<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[मनाचिये गुंती]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/marathi-career-counciling</link>
    <description><![CDATA[करीअरच्‍या वेगवेगळ्या संधी उपलब्‍ध करून देणारे चॅनल, रोजगार, शिक्षण, नोकरी यासाठीच्‍या मार्गदर्शनासह प्रभावशाली संवाद कौशल्‍य, व्‍यक्‍तीमत्‍व विकास, मुलाखतीला सामोरे जाताना, कसा असावा तुमचा सीव्‍ही, अर्ज करताना काय काळजी घ्‍यावी. अशा अनेक गोष्‍टींचा ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Mon, 15 Jun 2026 07:38:04 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>मनाचिये गुंती</title>
      <url>https://marathi.webdunia.com/marathi-career-counciling</url>
      <link>https://marathi.webdunia.com/marathi-career-counciling</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/marathi-career-counciling-1020307.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[यश एका दिवसात नाही]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-career-counciling/success-is-not-in-a-day-120110400018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-career-counciling/success-is-not-in-a-day-120110400018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2019-08/17/thumb/1_1/1566054779-8469.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2019-08/17/thumb/1_1/1566054779-8469.jpg</image>
      <description><![CDATA[यश मिळवण्याचा मार्ग कधीही एका दिवसात दिसत नाही. त्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असते आणि ते आपण करत असाल तर विजयाचा मार्ग निश्चित होतो.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="354" src="https://media.webdunia.com/_media/hi/img/article/2019-08/17/full/1566054779-8469.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="success" width="630" /></p>
	यश मिळवण्याचा मार्ग कधीही एका दिवसात दिसत नाही. त्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असते आणि ते आपण करत असाल तर विजयाचा मार्ग निश्चित होतो.<br />
	 </p>
<p>
	आजकाल प्रत्येकाला त्वरित यश मिळवायचं असतं. तरुण पिढी नोकरी करायला लागून एक वर्ष पूर्ण होत नाहीत तोवरच ते प्रमोशनची मागणी आणि अपेक्षा करायला लागतात. अशाच प्रकारे विार्थी परीक्षेच्या आधी केवळ दोन महिन्यांपासून अभ्यासाची पुस्तकं वाचायला लागतात आणि परीक्षेच्या निकालात त्यांना चांगले गुण अपेक्षित असतात. आपल्याही मनात तसं येत नसेल तर ते वास्तवात शक्य होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. आपल्याला पुढचं मार्गक्रमण करायचं असेल तर कोणतीही कामं न करता हळूहळू कार्यरत व्हायला हवं. एकाच दिवसात यश कधीही मिळत नाही. एखादं मोठं घर बनवण्यासाठी लहान आकाराच्या असंख्य विटांचा वापर करावा लागतो.त्यामध्ये यशाचा महाल तयार करायचा असेल तर त्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतील.</p>
<p>
	 </p>
<p>
	आज आपण यशस्वी व्यक्तीकडे पाहून त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याआधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. त्यानेही छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात करुन आज तो यशोशिखरावर पोहोचलेला असतो. एखादी व्यक्ती आपल्याला त्वरित यशस्वी बनवण्याचं किंवा आपली प्रगती त्वरित होईल अशी आश्वासनं देत असेल तर ती व्यक्ती आपल्यासाठी खोटारडेपणा करुन तुम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या. आपण यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करायला लागता त्यावेळी नंतर हे परिश्रमच यशाचा पाया ठरतात. मेहनत केल्याशिवाय यशाची पायाभरणी होत नाही आणि आपण आपलं उद्दिष्ट साध्य करु शकत नाही. एखादी टेकडी त्या जागेवरुन दूर करायची असेल तर तिच्या पायापासून सुरुवात करायला हवी. त्यामध्ये सुरुवातीला येणार्या अडचणी आपण दूर करु शकाल तर एक मोठं स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही. ते करण्यासाठी आपल्यामनाला सातत्याने प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	असं करताना हे तू करु शकणार नाहीस असं कोणी म्हणत असेल तर घाबरुन जायचं कारण नाही तर आपण आत्मविश्वासानेकाम करत राहिलं पाहिजे. आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने रोज एक पाऊल उचललं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन काम पूर्ण करण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करता त्यावेळी आपण उत्साहित राहतो. काम करण्याची प्रेरणा वाढते. पुढे जाण्याचा उत्साह कायम असेल तर आपल्याला मिळणारा विजय निश्चित ठरतो.</p>
<p>
	सतीश जाधव</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 04 Nov 2020 11:44:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 04 Nov 2020 11:46:25 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Career Counciling]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नोकरी बदलताय?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-career-counciling/नोकरी-बदलताय-115100700024_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-career-counciling/नोकरी-बदलताय-115100700024_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/lifestyle/2014-04/03/thumb/1_1/1396525375-3781.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/lifestyle/2014-04/03/thumb/1_1/1396525375-3781.jpg</image>
      <description><![CDATA[लिंक्ड इन या प्रोफेशनल नेटवर्किंग साईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार नोकरी शोधण्यात आणि बदलण्यात भारतीय आघाडीवर आहेत. चांगली संधी मिळाली की लगेच आधीची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. जादा पगार हे नोकरी सोडण्यामागील महत्त्वाचं कारण ठरतं. तरुण पिढी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<span style="font-size: 16px;">लिंक्ड इन या प्रोफेशनल नेटवर्किंग साईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार नोकरी शोधण्यात आणि बदलण्यात भारतीय आघाडीवर आहेत. चांगली संधी मिळाली की लगेच आधीची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. जादा पगार हे नोकरी सोडण्यामागील महत्त्वाचं कारण ठरतं. तरुण पिढी एका ठिकाणी अजिबात टिकत नाही. पण दुसर्‍या ठिकाणी मिळणारा गलेलठ्ठ पगार एवढाच निकष लक्षात घेऊन नोकरी सोडणं योग्य ठरत नाही. नोकरी सोडण्याआधी इतर काही बाबी लक्षात घेणंही गरजेचं असतं.</span></p>
<p>
	<br />
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="career" class="imgCont" height="200" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/hp/lifestyle/2014-04/03/full/1396525375-3781.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	<br />
	 </p>
<p>
	<br />
	<span style="font-size:16px;">* नोकरी बदलण्याचा निर्णय घेताना काही बाबींचा विचार करायला हवा. मुख्य म्हणजे केवळ पैशाला महत्त्व न देता नव्या ठिकाणी मिळणार्‍या प्रशिक्षणातून तुम्हाला काही शिकायला मिळणार आहे का, तिथे एकाच प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं का, नव्या नोकरीत विकासाच्या काही संधी मिळणार आहेत का, प्रोफेशनल म्हणून तुमची वाढ होणार आहे का या बाबी विचारात घेणं गरजेचं आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">* सध्याच्या कंपनीच्या कल्चरपासून तुम्ही दुरावला आहात का, याचा काही क्षण विचार करा. कंपनीतल्या वातावरणात तुम्ही आनंदी असाल, सहकार्‍यांसोबत तुमचं चांगलं ट्यूनिंग असेल, तुमचा उत्तम ग्रुप असेल तर अशा परिस्थितीत फक्त पैशांचा विचार करून नोकरी सोडणं कितपत योग्य याचाही विचार व्हायला हवा.</span></p><p>
	<span style="font-size: 16px;">* ऑफिसमध्ये मिळणार्‍या पायाभूत सोयीसुविधा आणि ऑफिसमधलं वातावरण कामासाठी पोषक असायला हवं. काम करताना तुम्हाला आनंदी, उत्साही वाटायला हवं. या बाबी लक्षात घेऊन नव्या नोकरीचा अर्ज करा.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;">* </span><span style="font-size: 16px;">तुमची कंपनी़, कंपनीतली माणसं तुमच्यावर विश्वास टाकतात का, याचाही विचार करता नव्या कंपनीतही हेच वातावरण असेल काल याबाबत बारकाईनं विचार करा. कंपनीतल्या लोकांचा तुमच्या कामावर विश्वासच नसेल तर अशा कंपनीत काम करून काहीच लाभ होणार नाही.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;">* </span><span style="font-size: 16px;">तुमच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतीकडे लक्ष द्या. कंपनीत तुम्हाला शिकण्याच्या संधी मिळायला हव्यात. तुमच्या वैयक्तिक विकासासाठी पोषक वातावरण असायला हवं.</span><br />
	<br />
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="420" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/hp/lifestyle/2014-03/01/full/1393678311-7922.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="400" /></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 07 Oct 2015 16:54:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 07 Oct 2015 17:04:05 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Career Counciling]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मजबूत मन हेच सामर्थ्य]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-career-counciling/मजबूत-मन-हेच-सामर्थ्य-108071900014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-career-counciling/मजबूत-मन-हेच-सामर्थ्य-108071900014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/lifestyle/2014-04/03/thumb/1_1/1_1/1396525375-3781.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/lifestyle/2014-04/03/thumb/1_1/1_1/1396525375-3781.jpg</image>
      <description><![CDATA[एखाद्या शास्त्रीय नर्तिकेचा अपघातात एक पाय निकामी होऊनही तिची नृत्याची जिद्द कमी होत नाही. ती नकली पाय बसवून व्यासपीठावर नाचते. एखाद्या क्रिकेटपटूने]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/19/images/img1080719014_1_1.jpg' Alt='jivan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>एखाद्या शास्त्रीय नर्तिकेचा अपघातात एक पाय निकामी होऊनही तिची नृत्याची जिद्द कमी होत नाही. ती नकली पाय बसवून व्यासपीठावर नाचते. एखाद्या क्रिकेटपटूने चांगला खेळ केला तरीही त्याला संघाबाहेर जाण्याचा रस्ता दाखविला जातो. परंतु, तो हार न मानता पुन्हा संघात दाखल होतो. एका महान चित्रपट निर्मात्याच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाला दर्शकांनी नकार दिल्यानंतर तो पुन्हा एक चित्रपट निर्माण करतो आणि तो चित्रपट इतिहास घडवितो किंवा मैलाचा दगड ठरतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असे नेहमीच होते. कारण जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणचे कमजोर मनाचे आणि दुसरे म्हणजे मजबूत मन असलेले. कमजोर मन असणार्‍या लोकांमध्ये संकटाचा सामना करण्याचे धाडस नसते. त्यामुळे ते अधिकधिक कमजोर होऊन तक्रार करणे, रडणे यामुळे अयशस्वी होतात. मात्र आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍याच्या माथ्यावर फोडण्यासाठी कारणे शोधतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मजबूत मन असणारे लोक असे नसतात. ते प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करतात. टीकाकारांनी केलेली टीका त्यांचे मन बदलू शकत नाही. ते आपली हिंमत गमावत नाहीत, ते तक्रार करत नाहीत. ते प्रत्येक घटनेचा सकारात्मक बाजूने विचार करून एक दिवस यशस्वी होतात. कारण, त्यांच्यामध्ये संकटाच्याकाळी आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा असते. ते जीवनातील प्रत्येक आव्हानाचा अधिकाधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण यापैकी कसे आहात आणि कसे बनू इच्छिता, ते ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. कारण, जीवनात प्रत्येकाला एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे, आपण साहसी बनू इच्छिता की भित्रे? सकारात्मक विचार करणारा कधीच भित्रा बनू शकत नाही. कारण, त्याचा स्वत:वर, जीवनावर आणि ईश्वरावर विश्वास असतो. ते उच्च विचारशक्ती आणि आत्मविश्वासाने आपले काम करतात. असे लोक आपल्यासाठी काम करतातच पण त्यांच्यामुळे देश आणि समाजाची प्रगती होत असते. असेच लोक देश आणि समाजाची अनमोल संपत्ती असतात. म्हणून नेहमी आपले मन मजबूत ठेवा. कारण, ए. पी. जे. अब्दुल कलाम, धीरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडूलकर या महान लोकांनी जन्म घेतला नसता तर एवढे मोठे कर्म त्याच्या हातून झाले नसते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 19 Jul 2008 12:15:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Career Counciling]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तुम्ही विसराळू आहात का?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-career-counciling/तुम्ही-विसराळू-आहात-का-108062400036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-career-counciling/तुम्ही-विसराळू-आहात-का-108062400036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/lifestyle/2014-04/03/thumb/1_1/1_1/1_1/1396525375-3781.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/lifestyle/2014-04/03/thumb/1_1/1_1/1_1/1396525375-3781.jpg</image>
      <description><![CDATA[आपणच ठेवलेल्या वस्तू नेमक्या कुठे ठेवल्या ते आपल्याला आठवत नाही. आपण ठरवलेली महत्वाची कामं आपल्याला दिवसभर आठवत नाहीत, पण रात्री झोपताना आठवतात. ते इतकं महत्वाचं काम करायला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आपणच ठेवलेल्या वस्तू नेमक्या कुठे ठेवल्या ते आपल्याला आठवत नाही. आपण ठरवलेली महत्वाची कामं आपल्याला दिवसभर आठवत नाहीत, पण रात्री झोपताना आठवतात. ते इतकं महत्वाचं काम करायला आपण विसरलो म्हणून हळहळत बसतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या स्मरणशक्तीला दोष देतो. अनेक गोष्टी आपल्याला हव्या तेव्हा आठवत नाही म्हणून आपलं बरचं नुकसान होतं व आपण हतबल होत जातो. विज्ञानातीलं संशोधनं असं सांगतात की मानवी मेंदूची क्षमता ही स्नायूंसारखी असते. स्नायू जसे विशिष्ट व्यायाम करून विकसित करता येतात, त्यांची क्षमता वाढवता येते, त्याच पद्धतीने माणसाच्या मेंदूची क्षमतादेखिल विशिष्ठ तंत्र वापरून व सराव करून वाढवता येते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप' जिंकणारा डॉम्निक ओब्रायन नावाचा ४० वर्षाचा माणूस केवळ ५ मिनिटांमध्ये २४० आकडे अचूक लक्षात ठेवतो व केवळ ४२ सेकंदात ५२ पत्यांचा सिक्वेन्स एकही चूक न करता लक्षात ठेवतो. ओब्रायनला लोक विचारतात की तुझ्यात ही क्षमता कुठून आली तेव्हा तो म्हणतो की ही क्षमता माझ्यात जन्मजात नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणामुळे हे साध्य झाले आहे. जे स्वतःची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात त्यांची स्मरणशक्ती वृद्धावस्थेतही कुशाग्र राहते. १४ वर्षाखालील सुमारे ३२ टक्के मुलांना स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र शिकवले जाते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आजच्या काळात सतत माहितीचा ओघ आपल्यापर्यंत येत असताना स्मरणशक्ती वाढविणे या गोष्टीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो आपल्या स्मरणशक्तीचे कौशल्य सिद्ध करतो तो नेहमीच सर्वांच्या पुढे जातो. आपली परिक्षापद्धतही स्मरणशक्तीच्या क्षमतेवर आधारलेली आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे प्रगती जर करायची असेल तर आपल्याला स्मरणशक्ती जास्तीत जास्त वाढवावी लागेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>लेखक नागपूरमधील नामवंत कंसल्टंट सायकॉलॉजिस्ट आहेत.) </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 24 Jun 2008 16:36:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:56:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Career Counciling]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
