शिवसेनेचा नरेंद्र मोदींना टोला
नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह रावांच्या नावाच्या फक्त पाट्या पुसून नवे घडणार नाही. आपला इतिहास आपणच घडवायला हवा' असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. '
'आधीच्या सरकारने काहीच केले नाही हा मंत्र नसून तुणतुणे असते. आधीच्या सरकारांनी काहीच केले नसते तर आजचा देश दिसलाच नसता' असेही त्यांनी म्हटले असून ' कर्ज काढून सण साजरा करण्याची परंपरा येथे आहेच. हे कर्ज कमी झाले तरी देश पुढे जाईल' असा सल्लाही उद्धव यांनी दिला आहे.