<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[ऑनलाईन दिवाळी अंक]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/diwali-marathi</link>
    <description><![CDATA[ऑललाईन वेबदुनिया दिवाळी अंक, दिवाळी विशेषमध्‍ये दिवाळीनिमित्त वेबदुनियाचा खास ऑनलाईन अक्षरफराळ.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Mon, 15 Jun 2026 11:40:11 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>ऑनलाईन दिवाळी अंक</title>
      <url>https://marathi.webdunia.com/diwali-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/diwali-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/diwali-marathi-1021112.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[‘स्पेस’- आपल्यातली आणि त्यांच्यातली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/‘स्पेस’-आपल्यातली-आणि-त्यांच्यातली-108102400026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/‘स्पेस’-आपल्यातली-आणि-त्यांच्यातली-108102400026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अस्वस्थता पचवणं महाअवघड. ते तुटलेपण पचवायला तसा वेळ
लागलाच. नंतर मात्र एसटीडी शोधत वार्या करणं एवढीच काय ती कटकट उरली. घरी फोन करण्याच्या गरजेपोटी आणि पुढच्या भेटीगाठींच्या वेळा ठरवण्यासाठीही एसटीडीच्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गुवाहाटीत पाय ठेवला. मोबाईलचं नेटवर्क गायब! तसं हे नेहमीचच. मागच्यावेळेस गेले तेव्हाही असंच झालं होतं. त्यामुळे फार काही चिडचिड झाली नाही. मात्र ऐनवेळेस मोबाईल `डे</font><font style='font-size:11pt;'>ड` </font><font style='font-size:11pt;'>होऊन पडला आणि आता जगात कुणाशीच आपला संपर्क नाही, आपण लांब फेकले गेलोय ही अस्वस्थता पचवणं महाअवघड. ते तुटलेपण पचवायला तसा वेळ लागलाच. नंतर मात्र एसटीडी शोधत वार्या करणं एवढीच काय ती कटकट उरली. घरी फोन करण्याच्या गरजेपोटी आणि पुढच्या भेटीगाठींच्या वेळा ठरवण्यासाठीही एसटीडीच्या पायऱ्या झिजवण्याशिवाय दुसरा पर्याय काय होता? वेळ मिळाला की एसटीडी गाठणं सुरू. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझी ही तगमग पाहून दीपाली मात्र वैतागली. शिणलीच. त्या दोन दिवसांत आम्ही गुवाहाटीतले किती रस्ते तुडवले आणि किती 'फुसके' खाल्ले याचा हिशेब नाही. 'फुसके' खाणं, झालमुरीचे बकाणे भरत चालणं आणि गप्पा मारणं; तोंडाला आराम नाहीच. (फुसके म्हणजे पाणीपुरी आणि झालमुरी म्हणजे भेळ. गुवाहाटीतल्या रस्त्यावर झालमुरीच्या गाडा लागलेल्या असतात. पण दोन प्रकारच्या. एक नेहमीची भेळ आणि दुसरी कडधान्याची. दोन्ही झालमुरीच. त्या चवीला तोड नाही.)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->फोनबिन नाही, काही संपर्कच नाही. म्हणजे काहीतरी गडबड, वाईटसाईट-भलतसलतंच झालं असणार असा आपल्याकडचा साधा हिशेब. गणितं तिचं. सोडवण्याच्या रीती तेवढा वेगळ्या. दिपालीनं तिचं गणित असंच सोडवलं होतं. 
<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>असंच भटकतांना एकदा काही केल्या फोन लागेना. अस्वस्थता कुरतडायला लागलेली. डोक्यात कलकलाट. त्यात दिपालीनं मला थेटच विचारलं, 'आप पंधरा दिन घरवालोंसे बात किए बिना नही रह सकती, आज तीन महिने हो गए मैने घर फोन नहीं किया..तो क्या फर्क पडा? फोन नही, मतलब मै ठीक हूँ ! सिधा हिसाब' पण हा हिसाब मला कुठं येत होता? आणि इकडं काळजीनं व्याकुळ होणाऱ्या माझ्या माणसांना तरी हे समीकरण कुठं माहित होतं. फोनबिन नाही, काही संपर्कच नाही. म्हणजे काहीतरी गडबड, वाईटसाईट-भलतसलतंच झालं असणार असा आपल्याकडचा साधा हिशेब. गणितं तिचं. सोडवण्याच्या रीती तेवढा वेगळ्या. दिपालीनं तिचं गणित असंच सोडवलं होतं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिपाली उपाध्याय. राष्ट्र सेविका समितीच्या गुवाहाटी कार्यालयात मला भेटली. तेजपुरला राहणारी ही मुलगी. कामासाठी गुवाहाटीत आली होती. तिशीच्या उंबरठ्यावरची. रुढार्थानं लग्राचं वय उलटलेलंच. ‘बीए’पर्यंत शिकलेली. तिचं गाव तेजपुरपासून पन्नास किलोमीटरवरचं लहान खेडं. कॉलेजात जायचं म्हणून हट्टानं गाव सोडून दहावीनंतर तेजपुरला आली. पदवीधर झाली. त्याच दरम्यान वडील हृदयविकारानं अचानक गेले. एक धाकटा भाऊ. तो हाफलाँगला इंजिनियरिग करत होता, धाकटी बहीण शाळेत जाणारी. घराची जबाबदारी हिच्यावर येऊन पडणं स्वाभाविक होतं. ती तिनं पेललीही. वर्षभर. शेतीतून भाताचं उत्पन्न सुरू झालं. हळूहळू गोष्टी रांगेला लागल्या. आणि दिपालीनं घर सोडलं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिपाली सांगते, 'आईला वाटायचं मी घराची जबाबदारी सांभाळावी. भावाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी किमान घर सांभाळावं. तेही नकोच असेल तर लग्र तरी करावं. त्यात काही वावगंही नव्हतं. जबाबदारी म्हणून मी हे सारं करायलाच हवं होतं. माझ्याशिवाय घराचं, आईचं- भावाबहिणीचं कसं होईल असा प्रश्न पडायचा. पण मग माझं काय? मला स्वतःला समाजसेवेत झोकून द्यायचं होतं. आपण चार भिंतीत बांधून पडलोय या विचारानं जीव तुटायचा. कधी वाटायचं, मला माझ्याच माणसांची काळजी वाटत नसेल, मी त्यांचंच भलं करणार नसेल तर समाजसेवा काय डोंबलाची करणार? काय त्यागाच्या बाता मारणार? वर्षभरात मी बर्याच गोष्टी लायनीला लावल्या आणि घराबाहेर पडले. आईला सांगितलं आता मी नसले तरी तुमचं काही अडणार नाही; अडलंच तर मी परत येईन. पण आता मी जाणार. घर सोडून तेजपुरला परत आले.</font><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज या सार्‍याला तीन वर्षे झाली. अजून तरी माझ्याशिवाय त्यांचं काही अडलं नाही. ते खुष आहेत, मी मजेत!' दिपालीला म्हटलं अवघड होता तुझा निर्णय. खूप इमोशनलही. भांडण झालं असेल स्वतःशी. तरी घर सोडलंस ते कसं?' ..अगर तब नहीं निकलती तो फिर कभी नही निकलती! चार दिन सब रोए, अब सब ठीक है! साथ रहना मतलब साथ देना नही होता ना? अभी भी मै घरवालोंके साथ हुँ, लेकीन मै उनका सहारा नही! वो मेरे साथ है, लेकीन मुझे बाँधते नही!' हा दिपालीचा साधा हिशेब.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नेपाळी वंशाची ही आसामी तरुणी. आसामात कायम 'नेपाली' म्हणून उपरेपणानं त्यांच्याकडं पाहिलं जातं त्या समाजातली. उपेक्षितच. पण तिनं तिची सारीच अवघड गणितं स्वतःसाठी सोपी करून घेतली आहेत. या सार्‍यावरही तिचं एक साधं म्हणणं, 'पिछले डोर नहीं तुटे, तो ना हम आगे के रहते है, ना पिछे के! जुडना और बंधना अलग होता है ना?' आता ही मुलगी तिचं 'आगे'चं मनासारखं आयुष्य जगतेय.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनावर कसलंही ओझं नाही, की जबाबदारी नाही. अपराधीपणाची भावना नाही. ज्यांची जबाबदारी घ्यावी ती तिची माणसं आता स्वतःची जबाबदारी उचलण्याइतकी सक्षम झाली आहेत. ना कुणी तिच्यामागे लग्राची भुणभूण करतं. ना घरी ये असा धोशा लावतं, ना तिच्या फोनची वाट पाहतं. अजुनही कधीतरी आईच्या हातच्या कच्च्या केळाच्या भाजीच्या आठवणीनं हिच्या डोळ्यात पाणी येतं. पण आपण आता जे जगतोय ते आपलं आयुष्य, 'जुडना'-बंधना नही, हा तिचा साधा हिशेब!' म्हणूनच तिला प्रश्न पडला असावा, की मी जर इतक्या लांब स्वतःहून आलेय तर मग या जगात रमण्याऐवजी जिकडून आलेय तिकडचा संपर्क तुटला म्हणून एवढी हैराण का होतेय? का पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतेय?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->आपण श्वास जितक्या सहजतेनं, जन्मतः घ्यायला लागतो तशी ही
माणसं जन्मतःच स्वतंत्र असतात. कोणी कुणाला बांधून घालत नाही. सारी सुटी -सुटी, तरी एकमेकांशी प्रेमानं घट्ट जोडलेली. ज्या 'स्पेस'चे आग्रह सध्या आपल्याकडे चर्चेत आहेत, ती 'स्पेस' माणसांना असतेच.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>काळजी वाटण्याचा बहाणा तिच्यासमोर तकलादूच ठरला असता. 'संपर्क तुटल्या'चा ( आणि तोडण्याचाही) फायदा तिला नीट माहित होता, तिच्यासमोर कसं काळजीचं घोडं दामटायचं? दिपालीच्या निमित्तानं लागला असेल पण त्या सार्‍या प्रवासात एक नाद लागला. नॉर्थ ईस्टातल्या 'स्वतंत्र' माणसांकडे बघायचा. त्या स्वतंत्रपणाला वयाचं बंधन नव्हतं. आपण श्वास जितक्या सहजतेनं, जन्मतः घ्यायला लागतो तशी ही</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माणसं जन्मतःच स्वतंत्र असतात. कोणी कुणाला बांधून घालत नाही. सारी सुटी -सुटी, तरी एकमेकांशी प्रेमानं घट्ट जोडलेली. ज्या 'स्पेस'चे आग्रह सध्या आपल्याकडे चर्चेत आहेत, ती 'स्पेस' माणसांना असतेच, तिची वेगळी आधुनिक चर्चा करायची वेळच का यावी, असा मुलभूत प्रश्न त्यांच्याकडं पाहिलं की आपसूक पुढं येतोच. कितीही टाळायचं म्हटलं तरी मनात अशी तुलना अकारण सुरू होते. या प्रवासात ती तुलना टाळण्याचा धडाही जाता जाता शिकावाच लागत होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मेरा लडका गडबड है! </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ईटानगरातली अशीच एक निवांत दुपार होती. मला तवांगला भेटलेल्या मार्कपने त्याच्या एका ईटानगरातल्या मैत्रिणीचा पत्ता दिला होता. जमलंच तर जाऊन भेट असा आग्रहही केला होता. मी तिला भेटायला गेले. तर ती तिनसुखियाला गेली होती. तिचा भाऊ गुवाहाटीला. घरी फक्त तिचे आईवडील होते. गप्पा सुरू झाल्या. तेवढात तिच्या भावाचा फोन आला. वडील तुटकतुटक दोनतीन वाक्य बोलले. ठेवून दिला फोन. समोरच बसलेल्या आईकडे अशा नजरेनं पाहिलं की बराचवेळ त्या बाईंनी नजर वर उचलली नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बदलत चाललेल्या अरुणाचलविषयी बोलणं सुरू होतं. शिक्षण-विकास अशी चर्चा. तसे ते गृहस्थ भडकलेच. म्हणाले, 'मी शिकलो. नोकरीला लागलो. माझ्या बस्तीतल्याच नाही तर   आजुबाजूच्या दहा बस्तीत कुणी तेव्हा दहावी पास नव्हता. किती किलोमिटर चाललो, किती जंगलं तुडवली, विचारू नका. कोण बरंवाईट सांगणारं होतं? माझं मीच लग्र ठरवलं. बायको केली, घरी  नेली. मुलंबाळं झाली. आता माझा मुलगा माझ्यापेक्षा कितीतरीपट जास्त शिकला, तो म्हणेल तेवढा पैसा मी त्याला दिला. पण तोसारखा मला विचारतो, हे करू का ते करू? या कॉलेजात जाऊ का त्या जाऊ? मला नाही तर आईला विचारतो, नाहीतर बहिणीला विचारतो. मित्रांना विचारतो. त्याचं काहीच नक्की नाही. पप्पा-पप्पा करके मेरी सलाह लेता है, ये बराबर नही, मेरा लडका गडबड है!' हे ऐकून गम्मत वाटली. पण का नाही त्या वडिलांनी चिडू? आपला मुलगा स्वतंत्र नाही, स्वतःचे निर्णय स्वतःच न घेता सतत आईवडिलांना विचारतो. हे त्या वडिलांच्या आकलनापलिकडचं होतं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निसर्गाचा नियम, पिल्लू मोठं झालं की सुटं होतं. आपलं मुल कुठं फिरतंय याची चिंता आईवडील करत नाही. त्याच्या लहानसहान गोष्टीत नाक खुपसत नाही. तरुण मुल-मुली दिवसभर नाहीच आले घरी तरी चिंता नाही. येतील. आल्यावर प्रश्नांची सरबत्ती नाही. कुठे? का? गेला होतास? प्रश्न नाही. तरुण मुलगा नाही आला एक-दोन दिवस घरी तरी कुणी फार काळजी करत नाही. जबाबदार आहे तो, कामासाठी गेला असेल येईल काम  संपलं की; इतकं सोपं सगळं. मुलींसाठीही ही स्थिती फार वेगळी नाही. सगळं भरवशावर चालतं, अविश्वासाची टांगती तलवार मानेवर धरल्यासारखे लोक जगत नाहीत.</font><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->ओमेन म्हणाला, 'उलटापुलटा आरसा पाहिलाय का कधी? शहरी समाजातल्या आरशात ज्यासाठी झगडा चाललाय ना ते आमच्याकडं आहे, आणि जे तुमच्याकडं आहे, ज्यातून तुम्हाला सुटायचंय त्यासाठी आम्ही झगडतोय!'<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>बस्तीतली ( बस्ती म्हणजे पहाडावर वसलेली छोटी वस्ती. शहरापासून दुर आणि दुर्गमही) एक रीत म्हणूनच अजुनही अनेक घरांत चालू असलेली दिसते. तीन-चार दिवस कुठं बाहेर जाणार  असेल तर घरातल्या वडिलधार्‍याला जातोय असं सांगायचं. ( जाऊ का? -अशी परवानगी मागायची नाही!) घरी कोणीच नसेल आणि तातडीनं जावं लागलं तर घरातल्या मोठा खांबाला सांगायचं. 'बाबा रे जातो, येईल लवकर. तोवर घराची-माणसांची काळजी घे!' आणि सांगायचं म्हणजे असं शब्दशः सांगायचं, प्रार्थना म्हणून. बाकी काही नाही. विश्वास ठेवायच्या घरच्या वडिलधार्‍यांवर, ते नसतील तर घरातल्या खांबावर. आपण सांगितलंय ना तर तो घेईल सगळ्यांची काळजी. आपण आपल्या कामाची चिंता करायची मागची नाही, ही त्यापाठची श्रद्धा. असं पाहत पाहत, तरुण होता होता मुलं अशी स्वतंत्र होतात. आणि जबाबदारही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तवांगला भेटलेल्या मार्कपचंच उदाहरण घ्या. तो गुवाहाटीत शिकतो. ईटानगरात त्याची एक लग्र झालेली बहिण असते तिचा क्रॉकरीचा बिझनेस. हा सुट्टीत तवांगहून भुतानी लोकांकडून क्रॉकरी विकत घेतो. बहिणीला नेऊन देतो त्यातून थोडं कमिशन घेतो. गुवाहाटीत विमा एजंट म्हणून फिरतो. त्याची दुसरी एक बहिण तवांगला नोकरी करते. तिला वाटलं की करील लग्र, हे त्याचं मत. मोठा भाऊ दिल्लीत ड्रेस डिझायनर. आणि त्याचे आईवडील. ते गावी असतात. अरुणाचलात दुर अलाँगजवळच्या खेड्यात. आजवर त्यांनी इटानगर पाहिलं नाही की गुवाहाटी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुलं आपापल्या वाटांनी उडून गेली पण आईवडिलांना त्या वाटा आहेत हेच माहित नाही. अशा समाजात एखाद्या मुलाला जर वडिलांनी आपला मार्गदर्शक व्हावं असं वाटत असेल, तो सतत स्वतःच्या आयुष्याविषयी वडिलांशी बोलत असेल तर त्या वडिलांना त्याची धास्तीच वाटते. आपला मुलगा स्वतंत्र- कमक्या नाही अशी. बदललेल्या काळात मुलाला आपली गरज आहे ही वडिलांच्या आकलनापलिकडची गोष्ट आहे आणि गुवाहाटीतले शहरी वडिल मुलांच्या आयुष्यात कसे डोकावतात हे पाहणार्‍या त्या मुलाला वडिलांचा हा तटस्थपणा जीवघेणा वाटत असणार, हे उघड! घरोघर आता या अशा जनरेशन गॅप्स बर्‍याच दिसायला लागल्या आहेत. त्या 'गॅप्स' नाहीत बदलत्या काळामुळं पडलेल्या तडा आहेत. आणि त्या तडा जगण्यावर-नात्यावर पडल्या की मनांवर ओरखडे पडणार हे उघडच! </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओमेन क्री नावाचा सॉफ्टवेअर इंजिनियर तरुण. अरुणाचली. अनेक वर्ष मुंबईत होता आणि आता गुवाहाटीत स्वतःचा बिझनेस करतोय. त्याचं या गॅप्सविषयी काही निरिक्षण आहे. तो त्याच चक्कीत भरडून इथवर आलाय. ओमेन म्हणाला, 'उलटापुलटा आरसा पाहिलाय का कधी? शहरी समाजातल्या आरशात ज्यासाठी झगडा चाललाय ना ते आमच्याकडं आहे, आणि जे तुमच्याकडं आहे, ज्यातून तुम्हाला सुटायचंय त्यासाठी आम्ही झगडतोय!' यातून वेगळ्याच झगडात मुलं आणि पालक आता फसायला लागली आहेत. मुलांनी काय कपडे घालावेत? काय शिकावं?त्यासाठी कुठून पैसे आणायचे? काय काम करावं? याची पालकांना खंत नाही, असली तरी मुलं मोठी झाली आता त्यांचे प्रश्न आपली जबाबदारी नाही असं पालकांना वाटतं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यात स्वतःची जबाबदारी झटकण्याची भावना नसते तर मुलं मोठं- स्वतंत्र आहे, त्याचं आयुष्य तो जगेल ही पिढ्यानपिढ्या अंगात मुरलेली रीतच. मुलांनी प्रेमात पडावं, वेळेत शरीरसंबंधाची सोय करावी, पोरंबाळ जन्माला घालावीत. भले ती पोरं आपल्याला सांभाळायला  लागली तरी चालतील पण एखादं पोरं मुलीला-मुलाला वेळेवारी झालेलं बरं, ही त्यांची भावना. त्यासाठी लग्र केलंच पाहिजे अशी सक्तीही कोणी अरुणाचलातल्या अनेक जमातींत करत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुलं मात्र आता काळाच्या या टप्प्यावर  गळ्याच प्रश्नांपाशी अडली आहेत. त्यांच्याकडे शिक्षणाच्या धड सोयी नाहीत. हातात पैसा नाही. शहरांत नोकरीचा प्रश्न. आयडेटिंटीचे प्रश्न. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा संघर्ष. स्पर्धेत टिकण्यासाठी नव्हे तर शिरण्यासाठीही करावा लागणारा झगडा त्यांच्यासमोर आहे. त्यात शहराचे लागलेले वेध. बदलती आधुनिक लाईफस्टाईल हवीशी वाटते. हे सगळं पालकांना  समजत नाही. मुलांना धड सांगता येत नाही. त्यातून घरोघर भांडणं होताहेत. किंवा संवाद तुटून अबोले धरले जात आहेत. आपण हिमतीनं जगणारी -स्वतंत्र माणसं. मग आपली शिकलर सवरली मुलं अशी  एकदम बिनकण्याची सैरभैर का वागायला लागली हा पालकांचा संताप. आणि पालकांनी आपल्याला वार्‍यावर सोडलंय ही मुलांची भावना. त्यांच्या आजच्या सार्वत्रिक उपेक्षेच्या भावनेला घरचं हे नवं तुटलेपण मग अधिक एकारलं करत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->मला सतत वाटायचं माझ्या वडिलांनी- काकांनी-मामानी विचारावं. त्यावर अधिकार गाजवावा प्रसंगी. पण ते केवळ ऐकून घेत. तुझं तू ठरव असं म्हणत. बरेचदा एकाकी वाटायचं. मी मुंबईत गेलो तर तिथली मुलं 'स्पेस' साठी भांडत होती. आणि मला माझी स्पेस नकोशी.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>ओमेन क्री सांगतो, ' हे सारं मी अनुभवलंय. मला सतत वाटायचं माझ्या वडिलांनी- काकांनी-मामानी विचारावं माझ्या आयुष्याविषयी. त्यावर अधिकार गाजवावा प्रसंगी. पण ते केवळ ऐकून घेत. तुझं तू ठरव असं म्हणत. बरेचदा एकाकी वाटायचं. मी मुंबईत गेलो तर तिथली मुलं 'स्पेस' साठी भांडत होती. आणि मला माझी स्पेस नकोशी.' सामाजिक जडणघडण असे शब्द वापरून समाजशास्त्रीय अभ्यास केला तर कदाचित घरोघरचे हे प्रश्न क्षुल्लक वाटतील. पण अडकित्यात अडकल्यासारखी ही माणसं अनेक बाजुनं पिसली जात आहेत. आणि पिसणार्‍या प्रत्येकाचं आयुष्य पिळवटून निघतंय!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बस्तीचे शिलेदार..पन्नास माणसांचं कुटूंब! घराबाहेर पंख पसरवून पडणारी ही मुलं मग नव्या संधी शोधतांना आधार शोधतात. त्यांच्यापेक्षा मोठा, जवळपासच्या बस्तीतला, शिकला-सवरला कुणी इटानगर-गुवाहाटी-कोलकाता- दिल्ली अशा शहरांत आहे का हे शोधून काढतात. आडभिंतीच्या पलिकडं काहीच संबंध नसतांना थेट त्या माणसापाशी जाऊन धडकतात. आणि पहिल्यांदा शाळेचं तोंड पाहिलेली, बस्तीपलिकडं या मोठ्या शहरांत येऊन ज्यांनी थोडाबहुत जम बसवला आहे अशी ती 'मोठी' माणसं बस्तीबाहेर पडणार्‍या या मुलांना आधाराचा हात देतात. आपल्या कुटूंबातच सामावून घेतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अरुणाचलातल्या या मोठ्या कुटूंबाची गोष्ट उलगडली तेव्हा वेगळीच ओळख झाली अरुणाचली माणसाच्या जगण्याची. इटानगरमधल्या नॉर्थ ईस्टन रिजनल इन्सिटूट ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्राध्यापक असलेले प्रदीप लिंगफा. त्यांच्या बस्तीतलेच नाही तर आजुबाजूच्या पाचपन्नास बस्तीत कुणी मुलगा इंजिनियर झालेला नाही. बंगळूर- केरळ-मुंबई -दिल्लीत राहून, अमेरिकेत जाऊन जग पाहून आलेले प्रो. लिंगफा. पण इटानगरात राहून अरुणाचलातल्याच ऊर्जाप्रश्नात काही काम करावं असा निर्धार करून ते परतले. आता त्यांचं छोटा विद्युतनिर्मिती तंत्राचं संशोधन सुरू आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्या घरी संध्याकाळी गप्पा मारता मारता बराच उशीर झाला. निघता निघता त्यांनीं हौशीनं बांधलेलं घर दाखवलं. घरात बरीच लगबग दिसत होती. घरात समारंभाला पाहुणे जमावेत तसे खोल्यांमध्ये माणसं होती. पाहुणेरावळे आलेले असताना त्यांचा एवढा वेळ घेतला म्हणून दिलगीरी व्यक्त केली तर ते हसले. म्हणाले, 'पाहुणे कसले? ही माझ्या घरातलीच माणसं आहेत.' अंदाजे पन्नास माणसं तरी असतील घरभरातल्या त्या खोल्यांत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लिंगफाचं तर त्रिकोणी कुटूंब, ते-बायको आणि मुलगी. मग हा एवढा मोठा परिवार? प्रो. लिंगफा ज्या बस्तीतून आले. त्या बस्तीतली, आजुबाजूच्या बस्तीतली. नात्याची, नात्यातल्या नात्यातली जी म्हणून माणसं इटानगरात येतात. यांच्याच घरी राहतात. कुणी शिकायला आलेलं असतं. तर कुणी आजारपणाच्या औषधोपचारासाठी, कुणी सहज फिरायला, तर कुणी नोकरी शोधायला. या माणसांची हक्काची जागा म्हणजे लिंगफांचं घर. निवारा आणि भोजनाची सोयही हक्काची. अमक्या-तमक्याचा संदर्भ सांगत येणार्‍यालाही त्यांच्या छताखाली आसरा नक्की मिळतो. हे असं का? लिंगफा सांगतात. </font>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासारखी माणसं ही आज बस्तीचा एकमेव आधार आहे. माझ्या कुटूंबाकडं पैसे नव्हते तर बस्तीतल्या माणसांनी वर्गणी काढून माझ्या शिक्षणाला पैसे दिले. माझ्यासारखी अनेक माणसं आपापल्या बस्तीच्या पाठबळावर इथवर पोहोचली. बस्तीतला एक मुलगा एवढा मोठा झाला याचं बस्तीला कौतुक. बाकीची मुलंही आदर्श म्हणून माझ्यासारख्यांकडं पाहतात. त्यांना शिकायची, झगडायची एक वाट आम्ही दाखवलीय. पण आता त्यांना पुढं जायला आधार हवा. साथ हवी. ती देणं हे मी माझं कर्तव्य मानतो. कारण आम्ही बस्तीपासून तोडून 'शहरी' झालो तर मग बस्तीतून पुढं येणार्यांना मदत कोण करणार? पोटच्या पोराच्या आधी बस्तीतल्या हुशार मुलांचा विचार लोक करतात. आपल्या बस्तीतून एक तरी इंजिनियर व्हावा म्हणून लोक पदराला खार लावतात. मग या सार्यांना आपल्या माणसाची सोय नको करायला?' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->देशाच्या मुख्य प्रवाहापासून अलगथलग पडलेल्या या भागात गरीबीपासून दहशतवादापर्यंत आणि फुटीरतेच्या मागणीपासून विकासापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. पण घरात शिरलेल्या प्रश्नांच्या या वादळांनी मात्र माणसांचं जगणं कित्येकपट अस्वस्थ करुन सोडलं आहे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>लिंगफाच्या घराचं ते दर्शन झालं आणि मग मी शिकल्यासवरल्या ज्या ज्या माणसांच्या घरी गेले. घराचं असं गोकुळ हमखास दिसलं. सगळ्यांचीच घरं मोठी नसतात. पण आपली अडचण कोणी सांगत नाही. एक मोठं भाताचं आणि एक कालवणाचं पातेलं रटरटत शिजतं. ज्याला वेळ असेल तो शिजवतो, कामाची वाटणी करायचीसुद्धा वेळ येत नाही. शिकली-सवरली माणसं स्वतःहून अशी जबाबदारी उचलतात. कम्युनिटी लिव्हिगचं बदलत्या काळातलं हे वेगळं रुपच. आपल्या माणसांशी 'स्वतःला' असं जोडून ठेवण्यामागे आणखीही एक भावना असते. एखादा कुणी बस्तीतला नाराज झाला किंवा चुकून कधी दाखवलीच जबाबदारीला पाठ तर बस्तीची दारं कायमची बंद होतात. म्हणजे आपल्या माणसांपासून कायमची फारकत. बस्तीपासून तुटण्याच्या शिक्षेचा विचारसुद्धा माणसांच्या जीवाची घालमेल वाढवतो इतकं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कम्युनिटी लिव्हिग रक्तात मुरलेलं असतं. शहरी अरुणाचली घरांचा आकार म्हणूनच दिवसेंदिवत वाढत जातांना दिसतो. एवढा माणसांचं घर चालवायचं म्हणजे त्यासाठीचा पैसा कसा उभारायचा याची चिंता अनेकांच्या जगण्याला वेगळे फाटे फोडते, ते वेगळेच! अनेक घरात पुढच्या दारानं येणार्या पैशापेक्षा मागच्या दारानं येणार्या पैशाचं प्रमाण वाढतं. त्यातून पैशाच्या व्यवहारांचे जे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत ते वेगळेच! </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आधुनिक कोण? आणि कोण मागास? बस्तीतले मुलं-मुली. अनवाणी पायानं जंगलं तुडवत, उपाशी राहत, कधी निवासी शाळांत वर्षानुवर्षे शिकून शहरांत येतात. पुढच्या शिक्षणाला नाहीतर नोकरीसाठी. गुवाहाटीत आलं की जग बदलतं. कलकत्ता- दिल्ली-मुंबई- बंगरुळ-हैद्राबाद नावाच्या शहरांतलं तर जगच वेगळं. उच्च् शिक्षणासाठी दरवर्षी हजारो नॉर्थ ईस्टर्न तरुण या शहरांत येतात. दक्षिण भारतातल्या हायटेक शहरांत जाण्याचं प्रमाण सर्वाधिक. सहज ताळा केला तर दिसेल गुवाहाटीहून उत्तरेला जाणाऱ्या गाडांपेक्षा दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांचं एकूण प्रमाण नक्की जास्त आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जाणाऱ्यांचं प्रमाण जास्त तसं परतून येणाऱ्यांचं प्रमाणही मोठं. आपल्या शहरांत काम करायचं, आपल्या भागाचा विकास करायचा हे स्पिरीट या मुलामुलींमध्ये कमालीचं तीव्र आहे. परतून येणार्या मुलामुलींसमोर परत आल्यावर शिक्षणाला साजेसाच रोजगार मिळवण्याचा प्रश्न नसतो. तर नव्या जगाचं वारं लागलेल्या या मुलांसमोर आता आणखी काही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. इटानगरात उणीपुरी चार वृत्तपत्रं. सगळ्यात जुन्याचं वय १० वर्षे सुद्धा नाही. मी इटानगरात होते त्या दरम्यान या वर्तमानपत्रांत तापलेल्या चर्चां प्रसिद्ध होत होत्या. बायकांनी मंगळसुत्रं घालावं का? लग्र कधी करावं? कोणत्या पद्धतीनं करावं? इत्यादी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नव्या-जुन्या विचारांच्या माणसांची एक नवीच धुमश्चक्री सुरू झाली आहे. जुनी-जाणती काही जमातीतली माणसं म्हणतात. की काळ बदलला. महिलांसाठी पुर्वीसारखं वातावरण राहिलेलं नाही. आदिवासी नसलेल्या बाहेरच्या माणसांचं आपल्यात येणंजाणं वाढलं. त्या माणसांच्या चालीरीती वेगळ्या. त्यामुळे बायकांनी लग्र झालेलं असल्याची काही चिन्ह वापरणं सामाजिक सुरक्षेसाठी गरजेचं ठरेल. मुळात प्रश्न हा की ज्या जमातीत लग्र करणंच बंधनकारक नाही, त्या जमातीतली २५ वर्षे एकत्र राहिलेली काही जोडपीही आता विवाह करायला लागली आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बाहेरुन शिकून आलेल्या मुलामुलींचं म्हणणं यासंदर्भात वेगळं आहे. त्यांना स्वतःवर ही बंधनं लादून घेणंच मान्य नाही. ज्या गोष्टी आपल्या रितीतच नाहीत त्या आधुनिक म्हणून का स्वीकारायच्या हा त्यांचा प्रश्न. म्हणजे दिल्ली-मुंबईत राहून आलेल्या मुली म्हणतात, 'आधुनिक शहरी नागरी समाजातील मुलींनी कधीच सौभाग्यलंकार वापरणं सोडलं. बंधनं म्हणून स्त्रीमुक्तीवाल्या विचारांनी बाईच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी संघर्ष केला. तिच्या निवडीचं स्वातंत्र्य मागितलं. आणि आता आपण ती बंधन का स्वीकारायची? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या व्यवस्थेत तर बाईनं केलेली निवड स्वीकारणं पुरूषावर बंधनकारक आहे. लग्राचंही तेच. शहरी मुलं लग्र टाळून लिव्ह-इन - रिलेशनशिपचा पुरस्कार करताना दिसतात. आणि एकमेकांच्या प्रेमापोटी -विश्वासानं ज्या समाजात स्त्रीपुरूष कुठल्याही बंधनाशिवाय एकत्र राहतात. त्याला आता सामाजिक मान्यता नावाची लग्राची मोहोर कशाला हवी? नैतिक-अनैतिकतेचे ही नवी परिमाणं कशाला? जगण्यात या बोचर्या प्रश्नांनी आरपार छेद द्यायला सुरूवात केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिक्षण -विकासरोजगार- दुरसंचार या पायाभूत गोष्टी हव्यात म्हणून सामाजिक संघर्ष एकीकडे पेटला आहे. आणि ज्या काही चिमुटभर प्रमाणात या गोष्टी घरांत पोहचल्या त्यांनी त्या घरात नवीन प्रश्न निर्माण केले आहेत. नवी वादळं निर्माण होत आहेत. देशाच्या मुख्य प्रवाहापासून अलगथलग पडलेल्या या भागात गरीबीपासून दहशतवादापर्यंत आणि फुटीरतेच्या मागणीपासून विकासापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. पण घरात शिरलेल्या प्रश्नांच्या या वादळांनी मात्र माणसांचं जगणं कित्येकपट अस्वस्थ करुन सोडलं आहे. या अस्वस्थेची उत्तरं काळाच्या प्रवाहात सापडतील की येणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर प्रश्नांचा हा भोवरा वाढेल? या अस्वस्थ उत्तराखेरीज आज तरी कुणाच्याच हातात फारसं काही दिसत नाही!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#800000'><b>लेखिका लोकमत वृत्तसमूहात कार्यरत आहेत.)</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 07 Nov 2008 12:03:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[द्विधा मनाची...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/द्विधा-मनाची-108102600054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/द्विधा-मनाची-108102600054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[एकाकी भटकतोय
या अनोळखी दुनियेत
 सोबतीला नाही कुणी
या एकेरी वाटेत...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>एकाकी भटकतोय</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या अनोळखी दुनियेत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोबतीला नाही कुणी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या एकेरी वाटेत... </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिसत होतं लांबच लांब आकाश</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिसत होतं एकच झाड</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याची होती आकाशाकडे मान</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासारखीच द्विधा त्याची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही खंत होती मनात </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासारखं असू नये कोणी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हीच प्रार्थना करतो प्रभू चरणात</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रेटता रेटता...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिसलं एक विसाव्याचं ठिकाण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जाऊन पाहतो तर काय? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या आधीच तेथे कुणी विराजमान</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तेथून जावं की थांबावं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हाच होता प्रश्न मनात </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुणी मिळेल जीवाभावाचं </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या अनोळखी जगात...</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 26 Oct 2008 19:19:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>संदीप पारोळेकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[निराधारांना मिळाला 'आधार']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/निराधारांना-मिळाला-आधार-108102400024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/निराधारांना-मिळाला-आधार-108102400024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[खान्‍देशातील जळगाव जिल्‍ह्याच्‍या पूर्वेकडे वसलेले सुमारे 50 हजार लोकसंख्‍येचे तालुक्‍याचे गाव अमळनेर. अवघ्‍या महाराष्‍ट्राची मायमाऊली म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या मातृहृदयी साने गुरूजींची कर्मभूमी आणि वारकरी संप्रदायाची पताका डौलाने फडकावणार्‍या संत ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>खान्‍देशातील जळगाव जिल्‍ह्याच्‍या पूर्वेकडे वसलेले सुमारे 50 हजार लोकसंख्‍येचे तालुक्‍याचे गाव अमळनेर. अवघ्‍या महाराष्‍ट्राची मायमाऊली म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या मातृहृदयी साने गुरूजींची कर्मभूमी आणि वारकरी संप्रदायाची पताका डौलाने फडकावणार्‍या संत सखाराम महाराजांची अध्‍यात्‍मनगरी.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>स्‍वातंत्र्य संग्रामाच्या आंदोलकांची आणि अध्‍यात्मिक वृत्तीच्‍या लोकांची दीर्घकालीन परंपरा जशी या शहरात रूजली तशीच या गोष्‍टींपासून शेकडो मैल दूर असलेली किंबहुना समाजाचा अविभाज्‍य भाग असूनही गावकुसाबाहेर राहिलेली आणखी एक संस्‍कृती येथील 'बोरी' नदीच्‍या किना-यावर रूजली आणि वाढलीही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>भरकटलेल्‍या...वैतागलेल्‍या आणि काही क्षणांची करमणूक करून घेण्‍यासाठी आलेल्‍या पुरुषांच्‍या हक्‍काचा असा एक वर्ग या गजबजलेल्‍या शहरात दाटीवाटीने वास्‍तव्‍यास आहे. ज्‍याला समाज वेश्‍या म्‍हणून ओळखतो तर त्‍यांची परंपरा त्‍यांना 'हरदासी' म्‍हणून संबोधते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>अगदी पुरातन काळापासून भारतात ही परंपरा चालत आलेली आहे. नाचगाणे करायचे, समाजाची करमणूक करायची आणि त्‍यांच्‍या दयेवर आयुष्‍य घालवायचे हीच त्‍यांची परंपरा. कालांतराने त्‍यात बदल होत जाऊन देहविक्रय सुरू झाला. जळगाव जिल्ह्यातल्‍या पाचोरा तालुक्‍यातील <!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->भरकटलेल्‍या...वैतागलेल्‍या आणि काही क्षणांची करमणूक करून घेण्‍यासाठी आलेल्‍या पुरुषांच्‍या हक्‍काचा असा एक वर्ग या गजबजलेल्‍या शहरात दाटीवाटीने वास्‍तव्‍यास आहे. ज्‍याला समाज वेश्‍या म्‍हणून ओळखतो तर त्‍यांची परंपरा त्‍यांना 'हरदासी' म्‍हणून संबोधते.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> माहिजी हे गाव 'हरदासींचे गाव' म्‍हणून पूर्वी ओळखले जायचे. पुढे या समाजाने रोजगाराच्‍या (देहविक्रय व्‍यवसाय) शोधार्थ स्‍थलांतर केले. त्याला गावकर्‍यांचा विरोधही कारणीभूत ठरला. या समाजाला माहिजी सोडावे लागले. त्‍यापैकी काही जण खूप वर्षांपूर्वी रेल्‍वेचे गाव म्‍हणून अमळनेरला स्‍थायिक झाले. येथे 'व्‍यवसाय' चांगला म्‍हणून मग त्‍यांची संख्‍या या शहरात वाढली आणि शहरातील गांधलीपुरा नावाच्‍या भागात या समाजाची मोठी वसाहत निर्माण झाली. सुरत-भुसावळ रेल्‍वे मार्गावरील आणि धुळ्यापासून जवळ असल्‍याने तसे सोयीचे म्‍हणून 'आंबटशौकीनांची'ही येथे गर्दी होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>थोड्याफार पैशांसाठी आपले सर्वस्‍व देणार्‍या या समाजामध्‍ये बाहेरच्‍या समाजासारखे जातीभेद किंवा धर्मभेद नाहीत. किंबहुना पैशांच्‍या गरजेपायी या महिलांनी, तर आणि शरीराच्‍या गरजेपायी येथे येणार्‍या पुरुषांनीच ते नष्‍ट केले आहे. त्‍यामुळे हिंदू कोण आणि मुस्लिम कोण हे सांगणे तसे अवघडच.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>अनेक पिढ्यांपासून येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या या महिलांकडे घर आहे मात्र 'घरपण' नाही. नाती आहेत पण ती जपायची कशी हेच माहीत नाही. म्‍हणायला समाजरचनेतील सर्वांत खालच्‍या थरात त्‍यांनाही स्‍थान आहे. मात्र तरीही समाजाच्‍या मूळ प्रवाहापासून शेकडो मैल दूर असलेल्‍या या वर्गाला ना शिक्षणाचा गंध, ना जगात होत असलेल्‍या बदलांचा. घरात मुलगी जन्‍माला आली तर ती देवाची... म्‍हणून तिला देहविक्रय करण्‍याच्‍या व्‍यवसायाला लावायचं तर मुलगा जन्‍माला आला तर तो या व्‍यवसायात 'दलाल' म्‍हणून काम करेल अशी या समाजाची रचना. पिढ्यानपिढ्या नव्‍हे शेकडो वर्षांपासून हीच समाजरचना बिनबोभाट चाललेली. या समाजाला ना कधी कुणाला शिक्षित करावसं वाटलं ना कुणाला त्‍यांच्‍या शोषणा विरोधात काही करावसं. म्‍हणायला चार-दोन पोरं जवळच्‍या नगरपालिकेच्या शाळेत तिसर्‍या किंवा चौथ्‍या वर्गापर्यंत शिकलेली. मात्र, ते लगेच विसरलेलीही.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपल्‍या आणि आपल्‍या कुटुंबीयांचे पोट भरायला अवघ्‍या पन्‍नास-शंभर रुपयांसाठी कुणासोबतही शय्यासोबत करायला तयार असलेल्‍या आणि गरीबी, अज्ञान व अंधश्रध्‍देने पिचलेला असा या महिलांचा वर्ग. या महिलांच्‍या अडचणी त्‍यांचे दुःख आणि व्‍यथा सामाजिक काम करणार्‍या भारती पाटील आणि रेणू प्रसाद यांनी जाणल्‍या आणि सुरू झाली एक चळवळ त्‍यांना आधार देण्‍याची... स्‍वबळावर उभं करण्‍याची 'स्‍वाधार' तिचं नाव.</font><font style=' color:#FF0080;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>अमळनेरच्‍या आधार बहुउद्देशीय संस्‍थेच्‍या माध्‍यमातून एड्ससंदर्भात जनजागृती करण्‍याचे काम भारती आणि रेणू करतात. हेच काम 'टार्गेट ओरिएंटेड' भागात झाले पाहिजे, असे 'एमसॅक'ने सुचविलं. त्‍यानुसार वेश्‍यावस्‍तीत एड्सची भयावहता आणि त्‍याचा प्रसार रोखण्‍यासाठी कंडोमचा वापर करण्‍याबाबत जनजागृती करण्‍याचे काम त्‍यांच्‍या संस्‍थेला सोपविण्‍यात आलं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>आधार'ने काम सुरू केले. सुरुवातीला या वस्‍तीत गेल्‍यानंतर देहविक्रय करणा-या या महिला त्‍यांच्‍याशी बोलायलाच तयार नसतं. हे पोलिसांचे लोक म्‍हणून त्‍यांच्‍यापासून दूर पळणे, आपला धंदा बुडवायला आले म्‍हणून शिवीगाळ करणे तर धमक्या देण्‍यापर्यंत अनेक पध्‍दतीने त्‍यांना वस्‍तीत येण्‍यापासूनच रोखले गेले. त्‍यांच्‍याकडे येणारे ग्राहकही कंडोमचा वापर करण्‍यास स्‍पष्‍ट नकार देत, त्‍यामुळे वस्‍तीतील सर्वांचाच रोष भारती आणि रेणू दोघांना सहन करावा लागला. तर दुसर्‍या बाजूला वेश्‍यांचा वस्‍तीत जातात म्‍हणून त्‍यांच्‍यावर पांढरपेशा समाजानेही टीका केली. वेगवेगळ्या प्रकारे बदनामी होऊ लागली. मात्र रेणू आणि भारती यांनी काम सुरूच ठेवलं. या महिलांचा त्‍यांच्‍या वस्‍तीचा, तेथील पध्‍दतींचा आणि अडचणींचा त्‍यांनी अभ्‍यास केला. </font><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>वस्‍तीतल्‍या एक-दोन शिकलेल्‍या मुला-मुलींची त्‍यांनी मदत घेतली. वस्‍तीतून छोटासा दवाखाना चालविणा-या डॉक्‍टरला त्‍यांनी हाताशी घेतलं आणि हळूहळू त्‍यांच्‍याशी ओळखी करून घ्‍यायला सुरुवात केली. या समाजातील सगळ्यात मोठा दोष अज्ञान असल्‍याचं त्‍यांच्‍या लक्षात आल्‍याने मुलांना शाळेत घालण्‍यासाठी त्‍यांनी प्रयत्‍न सुरू केले. 'हरदासी' समाजात पुरुष कोणतेही काम न करता घरातील महिलांच्‍या जीवावर मजा करतो. दारू पिणे, सट्टा खेळणे, मारामार्‍या करणे आणि दलाली करणे हीच काय ती पुरुषांची कामे. हे जाणून संस्‍थेने या पुरुषांना रोजगार उपलब्‍ध करून देण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू केले. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->आपल्‍या मुलांनी या व्‍यवसायात न पडता शिकावं अशी तेथील स्त्रियांची इच्छा आहे. त्यासाठी त्‍या आता प्रयत्न करीत आहेत. शिक्षणाचे महत्‍व त्‍यांना आता पटू लागल्‍याने या मुलांनाही आता शाळांमध्‍ये पाठविले जाऊ लागले आहे
.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>या समाजासाठी काम करण्‍याच्‍या उद्देशाने 'स्‍वाधार' या नावाने चळवळ सुरू केली. देहविक्रय करणा-या महिलांचे आणि पुरुषांचे वेगवेगळे बचत गट सुरू केले. पुरुषांनी सुरू केलेल्‍या बचत गटांतून त्‍यांना पान दुकान, चहाचे दुकान, भाजीपाला विक्री करणे यासारखी कामे सुरू करून दिली. तर महिलांनी जमविलेल्‍या पैशांतून त्‍यांच्‍यासाठी लहान-मोठी घरगुती कामे उपलब्‍ध करून दिली जाऊ लागली. सोबतीला वस्‍तीत गेट मिटींगच्‍या माध्‍यमातून एड्सचा प्रसार, त्‍याची भयावहता, कंडोमचे फायदे या गोष्‍टी पटवून दिली जाऊ लागल्या. गुप्‍तरोग म्‍हणजे काय? एड्स कसा होतो? यासह अनेक गोष्‍टींची माहिती त्‍यांना करून दिली जाऊ लागली. यापूर्वी बचतगटासाठी आणि शिक्षणासाठी 'आधार'ने केलेले प्रयत्‍न यशस्‍वी झाल्‍याने या महिलांकडून त्‍यास प्रतिसाद मिळू लागला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>आज वस्‍तीतील परिस्थित बराच बदल झाला आहे. वस्‍तीत आता कंडोमचा वापर वाढला आहे. महिला आज स्‍वतःहून कंडोम वापराचा आग्रह धरतात. या महिलांची नियमित आरोग्‍य तपासणी केली जाते. एचआयव्‍हीग्रस्‍त असलेल्‍या काही महिलांना एआरटी औषधोपचार उपलब्‍ध करून दिला गेला आहे. त्‍यामुळे एचआयव्‍ही लागणीच्या प्रमाणातही घट आली. आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>हा व्‍यवसाय आम्‍ही करू इच्छित नाही आम्‍हालाही वाटतं आपलं घर असावं, आमची मुलं शिकावीत मोठी व्‍हावीत त्‍यांनी या व्‍यवसायात न पडता शिकावं, अशी तेथील स्त्रियांची इच्छा आहे. त्यासाठी त्‍या आता प्रयत्न करीत आहेत. शिक्षणाचे महत्‍व त्‍यांना आता पटू लागल्‍याने या मुलांनाही आता शाळांमध्‍ये पाठविले जाऊ लागले आहे. सुरुवातीला सामान्‍य शाळांमध्‍ये या मुलांना प्रवेश देण्‍यास विरोध झाला होता. मात्र आता हळूहळू स्थिती बदलते आहे. या समाजातील कुणाचीही जन्‍म-मृत्युची नोंदच नसल्‍याने शिवाय हा समाज सातत्‍याने स्‍थलांतर करणारा असल्‍याने त्‍यांच्‍याकडे रेशनकार्डच नसल्‍याने शासकीय कामात अडथळे येत असतात. मतदार यादीतही या समाजाची नोंद नाही. 'आधार'ने त्‍यासाठी आता पाठपुरावा सुरू केला आहे. तर या महिलाही आता आपले म्‍हणणे स्‍वतः शासकीय कार्यालयांमध्‍ये जाऊन मांडू लागल्‍या आहेत. महिला व पुरुषांच्‍या बचतगटांचे कामही त्‍यांच्‍याकडूनच पाहिले जाऊ लागले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>आता गरीबी, अज्ञान आणि अनारोग्‍याविरुध्‍दचा हा लढा केवळ भारती पाटील आणि रेणू प्रसाद यांचा राहिला नसून तो आता वस्‍तीतील प्रत्‍येक महिलेचा झाला आहे. वस्‍तीतील महिलांना स्‍वबळावर उभ राहण्‍याचे बळ देणारी ही चळवळ आता त्‍यांच्‍याकडूनच चालविली जाऊ लागली आहे. म्‍हणूनच आधारने आता तिचे 'स्‍वाधार' असं नामकरण करून ती येथीलच काही महिलांच्‍या हातात दिली आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>समाजासाठी या बदलाने काहीही फरक पडणार नसला तरीही शतकानुशतके वंचितांचे जीवन जगावे लागलेल्‍या या महिलांच्‍या आयुष्‍यातला अंधःकार आता नष्‍ट होऊ लागला आहे. एका प्रकाशपर्वाच्‍या दिशेने त्‍यांचा प्रवास सुरू झाला असल्‍याने त्‍यांच्‍यासाठी ही मोठी गोष्‍ट आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Oct 2008 19:52:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>विकास शिरपूरकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मराठीचे 'नवनिर्माण'!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/मराठीचे-नवनिर्माण-108102500039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/मराठीचे-नवनिर्माण-108102500039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रात यापुढे फक्त मराठीच बोलली, लिहिली जाईल. (ही मराठी कोणती यावर सध्या चर्चा (खरं तर वाद) सुरू आहे.  पुण्याची, विदर्भाची, कोकणातली, खानदेशातली की पश्चिम महाराष्ट्रातली असा तो वाद आहे......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0810/25/images/img1081025039_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PR</td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच  अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली. या  झाडाझडतीने धरती आंदोळली. कित्येक 'बांगड्या' फुटल्या. कित्येक घरंगळत पुन्हा आपल्या मायदेशी गेल्या. राजमान्य राजेश्री  राजजींच्या या तेजतर्रार आंदोलनाने बहु मराठी मने आनंदली. 'मराठा तितुका मेळवावा'चा नाद घुमला आणि या महाराष्ट्रदेशी  'आनंदवनभुवनी'ची अनुभूती येऊ लागली. तर या सगळ्याचा मोठा लाभ राजजींना झाला. त्यांची लोकप्रियता बहु वाढली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यातच महाराष्ट्रदेशी निवडणूक जाहीर झाली. राजजींशी आमचे अतिशय घरोब्याचे संबंध असल्याने या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठिशी असणार आहोत. त्यामुळे त्यांच्या अतिगुप्त बैठकांतही आमचा सहभाग असतो. अशाच एका बैठकीत आम्ही सहभागी झालो असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'रोखठोकनामा' आमच्या हाती लागला. (रोखठोक हे शीर्षक श्रीमान ठाकरेजींच्या स्वभावाशी निगडीत असून त्याचा 'ठोकण्याशी' काहीही संबंध नाही हे सूज्ञास सांगणे न लगे.) सांगायचा मुद्दा असा की हा  रोखठोकनामा राजजींच्या व्यक्तिमत्वाला साजेसाच आहे. निवडणुकीनंतर राजजी काय करणार आहेत, याची चुणूक त्यातून कळते. </font><font style=' color:#0000FF;'><b>राजजी हे सगळे जे काही करत आहेत, ते 'महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा' या न्यायानेच असल्याने हा रोखठोकनामा मला मायबाप जनतेसमोर आणणे जरूरीचे वाटले. सबब, हा रोखठोकनामा खाली दिला आहे.</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>* </font><font style=' color:#000000;'></b>महाराष्ट्रात यापुढे फक्त मराठीच बोलली, लिहिली जाईल. (ही मराठी कोणती यावर सध्या चर्चा (खरं तर वाद) सुरू आहे.  पुण्याची, विदर्भाची, कोकणातली, खानदेशातली की पश्चिम महाराष्ट्रातली असा तो वाद आहे. काहींनी ज्ञानेश्वरकालीने मराठीचे रूप  सर्वांत शुद्ध मानावे असे म्हटले आहे. पण मराठा महासंघ व इतर संघटनांनी त्याला तीव्र विरोध करून तुकारामाच्या काळातील  मराठी शुद्ध मानावी असे म्हटले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>* </b>महाराष्ट्रात प्रवेश नाक्यांवर 'मराठी बोलणार्‍यासच प्रवेश' असा बोर्ड लावला जाईल. या तसेच सर्व नाक्यांवर एक भाषाविषयक  तज्ज्ञ ठेवण्यात येईल. त्याची पात्रता साधारणपणे मराठी प्राध्यापकाएवढी असेल. (पात्रता हा शब्द शैक्षणिक पात्रतेशी निगडीत असून त्याचा बौद्धिक कौशल्याशी संबंध नाही.) प्रत्येक गाडीतून उतरणार्‍या प्रवाशाला मराठी येते की नाही याची तो तपासणी करेल. तसेच मराठी शिकविण्याची व्यवस्थाही येथे असेल. किमान कामचलाऊ मराठी शिकविण्याचे 'क्लासेस' उघडणार्‍यांना येथे फुकट सरकारी भूखंड दिला जाईल. विमानतळावरही मराठी शिकविण्यासाठी खास अधिकारी असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>* </b>शाळेतही अर्थात मराठीतूनच शिकवले जाईल. हिदी भाषिक विद्यार्थ्यांना 'एक्स्ट्रा मराठी' असा विषय असेल. त्यात त्यांना हिंदी  भाषकांना ळ, ड, ट, ज्ञ ही अक्षरे तसेच च, ज यांचे उच्चार घोटवून घेण्यात येतील. त्यांच्याकडून मराठीचा सराव करण्यासाठी  'घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा' हे गाणे कविता म्हणून पाठ्यक्रमात सामील करण्यात येईल. हे गाणे म्हणून  दाखविणार्‍या हिंदी भाषकाला 'मराठी प्रवीण' ही पदवीही देण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>* </b>याशिवाय ज्यांचे शिक्षण पूर्वी हिंदीत झाले आहे त्यांना मराठी शिकविण्यासाठी 'फाडफाड मराठी' 'तातडीचे मराठी', कामचलाऊ  मराठी' 'शुद्ध मराठी' असे कोर्स सुरू करण्यात येतील. हे कोर्स चालविणार्‍या क्लासचालकांना सवलती देण्यात येतील. तसेच  यासाठी लागणारी पुस्तके सरकारी खर्चाने उपलब्ध करून देण्यात येतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>* </font><font style=' color:#000000;'></b>उत्तर भारतीयांना मराठी 'धडा' शिकविणार्‍या मराठी युवकांना विशेष गुण दिले जातील. याचा उपयोग त्यांना सरकारी नोकरीतील  प्राधान्य, सरकारी घरात प्राधान्य वगैरेसाठी होऊ शकेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>* </font><font style=' color:#000000;'></b>बैंक, बैग, इस्कूल, आईसीआईसीआई असे उच्चार करणार्‍या हिंदी भाषकांना कठोर दंड ठोठावण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>* </b>केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील कार्यालयातही मराठीतूनच कामकाज चालेल. 'हिंदी पखवाडा' बंद करून 'मराठी वर्ष' असा उपक्रम  राबविला जाईल. टपालापासून आयकरापर्यंतची सर्व कार्यालये हिंदीतूनच काम करतील. रेल्वेचे कामकाजही महाराष्ट्रात तरी  मराठीतूनच चालेल. त्यामुळे रेल्वेची उद्घोषणा फक्त मराठीत केली जाईल. महाराष्ट्रातील इतर भागात या उद्गोषणा मराठी आणि तेथील स्थानिक प्रादेशिक भाषेतही असतील. उदा. खानदेशात- खानदेशी. रेल्वेतील सर्व हिंदी शब्द मराठीत केले जातील. उपरी उपस्कर डिपो' वगैरे शब्दांचे मराठीत भाषांतर केले जाईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>* </b>दुकानांच्या सर्व पाट्या मराठीतच असतील. इंग्रजीत असलेल्या पाट्याही मराठीत करण्यात येतील. उदा. बिग बझारचे 'मोठा  बाजार', कॅफे कॉफी डेचे कॉफीचे दिवसाचे हॉटेल असे नामकरण करण्यात येतील. एवढच नव्हे तर ज्या कंपन्या महाराष्ट्रातून  चालविल्या जातात, त्यांची नावेही मराठीत होतील. उदा. रिलायन्सचे 'विश्वास', कॅमलचे 'उंट' अशीही नावे मराठीत असतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>* </b>छट पूजेला परवानगी दिली जाईल. पण ही पूजा पूर्णपणे मराठीत होईल. त्यासाठी मराठी भिक्षुक असतील. त्यानंतर होणारी  गाणीबजावणीही अस्सल मराठी होईल. त्यात लावणी, लोकसंगीत, मराठी भावसंगीत असे चढत्या भाजणीचे कार्यक्रम ठेवावे  लागतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>* </font><font style=' color:#000000;'></b>मनोरंजनाची साधने फक्त मराठीतच उपलब्ध होतील. उदा. मराठी चित्रपट सर्व चित्रपटगृहात लावले जातील. त्यातही अलका  कुबल छाप चित्रपट तर मल्टिप्लेक्समध्ये दाखविण्यात येईल. मराठी अभिनेत्यांना ग्लॅमर येण्यासाठी त्यांची मानधनाची रक्कम  ही कोट्यावधीत देण्यात येईल. समजा निर्मात्याने (कसेबसे) २५ हजार दिल्यास उर्वरित रक्कम महाराष्ट्र सरकार देईल. मराठीचा  गौरव टिकविण्यासाठी सरकारचे हे 'पुरोगामी' पाऊल असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>* </b>बॉलीवूडचे चित्रपटही मराठीतच तयार होतील. फक्त त्याला हिंदी सबटायटल्स देण्याची मुभा दिली जाईल. पण त्यांना या  चित्रपटात कंपल्सरी एक मराठी आयटम सॉंग टाकावे लागेल. (मराठीत हिंदी आयटम सॉंग चालते मग हे उलटे का नाही?)  महाराष्ट्रात रहाणार्‍या हिंदी भाषकांना 'कंपल्सरी' मराठी चित्रपट पहावे लागतील. त्यांचे मराठी सुधरेपर्यंत तरी आठवड्याला एक  असा हा 'रतीब' असेल. विशेषतः अलका कुबल वगैरेंचे चित्रपट आवर्जून दाखवले जातील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>* </b>मराठीत काम करणार्‍या बॉलीवूडच्या अभिनेत्यांना त्यांच्या चित्रपटांच्या संख्येनुसार पुरस्कार देण्यात येईल. उदा. पाच चित्रपट  केल्यास महाराष्ट्र गौरव, दहा केल्यास महाराष्ट्राचा अभिमान असे पुरस्कार देण्यात येतील.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>* </font><font style=' color:#000000;'></b>मराठी रागसंगीतातील हिंदी, अवधी, ब्रज भाषेतली बंदिशी बदलून त्यांची जागा मराठी पदांनी भरून काढली जाईल. त्यासाठी  पूर्वी जसे राजकवी असायचे तशी कवींची भरती करण्यात येईल. हे कवी या बंदिशींना पर्यायी मराठी बंदिशी देतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>* </font><font style=' color:#000000;'></b>बिहार व युपीमधून येणार्‍या रेल्वेगाड्यांमध्ये महाराष्ट्रातील शेवटचे स्टेशन येईपर्यंत मराठी संस्कृतीची सीडी दाखवली, ऐकवली  जाईल. त्यात अभंग, गवळण, लावणीपासून भावसंगीत ऐकविण्यात येईल. त्यानंतर मराठी सण-उत्सवांची ध्वनिचित्रफित  दाखविण्यात येईल. महाराष्ट्रात येताना शेवटचे स्टेशन असेल तिथे यावर एक प्रश्नमंजूषा ठेवली जाईल. त्यात प्रथम क्रमांक  मिळविणार्‍यांना 'पाईक महाराष्ट्राचा' हा पुरस्कार देण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तर राजमान्य राजजींच्या 'रोखठोकनाम्यात' मराठीचा गौरव वृद्धिंगत करण्यासाठी अनेक 'कलमे' आहेत. पण विस्तारभयास्तव त्यातील मोजकी कलमेच येथे दिली आहेत. माननीय राजजींच्या नेतृत्वाखालील सरकार या महाराष्ट्र देशी आल्यानंतर नक्कीच मराठीचा गौरव वाढेल हे उपर्यु्क्त तर्जुम्यावरून कळोन येते नाही का? </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Oct 2008 19:45:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रचितगडावरची 'स्वारी']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/प्रचितगडावरची-स्वारी-108102400020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/प्रचितगडावरची-स्वारी-108102400020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[धगुरड्यांचा ग्रुप सातत्याने भटकत असायचा. त्यांना ट्रेकिंगची फार हौस. आठ-पंधरा दिवस जंगलात भटकंती करून काळवंडून परतलेल्या त्या ग्रुपची येताच 'कॅसेट' सुरू व्हायची.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0810/24/images/img1081024020_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>दहावीची परीक्षा संपली आणि एकदाचे दहा वर्षांचे टेंशन गेले म्हणत (घरच्यांनी) सुटकेचा निःश्वास टाकला. आम्ही मात्र, परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन जितके केले नाही तेवढे सुटीतल्या ट्रेकिंगचे नियोजन करत होतो. सांगलीत प्रसिद्ध गणपती मंदिराच्या नजीकच आमचा पुराणिक वाडा.. आता वाडा म्हटल्यावर आपसुखच तुमच्या डोळ्यासमोर भलामोठा दरवाजा, शेणाने सारवलेल्या प्रचंड खोल्या, पडवीत हालणारा झोपाळा.. टिपीकल वाड्याचे चित्र तरळले असेल. पण, आमचा हा वाडा असा टिपीकल नव्हता खरा. पण, एकमेकांची नाळ जुळलेली कुटुंब या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहत. वडिलधारी माणसं, दादा-ताई म्हणाव्यात अशा कॉलेजिअन्सचा (धगुरड्यांचा)  ग्रुप आणि आम्हा छोट्यांची गॅग.. असे आम्ही आपापल्या नादात मग्शुल असायचो. आम्हा पोरांचं बालपण गणपती मंदिरातील प्रसन्न आणि झाडाझुडपांनी बहरलेल्या आल्हाददायक वातारणात गेलं.</font><font style=' color:#400080;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>धगुरड्यांचा ग्रुप सातत्याने भटकत असायचा. त्यांना ट्रेकिंगची फार हौस. आठ-पंधरा दिवस जंगलात भटकंती करून काळवंडून परतलेल्या त्या ग्रुपची येताच 'कॅसेट' सुरू व्हायची. जंगलात कसे थ्रिलींग अनुभव येतात. वाघ, सापासारखे जंगली प्राणी 'लाइव्ह' पाहायला मिळतात याचे वर्णन  ऐकताना आताच उठावं आणि जंगलात जावं असं वाटायचं.. (पण, तेव्हा रात्रीच्या वेळी.... ला जाण्यासाठीही बाबांची सोबत लागत असे)  पण, त्यांच्यामुळेच आम्हाला इतरत्र भटकण्यापेक्षा ट्रेकिंगला जाण्याचा नाद जडला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>असो.. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>दहावीची परीक्षा संपली आणि ट्रेकिंगला जाण्याचं आमचं खूळ जागं झालं. खरंतर मोन्या (सुनील पुराणिक) शिली (शैलजा भोसले) तुपी (तृप्ती जोशी) संत्या (संतोष पुराणिक) संत्या नंबर-2 (संतोष जोशी) कोल्हापूरचा संज्या (संजय) शिल्पा आदी मोठ्यांनी आम्हाला गृहीतच धरलं नव्हतं आणि उगीचच आमची उठाठेव सुरू होती. त्यांनी वासोट्याला जाण्याच निश्चित केलं होतं पण, त्यानंतर प्लॅन बदलला आणि 'प्रचितगड' येथे जाण्याचं निश्चित झालं. इतिहास आवडीचा विषय असल्याने आम्हालाही ही कल्पना पसंत पडली. पुस्तकात गडकोट किल्ल्यांची चित्रे आणि शिवाजी महाराजांनी गाजवलेला काळ वाचताना स्फुरण चढायचं. प्रचितगडाचं नाव कुठ ऐकलं नव्हत पण, किल्ल्यावर भटकंती करायची म्हटल्यावरच (नंतर फाटणार आहे याची कल्पना नव्हती म्हणून) आम्ही आनंदीत झालो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>खरं तर मोठ्यांच्या चर्चेत आम्हाला सहभागी करून घेतलं जात असे पण, आम्हाला जमेत धरलं जात नाहीय हे लक्षात आल्यावर आम्ही 'दंगा' सुरू केला. खरंतर जंगलात जाण्याची 'रिस्क' असल्याने आणि घरच्यांचा विरोध असल्याने ते आम्हाला टाळत होते. पण, रडून-फुगून घरच्यांची संमती घेतल्यावर त्यांनी (नाईलाजाने) आम्हाला स्वीकारले. माझ्यासह सॅंडी (संदीप)  केद्या (केदार) सुरज्या (सुरज सारडा) पशा (प्रसाद) आदींनी ट्रेकिंगला जाण्याची तयारी सुरू केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>अखेर जाण्याचा दिवस उजाडला... मिरजेतून नायरीला थेट गाडी असल्याने जागा मिळवण्यासाठी आम्ही 10 किलोमीटरवरचं मिरज गाठलं. टीशर्ट-बरमुडा, पायात बूट, टोपी, हातात काठी आणि पाठीवर मोठ्या सॅग लादलेल्या अवस्थेत आमची मिरजेतील 'एंट्री' लक्षवेधी ठरली. शिवाजी महाराजांच्या जमान्यातील आम्ही मावळे कुठंतरी लढाई जिंकण्यासाठी जात असल्याचे उगाचच वाटू लागलं. सकाळी 11 वाजता नायरी गाडी आली आणि कोंबड्या भरल्यासारखी गाडी प्रवाशांनी भरू लागली. प्रवाशी आत चढल्यावर आमची शस्त्र गळाली. खिडक्यांतून काठ्या, गाठोडी, स्टोव्ह आत टाकून जागा 'रिझर्व' केली. आत गेल्यावर जागा मिळाली नाहीच. परंतु, आमच्या वस्तू शोधण्याची वेळ आली. काही तास उभारल्यानंतर (बूड टेकण्याइतकी) जागा मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>दुपार लोटली आणि आम्ही कोकणात दाखल झालो. उन्हं उतरली, सायंकाळचं गार वारं सुखावू लागलं. पण, अंग अवघडलं असल्याने कधी एकदा खाली उतरतोय असं झालं होतं. संगमेश्वरात गरगमगरम चहा आणि भजी खाल्ल्यावर जिवात जीव आला. दिवेलागणीची वेळ झाली तरी प्रचितगड काय साधा डोंगर दिसेना. गाडी जशजशी पुढं जाईल तशी गर्दी कमी होत होती. आम्हाला हलकी डुलकी लागली होती. शेवटचा थांबा नायरी होता पण, आम्हाला शृंगारपूरला जायचं असल्याने 20 ते 30 किलोमीटर अलीकडे शृंगारपूर फाट्यावर ड्रायव्हरने ब्रेक मारला तसे आम्ही खडबडून जागे झालो. रात्रीचे आठ-साडेआठ वाजले होते आणि त्या 'एसटी'त प्रवाशी म्हणून फक्त आमचा ग्रुप होता. आमची उतरण्याची लगबग सुरू झाली तेवढ्यात कंडक्टर आला आणि म्हणाला ' तुम्हाला शृंगारपूरला जायचे असेल तर आता नायरीला चला आणि सकाळी उठून परत याच गाडीतून या.   कारण, या फाट्यावरून शृंगारपूरला जाण्यासाठी घाटातूनच 13 किलोमीटरची पायवाट आहे आणि येथे दोन नरभक्षक वाघ आहेत. वाघ.. म्हटल्यावर भीतीने थरकाप उडाला. बाहेर अंधार आणि किर्र झाडी पाहिल्यावर मी तर गाडी न सोडण्याचे ठरवले. मोठ्या मुलांची चर्चा सुरू झाली आणि त्यांनी गाडी सोडण्याचा निर्णय घेतला. आत रहाण्यास नकार दिला तर शिव्या खाण्याबरोबरच 'भित्रा' म्हणून घ्यावं लागलं असत, म्हणून मीही निमुटपणे खाली उतरलो. </font><font  style='font-size:11pt; color:#400080'>लाल मातीचा धुरळा उडवीत गाडी निघून गेली. गाडीचे मागील दिवे मंद होईपर्यंत मी गाडीकडे पाहत होतो. तोपर्यंत 'ऊ.. ऊ.... ' असा भुताटकीसारखा आवाज ऐकू येऊ लागला. आता मात्र भीतीने गाळण उडाली. काही समजायच्या आत अंधारातून एक काळी सावली आमच्याकडे येत असल्याचा भास होऊ लागला. तेव्हा मोठी मुले पुढे सरसावली. मुली किंचाळल्या. 'कुणी घाबरू नका, जोराचा आवाज सुरू करा.. ' अशा सूचना सुन्याने दिल्या. तेव्हा आवाज फुटत नसतानाही आम्ही ओरडण्याचा प्रवत्न करू लागलो. ती सावली जवळ आली तेव्हा समजले की, कडाक्याच्या थंडीने गारठलेला आणि आमच्याइतकाच भयभीत झालेला एक वृद्ध गोधडी लपेटलेल्या अवस्थेत आमच्याकडे येत होता. त्यालाही शृंगारपूरला जायचे होते पण, वाघाच्या भीतीने त्याची गाळण उडलेली होती. त्याला नीट बोलताही येत नव्हते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>आमच्या सोबतीने त्याला हायसे वाटले. त्याला नेमकी वाट माहीत असल्याने आमचीही भीती काहीशी कमी झाली. पण, वाघाची भीती कायम होती. कारण तेव्हा नरभक्षक वाघांकडून दररोज किमान एक तरी बळी जात होता. आम्ही 'कालवा' करीत आणि एकमेकांना पाठ चिटकवीत चालू लागलो. सुदैवाने त्यादिवशी (पौर्णिमा असावी) चंद्रप्रकाश असल्याने वाट दिसत होती. एक बाजूस दरी आणि छोटी पायवाट.. आम्ही रस्ता कापू लागलो. एका वळणावर प्राणी जोरजोरात ओरडतानाचे आवाज ऐकू येऊ लागले.   थंडी आणि भीतीने अंगावर काटा उभा राहिला होता म्हणून आम्ही एकत्र येऊन शेकोटी पेटवली. एकाचजागी जास्त वेळ थांबणे धोक्याचे आहे, असे त्या वृद्धाने सांगित्यावर आम्ही पुन्हा चालू लागलो. मनात नाही, नाही ते विचार घोळू लागले पण, 'घाबरायचे नाही.. यालाच थ्रिल म्हणतात', अशी आपल्याच मनाची समजूत घालून धिटाईचा आव आणत पुढे चालत होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>दीड ते दोन तास चालल्यानंतर अचानक बल्बचा प्रकाश दिसू लागल्याने प्रत्येकाच्या चेह-यावरील भय कमी होऊन समाधानाची लकेर उमटली. 'मगर दिल्ली अभी भी दूर थी'. आम्ही शृंगारपूरात पोहोचलो होतो पण, गावाच्या वेशीबाहेरच्या मारुती मंदिरातील दिवा चमकत होता. आणि याच मंदिरानजीक वाघांचे हल्ले अधिक होत असल्याचे समजताच आमचा 'स्पीड' वाढला. पुढे पंधरा ते वीस मिनिटाच्या फरकावर शृंगारपूर आले. कुठल्यातरी डोंग-राच्या पायथ्याला अर्थात उतरंडीला हे गाव वसले असल्याचे अंधुक प्रकाशात जाणवत होतं. फणस, आंबे आणि सागाची झाडं.. घरांच्या बाजूंनी दगड रचलेली..   अशा टिपीकल कोकणातील गावांत एक रात्र काढण्याची माझी हौस याठिकाणी भागणार म्हटल्यावर मी आनंदीत झालो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>रामचंद्रराव (नाव घेताच त्यांची आठवणं उभी राहिली) यांच्या घरी आम्ही गेलो. अगदी घरचे सदस्य असल्यासारखे त्यांनी आमचे स्वागत केले. गरम पाण्याचे पिंप त्यांनी आमच्यासाठी भरून ठेवले होते. आता या जंगलात पोटाचे हाल होणार अशी खूणगाठ मी एवढ्यावेळ चालताना मनात बांधून ठेवली होती. पण, रामचंद्रराव यांची आई व बायकोने आमच्यासाठी गरम-गरम भात शिजवला होता. आमटीचा खमंग घमघमाट सुटताच कधी एकदा भातावर ताव मारतोय असे झाले. कोकणी पत्रावळ्यांमध्ये भात आणि आमटीचा स्वाद आजही जिभेवर तरळतो. रात्री गप्पाटप्पा मारत आणि एकमेकांची खेचत झोप कधी लागली तेच कळले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>सकाळी अंथरुणे ओली झाली (.. काहीतरीच काय, दव पडले होते) होती आणि गारठ्याने सर्वांनाच जाग आली. डोळे उघडताच नजर केली ती आकाशाला गवसणी घालणं-या 'प्रचीतगडा'वर धुक्यामधून अधून मधून हा गड आम्हाला खुणावत होता. गडाचे उंच टोक दिसायचे तेव्हा ही उंची पाहून आम्ही तोंडात बोटे घालती पण, धुक्याची झालर हलकीच विरळ होऊन हा गड मान उंचवायचा. गडाची तटबंदी, कडाकपा-यांतून कोसळणारे पाण्याचे छोटे धबधबे-हिरवळ अन काळ्या कपारींचा सुंदर मिलाप लक्ष वेधून घेत होता. सकाळी उठल्यावर रामचंद्ररावांनी गरमागरम चहा आणून दिला. नाक तुटलेल्या त्या कपातील चहाचा पिताना मात्र चहा संपूच नये असे वाटत होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>नजीकच मोठ्या दगडगोट्यांमधून खळखळ वहाणा-या पाण्याचा आवाज येत होता. या दगडगोट्यांमधील 'नॅचरल कमोड' (दोन-दोन दगडे) निवडून आम्ही प्रातर्विधी ओटोपले. थंडी वाजत असली तरी वाहणा-या थंड पाण्यात आम्ही मनमुराद डुंबत अंघोळी आटोपल्या. गडावर चढण्याची इतकी घाई लागली की, नाश्त्याचे पोहे कधी पोटात गेले ते कळलेच नाही. 'जय शिवाजी.. जय भवानी... ' अशा घोषणा देत एकदाचे 'ट्रेकिंग' सुरू झाले. </font><font  style='font-size:11pt; color:#400080'>सुरुवातीलाच चढण सुरू झाली पण, आजूबाजूला दाट झाडी होती. या झाडीतून पायवाट गेलेली होती. अधुनमधुन गोंधळात टाकणारे फाटे फुटायचे. कोणी भरकटले तर पंचाईत होणार होती म्हणून हा धोका टाळण्यासाठी रामचंद्रराव यांनी सुरुवातीस सर्वांना 'जंगली' भाषा शिकवली. 'जंगली' म्हणजे धोका असल्यास विशिष्ट प्रकारची आरोळी द्यायची. अशा चार ते पाच प्रकारच्या आरोळ्या त्यांनी शिकवल्याच नाहीत तर चांगली तालीम करून घेलती. सुमारे दोन तास चालल्यानंतर डोंगराचा सपाट भाग लागला. येथे दुतर्फा उंचउंच वाळलेले गवत होते. येथून चालत असताना आम्ही दंगा-मस्ती करत होतो. पण, रामचंद्ररावांनी आम्हाला सावध केले. या ठिकाणी पदोपदी धोका होता. कारण या भागात रानडुकरांची संख्या जास्त असल्याने त्यांना पकडण्यासाठी शिका-यांनी चाप (पिंजरा) लावले होते. हा चाप धारधार असल्याने यामध्ये अडकल्यास जीव जातो. शिवाय काही चापांमध्ये दारू भरून ठेवण्यात आल्याने स्फोटही होतो. ही माहिती ऐकतात आम्ही सतर्क झालो आणि प्रत्येक पाऊल जपून टाकू लागलो. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ठिकठिकाणी लावलेले चाप आम्हाला दिसून आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>ही गडाची पहिली पायरी, वरती दुसरी पायरी असे काहीसे रामचंद्रराव सांगत होते. मात्र, तेव्हा आम्हाला याबद्दल काहीच इंटरेस्ट नव्हता. पुढे घंटाभर चालल्यावर झाडे विरळ होत गेली आणि पुन्हा कठीण जढण आली. दोन्ही बाजूला वाळलेल्या काट्याकुट्यांचा आधार होता. पण, तोही पुढेपुढे कमी होत गेले. चढण वाढत गेली तसे पाय घसरू लागले अचानक आमच्यासमोर असे चित्र उभे राहिले की काळजात एकदम धस्स झाले. दोन्ही बाजूला खोल दरी आणि त्यामधून एक वळण घेत पायवाट पुढे गेली होती. तेव्हा आम्ही 25 टक्केच गड चढलो हे नंतर कळले. आमच्या समोर केवळ दगड आणि कपा-यांतून गेलेली ती पायवाट पाहिल्यावर तर मी पळ काढायचेच निश्चित केले होते. पण, सुमारे तीन ते चार तासांचे आणि तेही दाट जंगलातून आम्ही येथपर्यंत आलो होतो त्यामुळे मागे वळण्याची कल्पनाही मुर्खपणाची होती. पण, पुढे जाणेही शक्य नव्हते. आमची तोंडे बघितल्यावर रामचंद्ररावांना आम्ही घाबरल्याचे जाणवले. 'एवढे वळण झाले की झाले' पुढे घाबरण्याचे काही नाही' असे सांगत त्यांनी धीर देण्याचा प्रवत्न केला. मी तर खाली बसकण मारून एका दगडाला मिठी मारली होती. पायाला कंप फुटला होता. आमच्या चेह-यावरील भाव पाहून मोठ्यांनी 'म्हणून तुम्हाला येऊ नका म्हणत होतो.. ' अशी झाडमपट्टी सुरू केली. आता झक मारत पुढे जावे लागणार याची जाणीव झाली. दगडाच्या आधारेच उठतो तोवरच खोल दरी आ.. करून आमचा घास घेण्यासाठी आसुसली असल्याचा भास झाला. (खरंतर यावेळीच ट्रेकिंगची खाज भागली होती पण, पुढे खूप काही वाढून ठेवले होते) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>सुरुवातीला मोन्या आणि रामचंद्रराव पुढे सरसावले. केवळ पाऊण ते एक फुटाची पायवाट, एका बाजूला दगडी कपार आणि दुस-या बाजूला दरी (डोळ्यासमोर चित्र उभे राहिले आणि हे लिहितानाही हात थरथरत आहेत) अशा काळजात धस्स करणा-या पायवाटेवरून भाजीमंडईतून फिरत असल्यासारखे रामचंद्रराव बिनधास्त चालत परतले. आम्ही पुढे जाणार तोवर जोरदार वारे सुरू झाले आणि दरीतून घूं... घूं.. आवाज सुरू झाला. तोंडातून राम.. राम.. राम.. राम.. असे पुटपुटत आम्ही पुढे सरसावलो. 25-30 पावले चालल्यावर आता मागे वळून पाहण्याचीही सोय नव्हती. एक वळसा घालून अशा ठिकाणी येऊन पोहोचलो की, ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. आता तर चक्कीत चांगलाच जाळ झाला होता. फॉल्स पॉंईंट वरून आपण दरीत कोसणारे धबधबे बघताना आपण बेधुंद होऊन जातो. आता मला सांगा या धबधब्याचे वरचे टोक आणि खालचे टोक याच्याबरोबर मध्ये तुम्हाला नेऊन सोडले तर काय मजा येईल ना. कल्पना केल्यावरच फाटली ना... हो अशीच अवस्था आमची झाली. कारण, कोरड्या पडलेल्या धबधब्यांच्या मधोमध आम्ही येऊन पोहोचलो. आता पुढे जाण्यासाठी येथून वर चढाई करावी लागणार होती. आमच्याकडे दोर वगैरे काहीच नव्हते. आता मात्र, आम्ही संतापलो. मागे दरी आणि वरची चढाई बघून मोठ्यांचीही फॅ.. फॅ.. झाल्याचे जाणवत होते. सारेच फसलो होतो. पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो. आणि त्यावेळच्या उन्हाळ्यात या मार्गावरून जाणारे आम्ही पहिलेच ट्रेकर्स होतो असे सांगताना रामचंद्ररावही गोंधळल्याचे जाणवत होते. तसे कारणही होते. त्या चढाईवरची नेहमीची दरड कोसळल्याने ही चढण धोकादायक बनली होती. त्या दगडांना हलका हात लागला तरी वरून माती आणि दगडगोटे घरंगळत खाली येऊन थेट दरीत कोसळत होते. आता आली का पंचाईत. (हीच दुसरी पायरी होती) </font><br/></font><font  style='font-size:11pt; color:#400080'>हार मानणार तो कोकणी माणूस कसला? रामचंद्रराव यांनी कमरेला गुंडाळलेला आणि मानेचा टॉवेल काढला. आमच्याकडून टॉवेल मागून घेतले आणि एकाला एक गाठी मारत त्यांनी 'दोर' बनविला. 'काय व्हायने नाय हो.. ' असे म्हणत दिलासा देत ते दोर घेऊन दगडांचा आधार घेत भराभर वरती चढले. खाली दगड पडत असल्याने 'सांभाळा.. सांभाळा.. ' अशा सूचना ते सातत्याने देत होते. मध्येच थांबून घाम पुसत त्यांनी उसासा घेतला आणि बघताबघता टोक गाठले. एकावर एक करत आमचे 'शूर' सवंगडी सरसावले खरे पण, त्याठिकाणी केवळ पाय टेकण्याइतकीच जागा होती. येथून डाव्याबाजूस दरी सुरू होत होती. मी आणि सुरज्याने एकमेकांना धीर देत कसेबसे चढण पार केले पण, वर जाताच समोर दरी पाहून डोळेच फिरले. खोल दरी आपली पाठ सोडणार नाही याची मनाशी खूणगाठ बांधल्याने भीती काहीशी मोडली होती. एक फुटाच्या पायवाटेवरून चालत असताना डाव्या बाजूस न बघता आम्ही पुढे सरकत होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>आमच्या ग्रुपमध्ये फूट पडली होती. पुढे गेलेले काहीजण एका भल्यामोठ्या दगडावरून कशाचाही आधार न घेता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. दोन्ही बाजूस दरी होतीच शिवाय तापते ऊन आणि जोराच्या वा-यामुळे समस्या वाढत होत्या. अधून-मधून पायवाटच ढासळल्याने तीन ते चार फुटांवर उडी घेण्याचे धाडस करावे लागत होते. विश्रांती घेण्याची इच्छा असली तरी थांबायला जागाच नव्हती. सुमारे अडीजतास चालल्यानंतर भगवा झेंडा दिसू लागला. गडावर पोहोचल्याच्या जाणीवेने थोडा दिलासा मिळणार तोवर नवे संकट उभे राहिले. गडावर पोहोचण्यासाठी एका डोंगरावरून गडावर एका लोखंडी शिडीवरून जावे लागणार होते. पण, ही केवळ नावाची शिडी होती. एक लोखंडी पाइप दोन्हीकडून मातीत खुपसण्यात आली आहे. आणि कोणताही आधार नसणा-या पाय-यांवर पाऊल टाकताच या पाया-या स्वतः:भोवतीच फिरायच्या. (आता गडावर वेल्डींग कोठून येणार) आता मात्र, खरंच धाडस करायचे होते. आपली काय गय नाही आणि येथून आपण परत जिवंत परत जाऊ शकत नाही, असे वाटू लागले. खालच्या दरीकडे लक्ष न देता आम्ही गडावर कसे पोहोचलो ते देवच जाणे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>वरती गेल्यावर फिरण्या आणि बघण्यासारखे बरेच काही होते मात्र, आता कुणाच्याही अंगात जीव नव्हता. पाण्यासाठी आम्ही विहिरीकडे धावलो तेथील गोड पाण्याने भागलेली तृष्णा आजही समाधान पावते. पण, एकवेळा तेथे मोठे काळे अजगर पाहिले आणि पुन्हा तथे जाण्याची कोणाचीही छाती झाली नाही. गडावर भग्नावस्थेत असलेल्या देवीच्या मंदिराचे आम्ही दर्शन घेतले. काट्याकुट्या गोळा करून स्टोव्हवर खिचडी शिजवली आणि रात्रीचे 'जेवण' करून आम्ही झोपी गेलो.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>दुस-या दिवशी सकाळी गारठ्याने हुडहुडी भरली आणि आम्ही जागे झालो. अंग कण्हत होते. प्रत्येकाच्या मनात गड पाहण्याच्या कुतूहलापेक्षा 'आता खाली उतरायचे' या जाणीवेनेचे भीती संचारली होती. येथून घेऊन जाण्यासाठी एखादे विमान आले तर किती बरे होईल अशा पोरकट कल्पना मनात घोळू लागल्या. मला तर खाली उतरण्यापेक्षा खाली उडीच टाकावी असे वाटायचे. बोलाचालीत सगळ्यांनीच आपली भीती व्यक्त करीत आलेल्या मार्गावरून उतण्यास नकार दिला. रामचंद्ररावांकडे दुस-या मार्गाबाबत विचारले तर ते म्हणाले जाता येईल पण, दोन-तीन दिवस जंगलातून जावे लागेल. आम्ही लगेचच तयारी दाखवली आणि परतीचा प्रवास सुरू झाला. त्या शिडीवरून खाली उतरायचे 'जीवा'वर आले होते. कसेबसे आम्ही खाली आलो आणि डाव्या हाताच्या पायवाटेने जंगलात घुसलो. दाट झाडीतून डोंगर चढायचे आणि उतरायचे. असे करत करत आम्ही घनदाट जंगलात दाखल झालो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>असे टिपीकल जंगल मी कधीच पाहिले नव्हते. जागोजागी जनावरांच्या विष्ठेचा वास येत होता. एके ठिकाणी तर पालापाचोळ्यात पाय गेल्यावर आम्ही कमरेइतक्या खड्यात गेलो. त्यातून हिरवे साप बाहेर पडू लागले. मोठमोठ्याने किंचाळत बाहेर पडतो तोच माकडांची टोळी कोठून दाखल झाली कुणास ठाऊक. या टोळीने आमच्यावर हल्ला चढविला. या रानटी माकडांकडूनही धोका असल्याचे लक्षात येताच आम्ही पळ काढला. दुपारचे दोन वाजले असतील पाणी संपत होते आणि आम्ही कमालीचे थकलो होतो. पाण्याचा कोठेच ठावठिकाणा नव्हता. एकाच बाटलीत पाणी शिल्लक होते आणि त्याचा ताबा मोन्याने घेतला. जो जास्त बॅगा वागवेल त्याला एक टोपण पाणी देण्याचा निर्णय त्याने घेतला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>पायात चालण्याचा त्राण नसताना पाण्यासाठी ओझे घ्यावे लागत. अचानक आम्हाला पाण्याचे एक डबके दिसले आणि खांद्यावरील बॅगा झटकून सर्वचजण त्या पाण्याकडे धावलो. खरेतर ते डबकेही आटले होते आणि उरल्या पाण्यामध्ये जनावरांची विष्ठा तरंगत होती. मात्र, आम्हाला केवळ पाणी दिसत होते. विष्ठा दूर करून आम्ही त्या पाण्यावर ताव मारला. (खरंतर यावेळी आम्हाला पाण्याची किंमत कळली) जाताना करवंदाच्या जाळ्यातील करवंदे, जांभूळ आणि कच्च्या कै-यांवर आम्ही ताव मारत होतो. सायंकाळी आम्ही निवळी या जंगलात मधोमध वसलेल्या गावात (लोकवस्तीत) पोहोचलो पण, येथे गेल्यावरच जे चित्र पाहिले त्यामुळे भीतीने परिसीमाच गाठली. काही वेळापूर्वीच त्याठिकाणी वाघाने हल्ला केला होता. गायीच्या बछड्याला ओढत जंगलात नेल्याच्या खुणा ताज्या होत्या. या झटापटीत वाघाने एका व्यक्तीवरही हल्ला केला होता. विशेष म्हणजे ज्या मार्गावरून त्याने बछड्याला फरफटत नेले होते त्याच मार्गावरून दुस-या दिवशी आम्हाला जायचे होते. रात्रभर गायीचा हंबरडा ऐकून आम्हालाही झोप आली नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>सकाळी उठल्यावर तेथील व्यक्तीने आम्हीला ताजी माडी आणून दिली. माडी म्हणजे काय हे माहीत नव्हते आणि भुकेने जीव व्याकुळ झाल्याने आम्ही तांब्यावर माडी प्यायलो. त्यानंतर मात्र, माडीच्या धुंदीत आमची पावले झपाझप पडू लागली. थोडे पुढे गेल्यावर झरा दिसला. मनसोक्त डुंबून झाल्यावर गरमागरम खिचडी खाल्ली आणि पुढील प्रवास सुरू झाला. मात्र, हा आनंद काही काळच होता. रामचंद्रराव यांना पुढील रस्ता माहीत नसल्याने त्यांनी निवळीतून 'वाटाडे' सोबतीला घेतले. तीन-चार तास चालल्यानंतर सायंकाळ झाला आणि आम्ही रस्ता भरकटल्याचे लक्षात आले. वाटाडे जोडप्यांनाही काही सुचेना. याचवेळी गवा रेड्यांचा मोठा कळप आमच्याकडेच येत असल्याचे आम्हाला दिसले. गव्यांचे लीद आणि चिखलात रुतलेल्या त्यांच्या पायांचे ठसे </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>पाहूनच त्यांच्या भव्यतेचा अंदाज येत होता मात्र, तेच गवे कळपाने आमच्यासमोर दिसत होते. येथील गवे पिसाळले आहेत आणि ते माणसांवर हल्ले करतात असे म्हणत वाटाड्यांनी पळ काढला' माझ्या दृष्टीने सर्व काही संपले होते. भीतीने थरकाप उडला होता. रामचंद्रराव यांनी प्रसंगावधान दाखवत आम्हाला नजीकच्या टेकडीवर नेले. सूर्य मावळत होता. प्रत्येकाच्या चेह-यावर थकवा आणि भय स्पष्ट जाणवत होते. एका कोरड्या पडलेल्या नदीच्या काठाला आम्ही विसावलो होतो. गव्यांचे भय कमी झाले पण, तेवढ्यात झुडपांचा आवाज सुरू झाला आणि त्यातून गव्याचे शिंग बाहेर आले. मुली किंचाळल्या. कोल्हापूच्या संज्याने मेलेल्या गव्याच्या सडलेल्या कंकालातून शिंग तोडून आणले होते. याचठिकाणी रात्र काढण्याचा निर्णय झाला आणि खाणेपिणे झाले आणि चारीबाजूंनी आग लावून आम्ही गप्पा मारत बसलो. रात्री प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>दुस-या दिवशी आग विझली होती आणि सर्वजण गाढ झोपेत होतो. नकळत आम्ही धाडस केले होते. खांद्याला बॅगा लादून पुन्हा चालणे सुरू झाले. डोंगरावरून नागमोडी वाटांमधून न जाता शॉर्टकट म्हणून ज्या दिशेला जायचे तेथे घसरगुंडी करत जाणे सुरू केले. आमच्याकडचे खाण्याचे साहित्यही संपत आले होते. पण, हळूहळू दाट झाडी विरळ होत चालली आणि कौलारू घरे नजरेस पडू लागली. तरीही अजून खूप पायपीट करायची होती. दाट जंगलानून वरती टेकाडावर आल्यावर ज्वालामुखीचे दगडातून चालायला लागायचे. नजर जाईल तेथपर्यंत हे दगड दिसायचे त्यामुळे भरकटण्याची भीती असायची. तीन चार तास चालल्यानंतर एका उतारावरून घसरतच खाली उतरलो आणि थेट शृंगारपूरात दाखल झालो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>ट्रेकिंग म्हणून आमची हौस भागलीच पण, या तीन दिवसांनी आम्हाला जगणं शिकवलं. पाण्याचे महत्त्व कळले आणि मुख्य म्हणजे एकीचे महत्त्वंही कळले. शृंगारपूरला अलविदा म्हणताना वर नजर फिरवत 'प्रचितगड' डोळ्यात साठवून घेतला, पुन्हा इकडे न फिरकण्याची शपथ घेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Oct 2008 16:02:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लिव इन रिलेशनशिपची गरज आहे?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/लिव-इन-रिलेशनशिपची-गरज-आहे-108102500003_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/लिव-इन-रिलेशनशिपची-गरज-आहे-108102500003_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लिव इन रिलेशनशिपला महाराष्ट्र सरकारने मंजूरी दिली आहे. याचा अर्थ कायद्याने विवाह न करता एकत्र रहाणारे स्त्री- पुरूष यांच्यातील नातेसंबंध आता कायदेशीर होतील. राज्य सरकारचा हा निर्णय महाराष्‍ट्राच्या पुरोगामी विचारसरणीतूनच आला आहे.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->विवाह म्हणजे दोन कुटुंब, समाज आणि दोन संस्कृतीचे मीलन मानले जाते. नेमका हाच फरक लिव इन रिलेशनशिपमध्ये आहे. यामध्ये आपल्यावर जबाबदारी असते. लिव इन रिलेशनशिपमध्ये ती नसते. कारण, पटलं तर एकत्र राहा नाहीतर विभक्त व्हा असा हा मामला आहे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>लिव इन रिलेशनशिपला महाराष्ट्र सरकारने मंजूरी दिली आहे. याचा अर्थ कायद्याने विवाह न करता एकत्र रहाणारे स्त्री- पुरूष यांच्यातील नातेसंबंध आता कायदेशीर होतील. राज्य सरकारचा हा निर्णय महाराष्‍ट्राच्या पुरोगामी विचारसरणीतूनच आला आहे. परंत</font><font style='font-size:11pt;'>ु, </font><font style='font-size:11pt;'>अशा प्रकारच्या संबंधामुळे निर्माण होणार्‍या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीकडून आलेल्या शिफारशीनंतर या कायद्याला अंतिम स्वरूप मिळणार आहे. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लिव इन रिलशनशिपमध्ये काही काळानंतर दुरावा निर्माण झाल्यास किंवा दोघांमध्ये मतभेद होऊन वेगळे राहण्याची वेळ आल्यास त्या महिलेला पोटगी देण्याची तरतूद देखील कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारच्या संबंधामुळे राज्याच्या सांस्कृति</font><font style='font-size:11pt;'>क, </font><font style='font-size:11pt;'>धार्मिक परंपरेवर काही परिणाम होईल क</font><font style='font-size:11pt;'>ा? </font><font style='font-size:11pt;'>याचाही राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>लिव इन रिलेशनशि</font><font style='font-size:11pt;'>प' </font><font style='font-size:11pt;'>योग्य की अयोग्य हे ठरवताना सुरवातीला समाजाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण आपल्याकडे समाज हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणतीही गोष्ट करताना आपण पहिल्यांदा लोकांचा विचार करत असतो. समा</font><font style='font-size:11pt;'>ज, </font><font style='font-size:11pt;'>लोक काय म्हणती</font><font style='font-size:11pt;'>ल? </font><font style='font-size:11pt;'>असा प्रश्न नेहमी असतो. जर समाजाने अशा प्रकारच्या संबंधाला मान्यता दिली तर 'लिव इन रिलेशनशि</font><font style='font-size:11pt;'>प' </font><font style='font-size:11pt;'>ठेवण्यास काहीही हरकत नाही. पण  लिव इन रिलेशनशिप ही काळाची गरज आहे, असे मला वाटत नाही. आपल्या सोयीसाठी त्याचा उपयोग होऊ शकत</font><font style='font-size:11pt;'>ो, </font><font style='font-size:11pt;'>हे तितकेच खरे! </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका स्त्रीशी लग्न झाले असताना दुसरीबरोबर संबंध ठेवण</font><font style='font-size:11pt;'>े, </font><font style='font-size:11pt;'>हे एक प्रकारे लिव इन रिलेशनशिपच आहे. जर आपण नैतिकतेचा विचार केला तर समाजाने अशा संबंधाला कधीच मान्यता दिलेली नाही. कार</font><font style='font-size:11pt;'>ण, </font><font style='font-size:11pt;'>आपल्याकडे दोन बायका करण्यावर कायद्याने बंदी आहे. दुसर्‍या स्त्रीला पत्नीचा दर्जा दिला जाणार असल्याने आधीच्या कायद्याचा हा भंग आहे. या संबंधाला कायदेशीर मान्यता मिळाल्यास लग्न न करता एकत्र राहणार्‍यांनाही कायदेशीर मान्यता मिळू शकेल. मात्</font><font style='font-size:11pt;'>र, </font><font style='font-size:11pt;'>त्याला समाजाचीही मान्यता लागेल. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे तो आपले कुटूं</font><font style='font-size:11pt;'>ब, </font><font style='font-size:11pt;'>नातेवाईक आणि मित्रमंडळींचा नेहमी विचार करत असतो. म्हणून लिव इन रिलेशनशिपला त्यांची मान्यता मिळवावी लागेल. जर त्यांनीच विरोध केला तर त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या संबंधातून नंतर आपल्याला मुले झाली तर त्यांचे का</font><font style='font-size:11pt;'>य? </font><font style='font-size:11pt;'>हा एक मोठा प्रश्न आहे. त्या महिलेला संपत्तीत वाटा मिळणार की नाह</font><font style='font-size:11pt;'>ी? </font><font style='font-size:11pt;'>अशा प्रकारे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. या सर्वांचा विचार करूनच लिव इन रिलेशनशिपला मान्यता देण्यात यावी असे वाट‍ते. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विवाह म्हणजे दोन कुटुं</font><font style='font-size:11pt;'>ब, </font><font style='font-size:11pt;'>समाज आणि दोन संस्कृतीचे मीलन मानले जाते. नेमका हाच फरक लिव इन रिलेशनशिपमध्ये आहे. यामध्ये आपल्यावर जबाबदारी असते. लिव इन रिलेशनशिपमध्ये ती नसते. कार</font><font style='font-size:11pt;'>ण, </font><font style='font-size:11pt;'>पटलं तर एकत्र राहा नाहीतर विभक्त व्हा असा हा मामला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सर्व काही असले तरी लिव इन रिलेशनशिपमुळे संस्कृतीला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाह</font><font style='font-size:11pt;'>ी, </font><font style='font-size:11pt;'>असेही वाटते. कार</font><font style='font-size:11pt;'>ण, </font><font style='font-size:11pt;'>आपल्या संस्कारातून संस्कृती घडत असते. आपल्याकडे विविध पद्धतीने विवाह केला जातो. त्यामुळे आपोआपच एका संस्कृतीवर दुसर्‍या संस्कृतीचा प्रभाव पडत असतो. म्हणून लिव इन रिलेशनशिप अशाच प्रकारचे नाते आहे. ते आपल्या स्वीकारायचे की नाही हे प्रत्येकाने किंवा समाजाने ठरवायचे आहे. कार</font><font style='font-size:11pt;'>ण, </font><font style='font-size:11pt;'>भारतीय लोकशाहीत नागरिकाला तसे स्वांतत्र्य दिले  आहे.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Oct 2008 11:35:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>नई दुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिद्धूचा 'लाफ्टर पंच']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/सिद्धूचा-लाफ्टर-पंच-108102400048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/सिद्धूचा-लाफ्टर-पंच-108102400048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवज्योतचं तसं नाही. एखादा विनोद  कितीही फालतू हसू दे, कितीही वेळा इतरांनी ऐकलेला असू दे, त्याला हसू येणार नाही असं होणारच नाही. बरं ते हसणंही  गालातल्या गालात नाही. अगदी सातमजली. खदाखदा.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0810/24/images/img1081024048_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>नवज्योतसिंग सिद्धू हा माणूस क्रिकेट सोडून दोनच गोष्टी करू शकतो. एक तर प्रचंड बडबड आणि दुसरं हसणं. बाकी तो  खासदार आहे. पण ही खासदारकी त्याला मिळालीय ती त्याच्या या दोन गुणांमुळेच. त्याला आयुष्यात या दोन गोष्टींव्यतिरिक्त  तिसरं काही जमेल असं वाटत नाही. पण आता मी सांगणार आहे ते त्याच्या हसण्याविषयी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता बघा. हसण्याच्या प्रत्येकाच्या काही 'लेव्हल्स' असतात. 'फुसकुली' ते 'खळखळाट' या दोन टोकात या लेव्हल्स असतात. विनोदात किती ताकद आहे त्याच्यानुसार फुसकुलीपासून खळखळाटापर्यंत हे हास्य जाऊ शकतं. जोक अगदी फालतू असला तर अजिबात हसू येत नाही. थोडा बरा असला की एखादी रेष हलते. पण नवज्योतचं तसं नाही. एखादा विनोद  कितीही फालतू हसू दे, कितीही वेळा इतरांनी ऐकलेला असू दे, त्याला हसू येणार नाही असं होणारच नाही. बरं ते हसणंही  गालातल्या गालात नाही. अगदी सातमजली. खदाखदा. त्यामुळे कुणीही नाही तरी तो हसण्याची शंभर टक्के ग्यारंटी असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>स्टार वन'वर कोणे एकेकाळी 'लाफ्टर चॅलेंज' हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता. (हा कार्यक्रम आताही आहे. पण त्यात आता  काही राम नाही.) हा कार्यक्रम दोनच गोष्टींनी खूप गाजला. एक तीवर येणारी कमनीय एंकर ( काय राव कशाला आठवण  करता.) आणि दुसरा नवज्योत सिद्धूचं हसणं. कुठल्याही विनोदाला हा भाऊ खदाखदा हसायचा. अगदी चावून चोथा झालेल्या  विनोदावरही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सिद्धूच्या या खळखळाटी हास्याचं गमक काय आहे माहितेय? सिद्धू म्हणे अतिशय निरागस, निष्पाप, बापडा वगैरे आहे.  पतियाळातल्या समृद्ध घरात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन तो जन्माला आला. पण त्याला दुनियादारी माहित नाही. छक्के पंजे  माहित नाहीत. त्यामुळे आयुष्यात कायम तो 'सीधासाधा'च राहिला. ज्या काळात कट्ट्यावर जाऊन मित्रांसोबत 'गजाली'  करण्याचं वय होतं, त्या काळात हा भाऊ साधू-संताची प्रवचनं ऐकायला जात होता. (कॉमेंट्री करताना सिद्धू जे 'तारे'तोडतो त्याचे  मूळ हेच.) त्यामुळे ह्याची त्याची उडवत 'व्हेज', 'नॉनव्हेज' जोक ऐकण्याचा, ऐकवण्याचा अनुभव त्यानं कधी घेतलाच नाही.  म्हणूनच पाचवीत जे विनोद आपण ऐकतो आणि सातवी-आठवीपर्यंत तेच विनोद अनेकदा ऐकून त्यावर हसून हसून गडाबडा  लोळतो ते विनोद सिद्धूने कधी ऐकलेच नाहीत. आणि याचा फायदा कुणी उचलला माहितेय? 'लाफ्टर चॅलेंज'च्या आयोजकांनी  आणि स्पर्धकांनी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->आयोजकांना असा माणूस परीक्षक म्हणून हवा होता जो स्वतः तरी हसेल किंवा त्याला पाहून बाकीचे तरी हसतील. त्यांच्या  दृष्टिने सिद्धू अगदी फिट होता. त्याचवेळी अगदी फालतूतला फालतू विनोद जरी ऐकवला तरी सिद्धू पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखा हसायचा.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आयोजकांना असा माणूस परीक्षक म्हणून हवा होता जो स्वतः तरी हसेल किंवा त्याला पाहून बाकीचे तरी हसतील. त्यांच्या  दृष्टिने सिद्धू अगदी फिट होता. त्याचवेळी अगदी फालतूतला फालतू विनोद जरी ऐकवला तरी सिद्धू पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखा हसायचा. त्यामुळे जोक हसण्याविना 'वायबार' गेला असे कधी घडत नसे. प्रेक्षक जरी हसले नाहीत तरी  'लाफ्टरचा' सामूहिक आवाज आणि त्यात सिद्धूचं गडगडाटी 'हास्य' हे दोन हशे शंभर टक्के ग्यारंटीसह येतात. काही वेळा तर  म्हणे विनोद इतके फालतू असतात की ते तयार असलेलं 'लाफ्टर' वाजविण्याचं काम असलेला माणूसही ते विसरून जायचा. पण  सिद्धू मात्र इमाने इतबारे हसायचा.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता सिद्धूच्या नावावर एकाच्या खूनाचा गु्न्हा वगैरे आहे हे खरं. तसं सिद्धूचं टाळकं कधी सटकेल काही सांगता येत नाही.  एकदा तर तो मनोज प्रभाकरलाही मारायला उठला होता. पण तो वाचला बिचारा. पण हे अपवाद. कधी कधी 'सटकणारा' असला  तरी सिद्धू निरागस आहे हे खरं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>लाफ्टर चॅलेंज'मध्ये शेखर सुमनलाही ज्या विनोदाला हसू येत नव्हतं, तिथं सिद्धू हसून हसून गडबडा लोळाण्याचे तेवढा रहायचा. आता शेखर सुमन लाफ्टर चॅलेंजच्या विनोदांना कंटाळला की सिद्धूला माहित नाही, पण त्याने हा शो सोडला. त्याची जागा घेतली ती शत्रूघ्न सिन्हाने. आता शत्रूची बातच निराळी. या भाऊला हसणंच ठाऊक नाही. चित्रपटातही त्याने कधी कॉमेडी रोल केला नाही. थोडक्यात मारामारीशिवाय दुसरं काहीही त्याला काहीही ठावकी नाही. आता हा बाबा सिद्धूशेजारी बसला की चित्र फार  गमतीदार असतं. समोर फालतू विनोद सांगितला गेलेला असतो आणि शत्रूभय्यांच्या चेहर्‍यावरची रेषही हलत नसते. शेजारी सिद्धू  मात्र त्या विनोदाने खुर्चीतून पडायचा तेवढा बाकी असतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थोडक्यात काय 'लाफ्टर चॅलेंज'ला सध्या जे काही प्रेक्षक मिळताहेत ते त्यातल्या विनोदांसाठी नाही तर सिद्धूला पहायला आणि  हसणं एंजॉय करायला. कारण सिद्धू हसला तरी समोरच्या माणसाचं टेन्शन जातं. भलेही विनोद कितीक फालतू का असेना.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>म्हणूनच म्हणतो सिद्धूपाजी जुग जुग जियो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Oct 2008 19:47:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>नई दुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[स्त्रीशक्ती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/स्त्रीशक्ती-108102400042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/स्त्रीशक्ती-108102400042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अनादी काळापासून माया आणि ब्रह्म यांच्यात मायेची जागा ही काहीशी महत्त्वाची मानली गेलेली आहे. शिव व शक्ती यातही शिवाने शक्तीला बरोबरीचे रूप देऊन तो स्वत: अर्धनारीनटेश्वर बनला. माणसाच्या विकसित अवस्थेपूर्वीही स्त्रिया ह्या त्याच्या बरोबरीने काम करत...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->ज्या घरात बाईच्या आरोग्याची, तिच्या मनाचीही काळजी घेतली जाते त्या घराचा उत्कर्षच होताना दिसतो कारण शारीरिक मानसिक आरोग्य व्यवस्थित असणारी स्त्री अधिक कार्यक्षमतेने घराचे व्यवस्थापन करू शकते आणि पर्यायाने चांगला समाज घडवायला मदत करते.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>अनादी काळापासून माया आणि ब्रह्म यांच्यात मायेची जागा ही काहीशी महत्त्वाची मानली गेलेली आहे. शिव व शक्ती यातही शिवाने शक्तीला बरोबरीचे रूप देऊन तो स्वत: अर्धनारीनटेश्वर बनला. माणसाच्या विकसित अवस्थेपूर्वीही स्त्रिया ह्या त्याच्या बरोबरीने काम करत. पूर्वी मातृसत्ताकपद्धती असल्याचाही दाखला मिळतो. हळूहळू माणूस शेती करू लागला तेव्हाही शेतात त्याच्या बरोबरीने स्त्री काम करत होती. मुळात सृजनशील असणार्‍या स्त्रीने आदिमकाळात भित्तिचित्राचे रेखाटण केलेले आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणी सर्वात प्राचीन रेखाचित्रे पाहाव्यास मिळतात ती स्त्रियांनीच रेखाटली असावीत असाही संशोधकांचा दावा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुलाच्या जडणघडणीत तर तिचा मोलाचा वाटा आहे. मुलाच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक, वाचिक विकास करण्यात आईची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. ती केवळ घरापुरतीच स्वामिनी नाही तर जिजाऊ सारखी एका हिर्‍याला पैलू पाहणारी 'जोहरी' आहे. अहिल्याबाईंसारखी धर्माधिष्ठित राजकारण चालवणारी कुशल राज्ञी आहे. राणी लक्ष्मीबाईसारखी झुंजार तर आहेत पण पोटच्या मुलासाठी हिरकणी चढणारी धाडसी आईही आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आईला कितीही त्रास होत असला तरी आपल्या मुलाबाळांसाठी ती उठून त्यांना रांधून वाढायचं काम करतेच. तिच्या आजारपण्यात गबाळं झालेलं घर तिचा एक हात फिरताच परत नीटनेटकं दिसू लागतं. ती स्वत:च्या आरोग्यापेक्षा घरधनी, वडिलधारे मूलबाळ यांचीच काळजी जास्त करत असते.मुळातच पुन:निर्मितीची शक्ती निसर्गाने फक्त स्त्रीलाच दिली असल्यामुळे गर्भाचा नऊ महिने भार सोसण्याच, नव्या जीवाला नवीन जग दाखवण्यासाठी स्वत: त्रास घेण्याची जोखीम तीच उठवते. स्वत:पेक्षा बाळाचा विचार ती आधी करते या सर्वांत ती लवकर थकते हे निश्चित.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या घरात बाईच्या आरोग्याची, तिच्या मनाचीही काळजी घेतली जाते त्या घराचा उत्कर्षच होताना दिसतो कारण शारीरिक मानसिक आरोग्य व्यवस्थित असणारी स्त्री अधिक कार्यक्षमतेने घराचे व्यवस्थापन करू शकते आणि पर्यायाने चांगला समाज घडवायला मदत करते.राष्ट्र सेविका समितीची संस्कृत प्रार्थना फार सुंदर आहे ती ऐकताना माझ्या अंगावर रोमांच येतात अन मी एक स्त्री असल्याचा मला अतिशय गर्व वाटतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->ज्या घरात स्त्रीचे शोषण होते (मग ते कोणत्याही प्रकाराने असो), ते तर चुकीचेच आहे पण आपल्या स्त्री असण्याचा गैरफायदाही काही स्त्रिया घेताना दिसतात ते बघून वाईट वाटते व अशा मूठभर स्त्रियांमुळे पूर्ण स्त्री वर्गाविषयी चुकीचा ग्रह तयार होऊ शकतो.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आपला भाऊ, भ्रतार (नवरा), मुलगा या पुरुषांना घडवण्याचे काम करते ती स्त्रीच. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे सक्षमपणे उभी असते ती स्त्री, या सर्व रूपात असणारी स्त्री एका स्त्रीच्या विरोधात जेव्हा उभी राहते तेव्हा मात्र या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही की एक स्त्रीच मग ती सासू, जाऊ, नणंद शेजारी या रूपात एकमेकींना त्रासदायक कशी होऊ शकते? मुलाला घडवणारी स्त्री पुत्रप्राप्तीसाठी नवसायास का करते किंवा एखादीला मुलगा झाल्यावरच कृतकृत्य झाल्यासारखे का वाटते? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उलट या बाबतीत मला असे वाटते की जर देवाने तुझ्या पदरात मुलीचे दान टाकले आहे तर तू इतर स्त्रियांपेक्षा जास्त योग्य असली पाहिजेस कारण मुलाला घडवून तो तुझ्याच घराचे नाव मोठे करणार पण मुलगी मात्र दुसर्‍या घराचा कारभार ही समर्थपणे चालवणार आहे, तेव्हा योग्य व्यक्ती (स्त्री) घडवण्याची किती मोठी जबाबदारी देवाने तुझ्यावर टाकली आहे. तुला देवाने मुलगी दिली कारण तूच तिला योग्य माणूस बनवू शकतेस याचा विश्वास देवाला आहे. तो तू सार्थ ठरवशीलच. देवाने या चांगल्या कामासाठी तुला निवडले आहे तेव्हा तूच उलट जास्त लायक आहेस स्त्री म्हणून जगायला. याचा अर्थ मुलगा असणारीला मी कमी लेखत नाही पण मुलगी असणारीवर विशेष जबाबदारी आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या घरात स्त्रीचे शोषण होते (मग ते कोणत्याही प्रकाराने असो), ते तर चुकीचेच आहे पण आपल्या स्त्री असण्याचा गैरफायदाही काही स्त्रिया घेताना दिसतात ते बघून वाईट वाटते व अशा मूठभर स्त्रियांमुळे पूर्ण स्त्री वर्गाविषयी चुकीचा ग्रह तयार होऊ शकतो. त्यामुळे नवर्‍याला मुठीत ठेवणे, त्याला आपल्या तालावर नाचवणे, त्याला त्याच्या घरच्यांपासून तोडणे हे चुकीचे आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याच्या पैशावर मजा करताना त्याला फक्त पैशाचे मशीन न समजता तुमचा एक मित्र म्हणून त्याच्याकडे बघाल तर तुमचा संसार फार सुखाचा होईल. दोघांमध्ये तुझं-माझं काय आलं. उलट एकदाच मिळणारा माणसाचा देह आहे तेवढं आयुष्य एकमेकांच्या साहाय्याने प्रेमाने सहवासाने सुंदर जगा योग्य प्रकारे समाजाभिमुख जगा. आपल्याला मिळालेल्या संधीचा संपत्तीचा योग्य उपभोग घेतानाचा वाचितानाही त्यापासून लाभ मिळू द्या. वडीलधाऱ्यांच्या आदराबरोबरच आपुलकीचे शब्द द्या. कर्तव्याला प्रेमाची झालर द्या. गरजूला मदत करा, भुकेल्याला अन्न द्या. समाजकार्य करताना प्रसिद्धीपेक्षा मदत योग्य ठिकाणी, योग्य वेळी कारण महत्त्वच हे लक्षात घ्या आणि बघा तुमचं स्त्रीत्व अजून उजळेल ठळक होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>योग्य मार्ग अवलंबा, वाईटाचा प्रतिकार करा, खर्‍याच्या मागे ठामपणे उभे राहा तुमचं हेच व्यक्तित्व पाहून मुलं घडतील त्यांचे मित्र मैत्रिणी, समाज विकसित होईल. आत्मोन्नतीबरोबरच तुमची चित्तशुद्धी होईल अन आजार, आळस तुमच्या जवळही फिरकणार नाहीत. तुम्ही अशाच राहा चिरतरुण आयुष्यभर! याच शुभेच्छा तुम्हा प्रत्येकासाठी अन प्रत्येकासाठी ह्या दिवाळीत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Oct 2008 17:46:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>सौ. भाग्यश्री कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दिवाळीच्या दिवशी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/दिवाळीच्या-दिवशी-108102400041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/दिवाळीच्या-दिवशी-108102400041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दिवाळीच्या दिवशी
दरापुढे सडा
ताईच्या रांगोळीने येणार्‍याची तर्‍हा
एक पाय लांबवर दुसरा पायरीवर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0810/24/images/img1081024041_1_1.jpg' Alt='ragoli' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#800040'><b>दिवाळीच्या दिवशी</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'><b>दरापुढे सडा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'><b>ताईच्या रांगोळीने येणार्‍याची तर्‍हा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'><b>एक पाय लांबवर दुसरा पायरीव</font><font style=' color:#000000;'>र</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ताईची, तिच्या मैत्रिणीची मदार रांगोळीवर </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>छोटे छोटे ठिपके, छोटे छोटे बिंदू</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कधि रेघांनी जुळतात, ताईच्या मनांत </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रेंगाळतात-गालीच्याचा आकार</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रांगोळी साकार कुठे त्रिकोण</font><font style='font-size:12pt;'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#800040'><b>कुठे चोकोन, कुठे सरळ तर कुठे </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'><b>वाकलेली-सगळे रांगांनी सजलेले</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'><b>जादुचा गालीचा लागला हसायला</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'><b>अन् ताईला काहीतरी पुसू लागला.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Oct 2008 17:40:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[फराळाची पंगत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/फराळाची-पंगत-108102400040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/फराळाची-पंगत-108102400040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दिवाळीच्या दिवशी झाली गंमत
ताटात बसली फराळाची पंगत।
करंजी म्हणते फुगले पोट
शंकरपाळ्यांनी दुमडले ओठ।]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0810/24/images/img1081024040_1_1.jpg' Alt='karanji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>दिवाळीच्या दिवशी झाली गंमत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>ताटात बसली फराळाची पंगत</font><font style=' color:#000000;'>।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>करंजी म्हणते फुगले पोट</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शंकरपाळ्यांनी दुमडले ओठ।</font><font style=' color:#8000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>पिऊन पिऊन तूप झाली गालफुगी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>चिरोटेवर बसले पटदिशी उगी।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>चकली ताईंना आला सरसरून काटा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>हंसून म्हणतो अनारसा पेढे वाटा</font><font style=' color:#000000;'>।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तक्ररी आणि गार्‍हाणी ऐकून ऐकून</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कडबोळे म्हणतो कान गेले विटून।</font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>गोल ढेरी सावरत लाडूराव आले</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>पाहुणे म्हणतात खाऊन खाऊन पोट फुगले।</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Oct 2008 17:35:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मंदीतही भारत मजबूत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/मंदीतही-भारत-मजबूत-108102400036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/मंदीतही-भारत-मजबूत-108102400036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारताने आर्थिक बाबतीत कधीची पराभव स्वीकारलेला नाही. १९२९ ची मंदी हे आजपर्यंतचे सर्वांत  मोठे आर्थिक संकट मानले गेले आहे. पण त्यावेळीही भारताला त्याचा फारसा फटका बसलेला नव्हता......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000040'><b><i>अमेरिकेत एका कुटुंबाकडे सरासरी तेरा क्रेडिट कार्ड आहेत आणि चाळीस  टक्के लोकांवर कर्ज आहे. अमेरिकेत १९७४ मध्ये कुटुंबावर असलेले एकूण कर्ज ६८ हजार कोटी डॉलर्स होते. ते आता १४ लाख  कोटीं डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. रूपयांमध्ये हा आकडा काढायचा असेल तर त्या रकमेला पन्नासने गुणा. </font><font style=' color:#000000;'></b></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत अतिशय अनोखा देश आहे. आज नाही अगदी अनादीकाळापासून. २००८ च्या फार पूर्वी आपल्या देशात पूर्ण जगाच्या एक  तृतीअंश उत्पादन होत होते. एक काळ होता जेव्हा भारत निर्यातदाराच्या भूमिकेतही होता. भारतीय व्यापार्‍यांचा डंका तर  जगभरात गाजत होता. पण एक वेळ अशीही आली की परदेशी आक्रमक आणि देशातील कमजोर राजेशाही यांच्यामुळे देश  गरीबीच्या गर्तेत गेला. पण तरीही भारतीय व्यापार जगभरात होतच होता. भलेही त्याचे प्रमाण कमी झाले तरीही. मग इंग्रज  आले आणि त्यांनी भारतीय उद्योग धुळीला मिळविण्याचे येनकेन प्रयत्न केले. पण व्यापारी वर्गाने ब्रिटिशांनाही पाणी पाजले.  धुळीला मिळणे तर दूरच उलट ब्रिटिशांच्याच काळात अनेक भारतीय उद्योग घराण्यांचा पाया रचला गेला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यानंतर आलेल्या नव्या सरकारने खासगी उद्योगांना वेसण घालून सरकारी उद्योगांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न केले. तरीही  भारतीय उद्योग संपला नाही. उलट मजबूत होत गेला. १९९१ नंतर उद्योगांवरचे सरकारी नियंत्रण कमी झाले आणि त्यांचे दरवाजे  परदेशी उत्पादक आणि व्यापार्‍यांसाठी खुले झाले. असे असूनही भारतीय व्यापार्‍यांना त्याचा फटका बसला नाही. उलट तो  अधिकच शक्तीशाली झाला. यातूनच भारतीय व्यापारी आणि उद्योजकांची एक पिढी तयार झाली. या पिढीच्या आधी कुणीही या  क्षेत्रात नव्हता. आज याच नवउद्योगपतींनी जुन्या उद्योग घराण्यांना मागे टाकले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->भारताच्या एकूण उत्पादनापैकी ८५ टक्के उत्पादन देशातच  तयार होते. केवळ १५ टक्के उत्पादनासाठी आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. आपली अर्थव्यवस्थाही निर्यातीवर अवलंबून  नाही. त्यामुळे विदेशातून पैसा नाही आला तरी त्याचा प्रभाव भारतावर फारसा पडणार नाही.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सांगण्याचे कारण हेच की भारताने आर्थिक बाबतीत कधीची पराभव स्वीकारलेला नाही. १९२९ ची मंदी हे आजपर्यंतचे सर्वांत  मोठे आर्थिक संकट मानले गेले आहे. पण त्यावेळीही भारताला त्याचा फारसा फटका बसलेला नव्हता. अगदी कशाला, पंधरा  वर्षांपूर्वी आग्नेय आशियातील देश आर्थिक संकटात सापडलेले असताना आणि त्यांचे चलनही कोसळत असताना भारतावर त्याचा  काहीही परिणाम झालेला नव्हता. हा काही योगायोग नव्हता. भारत यातूनही तरण्याची काही कारणे आहेत. पण आपण अगदी  संक्षिप्तपणे माहिती घेऊ ती अमेरिकेतील आणि जगभरावर पसरलेल्या आर्थिक संकटाची. भारतावरही या संकटाची छाया पडू  लागली आहे. या सगळ्याला कारणीभूत आहे अमेरिकेचा स्वार्थ आणि तिची श्रीमंती थाटातली जीवनशैली. जोडीला जगभरावर  केलेली 'दादागिरी'. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या २५ वर्षांपासून अमेरिकेचे उत्पादन घटले आहे पण उपभोग मात्र वाढला आहे. मग ही तूट इतर देशांकडून त्यांची उत्पादने  घेऊन भरून काढली जात आहे. तेथील राजकीय नेतेही लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी उधळपट्टीला प्रोत्साहन देत आहेत.  म्हणूनच की काय अमेरिकेने 'प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतःचं घर' मिळायला हवं या अट्टाहासोपोटी घर घेऊन दिलं. त्याची कर्ज  फेडण्याची क्षमता नसतानाही त्याला कर्ज दिलं. त्याचवेळी अमेरिकेची उधळपट्टीची जीवनशैली आणि उत्पन्न यांचं 'बॅलन्सशीट'  कधीच 'टॅली' होत नव्हतं. तरीही हे सारं सुरूच होतं. मोठं घर, कार, आलीशान वस्तू यांची खरेदी सुरूच होती. क्रेडिट कार्ड तर  अमेरिकी आयुष्याचा महत्त्वाचा भाग होते. म्हणूनच अमेरिकेत एका कुटुंबाकडे सरासरी तेरा क्रेडिट कार्ड आहेत आणि चाळीस  टक्के लोकांवर कर्ज आहे. अमेरिकेत १९७४ मध्ये कुटुंबावर असलेले एकूण कर्ज ६८ हजार कोटी डॉलर्स होते. ते आता १४ लाख  कोटीं डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. रूपयांमध्ये हा आकडा काढायचा असेल तर त्या रकमेला पन्नासने गुणा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवाय अमेरिकेच्या डोक्यावरचे कर्जही वाढतच होते. याचेही मुख्य कारण अर्थातच इराक व अफगाणिस्तानविरूद्ध पुकारलेले  युद्ध होते. यामुळे झालेले कर्ज २००० मध्ये ५ लाख ७५ हजार कोटी डॉलर्स होते. ते आता १० लाख वीस हजार कोटी डॉलर्सवर  पोहोचले आहे. याचा अर्थ अमेरिकेने स्वतःची आर्थिक चौकट अशी बनवली होती की त्यासाठी बाकीचे देश पैशांचा पुरवठा करत  होते. हा सगळा बुडबुडा विद्यमान अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या काळात फुगायला सुरवात झाली होती आणि त्यांच्याच कारकिर्दीच्या  शेवटाला तो फुटला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->भारतात रिझर्व्ह बॅंकेचे वर्चस्व बरेच आहे. इतर देशांप्रमाणे भारतात सरसकट कर्जवाटप केले जात नाही. कारण त्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे नियम कडक आहेत. म्हणूनच गेल्या पन्नास वर्षांत भारताची कोणतीही राष्ट्रीयकृत बॅंक दिवाळखोर झालेली नाही.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>हे पाहिल्यानंतर या सगळ्याचा फटका भारताला बसला तर आपण तो सहन करू शकू का? कारण अगदी काही आठवड्यांपूर्वी  आपण एका अतिशय चांगल्या अशा वातावरणात होतो. अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतेमंडळी, उद्योगपती भारताचे भविष्य अतिशय सुंदर  आहे, अशी स्वप्ने रंगवत होते, लोकांना दाखवत होते. पण आपल्याच काही चुकांमुळे भारतही अमेरिकेच्या आर्थिक अरिष्टात  सापडला. या स्थितीत सामान्य लोक चिंतेत आहेत. सरकारही काळजीत आहे. पण तरीही अमेरिका आणि इतर विकसित  देशांसमोर जे संकट आहे त्या तुलनेत भारत तेवढा अडचणीत नाही. याचीही अनेक कारणे आहेत. एक तर  जागतिकीकरणानंतरही भारताचे एकूण घरगुती उत्पन्न जास्त आहे. भारताच्या एकूण उत्पादनापैकी ८५ टक्के उत्पादन देशातच  तयार होते. केवळ १५ टक्के उत्पादनासाठी आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. आपली अर्थव्यवस्थाही निर्यातीवर अवलंबून  नाही. त्यामुळे विदेशातून पैसा नाही आला तरी त्याचा प्रभाव भारतावर फारसा पडणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे भारतातील एक  छोटा वर्ग सोडला तर उर्वरित वर्ग कर्जावर अवलंबून नाही. क्रेडिट कार्ड असलेल्या कुटुंबांची संख्या कमी आहे. क्रेडिट कार्डावर  खरेदीसाठीचा व्याजदरही कमी आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा परिणाम या कुटुंबावर कमी होईल. कॉल सेंटर, बॅंकींग सेवा, विमा  कंपन्या, पर्यटन यात काम करणार्‍यांना या सगळ्याचा फटका बसू शकतो. तिसरे मुद्दा, म्हणजे भारतात रिझर्व्ह बॅंकेचे वर्चस्व  बरेच आहे. इतर देशांप्रमाणे भारतात सरसकट कर्जवाटप केले जात नाही. कारण त्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे नियम कडक आहेत.  म्हणूनच गेल्या पन्नास वर्षांत भारताची कोणतीही राष्ट्रीयकृत बॅंक दिवाळखोर झालेली नाही. एखादी बॅंक आर्थिकदृष्ट्या कमकुवत  झाली तरी तिचे विलीनीकरण दुसर्‍या सक्षम बॅंकेत केले गेले आहे. चौथा मुद्दा, भारतात दिवाळखोरी जाहीर करणे अमेरिकेएवढे  सोपे नाही. अनेक बड्या कंपन्या लोकांचे पैसे गट्टम करत असल्या तरी ते काही फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. पाचवा मुद्दा,  भारतात बचतीचे प्रमाण (चीन वगळता) जगात सर्वाधिक आहे. कारण भारतीय लोक महागड्या वस्तू आपल्या बचतीतून खरेदी  करतात. अमेरिकेत चाळीस टक्के कुटुंब उधार खरेदी करतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याचा अर्थ परिस्थिती गंभीर नाही, असा नाही. पण सरकार आणि अर्थव्यवस्थेवरचा विश्वासच उडून जावा अशीही स्थिती नाही.  सरकार व रिझर्व्ह बॅंक ज्या सक्रियपणे या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत, ते यापूर्वी कधीच घडले नव्हते. त्यामुळे या  संकटातून पार पडल्यानंतरही भारत आणखी मजबूत होईल. कारण इतिहास तेच सांगतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'>लेखक पायोनियर मीडीया स्कूलचे संचालक व फायनान्शियल एक्सप्रेसचे माजी संपादक आहेत.) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Oct 2008 16:58:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>नई दुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[साहित्यामागचं 'संमेलन']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/साहित्यामागचं-संमेलन-108102400034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/साहित्यामागचं-संमेलन-108102400034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[स्थळ- मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ... नेहमीप्रमाणेच विमानतळ गजबजलेलं. परंतु आज काही तरी खास वाटलं. काही कळेना काय भानगड आहे. कारण गर्दी अमाप. पण सिक्युरीटी नसल्याने माझा गोंधळच झाला. कारण हल्ली गर्दी म्हटलं म्हणजे नेतेमंडळी आसपास आहेत हे समजून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>स्थळ- मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ... नेहमीप्रमाणेच विमानतळ गजबजलेलं. परंतु आज काही तरी खास वाटलं. काही कळेना काय भानगड आहे. कारण गर्दी अमाप. पण सिक्युरीटी नसल्याने माझा गोंधळच झाला. कारण हल्ली गर्दी म्हटलं म्हणजे नेतेमंडळी आसपास आहेत हे समजून घ्यावं लागतं ना. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मलाही सुरवातीला तसंच वाटलं. काही मंत्री किंवा मग एखादा गेलाबाजार गल्ली नेता आला असेल. पण त्यांच्या स्वागताची तयारी किंवा त्यांच्या स्वागताचे फलक वगैरे काही दिसत नव्हते. मग वाटलं क्रिकेटपटू वगैरे आले असतील. पण तसंही काही वाटत नव्हतं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मग काय विचारता राव. डोक्यात या साऱ्या गोष्टींचे 'अपचन' झालं आणि शेवटी एका अधिकार्‍याच्या जवळ जाऊन उभा राहिलो. तसा तो एकदम म्हणाला, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तो- एस सर व्हॉट कॅन आय डू फॉर यू? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी- नथिंग, मला फक्त विचारायचंय, ही गर्दी कशाची? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तो- ओ.. ओ.. सर दीस इज फॉर गेट टू गेदर ऑफ मराठी लिटरेचर्स, पोयटस, नॉव्हेलिस्ट.. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तो हसला. मी ही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी म्हटलं तुमचं नाव? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओ हो आय एम 'अनिरूद्ध गाडगीळ' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सालं मराठी माणूस एअरपोर्टावर गेल्यावर मराठी माणसाशी आंग्ल भाषेत का बोलतो हा प्रश्न माझं डोकं कुरतडण्याच्या आत त्याच डोक्यात लख्ख वीज चमकली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>च्यायला ही तर साहित्य संमेलनाला जाणार्‍या सारस्वतांची गर्दी. हे साहित्य संमेलनाचं वर्‍हाड सन फ्रान्सिस्कोला निघालं होतं तर. मी सगळ्या साहित्यिकांवर नजर फिरवली. म्हटलं बघूया कुणी ओळखीचं दिसतंय का? पण शप्पथ. एक पण चेहरा ओळखीचा नव्हता. (याचा अर्थ साहित्यिक बिनचेहर्‍याचे असतात असं नव्हे.) बिचारे मराठी साहित्यिक ते. त्यांना कुठलं आंग्ल साहित्यिकांसारखं ग्लॅमर. कुठल्यातरी सर्कारी खात्यात खर्डेघाशी करायची आणि त्यातून वाचवलेल्या वेळेत साहित्यनिर्मिती करणार्‍या बापड्या गरीब मराठी साहित्यिकांना कुठे ग्लॅमर येणार. पण तरीही मी अमेरिकेला जाणार्‍या साहित्यिकांची यादी आठवून आठवून चेहरे शोधू लागलो. आमच्या 'सौ'चा दूरचा कुणी नातेवाईकही साहित्यिक आहे. ते दिसतात का म्हणून मी शोधू लागलो. पण शोधून कुणीही सापडलं नाही. यंदाच्या यादीत पत्रकार जास्त असल्याचे मला माझ्या मित्राने सांगितले होते, ते ओझरते आठवले. मग मी ठरवलं, पत्रकारांच्याच नजरेने पाहायचं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आणि आपणच ओळखायचं कोण काय आहे ते? म्हणजे कोण नेमका कोणता साहित्यिक ते? मी मस्त गरम कॉफी पीत हे सारं पाहत होतो. एक माणूस सफारी घातलेला दिसत होता. तो सारखा सारखा लोकांना मोजत होता. बरं मला काही समजतच नव्हतं? तो माणसं का मोजतो आहे? सुरुवातीला वाटलं तो एखादा ट्रॅव्हल एजंट असेल, परंतु तो जवळ आल्यानंतर सारे त्याला मान देत होते, हा नेमका कोण आहे, माझ्यातील पत्रकार पुन्हा जागा झाला.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण, काहीच उमगत नव्हतं. मग वाटलं, बरोबर तो या साऱ्यांचा सुरक्षा रक्षक असेल. मग त्याला मान का बरा दिला जातोय. मी अधिकच गोंधळलो. काही नाही. मग मी एका व्यक्तीच्या जवळ गेलो, त्याला विचारलं हे धावपळ करणारे कोण? एखाद्या लग्नात यजमानांची धावपळ सुरू असते, तशी यांची धावपळ सुरू आहे? </font><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्या माणसाने मला खालून वरपर्यंत पूर्ण निरखून पाहिलं, आणि विचारलं, तुम्ही माझी मराठीतील प्रसिद्ध कविता वाचलेली दिसत नाही? माझ्या पोटात गोळा आला. मनात विचार आला स्वामी समर्थ वाचवा मला. मग अचानकच त्यांनी आपला विषय मोडत दुसरीकडे मोर्चा वळवत जोरजोऱ्यात हसण्यास सुरुवात केली. मी कोपऱ्यात जाऊन घाम पुसून पुन्हा मैदानात आलो. आता मी ठरवलं माणूस पाहायचा आणि मगच प्रश्न विचारायचा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका कोपऱ्यात एक जण पेपर वाचत बसला होता. मी हेरलं, हे असतील प्रसिद्ध पत्रकार महाशय, मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांना विचारलं. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणे, कोणत्या दैनिकाचे तुम्ही? का चॅनलवाले? मी म्हटलं नाही तसं नाही, म्हणजे मलाच तुम्ही ते वाटलात म्हणून मी आलोय. त्यांनी अगदी निर्विकारपणे माझ्याकडे पाहत म्हटले, तो मी नव्हेच. मी ओळखलं ते कोण होते. मी म्हटलं मग तुम्ही पेपर इतक्या आवडीने पाहात होतात की मला वाटलं तुम्हीच याचे संपादक असाल, ते म्हणाले नाही तसं नाही. यात मी आज जाणाऱ्यांच्या यादीत माझे नाव आहे का ते शोधत होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी कपाळावर हात मारला. म्हणालो चुकलो. मला माफ करा. ते म्हणाले असू द्या हल्ली होतंच असं, मला लोकं हल्ली लिहिणं कमी केल्यापासून संपादकच म्हणतात. त्यांची पुन्हा माफी मागत मी मैदान सोडले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता ठरवलं जोपर्यंत खात्री पटत नाही, तोपर्यंत कोणाला ओळख विचारायची नाही. मग मी पुन्हा त्या फिरणाऱ्या माणसाकडे पाहू लागलो. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. मी त्यांच्याकडे वळणार तोच त्यांना कोणीतरी 'काय पाटील..' अशी हाक मारली. मग मी यादी काढून त्यांचे नाव शोधण्यास सुरुवात केली, तर सर्वात वर एकच पाटील दिसले. मला उमजलं ते कोण ते? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी साऱ्यांकडे पाहत होतो. साऱ्यांच्या वेषभूषा पार बदलल्या होत्या. कोणी झब्ब्याच्या जोडीला जीन्स घातली होती, तर कोणी जीन्सवर झब्बा. दोन- तीन जणांची वेष आणि केशभूषा नेमकी समजतच नव्हती, ते काय प्लॅनिंग करून हे सारं करून आलेत ते? कोणाचे फोन अजूनही चालूच होते. कोणी सारखं विमानाकडं पाहत होतं, कोणी पहिल्यांदाच विमान पहिल्याने त्यांनी आपल्या प्रवासवर्णन लिहायला विमानतळावरूनच सुरुवात केली होती. कोणाला विषयच सूचना नव्हते. चार-चौघे एकत्र येऊन एकमेकांनाच वाहवा देत होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यादीतून आपले नाव वगळण्याच्या भीतीपोटी अनेकजण लपण्याचा प्रयत्नही करताना दिसत होते, तितक्यात </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अनाऊंसमेंट झाली. साऱ्यांनी एकमेकांचे हात धरत, चला असे म्हणत, दाराकडे एकमेकांना रेटण्यास सुरुवात केली. मला वाटलं माझीच फ्लाईट असेल, पण या साऱ्या साहित्यिकांचे विशेष विमान होते. काही कारणांमुळे त्यांना उशीर झाला होता. पण अखेर त्यांचे विमान आलेच.. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला मनस्वी आनंद झाला, चला संमेलनात सहभागी होता येणार नाही, कधी संमेलन पाहिलं नाही, कधी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साहित्यिकांचा सहवास लाभला नाही, पण आज बदललेलं साहित्य विश्व आणि विमानाने बाहेर जाणारी मराठी ग्रंथ मला पाहायला मिळाल्याने मी सुखावलो होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साऱ्यांची लगबग चालली होती, मी मान हालवत, परत जागेवर बसलो. तो गोंधळ मला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाची आठवण करून देत होता. तितक्यात माझी नजर अजूनही खुर्चीवरच बसलेल्या एका वयस्कर महिलेकडे गेली. कपाळाला हात लावून त्या बसल्या होत्या. कदाचित त्यांनाही हे असं पळापळ करणं आणि किलकिलाट पसंत नव्हता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला त्यांचा चेहरा नीट दिसत नव्हता म्हणून मी त्याच्याकडे गेलो. मला वाटलं वयोमानानुसार त्यांना त्यांचे सामान उचलता येत नसल्याने त्या बसल्या असतील. पण तसे नव्हते. मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटलो. त्यांना पाहताक्षणीच मला त्या कोण ते कळले. मी त्यांना वाकून नमस्कार केला. म्हटलं ताई का बसलात? अहो तुमचं विमान जाईल निघून, त्या हसल्या म्हणाल्या जाऊदे केला. माय पोरं तिथं माझी वाट पाहतायेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला त्यांना सोडून जावं वाटत नाही बघ. पण काय करावं हे म्हणाले चलाच ताई, म्हणून आले. पदर डोक्यावर घेत त्या म्हणाल्या सगळे गेले की जाईल मी मागून, माझी काळजी नको करूस. या साऱ्यांच्या गराड्यात मला फक्त हाच चेहरा ओळखीचा आणि खरा वाटला. त्या सिंधुताई होत्या. सिंधुताई सपकाळ......    </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Oct 2008 16:15:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['गुडमॉर्निंग महाराष्ट्र']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/-गुडमॉर्निंग-महाराष्ट्र-108102400029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/-गुडमॉर्निंग-महाराष्ट्र-108102400029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हल्ली आकाशवाणीच्या फेमस म्युझिकपेक्षा, हॅलो, गुडमॉर्निंग महाराष्ट्र, गुडमॉर्निग पीपल अशा रेडिओ जॉकीच्या अर्थात आरजेंच्या मधुर आवाजाने आपल्या प्रत्येकाचा दिवस उजाडतो. किंवा मग सूर्योदय होतो म्हणा. आणि दिवसाचा अखेरही याच आवाजाने होतो.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>हल्ली आकाशवाणीच्या फेमस म्युझिकपेक्षा, हॅलो, गुडमॉर्निंग महाराष्ट्र, गुडमॉर्निग पीपल अशा रेडिओ जॉकीच्या अर्थात आरजेंच्या मधुर आवाजाने आपल्या प्रत्येकाचा दिवस उजाडतो. किंवा मग सूर्योदय होतो म्हणा. आणि दिवसाचा अखेरही याच आवाजाने होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खरं तर दूरचित्रवाणीच्या शोधानंतर रेडिओला कितपत प्रतिसाद मिळेल हा यक्ष प्रश्न होता. कारण रेडिओ हे केवळ श्राव्य माध्यम आहे, तर टिव्ही दृकश्राव्य माध्यम. त्यामुळे 'एफएम'चे भविष्यच मुळात चिंतेच्या वातावरणात सुरू झाले.परंतु, आज पाहायला गेले तर, एफएम ऐकणार्‍यांची संख्या टिव्ही पाहणार्‍यांपेक्षा अधिक आहे. याचं सारं श्रेय जाते ते नवनवीन येणार्‍या एफएम चॅनल्सना. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण एफएम नेहमीच ऐकतो. पण 'एफएम' म्हणजे काय हे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहिती आहे. एफएम म्हणजे 'फ्रिक्वेंन्सी मॉड्यूलर'. भारतात याचे सर्वप्रथम ब्रॉडकास्टींग झाले ते 1977मध्ये मद्रास येथे. यानंतर देशात 'एफएम'चा प्रवास सुरू झाला. 1932 मध्ये जालंधर येथे 'एफएम' दाखल झाला. हे सारं त्या काळात सरकारी होतं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खर्‍या अर्थाने 'एफएम' क्षेत्रात क्रांती झाली ती, 1993 मध्ये. या काळात अनेक खाजगी 'एफएम'ने ग्राहकांना आकर्षित  करण्यासाठी अनेक योजनांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आता तर 'एफएम'चा संचार सर्वत्र झाला आहे. या काळात पॉप संगीताची मागणी पाहता या खासगी 'एफएम' केंद्रांनी पॉप गाणी प्रसारित करण्यास सुरुवात केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर एआयआर दिल्ली, मुंबई, पणजी, बेंगलूरू, मद्रास (आजचे चेन्नई), कोलकाता यांनी खाजगी निर्मात्यांना 'एफएम'च्या कार्यक्रमांची वेळ विकण्याचा निर्णय घेतला. यात टाईम्स, रेडिओ मिड डे, रेडिओस्टार यांचा प्रामुख्याने समावेश होता. महाराष्ट्राचा विचार करता 15 ऑगस्ट 1993 साली मुंबईमध्ये सर्व प्रथम नऊ तासांचे 'एफएम' सुरू झाले. यानंतर महाराष्ट्रभर 'एफएम'ची घोडदौड सुरू झाली. आज राज्यभर याचे जाळे पसरले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खरं तर एफएम म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरणच आधार न घेता, आणि कोणत्याही अडथळ्यांना पार करत सुस्पष्ट आवाजात संगीत ऐकवणारे माध्यम. 'एफएम'चा जन्म झाला तेव्हा यावर केवळ इंग्रजी कॉमेंट्रीच ऐकू येत असे. यात काऊंटडाऊन शो, लोकांची आवड, लोकांचे मनोरंजन, लोकांचा सहभाग, विविध स्पर्धा आदींचा समावेश एफएमवरील कार्यक्रमात या काळात करण्यात आला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर प्रादेशिक भाषेतही या प्रकारचे कार्यक्रम सुरू झाले. महाराष्ट्रात एफएम सुरू झाले, तेव्हाही हिंदी अथवा इंग्रजीतच याचे कार्यक्रम होत. परंतु, कालांतराने खासगी कंपन्यांनी ग्राहकांची मागणी पाहता आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी मराठीत 'एफएम' कॉमेंट्री सुरू केली, पाहता- पाहता त्याला चांगलाच प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.</font><br/></font>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>एफएम'च्या या प्रवासात इंग्रजी ते डायरेक्ट मराठी असा प्रवास खूप वेगाने झाला. या प्रवाहात मग सामान्यांची भर पडल्याने मनोरंजनाचे माध्यम असलेले एफएम एक फायदा देणारा व्यवसाय बनला. आज महाराष्ट्रात 'एफएम' मराठीत आहे. यावर 'आरजें'च्या दिलखुलासपणामुळे सामान्यांना आकर्षितत करण्यात त्यांना मोठे यश आले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज मोठ्या प्रमाणावर हिंदी गाणी एफएमवर ऐकवली जातात. यामागे दोन कारणे आहेत. 'एफएम' ऐकणार्‍यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. मराठी गाणे एखादे ऐकण्यास त्यांचा विरोध नाही. परंतु, आज तरुणांना आकर्षित करणारी मराठी गाणी कमी असल्याने 'एफएम' कंपन्यांना केवळ हिंदी गाण्यांचाच आधार घ्यावा लागत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जुनी मराठी गाणी अजरामर आहेत. परंतु, तरुणांना ती पचत नाहीत. याच कारणाने मराठीत एफएम आले असले तरी, गाणी मात्र यावर हिंदीतच आहेत. 'आरजें'नी मात्र आता मराठी बाणा जपत मराठी सुर आळवला असला तरी नागरिकांसाठी त्यांनाही काही प्रसंगी मराठी किंवा मग हिंदी बोलणे भाग पडते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही मराठी तरुणांची याविषयावर बोलकी प्रतिक्रिया आहे. 'एमसीए' करणारा निनाद म्हणतो, आरजेंनी मराठीतच बोलावे त्यांचे बोलणे झकास आहे, मी जन्मतःच मराठी आहे, पण मला गाणी हिंदी आवडतात, कारण तरुणांना रुचतील अशी मराठी गाणी सध्या येत नाहीत, याच काळातले 'कोंबडी पळाली' सोडले तर, कोणतेच मराठी गाणे तरुणांना आवडलेले नाही. त्यामुळे गाणी ही हिंदीतच हवीत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्योतिका म्हणते काही 'एफएम'वाले मिक्स गाणी लावायला पाहतात, यात एक मराठी, एक हिंदी असे गाणे लावले जाते. परंतु, हे चुकीचे आहे. असे केल्याने संगीत ऐकल्याचा आनंद तर मिळतच नाही. उलट गोंधळच वाढतो. आता हेच पाहा, 'मराठीत अश्विनी ये ना' हे गाणं ऐकल्यावर हिंदीत हिमेशचे 'तंदुरी नाइट्स' हे गाणे ऐकणे म्हणजे कांद्याच्या भाजीवर दूध पिण्यासारखे आहे. मोईन म्हणतो, गाणी जर ढिंगचँग असतील तरच कामातही मन लागते, आणि हे काम फक्त हिंदीच गाणी करू शकतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रेडिओ मिर्ची नाशिक केंद्राच्या प्रमुख सई बांदेकरांनीही याविषयावर आपले मत व्यक्त केले आहे. नागरिकांच्या मागण्या आणि त्यांची आवड लक्षात ठेवूनच विषयानुरुप गाणी वाजवली जातात. पहाटे तुम्ही रॉक संगीत लावले तर ते कोणीच ऐकणार नाही, त्यामुळे या वेळी तुम्हाला शांत आणि देवाचीच गाणी लावावी लागतील. यानंतर जसजसा दिवस उजाडत जाईल, तसे वेळेनुसार गाणे लावावे लागते. दुपारी महिला आणि पुरुषांच्या आवडीचा विचार करत तुलनात्मक गाणी लावावी लागतात, तर सायंकाळी कामावरून थकून परतणार्‍यांना पुन्हा नवचैतन्य देण्यासाठी मस्त हिंदी गाणी लावली जातात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठी श्रोतृवर्ग अजूनही एफएमला म्हणावा तितका मिळू शकत नाही. त्यामुळे एखादे मराठी गाणे चालते, परंतु मराठीत कार्यक्रम करायचा झाला तरी त्याला जाहिरातदार मिळत नसल्याने या कार्यक्रमांना सणवार किंवा वेळप्रसंगीच लावावे </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लागते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळे मराठीला न दुखावण्यासाठी मराठीत कॉमेंट्री आणि हिंदीत गाणी अशी सांगड घालावी लागते. आज मराठीत आरजे कॉमेंट्री सुरू झाली आहे, पण लवकरच मराठीत, संपूर्ण मराठीत एफएम सुरू होतील यात शंकाच नाही. पण सध्या तरी महाराष्ट्रात मराठी 'एफएम'चा प्रवास झक्कास चालला आहे, हे मात्र खरं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'>लेखिका 'रेडिओ मिर्ची'च्या नाशिक केंद्रात कार्यरत आहेत.)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Oct 2008 15:56:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[निर्णयक्षमतेचा कस...’वन बॉल टु गो’]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/निर्णयक्षमतेचा-कस-’वन-बॉल-टु-गो’-108102400028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/निर्णयक्षमतेचा-कस-’वन-बॉल-टु-गो’-108102400028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[‘अननोन वॉटर्स’ या संस्थेने पुण्यात  नुकतीच आंतरआयटी एकांकिका स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेत योगेश शेजवलकर लिखित ‘वन बॉल टू गो’  ही एकांकिका विजेती ठरली. क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूआधी होणा-या फलंदाजांमधील संवादाची ही एकांकिका आहे. मंदार ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#400040'>‘अननोन वॉटर्</font><font style='font-size:11pt;'>स</font><font style='font-size:11pt;'>’ या संस्थेने पुण्यात  नुकतीच आंतरआयटी एकांकिका स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेत योगेश शेजवलकर लिखित ‘वन बॉल टू ग</font><font style='font-size:11pt;'>ो’  </font><font style='font-size:11pt;'>ही एकांकिका विजेती ठरली. क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूआधी होणा-या फलंदाजांमधील संवादाची ही एकांकिका आहे. मंदार गोरे आणि सागर दातार यांनी यांनी या फलंदाजांच्या भूमिका केल्या.  </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#400040'>हा २०-२० सामना गल्लीतील दादाने आयोजित केलेला असतो. नाट्य मैदानाच्या खेळपट्टीवर घडते. सामन्यात शेवटच्या चेंडूवर तीन धावा फटकविल्या की फलंदाजी करणारा संघ विजयी होणार असतो. या शेवटच्या चेंडूच्या आधी दोन्ही फलंदाजांमध्ये झालेला संवाद म्हणजेच हे नाटक. फलंदाज म्हणतो की, दोन धावा काढू म्हणजे धावसंख्या समान होईल व सामना बॉलआउटवर निकाली ठरेल. गोलंदाजाच्या बाजूचा गडी म्हणतो की, मी पळेन पण एकच धाव काढेन. कारण हा सामना फिक्स झालेला आहे. सामना जिंकायचा असेल तर चौकार मार. माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नकोस. फलंदाज म्हणतो की, तोच प्रॉब्लेम आहे. क्षेत्ररक्षण असे आहे की, चौकार मारता येत नाही. दुसरा गडी म्हणतो, “मला माहीत आहे तुला नाही जमणार. मी तुला लहानपणापासून ओळखतोय..”.</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>त्यांच्यात बरीच चर्चा होऊनअखेर फलंदाज चौकार मारतो. पण तो फटका सीमारेषेपर्यंत जातच नाही. फलंदाज हताश होऊन खेळपट्टीच्या मध्यावर थांबतो. पण गोलंदाजाच्या बाजूचा फलंदाज पळू लागतो. फटका मारणारा फलंदाज विचारतो की, “आता तू का पळत आहेस ? तो उत्तरतो, “जेव्हा तीन धावांसाठी प्रयत्न करण्याची गरज होती तेव्हा आपण दोन धावांविषयी बोलत होतो. चारसाठी प्रयत्न केले म्हणून तीन धावा तरी मिळतील. जितकं पाहिजे असतं त्यापेक्षा थोडं कमीच मिळतं, हा जीवनाचा नियम आहे. चल पळ..”</font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>याच मुद्यावर एकांकिका संपते.</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>एकांकिकेत एक प्लॅशबॅक आहे. तो असा की, फटका मारणा-या फलंदाजावर निर्णय घेण्याची वेळ या आधीही आलेली असते. ‘करीअर की गर्लफ्रें</font><font style='font-size:11pt;'>ड</font><font style='font-size:11pt;'>’,  असा तो पेच असतो. त्यावेळी तो द्विधा मनःस्थितीत सापडलेला असतो. आता खेळातील निर्णायक फटका मारण्याची वेळ असते. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>अतिशय निराळ्या ‘पी</font><font style='font-size:11pt;'>च</font><font style='font-size:11pt;'>’ वरील या बक्षीसपात्र एकांकिकेबद्दल योगेशला बोलतं केलं.</font><font  style='font-size:11pt; color:#400040'><b>योगेश, एकांकिकेतून तुला काय सांगायचे आहे ? </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>जे सांगायचे आहे ते असे की, निर्णय घेण्याची वेळ आली की माणूस कोणत्याही एका दिशेला झुकून ‘आर या पा</font><font style='font-size:11pt;'>र</font><font style='font-size:11pt;'>’ असे करत नाही. अर्धवट मनःस्थितीचे परिणाम त्याला भोगावे लागतात. या सामन्याही ‘दोन धावा तर काढू, पुढचे पुढे..’  असा विचार असतो. मात्र, अखेर त्याला चौकारासाठी फटका मारावाच लागतो...   </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'><b>या एकांकिकेत ठरीव साचेबध्द नेपथ्य नाही. त्याची योजना करताना खूप विचार करावा लागला का ?</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>निश्चितच. वर्तमान आणि भूतकाळातील घटनांचा संदर्भ कळेल, अशा पध्दतीनेच नेपथ्य केले. रंगमंचावरील जागेचा पूर्ण वापर कसा होईल, हे पाहिले. नाट्यशास्त्रातील नियमांचा वापर करून नेपथ्य केले. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'><b>संगीताबाबत काय विचार केला होत</font><font style='font-size:11pt;'>ा ?</font><font style='font-size:11pt;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>क्रिकेटचा फील देणारे असे, त्याप्रमाणेच शाळेतील प्रसंगांना, प्रेमप्रसंगांना अनुरूप असे संगीत दिले. या तीनही गोष्टींचा विचार करावा लागला.</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'><b>ब्लॅकआउट ठेवायचेच नाही, असा निर्णय का घेतला ?</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>ओढून ताणून ब्लॅकआउट ठेवला असता तर नाट्याचा परिणाम नष्ट होण्याची भीती होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>मुळात, हे नाटक शेवटच्या चेंडूभोवती फिरणारे असल्याने कोणताही खंड पडणे सयुक्तिक नव्हते. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'><b>क्रिकेट सोडून दुस-या एखाद्या पार्श्वभूमीवरही हे नाट्य बसवता आले असते. जिवाची घालमेल आणि निर्णयक्षमतेचा कस जीवनातील इतरही प्रसंगातून दाखविला जाऊ शकला असता... </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>गेली काही वर्षे क्रिकेट आपल्या जीवनाचा एक भाग झालेले आहे. या खेळातील शब्दप्रयोग सर्वांना परिचयाची झालेली आहे. स्वतःच्या जीवनाशी प्रत्येकजण या खेळाचे नाते मनातल्या मनात लावू शकतो. या खेळात निर्णयक्षमतेला खूप महत्व आलेले आहे. आपल्या जीवनातही निर्णयक्षमतेला महत्व आलेले आहे. जो निर्णय घेऊ त्याचे परिणाम सामना संपेपर्यंत भोगावे लागतात. चांगले आणि वाईट दोन्ही. क्रिकेटच्या सामन्याचा प्रतीकात्मक वापर करण्याचा हा प्रयत्न आहे. क्लिष्ट गोष्टी क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर सोप्या पध्दतीने सांगता आल्या आणि त्यामुळेच नाट्य वाढायला मदत झाली.</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'><b>दोन पात्रातही ही एकांकिका झाली असत</font><font style='font-size:11pt;'>ी, </font><font style='font-size:11pt;'>असे वाटत नाही का ? उर्वरीत बाबी नेपथ्यातील हुषारीतून सूचित करणे शक्य होत</font><font style='font-size:11pt;'>े</font><font style='font-size:11pt;'>…</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>विषयाचा आवाका पाहता इतर पात्रांची गरज आहे, असे वाटले. त्याशिवाय, विषयाला न्याय देता आला नसता, असे वाटले. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'><b>परीक्षकांना हीच एकांकिका का आवडली असावी ?</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>अवघड विषय खूप सोप्या भाषेत मांडला होता. कलाकारांनी भूमिकांना न्याय दिला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>एकांकिका करताना बक्षिसाचा वगैरे विचार केला नव्हता.</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'>लेखनासह संगीताचीही जबाबदारी योगेशने सांभांळली. तेजस देवधरने त्याला प्रकाशयोजनेद्वारे मदत केली. मंदार आणि सागर यांनी प्रमुख भूमिकांसह ‘से</font><font style='font-size:11pt;'>ट</font><font style='font-size:11pt;'>’ ची जबाबदारीही सांभाळली. यापुढेही या एकांकिकेचे प्रयोग करण्याचा योगेशचा मनोदय आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Oct 2008 15:51:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी भारतीय असल्याची मला लाज वाटते]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/मी-भारतीय-असल्याची-मला-लाज-वाटते-108102400017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/diwali-marathi/मी-भारतीय-असल्याची-मला-लाज-वाटते-108102400017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ज्या देशाला स्वातंत्र्य मिळून साठहून जास्त वर्ष झाली, त्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना साध्या मूलभूत सुविधाही (रस्ते, संडास, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण) पुरेशा प्रमाणात देता येत नाहीत, तो देश काय कपाळ महासत्ता होणार?]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#FF0080'><b>ज्या देशाला स्वातंत्र्य मिळून साठहून जास्त वर्ष झाली, त्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना साध्या मूलभूत सुविधाही (रस्ते, संडास, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण) पुरेशा प्रमाणात देता येत नाहीत, तो देश काय कपाळ महासत्ता होणार? </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओम नमः शिवाय </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी भारतीय असल्याची मला लाज वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी भारतीय असल्याची मला खूप लाज वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी भारतीय असल्याची मला प्रचंड लाज वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी भारतीय असल्याची मला मनापासून लाज वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळीच्या फराळात ऐनवेळी खडा लागल्यासारखं वाटतंय ना? तेही अगदी महाकडू? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण माझा नाईलाज आहे. भारताच्या खोटा-खोटा, वरवरच्या समृद्धीची चित्रं रंगवणं, सूरज बडजात्या किंवा करण जोहरच्या टूकार चित्रपटातल्यासारखं अनुक्रमे भारतीय संस्कृती आणि देशप्रेमाच्या बेगडी कथा-कहाण्या रंगवून स्वतःची आणि इतरांचीही (कुणी वाचत असल्यास) घोर दिशाभूल करणं मला जमणार नाही. गेली तीन-साडेतीन वर्ष बघा. आपण सारेच भारताच्या तथाकथित प्रगतीचा माज (होय. माजच.)डोक्यात गेल्यासारखे वागत आहोत असं नाही वाटत तुम्हाला? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आयटीमधल्या तथाकथित यशाच्या कहाण्या आपण गेली चार वर्षे मारे रंगवून रंगवून स्वतःचं समाधान करवून घेत असलो, तरीही ज्या आयटीच्या जोरावर आपण समृद्धीची फळं (?) चाखत आहोत, त्या आयटीतील आपली प्रगती म्हणजे तरी नक्की काय आहे याचा कधी विचार केलात का? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इतके जर आपण आयटीच्या जगातले अनभिषिक्त सम्राट वगैरे असू, तर मला सांगा एकाही भारतीय कंपनीच्या नावावर मोठं एखादं सॉफ्टवेअर का नाही? अमेरिकन कंपन्यांच्या घरातल्या मोलकरणीसारखे आपण त्यांच्या दुय्यम तिय्यम दर्जाच्या कामांचे कॉन्ट्रॅक्टस मिळवून स्वतःची कोणती तिसमारखानी सिद्ध करतो, ते एक ब्रह्मदेवच जाणे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असो. मुद्दा आयटीशी किंवा कोणत्याही एका क्षेत्राशी संबंधित नाही. मुद्दा हा आहे, की गेल्या चार वर्षांपासून आपण महासत्ता वगैरे बनण्याच्या बेतात असल्यागत स्वतःचीच पाठ थोपटून घेत मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहोत, ते कधी बंद करणार, हा आहे. आपल्यातले बरेचसे महाभाग (विशेषतः सर्वपक्षीय राजकीय बिनडोक, तत्वहीन, कणाहीन, स्वार्थी, दूरदृष्टीहीन नेते, निष्क्रिय, कर्तृत्वहीन सरकारी अधिकारी आणि समृद्धीची सूज आलेला आमचा मध्यम आणि नवमध्यम श्रीमंत वर्ग हे सारेच) तर भारत महासत्ता झाल्यागत गमजा मारत फिरत असतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खरंच का हो आमची महासत्ता होण्याची लायकी आहे का? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जरा विचारा ना प्रश्न स्वतःलाच.. आणि प्रामाणिकपणे उत्तरही द्या. ज्या देशाला स्वातंत्र्य मिळून साठहून जास्त वर्ष झाली, त्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना साध्या मूलभूत सुविधाही (रस्ते, संडास, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण) पुरेशा प्रमाणात देता येत नाहीत, तो देश काय कपाळ महासत्ता होणार? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या देशात नागरिकांना ‘बेसिक सिव्हीक सेन्स’सुद्धा सांभाळता येत नाही, तो देश जगाचे नेतृत्व कोणत्या तोंडाने करणार? ज्या देशात चाळीस-टक्के माणसं किडा-मुंग्यांपेक्षाही वाईट स्थितीत जगतात, आणि त्याहून वाईट स्थितीत मरतात, तो देश जगाला कोणते संस्कार देणार? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या देशातले पावरबाज नेते शेतकर्‍यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करून क्रिकेटपटूंच्या लिलावातच जास्त रस घेतात आणि मोक्याचं भूखंड स्वतःच्या आणि स्वतःच्या मर्जीतल्या मुखंडांच्या घशात घालून शहरांच्या विकासाचं वाटोळं करतात, ते देशाला कसली पावर देणार? ज्या देशातल्या नागरिकांना धड ट्रॅफिकचे नियम पाळता येत नाहीत, ते नव्या जगाचे नियम कसले तयार करणार? जिथे सण-समारंभ साजरे करणं म्हणजे मोबाईलवर दोन ओळींचे एसेमेस पाठवणं आणि मोठा आवाजात म्युझिक सिस्टिम लावून धिंगाणा घालणं, एवढं आणि एवढंच समजलं जातं, ते जगाला काय संस्कार देणार? जिथे कामापेक्षा सुटांचंच आकर्षण जास्त, आणि कष्टांपेक्षा अंगचोरपणाच बोकाळला आहे, तो देश कशाच्या बळावर प्रगतीची स्वप्नं पाहणार? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font><font  style='font-size:11pt; color:#000000'>११ सप्टेंबरचा अमेरिकेतला हल्ला आणि ७ जुलैचा लंडनमधील बॉम्बस्फोट झाल्यानंतर आजतागायत तिथे परत तसं काही करणं दहशतवाद्यांना शक्य झालं नाही. आपल्याकडे मात्र गुरूवारच्या उपवासासारखे शुक्रवारचे बॉम्बस्फोट रूटीन होवू लागले आहेत आणि त्यात मरणार्‍यांबद्दल कुणाला काही वाटेनासं झालं आहे. ज्या देशातल्या पोलिसांना नागरिकांचं रक्षण करता येत नाही, तो देश जगातल्या दीनदुबळ्यांचं काय रक्षण करणार?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जिथला नवश्रीमंतीची सूज आलेला आमचा मध्यमवर्ग सॅटर्डे संडेला मॉल्स आणि मल्टिप्लेक्सच्या चकरा मारण्यात धन्यता मानतो आणि आहे त्यापेक्षा जास्त कमावण्याची जीवघेणी स्पर्धा आपलीशी करतो, तो देशासाठी काय विचार करणार? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या देशातला समस्त महिलावर्ग बिनडोक, दर्जाहीन, संस्कारहीन, बुद्धीच नसलेल्या मालिकांची पारायणं करतो, तो देश आपल्या पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार ? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या देशातला पिढानुपिढांचा राज्यकर्ता समाज फालतू स्वार्थासाठी आरक्षणाची मागणी करतो, तो लाचार शिरोमणी या देशाचंच काय, स्वतःच्या कुटुंबाचं तरी नेतृत्व करण्याच्या लायकीचा आहे का? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाचं जाऊ द्या. पुणे आणि मुंबईव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्र नावाची चीज आहे, याचीच इथल्या हस्तीदंती मनोर्‍यातल्या महाभागांना कल्पना आहे की नाही कोण जाणे. या उर्वरित महाराष्ट्रात बेकारी, वीज, पाणी, दुष्काळ यासारखे प्रश्न अजुनही उग्र रूप धारण करून आहेत, याचीही आम्हाला कल्पना नसावी. आणि असली तरी विचार करायला वेळ आहे कोणाकडे? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तो थोडीच माझा प्रॉब्लेम आहे? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खरंय. भारत हा माझा प्रॉब्लेम नाहीच आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी हाच भारताचा प्रॉब्लेम आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आणि तो सॉल्व्ह करायचा असेल ना, तर मी पासूनच सुरूवात करायला हवी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिबाळीच्या लखलखाटात आपल्या डोक्यात इतका जरी प्रकाश पडला, तरी पुरेसं आहेह्न. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अन्यथा कठीण आहे.. खूपच कठीण आहे. </font><br/>    .......................................................................................... <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Oct 2008 15:01:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
