शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

श्राद्ध करताना या 6 नियमांचे पालन जरूर करा

आश्विन शुक्ल पक्षाचे 15 दिवस, श्राद्धासाठी खास मानले जातात. तसे तर प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला, पितरांसाठी श्राद्ध आणि  तर्पण केले जाते. या 15 दिवसांमध्ये जर पितर प्रसन्न झाले तर कुटुंबात आनंद येतो आणि जीवनात कधीही कुठल्याही बाबींची कमतरता येत नाही. म्हणून श्राद्ध करताना या गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे.   
 
ही आहे प्रक्रिया
श्राद्ध दरम्यान तर्पणमध्ये दूध, तीळ, कुशा, पुष्प, गंध मिश्रित पाण्याने पितरांना तृप्त करण्यात येते. ब्राह्मणांना भोजन आणि पिण्ड दानाने पितरांना भोजन दिले जाते.  
 
श्राद्ध केव्हा करावे  
श्राद्धासाठी दुपारी कुतुप आणि रौहिण मुहूर्त श्रेष्ठ आहे. कुतुप मुहूर्त दुपारी 11:36 वाजेपासून 12:24 वाजेपर्यंत राहत. तसेच रौहिण मुहूर्त दुपारी 12:24 ते दिवसा 1:15वाजेपर्यंत असत. कुतप कालात देणार्‍या दानाचे अक्षय फळ मिळत. पूर्वजांचे तर्पण, प्रत्येेक पौर्णिमा आणि आमावस्याला करायला पाहिजे.  
 
श्राद्धाच्या 15 दिवसांमध्ये पाण्याने तर्पण करावे 
श्राद्धाच्या 15 दिवसांमध्ये, पाण्याने तर्पण करणे जरूरी आहे. चंद्रलोकाच्या वर आणि सूर्यलोकाजवळ पितृलोक असल्याने, तेथे पाण्याची कमतरता आहे. पाण्याने तर्पण केल्याने पितरांची तहान संपते बुजते नाही तर पितर तहालेले राहतात.  
 
श्राद्धासाठी योग्य कोण  
वडिलांचे श्राद्ध मुलगा करतो. मुलगा नसल्यास बायकोला श्राद्ध करायला पाहिजे. बायको नसल्यास सख्या भावाने श्राद्ध केले पाहिजे. एकापेक्षा जास्त पुत्र असल्यास मोठ्या पुत्राला श्राद्ध करायला पाहिजे.  
 
रात्री श्राद्ध करणे वर्जित आहे  
केव्हाही रात्री श्राद्ध नाही करायला पाहिजे. सायंकाळी देखील श्राद्धकर्म केले जात नाही.  
 
भोजन कसे असावे  
श्राद्धात जेवणात जौ, मटर आणि सरसोचे वापर श्रेष्ठ आहे. जेवणात तेच पक्वान्न बनवायला पाहिजे जे पितरांना पसंत होते. गंगाजल, दूध, शहद, कुश आणि तीळ सर्वात जास्त गरजेचे आहे. तीळ जास्त असल्यास त्याचे फल अक्षय असत.  
 
श्राद्ध कुठे करावे 
दुसर्‍यांच्या घरी राहून श्राद्ध नाही करायला पाहिजे. फारच आवश्यक असेल तर भाड्याच्या घरात श्राद्ध करू शकता.