<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[मैत्री दिन]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/marathi-friendship-day</link>
    <description><![CDATA[Friendship Day Special In Marathi – Get all about Friendship Day In Marathi, Friendship Day Marathi Scraps, Friendship Day Marathi SMS, Friendship Day Messages Marathi and many more! मैत्र दिनी शोधा तुमचा खराखुरा मित्र कोण? मैत्री दिन, फ्रेंडशिप डे, ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Mon, 15 Jun 2026 10:39:42 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>मैत्री दिन</title>
      <url>https://marathi.webdunia.com/marathi-friendship-day</url>
      <link>https://marathi.webdunia.com/marathi-friendship-day</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/marathi-friendship-day-1021001.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[मतभेद राखून मैत्रीः टिळक व आगरकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/मतभेद-राखून-मैत्रीः-टिळक-व-आगरकर-107080400032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/मतभेद-राखून-मैत्रीः-टिळक-व-आगरकर-107080400032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्राच्या इतिहासात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मैत्र (आणि मतभेद) दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे. पण बहुतेकवेळा या दोघांतील मैत्रिपेक्षा त्यांच्यातील मतभेदच अधिक...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राच्या इतिहासात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मैत्र (आणि मतभेद) दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे. पण बहुतेकवेळा या दोघांतील मैत्रिपेक्षा त्यांच्यातील मतभेदच अधिक प्रकर्षाने पुढे येतात. ते सहाजिकही आहे. पण त्यांच्यातील मतभेद परस्पर प्रेमात आणि स्वतःशी प्रामाणिक रहाण्यातच दडले आहेत हेही मानले पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आणि त्यानंतर केसरी व मराठी सुरू केल्यानंतर काही वर्षांत मुलभूत भूमिकांसंदर्भात दोघांचे मतभेद पुढे येऊ लागले. आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे अनेक कारणावरून मतभेदाची दरी रूंदावत गेली.  संमतीवयावरून आणि बालविवाहाच्या प्रश्नावरून ती वाढली. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. हे मतभेद पुढे वाढत गेले याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण त्यानंतर आणि तत्पूर्वीही दोघे अत्यंत चांगले मित्र होते. शिवाय एकमेकांच्या विचारांशी प्रामाणिक मतभेद राखून परस्परांवर प्रेम करणारे होते. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतभेदांनी दोघांना विभक्त केले ते वर्ष होते. 1887. या वर्षीच्या 25 ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फूट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` अशा शब्दांत दोघांचे संबंध तुटले. पण मने तुटली नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत. आणि टिळकही त्या छापत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधाचे हे एक उदाहरण.   </font><font  style='font-size:11pt; color:#000000'>तीव्र मतभेद असतानाही हे दोघे एकमेकावंर प्रेम करीत. सार्वजनिक वादात शिवीगाळ झाली असतानाही अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहित असता टिळक घळाघळा रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.`` </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय. यात शंका नाही.`` </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर 21 वर्षांनी म्हणजे 1916 मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते,</font><font style='font-size:11pt;'></font><br/>``<font  style='font-size:11pt; color:#000000'>सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनु्ष्यासहि दारिद्र्यांत राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखरे गावा लागतो.``</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>``....<font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्रापत् करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेऊन संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरूषच खरे धीर पुरूष हो</font><font style='font-size:11pt;'>त``</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्रीत मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी ही दोन्ही माणसे होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#0000FF'>संदर्भः लोकमान्य टिळक चरित्रः लेखक न. चिं. केळकर)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:37:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/ऍस्टेरिक्स-आणि-ओबेलिक्स-107080400031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/ऍस्टेरिक्स-आणि-ओबेलिक्स-107080400031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ही कहाणी आहे, दोन मित्रांची. एक आहे बलदंड शरीराचा, अदभुत शक्ती अंगी असलेला, तर दुसरा किरकोळ शरीरयष्टीचा ठेंगणा पण बुद्धीने सामर्थ्यवान. ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स ही त्यांची नावं. 1961 पासून...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>ही कहाणी आहे, दोन मित्रांची. एक आहे बलदंड शरीराचा, अदभुत शक्ती अंगी असलेला, तर दुसरा किरकोळ शरीरयष्टीचा ठेंगणा पण बुद्धीने सामर्थ्यवान. ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स ही त्यांची नावं. 1961 पासून या जोडगोळीने आपल्या धमाल विनोदी कॉमिक्सने अख्ख्या युरोपसह जगाला वेड लावलं. मूळची फ्रेंच भूमीतली, आणि जगातल्या बहुतांश भाषांत भाषांतरित झालेली ही जोडगोळी म्हणजे मैत्रीची निराळी दास्तान आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सन 1960च्या सुमारास रेनी गोस्किनो आणि अल्बर्टो उदेर्झो हे दोघे फ्रेंच मित्र एकत्र आले आणि त्यांनी ही अजरामर जोडगोळी जगाला बहाल केली. गोस्किनोने यातील बहुतांश कथांचं लेखन केलं, तर आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी उदेर्झोने या कहाण्या जिवंत केल्या. त्यापुर्वीही त्यांनी एकत्र निर्मिलेली एक कार्टून मालिका लोकप्रिय ठरली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असं काय आहे या जोडगोळीत? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स हे रहिवासी आहेत, प्राचीन गॉलचे. एका खेडेगावात हे दोघे राहतात. हे गाव काही असे-तसे नाही. या गावातील लोकांना मिळालंय एक जादुई द्रव्य. जे प्यायल्याने माणसाच्या अंगी हजार हत्तींचं बळ येतं. या द्रवाचा शोधही त्या गावात राहणाऱ्या गेटाफिक्स या वैदूने लावलाय. ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स ही जोडगोळी या जादुई शक्तीच्या बळावर जगभरात आणि विशेषत: रोमन साम्राज्यात जो धूमाकूळ घालतात, त्याच्या या कहाण्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओबेलिक्सच्या बलदंड शरीराचं आणि अंगभूत सामर्थ्याचं रहस्य म्हणजे, अगदी लहान असताना तो खेळता खेळता गेटाफिक्सच्या जादुई द्रव्याच्या पिंपातच पडला, त्याचा परिणाम त्याला प्रचंड बळ प्राप्त झालं, इतकं की आता आयुष्यभर त्याने त्या द्रव्याचा एकही थेंब घेतला नाही तरी चालेल. मात्र ओबेलिक्स महाशयांना हे द्रव प्रचंड आवडतं, त्यामुळे गेटाफिक्सची नजर चुकवून ते पिण्याचे त्याचे प्रयत्न आणि गेटाफिक्सने त्याला दाद न लागू देणं, या झटापटीतून निर्माण होणारे विनोद आबालवृद्धांची करमणूक करत आलेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्स या जोडगोळीनं केवळ मुलांनाच नाही, तर प्रौढांनाही आकर्षित केलंय, आणि या आकर्षणामागचं कारण आहे त्यातील कहाण्यांत लपलेला उपहास. </font><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्सची कथानकं जरी प्राचीन काळात घडत असली, तरी त्यात वर्तमानातील घडामोडींशी साधर्म्य दाखवून तिरकस शैलीत चिमटे काढण्याची कामगिरी गोस्किनो -उदेर्झोने चोख पार पाडली. या राजकीय, सामाजिक उपहासामुळे ही कॉमिक सीरिज निव्वळ कॉमिक सीरिज न राहता एक राजकीय कॉमेंट्री बनली . </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अनेक समकालिन राजकीय, सामाजिक, सेलिब्रिटींच्याही वृती- प्रवृत्तीचे विडंबन या कॉमिक सीरिजने केलं. त्यात एलिझाबेथ टेलर, बीटल्स, शॉन कॉनरी, जेम्स बॉंड, कर्क डग्लस, लॉरेन्स ऑलिव्हिए, अलेक गिनेस यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऍस्टेरिक्स-ओबेलिक्स जोडगोळीची एकूण जवळपास 33 साहसकथा खंड प्रकाशित झाले आहेत, आणि जगभरातल्या पुस्तकांच्या क्रमवारीत बेस्टसेलर ठरले आहेत. 1977 मध्ये गोस्किनोच्या मृत्यूनंतरही उदेर्झोने ही दास्तान चितारणे सुरू ठेवले . मात्र, गोस्किनोच्या लेखणीतला उपहास त्याला आपल्या शब्दांत उतरविणे जमले नाही, त्यामुळे ही नंतरची कथानकं जाणकारांच्या आणि वाचकांच्याही पसंतीस उतरली नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऍस्टेरिक्स आणि ओबेलिक्सच्या कथानकांवर चित्रपटही निघाले आहेत, ते झी स्टुडिओसारख्या इंग्रजी वाहिन्यांवर अधूनमधून पहायला मिळतात. मैत्रीदिनानिमित्त या आगळ्या-वेगळ्या जोडीचा हा अल्प परिचय. पूर्ण परिचय करून घ्यायचा असेल , तर आजच ऍस्टेरिक्स कॉमिक्स वाचा. तुम्ही या जोडगोळीचे फॅन व्हाल हे नक्की!</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:36:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वडापावाइतकेच अविभाज्य सचिन- विनोद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/वडापावाइतकेच-अविभाज्य-सचिन-विनोद-107080400026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/वडापावाइतकेच-अविभाज्य-सचिन-विनोद-107080400026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीने शालेय जीवनातील स्पर्धा ते आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंतचा प्रवास केला आहे. आजही त्यांची मैत्री कायम आहे. भारतीय फलंदाजीतील हे दोन भिन्न प्रवाह. आयुष्याच्या एका क्षणी ते]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804026_1_1.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीने शालेय जीवनातील स्पर्धा ते आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंतचा प्रवास केला आहे. आजही त्यांची मैत्री कायम आहे. भारतीय फलंदाजीतील हे दोन भिन्न प्रवाह. आयुष्याच्या एका क्षणी ते एकत्र आले. वाढले. एकमेकांत मिसळून गेले. कारकिर्दीत आज एकत्र नसले तरी परस्पर स्नेहाचा ओलावा ह्रदयात जपत आपापल्या मार्गाने त्यांची वाटचाल सुरू आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोघांचे मार्ग सुरवातीपासून भिन्न. एकाचा प्रवास गरिबी, कष्ट, अतृप्ती, निराशा, संघर्ष व बंड या मार्गाने झालेला. तर दुसर्‍याचा  सुख, समाधान, संतोष आणि शिस्तबद्ध असा. मात्र, दोघांमधील साम्य एकच- खेळाप्रती असीम निष्ठा व भक्ती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सचिन व विनोदची पहिली भेट लहानपणीच शारदाश्रमात झाली. त्यावेळी सचिन दह तर विनोद होता अकरा वर्षाचा. शारदाश्रमाकडून सेंट झेवियर्सविरूद्ध दोघांनी १९८८ मध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी 664 धावांची भागीदारी रचली. दोघांचे मैत्र तेव्हापासून जुळले ते कायमचेच. ‍शिवाजी पार्कवर प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सराव केला की वडा-पावची मेजवानी ठरलेलीच.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्या मैत्रीचा धागा वडापावशी तेव्हापासून जोडला गेला तोही कायमचाच. एकाने शतक ठोकलं की दुसर्‍याने वडा-पावची पार्टी देऊन सेलिब्रेट करायचे. लहान वयातच मैत्र जुळल्याने त्यांच्या मैत्रीत असूयेला शिरकाव करायला फटच सापडली नाही. १९८९ मध्ये सचिनची पाक दौर्‍यासाठी भारतीय संघात निवड झाली. दोघेही हर्षोर्ल्हासाने बेभान झाले. मित्राच्या आनंदात आनंद शोधण्याचा मोठेपणा त्यांच्यात तेव्हापासूनच भिनला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804026_1_2.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top'>IFM</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सचिनच्या निवडीनंतर वृत्तपत्रांमध्ये जागतिक भागीदारीतील दुसरा सवंगडी कुठाय? या आशयाचे वृत्त, लेख प्रकाशित झाले. त्याच वर्षी सचिनपाठोपाठ विनोदनेही भारतीय संघात प्रवेश केला. विनोदच्या कारकिर्दीची सुरवात संथ झाली. पण 224 धावांची द्विशतकी खेळी करून इंग्लंडविरूद्ध सवौच्च धावसंख्या उभारणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला. त्यानंतर त्याने अनेक अविस्मरणी खेळी केल्या. अव्वल गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. जागतिक कीर्तीच्या शेन वार्नला फोडून काढणारा पहिला भारतीय तोच.</font><font  style='font-size:11pt; color:#000000'>सचिन आणि विनोद या दोघांच्याही प्रवृती व स्वभावात कमालीची भिन्नता. सचिन शांत, संयमी, नम्र व शिस्तबद्ध तर विनोद अस्थिर, खळाळत राहणारा, उथळ आणि बेदरकारही. विनोदच्या जीवनाची वाट चढउतार युक्त. वादाची वादळे तर कायमचीच त्याच्याभोवती घोंघावणारी. १९९३ मध्ये झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेसाठी पुण्यात असताना हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये नोएला नावांच्या सुंदर युवतीशी विनोदची गाठ पडली आणि 'लव्ह एट फ्रर्स्ट साइट' झाले. चार महिन्यात विवाहही झाला. मैदानावर खेळ मात्र, इतर वेळेस मौज-मजा करण्यात वाईट काय? असे त्याचे मत. फॅशन, स्टाइलचा तो सुरूवातीपासूनच चाहता. त्यामुळे त्याच्यासंदर्भातील वादात त्याच्या स्टाईलही वादाच्याच विषय ठरल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सचिनच्या बाबतीत असे काही झाले नाही. वाद त्याला सहसा स्पर्शला नाही. दोघांमधील सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमीचाही हा परिणाम असावा. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक व साहित्यिक. महानगरातील </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्यमवर्गीय धाटणीच्या वांद्रयात त्यांचे वास्तव्य. तर विनोदचे वडील गणपत कांबळी जेस्कीन विलियम कंपनीत नोकरीस. मुस्लिमबहूल भिंडी बाजार भागातील चाळीत विनोदचे बालपण गेले. दोघांनीही भारतीय क्रिकेटमधील प्रवेशाची खडतर वाट निश्चयाने व संघर्षाने पार केलेली. विनोदला मात्र जीवनसंर्घषातूनही तावून सुलाखून निघावे लागले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>घरापासून शाळेपर्यंत व तेथून खेळाच्या मैदानावर जाण्यासाठी विनोदकडे पैसे नसायचे. त्याच्या प्रवास खर्चाची जबाबदारी उचलली ती आचरेकर सरांनी. शाळेची फी भरली ती वर्गशिक्षिकेने. पुढे विक्रमी भागीदारीनंतर सचिन व त्यास दोघांनाही प्रायोजक मिळाल्याने तो संघर्ष एकदाचा थांबला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सचिन व विनोदच्या कारकिर्दीने आंतरराष्ट्रीय वाट पकडली तरीही शालेय जीवनापासूनच्या मैत्राची वीण मात्र घट्ट राहिली. सचिन ओव्हलवर शंभरावा कसोटी सामना खळत असताना विनोद मित्रास शुभेच्छा देण्यास विसरला नाही. येथेही त्याने त्याला शंभर वडा-पावची भेट दिली. सचिनने गावसकरच्या 35 कसोटी शतकांची बरोबरी केल्यावर आयोजित मेजवानीत विनोद प्रमुख पाहुणा होता. यावेळेस कोणती भेट दिली असेल? ... बरोबर पस्तीस वडापावची. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सचिनच्या धावा वाढत जातील तशी वडापावच्या संख्येतही वाढ होत राहील. अन त्यांच्या मैत्रीची वीण अधिक घट्ट होत राहिल. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:35:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>मनोज पोलादे</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[.... त्याही पलीकडील मै‍त्री]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/-त्याही-पलीकडील-मै‍त्री-107080400018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/-त्याही-पलीकडील-मै‍त्री-107080400018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[माझ्या मते आकर्षणाच्या पलीकडे जाऊन एखाद्या स्त्रीने पुरुषाशी वा एखाद्या पुरुषाने स्त्रीशी केलेली व तरीही गाढ व अव्याहत, निरंतर वाहत राहणारी मैत्री येथे विशेषत्वाने अभिप्रेत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804018_1_1.jpg' Alt='Friend' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वरचना झाली तेव्हापासूनच स्त्री आणि पुरुष हा आदिम व मूलभूत भेद भाणसाच्या प्रवृत्तीला चिकटला आहे. स्त्री व पुरुषातील नैसर्गिक आकर्षणाच्या स्थायीभाव हा चिरंजीव असला तरी त्याला असलेले असंख्य पापुद्रे सर्वसाधारण मानवी संवेदनांना अजिबात जाणवत नाहीत. माझ्या मते आकर्षणाच्या पलीकडे जाऊन एखाद्या स्त्रीने पुरुषाशी वा एखाद्या पुरुषाने स्त्रीशी केलेली व तरीही गाढ व अव्याहत, निरंतर वाहत राहणारी मैत्री येथे विशेषत्वाने अभिप्रेत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांकडून अशा प्रकारच्या मैत्रीचा प्रस्ताव येण्याचे प्रमाण अगदी नगण्यच. स्त्री मात्र अशा प्रकारच्या मैत्रीची असोशीने वाट बघत असणार्‍या मानसिकतेत वावरणारी. एक स्त्री व दुसरी स्त्री यांच्यातील मैत्री ही नाही म्हटले तरी एका विशिष्ट बिंदूपाशी थांबते एका विशिष्ट मर्यादेपलीकडे तिला विशाल होता येत नाही. असं थांबलेपण मैत्रीचं नातं जून करण्यास आपसूकच कारणीभूत ठरू लागतं. ती मागेही जात नाही पण थांबून गेलेला विस्तार त्या मैत्रीत मग फारसं अप्रूप उरत नाही. एक पुरूष व दुसरा पुरूष यांची मैत्री दोन स्त्रियांमधील मैत्रीपेक्षा काहीशा भिन्न मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते. या मैत्रीचे हृदय स्त्री-मैत्रीतील मानसिकतेपेक्षा अधिक विशाल असते. कारण 'जेलसी' हा स्वभाव दुर्विशेष प्रामुख्याने स्त्रियांचीच मक्तेदारी मानली जाते. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804018_1_2.jpg' Alt='Friend' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>स्त्री ही भावनेला प्रधान मानणारी तर पुरुष हा भावनेला काहीसे दुय्यम स्थान देणारा जात्याच असतो. वात्सल्य-ममता हे स्वभाव विशेष स्त्रीमधे ज्या प्रमाणात वास्तव्य करतात तेवढे ते पुरूषामध्ये करत नाहीत. एखाद्या भिन्न-लिंगी मैत्रीत बरेचदा भावनांना नीट हातळले गेले नाही म्हणून तणाव निर्माण होतो किंवा ती उपरोक्त कारणामुळे तुटायलाही येते. मैत्री सांभाळण्याचे कामही पुरूषांपेक्षा स्त्री जास्त जबाबदारीने करते. स्त्रीला जी मैत्री हवी असते. ती शरीर-निरपेक्ष व मनाच्या गुंत्याची अशी. परंतु, शारीरिक गुंत्यात गुंतायला पुरुष अधिक उत्सुक असतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लिंगभेदापलीकडील मैत्री असा अर्थ आपण त्याही पलीकडील मैत्रीच्या संदर्भात घेतला तर त्याहीपलीकहे पोहोचण्याची जी एक बौद्धिक, शारीरिक, मानसिक कुवत लागते ती बाळगण्याची किंवा तशी व्यक्ती उपलब्ध होण्याची टक्केवारी अतिशय नगण्य असते. खरे तर मैत्री असणारी कोणतीही दोन पात्रे एकमेकांच्या संदर्भात जे जाणतात ते इतर कुणीही जाणत नसते. म्हणूनच ज्या दोन व्यक्ती मित्र म्हणून मिरविणार्‍या असतात त्या एकमेकांविषयी आदर बाळगणार्‍या असतील तर त्या मैत्रीकडे केवळ आदराने बघण्याचा डोळा समाजाजवळ असावयास हवा. कारण ही मैत्री त्याहीपलीकडे जाण हे जास्तीत जास्त सहभाग समाजानेच या मैत्रीला कितपत घट्ट हात दिला आहे या समजण्यावर अवलंबून असते.</font><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याहीपलीकडे मैत्रीला पोहोचायचं असेल तर कोणत्याही नात्यांची लेबल, भिंती नकोत. नातं पूर्वीचेच एस्टॅबलीश झालेले असेल तर नात्याचा विसर पडून पुढे जाता यायला हवं नाहीतर सुखदेव क्षणकेंच्या शब्दात </font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>त्वचेच्या काठाशी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>रुतलेले घर रक्तावे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>रक्ताचे पखर नातीगोत</font><font style=' color:#000000;'>ी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असं म्हणण्याची वेळ येईल. मैत्रीचा प्रवास, कुठपर्यंत असावा हे ठरवणे संबंधित व्यक्तींच्या हातीच असते परंतु, ही मैत्री मग .... त्याही पलीकडे जाते अथवा नाही ही बाब बाजूला राहण्याची शक्यता असते. कारण उभयंताची संमती असेल तर शरीराच्या डोहात बुड़ून पल्याडची अनुभूती घेतली जाऊ शकते. परंतु, येथे उभयपक्ष समान अधिकार बाळगणारे असणे अत्यंत गरजेचे ठरते. जबरदस्ती किंवा लादले जाणे हा प्रकार उद्भवला तर ती लैंगिक शोषणाची बाब होऊ शकते व संबंधाना वेगळेच विघातक वळण लागण्याची शक्यता असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थोडक्यात .... त्याही पलीकडल्या मैत्रीचा अनुभव हा नशीबवान वा भाग्यवान लोकांचीच मक्तेदारी आहे असे म्हणू गेल्यास फारसे असंयुक्तिक ठरणार नाही. परंतु अशी मैत्री ही अत्यंत दुर्मिळ दुर्लभ व अशा मैत्रीच्या प्राप्तीसाठी कुठलीही किंमत चुकविण्याची तयारी ठेवणं हा प्रत्येक व्यक्तीला अभिमानास्पदच वाटण्यासारखं आहे. फक्त मैत्री हेवा करण्यासारखी असावी एवढाच मुद्दा आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:35:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>सौ. माधुरी अशिरगडे</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शब्दांना अर्थ देणारे सलीम-जावेद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/शब्दांना-अर्थ-देणारे-सलीम-जावेद-107080400029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/शब्दांना-अर्थ-देणारे-सलीम-जावेद-107080400029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[`ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही`, पोलिस स्टेशनमध्ये टेबलावर पाय पसरून बसलेल्या शेरखानला (प्राण) इन्स्पेक्टर विजय अर्थात अमिताभ बच्चन म्हटले, तेव्हा एका सुपरस्टारचा जन्म...]]></description>
      <content:encoded><![CDATA[`<font  style='font-size:11pt; color:#000000'>ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नह</font><font style='font-size:11pt;'>ी`, </font><font style='font-size:11pt;'>पोलिस स्टेशनमध्ये टेबलावर पाय पसरून बसलेल्या शेरखानला (प्राण) इन्स्पेक्टर विजय अर्थात अमिताभ बच्चन म्हटले, तेव्हा एका सुपरस्टारचा जन्म झाला. हा सुपरस्टार जन्माला आला तो स्वतःच्या गुणवत्तेने हे खरेच. पण त्याला यशस्वी होण्यासाठी लागणारे शब्द सुरवातीला दिले ते सलीम जावेद या जोडीने. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तोपर्यंत चौदा चित्रपट ओळीने फ्लॉप ठऱलेल्या अमिताभने गावी जायचे तिकीट जवळपास काढूनच ठेवले होते. पण सलीम जावेदच्या शब्दांनी त्याचे आयुष्य बदलले. केवळ जंजीरच नाही, शोले, दिवार, जंजीर, डॉन हे अमिताभच्या आयुष्यातील माईल स्टोन चित्रपट सलीम जावेदच्या लेखणीतून साकारले आहेत. सलीम-जावेद नसते तर अमिताभ यशस्वी ठरू शकला असता?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्न कठिण आहे. पण त्यासाठी या काळाच्या इतिहासातही डोकवावे लागेल. सलीम -जावेद या जोडीने आपल्या सशक्त कथा-पटकथा लेखनाने सत्तरचे दशक अक्षरश: गाजवले. या दोघांनी तब्बल अकरा वर्ष सोबत काम केले. पण त्यांची केमिस्ट्री इतकी जुळली होती की त्यातून अजरामर कलाकृती घडल्या. पण मुळात हे मैत्र झाले कसे असा प्रश्न पडतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मैत्री ठरवून होत नसते. तशी ही सुद्धा झाली नाही. सरहदी लुटेरा नामक चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे भेटले. जावेद अख्तरने त्याचे कथानक लिहिले होते. दोघेही चित्रपटसृष्टीत नशीब आजमवात होते. फिल्म सिटीत त्यांना अडीच हजाराची नोकरी मिळाली. रमेश सिप्पींकडे काम करत असतानाच त्यांची राजेश खन्नाशी भेट झाली. राजेश तेव्हा सुपरस्टार होता. त्याच्या शिफारशीनेच त्यांना हाथी मेरे साथीच्या पटकथा लेखनाची संधी मिळाली. यानंतर सलीम-जावेद जोडी जमली. त्यांनी मागे वळून बघितले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या जोडीने ‍चित्रपटनिर्मित कथा, पटकथा एक स्वतंत्र विभाग असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या यशाचे घोडे चौखूर उधळले. सलीम-जावेद ब्रँड प्रस्थापित केला. अमाप प्रसिद्धीचचा कैफ कुणावरही चढतोच. त्याला हे तरी अपवाद कसे असणार. आमच्या उत्तम पटकथानकामुळे दिग्दर्शकास फारसे काम शिल्लक राहत नसल्याची फुशारकी मारण्याचा मोह त्यांना आवरला नाही.  त्यामुळे काही निर्मात्यांनी त्यांच्याबरोबर काम करणेही बंद केले. </font><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दोघांची मैत्री जेवढी घट्ट तेवढेच त्यांचे यशाशी नातेही अगदी पक्के. सलीम-जावेद म्हणजे यश व यश म्हणजे सलीम-जावेद असे समीकरणच त्यांनी प्रस्थापित केले. त्यांनी लिहिलेल्या अनेक संवादांनी शब्दांना, भूमिकांना अर्थ दिला आहे. 'मेरे पास गाडी है, बंगला है.. तुम्हारे पास क्या है...? मेरे पास मॉ है.... (दिवार),  पचास कोस दूर जब कोई बच्च रोता है तो मॉं कहती है गब्बर आयेगा...(शोले), मुझे तो सब पुलिसवालोंकी सूरत एक जैसी लगती है (शोले). असे किती डायलॉग सांगावेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शोले तर पूर्ण संवाद पाठ असणारे आजही अनेक लोक आहेत. केवळ गद्य शब्दांच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. पण सलीम जावेदने ती करून दाखवली. शोले, दिवार, जंजीरचे संवाद बदलून दुसरे लिहिले तर तो चित्रपट तितका गाजेल? लोकांना ते आवडेल? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सलीम-जावेद जोडीच्यचा यशाचा झंझावात तब्बल अकरा वर्षे होता. त्यांच्या मैत्रीची घट्ट वीण यावरून दिसते. प्रचंड पैसा, प्रसिद्धी लाभूनही यश त्यांच्या डोक्यात शिरले नाही. इर्षा, असूया या मानवी भावनांचा या काळात त्यांच्यावर प्रभाव पाडू शकल्या नाहीत. पण तरीही ही जोडी 1980 नंतर फुटली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याची कारण अनेक सांगितली जातात. मतभेद हेही एक कारण. पण ते निर्माण कशामुळे झाले याचीही अनेक कारणे आहेत. जावेदच्या जीवनात शबाना आझमी आल्यानंतर जावेदला स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली. शायरीचा छंद त्यांना वयाच्या तेराव्या वर्षापासूनच होता. त्यामुळे या जोडीने विभक्त होऊन स्वतंत्रपणे काम करायला सुरवात केली. जावेदने गीतलेखनात स्वतःची वाट शोधली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नंतरही त्यांनी स्वतंत्रपणे पटकथा लिहिल्या. पण पूर्वीची सर त्याला आली नाही. विभक्त झाल्यानंतर सलिमने नाम व जावेदने प्रतिकारची पटकथा लिहिली. पण यश तितके मिळाले नाही. मध्यंतरी जावेदने दीर्घ कालावधीनंतर फरहानसाठी 'लक्ष्य' ची पटकथा लिहिली. पण चित्रपट फार गाजला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेवटी प्रश्न पडतो, दोघेही प्रतिभावान होते, तरीही स्वतंत्रपणे ते तितके यशस्वी संवादलेखन का करू शकले नाहीत? परस्पर प्रेरणेचा अभाव हे त्याचे उत्तर असू शकेल. सुरवातीला बरोबर काम करताना एकमेकांच्या शब्दांत प्राण त्यांनी ओतले असतील. त्यामुळेच शब्दांना अर्थ आला. एकमेकांची प्रेरणाही ते स्वतःच होते. त्यामुळे वेगळे झाल्यानंतर प्रेरणेचा हा स्त्रोतच आटला. आणि कागदावर फक्त शब्द लिहिले गेले. कोरडे. प्राणहीन.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:34:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>मनोज पोलादे</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जोडी तुझी माझी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/जोडी-तुझी-माझी-107080400025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/जोडी-तुझी-माझी-107080400025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मानवी भावभावनांचाच अविष्कार असलेला चित्रपटही मैत्री या भावनेपासून कसा वेगळा राहिल. चित्रपटासाठी काम करताना अनेकांचे सूर जुळले. मनांच्या तारा जुळल्या. परस्परांचे उत्तम कॉम्बिनेशन झाले. यातूनच]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मानवी भावभावनांचाच अविष्कार असलेला चित्रपटही मैत्री या भावनेपासून कसा वेगळा राहिल. चित्रपटासाठी काम करताना अनेकांचे सूर जुळले. मनांच्या तारा जुळल्या. परस्परांचे उत्तम कॉम्बिनेशन झाले. यातूनच मैत्रीचे बंध बांधले गेले. त्यामुळेच विशिष्ट जोडी एकत्र आली की त्यांची कलाकृती चांगली होते. तिला प्रतिसादही चांगला मिळतो. चित्रपटसृष्टीत अनेक दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री किंवा संगीतकार यांचे कॉम्बिनेशन तयार झाले आहे. हीट कॉम्बिनेशन म्हणून ते ओळखले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा मैत्रीची उदाहरणे तरी किती म्हणून सांगावीत. मागे डोकावले तरी बरीच उदाहरणे दिसून येतील. गुरूदत्त, देव आनंद, गुरूदत्त आणि जॉनी वॉकर या जोड्या अनेक चित्रपटात एकत्र होत्या. गुरूदत्त आणि जॉनी वॉकरला वेगळे काढता येणार नाही एवढे त्यांचे मैत्र जुळले होते. तीच कथा गुरूदत्त आणि पटकथाकार अब्रार अल्वींची. अनेक प्यासा, कागज के फूल सारखे अनेक चांगले चित्रपट या जोडीच्या संवेदनशीलतेतून जन्माला आले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिग्दर्शक राजकपूर, गीतकार शैलेंद्र व संगीतकार शंकर जयकिशन यांची जोडीही अशीच. आवारा, श्री. 420, मेरा नाम जोकर, बुटपॉलीश यासारख्या अद्वितीय कलाकृती या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारल्या. यात मुकेशचेही नाव घेता येईल. राज कपूरला मुकेशचा आवाज हे कॉम्बिनेशन इतके अतूट आहे, की राज कपूरची इतर गायकांनी ऐकलेली गाणी चटकन वेगळी वाटतात, एवढे राज आणि मुकेशच्या आवाजाचे मैत्र जुळले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शोलेमधील जय (अमिताभ) आणि वीरूची (धर्मेंद्र) यांची मैत्री अजरामर झाली. पण हेच कॉम्बिनेशन पुढील अनेक चित्रपटात यशस्वी ठरले. चुपके चुपकेमध्ये हे दोघे एकत्र होते. शोलेतील या जोडीला एक तिसराही कोन होता, अमजद खानचा. अमिताभ आणि अमिताभ हे नायक- खलनायकाची जोडी अनेक यशस्वी चित्रपटांचा पाया आहे. लावारीससह अनेक चित्रपटातून त्यांचा `यारान</font><font style='font-size:11pt;'>ा` </font><font style='font-size:11pt;'>दिसून येतो. अभिताभची जोडी काळानुरूप अनेक दिग्दर्शकांशी जमली. ऋषिकेश मुखर्जीपासून तर रामगोपाल वर्मापर्यंत. ऋषिदांसोबत त्याने अभिमान, मिली, गुड्डीसारखे संवेदनशील चित्रपट दिले.  प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई हे य़शस्वी व्यावसायिक कॉम्बिनेशन होते. या दोघांबरोबर अमिताभने मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी, जंजीर, नसीब अशा अनेक चित्रपटांत काम केले. ही यादी बरीच वाढवता येईल.  सध्या रामगोपाल वर्मांबरोबरही त्यांची केमेस्ट्रीही चांगली जुळली आहे. सरकारपासून तर सरकार राजपर्यंत त्याचेच प्रत्यंतर येते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अगदी अलिकडच्या काळातील उदाहरण घ्यायचे झाले तर गोविंदा डेव्हिड धवन, करण जोहर शाहरूख खान हे घेता येईल. शाहरूख खान हा करण जोहरचा अत्यंत आवडता अभिनेता आहे. त्यामुळे दिल तो पागल है, कुछ कुछ होता है पासून कभी अलविदा ना कहना पर्यंत त्यांची जोडी टिकून आहे. तीच कथा डेव्हिड धवन आणि गोविंदाची. ऑखेपासून दोघांची भट्टी अशी जमली की ते जणू एकमेकांचे `पार्टन</font><font style='font-size:11pt;'>र` </font><font style='font-size:11pt;'>आहेत की काय असे वाटते. मधल्या काळात डेव्हिडचे चित्रपट अपयशी ठऱत होते. पण त्याने गोविंदाला घेऊन पार्टनर केला आणि यशाची पाटी पुन्हा डेव्हिडच्या नावापुढे झळकली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुलजार संजीवकुमारची जोडीही अशीच. अगदी परफेक्ट. एकाच्या उक्तीतून दुसर्‍याची कृती उमटणार. ऑंधी, मौसम, कोशीश चित्रपट बघितले की त्यांच्या केमिस्ट्रीतून पडद्यावर साकारलेल्या अप्रतिम कलाकृतीचा प्रत्यय येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मधुर नाते </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संगीत हे क्षेत्र मुळातच एकमेकांच्या सहकार्यावर, मैत्रीवर अवलंबून असणारे क्षेत्र आहे. एसडी, आरडी बर्मन, अनिल विश्वास, सलील चौधरी, रवी, मदनमोहन या प्रतिभावंत संगीतकारांनी एकट्याने संगीत दिले असले तरी अनेक संगीतकार जोड्यांचे मधुर संगीत त्यांच्यातील मैत्रीच्या गोडीचे निदर्शक आहे. शंकर जय किशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी यांच्यापासून ते आजच्या शंकर एहसान लॉयपर्यंत ही यादी वाढवता येईल. पण याचबरोबरीने विशिष्ट् संगीतकाराचे विशिष्ट गायकाशी जुळलेले नाते अवीट गोडीची कलाकृती निर्माण करून जाते. लता मंगेशकर यांनी सर्वंच संगीतकारांबरोबर चांगली गाणी दिली. पण मदनमोहन आणि सचिन देव बर्मन यांच्याबरोबरची गाणी काही वेगळीच. त्याचवेळी ओ. पी. नय्यर यांनी लताला वगळून चांगले संगीत दिले ते आशा भोसलेंच्या साथीने. या दोघांची अतिशय चांगली गाणी आजही चटकन ओठावर येतात. राहूल देव बर्मन व किशोर हीसुद्धा अशीच प्रतिभावंत जोडी. हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळानंतरच्या काळातील अनेक अविस्मरणीय गाणी यांनी दिली आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मैत्रीची अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. पडद्याबाहेरचे हे मैत्र पडद्यावर सृजनात्मक अविष्काराला कारणीभूत ठरले आहे. या सृजनाच्या तळाशी मात्र त्यांचे जुळलेले सूर आहेत, हेही तितकेच खरे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Aug 2007 12:53:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>मनोज पोलादे</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मैत्र जीवांचे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/मैत्र-जीवांचे-107080400015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/मैत्र-जीवांचे-107080400015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ही कहाणी आहे अजय आणि विजय या दोन मित्रांची. दोघेही अगदी जीवलग मित्र. कुठेही जातील, काहीही करतील तर बरोबरच. एकाला झाका, दुसऱ्याला काढा, असं लोक त्यांच्याविषयी म्हणत]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही कहाणी आहे अजय आणि विजय या दोन मित्रांची. दोघेही अगदी जीवलग मित्र. कुठेही जातील, काहीही करतील तर बरोबरच. एकाला झाका, दुसऱ्याला काढा, असं लोक त्यांच्याविषयी म्हणत. एकदा दोघेही आपल्या गाडीतून नाशिकहून पुण्याला निघालेले. वाटेत त्यांची गाडी एका ट्रकला जाऊन धडकते. दोघेही जबर जखमी होतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉक्टर पटवर्धन त्यांच्यावर उपचार करत असतात. डॉक्टरांच्या उपचारांना यश येतंय असं दिसतं. अजय वाचतो, पण त्याला डोळे गमावावे लागतात. विजय अद्याप अत्यवस्थच असतो. दुसऱ्या दिवशी डॉक्टर त्याला भेटायला जातात. तेव्हा विजयची हालचाल दिसायला लागते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉक्टर पटवर्धन त्याची चौकशी करतात. </font><font style='font-size:11pt;'></font><br/>``<font  style='font-size:11pt; color:#000000'>कसाहेस बाळा. ``</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आतून आलेली कळ दाबत प्रयत्नपूर्वक चेहरा हसरा ठेवत विजय उत्तरतो, ``छानेय डॉक्ट</font><font style='font-size:11pt;'>र``. </font><br/>``<font  style='font-size:11pt; color:#000000'>विजय, तू खूप सहनशील आहेस. तुझ्यात धैर्यही आहे. म्हणूनच हे सारं तू सहन करू शकलास.``</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विजय क्षीणसं हसतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉक्टर जायला निघतात, थोडं पुढे जाताच, विजयने कष्टाने मारलेली हाक ऐकून ते मागे येतात. </font><font style='font-size:11pt;'></font><br/>``<font  style='font-size:11pt; color:#000000'>काय रे बाळ</font><font style='font-size:11pt;'>ा``</font><br/>``<font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉक्टर मी तुम्हाला काल जे सांगितलं ते तुमच्याजवळच ठेवा. कुणालाच सांगू नका. प्लीज.``</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉक्टर म्हणतात, ``नाही रे बाळा.`` </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे आजारातून अजय पुष्कळसा बरा होतो. आलेले अंधत्वही स्वीकारतो. काठी घेऊन बाहेर हिंडू फिरू लागतो. विजयला मात्र हॉस्पिटलमध्येच बराच काळ काढावा लागतो. चालणं त्याला जमत नाही. सुरवातीला अजय त्याला रोज भेटायला येत असे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉस्पिटल्या पायऱ्यांवरून येणारा अजयच्या काठीचा टॉक टॉक आवाज विजयला एकेक दिवस प्रेरणा देणारा ठरत होता. विशिष्ठ वेळेला कान गोळा करून तो त्या आवाजाची वाट पहात बसे. अजय आला की त्याला हायसं वाटायचं. पण पुढे अजयला हे येणं त्रासदायक वाटायला लागलं. सतत येणं आणि आजारी मित्रासोबत बसणं नको वाटायला लागलं. त्याने येणं कमी केलं. आधी एक दिवसाआड मग दोन मग तीन असं करत करत शेवटी त्याने येणंच थांबवलं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे विजयची प्रकृती बिघडत गेली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण एके दिवशी बातमी आली. विजय गेला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी काठीची मदत घेत अजय स्मशानात पोहोचला. डॉक्टर पटवर्धन तिथं होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते अजयजवळ आले. त्याच्या हातात एक पत्र देऊन म्हणाले. </font><font style='font-size:11pt;'></font><br/>``<font  style='font-size:11pt; color:#000000'>विजयनी लिहिलंय. तुझ्यासाठी. वाच.`` </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अजयने पत्र उघडलं, त्यात लिहिलं होतं, ``प्रिय अजय, अखेर मी तुला सोडून चाललोय. पण मी डॉक्टरांना दिलेलं वचन पाळतोय. माझे डोळे मी तुला दान करतोय. एवढ्या दिवस तू काहीच पाहू शकला नाहीस. आता माझ्या डोळ्यांनी हे जग बघ.`` </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाचता वाचताच अजयच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Aug 2007 23:37:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सलामत रहे दोस्ताना हमारा...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/सलामत-रहे-दोस्ताना-हमारा-107080400016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/सलामत-रहे-दोस्ताना-हमारा-107080400016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बाजारात घाईघाईने चाललेली नेहा अचानक कुणाला तरी बघून थांबली. तिला आपला लहानपणीचा मित्र अखिल दिसला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बाजारात घाईघाईने चाललेली नेहा अचानक कुणाला तरी बघून थांबली. तिला आपला लहानपणीचा मित्र अखिल दिसला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804016_1_1.jpg' Alt='Friend' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>धावत जाऊन तिने अखिलला हाक दिली. अखिलने मागे वळून बघितले तर नेहा! दम लागलेली नेहा म्हणाली, 'अखिल मी... मी... नेहा' 'नेहा अरे तू...इतक्या वर्षानंतर... मी तर तुला ओळखलं नाही. भागांत कुंकु, कपाळावर टिकली, साडी नेसलेली नेहा, अखिलच्या लहानपणची नेहा या नेहापेक्षा खूपच वेगळी दिसत होती. अखिल आणि नेहा दुसरीच्या वर्गात एकत्र होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकच शाळा, एकच वर्ग आणि एकाच कॉलनीत रहात होते. जेवण, अभ्यास, भांडणे, मौजमजा, प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगणे, सल्ला मसलत करणे यामुळे त्यांच्यात प्रगाढ मैत्रीला झाली होती. बारावीनंतर अखिल पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आणि पाच वर्षानंतर जेव्हा तो पुन्हा परत आला तेव्हा नेहाचे लग्न झाले होते. एकेकाळी एकमेकांची ओळख असणारे अखिल आणि नेहाला आज काय बोलावे हे सुचत नव्हते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा अनेक मित्रांना विविध कारणाने एकमेकांपासून दूर जावे लागते. मुलगा आणि मु‍लगी यांच्या मैत्रीत असे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. लग्न, करिअरमुळे अनेक चांगले मित्र एकमेकांपासून दूर जातात. आपण ठरवले तर चांगली मैत्री टिकवून ठेवू शकतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कायम संपर्कात रह</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दूरध्वनी, ई-मेल, संदेशाद्वारे कायम एकमेकांच्या संपर्कात रहा. आज कितीतरी आधुनिक संपर्क साधने  उपलब्ध आहेत. जग अगदी जवळ आले आहे. मग आपण आपल्या मित्राच्या संपर्कात का राहू शकत नाही? आठवड्यातून एकदा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ई-मेल किंवा दूरध्वनी करून विचारपूस करा.  </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804016_1_2.jpg' Alt='Friendship' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>विशेष कार्यक्रम असल्यावर भेटू शकत</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याग मै‍त्रीची पहिली अट आहे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रेम हीच साधना दूसरी अट आहे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकटेपणा जीवनासाठी शाप आहे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या सुखात आपण इतरांना सहभागी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>करून घेत नाही तो आनंद पण व्यर्थ आहे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनुष्य कितीही व्यस्त असला तरीही वाढदिवस, किंवा सण साजरे करण्यासाठी वेळ काढावा. अशी संधी केवळ मित्र आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>मैत्रीवर विश्वास ठेव</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपली मैत्री खरी असेल तर सर्वजण तिच्याकडे आदराने बघतील. आपला पति किंवा पत्नीच्या मैत्रीवर संशयाने पाहू नये, मित्राच्या कुटूंबात प्रेमाने आणि आनंदाने सहभागी व्हा.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804016_1_3.jpg' Alt='Friendship' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>मित्र प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडत</font><font style=' color:#000000;'>ो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मैत्रीत कर्तव्य किंवा बंधन नसते, मैत्रीत अधिकार असतो. जर आपले कुटूंब अडचणीत असेल तर आपल्या मित्राला मदत मागण्यास मागेपुढे पाहू नये.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मैत्री एक पवित्र नाते असून त्यामध्ये कोणतेही बंधन किंवा जबरदस्ती नसते. मैत्री निस्वार्थी असते. खरी मैत्री आयुष्यभर टिकते आणि जबाबदार मित्र प्रत्येक सुख दुखात सहभागी होतो. तर मित्रांनो, आज मैत्री दिनानिमित्त असा संकल्प करा की आपल्या खर्‍या मैत्रीला जगाच्या गर्दीत विसरून जाणार नाहीत. जर आपल्याला आपल्या मैत्रीवर विश्वास असेल तर ती जीवनभर आपल्याबरोबर येईल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Aug 2007 23:37:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/मैत्रीच्या-मंदिरात-मैत्रीची-वात-107080400019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/मैत्रीच्या-मंदिरात-मैत्रीची-वात-107080400019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप बॅंडपासून गिफ्टपर्यंतच्या वस्तूंनी दुकाने ओसंडून वाहत आहेत. हे सारे पाहिल्यावर मैत्री दिवस साजरा करण्याची खरोखरच गरज आहे काय़ असा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804019_1_1.jpg' Alt='Friend' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप बॅंडपासून गिफ्टपर्यंतच्या वस्तूंनी दुकाने ओसंडून वाहत आहेत. हे सारे पाहिल्यावर मैत्री दिवस साजरा करण्याची खरोखरच गरज आहे काय़ असा प्रश्न पडतो. मैत्री एकाच दिवसाचीच आणि ''फ्रेंडशिप बँड''च्या किमतीएवढीच आहे का?</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804019_1_2.jpg' Alt='Friend' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मैत्री ढोलताशे पिटून फ्रेंडशिप बॅंड बांधून व्यक्त करण्याची बाब नाही, ती अंत:करणातून जोडली जाते. ती जाणून घेण्यासाठी अंतःकरणाचाच मार्ग अनुसरावा लागतो. मैत्री ही निरंतर वाहणार्‍या गंगेसारखी निर्मळ व पवित्र असते. पहिल्या पावसानंतर येणार्‍या मातीच्या सुगंधासारखी धुंद व हळुवार वार्‍याच्या स्पर्शासारखी सुखद जाणीव देणारी असते. अशा या नात्याला पैशांत तोलणे म्हणजे या निर्मळ व पवित्र संबंधाचा अपमान नव्हे काय?</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804019_1_3.jpg' Alt='Friend' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> '<font  style='font-size:11pt; color:#000000'>मैत्री' ही काही एक दिवस साजरा करण्याचीही बाब नाही. जीवनातील प्रत्येक क्षण मैत्रीचा सोहळा साजरा करायला हवा. मैत्री ही निस्वार्थ असते. एकमेकांच्या सुख-दुखा:त मेतकुटासारखी मिसळून जाणारी असते. कधी कधी असे वाटते की मैत्रीचा हा अर्थ आजच्या झकपक, दिखाऊ जीवनशैलीत पार हरवल्यागत झाला आहे. म्हणूनच हा दिवस साजरा करण्याची गरज भासायला लागली आहे. हे नाते देवाने आपल्याला दिलेले एक वरदान आहे. मैत्रीद्वारे जीवनातील सुखाचे आणि दुखाःचे क्षण भोगण्याची आणि सोसण्याची शक्ती दिलेली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देवाच्या भक्तीची किंवा श्रावणातील पावसाची चिंब ओल या नात्यात आहे. मैत्री ही पाण्यासारखी ‍तरल तर लोखंडासारखी मजबूत असते. हे नाते जीवनात येणार्‍या कुठल्याही प्रकारच्या वादळात नेस्तनाबूत होत नाही. उलट प्रत्येक वादळाच्या स्पर्शाने नितळ होऊन सोन्यासारखे उजळत जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जागतिकीकरणाच्या या युगात आणि मुक्त विचारधारेत मैत्रीची व्याख्या बदलली आहे. 20-25 वर्षांपूर्वी आई-वडील व वयात आलेल्या मुलांमध्ये एक दुरावा होता. मुले आई-वडिलांसमोर स्वत:चे विचार मुक्तपणे मांडायला घाबरत, पण आज त्यांच्यामध्ये मैत्रीच्या नात्याची जोड झालेली आहे. हा बदल एका दृष्टीने चांगला आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>	मैत्रीची साथ, मैत्रीचाच हात</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>	मैत्रीच्या मंदिरात, मैचीचीच वात </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>	मैत्रीच्या घरात मैत्रीची बात</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>	आणि मैत्रीची जात मैत्रीच्याच आत.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मैत्री केवळ एका दिवसापूरती मर्यादित न ठेवता युगांतरापर्यंत असीम, अमर्यादित ठेवून तिच्यात ओतप्रोत प्रेमभावना सतत जागृत ठेवूया. आजचा मैत्री दिन ही शपथ घेऊनच साजरा करूया. काय?</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Aug 2007 23:35:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारतीय अध्यात्माचा पाया असणारी मैत्री]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/भारतीय-अध्यात्माचा-पाया-असणारी-मैत्री-107080400021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/भारतीय-अध्यात्माचा-पाया-असणारी-मैत्री-107080400021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कृष्ण आणि अर्जुन यांच्या मैत्रीवर भारतीय अध्यात्मशास्त्राची इमारत उभी आहे. या दोघांच्या मैत्रीला पदरही पुष्कळ आहेत. मैत्रीचा परिपूर्ण अनुभव या दोघांच्या नात्यांत येतो. मैत्रीची संकल्पना]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804021_1_1.jpg' Alt='Arjun_Shrikrishna' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कृष्ण आणि अर्जुन यांच्या मैत्रीवर भारतीय अध्यात्मशास्त्राची इमारत उभी आहे. या दोघांच्या मैत्रीला पदरही पुष्कळ आहेत. मैत्रीचा परिपूर्ण अनुभव या दोघांच्या नात्यांत येतो. मैत्रीची संकल्पना आणि मित्रत्वाचे निकषही स्पष्ट होतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्जुन आणि कृष्णाच्या मैत्रीला व्यापक संदर्भही आहेत. मुळात पांडव पाच असतानाही कृष्णाची विशेष मैत्री अर्जुनाशीच का जुळली? इतर पांडवही चांगले योद्धे असतानाही त्याने अर्जुनाच्याच रथाचे सारथ्य का केले आणि त्याचबरोबर अर्जुनाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगात श्रीकृष्ण का धावून गेला? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या परस्परसंबंधात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कृष्णाकडे अर्जुन केवळ मित्र, सखा, सोबती या भावनेने नाही तर गुरू, मार्गदर्शक अशाही व्यापक अर्थाने पहात होता. त्यामुळेच मित्र कसा असावा हे दोघांच्या नात्यावरून स्पष्ट होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कृष्णाने आपल्या बाजूने लढावे यासाठी अर्जुनाने आग्रह धरला होता. तो त्याला स्वतःला भेटायला गेला होता. त्याविषयीची कथाही प्रसिद्ध आहे. कृष्णाचे मोठेपण मान्य करून तो त्याच्या पायाशी बसला तर त्याचवेळी तेथे आलेला दुर्योधन मात्र अहम बाळगत त्याच्या डोक्यापाशी बसला. त्यामुळे उठल्यानंतर कृष्णाचे लक्ष पायाशी बससलेल्या अर्जुनाकडे जाऊन त्याच्याशी त्याने बोलणे सुरू केले. कृष्णाकडे पाहण्याचा अर्जुनाचा आणि दुर्योधनाचा दृष्टीकोन त्यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट करणारा आहे. त्यामुळेच कृष्ण कौरवांकडे न जाता पांडवांच्या बाजूने गेला. पांडवांतही त्याचे अर्जुनाशी विशेष सख्य झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपली पुतणी आणि बलरामाची कन्या सुभद्राचे लग्न अर्जुनाशी व्हावे ही सुद्धा त्याचीच इच्छा. त्यानेच सुभद्रेचे हरण करण्यासाठी अर्जुनाला उद्युक्त केले. आपली पुतणी सुस्थळी पडावी ही त्याची इच्छा. त्यासाठी कृष्णाने बलरामाचा रागही ओढवून घेतला. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुरूक्षेत्रावर आपल्या ज्येष्ठांना आणि गुरूंना पाहून अवसान गळालेल्या अर्जुनाला कृष्णानेच कर्म करण्यासाठी उद्युक्त केले. प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी काय करायचे ते ठरले आहे. त्यामुळे तू क्षत्रिय असल्याने कर्म कर असा उपदेश त्याने अर्जुनाला केला. यानंतर अर्जुन लढला. येथे कृष्णाने खर्‍या मित्राची भूमिका बजावली. प्रसंगी त्याला त्याच्या मानसिक दौर्बल्याला हिणवून त्याला युद्यासाठी त्याने प्रवृत्त केले. आणि त्याच्या या बोलण्यामुळेच युद्धाचे पारडे पांड़वांच्या बाजूने झुकले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सूर्य मावळेपर्यंत जयद्रथाला मारले नाही तर आग्निकाष्ट भक्षण करीन अशी प्रतिज्ञा केलेल्या अर्जुनाला या संकटातून वाचविणाराही कृष्णच होता. पौराणिक कथेप्रमाणे त्यानेच सूर्य सुदर्शनचक्राद्वारे झाकून सूर्य मावळल्याचा आभास केला आणि त्यानंतर बाहेर आलेल्या जयद्रथाचा वध करण्यास अर्जुनाला सांगितले. कृष्णाचे चातुर्य आणि आपल्या मित्राच्या प्रतिज्ञापूर्तीसाठी चाललेली धडपडही यातून दिसून येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा अनेक कथांतून या दोघांच्या नातेसंबंधांवर प्रकाश पडतो. कृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेवर तर भारतीय अध्यात्मशास्त्र उभे आहे. या दोघांच्या संवादातूनही त्यांचे नाते काय होते हे समजते. मैत्रीचा ज्ञानदिवा त्यांनी तेवत ठेवला आणि पुढच्या अनेक पिढ्यांना त्याची प्रेरणा दिली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Aug 2007 23:35:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ना उम्र की सीमा हो ...........]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/ना-उम्र-की-सीमा-हो-107080400022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/ना-उम्र-की-सीमा-हो-107080400022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नात्याला अंकुर फुटण्यासाठी वातावरण अनुकूल असावे लागते, मग ते कोणतेही नाते असो. नाते फूलण्यासाठी सामंजस्य, सहनशीलता आणि प्रेमाची आवश्यकता असते. यापैकी एक जरी कमी असेल तर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/04/images/img1070804022_1_1.jpg' Alt='Friend' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>नात्याला अंकुर फुटण्यासाठी वातावरण अनुकूल असावे लागते, मग ते कोणतेही नाते असो. नाते फूलण्यासाठी सामंजस्य, सहनशीलता आणि प्रेमाची आवश्यकता असते. यापैकी एक जरी कमी असेल तर तिथे नात्याला मर्यादा पडते. इतकेच काय  नात्याला वयोमर्यादाही नसते. नाते तयार करण्यासाठी वयाची अट अजिबात नसते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तरीही दोन वेगवेगळ्या वयातील मैत्रीची उदाहरणे चटकन आपल्या डोळ्यासमोर येत नाहीत. मैत्री म्हणजे समवयस्कांमधीलच  असेच आपण गृहित धरतो. प्रौढ महिला आणि तरूण मुलगा किंवा मुलगी यांच्यात मैत्री असू शकते हे आपल्या लक्षातच येतन नाही. किंबहूना त्याकडे आपण या दृष्टीकोनातून पहातही नाही. मैत्रीसाठी एखाद्या वयाची अट ठेवल‍ी आहे का? किंवा आपल्या राज्यघटनेत असा काही नियम आहे का? मग समाजात अशा मैत्रीचे उदाहरण बघितल्यावर आपण त्याचा स्वीकार का करत नाही? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मित्रात भांडणे, राग आणि स्पर्धेची भावना असतेच. परंतु, हेच नाते एखाद्या परिपक्व व्यक्तीचे आपल्यापेक्षा कमी वयाच्या मित्रांबरोबर असेल तर ही भावना स्वाभाविकरित्या कमी होते. वयाने मोठा असलेला मित्र आपला अनुभव आणि मोठेपणाच्या भावनेने केवळ मैत्री नाही तर सुरक्षिततेची सावली देतो. विशेषत: मित्र जेव्हा एखाद्या कौंटूबिक समस्येवर निर्णय घेऊ शकत नसेल, त्यावेळी प्रौढ मित्र त्याचा मार्गदर्शक ठरू शकतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मैत्रीचा फायदा केवळ एकतर्फी नसतो. एखादी प्रौढ महिला घरातील कामे बाजूला ठेवून एखादी बाब एंजॉय करू शकत नाही. अशावेळी एखादी युवती तिची मैत्रीण असेल तर तिचा जिवंतपणा आणि उमेद पाहून त्या महिलेच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळू शकते. अर्थात युवक-युवतींचे स्वप्न, काहीतरी करून दाखविण्याची हिंमत आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा जोश याचा महिलांवर प्रभाव पडून त्या संकुचित वृत्तीतून बाहेर पडू शकतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पिता पुत्र किंवा पती पत्नी यांचे नाते मैत्रीचे नसते, परंतु या नात्यांमध्ये आपल्या मर्यादेबरोबर मैत्रीचा गंध नसेल तर नाते नीरस होते. कारण मैत्रीचे नाते परिपूर्ण असून सर्व नात्यांमध्ये पूर्णता आणते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Aug 2007 23:34:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ही इज़ माय बेस्ट फ्रेंड...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/ही-इज़-माय-बेस्ट-फ्रेंड-107080400023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/ही-इज़-माय-बेस्ट-फ्रेंड-107080400023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जतिन आणि रियाची ओळख महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसापासून झाली होती. दोघांच्याही  आवडीनिवडी मिळत्या जुळत्या असल्यामुळे दोघांना एकमेकांजवळ येण्यासाठी जास्त वेळ लागला नाही]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जतिन आणि रियाची ओळख महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसापासून झाली होती. दोघांच्याही  आवडीनिवडी मिळत्या जुळत्या असल्यामुळे दोघांना एकमेकांजवळ येण्यासाठी जास्त वेळ लागला नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध केला जातो हा जगाचा नियम आहे. या दोघांची मैत्रीही बाकीच्या विद्यार्थ्यांच्या आवडत नसे आणि सर्वांनी रिया आणि जतिनच्या विरोधात एकमेकांचे कान भरण्यास सुरवात केली. हळूहळू दोघांमधील संबंध दूरावत गेले आणि चांगले मित्र असणारे रिया आणि जतिन आज एकमेकांपासून दूरावले गेले. कारण एकमेकांवर विश्वास नसल्यामुळे आणि लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांनी एकमेकांशी चर्चा केली नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका महापुरूषाने म्हटले आहे की, 'मनुष्य मित्राचा मृत्यू सहन करू शकतो, मैत्री नाही.' मैत्री आयुष्यभर ठेवण्यासाठी काही लहान लहान गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>मुलींना हे आवश्यक आह</font><font style=' color:#000000;'>े</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुलीने मैत्रीत प्रामाणिक आणि मर्यादा कधीही विसरू नये. आपली मर्यादा स्वत: ठरवून घ्यायला  पाहिजे. आईवडिलांपासून आपल्या मित्रांची माहिती लपवू नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुणालाही न सांगता एकटेच घराबाहेर पडू नये. शक्य झाल्यास समूहाने बाहेर जावे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुलींनी एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करावा किंवा नंतर चर्चा करावी. ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या मैत्रीचे नुकसान करू नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>मुलांना आवश्यक बाब</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मैत्रीचे नाते खूप पवित्र आणि मोठे असते. मैत्रीत कोणी मुलगा किंवा मुलगी नसून मि‍त्र केवळ मित्रच असतो. त्याचा फायदा घेऊ नये. एखाद्याने आपल्यावर विश्वास ठेवला तर त्याचा आदर करावा. दुसर्‍याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या मित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊ नये. आपला मित्र चुकीच्या मार्गाने जात असल्याचे कळल्यावर त्याला समजावून सांगणे आणि साभांळणे आपले कर्तव्य आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज जगात मुलगा आणि मुलीची मैत्री असणे वाईट मानले जात नाही, कुणीही त्यांना वाईट नजरेने बघत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज मैत्री दिवस आहे, म्हणजे मैत्री साजरी करण्याचा दिवस आहे. मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या मर्यादेत राहून आपल्या मित्राप्रती विश्वास ठेवला तर त्यांची मैत्री शाळा किंवा महाविद्यालयापर्यंत नाही, तर आयुष्यभर राहील आणि काळाबरोबर अधिक दृढ होईल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Aug 2007 23:33:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नुसते मैत्र नव्हे हा सृजनोत्सव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/नुसते-मैत्र-नव्हे-हा-सृजनोत्सव-107080400024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/नुसते-मैत्र-नव्हे-हा-सृजनोत्सव-107080400024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[तरूणाईचा कवी संदीप खरे आणि त्या कवितांना सुरेल चाली लावून म्हणणारा संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्यातील मैत्री म्हणजे सृजनोत्सव आहे. या दोघांची मैत्री रसिकांसाठी मैफल आहे. आयुष्यावर बोलणारी.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तरूणाईचा कवी संदीप खरे आणि त्या कवितांना सुरेल चाली लावून म्हणणारा संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्यातील मैत्री म्हणजे सृजनोत्सव आहे. या दोघांची मैत्री रसिकांसाठी मैफल आहे. आयुष्यावर बोलणारी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या मैत्रीचे धागे तपासू गेलो तर त्यातील गुंतागुंत लक्षात येते. मुळात दोन सृजनशील माणसांच्या व्यक्तिमत्वातच गुंतागुंत असते. त्यात हे दोघे एकत्र आल्यानंतर होणारी गुंतागुंत किती अवघड असेल. संदीपने पहिल्या दोन कॅसेटस शैलेश रानडेबरोबर केल्यानंतर सलील आणि संदीप हे समीकरण बनले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे दोन प्रतिभावंत भेटले तेही योगायोगानेच. परस्परांबरोबर काम करण्यापूर्वी दोघांची क्षेत्रे वेगळी होती. सलील कुलकर्णीची ओळख पटू लागली होती ती नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून. त्याने काही चित्रपटांना संगीतही दिले होते. तोपर्यंत संदीपचे काही कॅसेटमुळे नाव होत होते. अचानक एका वळणावर दोघांची गाठ पडली आणि त्यांची जोडी जमली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आयुष्यावर बोलू काही, नामंजूर आणि सांग सख्या रे या नवीन कॅसेटस म्हणजे या दुकलीच्या प्रतिभेचा उत्कट अविष्कार आहेत. वास्तविक संदीप स्वतः गायकही आहे. त्यामुळे त्याच्या कविता सुचतानाच लय घेऊन येतात. अशावेळी संगीतकार असलेल्या सलीलला वेगळी चाल सुचली तर? पण तसा प्रश्न पडतच नाही. त्यांचे एकमेकांशी अत्यंत चांगले ट्यूनिंग जमले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोघांमध्ये असे काय होते, ज्यामुळे ते एकत्र आले? संदीप म्हणतो, मला सलीलची गायकी आवडली आणि त्याची संगीत देण्याची पद्धत. सलीलला संदीपमधील नैसर्गिक कवी आवडला. त्याच्या शब्दांना सूर देणे आपल्याला आवडेल असे सलीलला वाटले आणि सलीलच्या सूरांवर आपल्या शब्दांनी हिंदोळे घ्यावे असे संदीपला वाटले. वास्तविक सलीलची संगीतकार म्हणून ओळख होती. पण तो गायक आहे, हे 'आयुष्यावर...'मधून पहिल्यांदा कळले. संदीपच्या मते 'सलीलला माझ्या काव्यातला भाव ओळखू येतो. त्यानुसारच तो गातो. त्यामुळे ते काव्य रसिकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचते.' थोडक्यात परस्परांच्या बलस्थानांची आणि मुख्य म्हणजे एकमेकांना दोघांची गरज आहे, याची जाणीव त्यांना झाली आणि जोडगोळी जमली. संगीतकारांच्या जोड्या असतात, पण येथे कवी आणि संगीतकारांच जोडी जमली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचेही तसेच. सुरवातीला केवळ प्रयोग म्हणून केलेला हा कार्यक्रम चक्क व्यावसायिक झाला. आता तर त्याने जवळपास साडेतीनशेचा टप्पा गाठला आहे. हा कार्यक्रम म्हणजे दोघांचाही सृजनोत्सव आहे. संदीपचे नवे गाणे आणि सलीलची नवी चाल या कार्यक्रमातून आपल्या भेटीला येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोघांचे हे मैत्र म्हणजे लोकांसाठी शब्द सुरांची मैफल असते. दोघांच्या मैत्रीतून प्रतिभेचे लेणे उभे राहिले आहे. या लेण्याला मैत्रीदिनी सलाम.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Aug 2007 23:33:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मैत्री म्हणजे...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/मैत्री-म्हणजे-107080400030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-friendship-day/मैत्री-म्हणजे-107080400030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[''मित्र हीच माझी संपत्ती'' - एमिली डिकिन्सन 

'' संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र'' - वाल्टर विन्चेल 

''जीवनाच्या पाककृतीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच मित्र'' - डॉयर यामसकी...]]></description>
      <content:encoded><![CDATA[''<font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>मित्र हीच माझी संपत्ती'' - एमिली डिकिन्सन </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>'' <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र'' - वाल्टर विन्चेल </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>जीवनाच्या पाककृतीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच मित्र'' - डॉयर यामसकी </font><font style=' color:#000000;'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>'' ‍<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>विश्वासाशिवाय मैत्री नाही. अनं मैत्रीशिवाय मी एकटा आहे''- जेम्स मायकल </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'></font><br/>'' <font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>चांगले मैत्र मिळणे कठिण, मिळाले तर गमावणे कठीण़, विसरणे तर त्यापेक्षाही कठीण </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>आदर्श मैत्र जुळत नाही अन् जुळले तर विसरले जात नाही'' - जॉनी </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>मैत्री हक्क नसून ती एक गोड जबाबदारी असते''- खलिल जिब्रान </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>आपल्यातील गुण ओळखतो तोच खरा मित्र'' - हेन्री फोर्ड </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>मित्र आपली‍ काळजी घेणारा दैवी अविष्कारच असतो.''</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Aug 2007 23:30:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[friendship day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
