<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[मागोवा-२००७]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/retrospect-07-marathi</link>
    <description><![CDATA[2007 या वर्षांत घडलेल्‍या महत्‍वाच्‍या घडामोडींचा कॅलेडिओस्‍कोप. वेबदुनियाच्‍या वाचकांसाठी]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Fri, 12 Jun 2026 18:41:52 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>मागोवा-२००७</title>
      <url>https://marathi.webdunia.com/retrospect-07-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/retrospect-07-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/retrospect-07-marathi-1021006.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[लोकशाहीची 'आशा' निमाली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/लोकशाहीची-आशा-निमाली-107122800007_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/लोकशाहीची-आशा-निमाली-107122800007_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[काहींची नावे खऱोखरच त्यांना किती शोभतात. बेनझीर हे नावही असेच. बेनझीर या शब्दाचा अर्थ आहे, अतुलनीय. जिच्याशी तुलनाच होऊ शकणार नाही]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/28/images/img1071228007_1_1.jpg' Alt='benazir' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>काहींची नावे खऱोखरच त्यांना किती शोभतात. बेनझीर हे नावही असेच. बेनझीर या शब्दाचा अर्थ आहे, अतुलनीय. जिच्याशी तुलनाच होऊ शकणार नाही अशी. बेनझीरला हे किती लागू होतंय नाही? जेथे बुरखा काढणेही पाप असे समजल्या जाणाऱ्या अत्यंत कट्टरवादी मुस्लिम देशाची ती पहिली महिला पंतप्रधान. लष्करशाहीच्या वरवंट्याखाली सतत दडपल्या गेलेल्या देशाला लोकशाही मार्गावर आणण्याचा वसा घेतलेली महिला आणि म्हणूनच पाकमधील सध्याची अशांत परिस्थिती पाहता तिच्या हातीच सत्ता सोपवली तर देश सावरू शकेल असा लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारी रणझुंजार नेता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पित्याचा हत्यारा झिया उल हकशी लढणारी, नवाझ शरीफ यांना आव्हान देणारी आणि लष्करी वर्दीतल्या मुशर्रफ यांच्या विरोधात उभी ठाकलेली बेनझीर. तिचा मृत्यूही अगदी तिच्या नावासारखाच झाला. कुणाशी तुलना न करता येण्यासारखा. पंतप्रधानपद भूषवलेल्या कुणाही महिला नेत्याला असा मृत्यू आल्याचे ऐकिवात नाही.....</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बेनझीर म्हणजे पठाणी सौंदर्य. सिंध प्रांतातील वडिल आणि सिंधी-कुर्दीश कूळ असणारी आई अशी सरमिसळ असणाऱ्या आई-बापांची ही अतिशय देखणी कन्या. गोरापान चेहरा. चष्म्यातून बोलणारे डोळे आणि बोलण्यात जाणवणारा ठामपणा...बेनझीर यांची ही पहिल्यांदा जाणवणारी वैशिष्ट्य. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>बेनझीर राजकारणात अपघाताने नाही शिरली. अगदी ठरवून शिरली. तेही राजकारणी पित्याची- झुल्फिकार अली भुट्टो यांची हत्या झाली असतानाही.....</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भुट्टो घराणे पाकिस्तानच्या राजकारणात गांधी-नेहरू घराण्यासारखे प्रसिद्ध. बेनझीरचे वडिल झुल्फिकार अली भुट्टो सत्तरच्या दशकात पाकिस्तानचा राज्यशकट चालवत होते. विशेष म्हणजे लष्करी वरवंट्याखाली असलेला पाकिस्ताना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात लष्करमुक्त होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा झुल्फिकार अली भुट्टो यांची बेनझीर ही कन्या. त्यांचा जन्म २१ जून १९५३ मध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. कराचीत प्राथमिक शिक्षण झालेल्या बेनझीर यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत धाव घेतली. तेथे हार्वड व ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>पित्याचा निर्घृण खून</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बेनझीर पित्याचा राजकीय वारसा चालविण्यासाठी तयार होत असतानाच पाकचे लष्करप्रमुख झिया उल हक यांनी १९७७ मध्ये बंड करून भुट्टो यांचे सरकार उलथवले. सत्ता ताब्यात घेऊन त्यांनी भट्टो यांना तुरूंगात टाकले. त्यानंतर बंडखोर राजकीय नेते अहमद रझा कसुरी यांची हत्या केल्याच्या आरोपावरून त्यांना दोन वर्षांनी फाशी देण्यात आली. त्यानंतर बेनझीर यांनाही अटक करण्यात आली. त्यानंतरची त्यांची पाच वर्षे तुरूंगातच गेली. हा काळ तिने अतिशय धैर्याने काढला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>पाकिस्तान पीपल्स पार्टीची स्थापना</font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यावेळी उपचारासाठी बाहेर येण्याच्या बहाण्याने त्यांनी लंडन गाठले. तेथे त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीची (पीपीपी) स्थापना केली आणि झियांविरोधात आघाडी उघडली. त्यानंतर त्या १९८६ मध्ये पाकिस्तानात परतल्या. योगायोग काय असतो पहा. ज्या झिया उल हक यांनी बेनझीरच्या वडिलांना फासावर लटकावले त्यांचेच विमानात बॉम्बस्फोट होऊन निधन झाले. त्यानंतर पाकिस्तानात लष्करमुक्तीची आणि स्वातंत्र्याची हवा खेळू लागली. अशाच वातावरणात झालेल्या निवडणुकीत निवडून येत बेनझीर देशाची पहिला महिला पंतप्रधान बनल्या. लोकशाही मार्गाने झालेली ही पाकमधील पहिली निवडणूक. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>पंतप्रधानपदाची कारकिर्द </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण बेनझीर यांची ही कारकिर्द जेमतेम वीस महिने टिकली. बेनझीर यांचे पती असीफ अली झरदारी यांच्यावर व पर्यायाने बेनझीरवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यांच्यानंतर झिया उल हक यांचे शिष्य नवाझ शरीफ सत्तेत आले. पण १९९३ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा बेनझीर निवडून आल्या. पण पुन्हा तीन वर्षांनंतर भ्रष्टाचाराच्याच आरोपावरून त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले.</font><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारी पैशाचा गैरव्यवहार केल्याचा बेनझीर व त्यांच्या पतीवर आरोप होता. त्यामुळे लोकांचा बेनझीरवरील विश्वास उठू लागला. अर्थात झरदारी यांच्यावरील १८ पैकी एकाही आरोपात ते दोषी ठरले नाही. पण दहा वर्षे ते तुरूंगात होते. अखेर पुराव्याअभावी त्यांना २००४ मध्ये जामीन मिळाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बेनझीरने आपल्यावरील आरोप राजकीय हेतूंनी प्रेरीत असल्याचे सांगून ते फेटाळून लावले होते. १९९९ मध्ये बेनझीर यांना एका खटल्यात दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर मग याच वर्षी बेनझीर स्वतःच्या मर्जीने देश सोडून निघू गेल्या होत्या. आपली तीन मुले व पतीसमवेत त्या दुबईत रहात होत्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>राजकीय विजनवास</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नवाझ शरीफ यांना हटवून मुशर्रफ सत्तेवर आल्यानंतर बेनझीर यांचे पाकमध्ये आणे अनिश्चितच बनले होते. पण मुशर्रफ यांनी लष्करी वर्दी त्यागण्याचे ठरविल्यानंतर पाकमध्ये पुन्हा लोकशाहीचे वारे वहायला लागतील, असे चित्र होते. म्हणूनच बेनझीर आठ वर्षांच्या विजनवासानंतर पुन्हा पाकमध्ये परतल्या होत्या. अर्थातच शरीफ यांना पाकमध्ये परतल्यानंतर आल्यापावली परत पाठविणाऱ्या मुशर्रफ यांनी बेनझीर यांच्याशी समझोता करार केला होता. त्यामुळे बेनझीर आल्यानंतर त्यांनी कुठलाही विरोध केला नाही. त्यांच्यावरील आरोपही मागे घेण्यात आले होते. बेनझीर यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होता यावे यासाठी घटनेतही तशी दुरूस्ती करण्यात आली होती. त्याचवेळी बेनझीर यांना एकूणच मिळणारा पाठिंबा पहाता त्याच सत्तेवर येतील असे चित्रही दिसत होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण बेनझीर यांचे पाकिस्तानातील स्वागत एका आत्मघातकी स्फोटानेच झाले. यात शंभराहून अधिक जण मरण पावले होते. बेनझीर यांची वाट बिकट होती, याची कल्पना तेव्हाच आली होती. त्यांना मारण्याचे प्रयत्न त्यानंतरही झाले. अगदी आजच पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने राजकीय व धार्मिक नेत्यांवर हल्ल्याची भीती वर्तवली होती. त्यासाठी सुरक्षा यंत्रणांनाही सजग केले होते. पण अखेर हल्लेखोरांनी त्यांचा वेध अखेर घेतलाच. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>लोकशाहीची आशा....</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बेनझीर इतर पाकिस्तानी नेत्यांप्रमाणे धर्मांध नव्हत्या. त्यांचे शिक्षणही अमेरिकेत झाले असल्याने तेथील खुलेपणा त्यांच्या विचारातही आला होता. त्या पुन्हा सत्तेवर आल्या असत्या तर पाकिस्तानातील धर्मांध शक्ती कमी झाल्या असता असा लोकांना विश्वास होता. त्यांच्या काळात भारत-पाक संबंधातही सुधारणा झाली होती. कट्टरवादी शक्तींच्या त्याही विरोधात होत्या. म्हणूनच लाल मशिदीवर मुशर्रफ यांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी समर्थन केले होते. म्हणूनच त्याही कट्टरपंथीयांच्या बंदुकीचे लक्ष्य होत्या. अखेर प्रयत्नांती कट्टरपंथीयांनी त्यांचे लक्ष्य साधले. पण त्यामुळे लोकशाहीची ज्योत प्रज्वलित करून ती तेवत ठेवण्याची आशा जिच्याकडून ठेवता येईल, अशी ज्योती मात्र निमाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>भुट्टो कुटुंब आणि मृत्यूचे थैमान</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बेनझीरचे वडिल झुल्फिकार अली भुट्टो यांना झिया उल हक यांनी फासावर लटकवल्यानंतर भुट्टो कुटुंबात अनैसर्गिक मृत्यूचे सत्रच सुरू झाले. बेनझीरला एक मुर्तझा नावाचा भाऊही होता. पण पित्याच्या मृत्यूनंतर तो तत्कालीन साम्यवादी अफगाणिस्तानात पळून गेला. तेथे त्याने झिया उल हक यांच्या विरोधात एक अतिरेकी संघटना स्थापन केली. अफगाणिस्तानातून तो मध्यपूर्वेतील अनेक देशातही गेला होता. १९९३ मध्ये निर्वासित राहून त्याने पाकिस्तानात निवडणूक लढवली. त्यात तो निवडूनही आला. पण पाकमध्ये परतल्यानंतर त्याची रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली. बेनझीरचा दुसरा भाऊ शहानवाझ हाही राजकारणात होता. पण तो हिंसाचारी राजकारणी नव्हता. पण त्याचाही १९८५ मध्ये फ्रांसमध्ये रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. आता या साखळीत बेनझीरचाही समावेश झाला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 19:16:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आरएसएसचा कार्यकर्ता ते वादग्रस्त नेता]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/आरएसएसचा-कार्यकर्ता-ते-वादग्रस्त-नेता-107122400009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/आरएसएसचा-कार्यकर्ता-ते-वादग्रस्त-नेता-107122400009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर तिसऱ्यांदा आरूढ होणार हे निश्चित झाले आहे. कदाचित याचाच अंदाज असल्याने भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/24/images/img1071224009_1_1.jpg' Alt='modi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर तिसऱ्यांदा आरूढ होणार हे निश्चित झाले आहे. कदाचित याचाच अंदाज असल्याने भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवानींनी गुजरातचे निकाल लागण्यापूर्वीच घोषित करण्यात आले. यात मोदींना रोखण्याचाच डाव असावा या म्हणण्यातही तथ्य असावे. कारण गुजरातमधील सत्ता खेचून आणण्यात, तीही एवढ्या मोठ्या मताधिक्याने हे केवळ मोदींमुळेच घडले, हे त्यांचे शत्रूही मान्य करतील. त्यामुळे या विजयात भाजपापेक्षा मोदींचाच विजय आहे, हे नक्की. भाजपच्याच माध्यमातून पुढे गेलेले मोदी पक्षापेक्षा मोठे कसे ठरले? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कडवा कार्यकर्ता </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्हयातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला नरेंद्र दामोदरदास मोदी नावाचा मुलगा पुढे जाऊन गुजरातचा मुख्यमंत्री आणि भारतातील सर्वांत वादग्रस्त नेता म्हणून ओळखला जाईल, असे कुणी त्या काळात म्हटले असते तर त्याला कुणीही वेड्यात काढले असते. इतकेच कशाला दहा वर्षापूर्वी असे कुणी म्हटले असते तरीही त्याची अवस्था हीच झाली असती, पण हे घडले खरे. कारण पटेलांच्या गुजरातेत मोदींसारखा ओबीसी नेता सगळ्यांना चीत करून येतो ही बाबच त्यांच्यात काही विशेष आहे, हे दर्शवणारी आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोदींच्या राजकीय प्रवासाची सुरवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रवेशापासून झाली. तरूणपणातच संघात गेलेले मोदी नंतर संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक झाले आणि त्यानंतर अपरिहार्यपणे राजकारणाकडे वळले. ७४ मध्ये संघात गेलेले मोदी जयप्रकाश नारायणन यांच्या नवनिर्माण आंदोलनातही सहभागी झाले होते. त्यानंतर १९८० मध्ये भारतीय जनता पक्षातही त्यांनी प्रवेश केला. ८८ पर्यंत त्यांना कोणतेही पद मिळाले नव्हते. पण भाजप आणि संघ यांच्यात समन्वयाचे काम त्यांनी अतिशय चांगले सांभाळले. म्हणूनच लालकृष्ण अडवानींचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांच्यामुळेच मोदींना ८८ मध्ये गुजरातमध्ये पक्षाचे सरचिटणीसपद मिळाले. अडवानींचे शिष्यत्व मोदींनी तेव्हापासूनच स्वीकारले आणि अडवानींनीही या शिष्याला आपला मानला. पण त्यांना कदाचित माहितही नसेल, हा शिष्य गुरूपेक्षाही मोठा होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे मोदींना राष्ट्रीय पातळीवर प्रमोशन देण्यात आले. १९९५ मध्ये ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. सरचिटणीसांच्या गर्दीत मोदी फारसे कुणाला माहित नव्हते. पण अचानक केशुभाईंना हटवून २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्रीपद त्यांना देण्यात आले. त्यावेळी कोण हे मोदी असाच प्रश्न लोकांच्या आणि पक्षातील इच्छुकांच्या चेहऱ्यावर उमटला होता. कारण मोदी तोपर्यंत फडात वावरणारे मोदी सर्वसामान्यांचे झाले नव्हते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>गुजरात दंग</font><font style=' color:#000000;'>ल</b></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->परिस्थिती हाताबाहेर जात असतनाही मोदींनी लष्कराला बोलवायला तीन दिवस घेतले. अगदी निवडून निवडून मुसलमानांना मारले. या घटनेचे जागतिक पातळीवर पडसाद उमटले.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>एकतर मोदी मुख्यमंत्री झाले ते केशुभाईंसारख्या बड्या नेत्याला हटवून. केशुभाईंना हटविण्याचे कारण एकच होते. २००१ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाने मोठी हानी झाली होती. लोकांच्या पुनर्वसनाचे काम तितके चांगले होत नव्हते. त्याचीच नाराजी पोटनिवडणुकीत उमटली आणि भाजपला काही जागा गमवाव्या लागल्या. पक्षाने मग केशुभाईंना हटवून मोदींकडे राज्याची धुरा सोपवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोदींनी पुनर्वसनाला वेग दिला आणि ते चांगले कसे होईल ते पाहिले. पुढे २००२ मध्ये गोधरा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेस जाळण्याची घटना घडली. त्यात साठ हिंदूंची राखरांगोळी झाली. त्याची प्रतिक्रिया म्हणून गुजरातभर विशेषतः उत्तर गुजरातमध्ये दंगे पेटले आणि त्यात हजारभर मुसलमानांची कत्तल करण्यात आली. या संपूर्ण दंगलीत मोदींची भूमिका संशयास्पद राहिली. परिस्थिती हाताबाहेर जात असतनाही मोदींनी लष्कराला बोलवायला तीन दिवस घेतले. अगदी निवडून निवडून मुसलमानांना मारले. या घटनेचे जागतिक पातळीवर पडसाद उमटले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींनी राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला. चौफेर मोदींविरोधात रान पेटले. प्रसार माध्यमांनीही मोदींना व्हीलन ठरविले. पण सामान्य गुजराती हिंदू माणसाच्या मनात मात्र मोदींची प्रतिमा एक नीडर नेता म्हणून प्रस्थापित झाली. रणछोडदासांचा गुजरात वीरांचा बनविण्यात मोदींची भूमिका मोठी असल्याचे बोलले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याच काळात गुजरात विधानसभेची मुदत संपायला आली होती, मोदींनी गोधरानंतर लगेचच विधानसभा विसर्जित करून निवडणूक जाहीर केली. दंगल संपल्यानंतर वातावरण मोदींच्याच बाजूने होते. ओम नमो नारायण ही घोषणा याच काळातील. नमो म्हणजे नरेंद्र मोदी. अखेर अपेक्षेप्रमाणेच झाले. दंगलीचा फायदा मिळून संपूर्ण हिंदू मतांचे धुव्रीकरण झाले आणि मोदी १२७ जागा मिळवून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. वास्तविक त्या आधीच्या निवडणुकीतही भाजपला एवढे मोठे यश मिळाले नव्हते. मोदी पक्षापेक्षा मोठे होत असल्याचे दिसू लागले होते. पण पक्षालाही त्याशिवाय पर्याय नव्हता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>मोदींची विकासकामे </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुख्यमंत्रिपदाची दुसरी कारकिर्द मात्र मोदींच्या विकासकामांसाठी ओळखली जाते. या काळात मोदींना नेमके असे काय केले त्यामुळे त्यांची प्रतिमा एवढी मोठी झाली असावी? दंगलीच्या मुद्यावरून मोदींना वारंवार कोंडीत पकडले जाणार हे तर स्पष्ट होते. त्यामुळेच त्यांनी आपले संपूर्ण लक्ष गुजरातच्या विकासाकडे दिले. म्हणूनच मोदींनी सरकारच्या प्रशासकीय रचनेचीच पुनर्रचना केली. आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आधी पैसा वाचवला. त्यांच्या कारकिर्दीत राज्याचा विकासदर दहा टक्के होता, तो इतर राज्यांपेक्षा बराच जास्त होता. गेल्या वर्षी हा दर ११.२ टक्के होता. इतर राज्ये भारनियमनाने पोळत असताना गुजरातमध्ये मात्र २४ तास वीज असते. त्याने गुजरातच्या वीज मंडळाच्या तोट्यात घट आणून दाखवली.</font><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्या कारकिर्दीत झालेले महत्त्वाचे काम म्हणजे सरदार सरोवर प्रकल्पाची उंची ९५ फूटांवरून ११०.६४ फूटांपर्यंत वाढविण्याचे. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढली आणि त्यातून विजेची निर्मिती झाली. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गुजरातमध्ये ठिकठिकाणी कालवे काढून नर्मदेचे पाणी पाईप टाकून कच्छ या कायम तहानलेल्या भागापर्यंत पोहोचवले. कच्छमध्ये नर्मदेचे पाणी येण्याचे दिवास्वप्न गुजराती जनता कित्येक वर्षे पहात होती. मोदींनी हे स्वप्न सत्यात उतरवले. याशिवाय मुलींच्या शिक्षणासाठी विद्यादीप योजना यासारख्या अनेक योजना राबविल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>पुन्हा मुख्यमंत्री </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुजरात विधानसभा निवडणुकींचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षातील वातावरण मात्र मोदींच्या विरोधात गेले होते. मोदींचा फटकळपणा, कुणालाही न जुमानणे, सर्व निर्णय स्वतः घेणे या सगळ्या बाबींनी पक्षातील लोकही नाराज होऊ लागले होते. म्हणूनच शेवटच्या काळात अनेक आमदार मोदींना सोडून गेले. केशुभाई पटेल, सुरेश मेहता या माजी मुख्यमंत्र्यांनी दंड थोपटले. गुजरात दंगलीवेळी गृहमंत्री असलेले गोवर्धन झडपिया हेसुद्धा मोदींच्या विरोधात गेले. केशुभाई विरोधात गेल्यानंतर पटेलांचे प्राबल्य असणाऱ्या सौराष्ट्रात भाजपला फटका बसणार असे संकेत दिले जात होते. पण मोदी शांत होते. भाजपची संपूर्ण उमेदवार यादी त्यांनी तयार केली. असंतुष्टांना उमेदवारी नाकारली. अनेक विद्यमान आमदारांनाही डच्चू दिला. असे सगळे वातावरण असताना मोदी पुन्हा येतील असे कुणालाच वाटत नव्हते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>आक्रमक प्रचार</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यातच निवडणूकीचा प्रचार सुरू झाला आणि कॉंग्रेसतर्फे सोनिया गांधींनी प्रचाराचे बिगुल फुंकले. थेट मोदींवर आरोप करताना मौत का सौदागर अशीच उपमा दिली. (पुढे त्यांनी आपण त्यांच्यासंदर्भात बोललोच नाही, असे स्पष्टीकरण दिले.) कॉंग्रेसने इतरही अनेक नेते उतरवले. अगदी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगही या आखाड्यात उतरले. त्यांनीही मोदींवर खरपूस टीका केली. पण या आरोपानंतर मोदी सुसाट सुटले. त्यांनी कॉंग्रेस आणि सोनियांना खास आपल्या शैलीत फटकारत आक्रमक प्रचार सुरू केला. प्रचारात बोलता बोलता सोहराबुद्दीन या गुंडाच्या एनकाऊंटरचेही समर्थन केले. त्यामुळे ते अडचणीतही आले. पण तरीही त्यांनी दणकून प्रचार सुरू केला. नेमका निकाल काय लागेल हे सांगणे अवघड होते. माध्यमांनी मोदींना व्हीलन ठरवले होते. तरीही मोदींची प्रतिमा गुजराती समाजाच्या मनात कायम होती. म्हणूनच त्यांच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रोत्यांनाच प्रश्न विचारून त्यांच्याकडून आपल्याला हवे ते काढून घेण्याची त्याची शैली त्यांच्यातील चतुर राजकीय नेता दाखविणारी होती. भाजपमधील बड्या नेत्यांच्या सभांना गर्दी होत नसताना मोदींच्या सभा मात्र गर्दीने भरून जायच्या. पण म्हणून गुजरात पुन्हा मोदींकडे जाईल, असे सांगता येत नव्हते. कारण गर्दी सोनियांच्याही सभेला होत होती. त्यात पोल पंडितांचे अंदाजही मोदींच्या विरोधात जाणारे होते. पण मोदींचा ऐरावत लक्ष्याच्या दिशेने निघालेला होता. आणि इतरांनी कधी अपेक्षिलेही नसेल असे यश पुन्हा एकदा मोदींना मिळाले. जवळपास मागच्या इतक्याच जागा मिळवून मोदींनी आपला करिश्मा दाखवून दिला. हिंदूत्वाचे दुसरे नाव मोदीत्व असा प्रचार झाला होता. हे मोदीत्व निवडणुकीत चालले. आणि मोदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 19:15:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मोदींना पर्याय नाही]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/मोदींना-पर्याय-नाही-107122400008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/मोदींना-पर्याय-नाही-107122400008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अखेर "अनपेक्षितपणे' मोदींनी गुजरातची गादी राखली आहे. अनपेक्षितपणे यासाठी की सर्वच माध्यमांनी मोदींना बहुमत मिळेल पण काठावर, असा सूर लावला होता. गुजरातच्या जनतेने हे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/24/images/img1071224008_1_2.jpg' Alt='modi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>अखेर "अनपेक्षितपणे' मोदींनी गुजरातची गादी राखली आहे. अनपेक्षितपणे यासाठी की सर्वच माध्यमांनी मोदींना बहुमत मिळेल पण काठावर, असा सूर लावला होता. गुजरातच्या जनतेने हे सारे अंदाज पूर्णतः बाजूला सारत आपला तारणहार निवडताना मोदींना पर्याय नाही, हेच स्पष्ट केले. सारी परिस्थिती प्रतिकूल असताना क्रिकेटच्या सामन्यात एखाद्याने एकहाती फटकेबाजी करत सामना जिंकून आणावा, तसेच मोदींच्या विजयाबाबत म्हणावे लागेल. सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीच्या निकालांनी माध्यमांच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट केल्या आहेत. एवढेच नव्हे तर दिल्लीतील राजकीय घडामोडींवरही त्याचा परिणाम होणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धर्माच्या मदतीने राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जातीच्या राजकारणाला टाळता आले नाही, तर निधर्मी राजकारणाचा टेंभा मिरवणाऱ्या कॉंग्रसची केवळ जातीय राजकारणावरच भिस्त हे या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. एकूणच निकाल पाहता त्यातून काही गोष्टी स्पष्ट होणाऱ्या आहेत. त्यातील एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे यापुढील राजकारण पूर्णतः मोदी केंद्रीत होणार. गुजरातच्या विकासामुळे "उत्तम प्रशासक' हे प्रमाणपत्र मिळालेच. परंतु या विजयामुळे ते कसलेले राजकारणी असल्याचेही सिद्ध झाले आहे. कारण हेकेखोर स्वभाव, पटेलांच्या नाराजीचा बागूलबुवा, संघ परिवारातील दिग्गजांमध्ये धुमसत असलेला असंतोष या प्रतिकूल बाबी असतानाच जवळपास 50 हून अधिक आमदारांना मोदींनी अक्षरशः हाताला धरून घरी बसवले. काहींनी उघड नाराजी व्यक्त केली तर काहींनी कॉंग्रेसची वाट धरली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->हे त्रासदायक होईल याचा मोदींनाही याचा अंदाज होता. म्हणूनच त्यांनी नवे मतदार आणि नवे मतदार संघ शोधले. कॉंग्रेसचा भर पारंपरिक मतदारांवर आणि भाजपच्या नकारात्मक मतांवर राहिला.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रीय नेत्यांच्या मर्जीतील काहींनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावली होती. पण मोदींनी वरिष्ठांच्या शब्दालाही न जुमानता "</font><font style=' color:#FF0080;'>ये हमारे फ्रेम मे नही बैठते' </font><font style=' color:#000000;'>म्हणत उमेदवारी नाकारली होती. याआधी काही महिन्यांपूर्वी झालेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सर्व नगरसेवकांना बदलून नव्या चेहऱ्यांना निवडून आणण्याचा विस्तवाशी खेळ खेळला होता. त्यात यश आले असले तरी विधानसभा निवडणुकीत हे शक्‍य होणार नाही, या भ्रमात कॉंग्रेस राहिली. म्हणूनच भाजपच्या बंडखोरांना कॉंग्रेसने पायघड्या अंथरल्या. शिवाय पटेल अस्मितेला हवा देत मोदींच्या विरोधात पटेल उमेदवारही दिला. याचा त्रास मोदींना झालाच नाही, असे नाही. पण त्यावर त्यांनी शोधलेला इलाजही अक्‍सीर राहिला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे त्रासदायक होईल याचा मोदींनाही याचा अंदाज होता. म्हणूनच त्यांनी नवे मतदार आणि नवे मतदार संघ शोधले. कॉंग्रेसचा भर पारंपरिक मतदारांवर आणि भाजपच्या नकारात्मक मतांवर राहिला. मोदींच्या स्वच्छ प्रतिमेचा झालेला प्रचार, विरोधात गेलेल्यांची कथित स्वार्थी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेले यश, बंडखोरांबाबत जाहीरपणे एकही शब्द न बोलणे या साऱ्याच क्‍लृप्त्या मोदींना फायदेशीर ठरल्या. पटेल केंद्रीत राजकारणाला मोदींनी 49 पटेल उमेदवार रिंगणात उतरवून काटशह दिलाच, शिवाय जिंकू शकणारे कॉंग्रेसचे उमेदवारही आपल्या जाळ्यात ओढले. भाजपच्याही उमेदवारांशी जिंकण्याचा निकष कटाक्षाने पाळण्यात आला होता. जुनागढमधील महेंद्रभाई मश्रू हे नेहमीच अपक्ष म्हणून विजयी होणारे किंवा द्वारका मतदार संघात गेल्यावेळी कांग्रसचे विजयी उमेदवार पबुभा माणेक हे यावेळी खास मोदींचे उमेदवार होते. या दोन उदाहरणांवरूनच काटशहाच्या राजकारणाची कल्पना यावी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोदींच्या कोणालाही न जुमानणाऱ्या स्वभावाचे, मर्दानी हावभावांचे, हम करे सो कायदा वृत्तीचे गुजराथच्या महिलांमध्ये आकर्षण पाहता मतदारांमध्ये निम्म्याने असलेल्या या मतदारांना आपली "</font><font style=' color:#FF0080;'>व्होटबॅंक' </font><font style=' color:#000000;'>बनवण्यासाठी मोदींने जे प्रयत्न केले त्याचाही फायदा झालाच आहे. सहा महिन्यांत 36 हून अधिक मेळावे घेत 22 लाख महिलांना एकत्र आणून "मोदी ब्रॅन्ड' त्यांच्यावर ठसवला. शिवाय 22 महिलांनाही उमेदवारी दिली. गुजरातच्या राजकीय इतिहासात कोणत्याच पक्षाने एवढ्या संख्येने महिलांना उमेदवारी दिली नव्हती.</font><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->"सारी खुदाई एक तरफ' असताना हा विजय मोदींचे नेतृत्व ठसवणारा आहे. कारण त्यांना अडचणी आणण्यात कॉंग्रेस तर होतीच. पण भाजपचेही मंडळी त्यात मागे नव्हते. माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, सुरेश मेहता, काशिराम राणा यांचा विरोधाचा पवित्रा उघड होता. विश्‍व हिंदू<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> "<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>सारी खुदाई एक तरफ' </font><font style=' color:#000000;'>असताना हा विजय मोदींचे नेतृत्व ठसवणारा आहे. कारण त्यांना अडचणी आणण्यात कॉंग्रेस तर होतीच. पण भाजपचेही मंडळी त्यात मागे नव्हते. माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, सुरेश मेहता, काशिराम राणा यांचा विरोधाचा पवित्रा उघड होता. विश्‍व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडीया तर कोठेही दिसून आले नाही. प्रत्यक्ष संघालाही दूर ठेवत मोदींनी स्वतःला पणाला लावत हा डाव खेळला अन्‌ जिंकलाही. मुळात मोदींची प्रतिमा ही हवेत फेकलेल्या मांजरासारखी आहे, जे कसेही फेकले तरी पडताना चार पायावरच पडते. स्तुती असो अथवा टीका असो ती मोदींना फायदेशीरच ठरते, हे "मौत का सौदागर' प्रकरणावरूनच दिसले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>"<font  style='font-size:11pt; color:#000000'>मोदी डर का मार्केटींग करते है' ही कॉंग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रीया असली तरी हे मार्केटींग निष्प्रभ करण्याऐवजी कॉंग्रेसने जाहीरनाम्यात दंगलीच्या दोषींवर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. त्याचा उलटा परिणाम झाल</font><font style='font-size:11pt;'>ा. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गोध्रा हत्याकांड त्यानंतरची दंगल हे गुजरातच्या इतिहासातील दुर्दैवी क्षण होते. व्यावसायिक मानसिकता असलेल्या बहुसंख्य गुजराथी समाजाला आपला व्यवसाय भला की आपण भले असे वाटत असते. पण आपणही कधी तरी आक्रमक होऊ शकतो, ही अहं सुखावणारी भावना दंगलीतून पुढे आली. म्हणूनच दंगलीच्या "एकदा काय व्हायचे ते होईल, पण "</font><font style=' color:#FF0080;'>त्यांना' धडा शिकवायलाच हवा' </font><font style=' color:#000000;'>असे म्हणणारा सामान्य गुजराथी माणूस आता ते विसरू पाहतो आहे. तरीही त्याची "गुजरातची अस्मिता' सोहराबुद्दीनच्या मुद्‌द्‌यावरूनही उफाळून येऊ शकते, हे मोदी जोखून असल्याने त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी त्याचा फायदा घेतला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दंगलीचा कलंक घेऊन वावरणाऱ्या मोदींनी गेल्या काही वर्षांत "विकासपुरूष' ही नवी उपाधी मिळवली आहे. प्रशासनावर मजबूत पकड आणि भ्रष्टाचाराला विरोध हा मोदींचा दावाही सामान्यांना भावला. शहरी भागात मोदींच्या या प्रतिमेचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळेच कॉंग्रसचे नेते "मोदींशी आमची लढाई शहरी भागात नाही, तर ग्रामीण भागात राहील' असे खासगीत सांगत होते. शिवाय मोदींच्या सर्वमान्यतेला पर्याय देणारे नेतृत्व कॉंग्रसेला देता आले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुजरातमध्ये कॉंग्रेस कधी नव्हे तेवढी यावेळी आक्रमक दिसून आली. मोदींच्या विकासाच्या दाव्यांचे वाभाडे काढण्यात कॉंग्रसला बऱ्यापैकी यश आले होते. पण नेता कोण, हे शेवटपर्यंत पक्षाने सांगितले नाही. केंद्रातील अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी, विरोधी पक्षनेते अर्जुन मोढवाडीया की माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला, यातील एकही नाव जाहीर करण्यात पक्ष नेतृत्व बिचकत असल्याचेच चित्र कायम राहिले. एकाची निवड करावी तर बाकी नाराज, पर्यायाने फटका ऐन निवडणुकीत. या भीतीने शेवटपर्यंत राजकीय व्यूहरचनेच्या गोंडस नावाखाली मतभेद दडपून टाकले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गेल्या वेळेसारखा उपद्रव होऊ नये म्हणून चक्क प्रथमच निवडणूकपूर्व आघाडी केली. एक जागा राष्ट्रीय नेते (?) रामविलास पासवान यांच्याही पक्षाला दिली. मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाला उमेदवार उभे करण्यापासून रोखण्यात व मतविभाजन टाळण्यात कॉंग्रेसने यश मिळवले. परंतु त्याचा फायदा घेता आलाच नाही, कारण ठोस नेतृत्वाचा अभाव. भाजप आणि संघ परिवारातील लाथाळ्या आपल्याला सत्तेवर नेऊ शकते या एकाच गणितावर स्वतःला झोकून देणाऱ्या कॉंग्रेसला आपल्या क्षीण ताकदीचा अंदाज आलाच नाही, हेच या निकालातून जाणवते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींच्या सभेत गर्दी दिसावी म्हणून येणाऱ्या लोकांनी विखरून बसावे यासाठी व्यासपिठावरून जेथे केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल किंवा सुबोधकांत सहाय यांच्या सारख्यांना आवाहन करावे लागते, स्थानिक नेते त्यासाठी अपयशी ठरतात तेथेच कॉंग्रेसची लोकांपासून तुटलेली नाळ दिसून येत होती. पटेलांचे प्रभाव क्षेत्र आणि नाराजीचे केंद्र असलेल्या सौराष्ट्र, दक्षिण गुजरातमध्ये सोनियांना आणि पंतप्रधानांनाही सभा घ्याव्या लागल्या. परंतु त्याचा लाभ मतपेटीतून तरी कॉंग्रेसला झालेला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असे असले तरीही या निवडणुकीचा कॉंग्रेसला एकमेव फायदा म्हणजे "मोदींना आव्हान देणाऱ्या धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकमेव नेत्या सोनिया गांधी' या मुद्‌द्‌याचे भांडवल करता येणार आहे. नाही तरी भाजपचे अडवाणींनंतरचे पुढील नेतृत्व म्हणजे मोदी, अशी जाहीरात होऊ लागली आहेच. त्यामुळे त्याचा भावनिक प्रचार करत धर्मनिरपेक्षतेचे आवाहन करत पुन्हा सोनिया गांधींचे नेतृत्व इतरांना स्विकारण्यासाठी भाग पाडण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न राहील. परंतु धर्मनिरपेक्षतेचा वसा सांगणाऱ्या आणि मुस्लिमांचे आपणच तारणहार असल्याचे सांगणाऱ्या कॉंग्रेसने तर मुस्लिम उमेदवारांना टाळले आहे. गुजरातच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण दहा टक्के. त्या हिशेबाने एकेकाळी 18 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवणाऱ्या कॉंग्रेसने यावेळी केवळ सातच मुस्लिमांना उमेदवारी दिली. यावर विचारला जाणारा प्रश्‍न कॉंग्रेससाठी अडचणीचा ठरला नाही, तरच नवल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 19:14:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/क्रिकेटमध्ये-ऑस्ट्रेलियाचे-वर्चस्व-107122400007_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/क्रिकेटमध्ये-ऑस्ट्रेलियाचे-वर्चस्व-107122400007_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[इंग्लंड एशेस मालिका विजयाच्या सोहळ्यात दंग असतानाचा रिकी पॉटींगने भविष्यातील आडाखे आखत क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वास ओहोटी लागू देणार नाही, हे मनाशी पक्के केले होते. कांगारूंचे पुनरागमनातील आक्रमण त्यांच्या शैलीस शोभणारेच होते. दोन]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/24/images/img1071224007_1_1.jpg' Alt='ponting' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>इंग्लंड एशेस मालिका विजयाच्या सोहळ्यात दंग असतानाचा रिकी पॉटींगने भविष्यातील आडाखे आखत क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वास ओहोटी लागू देणार नाही, हे मनाशी पक्के केले होते. कांगारूंचे पुनरागमनातील आक्रमण त्यांच्या शैलीस शोभणारेच होते. दोन हजार सहाच्या शेवटी चँमियन्स करंडकावर मोहोर उमटवल्यावर त्यांनी एशेश मालिकेत इंग्लंडचा 5-0 ने फडशा पाडला. सलग दुसर्‍या विश्वकरंडकात विश्वविजेतेपद पटकावून विजयाचा अश्वमेध कायम ठेवला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भार‍ताविरूद्ध सव्वीस जानेवारीपासून सुरूवात होणार्‍या कसोटी मालिकेअगोदर त्यांनी सलग चौदा कसोटी विजयांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. सलग सोळा कसोटी विजयाच्या विक्रमापासून ते अवघे दोन सामने दूर आहेत. वर्षाच्या सुरूवातीसच त्यांनी आपल्या व्यावसायिकतेचे दर्शन घडवले. त्यांच्या डोळे दिपवणार्‍या विजयी मोहिमेस फक्त इंग्लंड व न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत वेसण घातली. मात्र वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वकरंडकात हिशोब चुकता केला. सिडनीतील शेवटचा कसोटी सामना आनंद सोहळा साजरा करण्यासोबतच शेन वॉन, ग्लेन मॅकग्राथ व जस्टीन लँगर यांना निरोप देण्यामुळेही कायमचा स्मृतीत राहीला. निवृत्तीच्या वेळी वॉर्नच्या नावावर कसोटीत 708 बळींचा विक्रम होता.</font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मॅकग्राथने विश्वचषकात चमकदार कामगिरी करून मालिकावीराचा बहूमान पटकावला. त्याने कसोटीत 563 बळी नोंदवून कोणत्याही वेगवान गोलंदाजाने केलेली सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. वर्षाच्या शेवटी श्रीलंकेच्या मुरलीधरनने कसोटीतील सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला. तो एक हजार बळींचा टप्पा पूर्ण करो अथवा नाही. पण त्याचा हाच विक्रम तोडणे अशक्यप्राय आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांच्या मृत्यूने विश्वकरंडकाच्या उत्साही वातावाणावर काळे ढग जमले. ऑयर्लंडविरूद्ध पाकच्या पराभवानंतर अठरा मार्चला किंग्सटन येथे एका हॉटेलमध्ये ते मृतावस्थेत आढळले होते. सुरूवातीस विष दिल्यानंतर गळा दाबल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यामध्ये सट्टेबाजांचा हात असू शकतो, अशा संशयासही वाव होता. जमैका पोलिसांनी यास खूनाचे प्रकरण मानून चौकशीस सुरूवात केली होती. मात्र मधुमेह,  उच्च रक्तदाबासहित कित्येक आजारांनी त्यांच्यावर आक्रमण केले होते.</font><font  style='font-size:11pt; color:#000000'>अखेर गेल्या महिन्यात कॉरोनरच्या चौकशीनंतरही त्यांचा मृत्यू नैसर्गिक की त्यांचा खून करण्यात आला, हे स्पष्ट झाले नाही. विश्वकरंडकात भारत व पाकिस्तान पहिल्या फेरीतच बाहेर गेल्याने आशिया खंडातील क्रिकेट चाहत्यांसोबतच व्यवसायासही फटका बसला. तिकिटांचे गगनाला भिडणारे दर व मैदानात वाद्य नेण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने उरला सुरला उत्साहही मावळला. विश्वकरंडकास स्थानिक प्रेक्षकांचाही उत्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या विश्वकरंडकातील संस्मरणीय घटना म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने हॉलंडविरूद्ध एका षटकात सहा षटकार ठोकले. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगाने सलग चार चेडूंवर चार बळी घेऊन हंगामा केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला ट्वेंटी-20 विश्वकरंडक रोमहर्षक झाला. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत विश्वकरंडकावर नाव कोरले. युवराजसिंहने इंग्लडविरूद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड यांस एका षटकात सहा षटकार ठोकून भारतीय विजय अभियानास भरजरी वस्त्र बहाल केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वॉर्न, मॅकग्राथ व मुरलीधरनच्या वैयक्तिक कामगिरीव्यतिरिक्तही दोन हजार सात फलंदाजांचेच वर्ष राहीले. जॅक कॅलिसने सात डावात पाच शतके ठोकली व दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान, न्यूझीलंड व भारताविरूद्ध मालिका जिंकल्या. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीचा समाचार घेत दोन द्विशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 192,  इंग्लंडविरूद्ध 152 धावा काढण्यासोबतच चार कसोटीत सलग 150 पेक्षा अधिक धावा काढणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑस्ट्रेलियाचा एडम गिलख्रिस्ट कसोटी सामन्यात 100 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज झाला आहे. सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या एलन बॉर्डरला मागे टाकत ब्रायन लारानंतर कसोटीत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा दुसरा फलंदाज झाला आहे. सहकारी खेळाडू व अधिकार्‍यांसोबत वाद झाल्यानंतर विश्वकरंडक आटोपल्यावर लाराने निवृत्तीचा निर्णय जाहिर करून तमाम क्रिकेट रसिकांना धक्का दिला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 19:12:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्राची 'प्रतिभा' झळाळली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/महाराष्ट्राची-प्रतिभा-झळाळली-107122200015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/महाराष्ट्राची-प्रतिभा-झळाळली-107122200015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पराक्रमही करून झाला. पण दिल्लीचे सिंहासन मराठी माणसापासून कायम दूरच राहिले. पंतप्रधानपदही महाराष्ट्राला कधी मिळू शकले नाही. नाही म्हणायला यशवंतराव]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून २००७ या वर्षाने काय दिले असेल तर या देशाचे सर्वोच्च पद. यापेक्षा दुसरी कुठली मोठी घटना असूच शकत नाही. दिल्लीच्या तख्तावर मराठी जरीपटका फडकवायची स्वप्ने खूप पाहिली गेली. त्यासाठी अगदी पाकिस्तानातल्या अटकेपर्यंत धडक मारण्याचा <!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/22/images/img1071222015_1_1.jpg' Alt='pratibha' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <b>पराक्रमही करून झाला. पण दिल्लीचे सिंहासन मराठी माणसापासून कायम दूरच राहिले. पंतप्रधानपदही महाराष्ट्राला कधी मिळू शकले नाही. नाही म्हणायला यशवंतराव चव्हाणांना औटघटकेचे उपपंतप्रधानपद तेवढे मिळाले. पण दिल्लीच्या बाबतीत मराठा गडी अपयशाचा धनी ठरला. पण २००७ या वर्षाने मराठी माणसाला एक अनपेक्षित व चांगली भेट दिली, ती प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपतिपदाच्या रूपाने. त्यासाठी आलेले अडथळे अगदी विनासायास बाजूला झाला. एवढेच काय पण मराठी माणूस राष्ट्रपती होतोय म्हटल्यानंतर शिवसेनेनेही विरोध न करता पाठींबा देऊन मराठी अस्मिता जपली. पण देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ झालेल्या प्रतिभाताईंनी ही वाटचाल केली तरी कशी याचाच हा मागोवा....</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रतिभाताईंचे व्यक्तित्व सौम्य, ऋजू आणि पारदर्शी आहे. कपाळावर ठसठशीत कुंकू, आणि डोक्यावरचा पदर...भारतीय पारंपरिक, आदर्श स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. राजकारणात राहूनही साधनशुचिता जपलेली जी काही थोडी व्यक्तिमत्वे आहेत, त्यात प्रतिभाताईंचे नाव घेता येईल. चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही वादाचा शिंतोडाही न उडालेल्या प्रतिभाताईंवर विरोधकांनी गेल्या महिनाभर जे आरोप केले, त्यातले कुठलेच टिकले नाहीत, पण यामुळे प्रतिभाताईंपेक्षा विरोधकांचे मात्र हसे झाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>ताईंचा जन्म खान्देशातील जळगावात १९ डिसेंबर १९३४ मध्ये झाला. </font><font style=' color:#000000;'>त्यांचे वडिल सरकारी वकिल होते. एमए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रतिभाताई उपस्थित होत्या. महिलांनी राजकारणात यायला हवे. राजकारण स्वच्छ रहाण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, अशा आशयाचे भाषण तेव्हा चव्हाणांनी केले होते. ते ऐकून प्रभावित झालेल्या प्रतिभाताई राजकारणात उतरल्या. पण राजकारणा उतरायचे तर काही लक्ष्य समोर हवे, असे नव्हते. योगायोगाने त्यांच्या तोपर्यंतच्या कामाची पावती आणि धडाडी पाहून त्यांन जळगाव मतदारसंघातून आमदारकीचे तिकिट मिळाले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्या आमदार झाल्या. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे पंचवीस. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषवली. आमदार असतानाच त्या वकिल झाल्या. याच काळात त्यांचा विवाह झाला देवीसिंह शेखावत यांच्याशी. जळगावनंतर प्रतिभाताईंनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधानसभेत प्रतिभाताईंनी अनेक पदांवर संधी मिळाली. त्यांचे त्यांनी सोने केले. 1967 ते 77 या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. </font><font style=' color:#FF0080;'>त्यानंतर 1978 ते 1980 या कालावधीत शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले. शरद </font><font style=' color:#000000;'>पवारांसारखा नेता समोर असताना विरोधी पक्षनेतेपदी प्रतिभा पाटील असणे खरे तर यातच त्यांची क्षमता दिसून येते. कारण पवार यानी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचे सरकार बनविले होते. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने त्यांना या पदावर नेमले, याचाच अर्थ त्यांच्यावर असलेला पक्षाचा विश्वासही मोठा होता, हे दर्शविणारा आहे</font><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन 1980 मध्ये प्रतिभाताईंना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. पण पक्षानेही त्यांच्या योग्यतेचा विचार करून राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तेथे त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेऊन उपसभापती म्हणून निवड झाली. 1986 </font><font style=' color:#8000FF;'>ते 88 या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. </font><font style=' color:#000000;'>राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत 1991 साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यासारखी परिस्थिती होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण तरीही त्या कॉंग्रेसशी एकनिष्ठ होत्या. पक्ष सोडून जायचा असे त्यांच्या मनात कधीही आले नाही. अंतुलेंनी मुख्यमंत्रीपद हिरावून घेतले तेव्हाही नाही. त्यामुळेच पक्षाचा त्यांच्यावर विश्वास होता. म्हणूनच तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली गेली. इतकी वर्षे कॉंग्रेस पक्षाच्या विचारांशी ठेवलेल्या बांधिलकीने त्यांना राज्यपाल बनविले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या काळातही कुठला वाद त्यांना शिवला नाही. पण म्हणून मेणाहून मऊ अशीही त्यांची प्रतिमा नव्हती. राजस्थान सरकारने धर्मांतरबंदी करणारे विधेयक त्यांच्याकडे सहीसाठी पाठविले. पण त्यांनी त्यावर सही करण्याचे नाकारून ते राष्ट्रपतींकडे पाठविले. त्यांच्यातील कर्तव्यकठोर स्त्री दिसली ती या प्रकरणातून.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>आता त्या राष्ट्रपती झाल्या आहेत. जळगावची एक कन्या देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ झाली आहे. दिल्लीत मराठी पंतप्रधान कधी होईल तेव्हा होईल, पण निदान आता देशाचे सर्वोच्चपद तरी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 19:10:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वादाच्या वावटळीतील निवडणूक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/वादाच्या-वावटळीतील-निवडणूक-107122200013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/वादाच्या-वावटळीतील-निवडणूक-107122200013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाच्या तेराव्या राष्ट्रपतिपदासाठी झालेली निवडणूक यापूर्वी कधीही एवढी वादग्रस्त झालेली नव्हती. आधी नावांवरून चर्चांचा रतीब, मग भूमिकांची टक्कर, नावे ठऱल्यानंतर आरोपांच्या फैरी, उत्तर नि प्रत्त्युत्तर. महाराष्ट्राची कन्या असलेल्या प्रतिभाताई]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/22/images/img1071222013_1_1.jpg' Alt='pratibha' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>देशाच्या तेराव्या राष्ट्रपतिपदासाठी झालेली निवडणूक यापूर्वी कधीही एवढी वादग्रस्त झालेली नव्हती. आधी नावांवरून चर्चांचा रतीब, मग भूमिकांची टक्कर, नावे ठऱल्यानंतर आरोपांच्या फैरी, उत्तर नि प्रत्त्युत्तर. महाराष्ट्राची कन्या असलेल्या प्रतिभाताई पाटील या अखेर साऱ्या आरोपातून तावून सुलाखून राष्ट्रपती झाल्या. पण या निवडणुकीपूर्वीचा काळ अतिशय वादग्रस्त काळ म्हणून लक्षात राहील. या काळाचा हा मागोवा........</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रपतिपदासाठी चर्चेत अनेक नावे होती. पण या पदाची माळ प्रतिभाताईंच्या गळ्यात पडली तीही योगायोगानेच. या पदासाठी सर्वांत आधी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव चर्चेत होते. गेल्या वेळी शेखावतांविरोधात कॉंग्रेसने उपराष्ट्रपतिपदासाठी त्यांनाच उमेदवारी दिली होती. त्यामुळे याही वेळी शिंदेंनाच उमेदवारी मिळेल असे वाटत होते. पण नंतर त्यांचे नाव मागे पडले आणि शिवराज पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. प्रणव मुखर्जींना डाव्या पक्षांचा पाठिंबा होता. (</font><font style=' color:#FF0080;'>प. बंगालमधील होते म्हणून) </font><font style=' color:#000000;'>त्याचवेळी शिवराज पाटील यांना मात्र डाव्यांनी विरोध केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डावे आणि शिवराज पाटील यांच्यात यापूर्वीच बिघडलेले संबंध पाटील यांना अखेर अडचणीचेच ठरले. पाटील यांची सत्यसाईबाबांवर असलेली श्रद्धा आणि डाव्यांशी ज्यांच्याशी फाटले आहे, त्यांच्याशी पाटील यांचे असलेले चांगले संबंध हे खरे तर पाटील यांना विरोधाचे कारण होते. वास्तविक सोनिया गांधी यांची पसंती शिवराज पाटील यांनाच होती. कारण पाटील हे सोनियानिष्ठ आहेत. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही सोनियांनी त्यांना महत्त्वाचे गृहमंत्रिपद दिले यावरूनच त्यांच्यावरचा विश्वास लक्षात घ्यावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्यांच्या विरोधामुळे पाटील यांचेही नाव मागे पडले. मग सोनिया गांधींनी प्रतिभा पाटील यांचे नाव चर्चेत आणले. त्यावेळी प्रतिभाताई होत्या माऊंट अबू येथील शिबिरात. आपले नाव देशाच्या सर्वोच्च पदासाठी घेतले जाते आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती. असे म्हणतात, की शरद पवारांनीच ताईंचे नाव सुचविले. पुढे या नावाला अनुमोदन देण्यात पवारांचाच सहभाग होता. ताईंचे राजकीय जीवन जवळून पाहिलेल्या पवारांना ताईंविषयी माहिती होतीच. एक महिला या पदावर विराजमान झाल्यास तोही एक इतिहास घडेल, या सोनियांच्या मतानंतर सर्वच चित्र पालटले आणि प्रतिभाताईंच्या नावावर सहमती झाली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे या पदासाठी सर्वसहमतीची भाषा सुरवातीला करणाऱ्या भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विद्यमान उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत हेच आपले राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील, असे सांगितले. पण कॉंग्रेसने त्यांना विरोध केल्यानंतर रालोआने आपलेच घोडे पुढे दामटले. शेखावतांची प्रतिमा लक्षात घेता, त्यांना भाजपचे उमेदवार म्हणून पुढे केले, तर तिसऱ्या आघाडीचे खासदार त्यांना मतदान करणार नाहीत, म्हणून मग त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून उतरवण्याची टुम निघाली. पण तिसऱ्या आघाडीने कुणालाच पाठिंबा न देता तटस्थ रहाण्याचे ठरविले आणि आयत्यावेळी त्यातील अनेकांनी मतदानात भाग घेऊन प्रतिभाताईंना मतदान केले.</font><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेखावतांना उतरवल्यानंतर रालोआला अपेक्षित तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा मिळाला नाही. शिवाय मित्रपक्ष शिवसेनेनेही मराठी माणूस या मुद्द्यावरून प्रतिभाताईंना पाठिंबा दिला. मग मते फोडण्यासाठी छुपी रणनिती वापरत रालोआने प्रतिभाताईंविरोधात आरोपांची मोहिमच उघडली. जळगावात झालेल्या खूनप्रकरणी ताईंच्या भावाच हात असून त्यांनीच त्यांचा बचाव केला असा आरोप तेथील रजनी पाटील यांच्याकरवी त्यांना दिल्लीत आणून करण्यात आला. शिवाय ताईंनी स्थापन केलेल्या बॅंकेच्या थकीत कर्जाविषयीचे प्रकरण काढण्यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या खासदारनिधीचा वापर करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. या आरोपांसाठी प्रसारमाध्यमांचा पुरेपूर वापर करण्यात आला. शिवाय त्यासाठी खास गुळगुळीत कागदावर छापलेली पुस्तिकाही देशभरात वाटण्यात आली. इतकेच नव्हे तर एक वेबसाईटही सुरू करण्यात आली. रोज प्रत्येक नेता काही ना काही आरोप करू लागला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण या सर्व आरोपांदरम्यान प्रतिभाताई अगदी शांत होत्या. हे सर्व आरोप निराधार असल्याचे त्यांनी निक्षून सांगितल्यानंतर कोणत्याही आरोपाला उत्तर देण्याच्या भानगडीत त्या पडल्या नाहीत. कॉंग्रेसने आपल्यापरिने या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. पण यातील अनेक आरोप निराधार असल्याचे या क्षेत्रातील मंडळींनी सांगितले. बॅंकेबाबतच्या आरोपात काहीही तथ्य नाही हे सहकार संघाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले. खासदारनिधीबाबतचा आरोप लोकसभा अध्यक्ष सोमनाथ मुखर्जी यांनीच फेटाळून लावला. पण तरीही विरोधकांची कोल्हेकुई सुरूच होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खरे तर शेखावतांचा पराभव समोर दिसत असल्याचेच हे लक्षण होते. म्हणूनच शेवटच्या क्षणी तिसऱ्या आघाडीने तटस्थ रहाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आगतिक झालेल्या रालोआने तटस्थ रहाणे कायद्याला मंजूर नसल्याचे सांगत, निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. शेवटी आयोगानेच या निवडणूकीत मतदान करणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शेखावत पराभूत होणार हे स्पष्ट झाले आणि त्यावर शिक्कामोर्तबही झाले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 19:09:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नायक नहीं खलनायक हूँ मैं]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/नायक-नहीं-खलनायक-हूँ-मैं-107122200012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/नायक-नहीं-खलनायक-हूँ-मैं-107122200012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी्च्या खटल्यात शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त याला अखेर विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी सहा वर्षांची शिक्षा सुनावली. कोणत्याही हाय प्रोफाईल व्यक्तीला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/22/images/img1071222012_1_1.jpg' Alt='sanjay' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी्च्या खटल्यात शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त याला अखेर विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी सहा वर्षांची शिक्षा सुनावली. कोणत्याही हाय प्रोफाईल व्यक्तीला शिक्षा होऊ शकते हे कोणत्याही भारतीय व्यक्तीला पटू शकले नसते. पण संजयला शिक्षा झाल्याने लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत झाला. न्यायासमोर सर्व सारखे असतात, हेही त्यामुळे स्पष्ट झाले. त्यानंतर संजयला अटक झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महिना-दीड महिना आत राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला. त्यानंतर कोर्टाच्या निकालाची कागदपत्रे मिळाल्यानंतर तो पुन्हा पोलिसाच्या स्वाधीन झाला. त्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज दिला. तो मंजूर झाल्याने सध्या तो बाहेर आहे. पण तो कधीही आत जाऊ शकतो. त्यातच त्याने तुरूंगाची स्थिती सुधारायला हवी असे विधान करून आपला आतला अनुभव बाहेरच्यांशी शेअर केला. पण गांधीगिरीपूर्वीच मुन्नाभाई झालेल्या संजयचा प्रवास कसा झाला याचा हा आढावा..........</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गा़डीवर उंडारणं, ड्रग्ज घेणं, बेपर्वाई, बेफिकिरी, बेमूर्वतपणा आणि साऱ्या जगाला मी लाथ मारतो असा अविर्भाव....साधारणपणे कुठल्याही श्रीमंती बाळांना लागू होईल, असे हे वर्णन एकेकाळी संजय दत्तलाही लागू होते. </font><font style=' color:#FF0080;'>संजूबाबा म्हणून ओळखला जाणारा हा मुन्नाभाई त्याच्या पूर्वायुष्यात निरागस मुन्ना असण्यापेक्षा बराचसा भाई (लाक्षणिक अर्थाने) होता. </font><font style=' color:#000000;'>आई-वडिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा लावण्यासाठी जे काही करता येईल, ते या कुलदीपकाने त्याच्या पूर्वायुष्यात केले. गांधीगिरीपूर्वीची भाईगिरी पहायची असेल तर त्याच्या पूर्वायुष्याची कहाणी माहित करून घ्यावी लागेल. त्याच्या कुठल्याही चित्रपटाची पटकथा शोभावी एवढा मालमसाला त्यातही आहे.....</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही कहाणी घडली मुंबई नावाच्या आटपाट नगरात. माजी खासदार व अभिनेते सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस या नितांतसुंदर, सोज्जवळ जोडप्याच्या संजय हा द्वाड मुलगा. लहानपणापासूनच वाया गेलेला. </font><font style=' color:#FF0080;'>आई-वडिलांच्या प्रतिमेच्या बरोबर उलट याचा स्वभाव. हायस्कूलमध्ये असतानाच याला ड्रग्जची सवय लागलेली. आई नर्गिसला कर्करोग झाला होता हे कळल्यानंतर या बाळराजांच्या लीला थांबतील, असे त्या माऊलीला वाटले. पण तसे काही घडले नाही. </font><font style=' color:#000000;'>उलट बिचारी याच धक्क्याने लवकर गेली. संजयला आता ड्रग्जसाठी निमित्त मिळाले. आईच्या मृत्यूचे. ड्रग्ज घेण्याचे त्याचे प्रमाणही वाढले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तत्पूर्वी त्याचे चित्रपटसृष्टीत पदार्पण घडविणारा रॉकी हा चित्रपट येऊन गाजूनही गेला होता. त्याच्यात उद्याचा स्टारही दिसत होता. पण त्याचे स्टार मात्र काही तितके चांगले दिसत नव्हते. राजकारणात लोकांसाठी खूप काही करणाऱ्या पिता सुनील दत्त यांनी मुलाला सुधारण्याचे खूप प्रयत्न केले. पण यश येत नव्हते. व्यसन वाढल्यानंतर मात्र त्यांनी संजयला उचलून अमेरिकेतील टेक्सास येथे असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात नेले. तेथे संजय सुधारला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याच्या आयुष्यातील हा टर्निग पॉईंट म्हणता येईल. यानंतर संजय पुन्हा चित्रपटात काम करू लागला. याच काळात त्याच्यावरील उपचारात त्याची सेवा करणाऱ्या रिचा शर्मा या मुलीच्या प्रेमात तो पडला. दोघांनी लग्नही केले. त्यांना त्रिशला नावाची मुलगी झाली. पण दोनच महिन्यांनंतर कळले. रिचाला ब्रेन ट्युमर झालाय आणि ती काही महिन्यांचीच सोबती आहे. पुढे रिचाचा मृ्त्यू झाला. त्याच्या आयुष्यात त्रिशला हेच त्याचे सर्वस्व बनली. पण त्याच्या सासू सासऱ्यांनी कायदेशीर लढाई खेळून तिचा ताबा मिळवला. संजय पुन्हा एकटा राहिला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याच काळात मुंबईत १२ मार्च १९९३ ला बॉम्बस्फोट झाले. यात सहभागाचा संशय़ घेऊन पोलिसांनी संजयला अटक केली. बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत मुंबई अनेक दिवस जळत होती. त्यावेळी संजयने स्वरंक्षणासाठी शस्त्रे बाळगली. ही शस्त्रे त्याला मिळाली कशी याचा इतिहासही रोचक आहे. संजयचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे होते, हेच त्यातून दिसून येते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सीबीआयने टाडा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, की अबू सालेम त्याच्या काही साथीदारांसह १६ जानेवारी १९९३ ला संजय दत्तच्या घरी गेला. त्याने त्याला तीन एके-५६ रायफली शिवाय २५ हातगोळे, नऊ एमएम पिस्तूल आणि काही काडतुसे दिली. संजयने त्यातील दोन रायफली मॅग्नम व्हिडीओचे मालक हनीफ कडावाला व समीर हिंगोरा यांना परत केल्या. पण एक स्वतःजवळच ठेवली. बॉम्बस्फोट झाले तेव्हा संजय मॉरीशसमध्ये शूटींगमध्ये होता. तपासात पोलिसांना संजयचा सहभाग आढळल्याने त्यांनी संजयला बोलावणे पाठविले. त्यावेळी संजयने तेथूनच आपल्या घरात असलेली एक रायफल नष्ट करण्याचे युसफ नळवाला, केरसी अडजेनिया, रूसी मुल्ला आणि अजय मारवाह यांना सांगितले. त्यांनी तसे केले. ही रायफल आणि इतर शस्त्रास्त्रे नऊ जानेवारी १९९३ ला दुबईतून आली होती.</font><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/22/images/img1071222012_2_2.jpg' Alt='sanjay' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई पोलिसांच्या आरोपांचा संजयने इन्कार केला. पण त्यावेळी त्याचे वडिल सुनील दत्त यांनी त्याला तातडीने मुंबईत परतावे असे सांगितले. त्यानुसार संजय परत आल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर तो अठरा महिने ऑर्थर रोड कारागृहात होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा काळ संजय टीकेचे लक्ष्य बनला होता. प्रसारमाध्यमांनी त्याचे वाभाडे काढण्यास कमी केले नाही. त्याचा खलनायक हा चित्रपटही नेमका याच काळात आला. त्याच्या वास्तव आयुष्यातही तो खलनायक बनला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही त्याला टीकेचे लक्ष्य केले होते.संजयच्या स्टार प्रोफाईलचा परिणाम सर्व घडामोडींवर होत होता. यावेळी त्याचे वडिल सुनील दत्त यांनी अतिशय धीरोदात्तपणे आपला मुलगा नाठाळ असेल पण दहशतवादी नाही, असे बजावून सांगितले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संजयला वाचविण्याचे खूप प्रयत्न सुनील दत्त यांनी केले. शिवसेनेकडून होणारा विरोध थांबविण्यासाठी संजयला शिवसेनाप्रमुखांच्या पायावरही घातले. त्यानंतर शिवेसेनेने संजयविरोधातील भूमिका सोडून दिली. त्यानंतर सुनील दत्त यांनी लोकसभेची एक निवडणूक लढवलीच नाही. त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातून शिवसेनेचे मधुकर सरपोतदार खासदार झाले. सुनील दत्त यांनी शिवसेनेसाठी ही तडजोड केल्याचे बोलले जाते. त्यावेळी मुंबईचे पोलिस आयुक्त असणारे अमरजित सिंह सामरा यांनी संजय, निरागस असल्याचे सांगून वाद ओढवून घेतला होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशी परिस्थिती असतानाही नंतर हे वादळ कमी होत गेले. </font><font style=' color:#FF0080;'>पुढे संजयला जामीनही मिळाला. त्याची चित्रपट कारकिर्दही जोरात सुरू झाली. त्याच्या चित्रपटांना आधीपेक्षा जास्त यश मिळाले. मुन्नाभाईच्या चित्रपटांनी तर त्याच्या अभिनयावरही शिक्कामोर्तब केले. </font><font style=' color:#000000;'>त्याच्याविरोधात उडालेला जनप्रक्षोभ या काळात खूपच कमी होऊन त्याच्या चाहत्यांची संख्याही वाढली. यानंतर वेळ आली ती बॉम्बस्फोट खटल्याचे निकाल देण्याची. यात २८ नोव्हेंबर २००६ ला संजयचा नंबर लागला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>टाडा कोर्टाचे न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी संजयला बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याबद्दल दोषी ठरविले. पण दहशतवादी कटात सहभागी असल्याचा त्याच्याविरूद्धचा आरोप न्यायाधीशांनी फेटाळला. तो दहशतवादी नाही, असे न्यायाधीश कोदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. आणि अखेर त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला सहा वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चुकीच्या संगतीचा परिणाम एखाद्याचे आयुष्य कसे बिघडवतो, याचे संजय दत्त हे उत्तम उदाहरण आहे. गुंडांशी असलेली मैत्री त्याला अशी महागात पडली. गांधीगिरीपूर्वीची भाईगिरी त्याला तुरूंगात घेऊन गेली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>....<font  style='font-size:11pt; color:#000000'>जसा संजय बिघडला आणि शिक्षेस पात्र ठरला, तसाच तुमच्या आमच्या आजूबाजूला असलेला असा संजय मुलगा बिघडू नये शिक्षेस पात्र ठरू नये. साठा उत्तराची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 19:07:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शाहरूख निर्विवाद ‘किंग’, चाहत्यांना अक्षयचीही ‘भूल’]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/शाहरूख-निर्विवाद-‘किंग’-चाहत्यांना-अक्षयचीही-‘भूल’-107122100016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/शाहरूख-निर्विवाद-‘किंग’-चाहत्यांना-अक्षयचीही-‘भूल’-107122100016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेते चित्रपटांसोबतच त्यांच्या तगड्या मानधनासाठीही चर्चेत राहीले. आमिर खानने 30 कोटींची ऑफर लाथाडून पैशांपेक्षा आपण चित्रपट, कथा व निर्मिती मुल्यास अधिक महत्व देतो, हे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेते चित्रपटांसोबतच त्यांच्या तगड्या मानधनासाठीही चर्चेत राहीले. आमिर खानने 30 कोटींची ऑफर लाथाडून पैशांपेक्षा आपण चित्रपट, कथा व निर्मिती मुल्यास अधिक महत्व देतो, हे अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीवर राज्य करणार्‍या प्रमुख अभिनेत्यांचा आढावा- </b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221016_1_1.jpg' Alt='akshay kumar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>अक्षय कुमार (नमस्ते लंडन, हे बेबी, भूलभुलैया)</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अक्षय कुमारचे यावर्षी प्रदर्शित झालेले तीनही चित्रपट हिट झाले. त्यातच ख्रिसमसच्या शुभमुहूर्तावर त्याचा 'वेलकम'  प्रदर्शित होत आहे. अक्षयच्या मते आपण कोणत्याही खानापेक्षा काही कमी नाही. इतर अभिनेत्यांना टिकून राहणे कठिण झाले असताना अक्षय सलग यशस्वी चित्रपट देत आहे. त्याच्या चाहत्यांच्या संख्येत यावर्षी झपाट्याने वाढ झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>शाहरुख खान (चक दे इंडिया, ओम शांती ओम) </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221016_1_2.jpg' Alt='shahrukh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>चित्रपटसृष्टीतील किंग खान अर्थात शाहरूखने यंदाचे वर्ष गाजवले. तो निर्विवाद बादशाह राहिला. 'चक दे इंडिया' सारखा वेगळा चित्रपट स्वीकारून त्याने धोका स्वीकारला होता. पण चित्रपट सुपरहिट झाल्याने त्याने घेतलेली रिस्क यशात परिवर्तित झाली. शिवाय त्याच्यावर असणारा त्याच त्या भूमिकांचा आरोपही दूर झाला. 'ओम शांति ओ' चित्रपटातून त्याने अंगातला शर्ट फेकून देत देओल आणि सलमान खानसारख्या अभिनेत्यांनाही आव्हान अंगप्रदर्शनात हम भी कुछ कम नही, हे दाखवून दिले. या दोन्ही चित्रपटांच्या यशस्वीतने शाहरूखचे नाणे अद्यापही खणखणीत असल्याचे सिद्ध झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>सलमान खान (सलाम-ए-इश्क, पार्टनर, मेरीगोल्ड, सांवरिया) </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221016_1_3.jpg' Alt='salman' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सलमानचे चारपैकी तीन चित्रपट आपटले. 'सलाम-ए-इश्क' व 'मेरीगोल्ड' हे चित्रपट का स्वीकारले, हे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. 'सांवरिया' त्याला दोष देता येणार नाही. 'पार्टनर' हा त्याचा एकमात्र हिट चित्रपट राहिला. यामधून तो फक्त सुंदरच दिसला नाही तर गोविंदासोबत त्याची जुगलबंदी चांगलीच रंगली. लग्नाच्या बाबतीच मात्र त्याने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>अभिषेक बच्चन (गुरु, शूटआउट एट लोखंडवाला, झूम बराबर झूम, लागा चुनरी में दाग) </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>यावर्षात अभिषेक बच्चन चित्रपटांपेक्षा ऐश्वर्याशी लग्नामुळे अधिक चर्चेत राहीला. मणिरत्नम यांच्या 'गुरू' चित्रपटाने त्याला खणखणीत यश मिळवून दिले. 'झूम बराबर झूम' चित्रपटात बिग-बी असूनही तो दणकून आपटला. 'शूटआऊट...' व 'लागा चुनरी मे दाग' अभिषेक छोट्या भूमिकातून झळकला. मात्र काही चित्रपट यशस्वी होवूनही तो अद्यापपर्यंत स्थान घट्ट करू शकलेला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>सैफ अली खान (ता रा रम पम, एकलव्य) </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सैफचे लक्ष चित्रपटांपेक्षा गर्लफ्रेंड्सवर अधिक राहिले. यावर्षात त्याच्या चित्रपटांच्या संख्येपेक्षा जास्त मुलींशी नावे (रोजा, बिपाशा व करीना) जोडले गेले. खान त्रयींच्या स्पर्धेत उतरलेल्या सैफसाठी हे वर्ष एवढे अनुकूल राहिले नाही.</font><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>अमिताभ बच्चन (नि:शब्द, एकलव्य, शूटआउट एट लोखंडवाला, चीनी कम, झूम बराबर झूम, रामगोपाल वर्मा की आग) </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>नि:शब्द' व 'रामगोपाल वर्मा की आग'  हे चित्रपट केल्यामुळे अमिताभच्या वाट्याला प्रशंसेपेक्षा टीकाच आली. 'चीनी कम' ला शहरी भागात यश मिळाले. अभिषेकसाठी काही चित्रपट करण्याचा फटकाही त्याला बसला. आगामी वर्ष त्याला लाभेल अशी आशा करूया. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>जॉन अब्राहम  (सलाम-ए-इश्क, नो स्मोकिंग, गोल) </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जॉन अब्राहमला कारकीर्दीविषयी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. त्याचे चाहतेही त्याच्या चित्रपटांना जात नाहीत. 'गोल' चित्रपट दणकून आपटल्यावरून ते सिद्धही झाले. त्याला अभिनयात सुधारणा करणे आवश्यक आहे. </font><br/>        <font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>संजय दत्त (एकलव्य, शूटआउट एट लोखंडवाला, धमाल, दस कहानिया, नहले पे देहला) </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षभरात संजय दत्तचा एक पाय तुरूंगात तर दुसरा स्टुडिओत राहिला. त्याने केलेल्या पाच चित्रपटांपैकी फक्त 'धमाल' ने तिकीट खिडकीवर धमाल केली. संजयचे स्थान घसरत आहे. तुरूंगातून सतत आत-बाहेर राहिल्याने मोठे निर्माते त्याच्यापासून पळ काढत आहेत.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>सनी देओल (काफिला, अपने, फूल एन फाइनल, बिग ब्रदर) </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सनीच्या यशस्वीतेचा सूर्य वर्षभर ढगांआडच राहीला. 'अपने' व्यतिरिक्त त्याचे इतर चित्रपट दणकून आपटले. चाहत्यांचे त्याच्यावर आजही प्रेम असले तरी रद्दी चित्रपट ते कसे बघणार. त्यामुळेच त्याने आपल्या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपट निर्मितीचा धडाका लावला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>शाहिद कपूर (फूल अँड फाइनल, जब वुई मेट) </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चित्रपटसृष्टीत परिपक्व भूमिकांसाठी अपरिपक्व समजल्या जाणार्‍या शाहिदने गाडी 'जब वुई मेट' नंतर सुसाट सुटली आहे. त्याला आता एकट्यास अभिनेता म्हणून चित्रपट मिळू लागले आहेत. 'जब वुई मेट' व करीनामुळे शाहिदला हे वर्ष विसरणे नक्कीच शक्य नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>अजय देवगण (कॅश, रामगोपाल वर्मा की आग)</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सशक्त अभिनेता असूनही अजयने दर्जाहीन चित्रपटातून झळकण्याचा झपाटा लावला आहे. त्याने आपणांस काही निवडक बॅनरपच्या मर्यादेत बांधून घेतल्याचे ‍िदसते. 'कॅश' व ' आग' हे दोन्ही चित्रपट दणकून आदळले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>बॉबी देओल (शाकालाका बूम बूम, झूम बराबर झूम, अपने, नकाब, नन्हें जैसलमेर) </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अब्बास-मस्तान व यशराज फिल्मसने हात दिल्यानंतरही बॉबी तिकीट खिडकीवर नशीब काढू शकलेला नाही. 'अपने' चित्रपटातून वडील व भावासोबत अभिनय करण्याचा फायदा त्याला झाला, मात्र स्वत:च्या भरवशावर हिट चित्रपट देणे त्याच्यासाठी अशक्य झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>अक्षय खन्ना (सलाम-ए-इश्क, नकाब, गांधी माय फादर, आजा नच ले) </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सारख्या प्रयत्नानंतरही अक्षय अपयशाच्या कोंडाळ्यातून बाहेर पडू शकला नाही. 'गांधी माय फादर' मधील अभिनयासाठी त्याचे कौतुक झाले. पण एकट्याच्या भरवशावर हिट चित्रपट देणे शक्य नाही हे अधोरेखितही झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>रितेश देशमुख (हे बेबी, कॅश, धमाल)</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विनोदी चित्रपटातून रितेशची भट्टी चांगलीच जमते. यावर्षात त्याच्या खात्यात दोन हिट चित्रपट जमा झाले आहेत. रितेश इमेज बदलण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र निर्माता , दिग्दर्शक व प्रेक्षक त्याच्या विनोदी अभिनयाचेच चाहते आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>ह्रतिक रोशन - </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावर्षात त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तर आमिर खानचा 'तारे जमीन पर' एवढ्यात प्रदर्शित होईल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 19:06:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रस्थापित अभिनेत्रींच्या पिछेहाटीचे वर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/प्रस्थापित-अभिनेत्रींच्या-पिछेहाटीचे-वर्ष-107122100014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/प्रस्थापित-अभिनेत्रींच्या-पिछेहाटीचे-वर्ष-107122100014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सरते वर्ष प्रस्थापित अभिनेत्रींसाठी प्रतिकूल राहिले. राणी, प्रीती झिंटा, ऐश्वर्या रॉय यासारख्या प्रस्थापित अभिनेत्रींना मागे टाकत विद्या बालन, कैतरिना कैफ, दीपिका पदुकोण व लारा दत्ता सारख्या नवोदित अभिनेत्रींनी हिट चित्रपट दिले. अभिनेत्रीच्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरते वर्ष प्रस्थापित अभिनेत्रींसाठी प्रतिकूल राहिले. राणी, प्रीती झिंटा, ऐश्वर्या रॉय यासारख्या प्रस्थापित अभिनेत्रींना मागे टाकत विद्या बालन, कैतरिना कैफ, दीपिका पदुकोण व लारा दत्ता सारख्या नवोदित अभिनेत्रींनी हिट चित्रपट दिले. अभिनेत्रीच्या कामगिरीचा धावता आढावा घेऊया - </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>कैतरिना कैफ (नमस्ते लंडन, पार्टनर, अपने, वेलकम) </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_1_1.jpg' Alt='katrina' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कैतरिनाच्या चित्रपट कारकीर्दीचा आढावा घेतल्यास एखादा अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व चित्रपट हिट झाले आहेत. पदार्पणाअगोदर सलमान खानची प्रेयसी म्हणून ओळख असलेल्या कैतरिनाने बघता बघता स्वत:ची ओळख निर्माण केली. आता ती स्वत:चे निर्णय स्वतः घेते. निर्मातेही कैतरीनाचे महत्त्व ओळखून आहेत. कैतरिनानेही हिंदी संवादफेक व अभिनयात चांगलीच सुधारणा घडवून आणली आहे. ख्रिसमसच्या शुभमुहूर्तावर येणार</font><font style=' color:#FF80C0;'>ा 'वेलकम' </font><font style=' color:#000000;'>यशस्वी झाल्यास तिच्या याव र्षातील निर्विवाद यशावर शिक्कामोर्तब होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>विद्या बालन (सलाम-ए-इश्क, गुरु, एकलव्य, हे बेबी, भूलभुलैया)</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_1_2.jpg' Alt='vidya balan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सलग तीन हिट चित्रपटातून झळकून विद्याने भक्कम पायाभरणी केली आहे. '</font><font style=' color:#0080FF;'>हे बेबी' </font><font style=' color:#000000;'>मधून मॉडर्न लूक धारण करून तिने ग्लॅमरस बनण्याचा प्रयत्नही केला. विद्याची अभिनयाची बाजू भक्कम असल्यामुळे तिला प्रियदर्शन, विधू विनोद चोप्रा, निखिल अडवाणी, मणिरत्नम यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधून ‍अिभनयाची संधी मिळाली. नवीन वर्षात तिचे चांगले चित्रपट प्रदर्शित होणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>दीपिका पदुकोण (ओम शांती ओम)</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_1_3.jpg' Alt='deepika' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दीपिकाने पदार्पणातच अनेक प्रस्थापित अभिनेत्रींची झोप उडवली. तिचा एकच चित्रपट आला असला तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार अभिनेते व दिग्दर्शक दीपिकासोबत काम करण्यास इच्छुक आहेत. तरूण वर्गात प्रसिद्ध असलेली दीपिका पहिल्या क्रमांकाची प्रबळ दावेदार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>राणी मुखजीँ (ता रा रम पम, लागा चुनरी में दाग, सांवरिया) </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_1_4.jpg' Alt='rani' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>अभिनयातली राणी म्हणून प्रसिद्ध असलेली राणी निवडक चित्रपटांमधूनच दिसत आहे. मात्र, यावर्षी तिला अपेक्षित यश मिळाले नाही. लागा चुनरी मे दाग पूर्णपणे तिचा चित्रपट होता. पण तिकीट खिडकीवर तो प्रभाव पाडू शकला नाही. सांवरिया व  'ता रा रम पम' सारख्या चित्रपटांमधून तिने दमदार अभिनय केला मात्र चित्रपट कमकुवत असल्याचा फटका राणीस बसला. बहुतेक राणी आता लग्नाच्या तयारीत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>प्रीती झिंटा (झूम बराबर झूम)</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रीतीचेही सध्या अभिनयापेक्षा नेस वाडियाकडे अधिक लक्ष आहे. यावर्षात ती फक्त एका चित्रपटातून झळकली.  तोही फलॉप झाला. राणीप्रमाणेच प्रीतीही लग्नाची गाठ बांधण्याच्या तयारीत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>ऐश्वर्या रॉय (गुरु, प्रोव्होक्ड)</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_1_5.jpg' Alt='aish' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>यावर्षात ऐश्वर्या चित्रपटांपेक्षा लग्न, करवा चौथ व धार्मिक स्थळांच्या भेटींमुळे अधिक चर्चेत राहीली. ती गर्भवती असण्याबाबतही अंदाज बांधण्यात आले. बॉलीवूडमधील बहुतांश आघाडीच्या कलाकारांशी तिचे पटत नाही. चित्रपटांपेक्षा तिच्यासाठी कुटुंब अधिक महत्त्वाचे आहे. यावर्षी 'गुरू' चित्रपटामुळे तिला यश मिळाले तर प्रोव्होक्ड' मुळे तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली.</font><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>लारा दत्ता (झूम बराबर झूम, पार्टनर) </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_2_9.jpg' Alt='lara' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->   '<font  style='font-size:11pt; color:#000000'>झूम बराबर झूम' सारख्या पडेल चित्रपटापासून एकाच व्यक्तीला फायदा झाला. ती म्हणजे लारा दत्ता. डेव्डिड धवन यांच्या '</font><font style=' color:#FF80C0;'>पार्टनर' </font><font style=' color:#000000;'>चित्रपटामुळे तिचा हिट चित्रपटांचा दुष्काळही संपला आहे. आपणं विनोदी भूमिकाही भक्कमपणे करू शकतो, हे पार्टनरने सिद्ध केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>शिल्पा शेट्टी (मेट्रो, अपने)</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_2_2.jpg' Alt='shilpa' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>शिल्पा शेट्टीसाठी हे वर्ष भरभराटीचे गेले. 'बिग ब्रदर' स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. चित्रपटांपेक्षा तिचा संगीतमय कार्यक्रम 'मिस बॉलीवूड' ने यशाचे विक्रम नोंदवले. 'मेट्रो' मधील अभिनयासाठी ती कौतुकास पात्र ठरली. देवलबंधूंच्या 'अपने' मधूनही ती झळकली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>करीना कपूर (जब वी मेट) </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_2_10.jpg' Alt='karina' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PR</td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>करीनाने शाहिदचा हात सोडून सैफचा हात धरला. पण ती चित्रपटांपेक्षा चर्चेत राहीली ती प्रेमप्रकरणामुळे. त्यातच 'जब वुई मेट' चित्रपटही यशस्वी ठरला. सैफच्या प्रेमात पडलेल्या करीनाकडे चांगले चित्रपट असून ते नवीन वर्षात प्रदर्शित होतील.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>प्रियांका चोप्रा (सलाम-ए-इश्क, बिग ब्रदर)</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_2_4.jpg' Alt='prinkaya' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रियांकाने फार पूर्वी साइन केलेला 'बिग ब्रदर' नवीन वर्षात झळकेल. ‍या वर्षीचे तिचे दोन्ही चित्रपट तिकीट खिडकीवर आपटले तरी प्रियांकाची दखल घेणे आवश्यक आहे. वयासोबतच दिग्दर्शकांचा विश्वास तिच्याबरोबर आहे. आगामी काळात तिचे आणखी चित्रपट येतील. हरमनच्या नावाचा जप केल्यापेक्षा तिला अभिनयावर अधिक लक्ष द्यावे लागेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>बिपाशा बासू (नहले पे देहला, गोल)</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_2_5.jpg' Alt='bipasha' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>बॉयफ्रेंड जॉन अब्राहमप्रमाणेच बिपाशालाही यावर्षात यशाने झुकांडी दिली. कारकिर्दीच्या खडतर प्रवासातून ती जात आहे. भविष्यात आशा ठेवता येईल असे दर्जेदार चित्रपटही तिच्याकडे नाही. जॉन व तिच्यात ब्रेकअप झाला आणि पुन्हा ते एकत्रही आले. बहुतेक जॉन-विद्याच्या बातम्या कानावर पडत असल्यानेच तिने सैफशी मैत्री वाढवली होती. परिणामी जॉन बिपाशाकडे परत आला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'><b>सुश्मिता सेन (रामगोपाल वर्मा की आग) </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/21/images/img1071221014_2_6.jpg' Alt='sushmita' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुक्त जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुश्मिता सेनला हिंदी चित्रपटसृष्टीत अद्यापपर्यंत कुणीही गांभीर्याने घेतले नाही आणि तिनेही चित्रपटांना गांभीर्याने घेतेले नाही. त्यामुळे तिच्या कारकिर्दीची गाडी रडतखडत चालली आहे. रामगोपाल वर्मा की आग  हा तिचा प्रदर्शित झालेला वर्षातील एकमेव चित्रपट. सध्या ती 'दुल्हा मिल गया'  नावाचा चित्रपट करत असून तिने लवकरच लग्नाच्या मागे लागले पाहिजे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 19:01:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हॉकीत भारताचा प्रवास चढ उताराचाच]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/हॉकीत-भारताचा-प्रवास-चढ-उताराचाच-107122000012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/हॉकीत-भारताचा-प्रवास-चढ-उताराचाच-107122000012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय पुरूषांच्या हॉकी संघाने २००७ मध्ये आशिया कप जिंकला असला तरी आठ वेळा ऑलिंपिक विजेता होणाऱ्या  या संघापुढे पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी पात्र ठरण्याचे आव्हान आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय पुरूषांच्या हॉकी संघाने २००७ मध्ये आशिया कप जिंकला असला तरी आठ वेळा ऑलिंपिक विजेता होणाऱ्या  या संघापुढे पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी पात्र ठरण्याचे आव्हान आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आशिया कप विजेतेपद वगळले तर भारतीय पुरूष व महिला संघ २००७ मध्ये फार काही विशेष करू शकलेले नाही.  ऑलिंपिकमध्येही हे संघ पात्र ठरू शकले नाही यावरूनच संघांची कामगिरी लक्षात घ्यावी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या वर्षी हॉकीच्या दृष्टीकोनातून घडलेली चांगली बाब म्हणजे २०१० मध्ये होणाऱ्या पुरूष हॉकी विश्वकरंडकाचे यजमानपद  भारताला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आपली गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा कमावण्यासाठी दिल्ली येथे  विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद खेचून आणण्यात यश मिळविले आहे. या अंतर्गतच ऑस्ट्रेलियातील रिक चार्ल्सवर्थ  यांना भारतीय हॉकीचे तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. निराशाजनक कामगिरीमुळेच भारतीय खेळाडू  व प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेत कुठेही दिसले नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आशिया कपमध्ये चौदा गोल करून भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा प्रभूज्योतसिंग  आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या स्पर्धेत होता. पण ऑस्ट्रेलियाच्या जेमी ड्वेयर याने बाजी मारत  पुरस्कार पटकावला. महिलांमध्ये तर एकीलाही नामांकन मिळू शकले नाही, यातच सारे काही आले. यंदा कोणत्याही  हॉकी खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान मिळू शकला नाही. अर्जुन पुरस्कारही फक्त ज्योती  सुनीता कल्लूला मिळाला. द्रोणाचार्य पुरस्कार या क्षेत्राला मिळाला नाही. वीरेंदर सिंह यांनाच फक्त जीवनगौरव पुरस्कार  व ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुघलकी निर्णय घेण्याची परंपरा याही वर्षी पाळण्यात आली. आशिया कपमध्ये प्रत्येक गोलसाठी बक्षिस व आपल्या  संघावर गोल झाल्यास दंड असा विचित्र नियम महासंघाचे अध्यक्ष के. पी. एस. गिल यांनी काढला. ज्याच्यावर सर्वत्र  टीका झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय पुरूषांचा संघ नवे प्रशिक्षक जोकिम कारवाल्हो यांच्या नेतृत्वाखाली ५ ते १३ मेपर्यंत मलेशियात अझलह शाह  हॉकी स्पर्धा खेळायला गेला. पण तेथे तिसऱ्या क्रमांकापर्यंतच संघाने धडक मारली. सेमी फायनलमध्ये मलेशियाकडून  भारताला २-१ असा पराभव पत्करावा लागला. अखेर कास्य पदकासाठी झालेली लढत भारताने दक्षिण कोरीयाला  हरवून जिंकली.</font><br/></font><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर २३ जून ते एक जुलैपर्यंत बेल्जियममध्ये झालेल्या सहा देशांच्या स्पर्धेत संघ सहभागी झाला होता. यातील  विजेत्याला प्रतिष्ठित चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळणार होती. पण पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर न  करता येण्याची जुनी चूक भारताला भोवली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्जेंटिनाविरूद्धच्या सामन्यात तर भारताला अकरा पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. त्यातील एकावरही गोल होऊ शकला  नाही. परिणामी या सामन्यात २-१ अशी हार पत्करावी लागली. परिणामी अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न भंगले. अखेर  इंग्लंडला हरवून भारताला कास्य पदक तेवढे मिळाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वरिष्ठांची ही कामगिरी असताना २१ वर्षाखालील संघाची कामगिरीही वेगळी नव्हती. जर्मनीत आठ देशांदरम्याची  मालिका खेळण्यास गेलेला संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. अर्थात वर्षाच्या शेवटी झालेल्या बीएसएनएल आशिया  कपमध्ये कामगिरी उंचावून भारताने हा कप आपल्याकडेच राखला हे यश नमूद करावे लागेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अकरा देश सहभागी झालेल्या या स्पर्धेत भारताने सलग सात सामने जिंकून विजेतेपद पटकावले. आशियातील  पहिल्या क्रमांकाचा संघ दक्षिण कोरीयाला भारताने दोनदा हरविले, तर श्रीलंकेला तब्बल २०-० अशा विक्रमी गोलांनी  पराभूत केले. भारताने आशिया कपमध्ये तब्बल ५७ गोल केले आणि त्यांच्याविरूद्ध फक्त पाच गोल झाले. अंतिम  फेरीत कोरीयाला तर ७-२ अशी शिकस्त दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महिला संघाची सुरवात निराशाजनक झाली. चार देशांच्या स्पर्धेत जपानविरूद्धच्या सामन्यातच या संघाला मात खावी  लागली. इटलीत झालेल्या चौरंगी स्पर्धेतही याचीच पुनरावृत्ती झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉंगकॉंगमध्ये झालेल्या सहाव्या आशिया कप स्पर्धेत संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नऊ देशांच्या  या स्पर्धेत थायलंड, सिंगापूर यांना १६-० असे हरवून सुरवात चांगली केली होती. पण त्यानंतर कामगिरीत सातत्य न  राखल्याने संघाला पुढे जाता आले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिल्लीत खेळल्या गेलेल्या चौरंगी लाल बहादूर शास्त्री महिला हॉकी स्पर्धेत अझरबैझानला १-० असे हरवून भारतीय  संघाने या वर्षातील एकमेव विजेतेपद मिळविले. भारतीय पुरूष व हॉकी संघांपुढे ऑलिंपिकसाठी पात्र होणे हेच एक मोठे  आव्हान नजिकच्या काळात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुरूष हॉकी संघ मार्चमध्ये चिलीतील सॅंटियागो येथे ऑलिंपिक पात्रता फेरीत खेळेल. तर महिला संघ एप्रिलमध्ये  रशियात कझान येथे ऑलिंपिक पात्रता फेरीत खेळेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:59:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['भेजा फ्राय' चित्रपटांचा यंदाही 'ब्लॅक फ्रायडे']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/-भेजा-फ्राय-चित्रपटांचा-यंदाही-ब्लॅक-फ्रायडे-107121900016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/-भेजा-फ्राय-चित्रपटांचा-यंदाही-ब्लॅक-फ्रायडे-107121900016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[चित्रपट हे स्वप्नरंजनाचे माध्यम असल्याचा समज करून देणाऱ्या काळातही वर्तमानाचे बोट धरून चालणारेही काही  चित्रपट येत आहेत. सरत्या वर्षातही असे काही चित्रपट येऊन गेले. त्यांनी आजूबाजूच्या वास्तवावर बोट ठेवताना  त्याचे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219016_1_1.jpg' Alt='magova2007' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>चित्रपट हे स्वप्नरंजनाचे माध्यम असल्याचा समज करून देणाऱ्या काळातही वर्तमानाचे बोट धरून चालणारेही काही  चित्रपट येत आहेत. सरत्या वर्षातही असे काही चित्रपट येऊन गेले. त्यांनी आजूबाजूच्या वास्तवावर बोट ठेवताना  त्याचे अस्वस्थ करणारे रूपही लोकांपुढे मांडले. पण भेजा फ्राय करणाऱ्या या चित्रपटांचा ब्लॅक फ्रायडे यंदाही काही  टळला नाही.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219016_1_2.jpg' Alt='magova2007' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>बिमल रॉय आणि ह्रषिकेश मुखर्जी यांच्यानंतर हिंदी चित्रपट प्रामुख्याने दोन श्रेणीत विभागला जातो. कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट. पण गेल्या काही वर्षात या दोहोतील भेदही काहीसा कमी होऊ लागला आहे. काही दिग्दर्शक कला  व व्यावसायिकतेचा संगम करून चित्रपट काढत आहेत. त्याचवेळी निखळ कलात्मक म्हणून (म्हणजे काही लोकांपुरते  मर्यादीत राहणारे व न चालणारे) चित्रपट अगदी अल्प प्रमाणात येत आहेत. बाकी व्यावसायिक सिनेमा म्हणजे  वास्तवाशी नाते तोडलेले चित्रपट म्हणूनच उरले आहेत. म्हणूनच अशा परिस्थितीत वेगळी वाट चोखाळणाऱ्या  चित्रपटांची दखल घ्यावीच लागते. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219016_1_3.jpg' Alt='magova2007' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भेजा फ्राय, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., मेट्रो, चीन कम, परझानिया, ब्लॅक फ्रायडे हे त्यातील काही चित्रपट. पण याची  सुरवात २६ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या परझानियाने केली. राहूल ढोलकिया याचा हा चित्रपट गुजरात दंगलीवर  आधारीत होता. या दंगलीत आपला मुलगा गमावलेल्या पारशी कुटुंबाची ही संवेदनशील कहाणी अतिशय चांगली मांडली  होती. तत्कालीन राज्यकर्त्यांचा आणि हिंदूत्ववाद्यांचा उन्माद मांडताना चित्रपट लाऊडही झाला नाही. त्यामुळेच तो  लक्षात रहाणारा ठरला. अर्थातच तो चित्रपट फारच मर्यादीत प्रेक्षकांनी पाहिला. गुजरातमध्ये तर त्यावर बंदीची भाषाही  बोलली गेली. पण समीक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण वर्षातील चांगला ऑफ बीट चित्रपट म्हणायचा झाल्यास ब्लॅक फ्रायडेचे नाव घ्यावे लागेल. अनुराग कश्यप  दिग्दर्शित हा चित्रपट मुंबई बॉम्बस्फोटावर आधारीत होता. या चित्रपटाची डॉक्युमेंटरी होण्याचा धोका होता, पण  अनुरागने चित्रपट असा काही हाताळला आहे, की वास्तवाचे दूसरे रूप हा चित्रपट वाटतो. बॉम्बस्फोटाच्या कटापासून  त्याच्या आरोपींच्या शोधापर्यंतचा सगळा प्रवास खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. शिवाय चित्रपट हे सगळे दाखवून या  साऱ्याची कारणे सांगताना भाष्यही करून जातो. ही कारणे पटोत न पटोत पण चित्रपटाची दखल मात्र घ्यावी लागते.  यात मुंबईचे तत्कालीन सहआयुक्त राकेश मारीया यांची के. के. मेनन याने वठवलेले भूमिका लाजवाब होती. </font><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219016_2_1.jpg' Alt='magova2007' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मीरा नायर व दीपा मेहता या अनिवासी भारतीय दिग्दर्शकांचे नेहमी वेगळ्या पठडीत असणारे चित्रपट याही वर्षी आले  अपेक्षेप्रमाणे दीपा मेहता यांचा वॉटर हा चित्रपटही यंदा वादाचे मोहोळ उठवून गेला. शेवटी हिंदूत्ववाद्यांच्या तीव्र  विरोधातमुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित झालाच नाही. तिच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत वॉटर तितकासा चांगला  नव्हता, अशी चर्चा होती. मीरा नायरचा यंदा प्रदर्शित झालेला नेमसेक हा चित्रपट झुंपा लाहिरीच्याच कादंबरीवर  आधारीत होता. सलाम बॉम्बेनंतर मीराने एवढा चांगला चित्रपट दिल्याची समीक्षकांत चर्चा होती. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219016_2_2.jpg' Alt='magova2007' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>गौतम घोष यांचा यात्रा हाही या वर्षी प्रदर्शित झालेला वेगळा चित्रपट. याशिवाय ऐश्वर्या राय अभिनीत प्रोव्होक्डही चर्चेत  होता. पण त्याला बाहेरच जो काही मिळायचा तो प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने ऐश्वर्याच्या नावावर बाहेरचा एक  चित्रपट लागला. महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट बनविण्याचा मोह अजूनही अनेकांना आवरत नाही. यंदा अनिल  कपूरचे नाव त्यात घ्यायला हवे. अनिलच्या कंपनीतर्फे गांधी माय फादर हा चित्रपट यंदा प्रदर्शित झाला. महात्मा गांधी  व त्यांचा मुलगा देवदास यांच्यातील तणावाचे संबंध ही चित्रपटाची कथावस्तू. देवदासची भूमिका अक्षय खन्नाने केली  होती. पण चित्रपट लोकांना फारसा आवडला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विशाल भारद्वाज व मधुर भांडारकर यांनी व्यावसयिक व कलात्मक चित्रपट यांचा चांगला मेळ घातला आहे. त्यामुळे  एकावेळी दोन्ही प्रकारचे वाटावेत असे चित्रपट ते तयार करतात. पण याच प्रयत्नातील मधुरचा ट्रॅफिक सिग्नल यंदा  व्यावासयिकदृष्ट्या फसला. वास्तविक चित्रपट चांगला होता. तीच कथा भारद्वाजच्या ब्ल्यू अंब्रेलाची. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219016_2_3.jpg' Alt='magova2007' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवाय यंदा रिमा कागदी यांचा हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि. हा खुसखुशीत चित्रपट हसू उमटवून गेला. भेजा फ्राय हा  सागर बेल्लारी यांचा चित्रपट म्हणजे पडद्यावर केलेले छानसे नाटक होते. ते व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही ठरले. चिनी  कम हा शहरी भागात पाहिला गेला. पण साठ वर्षाच्या म्हाताऱ्याने पस्तीस वर्षाच्या मुलीशी लग्न करण्याचे वास्तव(?)  समाज पचवू शकला नाही. याशिवाय सुधीर मिश्रा यांचा गुरूदत्त व वहिदा रहमान यांच्या नातेसंबंधांवर आधारीत खोया  खोया चांद या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झाला. पण त्याने लगेचच मान टाकली. पण चित्रपटाची गाणी छान होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकूणात काय ऑफ बीट चित्रपटांना जाण्याचे धाडस काही ठरावीक लोकांनीच केले. त्यामुळे हे चित्रपट न चालण्याची  रड काही प्रमाणात कायम राहिली. पण तरीही त्यात कलात्मकरित्या जमलेले व व्यावसायिक समीकरणांना पुरे पडणारे  चित्रपट चालले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:58:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[निराशेतून आशेच्या हिंदोळ्यावर क्रिकेट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/निराशेतून-आशेच्या-हिंदोळ्यावर-क्रिकेट-107121800006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/निराशेतून-आशेच्या-हिंदोळ्यावर-क्रिकेट-107121800006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वेस्ट इंडीजमधील विश्वकरंडक स्पर्धेतील अत्यंत खराब कामगिरी ते दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धतील ऐतिहासिक विजय...अशा दोन टोकांमध्ये भारतीय क्रिकेट या वर्षी झुलले. आत्यंतिक निराशेनंतर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/18/images/img1071218006_1_1.jpg' Alt='ball' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>वेस्ट इंडीजमधील विश्वकरंडक स्पर्धेतील अत्यंत खराब कामगिरी ते दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धतील ऐतिहासिक विजय...अशा दोन टोकांमध्ये भारतीय क्रिकेट या वर्षी झुलले. आत्यंतिक निराशेनंतर आलेले आनंदपर्व भारतीयांनी इतक्या दणक्यात साजरे केले की या रसिकांनी विश्वकरंडकातील पराभवानंतर याच क्रिकेटपटूंची गाढवावरून प्रतीकात्मक धिंड काढली होती, हेही विसरायला झालं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय क्रिकेटमध्ये यावर्षी अशा काही घटना घडल्या की त्याचा परिणाम भविष्यातील क्रिकेटवर नक्कीच होतील. भारतीय क्रिकेट मंडळ याही वर्षी आपल्या धक्कादायक कारभारामुळे चर्चेत राहिले. मंडळाने घेतलेल्या अनेक निर्णयाचा परिणाम आगामी काळात होतील. इंडियन क्रिकेट लीगमध्य</font><font style=' color:#FF8040;'>े (आयसीएल) </font><font style=' color:#000000;'>सामील होणार्‍या खेळांडूवर घातलेली बंदी व खेळांडूचे तोंड बंद ठेवण्यासाठी आणि निवड समितीच्या सदस्यांना वृत्तपत्रात स्तंभलेखनावर बंदी घालणारा आदेश खूप दिवस चर्चेत राहीला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही वेळा मंडळाला माघार घ्यावी लागली. त्यामध्ये प्रशिक्षकाच्या निवडीचा मुद्दा समाविष्ट आहे. ग्रेग चॅपेल यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी निवडल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅहम फोर्डने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ऑफर लाथाडली होती. मग दक्षिण आफ्रीकेच्या गॅरी कर्स्टनची नियुक्ती करण्यात आली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी जानेवारीत न्यूझीलंडमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून तिसर्‍या व अंतिम कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र बांगलादेश व इंग्लंडला त्यांच्या मायदेशात 1-0 ने हरवून कसोटी मालिका जिंकली तर पाकिस्तानला 27 वर्षानंतर कसोटी मालिकेत‍ 1-0 ने हरविले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वकरंडक स्पर्धा, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून झालेले पराभव वगळले तर भारताची कामगिरी चांगलीच झाली आहे. यादरम्यान बांगलादेश, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानकडून मालिका जिंकली. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 3-4 असा भारताचा काठावर पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 4-2 ने पराभव केला.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/18/images/img1071218006_1_2.jpg' Alt='cricket07' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>वेस्ट इंडीजमध्ये भारतीय क्रिकेटवर लागलेला डाग धोनीसेनेने दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-20 विश्वकरंडक जिंकून पुसून टाकला. सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड आणि सौरभ गांगुली हे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत न खेळल्यामुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य आता युवा खेळांडूच्या हातात सुरक्षित असल्याचे म्हटले जाऊ लागले.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/18/images/img1071218006_1_3.jpg' Alt='cricket07' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>धोनीच्या संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानसारख्या दिग्गज संघाला हरवून पहिला विश्वकरंडक पटकावला. 1983 नंतर प्रथमच भारताने विश्वकरंडक जिंकला. भारतीय संघ मायदेशात परतल्यावर मुंबईमध्ये त्यांचे शाही स्वागत झाले. त्याचे ध्वनी परदेशातही उमटले. भारतीय रसिकांचे क्रिकेटप्रेम किती आहे हेच यातून दिसून आले. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/18/images/img1071218006_1_4.jpg' Alt='cricket07' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय क्रिकेटने यावर्षी तीन कर्णधार पाहिले. राहूल द्रविडने इंग्लंड दौर्‍यानंतर अचानक कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याचा हा निर्णय अजूनही एक रहस्य आहे. महेंद्रसिंग धोनी अगोदरच ट्वेंटी-20 स्पर्धेचा कर्णधार बनला होता. नंतर एकदिवसीय सामन्याची धुराही त्याच्यात हाती देण्यात आली. भारत‍ीय क्रिकेटचे नेतृत्व आता युवा खेळांडूच्या हाती गेले. पण कसोटी सामन्यासाठी अनुभवी अनिल कुंबळेकडेच कर्णधारपद देण्यात आले.</font><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/18/images/img1071218006_2_1.jpg' Alt='cricket07' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आकड्यांमध्ये संघाच्या कामगिरीविषयी बोलायचे झाल्यास यावर्षी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या नऊ कसोटी सामान्यात तीन सामने भारताने जिंकले व एका कसोटीत पराभव झाला. भारतीय संघाने 37 एकदिवसीय सामने खेळून 20 जिंकले. संघाला 15 सामन्यात हार पत्करावी लागली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संघाने सुरवातीला वेस्ट इंडीज व श्रीलंकेविरूद्ध मायदेशातील एकदिवसीय मालिका जिंकून विश्वकप स्पर्धेची चांगली तयारी असल्याची झलक दाखविली होती. भारताला विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु 17 मार्च 2007 या दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप झाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशाकडून भारत पराभूत झाला होता. </font><font style=' color:#FF8040;'>बांगलादेशाने बर्मुडाच्या नवीन संघाला 257 धावांनी हरवून इतिहास रचला होता. </font><font style=' color:#000000;'>श्रीलंकेने तिसर्‍या सामन्यात बांगलादेशला 69 धावांनी शिकस्त देत त्यांचे आव्हान संपवले.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/18/images/img1071218006_2_2.jpg' Alt='cricket07' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top'>PTI</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेत युवराजसिंहने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारले. कसोटीसाठी त्याला बाद ठरविल्यानंतर दैवयोगाने मिळालेल्या संधीचाही त्याने फायदा घेत पाकिस्तानच्याविरूद्ध बंगळूर कसोटीत शतक झळकावून निवड समितीला दखल घ्यायला लावली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगातील सर्वात श्रीमं‍त क्रिकेट मंडळाने याचदरम्यान आपली '</font><font style=' color:#FF8040;'>मनीपॉवर' </font><font style=' color:#000000;'>दाखवली. आयसीएल वाजत गाजत स्थापन झाल्यानंतर मंडळाने इंडियन प्रिमीयर लीग (</font><font style=' color:#FF8040;'>आयपीएल) </font><font style=' color:#000000;'>सुरू केली. विदेशी खेळांडूसाठी या माध्यमातून कोट्यवधी रूपये दिले जाणार आहेत. आता मार्च एप्रिल 2008 मध्ये कळेल की मंडळाने खेळलेला हा जुगाराचा कितपत यशस्वी ठरतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>जाता-जाता पुढील वर्षाच्या बाबतीत.... </b>भारतासाठी सर्वांत मोठे आव्हान ऑस्ट्रेलिया दौर्‍यात असून तेथे चार कसोटी सामन्याशिवाय तिरंगी मालिका खेळायची आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रीकेचा संघ भारत दौर्‍यावर येणार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>शेवटी यावर्षी दिलीप सरदेसाईसारख्या दिग्गज क्रिकेटपटूने अखेरचा निरोप घेतला. त्यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये संघाच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:57:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अतिरेकी कारवाया मागील पानावरून पुढे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/अतिरेकी-कारवाया-मागील-पानावरून-पुढे-107122700013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/अतिरेकी-कारवाया-मागील-पानावरून-पुढे-107122700013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दिल्ली अटारी समझोता एक्सप्रेसमध्ये झालेला स्फोट, हैदराबादमध्ये ऐतिहासिक मक्का मशिदीतील स्फोट व उत्तर प्रदेशात वाराणसी, फैजाबाद व लखनौतील न्यायालयांना साखळी बॉम्बस्फोटांनी केलेले लक्ष्य....अशा दहशतवादी घटनांनी या वर्षाला.........]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दिल्ली अटारी समझोता एक्सप्रेसमध्ये झालेला स्फोट, हैदराबादमध्ये ऐतिहासिक मक्का मशिदीतील स्फोट व उत्तर प्रदेशात वाराणसी, फैजाबाद व लखनौतील न्यायालयांना साखळी बॉम्बस्फोटांनी केलेले लक्ष्य....अशा दहशतवादी घटनांनी या वर्षाला एक काळा चेहरा दिला. पण या घटना घडूनही सर्वसामान्य लोकांचे मनोधैर्य मात्र खचले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशभरात डिसेंबरच्या मध्यापर्यंत दहशतवादी घटनांमध्ये २४६५ जणांचा मृत्यू झाला. त्यात ११२५ अतिरेकी, ९५७ नागरीक व ३३३ सुरक्षा कर्मचारी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतावादी कारवायांमध्ये घट झाल्याचे जाणवले. या राज्यात दहशतवादी घटनांत ७६८ जणांना प्राण गमवावे लागले. १९९० नंतरचा हे सर्वांत कमी प्रमाण आहे. १९९० मध्ये १७७ जणांचा मृत्यू झाला होता. २००१ मध्ये हे प्रमाण ४५०७ होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या वर्षातील प्रमुख दहशतवादी घटनांत समझोता एक्सप्रेसमधील स्फोटाचा उल्लेख करावा लागेल. दहशतवाद्यांनी भारत व पाकदरम्यान चाललेली शांतता प्रक्रिया रोखण्याच्या हेतूने या गाडीत स्फोट घडवून आणला. त्यात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात १५ मार्चला माओवाद्यांनी रानी बोदलीमध्ये पोलिसांवर हल्ला चढवून ५५ पोलिसांची हत्या केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांना धर्म नसतो, हे हैदराबादेतील मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटाने सिद्ध झाले. हैदराबाद या वर्षी दोनवेळा अतिरेक्यांचे लक्ष्य झाले. पहिल्यांदा सोळा मेस व दुसऱ्यांदा २५ ऑगस्टला. पहिल्या घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या स्फोटांत ४४ जणांना प्राण गमवावे लागले. यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश होता. संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी तेथे गेले होते. लुंबिनी पार्क येथे झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवाय २३ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातील लखनौ, वाराणसी व फैजाबाद येथील न्यायालयांना दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून लक्ष्य केले. त्यात अनेकांचे जीव गेले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या घटना वगळल्या तर त्या तुलनेत देशांत फार मोठ्या अशा दहशतवादी घटना घडल्या नाही. ईशान्य भारतातील दहशतवाद मात्र या वर्षात वाढला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माओवाद्यांच्या कारवायात या वर्षी काहीशी घट झाली. गेल्या वर्षी त्यांच्या कारवायांत ७४२ जणांना प्राण गमवावे लागले. यावर्षी ही संख्या ६१३ पर्यंत खाली आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिरेक्यांनी घातपाती कारवायांचे तंत्र काहीसे बदलले. स्लीपींग सेलचा वापर करून बरेच स्फोट घडविण्यात आले. गेल्य काही महिन्यात झालेल्या अतिरेकी घटनांची जबाबदारी हरकत उल जिहादी इस्लामिया उर्फ हुजी या अतिरेकी संघटनेने घेतली आहे. या संघटनेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम पैसा पुरवतो असे स्पष्ट झाले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 27 Dec 2007 16:12:29 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मोदी बनले 'सत्तेचे सौदागर']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/मोदी-बनले-सत्तेचे-सौदागर-107122700011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/मोदी-बनले-सत्तेचे-सौदागर-107122700011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[२००७ या वर्षात राजकारणात अनेक घटना घडल्या. कॉंग्रेसला उत्तराखंड व पंजाबमध्ये सत्त गमवावी लागली. भाजपच्या दृष्टिने मात्र वर्ष तसे चांगले गेले. कारण या दोन राज्यात सत्तेवर येताना गुजरातमध्ये सलग]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/27/images/img1071227011_1_1.jpg' Alt='modi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>२००७ या वर्षात राजकारणात अनेक घटना घडल्या. कॉंग्रेसला उत्तराखंड व पंजाबमध्ये सत्त गमवावी लागली. भाजपच्या दृष्टिने मात्र वर्ष तसे चांगले गेले. कारण या दोन राज्यात सत्तेवर येताना गुजरातमध्ये सलग चौथ्यांदा पक्षाने सत्ता खेचून आणली.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचे सोशल इंजिनियरींग जोरदार चालले. त्यामुळे पंधरा वर्षांनंतर कुणा एका पक्षाला तेथे बहूमताने सत्ता मिळाली. गुजरातमध्ये मीडीयाच्या तसेच विरोधकांच्याही प्रचाराला धूप न घालता मतदारांनी नरेंद्र मोदींना भरभरून मते दिली आणि त्यांना सत्तेचे सौदागर बनविले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'><b>भगवा फडकला- </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भगव्याची कास धरणाऱ्या भारतीय जनता पक्षाला गेले वर्ष आनंदाचे गेले. उत्तराखंडात कॉंग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेतली. गेल्या निवडणुकीत ३६ जागा मिळविणाऱ्या कॉंग्रेसला यावेळी पख्त २१ जागाच मिळू शकल्या. जनरल (निवृत्त) भुवनचंद्र खंडूरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेत आले. भाजपला आनंद साजरा करण्याची संधी दिली ती पंजाबने. शिरोमणी अकाली दलाच्या साथीने भाजपने पंजाबमध्ये कॉंग्रेसला सत्तेवरून खाली खेचले. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याकडून मुख्यमंत्रिपद खेचून घेत शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री झाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->पुढील वर्ष राजकीय हालचालींचे ठरेल. विशेषतः भाजपची कसोटी लागेल. कारण या वर्षांत मध्य प्रदेश, राजस्तान व छत्तीसगडमध्ये निवडणूक होते आहे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपसाठी या वर्षाचा शेवट गोड केला तो गुजरातने. गुजरातमध्ये सगळ्या शक्याशक्यतांना, पोल पंडितांच्या अंदाजांना, सर्वेक्षणाला आणि विरोधकांच्या जोरदार प्रचाराला मातीत घालून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. १८२ सदस्यांच्या या विधानसभेत मोदींनी ११७ जागा मिळवून विरोधकांची हवा गुल केली. या विजयाने मोदी पक्षापेक्षाही मोठे झाले. त्यामुळे पक्षातील नेतेमंडळीही टरकली आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'><b>वाजपेयींचा राजसंन्यास </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माजी पंतप्रधान अटलबिहारी या वर्षात राजकारणातून निवृत्तच झाल्यासारखे होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा तोंडावळा वाजपेयीच होते. पण ते निवृत्त झाल्याने पक्षाला फटका बसला. आता पक्षाने लालकृष्ण अडवानींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले आहे. पण कट्टर हिंदूत्ववादी अडवानींनी सगळे पक्ष स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'><b>कॉंग्रेसला २००७ चा फटक</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेससाठी हे वर्ष कटू आठवणींनी भरलेले असेच गेले. उत्तराखंड, पंजाब या राज्यांची सत्ता पक्षाने गमावली. उत्तर प्रदेशची सत्ता प्राप्त करण्याचे स्वप्न मायावतींनी असे काही उधळून लावले की या निवडणुकीत पक्षाची धुरा सांभाळणारे राहूल गांधी पार भिरभिरून गेले. म्हणूनच गुजरातच्या निवडणुकीतही ते एकदाच प्रचारात सहभागी झाले. उत्तर प्रदेशात खुद्द सोनिया गांधी व राहूल यांनी घेतलेल्या सभा, रोड शो यांचा काही म्हणजे काही उपयोग झाला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तीच कथा गुजरातची. गुजरातमध्ये सोनियांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवून बेअरींग तर छान घेतले. त्यांच्या सभांना गर्दीपण चांगली झाली. राहूलचा रोड शोही गाजला. पण मतदारांनी कॉंग्रेसला वाकुल्या दाखवल्या. विशेष म्हणजे सोनियांच्या सभा जेथे जेथे झाल्या तेथे तेथे त्यांना पूर्वीपेक्षा कमी जागा मिळाल्या. गुजरातमध्ये तर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगही प्रचारासाठी आले होते. पण तरीही काहीही उपयोग झाला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेससाठी समाधानाची बाब म्हणजे गोव्यात कसे बसे सरकार बनविता आले. पण त्याचवेळी हरियानात पक्षात फूट पडल्याने भविष्यत पक्षाला त्रास होईल, याचे संकेतही दिसले. पक्षाचे ज्येष्ठ नेते भजनलाल यांनी पक्षातून बाहेर पडून नविन पक्ष स्थापन केला. सध्या राज्यातील सरकारला धोका नसला तरी भविष्यात काही सांगता येत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'><b>राहूलच्या भाळी पदाचा टिळ</font><font style=' color:#000000;'>ा</font><font style='font-size:12pt;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/27/images/img1071227011_1_2.jpg' Alt='rahulgandhi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसमध्ये आता तरूण तुर्कांचे दिवस येणार याचे संकेत या वर्षी दिसले. त्याचबरोबर या तरूण तुर्कांचे नेतृत्व राहूल गांधींकडे असणार हेही स्पष्ट झाले. राहूलला पक्षाचे सरचिटणीसपद देताना एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे नेतृत्वही दिले. राहूलच्या युवराजपदानंतर आता पुढील पंतप्रधान तोच असू शकतो, हेच स्पष्ट झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'><b>उत्तर प्रदेशात मायाजाल</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/27/images/img1071227011_1_3.jpg' Alt='mayawati' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या वर्षाची महत्त्वाची घटना म्हणजे उत्तर प्रदेशात पूर्णपणे स्वबळावर आलेले मायावतींचे सरकार. मायावतींनी सोशल इंजिनियरींगचे गणित असे काही जमवले की भले भले पोलपंडित, राजकीय विश्लेषक, नेते पार भेलकांडून गेले. तिलक, तराजू और तलवार इनको मारो जुते चार म्हणणआऱ्या मायावतींनी सतीशचंद्र मिश्रा यांच्या साथीने उत्तर प्रदेशातील ब्राह्मणांना आपल्या दावणीला बांधले. यावेळी त्यांनी १३९ उच्चवर्णीयांना उमेदवारी दिली. दलित व सवर्णांची अनोखी आघाडी करून त्यांनी हत्तीच्या भाळी विजयाचा टिळा लावला. मायावतींच्या या राजकारणाने उत्तर प्रदेशातील गेली १५ वर्षांची अस्थिरताही संपून गेली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#F29744'><b>अणू करार</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे वर्ष केंद्र सरकारसाठी डोकेदुखीचे गेले. अणू कराराच्या मुद्यावरून डाव्यांनी केंद्राला सतत धारेवर धऱले. परिणामी कॉंग्रेसला सतत मागे यावे लागले. परिणामी हा करार होऊ शकला नाही. गुजरातमधील पराभवानंतर कॉंग्रेस पुन्हा हा मुद्दा काढेल असे वाटत नाही. नंदीग्राम मुद्द्यावरून बंगालमध्ये डाव्यांना बॅकफूटवर यावे लागले. सगळीकडून टीकेचा भडीमार झाला. त्यात तस्लीमाचे प्रकरणही नडले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढील वर्ष राजकीय हालचालींचे ठरेल. विशेषतः भाजपची कसोटी लागेल. कारण या वर्षांत मध्य प्रदेश, राजस्तान व छत्तीसगडमध्ये निवडणूक होते आहे. या राज्यांसाठी भाजपकडे मोदींसारखे करिश्मा दाखविणारे नेतृत्व नाही. त्यामुळे कॉंग्रेस सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार हेही निश्चित.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 27 Dec 2007 14:46:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अर्थव्यवस्थेसाठी २००७ फील गुड वर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/अर्थव्यवस्थेसाठी-२००७-फील-गुड-वर्ष-107122200018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/अर्थव्यवस्थेसाठी-२००७-फील-गुड-वर्ष-107122200018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[2007 हे वर्ष उद्योग जगतासाठी खूपच चांगले गेले. शेअर बाजाराने विक्रमी उंची गाठली. चलनवाढही ती टक्क्यांपर्यंत खाली घसरून महागाईला आळा घातला गेला.  टाटाने कोरसला तर मित्तल यांनी आर्सेलर कंपनीला खिशात टाकून उद्योग..........]]></description>
      <content:encoded><![CDATA[2007 <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>हे वर्ष उद्योग जगतासाठी खूपच चांगले गेले. शेअर बाजाराने विक्रमी उंची गाठली. चलनवाढही ती टक्क्यांपर्यंत खाली घसरून महागाईला आळा घातला गेला.  टाटाने कोरसला तर मित्तल यांनी आर्सेलर कंपनीला खिशात टाकून उद्योग जगतात भारतीय ऐरावताची दादागिरी दाखवून दिली. त्याचवेळी जगभरात पसरलेल्या भारतीय व्यवस्थापकांनी अनेक महत्त्वाच्या कंपन्यांची उच्च पदे मिळवून भारतीय बुद्धिमत्तेची छाप उमटवली. त्यामुळे बॅंकींगपासून ऑटोमोबाईलपर्यंत सर्व क्षेत्रात खऱ्या अर्थाने फील गुड वाटले. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉलरची किंमत वाढल्याने निर्यातदारांपुढे मोठी अडचण उभी राहिली. त्याचवेळी अनिल अंबानी यांना भावाबरोबरच वाद आणि देशातील अनेक ठिकाणी त्यांच्या रिलायन्स फ्रेशला झालेला विरोध डोकेदुखीला कारण ठरला. सेझच्या मुद्दयावरून केंद्र सरकार आणि ठिकठिकाणची राज्य सरकारे अनेकदा अडचणीत आली. पण या काही बाबी सोडल्या तर एकूणातच हे वर्ष चांगले गेले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>शेअर बाजार नव्या उंचीव</font><font style=' color:#000000;'>र</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय शेअर बाजारासाठी हे वर्ष 'वाढता वाढता भेदीला वीस हजार निर्देशांकाला' असे गेले. बाजाराचा बैल यावर्षी वेगाने पुढे पुढे पळत होता. त्यामुळेच ३१ डिसेंबर २००६ ला निर्देशांक १३ हजार ७८७ वर होता. या वर्षांत तो वीस हजाराच्या वर जाऊन आला. याचा अर्थ एका वर्षात सहा हजार निर्देशांकाचा प्रवास त्याने केला. म्हणूनच गुंतवणूकदार यावर्षी खुश होते. परदेशी गुंतवणूकदार संस्थाही खुश आहेत. पण बाजाराचे संवेदनशील रूपही दिसून आले. बाजार एके दिवशी पंधराशे अंकांनी कोसळला, पण एका दिवशी तेराशे अंकाची वाढही त्यात झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>परदेशी कंपन्यांचे अधिग्रह</font><font style=' color:#000000;'>ण</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय उद्योगांसाठी हे वर्ष चांगले गेले. टाटा स्टील, किंगफिशर, ओएनजीसी या कंपन्यांसाठी ते विशेष आठवणीत राहील. भारतीय वंशाचे उद्योजक लक्ष्मी मित्तल यांच्या मित्तल स्टीलने आर्सेलर या जगातील बड्या स्टील कंपनीला विकत घेऊन भारतीय ताकद दाखवून दिली. त्यालाच पुढे नेताना भारतातील अनेक उद्योगांनी रिटेल, रियल इस्टेट व ऑटोमोबाईल क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची ध्वजा फडकावली. टाटाने कोरसचा घास घेऊन सगळ्यांना चकीत केले. आता जग्वार व प्युजोची निर्मिती करणाऱ्या फोर्डच्या कंपनीला गिळंकृत करण्याची तयारी सुरू आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>भारतीय बुद्धिमत्तेची छाप जगताव</font><font style=' color:#000000;'>र</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अनेक भारतीयांनी जागतिक कंपन्यांवर आपला ठसा उमटवला. नागपूरचे विक्रम पंडित यांना सीटी ग्रुपचे सीईओपद मिळाले. त पद्मश्री वारियर यांना सिस्कोचे सीटीओपद मिळाले. याशिवाय पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी, व्होडाफोनचे सीईओ अरूण सरीन, हार्टफोर्ड इंटरनॅशनलचे रामाणी अय्यर व एडोब सिस्टिम्सचे शांतनू नारायणन यांचीही जगावर छाप पडली. भारतीय वंशाचे सी. के. प्रल्हाद जगातील सर्वांत प्रभावी थिंकर म्हणून निवडले गेले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->डॉलरची किंमत वाढल्याने निर्यातदारांपुढे मोठी अडचण उभी राहिली. त्याचवेळी अनिल अंबानी यांना भावाबरोबरच वाद आणि देशातील अनेक ठिकाणी त्यांच्या रिलायन्स फ्रेशला झालेला विरोध डोकेदुखीला कारण ठरला.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>रूपया मजबू</font><font style=' color:#000000;'>त</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेचे राजकीय महत्त्व कमी होत असताना त्यांना आर्थिक बाबतीतही नुकसान झाले. डॉलरची किंमत घसरल्याने अमेरिकेचे धाबे दणाणले आहे. आखातात अमेरिकेने केलेला उतपातही मुळावर आला आहे. डॉलरची किंमत घटल्याने रूपयाची किंमत वधारली. रूपयाची किंमत वाढल्याने निर्यातदारांना मोठा फटका बसला, पण आयातदारांची मात्र चांदी झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>गुंतवणूकदारांसाठी पायघड्य</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी चांगली योजना तयार केली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. परदेशी कंपन्या भारतात येण्यास उत्सूक दिसल्या. बॅंकिंग, रिटेल, टेलिकॉम, आयटी, बीपीओ, केपीओ या क्षेत्रात त्यांची रूची जास्त दिसली. शेअर बाजारातील तेजीचे श्रेय त्यांनाही जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>मोटारसायकलला कराची धड</font><font style=' color:#000000;'>क</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारने दुचाकी वाहनांवर कर लावल्याने विक्रीत ३.८९ टक्के घट झाली. कर्ज कमी उपलब्ध झाल्याने मोटारसायकल उद्योगाला फटका बसला. २००७ मध्ये केवळ ७५ लाक दुचाकींची विक्री झाली. त्यामुळे आगामी वर्षाकडून या उद्योगाला मोठ्या अपेक्षा आहे. वर्षाच्या शेवटी सरकारनेही त्यांना तसे आश्वासन दिले आहे. त्याचवेळी कार उद्योगासाठी मात्र हे वर्ष आनंदात गेले. टाटा व मारूतीने कोट्यावधी रूपये गुंतविण्याची योजना तयार केली. या उद्योगाने वर्षभरात दहा लाख कार विकून विक्रम केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>रिटेल उद्योगाचा बोलबाल</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रिटेल कंपन्यांचा याही वर्षी बोलबाला होता. वॉलमार्टसहीत जगभरातील बड्या कंपन्या भारतावर नजर ठेवून होत्या. रिलायन्स, सुभिक्षा, बिग बाजार यांनी लोकांना मॉलमध्ये खरेदीची सवय लावली. रिलायन्सने भाजीविक्रीत उतरून विक्रेत्यांचे शिव्याशाप खाल्ले. २००६ मध्ये देशात केवळ १०५ मॉल होते. २००७मध्ये त्यांची संख्या १८० झाली. जागतिक अर्थव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत पाचवे रिटेल डेस्टिनेशन असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे आगामी वर्षातही या उद्योगात तेजी दिसेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>सेझला कडाडून विरो</font><font style=' color:#000000;'>ध</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे वर्ष सेझला कडाडून झालेल्या विरोधासाठीही ओळखले जाईल. शेतकऱ्यांकडून जमिनी अधिग्रहित करण्यात सरकारला डोकेदुखी झाली. सरकारी धोरणांवर टीका करण्यात आली. पण सरकारही भूमिकेवर ठाम होते. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओरीसा या राज्यात सेझवरून रणकंदन झाले. मध्य प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र सरकारने उद्योगांना आकर्षित करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>पंचवार्षिक योजना </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या वर्षाच्या शेवटी पंतप्रधानांनी उद्योग जगताला अकराव्या पंचवार्षिक योजनेची भेट दिली. या काळात आर्थिक वाढीचा दर दहा टक्के राहील, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>एकूणात काय तर २००७ हे वर्ष उद्योग जगताच्या दृष्टिकोनातून बरेच काही मिळवून देणारे ठरले. याच्या जोरावर २००८ मध्ये भारत पुढचा मोठा टप्पा गाठेल ही अपेक्षा.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 22 Dec 2007 17:14:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[धकधक गर्लचे पुनरागमन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/धकधक-गर्लचे-पुनरागमन-107122200016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/धकधक-गर्लचे-पुनरागमन-107122200016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[२००७ या वर्षातील चित्रपटसृष्टीत घडलेल्या मोठ्या घटनांपैकी एक म्हणजे आपल्या मोहक हास्याने लाखो प्रेक्षकांना वेड लावणारी, लाखोंच्या ह्रदयाची धडकन माधुरी दीक्ष‍ितने केलेले पुनरागमन. यशराज फिल्म्सच्या 'आजा नच ले']]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/22/images/img1071222016_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>२००७ या वर्षातील चित्रपटसृष्टीत घडलेल्या मोठ्या घटनांपैकी एक म्हणजे आपल्या मोहक हास्याने लाखो प्रेक्षकांना वेड लावणारी, लाखोंच्या ह्रदयाची धडकन माधुरी दीक्ष‍ितने केलेले पुनरागमन. यशराज फिल्म्सच्या 'आजा नच ले' या चित्रपटातून माधुरीने पुनरागमन केले. चित्रपटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. पण माधुरीच्या अभिनयाची मात्र वाहवा झाली. त्याच जुन्या अंदाजात माधुरी पुन्हा दिसली. या धकधक गर्लशी त्यावेळी मारलेल्या गप्पांचा हा गोषवारा........</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>पुनरागमनाविषयी......</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हो. बराच कालावधी गेल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. कारण तुम्हाला तुमच्या पूर्वलौकीकाला जागून चांगलीच कामगिरी करावी लागते. तुमच्या प्रत्येक गोष्टींवर नजर ठेवली जाते. सगळ्यांना तुम्ही कोणता चित्रपट करत आहात व त्यात कोणती भूमिका करत आहात याची उत्सुकता असते. लोकांच्या खूप अपेक्षा असतात. त्याचा ताणही असतो. मी चुकीचे तर करत नाही ना? माझे काम आवडेल ना? असे अनेक प्रश्न मनात थैमान घालत असतात. माझ्यावर दोन मुलांची जबाबदारी आहे. ते मुंबईत राहू शकतील ना ? असा विचार माझ्या मनात होता. कारण इतके दिवस त्यांनी कधीच मुंबईत घालवले नाहीत. पण त्यांनी शूटींगचा मनसोक्त आनंद घेतला. माझा मोठा मुलगा आता हिंदी बोलतोही व हिंदी गाणेही गातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>चोप्रा कुटुंबियांशी संबं</font><font style=' color:#000000;'>ध</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात नृत्य केल्यानंतर यशजींनी मला चित्रपटात काम करण्यासंदर्भात विचारणा केली. मी यावर गांभीर्याने विचार केला नव्हता. नंतर आदित्य चोप्राने माझ्याशी चर्चा केली व चित्रपटाचा विषय मांडला. यशजींसोबत मी 'दिल तो पागल है' हा चित्रपट केला होता. त्यांचे काम सुनियोजीत व व्यवस्थित असते. त्याचप्रमाणे ते जे सांगतात ते खरे करून दाखवितात. त्यामुळे मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. त्या आदरापोटीच मी त्यांना होकार दिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->बराच कालावधी गेल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. तुम्हाला तुमच्या पूर्वलौकीकाला जागून चांगलीच कामगिरी करावी लागते. तुमच्या प्रत्येक गोष्टींवर नजर ठेवली जाते. सगळ्यांना तुम्ही कोणता चित्रपट करत आहात व त्यात कोणती भूमिका करत आहात याची उत्सुकता असते.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> '<font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>आजा नच ले'बद्द</font><font style=' color:#000000;'>ल</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाश्चात्य संस्कृती आपल्या देशात पाय पसरवत आहे. परिणामी प्राचीन परंपरा असल्या आपल्या संस्कृतीपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपली कला, कौशल्ये नष्ट होत आहेत. चित्रपट माध्यम हेही त्यातलेच एक. हा चित्रपट आपल्या संस्कृतीशी नाळ जोडतो. आपली मुल्ये व संस्कृती याकडे घेऊन जातो. ही कथा आजच्या युगाशी मिळतीजुळती आहे. थोडक्यात 'फिल गुड मूव्ही' आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>दीर्घकाळानंतर कॅमेरासमोर....</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फारच छान. पहिले दोन तास मी काही विसरले तर नाही ना? अशी भीती मनात होती. पण दोन तासांनी हेच विसरली की मी सहा वर्षांनी शूटींग करत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>चित्रपट जगतातील बदल....</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हो, बरेच बदल पहायला मिळाले. आता वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनविले जात आहेत. सगळी कामे सुव्यस्थित होत आहेत. पटकथा आधीच दिली जाते. मला आठवते की आधी मी जेव्हा शूटींगला जायची तेव्हा बर्‍याचदा मला काय करायचे आहे हेच माहीत नसायचे. सेटवरच संवाद लिहिले जायचे. पण आता असे होत नाही. त्यामुळे कलाकारांना खूप मदत होते. ते तयारी करूनच सेटवर येतात. आता सिंक साउंडमध्ये शूटींग केले जाते. त्यामुळे डबिंगचे टेन्शन रहात नाही. आता 'भेजा फ्राय' व खोसला का घोसला' सारखे चित्रपट यशस्वी होतात. हे वेगळेपण या काळात घडले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>आजा नच ले' नंतर पुढे... </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी याबाबत अजून विचार केलेला नाही.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 22 Dec 2007 16:51:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ट्वेंटी-२० तील शंभर टक्के विजेतेपद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/ट्वेंटी-२०-तील-शंभर-टक्के-विजेतेपद-107122200011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/ट्वेंटी-२०-तील-शंभर-टक्के-विजेतेपद-107122200011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय क्रिकेटसाठी २००७ हे वर्ष संस्मरणीय असे गेले. १९८३ नंतर विश्वकरंडक जिंकण्यात संघाला यश आले नव्हते. मागच्या वेळी विश्वकरंडाकाच्या अंतिम फेरीत धडक मारूनही शेवटी हारच पदरी पडली होती. यावर्षी तर दुसऱ्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/22/images/img1071222011_1_1.jpg' Alt='dhoni' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय क्रिकेटसाठी २००७ हे वर्ष संस्मरणीय असे गेले. १९८३ नंतर विश्वकरंडक जिंकण्यात संघाला यश आले नव्हते. मागच्या वेळी विश्वकरंडाकाच्या अंतिम फेरीत धडक मारूनही शेवटी हारच पदरी पडली होती. यावर्षी तर दुसऱ्या फेरीतही संघ जाऊ शकला नाही. ही मानहानी असताना पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ पाठवला गेला. त्यात एकही बडा खेळाडू नव्हता. कर्णधारपदही नवख्या महेंद्रसिंह धोनीकडे सोपविले होते. आता हा काय करणार याकडे लक्ष लागले असताना नव्या प्रकारच्या खेळाचा भारतीय संघ चक्क सरताज ठरला. बड्या बड्या संघांना पाणी पाजून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि अंतिम फेरीत तर काय चक्क पाकिस्तान. पारंपरिक प्रतिस्पर्धी. पण भारताच्या विजयरथाने पाकिस्तानलाही चिरडले आणि विश्वकरंडकावर आपले नाव कोरले. या स्वप्नवत प्रवासाचा हा मागोवा.......</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ट्वेंटी-20 विश्वकरंडकात उतरण्यापूर्वी भारताला अशा प्रकारच्या फक्त एकाच सामन्याचा अनुभव होता. पण तरीही अननुभव आड येऊ न देता भारताने करंडक जिंकण्यापर्यंतचा प्रवास अगदी स्वप्नवत केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या स्पर्धेत भारताची सांघिक कामगिरी चांगली झाली. एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहून विश्वकरंडक जिंकता येत नाही. त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न गरजेचे असतात. हेच याही वेळी अधोरेखित झाले. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील नायक वेगळा होता. म्हणूनच स्टार खेळाडू नसतानाही भारत करंडक जिंकला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युवराजसिंह, वीरेंद्र सेहवाग, आर. पी. सिंह, श्रीशांत, कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रॉबीन उत्थप्पा, रोहित शर्मा या सर्वांनी मोक्याच्या वेळी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ड गटातील स्कॉटलंडविरूद्धचा भारताचा पहिला सामना पावसात वाहून गेला. त्यानंतरचे सर्व सामने भारतासाठी करा किंवा मरा स्थितीतलेच होते. सुपर आठमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला हरविणे गरजेचे होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण कमी फरकाने हरला असता तरी नेट रन रेटच्या आधारे भारत सुपर आठमध्ये पोहोचू शकला असता. पण याही अतिशय़ चित्तथरारक सामन्यात पाकिस्तानने बरोबरी साधली. पण बॉलआऊटमध्ये भारताने पाकला 3-0 ने नमवले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुपर आठमधील पहिल्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून दहा धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इंग्लंड व दक्षिण आफ्रिका हे दोन बडे संघ भारतापुढे होते. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/22/images/img1071222011_1_2.jpg' Alt='youraj' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>इंग्लंडविरूद्धच्या सामन्याचा हिरो युवराजसिंह झाला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारले. अवघ्या बारा चेंडूत अर्धशतक फटकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वांत वेगवान अर्धशतक आहे. गोलंदाजांनी अंतिम षटकांमध्ये अतिशय अचूक टप्प्यावर योग्य दिशा राखून गोलंदाजी केली. त्यामुळे भारताला अठरा धावांनी विजय मिळाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारताला दक्षिण आफ्रिकेला हरविणे गरजेचे होते. पण या सामन्याचे दुर्देव म्हणजे मागच्या सामन्याचा हिरो युवराज दुखापतीमुळे यावेळी खेळू शकला नाही. त्यातच यजमान संघाने सुरवातीलाच चार चेंडूत भारताच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठविले. पण रोहित शर्मा या युवा फलंदाजाने चाळीस चेंडूत पन्नास धावा काढून संघाला 153 या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर रूद्रप्रतापसिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभवच केला असे नाही, तर यजमानांना चक्क स्पर्धेबाहेरही ढकलले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उपांत्य फेरीत भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होती. भारताची विजय यात्रा आता संपली असेच जणू सर्वजण धरून चालले होते. एकदिवसीय सामन्याती विश्वविजेता ऑस्ट्रेलिया भारताला चीत करणार असेच वाटत होते. पण धोनीच्या संघाने चमत्कार घडविला. ऑस्ट्रेलियाला पंधरा धावांनी हरवून त्यांना मायदेशी पाठविले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात युवराजने पुन्हा एकदा जोरदार खेळी करताना पाच चौकार व पाच षटकारांच्या सहाय्याने तीस चेंडूतच सत्तर धावा कुटल्या. गोलंदाजीच श्रीशांतने चमक दाखविताना चार षटकात केवळ बारा धावा देऊन ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठविले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अंतिम फेरीत भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडली. आशियाई वाघांच्या या मुकाबल्यात भारताने पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव करून ट्वेंटी ट्वेंटीचा पहिला विश्वकरंडक आपल्या नावे केला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 22 Dec 2007 15:59:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुलांना मारपीट (कायद्याने) थांबली !]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/मुलांना-मारपीट-कायद्याने-थांबली-107122200008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/मुलांना-मारपीट-कायद्याने-थांबली-107122200008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[2007 हे वर्ष मुलांच्या हक्कांसंदर्भात सरकार व स्वयंसेवी संस्थांकडून दाखविलेल्या सजगतेसाठी लक्षात राहिल. केंद्र सरकारने याच वर्षी बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/22/images/img1071222008_1_1.jpg' Alt='magova' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> 2007 <font  style='font-size:11pt; color:#000000'>हे वर्ष मुलांच्या हक्कांसंदर्भात सरकार व स्वयंसेवी संस्थांकडून दाखविलेल्या सजगतेसाठी लक्षात राहिल. केंद्र सरकारने याच वर्षी बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या आयोगाने स्थापन झाल्यानंतर मास्तरांच्या हातून छडी काढून घेण्याचा आदेश काढला. या आयोगाचे अध्यक्षपद मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त शांता सिन्हा यांच्याकडे आहे. आयोगाने आपल्या पहिल्याच आदेशात मुलांना शारीरिक शिक्षा देण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मारकुट्या शिक्षकांवर आता कायदेशीर कारवाई केली जाईल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रीमती सिन्हा यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सांगितले होते, की शिक्षकांना शाळेत मुलांना शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार नाही. मुलांना समजावून सांगून शिकविले गेले पाहिजे. मुलांना मारणे हे मध्ययुगीन विचारांसारखा आहे.आयोगाची एक सदस्या संध्या बजाज म्हणाल्या, की बालमजूरी, बालतस्करी व शाळेत मुलांना होणारी मारहाण रोखणे हे आयोगाचे उद्दीष्ट आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याचवेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने निठारी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर मुलांची तस्करी रोखण्यासाठी आदेश दिले. ढाबे, हॉटेल्स यात १४ वर्षांपेक्षा लहान मुलाना काम करावयास बंदी घालणारा कायदा सरकारने गेल्या वर्षी मंजूर केला होता. यावर्षी या हक्काबाबतीत जाणीव दिसून आली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/22/images/img1071222008_1_2.jpg' Alt='child' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारने कायदा तयार करायला जी सजगता दाखवली, तेवढी त्याच्या अंमलबजावणीत दाखवली नाही. म्हणूनच किती बालकामगारांना वर्षभरात मुक्त केले याची आकडेवारी सरकारकडे नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनेच ही बाब मान्य केली. या वर्षात निठारी हत्याकांडासारखे प्रकरण घडले नाही. पण गुजरातमधील एका शाळेत मुलाला पळत मैदानाला चक्कर मारण्याची शिक्षा देण्यात आली. त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला. राजस्थानातही एका मुलाचा शिक्षकाने केलेल्या मारपिटीत मृत्यू झाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्या इतर भागातही अशा काही घटना घडल्या. मुलांना मारणे, शॉक देणे व एचआयव्ही बाधित मुलांसमवेत भेदभावाची वागणूक असे प्रकार घडले. निठारी हत्याकांडाच्या चौकशीसाठी मानवाधिकार आयोगाचे सदस्य पी. सी. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने मुलांची तस्करी व मुलांच्या बाबतीत होणारे हिंसाचार यांना आळा घालण्यासाठी विविध शिफारसी केल्या आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याअंतर्गतच सर्व राज्यात हरवलेल्या मुलांची संख्या एकत्र करणे, मुले हरवल्यास तक्रार देणे सक्तीचे करणे व याची माहिती आयोगाला देण्याचा आदेश काढण्यात आला. भारतातून हरवणारी मुले नंतर अरब देशांत उंटाच्या शर्यतीत वापरली जातात. काहींना बाल वेश्या केले जाते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 22 Dec 2007 14:59:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अनिवासी भारतीयांचा सरत्या वर्षावर ठसा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/अनिवासी-भारतीयांचा-सरत्या-वर्षावर-ठसा-107122000014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/अनिवासी-भारतीयांचा-सरत्या-वर्षावर-ठसा-107122000014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सरत्या वर्षात अनिवासी भारतीयांनी देखिल जागतिक पातळीवर ठसा उमटवला. राजकारण असो की व्यापार, चित्रपट असो की अवकाश कोणतेही क्षेत्र भारतीयांच्या प्रभावापासून मुक्त राहिले नाही. अशाच काही अनिवासी.........]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#808040'>सरत्या वर्षात अनिवासी भारतीयांनी देखिल जागतिक पातळीवर ठसा उमटवला. राजकारण असो की व्यापार, चित्रपट असो की अवकाश कोणतेही क्षेत्र भारतीयांच्या प्रभावापासून मुक्त राहिले नाही. अशाच काही अनिवासी भारतीयांच्या कर्तृत्वाचा हा वेध....</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/20/images/img1071220014_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b><i>सुनीता विल्यम्स</b></i></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>१९ सप्टेंबर १९६५ ला ओहियो येथे जन्म झालेली सुनीता विल्यम्स कल्पना चावलानंतर अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला आहे. मिशन एसटीएस-११६ मध्ये बसून १४ सहकाऱ्यांच्या साथीने सुनीताने १० डिसेंबर २००६ ला अवकाशात उड्डाण केले. त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजे २२ जून २००७ ला ती पृथ्वीवर परतली. या काळात तिने तीनवेळा स्पेस वॉक केला. १९५ दिवस अंतराळात रहाताना सुनीताने सर्वांत जास्त काळ तेथे राहण्याचा विक्रमही केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'><i></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b><i>बॉबी जिंदाल</font><font style=' color:#000000;'></i></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेच्या लुझियाना प्रांताचे गव्हर्नर बनण्याचा मान यंदा भारतीय वंशाच्या बॉबी जिंदाल यांनी मिळविला. भारतीय वंशाचा व्यक्ती प्रथमच अमेरिकेत या पदावर जाऊन पोहोचला आहे. वीस ऑक्टोबर २००७ ला गव्हर्नरपदासाठी त्यांची निवड झाली. बॉबी १४ जानेवारी २००८ ला पदाची शपथ घेणार आहेत. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/20/images/img1071220014_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b><i>लक्ष्मी मित्तल </font><font style=' color:#000000;'></b></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजस्थानातील चुरू येथे जन्म झालेल्या लक्ष्मी मित्तल जगातील गिन्याचुन्या शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोडतात. फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील श्रीमतांच्या यादीत या लक्ष्मीपुत्राने पाचवे स्थान पटकावले. जगातील सर्वांत मोठी स्टील कंपनी आर्सेलर खरेदी करून मित्तल यांनी आपल्या पोलादी साम्राज्याचा विस्तार केला. हे त्यांचे सर्वांत मोठे यश मानले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>सी. के. प्रल्हा</font><font style=' color:#000000;'>द</font><font style='font-size:12pt;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/20/images/img1071220014_1_3.jpg' Alt='prahlad' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय वंशाचे मॅनेजमेंट गुरू सी. के. प्रल्हाद यांना जगातील सर्वांत प्रभावशाली मॅनेजमेंट थिंकर म्हणून निवडले गेले. या स्पर्धेत त्यांनी बिल गेट्स, एलेन ग्रीनस्पीन आणि रिचर्ड ब्रॅनसन यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यवस्थापकांनाही मागे टाकले. पहिल्या पन्नासात स्थान मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत. गेल्या वर्षी सनटॉपतर्फे जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांचे नाव तिसऱ्या स्थानावर होते. कॉर्पोरेट धोरणांमध्ये प्रल्हाद यांना बापमाणूस मानण्यात येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>विक्रम पंडित</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/20/images/img1071220014_1_4.jpg' Alt='vikram' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठमोळे विक्रम पंडित यांनी सरत्या वर्षाची छान भेट भारताला त्यातही मराठी मनाला दिली आहे. जगातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या सिटी ग्रुपचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले आहेत. सोळाव्या वर्षी अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या पंडीतांनी उच्च शिक्षण घेऊन तिथेच कारकिर्दीची श्रीगणेशा केला आणि मॉर्गन स्टॅन्लेसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत अखेर सिटी ग्रुपच्या सीईओपदापर्यंतचा टप्पा गाठला. शेगावच्या गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा असणारे पंडीत आज एवढ्या मोठ्या पदावर असले तरी मनाने निखळ मराठी आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 21 Dec 2007 09:08:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महिलेला राष्ट्रपती करणारे वर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/महिलेला-राष्ट्रपती-करणारे-वर्ष-107121900014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/महिलेला-राष्ट्रपती-करणारे-वर्ष-107121900014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[यंदाचं २००७ हे वर्ष भारताच्या बाबतीत महिला विशेष वर्ष ठरले आहे. स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवी वर्षात भारताची धुरा प्रथमच एका महिलेच्या हाती आली. अर्थात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण याही वर्षी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219014_1_1.jpg' Alt='pratibha' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top'>PTI</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>यंदाचं २००७ हे वर्ष भारताच्या बाबतीत महिला विशेष वर्ष ठरले आहे. स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवी वर्षात भारताची धुरा प्रथमच एका महिलेच्या हाती आली. अर्थात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण याही वर्षी लागू होऊ शकले नाही. पण इतर बाबतीत महिलांचा वरचष्मा राहीला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राची कन्या असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी २५ जुलै २००७ ला राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली आणि इतिहास घडविला. राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. जळगाव जिल्ह्यातून करीयरची सुरवात करणाऱ्या प्रतिभाताईंनी राजकारणात विविध सन्मानाची पदे भूषवली. राजस्थानच्या राज्यपालपदीही त्या होत्या. त्यानंतर त्यांना हे मानाचे पद मिळाले. उपराष्ट्रपती असलेले भैरोसिंह शेखावत हेही या स्पर्धेत होते, मात्र प्रतिभाताईंनी त्यांना तीन लाखा मतांनी शिकस्त दिली. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219014_1_2.jpg' Alt='sonia' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top'>PTI</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>सोनियांचा प्रभाव- </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इच्छा नसतानाही राजकारणात आलेल्या सोनियांनी राजकारण फार लवकर समजून घेतले आणि त्याचा उपयोगही केला. उगाच नाही, टाईम या विख्यात नियतकालिकात २००७ मधील जगातील १०० प्रभावशाली महिलांमध्ये सोनियांचा समावेश केला. तेही या शंभर महिलांमध्ये सहावे स्थान. यावरून सोनियांचे महत्त्व जागतिक पातळीवर लक्षात यावे. पण त्यांनी पाठपुरावा करूनही महिला आरक्षणासाठी त्या इतर पक्षांची विशेषतः घटक पक्षांची मते अनुकूल करून घेऊ शकल्या नाहीत. पण वर्षभरात सोनियांचा प्रभाव सरकारवर आणि अर्थातच पक्षावपही राहिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अणू करारापासून इतर मुद्यांवरून डाव्या पक्षांना चुचकारत तर कधी ललकारत त्यांनी हे वर्ष गाजवले. शेवटच्या काळात तर गुजरातमध्ये त्यांनी जोरदार प्रचार केला. नरेंद्र मोदींना थेट आव्हान देताना त्यांच्या शेलक्या शब्दांनी मोदींसारख्या कसलेल्या राजकारण्यालाही त्यांनी जेरीस आणले. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219014_1_3.jpg' Alt='sania' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top'>PTI</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>सानियाची झेप- </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महिला आरक्षणासाठी वितंडवाद चालू असताना विविध क्षेत्रात महिला कर्तृत्वाची नवी शिखरेही गाठत आहेत. टेनिस क्षेत्रात जिथे भारतीयांचे नाव आढळत नव्हते, तिथे सानियाने आता स्वतःच्या कर्तृत्वाचे झेंडे गाडले आहेत. अल्पावधीतच सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या या हैदराबादी बालेने या वर्षात अनेक नविन पराक्रम केले. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत मानांकन मिळविणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली. अमेरिकन ओपन स्पर्धेत सानियाला हे मानांकन मिळाले होते. या स्पर्धेत ती तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचली होती. यशाच्या एकेक पायऱ्या वर चढत चाललेली सानिया सामाजिक जाणीवही राखून आहे. म्हणूनच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मुली वाचवा या मोहिमेची ती ब्रॅंड अँबेसेडर आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>उद्योगजगतातील महिलाराज- </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219014_1_4.jpg' Alt='kiran' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>उद्योगजगतातही महिलांनी यंदाच्या वर्षी आपला ठसा उमटवला. बायोकॉन कंपनीला एंझाईम कंपनीतून जागतिक पातळीवरील कंपनी बनविण्याचे श्रेय </font><font style=' color:#FF8000;'>किरण मुजुमदार </font><font style=' color:#000000;'>यांना जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतीय महिला चमकल्या. पेप्सिकोच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्य</font><font style=' color:#FF8000;'>ा इंद्रा नुयी </font><font style=' color:#000000;'>यांची निवड हे त्याचे उत्तम उदाहरण. फोर्ब्स या नियतकालिकेने २००७ मधील प्रभावशाली महिलांमध्ये पाचवे स्थान इंद्रा नुयी यांना दिले आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219014_1_5.jpg' Alt='farah' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top'>IFM</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>बॉलीवूडमध्ये महिलांचा दबदबा-</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चित्रपच उद्योगातही महिलांनी दबदबा राखला. या वर्षीचा सुपरहिट चित्रपट </font><font style=' color:#FF8000;'>फरहा खानच्य</font><font style=' color:#000000;'>ा नावे जातो. ओम शांती ओमच्या निमित्ताने महिला दिग्दर्शकही सुपरहिट चित्रपट देऊ शकतात, हे दाखवून दिले. ऐश्वर्या रॉयही या वर्षी चर्चेत राहिली. हॉलीवूडमध्ये तिचे चित्रपट प्रदर्शित झाले. द लास्ट लेजिन हा चित्रपट रशिया व नेदरलॅंडमध्ये प्रदर्शित झाला, तर सर्किल ऑफ लाईट लाईट यावर आधारीत प्रोव्होक्ड भारत व ब्रिटनमध्ये प्रदर्शित झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांच्या मते, महिलांवर आधारीत अनेक चित्रपट होत आहेत. त्यातून काही साध्यही करता येत आहे. त्यांच्यासाठी अनेक योजनाही येत आहेत. पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. त्यासाठी बरेच काही करावे लागणार आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/19/images/img1071219014_1_6.jpg' Alt='nirmala' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या </font><font style=' color:#FF8000;'>निर्मला देशपांडे </font><font style=' color:#000000;'>म्हणतात, की केवळ गप्पा मारून काही होणारन नाही. त्यासाठी ठोस काहीतरी करावे लागेल. तरच महिलांच्या अवस्थेत सुधारणा होईल. मुले व मुली सारख्या असे म्हणत असताना दुसरीकडे स्त्री भ्रुण हत्या होते, आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महिलांच्या दृष्टीकोनातून या वर्षी बरेच काही घडले, पण बरेच काही बाकीसुद्धा आहे, हेही तितकेच खरे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Dec 2007 15:12:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[२००७ : विनोदाची आणि शाहरूखची तेवढी चलती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/२००७-विनोदाची-आणि-शाहरूखची-तेवढी-चलती-107121800013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-07-marathi/२००७-विनोदाची-आणि-शाहरूखची-तेवढी-चलती-107121800013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[या वर्षात सुरवातीच्या सहा महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मान टाकली होती. त्यामुळे बॉलीवूडकरांना चांगलीच धडकी भरली होती. सुपरहिट तर सोडाच पण चित्रपट हिट या श्रेणीतही चालत नव्हते. त्यानंतरच्या सहा महिन्यात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या वर्षात सुरवातीच्या सहा महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मान टाकली होती. त्यामुळे बॉलीवूडकरांना चांगलीच धडकी भरली होती. सुपरहिट तर सोडाच पण चित्रपट हिट या श्रेणीतही चालत नव्हते. त्यानंतरच्या सहा महिन्यात मात्र परिस्थिती बदलली. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळविल्यामुळे सुरवातीच्या सहा महिन्यातील चित्र या काळात पुरते बदलले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बॉलिवूडमधील हा काळ परिवर्तनाच्या लाटेचा होता. नवनवीन विषयावर चित्रपट तयार होत होते. परझानिया, ट्रॅफीक सिग्नल, ब्लॅक फ्रायडे, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., वॉटर, नेमसेक, भेजा फ्राय, गांधी माय फादर, ब्ल्यू अंम्ब्रेला, लॉयन्स ऑफ पंजाब, मनोरमा सिक्स फीट अंडर यासारखे चित्रपट या वर्षात पाहण्यासाठी मिळाले. नवनवे दिग्दर्शक, कलाकार वेगळ्या प्रकारचे चित्रपट तयार करायचे आणि त्यात काम करण्याचे धाडस दाखवत आहेत. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/18/images/img1071218013_1_1.jpg' Alt='bollywood' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top'>IFM</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>सुपरहिट चित्रपट: </font><font style=' color:#000000;'></b>या वर्षातील दोन्ही सुपरहिट चित्रपट शाहरूख खानच्या नावावर आहेत. </font><font style=' color:#FF8000;'>‘चक दे इंडिया’ </font><font style=' color:#000000;'>फार चालेल असे प्रदर्शित होण्यापूर्वी कुणालाही वाटत नव्हते. कारण चित्रपटात शाहरुख खानशिवाय दुसरा कोणताही सुपरस्टार नव्हता. त्याला नायिकाही नव्हती. ही भूमिकादेखिल शाहरुखच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा फारच वेगळी होती. त्यामुळे ही भूमिका करणे हा धोकाही होता. तरीही त्याने ती भूमिका अगदी झोकात केली. खेळांवर आधारीत चित्रपट फारसे चालत नाहीत. चक दे... त्याला सणसणीत अपवाद ठरला.दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या </font><font style=' color:#FF8000;'>‘ओम शांती ओम’ </font><font style=' color:#000000;'>ने जोरदार यश मिळविले. सत्तरच्या दशकातील बॉलिवूडच्या पार्श्वभूमीवर फराह खानने तयार केलेल्या या चित्रपटाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>हिट चित्रप</font><font style=' color:#000000;'>ट: </b>गायक हिमेश रेशमियाला नायक म्हणून सादर करणारा </font><font style=' color:#FF8000;'>‘आपका सुरूर’ </font><font style=' color:#000000;'>हा चित्रपट आश्चर्यकारकरित्या चालला आणि हिटच्या यादीत जाऊन बसला. हिमेशच्या अभिनयाचे हसू आले, तरी चित्रपट चालल्याने हिमेशच्या चेहऱ्यावर हसू फुटले नसते तरच नवल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विनोदाच्या रंगात रंगलेले </font><font style=' color:#FF8000;'>‘हे बेबी’, ‘भूलभुलैया’ </font><font style=' color:#000000;'>आणि </font><font style=' color:#FF8000;'>‘पार्टनर’ </font><font style=' color:#000000;'>या चित्रपटांनीदेखील चांगला व्यवसाय ‍केला. या चित्रपटांच्या यशावरून प्रेक्षकांना जास्त डोकं लावावे लागणारे चित्रपट आवडत नाहीत, असा निष्कर्ष काढता येईल. या चित्रपटांसाठी अक्षय कुमारला सर्वांत‍ जास्त पसंती दिली गेली. ‘हे बेबी’ साजिद खानने (फराह खानचा भाऊ) दिग्दर्शित केला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>सरासरी : </font><font style=' color:#000000;'></b>मणिरत्नमच्या </font><font style=' color:#FF8000;'>‘गुरु’ </font><font style=' color:#000000;'>ला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. पण या चित्रपटाला यशस्वी मानण्याइतका त्याने व्यवसाय केला. </font><font style=' color:#FF8000;'>‘भेजा फ्राय’ </font><font style=' color:#000000;'>च्या यशस्वीतेने बॉलिवुडवाल्यांचे भेजे चालेनासे झाले. अतिशय चांगली पटकथा आणि सादरीकरण असलेला हा चित्रपट तसा चाकोरीबाह्य होता. विशेष म्हणजे त्यात एकही स्टार, नायिका नव्हती. तरीही आश्चर्यकारक यश त्याला मिळाले. या चित्रपटाने अनेक निर्मात्यांना प्रेरणा दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>’नमस्ते लंडन</font><font style=' color:#000000;'>’ क्रिकेट विश्वकरंडकादरम्यान प्रदर्शित झाला होता. भारतीय क्रिकेट संघाने विश्वकरंडकात नांगी टाकल्यानंतर वैतागलेल्या प्रेक्षकांनी या चित्रपटाला जाऊन डोक्याचा त्रास कमी केला. हॉलिवूडचा ‘हॅरी पॉटर एंड द ऑर्डर ऑफ फिनिक्स’ किंवा ‘स्पायडरमॅन’ या चित्रपटानेदेखील यश मिळविले. वैशिष्ट्य म्हणजे यंदा ‘स्पायडरमॅन’ भोजपुरी भाषेत बोलला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंद्र कुमारचा नायिकेशिवाय असलेल</font><font style=' color:#FF8000;'>ा ‘धमाल’ </font><font style=' color:#000000;'>काहीसा चालला. तो लहान मुलांना खूप आवडला. शाहीद कपूर-करीनाचा </font><font style=' color:#FF8000;'>‘जब वुई मेट’ </font><font style=' color:#000000;'>च्या निर्मात्याला चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी जास्त पैसा खर्च करावा लागला नाही. कारण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही दिवस अगोदर दोघांत ब्रेकअप झाला. यामुळे चित्रपटांची खूप चर्चा झाली आणि तो चालला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>नरम, गरम : </font><font style=' color:#000000;'></b>या श्रेणीत काही यशस्वी ठिकाणी चाललेले व इतरत्र आपटलेले असे चित्रपट आहेत. </font><font style=' color:#FF8000;'>‘चीनी कम’ </font><font style=' color:#000000;'>केवळ मोठ्या शहरांत चालला. लहान शहरातील प्रेक्षकांना विषयच आवडला नाही. </font><font style=' color:#FF8000;'>‘अपने’ </font><font style=' color:#000000;'>हा चित्रपट उत्तर भारतात चांगला चालला. कारण तेथे देओल कुटुंब फेमस आहे. </font><font style=' color:#FF8000;'>‘शूट आऊट एट लोखंडवाला’ </font><font style=' color:#000000;'>मुंबईत चालला. </font><font style=' color:#FF8000;'>‘मेट्रो’ </font><font style=' color:#000000;'>लाही महानगरी प्रेक्षकांनी पसंती दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>फ्लॉप : </font><font style=' color:#000000;'></b>या वर्षात अनेक चित्रपट फ्लॉप झाले, पण ज्यांच्यापासून खूप अपेक्षा होत्या त्याच चित्रपटांचा समावेश आहे. या यादीत </font><font style=' color:#FF8000;'>‘रामगोपाल वर्मा की आग’ </font><font style=' color:#000000;'>सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे. रामूने हा चित्रपट तयार करून आयुष्यातील सर्वांत मोठी चूक केली. ‘नि:शब्द’, ‘गो’, ‘डार्लिंग’ सारखे चित्रपट करून त्याने काय साध्य केले त्या एका रामूलाच माहित.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यशराज फिल्म्सच्या हाती यावर्षी यश लागलेच नाही. ‘झूम बराबर झूम’, ‘आजा नच ले’ आणि ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटांनी या बॅनवरवर अपयशाचाच डाग लावला. ‘सलाम-ए-इश्क’ ला प्रेक्षकांनी नाकारले. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/18/images/img1071218013_1_2.jpg' Alt='omshantiom' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top'>IFM</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>संजय लीला भन्साळीच्या </font><font style=' color:#FF8000;'>‘सावरीया’ </font><font style=' color:#000000;'>ला </font><font style=' color:#FF8000;'>‘ओम शांती ओम’ </font><font style=' color:#000000;'>चा जोरदार फटका बसला. एकाचवेळी दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. सांवरीयावाले चित्रपट हिट आहे, असे ओरडून सांगत होते. पण आकडेवारी दुसरेच काहीतरी सांगत होती. अब्बास-मस्तानची ‘नकाब’ ची कथा कोणालाही आवडली नाही. अनुभव सिन्हाच्या ‘कॅश’ ने निर्मात्यांचाच खिसा रिकामा केला. ‘नो स्मोकींग’ ला प्रेक्षकांनी न जाणेच पसंत केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 18 Dec 2007 16:31:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 07]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
