बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 7 नोव्हेंबर 2015 (10:51 IST)

संमेलनाचा वाद जाणार कोर्टात

८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली असली तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. माझ्या वाट्याची सहाशेहून अधिक मते गायब झाल्याची तक्रार कवी विठ्ठल वाघ यांनी केली असून या प्रकरणात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सबनीस यांना ४८५, तर कवी विठ्ठल वाघ यांना ३७३ मते मिळाली आहेत. मात्र, वाघ यांनी या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे. निवडणुकीची प्रक्रिया साहित्यिकांच्या हातात राहिली नसून इतर लोकच ती चालवित असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. दरम्यान, या प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात आले.