विरारच्या नदीत आढळले बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह
विरारमधील नदीत तीन बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह आज (बुधवार) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिन्ही विद्यार्थी विरारमधील एका इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थी होते. गेल्या 25 ऑगस्टपासून ते बेपत्ता होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही मृत विद्यार्थी विरारमधील वागड गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत नववीच्या वर्गात शिकत होते. बुधवारी सकाळी तिघां मृतदेह शाळेमागील नदीत तरंगताना आढळून आले. तिघे शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहात होते. तिने नदीवर पोहोण्यासाठी गेले असावे. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदा विरार पोलिसांनी वर्तवला आहे.