<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[स्वातंत्र्य दिन]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/indepandance-day-marathi</link>
    <description><![CDATA[Independence Day In Marathi - 15th August is celebrated as Independence Day of India. Know more about Independence Day in In Marathi language on Independence Day Marathi special page! स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनची संपूर्ण माहिती मराठी ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Wed, 10 Jun 2026 00:35:13 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>स्वातंत्र्य दिन</title>
      <url>https://marathi.webdunia.com/indepandance-day-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/indepandance-day-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/indepandance-day-marathi-1021109.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[प्रांतीयवादातून विघटनाकडे?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रांतीयवादातून-विघटनाकडे-108081400037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रांतीयवादातून-विघटनाकडे-108081400037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाचा ६१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती मात्र तितकीशी आशादायक नाही. भ्रष्टाचार, अविकास यासारख्या नेहमीच्या समस्या तर आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रांतीयतावादाने डोके वर........]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाचा ६१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती मात्र तितकीशी आशादायक नाही. भ्रष्टाचार, अविकास यासारख्या नेहमीच्या समस्या तर आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रांतीयतावादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे विकासाच्या वाटेवर चालत असताना आता आपण प्रांतीयतावादाच्या रूपाने विघटनाकडे तर वाटचाल करत नाही ना? याचा विचार करायची वेळ आली आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात प्रादेशिक अस्मिता पुढे करून अनेक आंदोलने उभी केली जात आहेत. काही जुनी आहेत. काही नव्याने सुरू झाली आहेत. पण सगळ्या राज्यात अशी आंदोलने सुरू आहेत. ६१ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर याच प्रश्नाला हात घालण्याचे वेबदुनियाने ठरविले. 'प्रांतीयवादी आंदोलनातून देशाची विघटनाकडे वाटचाल सुरू झाली आहे काय?' या विषयावर आम्ही एक सेमिनार घेतला असून त्यात अनेक मान्यवरांना सहभागी करून घेतले आहे. यात महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरूणभाई गुजराती, माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, भाजपचेच प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ खडसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व आमदार बाळा नांदगावकर, याच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नितीन सरदेसाई हे मान्यवर यात सहभागी झाले आहेत. या सगळ्यांची मते आपल्याला येथे वाचायला मिळतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>या नेत्यांच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special08/iday/0808/14/1080814038_1.htm' target=_blank>प्रांतवादापेक्षा देश महत्त्वाचा</a></b><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special08/iday/0808/14/1080814039_1.htm' target=_blank>प्रांतीयवाद राजकारणातून- अरूणभाई गुजराती</a></b><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special08/iday/0808/14/1080814040_1.htm' target=_blank>आधी प्रांतावर प्रेम गरजेचे- बाळा नांदगावकर </a></b><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special08/iday/0808/14/1080814041_1.htm' target=_blank>प्रांतावर प्रेम हवे पण वाद नकोः गोपीनाथ मुंडे </a></b><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special08/iday/0808/14/1080814042_1.htm' target=_blank>प्रांतवादाचे परिणाम गंभीर- एकनाथ खडसे</a></b><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special08/iday/0808/14/1080814043_1.htm' target=_blank>'मनसे' प्रांतवाद करत नाहीः नितिन सरदेसाई</a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 20:36:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['मनसे' प्रांतवाद करत नाहीः नितिन सरदेसाई]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/-मनसे-प्रांतवाद-करत-नाहीः-नितिन-सरदेसाई-108081400043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/-मनसे-प्रांतवाद-करत-नाहीः-नितिन-सरदेसाई-108081400043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA['मनसे'ने आपले आंदोलन कधीही उग्र केलेले नाही किंवा आम्ही सौम्य आंदोलन करतो असे कोणीही म्हणू शकणार नाही. परंतु, नेहमीच आमच्याकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. आज घडीला देशात शंभर प्रश्न, समस्या आहेत,]]></description>
      <content:encoded><![CDATA['<font  style='font-size:11pt; color:#000000'>मनसे'ने आपले आंदोलन कधीही उग्र केलेले नाही किंवा आम्ही सौम्य आंदोलन करतो असे कोणीही म्हणू शकणार नाही. परंतु, नेहमीच आमच्याकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. आज घडीला देशात शंभर प्रश्न, समस्या आहेत, त्यातील 10 प्रश्नांना आम्ही हात घातला आहे. जर उद्या आम्ही प्रांतीयतेचा मुद्दा सोडला तर आमच्यावर पुन्हा आरोप होतील की आम्ही प्रांताकडे, प्रदेशाकडे लक्षच देत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आम्हाला फक्त सामान्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रांतवाद करत नाहीत, मराठी माणसांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडवण्‍याला जर आपण प्रांतवाद म्हणत असाल तर तोही आम्हाला मान्य आहे. देश अखंड आहे, तो अखंडच रहाणार. मनसेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा </font><br/>( <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>श्री. सरदेसाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आहेत.)</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000080'>शब्दांकनः नितिन फलटणकर) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 20:26:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रांतवादाचे परिणाम गंभीर- एकनाथ खडसे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रांतवादाचे-परिणाम-गंभीर-एकनाथ-खडसे-108081400042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रांतवादाचे-परिणाम-गंभीर-एकनाथ-खडसे-108081400042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[प्रांतवाद आणि राजकारण या एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. राजकारणात वर यायचे तर जो तो  प्रांतवादावर भर देऊन वाद भडकवतो. प्रांतवर प्रेम हवेच. पण त्याचे राजकारण नको. नाही तर त्याचे परिणाम गंभीर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रांतवाद आणि राजकारण या एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. राजकारणात वर यायचे तर जो तो  प्रांतवादावर भर देऊन वाद भडकवतो. प्रांतवर प्रेम हवेच. पण त्याचे राजकारण नको. नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील व ते आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकारणी आज आपली पोळी भाजून घेतली. पण देशाचे ऐक्य मात्र धोक्यात येतील. आपल्या भाषेसाठी,  अस्मितेसाठीचे हे आंदोलन म्हणजे राजकारणात पुढे येण्यासाठीची शिडी आहे. त्या शिडीचा वापर करून प्रत्येकाला  सत्तेच्या खुर्चीपर्यंत यायचे आहे. पण यामुळे समाजमनाला विद्वेषाच्या जखमा होतील त्याची जबाबदारी कोण घेणार? </font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>श्री. खडसे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.) </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000040'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000040'>शब्दांकनः नरेंद्र राठोड) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 20:23:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रांतीयवाद राजकारणातून- अरूणभाई गुजराती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रांतीयवाद-राजकारणातून-अरूणभाई-गुजराती-108081400039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रांतीयवाद-राजकारणातून-अरूणभाई-गुजराती-108081400039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हिमालयाच्या बर्फापासून ते राजस्थानच्या मरूभूमीपर्यंत महासागराच्या तटापासून ते शेतात वाहणार्‍या पाटापर्यंत हा  देश एक आहे. त्याच्या सृजन आणि समृद्धीसाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>हिमालयाच्या बर्फापासून ते राजस्थानच्या मरूभूमीपर्यंत महासागराच्या तटापासून ते शेतात वाहणार्‍या पाटापर्यंत हा  देश एक आहे. त्याच्या सृजन आणि समृद्धीसाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. अनेक वर्षांचा  वैभवशाली इतिहास असलेल्या या देशाची विविधता हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. भाषा आणि प्रांतांमध्ये भिन्नता हीच  आमची ताकद आहे. या पार्श्वभूमीवर किरकोळ वाद हा असणारच. त्यामुळे देशाच्या ऐक्याला काहीही फरक पडणार  नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंजाबच्या बिंद्राने सुवर्णपदक जिंकले तेव्हा केरळला आनंद झालाच ना? महाराष्ट्राचा सचिन जेव्हा सेंच्युरी मारतो  किंवा झारखंडचा धोनी जेव्हा ट्वेंटी-२० चा वर्ल्ड कप जिंकून आणतो तेव्हा संपूर्ण भारत देश वेडा होऊन आनंदाने  नाचतोच ना? मग आम्ही वेगळे कसे? खरं सांगायचं तर भाषा आणि प्रांताचा वाद हा आमच्या संधीसाधू  राजकारण्यांनी उभा केला आहे. केवळ मतांचे राजकारण करणार्‍यांना आणि प्रसिद्धी हवी असलेल्यांना हा मराठीचा  पुळका आला आहे. त्यांच्याने काहीही होणे नाही. भारत आणि भारतीय हीच आमची खरी ओळख आहे. मी मराठी,  हा गुजराती आणि तो कानडी हा विचार करण्यापूर्वी आम्ही भारतीय हा विचार महत्त्वाचा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>६१ वर्षांच्या आपल्या स्वातंत्र्यातून आपण अनेक स्थित्यंतरे आणि अनेक संकटांचा सामना केला. आज आपल्यासमोर  सगळ्यात मोठे संकट आहे गरीबी आणि अशिक्षिततेचे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. हा देश बलशाली बनवूया. </font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>श्री. गुजराती हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#800080'>शब्दांकनः विकास शिंपी) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 20:21:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रांतावर प्रेम हवे पण वाद नकोः गोपीनाथ मुंडे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रांतावर-प्रेम-हवे-पण-वाद-नकोः-गोपीनाथ-मुंडे-108081400041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रांतावर-प्रेम-हवे-पण-वाद-नकोः-गोपीनाथ-मुंडे-108081400041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[आपल्या प्रांतावर आपले प्रेम हवेच. पण या प्रेमापोटी उगाचच भरकटत जाऊन वाद निर्माण व्हावेत हे मात्र योग्य  नाही. आपण ज्या ठिकाणी रहातो, तो प्रांत आपला. आणि त्यावर आपले प्रेम हवेच. परंतु, प्रांतिक वाद मात्र नकोत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या प्रांतावर आपले प्रेम हवेच. पण या प्रेमापोटी उगाचच भरकटत जाऊन वाद निर्माण व्हावेत हे मात्र योग्य  नाही. आपण ज्या ठिकाणी रहातो, तो प्रांत आपला. आणि त्यावर आपले प्रेम हवेच. परंतु, प्रांतिक वाद मात्र नकोत. मी या प्रांताचा. तो त्या प्रांताचा. अशा भावनेने थोड्याफार प्रमाणात का होईना देशाच्या एकीवर परिणाम होतो. अन,  आज जे प्रांतिक वाद होताहेत त्यात प्रेम थोडे आणि राजकारणच अधिक दिसते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकारणासाठी प्रांतिकतेला खतपाणी घालून नवीन वाद निर्माण करणे ही भविष्यातील सर्वांत चिंतेची बाब ठरणार  आहे. येथील प्रत्येक सामान्य माणसानेच आता सावध झाले पाहिजे. त्याने आपल्या प्रांतावर प्रेम जरूर करावे. पण  त्यासाठी वाद निर्माण करून आपण आपल्याच देशाची एकी भंग करतोय हेही लक्षात ठेवावे. </font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>श्री. मुंडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.) </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000040'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000040'>शब्दांकनः नरेंद्र राठोड) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 20:21:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आधी प्रांतावर प्रेम गरजेचे- बाळा नांदगावकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/आधी-प्रांतावर-प्रेम-गरजेचे-बाळा-नांदगावकर-108081400040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/आधी-प्रांतावर-प्रेम-गरजेचे-बाळा-नांदगावकर-108081400040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[आपण ज्या प्रांतात रहातो त्या प्रांताची माती आपली मातृभूमी आहे. त्या प्रांताचा अभिमान प्रत्येक माणसाच्या  मनात असलाच पाहिजे. देशाची प्रगती ही प्रत्येक माणसांच्या मनात असलीच पाहिजे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण ज्या प्रांतात रहातो त्या प्रांताची माती आपली मातृभूमी आहे. त्या प्रांताचा अभिमान प्रत्येक माणसाच्या  मनात असलाच पाहिजे. देशाची प्रगती ही प्रत्येक माणसांच्या मनात असलीच पाहिजे. पण देशाची प्रगती प्रत्येक  माणसाच्या घरापासून होते. आधी घराची प्रगती मग गावाची, मग प्रांताची आणि मगच देशाची प्रगती शक्य आहे.  आपण जर आपल्या प्रांतावर प्रेम न करता, आपल्या प्रांताच्या प्रगतीचा विचार न करता सरळ देशाच्या प्रगतीचा  विचार केला तर ते कसे शक्य आहे? आधी आपण ज्या मातीत राहिलो, ज्या मातीत वाढलो त्यांच्यावर प्रेम  करायला शिकले पाहिजे. देशावर प्रेम आपोआप जडेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आकाशवर प्रेम आहे, हे दाखविण्यासठी कुणी घर सोडून मोकळ्या आकाशाखाली उघड्या जमिनीवर झोपत नाही.  आकाशावर प्रेम आहे हे दाखविण्यासाठी त्याला प्रेमाने न्याहाळले तरी पुरे. नाही तर उघड्या जमिनीवर झोपणार्‍याला  लोक वेडा म्हणण्यासही कमी करीत नाहीत. </font><br/>((<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>श्री. नांदगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत.)</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000040'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000040'>शब्दांकनः नरेंद्र राठोड) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 20:19:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रादेशिकतेपेक्षा देश महत्त्वाचा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रादेशिकतेपेक्षा-देश-महत्त्वाचा-108081400038_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/प्रादेशिकतेपेक्षा-देश-महत्त्वाचा-108081400038_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[किमान काही साम्य असणार्‍या लोकांचे  एक राज्य करण्याचा घाट घातला जातो आहे. हे साम्य भाषा, संस्कृती, वंश या माध्यमातून शोधले जाते आहे. या सगळ्यातून  'आमच्या लोकांचे आमचे राज्य' अशी आयडेंटिटी निर्माण होईल.........]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->किमान काही साम्य असणार्‍या लोकांचे  एक राज्य करण्याचा घाट घातला जातो आहे. हे साम्य भाषा, संस्कृती, वंश या माध्यमातून शोधले जाते आहे. या सगळ्यातून  'आमच्या लोकांचे आमचे राज्य' अशी आयडेंटिटी निर्माण होईल.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाचा ६१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती मात्र तितकीशी आशादायक नाही. भ्रष्टाचार, अविकास यासारख्या नेहमीच्या समस्या तर आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रांतीयतावादाने डोके वर काढले  आहे. त्यामुळे विकासाच्या वाटेवर चालत असताना आता आपण प्रांतीयतावादाच्या रूपाने विघटनाकडे तर वाटचाल करत नाही  ना? याचा विचार करायची वेळ आली आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रादेशिकतावाद तसा नवा नाही. देशाच्या प्रत्येक भागात लहान-मोठ्या प्रमाणात तो आहे आणि होता. पण त्याची टोके आता  टोचू लागली आहेत. पाकिस्तानच्या भडकावण्यातून पंजाबातही खलिस्तानी आंदोलन पेटले होते. ते कसेबसे शांतही झाले.  त्यासाठी एका पंतप्रधानाचा बळीही दिला. तमिळनाडूतही तशा मागण्या अधून-मधून होत असतात. म्हणून तर श्रीलंकेच्या प्रश्नावर  नीट काही भूमिका घेता येत नाही आणि घेतल्यानंतर काय होते, हे राजीव गांधींच्या हत्येच्या रूपाने समोर आले आहे. पण  प्रांतीयतावाद फक्त इथे आहे, असे नाही. आसाममध्येही तो आहे. उल्फा त्यासाठीच आंदोलन करते आहे. ईशान्येच्या  राज्यांमध्येही स्वतंत्रतेच्या मागण्या अधूमधून डोके काढत असतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगमध्ये आंदोलन पेटले आहे. उत्तर  प्रदेशाचे त्रिभाजन करण्याची मागणी समोर आहेच. आंध्र प्रदेशमध्ये स्वतंत्र तेलंगाणा राज्यासाठी आंदोलने होत आहेत. त्यासाठी  तर एक पक्षही स्थापन झाला. कर्नाटकातही प्रादेशिकतावाद फोफावतो आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कन्नड अस्मिता  हाही मुद्दा होता. कन्नड रक्षण वेदिके सारखी संघटना तर केवळ प्रांतीय अस्मितेच्या जोरावरच स्थापन झाली आहे.  गुजरातमध्येही सौराष्ट्र वेगळा व्हावा यासाठी मागणी होते. महाराष्ट्रातही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  निमित्ताने मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे 'मराठा तितुका मेळवावा' असे होत असताना दुसरीकडे मराठीच  असलेला विदर्भ वेगळा करण्याची मागणीही तितकीच जोर लावून केली जाते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सगळे चित्र पहाताना प्रांतीय अस्मिता भडकत चालल्याचे दिसून येते. या सगळ्यातून किमान काही साम्य असणार्‍या लोकांचे  एक राज्य करण्याचा घाट घातला जातो आहे. हे साम्य भाषा, संस्कृती, वंश या माध्यमातून शोधले जाते आहे. या सगळ्यातून  'आमच्या लोकांचे आमचे राज्य' अशी आयडेंटिटी निर्माण होईल. पण त्यामुळे इतर प्रांतातून तिथे लोक येऊ शकतील का? त्यांचे  स्थान काय असेल हा प्रश्न निर्माण होतो. प्रांतीय अस्मिता जोपासताना इतरांचा द्वेष करण्याची वृत्ती बोकाळली जाईल आणि  त्यातून देशाच्या ऐक्यालाच धोका निर्माण होऊ शकतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या मोठ्या राज्यांचे विभाजन करण्याच्या मागणीत गैर नाही. कारण ही राज्ये  आकाराने प्रचंड मोठी आहेत. छत्तीसगड वेगळे करूनही मध्य प्रदेश मोठे आहे. उत्तर प्रदेशात २६ प्रशासकीय विभाग आहेत. एका  मुख्यमंत्र्याने ठरवले तरी सगळ्या विभागाना एका वर्षात तो भेट देऊ शकत नाही. बिहारची परिस्थितीही तशीच आहे. असे असेल  तर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्यांचे विभाजन करणे गरजेचे आहे. त्यातून विकासालाही वाव मिळू शकतो. पण हे विभाजन एक  संस्कृती जोडण्याच्या दृष्टिकोनातून होत असल्यास त्यातून प्रांतीय अस्मिताही डोकावतील. प्रांत म्हणून वेगळे अस्तित्व  असायलाही हरकत नाही. पण त्यातून इतरांच्या विषयीची द्वेषभावना निर्माण व्हायला नको. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->प्रत्येक राज्यात त्या राज्यातील नागरिकाला प्राधान्य द्यायला हवे. यात चुकीचे काहीही नाही. पण या माध्यमातून इतरांचा त्या  राज्यात जाण्याचा रस्ता बंद करण्यात अर्थ नाही. कारण यातून विकास रोखला जाऊ शकतो.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रात शिवसेनेने प्रांतीय अस्मितेतूनच आंदोलन सुरू केले. ते थंड झाल्यावर आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तोच मुद्दा हाती घेऊन आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला प्राधान्य यात गैर काही नाही. पण एकूणात  परप्रांतीयांविरोधात आंदोलन करताना त्यांच्याविषयी द्वेषभावना बाळगली गेल्यास त्याचा वेगळा संदेश जाईल आणि मग  मानसिकताच फुटीरतावादी बनल्यास आश्चर्य वाटायला नको. उदाहरण घ्यायचे तर आसामचे घेता येईल. विकासात मागे  पडलेल्या आसामवर बांगलादेशीयांचे लोंढे आदळायला लागले तेव्हा उल्फाचे आंदोलन सुरू झाले. त्याला सुरवातीच्या काळात  आसाम साहित्य सभा या बुद्धिवाद्यांचे नेतृत्व करणार्‍या संघटनेनेही पाठिंबा दिला होता. त्यातलेच अनेक लोक त्यात नेते होते.  या आंदोलनाची परिणती काय झाली हे आज आपण पहातो आहे. हे राज्यच या संघटनेने अस्थिर करून टाकले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रत्येक राज्यात त्या राज्यातील नागरिकाला प्राधान्य द्यायला हवे. यात चुकीचे काहीही नाही. पण या माध्यमातून इतरांचा त्या  राज्यात जाण्याचा रस्ता बंद करण्यात अर्थ नाही. कारण यातून विकास रोखला जाऊ शकतो. कारण एका राज्याच्या सर्व गरजा  भागतील असे मनुष्यबळापासून वस्तुंपर्यंत काहीही त्या राज्यात उत्पादित होत नाही. त्याला दुसर्‍या रा्ज्यांवर अवलंबून रहावेच  लागते. असे असताना विरोध फक्त मनुष्यबळाला केला जातो, वस्तूंना नाही. कारण त्या आपल्या रोजच्या जीवनाचा भाग  असतात. उत्तर प्रदेशात महाराष्ट्रानंतर सर्वांधिक साखरेचे उत्पादन होते. ती साखर आपल्याला हवी, पण ती निर्मिती करणारे हात  आपल्याकडे आल्यावर त्यांना विरोध होतो. मध्य प्रदेशात डाळींचे मोठे उत्पादन होते. ते हवे. पण तिथली माणसे नकोत, ही  मानसिकता चुकीची आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->स्वातंत्र्यदिन साजरा करताना तो पूर्ण देशाचा असतो. त्याचवेळी प्रांतीय अस्मितेसाठी आंदोलने होतात, याला काय अर्थ आहे. याचाच अर्थ आपण आपल्या देशापेक्षा राज्याचे अधिक आहोत. उद्या या राज्यांतून स्वतंत्र राष्ट्र हवे याची हाक आली तर आश्चर्य वाटायला नको.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रात औद्योगिक विकास जास्त आहे. पण बाकीच्या क्षेत्रांचाही तितका विकास झाला असे नाही. शेतीच्या बाबतीत पंजाब  जेवढा समृद्ध आहे, तेवढा महाराष्ट्र नाही. गव्हासाठी आपल्याला पंजाब व मध्य प्रदेशावरच अवलंबून रहावे लागते. असे असताना  त्या लोकांना विरोध करून आपण काय साध्य करू पहातो. आपल्या राज्यावर भार नको ही बाब खरी. पण येणारी मंडळी  आपल्या हातातील तर काही हिसकावून घेत नाही ना? त्यांचे ते स्वतंत्रपणे जगतात ना? मग आपण एवढे हिंसक पातळीवर का  उतरतो आहोत? </font><br/></font><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->आधीच दहशतवादाने देश पोखरून निघाला आहे. तो आवरता आवरता नाकी नऊ  येताहेत. प्रांतीय आंदोलने वाढली तर या दहशतवादाला खतपाणीच मिळेल. त्यामुळे देशाचे अखंडत्व धोक्यात येईल.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करताना तो पूर्ण देशाचा असतो. त्याचवेळी प्रांतीय अस्मितेसाठी इतर राज्याच्या नागरिकांना हाकलून देण्याची आंदोलने होतात, याला काय अर्थ आहे. याचाच अर्थ आपण आपल्या देशापेक्षा राज्याचे अधिक आहोत. मग राष्ट्रीय भावनाच उत्पन्न न झाल्यास प्रादेशिक अस्मिता आणखी टोकदार होऊन उद्या या राज्यांतून स्वतंत्र राष्ट्र हवे याची हाक आली तर आश्चर्य वाटायला नको. मग महत्प्रयासाने मिळालेले स्वातंत्र्य कवडीमोल ठरेल. शिवाय त्या  स्वातंत्र्ययोद्ध्यांचा अपमानही ठरेल. गांधींनी गुजरातसाठी, टिळक-सावरकरांनी महाराष्ट्रासाठी, सुभाषबाबूंनी बंगालसाठी,  राजेंद्रप्रसादांनी बिहारसाठी, भगतसिंगांनी पंजाबसाठी स्वातंत्र्य मागितले नव्हते. ते पूर्ण भारतासाठी मागितले होते. वास्तविक  त्यांना त्यांच्या प्रांतासाठीही लढता आले असते. पण त्यांनी तसे केले नाही. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->गांधींनी गुजरातसाठी, टिळक-सावरकरांनी महाराष्ट्रासाठी, सुभाषबाबूंनी बंगालसाठी,  राजेंद्रप्रसादांनी बिहारसाठी, भगतसिंगांनी पंजाबसाठी स्वातंत्र्य मागितले नव्हते. ते पूर्ण भारतासाठी मागितले होते.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण मात्र आता प्रांतीय अस्मितेच्या नावावरून एकमेकांशी लढतो आहोत. स्वतंत्र राज्यांच्या अस्मितांसाठी भांडतो आहोत. उद्या  त्या राज्यांची स्वतंत्र राष्ट्रे व्हावीत यासाठी लढलो तर आश्चर्य वाटायला नको. कारण अस्मितांची टोके एवढी टोकदार झाली  आहेत, की त्याची टोचणी बसायला लागली आहेत. युगोस्लाव्हियाचे विभाजन केवळ वांशिक दृष्टिकोनातून झाले. पण विकासाच्या  पटलावर ही नवनिर्मित राज्ये किती दिसतात? सोव्हिएत संघराज्य तसे मारूनमुटकूनच बनवले होते. ते कोसळून पडले. त्यांच्या  ऐक्यात आणि भारतीय ऐक्यात बराच फरक आहे. भारतीय ऐक्य हे किमान सांस्कृतिक व धार्मिक एकतेतून साधले गेले आहे.  विविधता असली तरीही एकात्मता आहे. म्हणूनच हा देश अजूनही टिकला आहे. तमिळनाडू आणि स्पेनच्या संस्कृतीत काहीही  साम्य नाही. पण तमिळनाडू आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत भिन्नता आढळूनही काहीतरी साम्य आढळेल ते कुटुंब व्यवस्थेपासून  अन्य कितीतरी विषयांमध्ये आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळेच केवळ प्रांतीयतावाद करून भागणार नाही. इतर प्रांतियांविषयी द्वेषभावना बाळगून कुणाचाच विकास होणार नाही. उलट  होत असलेल्या विकासालाच अडसर निर्माण होईल. विकासाची चाके थांबतील. देशाचे ऐक्य धोक्यात येईल आणि त्याचा फायदा  घ्यायला बाकीचे देश टिपलेलेच आहेत. आधीच दहशतवादाने देश पोखरून निघाला आहे. तो आवरता आवरता नाकी नऊ  येताहेत. प्रांतीय आंदोलने वाढली तर या दहशतवादाला खतपाणीच मिळेल. त्यामुळे देशाचे अखंडत्व धोक्यात येईल. विविधता हे वैशिष्ट्य असले तरी त्यातील  एकता हीच आपली ताकद आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 20:16:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[देशभक्तीपर चित्रपट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/देशभक्तीपर-चित्रपट-108081400017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/देशभक्तीपर-चित्रपट-108081400017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#8000FF'>वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला. काहींनी त्याला बटबटीत आणि ओंगळवाणे स्वरूपही दिले. पण तरीही या विषयाची मांडणी प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हा आढावा. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही दिवसात शहीद भगतसिंग यांच्यावरील चित्रपट अचानक वाढले. 1948 मध्ये दिलीपकुमार यांचा शहिद चित्रपट आला होता. तो चित्रपट पाहून त्यांच्या वडिलांनी म्हणे त्यांना सल्ला दिला होता. बेटा, यापुढे ज्यात तू मेलेला दाखवशील असे रोल करू नकोस. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर 1963 मध्ये शम्मीकपूर हेही भगतसिंग यांच्या रूपात पडद्यावर आले होते. पण जंगली शम्मीचे हे शहिद रूप प्रेक्षकांना मात्र फारसे आवडले नाही. 2002 मध्ये तर चार भगतसिंग एकमेकांसमोर ठाकले होते. प्रेक्षकांनी तिघांवर फुली मारली. राजकुमार संतोषी यांचा भगतसिंग पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी झाली. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/14/images/img1080814017_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत कुमार म्हणवल्या जाणाऱ्या मनोजकुमारने देशभक्तीवर बरेच चित्रपट काढले. त्याने शहिद चित्रपटाद्वारे आपल्या भारतपटांची लाट सुरू केली आणि जणू बॉलीवूडमध्ये देशभक्ती वगैरेचे ठेकेदार आपणच आहोत, असा आभास निर्माण केला. उपकारमध्ये मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती असे म्हणणाऱ्या मनोज कुमार यांनी रोटी कपडा और मकानमध्ये झीनत अमानला पावसात चिंब भिजवून (आणि तिचे अंगप्रत्यांग दाखवून) तेरी दो टकीये की नोकरी मे मेरा लाखोंका सावन जाये असे गायला लावले. मनोजकुमारच्या देशभक्तीचा अंदाज हा असा ओलेता होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमिताभचा देशप्रेमीही लोकांना आठवत असेलच. याशिवाय अनेकांनी भारत, देशभक्ती वगैरे दाखवायचा प्रयत्न केला. पण बटबटीत आणि सवंगपणा त्यातून जास्त दिसला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युद्धपट तर अनेक निघाले. त्यात नाव घेण्यासारखे खूप कमी आहेत. त्यात छोटा चेतन, हकिकत असे काही उल्लेखनीय आहेत. अलीकडच्या काळात जे. पी. दत्ता यांनाही देशभक्तीचा फिवर चढला होता. त्यांचा बॉर्डर चांगला बनला आणि गाजलादेखील भरपूर. पण एलओसी (लाईन ऑफ कंट्रोल) च्या बाबतीत लोकांनी एवढा कंट्रोल पाळला की ते थेटरात गेलेच नाहीत. बाकी हिंदूस्थान की कसम सारखे सुमार चित्रपटही बरेच आले. त्यांची दखल न घेतलेलीच बरी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केतन मेहना यांनी 1857 च्या क्रांतीचे बिगूल वाजवून आमिर खानला मंगल पांडे म्हणून सादर केला. चित्रपट बऱ्यापैकी गाजला. यातील मंगलगानही चांगलेच गाजले. आणि चर्चा जास्त झाली ती आमीर खानच्या मंगल पांडेतील नव्या केशभूषेची आणि मिशीची. कोणाचे काय तर कोणाचे काय. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/14/images/img1080814017_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेल्या श्याम बेनेगल यांनी बॉस द फरगॉटन हिरोद्वारे नेताजी बोस या महानायकाला पडद्यावर आणले. याशिवाय मेकिंग ऑफ महात्मा द्वारे त्यांनी महात्मा होण्यापूर्वीच्या गांधींचा वेध घेतला. वेद राही यांनी सुधीर फडके यांचे स्वप्न असलेल्या वीर सावकर या चित्रपटाद्वारे या स्वातंत्र्यसूर्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रियदर्शनने कालापानी मधून देशभक्ती मांडली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आशुतोष गोवारीकरने देशभक्तीला नवे परिणाम दिले. क्रिकेटचे. त्यामाध्यमातून देशभक्ती कशी व्यक्त करता येते, याचे कथानक अतिशय छान गुंफून तसेच मांडले. नुकताच आलेल्या चक दे इंडियामधून हॉकी या राष्ट्रीय खेळाला मांडताना त्यालाही राष्ट्रभक्तीची किनार दिली आहे. एकूण काय देशभक्ती आता सर्वस्पर्शी झाली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 12:08:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कर्नाटकात गांधीजींचे मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/कर्नाटकात-गांधीजींचे-मंदिर-108081400002_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/कर्नाटकात-गांधीजींचे-मंदिर-108081400002_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांचा आदर करतोच. पण कर्नाटकात मात्र गांधीजींचे मंदिर आहे. शिवाय नेहमी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/14/images/img1080814002_1_1.jpg' Alt='gandhi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांचा आदर करतोच. पण कर्नाटकात मात्र गांधीजींचे मंदिर आहे. शिवाय नेहमी देवाची पूजा करतो, तशी त्यांचीही रोज पूजा केली जाते. विशेष म्हणजे आज या काळातही त्यांचे दर्शन घ्यायला गर्दी होत असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वास्तविक आजच्या काळात गांधीजी फक्त नोटेपुरते आणि भाषणापुरते उरले आहेत. राजकारण्यांनी त्यांचे नाव वापरून राजकारण तेवढे केले. पण असे असले तरी गांधींच्या मंदिराच्या रूपाने त्यांचा विचार जपण्याचेही काम एकीकडे केले जात आहे. कर्नाटकाच्या समुद्र किनार्‍यावरील सुंदर शहर असलेल्या मंगलोरपासून तीन किलोमीटरवर हे मंदिर आहे. बंगलोर- मंगलोर महामार्गावर कनकंडी या गावात श्री ब्रह्म बैदरकला गराडी क्षेत्र आहे. याच्या आवारातच गांधीजींचे मंदिर आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा मंदिर परिसर आगळा आहे. मुख्य मंदिर हे तुलू गावातील लढवय्ये तरूण कोटी व चेन्नय्या या बंधूंच्या स्मृत्यर्थ बांधले आहे. त्यालाच ब्रह्म बैदरकला गराडी क्षेत्र असे म्हणतात. त्यांच्या बहिणीचे मायंदलचेही येथे मंदिर आहे. त्याचबरोबर ब्रह्मर्षी नारायण गुरू, गणपती बालपरमेश्वरी, आनंद भैरव, सुब्रमण्य यांचीही मंदिरे या आवारात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गराडी ही एक पारंपरिक व्यायामशाळा आहे. येथे मार्शल आर्टसह तलवारीसारख्या शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाई. कोटी व चेन्नयाना यांनी येथेच शस्त्र प्रशिक्षण घेतले. त्यांच्या शौर्यामुळेच या परिसरात विशेषतः तुळू भाषिकांमध्ये त्यांच्या नावाने एका पंथाची सुरवात झाली. हे दोघे बंधू त्या परमेश्वराचे अवतार आहेत, अशी त्यांची श्रद्धा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गराडी क्षेत्राची स्थापना ४ मार्च १८७४ मध्ये झाली. पण १२ डिसेंबर १९४८ ला या क्षेत्राचे व्यवस्थापक सोमाप्पा पंडित व अध्यक्ष नरसप्पा सालियन यांनी येथे गांधीजींचे मंदिर उभारण्याचे ठरविले व या क्षेत्राला शांतता व अहिंसेचे केंद्र बनविण्याचे ठरविले. वेंकप्पा पूजारी यांनी लगोलग गांधीजींची मूर्ती भेट दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इतर मंदिरांप्रमाणे येथेही गांधीजींची रोज पूजा केली जाते. त्यासाठी एक पुजारीही आहे. तो रोज येथे दूध, केळी व भात ठेवतो. गांधी जयंतीच्या दिवशी तर विशेष पूजा केली जाते. शिवाय मिरवणूकही काढली जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या मंदिरातील गांधीजींची मूर्ती लोभस आहे. ते पुस्तक वाचण्याच्या पवित्र्यात आहेत, अशी त्यांची मूर्ती आहे. येथे भेट देणारी मंडळी गांधीजींच्या मंदिराला भेट देण्यास अजिबात विसरत नाहीत. कारण याच साबरमतीच्या संताने सत्य आणि अहिंसेचे शिकवण लोकांना दिली आणि त्याच बळावर स्वातंत्र्य खेचून आणले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गांधीजींच्या जयंती आणि पुण्यतिथीदिनी येथे गर्दी होतेच. शिवाय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनीही येथे कार्यक्रम होतात. आता हे मंदिर आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत चालले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 08:58:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/राष्ट्रध्वज-फडकवण्याची-नियमावली-108081400001_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/राष्ट्रध्वज-फडकवण्याची-नियमावली-108081400001_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/14/images/img1080814001_1_1.jpg' Alt='flag' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात. (स्त्रोत- वार्ता) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Aug 2008 08:58:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[देशभक्तीची प्रेरणा देणारे नायक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/देशभक्तीची-प्रेरणा-देणारे-नायक-108081300015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/देशभक्तीची-प्रेरणा-देणारे-नायक-108081300015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[आजपर्यंत बॉलीवूडमध्ये देशभक्तीवर आधारित बरेच चित्रपट प्रदर्शित झाले व होत आहेत. आपल्या देशाप्रती एकनिष्ठ होऊन रणभूमीवर लढणार्‍या बॉलीवूडमधील नायकांना रुपेरी पडद्यावर पाहून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>आजपर्यंत बॉलीवूडमध्ये देशभक्तीवर आधारित बरेच चित्रपट प्रदर्शित झाले व होत आहेत. आपल्या देशाप्रती एकनिष्ठ होऊन रणभूमीवर लढणार्‍या बॉलीवूडमधील नायकांना रुपेरी पडद्यावर पाहून प्रेक्षकांमध्ये देशभक्तीच्या भावना जागृत होताना दिसतात. आपले शत्रू राष्ट्र समजले जाणार्‍या पाकिस्तानविरुद्ध फुकारलेले युद्ध असो वा दहशतवाद्यांशी केलेले दोन हात. प्रेक्षकांना हे सारे पडद्यावर पहायला फार आवडते, हेच या चित्रपटांना मिळालेल्या यशावरून सिद्ध होते. </font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बॉलीवूडमध्ये देशभक्तीवर आधारित बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत व आगामी काळात मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. रणभूमीवरील युद्धाचा प्रसंग पाहून आजच्या काळातील युवकांचे बाहूही फुरफुरत आहेत. चित्रपटांमधील देशभक्तीची भावना ओतप्रोत भरलेल्या भूमिकांमधील नायक आजच्या सळसळत्या तरुणाईला प्रेरणा देणारे ठरले आहेत. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/13/images/img1080813015_1_1.jpg' Alt='sanjay' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> 1960 <font  style='font-size:11pt; color:#000000'>ते 1980च्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या 'शहीद' व 'उपकार' या चित्रपटांनी नायक मनोज कुमारची ''देशभक्त भारत कुमार'' म्हणून नवीन ओळख करून दिली. तर 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मूलमंत्र देणारा नायक संजय दत्तच्या 'लीला' जगजाहीर असूनही समाजाने संजयला चित्रपटातील मुख्य भूमिकेत स्वीकारले. एवढेच नव्हे तर त्याने दिलेल्या 'गांधीगिरी'चा उपदेश ऐकून रोजच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बॉलीवूडमधील काही नायकांनी देशभक्तिपर चित्रपटामधील मुख्य भूमिका साकारून आज इतिहास जमा झालेल्या शहिदांना रुपेरी पडद्यावरच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनातही जिवंत केले आहे. त्यातील काही नायकांची चित्रपट व त्यांनी साकारलेल्या भूमिका....</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/13/images/img1080813015_1_2.jpg' Alt='gadar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>तारासिंग- सनी देवल </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>गदर- एक प्रेम कथा' या चित्रपटातील तारासिंग नावाचे पात्र सनी देवलने साकारले. तारासिंगला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चित्रपटात भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या फाळणीचा प्रसंग दाखविण्यात आला आहे. त्यात तारासिंग व सकीना( अमिषा पटेल) यांची प्रेम कहाणीतून त्यांचा विवाह व त्यानंतर त्यांच्या झालेली ताटातूट, आणि सकिनाला परत आणण्यासाठी गेलेला तारासिंग अशी ही कथा. तारासिंगची भूमिका काहीशी आक्रस्ताळी वाटत असली तरी सनी देओलने ती जिवंत केली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याचा आक्रमकपणा अनेकांत देशभक्तीची भावना जागृत करण्यास कारणीभूत ठरला. चित्रपटातील संवादांमधून त्या काळचे चित्रही बर्‍यापैकी उभे रहाते.   </font><font style=' color:#FF0080;'><b></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/13/images/img1080813015_1_7.jpg' Alt='aamir' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>अजयसिंग राठोड- अमीर खान </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>सरफरोश'मधील अमीर खानची एसीपी राठोडची भूमिका तरुणाईला आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहण्याच्या प्रेरणा देते. आपल्या कुटुंबियाच्या सेवेसह देशाच्या रक्षणासाठी राज्यांच्या सीमांतर्गत होणारी शस्त्रांची तस्करी करणार्या दहशतवाद्यांना पकडण्यात तो यशस्वी झाल्याचे दाखविले आहे. </font><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/13/images/img1080813015_2_1.jpg' Alt='anil kapoor' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>शिवाजीराव गायकवाड- अनिल कपू</font><font style=' color:#000000;'>र</b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>नायक'मध्ये अनिल कपूरने शिवाजीराव गायकवाडची भूमिका केली आहे. पत्रकारापासून ते एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना न्याय दिला आहे. भ्रष्ट मंत्री व पुढारी यांचे पितळ जनतेसमोर उघडे करून त्यांना तरुंगाची हवा खायला पाठविल्याचे दाखविण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारीत असा हा चित्रपट आहे. मराठी जनतेने या 'नायक'चे जोरदार स्वागत केले होते. राजकारणी देशाला आतून पोखरत असल्याचे या चित्रपटात दाखविले आहे.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/13/images/img1080813015_2_2.jpg' Alt='aamir' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>रंग दे बसंतीमधील मैत्र</font><font style=' color:#000000;'>ी</b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>रंग दे बसंती' या चित्रपटातील दलजीत, करण सिंघानीया, असलम, सुख्खी,  लक्ष्मण पांडे या पात्रांनी तरूणाईमधील निस्सीम मैत्रीच्या भावना जागृत केल्या आहेत. तरुणांना प्रशासनाविरूद्ध लढताना दाखविले आहे. अमीर, सोहा, सिद्धार्थ, कुणाल कपूर, शर्मन जोशी, अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली पात्रे व त्यांच्यात असलेली मैत्री मस्तपैकी जमून आली आहे. त्यांच्या मैत्रीतून राष्ट्रप्रेम जागृत झाले आहे. '</font><font style=' color:#8000FF;'>जिंदगी जीने के सिर्फ दो ही तरीके होते है- एक, जो हो राहा है होने दो, बर्दाश्त करते जाओ या फिर जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की' </font><font style=' color:#000000;'>हा डायलॉग तर खूप प्रसिद्ध झाला.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/13/images/img1080813015_2_3.jpg' Alt='sharukh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>कबीर खान- शाहरूख खान </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>चक दे इंडिया' या चित्रपटात महिला हॉकी चमूच्या कोचची भूमिका शाहरूख खानने साकारले आहे. देशाच्या भिन्न राज्यांतून आलेल्या मुलींमध्ये एकसूत्रीपणा निर्माण करून त्यांना वर्ल्ड हॉकी चॅंपियनशिप मिळविण्यासाठी प्रेरीत करण्याचे काम कबीर खान म्हणजेच शाहरूख खानने केले आहे. महिला हॉकीचा चमू अंतिम फेरीत पोहचतो. अंतिम फेरीच्या एक दिवस अगोदर मैदानावर कबीर खान हॉकी चमू प्रमुखाला भारतांचा झेंडा पहिल्यांदा इंग्रजी व्यक्तीला फडकावताना पाहत असल्याचे सांगताना दाखविले आहे. यातून देशभक्तींच्या भावना प्रकट होतात. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बॉलीवूडमध्ये देशभक्तीवर आधारित वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट तयार झाले आहेत. हे चित्रपट समाजातील प्रत्येक नागरिकांना देशाप्रती प्रेरणा देणारे ठरले आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 13 Aug 2008 15:57:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अहिंसात्मक क्रांतीबाबत समाधानी नव्हतो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/अहिंसात्मक-क्रांतीबाबत-समाधानी-नव्हतो-108081200034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/अहिंसात्मक-क्रांतीबाबत-समाधानी-नव्हतो-108081200034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते पुस्तकात म्हणतात, कॉंग्रेस कार्यकारी समितीचा यासंदर्भातील ठराव प्रकाशित झाल्यावर संपूर्ण देशात उत्साहाची लहर पसरली. ठरावात कोणत्या बाबींचा समावेश आहे हे माहीत नसतानाही ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेस जनआंदोलन उभारणार असल्याची अनुभूती जनसामान्यांना झाली होती. काही दिवसातच सरकार व नागरिक 'भारत छोडो आंदोलना'च्या स्वरूपाबाबत चर्चा करू लागले. ठराव मंजूर केल्यानंतर कार्यकारी समितीने सरकारची प्रतिक्रिया अजमावण्याचा निर्णय घेतला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारने मागणी मान्य केली किंवा सामंजस्याचा निर्णय घेतल्यास चर्चेचा पर्याय खुला राहील, नाहीतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली संघर्षास सुरुवात करता येईल, असे ठरविण्यात आले होते. कार्यकारी समितीच्या निर्णयाबाबत उत्सुकता असल्याने देशा-परदेशातील पत्रकारांनी वर्धा गाठले होते. गांधीजींनी पंधरा जुलैला पत्रकार परिषद बोलावली. गांधींनी एका प्रश्नाच्या उत्तरात आंदोलनास सुरूवात झाल्यास ती ब्रिटिशाविरुद्ध अहिंसात्मक क्रांती असेल, असे सांगितले. मला मात्र हे फारसे पटत नव्हते. हे आता मान्य करण्यास काही हरकत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरळ सरळ कारवाई करावी या बाजूचा मी होतो. कारण या ठरावाबाबत मी आशावादी नव्हतो. सरकारची प्रतिक्रिया काय असेल याविषयी माझा अंदाज निश्चित होता. गांधी किंवा त्यांच्या प्रतिनिधीस व्हाईसरायने भेटण्यास असर्मथता दर्शवल्याचे मला आश्चर्य वाटले नाही. या घटनेनंतर मी अखिल भारतीय कॉंग्रेसची बैठक बोलावून या मुद्यावर गांभीर्याने विचार करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सात ऑगस्ट 1942 रोजी बैठक बोलावण्यात आली. गांधीनीही आपले विचार मांडले. दोन दिवसाच्या विचारविनिमयानंतर साम्यवाद्यांच्या विरोधानंतर आठ ऑगस्टला सायंकाळी 'भारत छोडो' हा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर झाला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:51:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी तिरंगा बोलतोय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/मी-तिरंगा-बोलतोय-108081200033_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/मी-तिरंगा-बोलतोय-108081200033_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/12/images/img1080812033_1_1.jpg' Alt='tiranga' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रिय भारतवासीयांनो, </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आले ते रेशमी खादी आणि सुती खादीमध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला. </font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम तुम्हाला माहित हवेत. ते आता सांगतो. भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:३ असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चोवीस आर्‍या असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढर्‍या रंगाच्या पट्टीच्या रूंदीएवढा असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीचा एक वर्ग फूट कपड्याचे वजन २०५ ग्रॅम व्हायला हवे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासाठी हाताने तयार केलेल्या खादीचे उत्पादन स्वातंत्र्य सेनानींच्या गरग नावाच्या गावत केले जाते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यात बंगळूर- पुणे रस्त्यावर हे गाव आहे. येथे या केंद्राची स्थापना १९५४ मध्ये करण्यात आली. मात्र, आता शहाजानपूर येथील ऑर्डिनेन्स क्योरिंग फॅक्टरी, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई व खादी ग्रामोद्योग आयोग दिल्ली येथेही माझे उत्पादन होऊ लागले आहे. माझी निर्मिती खासगी तत्वावरही होऊ शकतो. मात्र, माझा मानसन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी आयएसआय मार्क हवा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगतीही कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:49:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सुरवातीपासूनच माझा फाळणीला विरोधच]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/सुरवातीपासूनच-माझा-फाळणीला-विरोधच-108081200032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/सुरवातीपासूनच-माझा-फाळणीला-विरोधच-108081200032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांची बाजू न्याय्य असल्याचा विचार आपण करत असल्याचे पाहून मी तर चकित झालो आहे, आणि म्हणूनच कदाचित तुम्ही जिना]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>महात्मा गांधी यांचे लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र.... </b></font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/12/images/img1080812032_1_1.jpg' Alt='gandhi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांची बाजू न्याय्य असल्याचा विचार आपण करत असल्याचे पाहून मी तर चकित झालो आहे, आणि म्हणूनच कदाचित तुम्ही जिना यांच्या मागणीला जास्त महत्त्व देत आहात. माझे स्पष्ट मत आहे की हे शक्य नाही. तुलनाच जर करायची असेल तर सातत्यतेशी करा. तुम्हाला कायदे आझम जीना कॉंग्रेसच्या तुलनेत जास्त समजूतदार आणि न्यायप्रिय वाटत असतील, तर मग तुम्ही मुस्लिम लीगच्या नेत्यांशीच सल्ला मसलत केली पाहिजे. आणि मुक्तपणे त्यांची धोरणे स्वीकारली पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कायदे आझम जीना यांना अनुकूल अशा पद्धतीने कॉंग्रेसचे मंत्री सरकार चालवत नसल्याने, जीना तुम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत सत्ता हस्तांतरणाला विरोध करतील, असा इशारा तुम्ही दिला आहे. माझ्यासाठी चिंता आणि आश्चर्याचे मिश्रण असलेले हे वृत्त आहे. मी सुरवातीपासूनच फाळणीला विरोध केला आहे. फाळणीची सूचना करणे ही ब्रिटिश साम्राज्याने सुरवातीलाच केलेली घोडचुक आहे. याही क्षणी तुम्ही ही चुक सुधारू शकता. पण मनातील किल्मिष आणि कटूता वाढविणे हे काही योग्य नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंग्रजांच्या उपस्थितीत विभाजन न झाल्यास बहुसंख्याक हिंदू मुसलमानांना गुलाम बनवून राज्य करतील आणि त्यांना कधीच न्याय मिळणार नाही, या आपल्या धारणेने मी तिसर्‍यांदा चकित झालो आहे. आपल्या मनातील ही धारणा निराधार आहे. हिंदूंची संख्या येथे महत्त्वाची नाही. एक लाखापेक्षा कमी असलेल्या इंग्रजांनी चाळीस कोटी भारतीयांवर दडपशाही करून राज्य केलेच ना. ठीक आहे, आपल्या विचारार्थ मी पाच सूचना पाठवत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कॉंग्रेसने अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे, की कोणत्याही प्रांताला जबरदस्तीने भारतात सामील करण्यात येणार नाही. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजात एवढी ताकद नाही की ते दहा कोटी मुसलमानांवर दडपशाही करू शकतील. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>मोगलांनीही इंग्रजांप्रमाणेच हिंदूस्थानावर मोठ्या कालखंडात राज्य केले आहे. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>मुसलमानांनी आपल्याबरोबर हरीजन आणि आदिवासींना आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न केला आहे. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>जे मुसलमांवर दडपशाही करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जाते, ते सवर्ण हिंदू संख्येने अगदी नगण्य आहेत. यातील राजपुतांमध्ये अद्याप राष्ट्रीयतेचा उदय झालेला नाही. ब्राह्मण आणि वैश्यांना शस्त्र पकडताही येत नाही. त्यांची सत्ता असलीच तर ती नैतिक आहे. शूद्र हरीजनांमध्ये गणले जातात. असा हिंदू समाज केवळ बहुसंख्याक असल्याने मुसलमानांवर दडपशाही करून त्यांना समूळ नष्ट करून टाकेल, ही अगदी कपोलकल्पित कहाणी आहे. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळे आपल्या हे लक्षात आले असेल की सत्य आणि अहिंसेच्या नावावर मी एकटाच उरेल. आणि अहिंसेचा अधार असलेल्या पुरूषापुढे अणूशक्तीसुद्धा क्षुद्र असते. तेथे नौदलाची काय कथा. मी हे पत्र माझ्या मित्रांना दाखविलेले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>सादर</font><font style=' color:#8000FF;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>मोहनदास करमचंद गांधी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>दिनांक २८ जून १९४७  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:44:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नियतीशी केलेला करार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/नियतीशी-केलेला-करार-108081200031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/नियतीशी-केलेला-करार-108081200031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/12/images/img1080812031_1_1.jpg' Alt='karar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>चौदा ऑगष्टच्या रात्री दिल्लीत घटना सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले भाषण..... </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा ये</font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे योग्य ठरेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इतिहासाच्या उषःकालात भारताने स्वतःच्या शोधास अनंतात प्रारंभ केला. या काळातील अनेक शतके या देशाचे कर्तृत्व, त्याचे यशापयश यांनी भरलेली आहेत. भलेबुरे दिवस येत जात राहिले पण या देशाने आपले स्वत्व शोधण्याचे ध्येय डोळ्यांपुढून हलू दिले नाही. ही शक्ती देणारे आदर्शही तो विसरला नाही. आज आम्ही दुर्भाग्याच्या एका कालखंडावर पडदा पाडतो आहोत. भारताला अखेर स्वत्वाची ओळख झाली आहे. आज आम्ही साजरा करत असलेला आनंदोत्सव म्हणजे आगामी काळात आणखी कीर्ति आणि विजय मिळविण्यासाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे. असा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी यापुढेही मिळणार आहेत. ही संधी साधण्यासाठी आणि भविष्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी आमच्यात तेवढे धाडस आणि बुद्धिकौशल्य आहे? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्य व शक्तीच्या बरोबरच जबाबदारीही वाढते. भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्‍या या सभेवर ही जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या जन्मापूर्वी आपण सर्व प्रसववेदना सहन केल्या. त्याच्या स्मृती हृदयात जतन करून ठेवल्या आहेत. यातील काही वेदनांची ठसठस आजही होतेय, पण तरीही भूतकाळ संपून भविष्याचे आव्हान आपल्यासमोर आहे हेही विसरता कामा नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे भविष्य आरामात घालवण्यासाठी वा विश्रांती घेण्यासाठी नाही. आतापर्यंत आपण जे संकल्प केले आणि आजही करत आहोत, त्यांना पूर्ण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहण्यासाठी आहे. भारताची सेवा म्हणजे कोट्यवधी दीनदलितांची सेवा आहे. याचा अर्थ दारिद्र्य, अज्ञान व संधीची विषमता आपल्याला संपवावी लागणार आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसले पाहिजेत, अशी आमच्या पिढीतील सर्वांत मोठ्या व्यक्तीची आकांक्षा आहे. कदाचित हे आपल्या क्षमतेपलिकडील असेल. पण जोपर्यंत अश्रू आहेत, दुःख आहेत, तोपर्यंत आपले काम पूर्ण होणार नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच आम्हाला काम करायचे आहे. परीश्रम घ्यायचे आहेत. ही स्वप्ने केवळ भारताची नसून वैश्विक आहेत. वैश्विक वातावरणात देश व नागरिकांची ‍वीण परस्परांशी इतकी जुळलेली आहे की तिला अलिप्त करता येणार नाही. शांततेच्या संदर्भात असे म्हटले जाते की तिचे विभाजन करता येत नाही. स्वातंत्र्याचेही आणि आता समृद्धीचेही तसेच आहे. इतकेच काय पण संकटांनाही विभक्त करता येत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या भारतीयांचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या पाठिशी विश्वासाने आणि निश्चयपूर्वक उभे रहावे. कुणावरही फुटकळ आणि विखारी टीकेची ही वेळ नाही. त्याचवेळी दुसऱ्यांवर आरोप करण्याची सुद्धा ही वेळ नाही. आपली आगामी पिढी सुखासमाधानाने राहू शकेल अशा बलाढ्य व विशाल भारताची इमारत आपल्याला उभारायची आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महोदय, मला हा प्रस्ताव मांडण्याची परवानगी द्यावी - </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे मनाशी पक्के ठरवा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1. <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>मध्यरात्रीचे टोले पडल्यानंतर याप्रसंगी उपस्थित घटना सभेच्या सदस्यांनी अशी शपथ द्यावी की- </font><font style=' color:#000000;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, मी भारतीय घटना सभेचा सदस्य, भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवी कल्याण साधण्यासाठी मी सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2. <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जे सदस्य यावेळी उपस्थित नाहीत. ते पुढील वेळी या अधिवेशनात उपस्थित असतील त्यावेळी त्यांनी ही शपथ घ्यावी. (सभापतींनी निश्चित केलेल्या काही शाब्दिक बदलासह)</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रकाशन विभागाकडून प्रकाशित 'जवाहरलाल नेहरू के भाषण' या पुस्तकातून साभार ) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:41:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लालबहादुर शास्त्री]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/लालबहादुर-शास्त्री-108081200030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/लालबहादुर-शास्त्री-108081200030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. एका दिवशी ते कापड गिरणी पाहण्यासाठी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>जन्म: २ ऑक्टोबर, १९०४ </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मृत्यू: ११ जानेवारी, १९६</font><font style=' color:#000000;'>६</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. एका दिवशी ते कापड गिरणी पाहण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर गिरणीचा मालक, उच्च अधिकारी व इतर महत्त्वाचे लोक होते. गिरणी पाहिल्यानंतर शास्त्रीजी गिरणीच्या गुदामात गेल्यानंतर त्यांनी साड्या दाखवायला सांगितले. गिरणी मालक आणि अधिकार्‍याने एकापेक्षा एक सुंदर साड्या त्यांना दाखवल्या. शास्त्रीजी साड्या पाहून म्हणाले,' साड्या तर खूप सुंदर आहेत, यांची किंमत काय आहे?'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>' <font  style='font-size:11pt; color:#000000'>ही साडी ८०० रूपयांची आहे आणि हिची किंमत एक हजार रुपये आहे,' गिरणी मालकाने सांगितले. ही तर खूप महाग आहे, मला कमी किमतीच्या साड्या दाखवा, शास्त्रीजी म्हणाले. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट होती की ही घटना १९६५ ची होती, यावेळी एक हजार रुपयांची किंमत खूप होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>बरं, ही पाहा. ही साडी पाचशे रुपयांची आहे आणि ही चारशे रुपयांची,' गिरणी मालक दुसर्‍या साड्या दाखवत म्हणाला. 'अरे बाबा, यादेखिल खूप महाग आहेत. माझ्या सारख्या गरीबासाठी कमी किमतीच्या साड्या दाखवा, ज्या मी खरेदी करू शकेल,' शास्त्रीजी म्हणाले. ' वा सरकार, आपण तर आमचे पंतप्रधान आहात, तुम्हाला गरीब कसे म्हणता येईल? आम्ही तर या साड्या तुम्हाला भेट देत आहोत,' गिरणी मालक बोलला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>' <font  style='font-size:11pt; color:#000000'>नाही बाबा, मी भेट घेऊ शकत नाही', शास्त्रीजी म्हणाले. यावर तो गिरणी मालक अधिकाराने म्हणाला की, 'आम्ही आमच्या </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधानांना भेट देणे, हा आमचा अधिकार आहे.'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>' <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>हो, मी पंतप्रधान आहे,' शास्त्रीजी शांतपणे म्हणाले.' परंतु, याचा अर्थ असा नाही की ज्या वस्तू मी खरेदी करू शकत नाही त्या वस्तू मी भेट म्हणून स्वीकारू आणि आपल्या पत्नीला देऊ. बाबा, मी पंतप्रधान असलो तरी आहे गरीबच ना. तुम्ही मला स्वस्त साड्याच दाखवा. मी ऐपतीप्रमाणेच साडी खरेदी करेन.'</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गिरणी मालकाच्या सार्‍या विनवण्या व्यर्थ गेल्या. देशाच्या पंतप्रधानांनी स्वस्त भावाच्या साड्याच खरेदी केल्या. शास्त्रीजी एवढे महान होते की मोह त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:35:29 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महात्मा गांधी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/महात्मा-गांधी-108081200028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/महात्मा-गांधी-108081200028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/12/images/img1080812028_1_1.jpg' Alt='gandhiji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महात्माजींची जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला. तेथेच त्यांनी १९०३ मध्ये इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. १९१४ मध्ये ते भारतात परतले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. १९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, १९४०-४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सार्‍यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/12/images/img1080812028_1_2.jpg' Alt='gandhiji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे सहा मे १९४४ ला त्यांना सोडणअयात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोआखालीत सुरू असेलली जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणार्‍या महात्मा गांधींना एका असंतुष्टाने तीस जानेवारी १९४८ मध्ये गोळी घातली. त्यातच त्यांचे निधन झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे... व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांनी सुरू केलेल्या 'हरीजन' वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, रणनीती यांचेही विवरण असायचे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते, असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता. यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:30:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विनायक दामोदर सावरकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/विनायक-दामोदर-सावरकर-108081200027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/विनायक-दामोदर-सावरकर-108081200027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ब्रिटिशांविरोधात क्रांतीची ज्योत पेटवून त्यात स्वतःच्या आयुष्याची आहूती देणारे वीर सावरकर म्हणजे एक धगधगते जीवन आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्म झालेल्या विनायक दामोदर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/12/images/img1080812027_1_1.jpg' Alt='savarjar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटिशांविरोधात क्रांतीची ज्योत पेटवून त्यात स्वतःच्या आयुष्याची आहूती देणारे वीर सावरकर म्हणजे एक धगधगते जीवन आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्म झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या शिवाजी हायस्कूलमदून झाले. येथून 1901 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. अभ्यासात त्यांना विशेष रुची होती. लहानपणी त्यांनी काही कविताही रचल्या होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काम करण्याकरता त्यांनी गुप्तपणे 'मित्र मेळा' संस्थाही चालवली होती. अभिनव भारत ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. बंगालच्या फाळणीनंतर त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळीही केली. पुण्यात फर्गसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी दिलेली भाषणे राष्ट्रभक्तीने ओसंडून वाहणार्‍या खळाळत्या झर्‍यासारखीच होते. टिळकांच्या शिफारशीने त्यांना 1906 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली आणि ते लंडनला गेले. 'इंडियन सोशोलॉजिस्ट व तलवार या वृत्तपत्रातून त्यांनी अनेक लेख लिहिले. ते नंतर कलकत्ता येथील 'युगांतर' मध्येही प्रकाशित झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रशियन क्रांतिकारकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. लंडनच्या वास्तव्यात त्यांची गाठ लाला हरदयाल यांच्याशी पडली. हरदयाल तेथे इंडिया हाउस चालवायचे. मदनलाल धिग्रास फाशी दिल्यानंतर त्यांनी 'लंडन टाइम्स' मध्येही एक लेख लिहिला होता. धिंग्रांचे म्हणणे मांडणारी पत्रके त्यांनी वाटली. त्यांचे जहाल विचार अडचणीचे ठरतील हे हेरून त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली. तेथून बोटीने भारतात आणताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ बोटीतून उडी गाठून बंदर गाठले. पण फ्रान्सच्या सैनिकांनी त्यांना परत ब्रिटिशांच्या ताब्यात दिल्याने त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात त्यांच्यावर खटला चालवून त्यांना पन्नास वर्षांच्या दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी ब्रिटिश शासन तरी शंभर वर्षे टिकेल काय असा प्रश्न विचारला. १९११ ते १९२१ पर्यंत ते अंदमान तुरुंगात राहिले. २१ मध्ये काही अटींवर त्यांना भारतात परत आणले. त्यानंतर तीन वर्षे ते नजरकैदेत होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुरूंगाच्या कालावधीत त्यांनी हिंदुत्वावर शोध ग्रंथ लिहिला. १९३७ मध्ये त्यांची हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. १९४३ नंतर त्यांचे दादर, मुंबई येथे त्यांचे वास्तव्य होते. ते अखेरपर्यंत अखंड भारताचे पुरस्कर्ते राहिले. स्वातंत्र्यप्राप्तीबद्दल गांधीजी व सावरकरांच्या विचारधारेत भिन्नता होती. सावरकरांनी १८५७ वर पुस्तक लिहून तोपर्यंत बंड म्हणून हिणवण्यात येत असलेल्या या लढ्याला स्वातंत्रसमर संबोधले. २६जानेवारी १९६६ मध्ये प्रायोपवेशन करून त्यांनी प्राण सोडले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:28:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवराम हरी राजगुरू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/शिवराम-हरी-राजगुरू-108081200026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/शिवराम-हरी-राजगुरू-108081200026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व 'हिंदुस्थान सोशालिस्ट]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी'चे सदस्य झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंह़, यतीनदास यांच्यासोबत त्यांनी पंजाब, कानपूर, आग्रा व लाहोरामध्ये ब्रिटिशाविरुद्ध असंतोष पेटवून जहाल विचारसरणीचा प्रसार केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सायमन कमिशनविरुद्ध 30 ऑक्टोबर, 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर, 1928 ला त्यांचे निधन झाले. क्रांतिकारकांनी लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी मोहीम आखली. भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लालजींवर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स लाहोरामधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली. तो दिवस होता 17 डिसेंबर, 1928. यानंतर 20 डिसेंबराला लाहोर सोडून तिघेही भूमिगत झाले. राजगुरू 30 डिसेंबर, 1929 मध्ये पुण्यात पकडले गेले. लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटला चालला. त्यापैकी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लाहोर तुरुंगात 23 मार्च, 1931 रोजी फासावर चढून वीरमरण पत्करले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:25:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चाफेकर बंधू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/चाफेकर-बंधू-108081200025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/चाफेकर-बंधू-108081200025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[चाफेकर बंधूंचा जन्म कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->एकाच कुटुंबातील तीनही भाऊ भारतमातेस पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वत:चा प्राण अर्पण करतात, हे शौर्याच्या गाथेतील एकमेव उदाहरण आहे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>चाफेकर बंधूंचा जन्म कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरीत होऊन चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्‍या ब्रिटीशांबिरूद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरूवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंगटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी रॅडला भारतात पाचारण केले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथील निवास्थानातून बाहेर पडलेल्या रॅड ह्याचेवर जवळून गोळ्या झाडल्या. वेळ होती 22 जून 1897 सालच्या मध्यरात्रीची. रॅड मरण पावला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व 18 एप्रिल 1898 रोजी त्यास फासावर चढवण्यात आले. त्यापाठोबाठ वासुदेवाला 8 मे 1899 व बाळकृष्णाला 16 मे 1899 रोजी फासावर चढवण्यात आले. भगतसिंह़ राजगुरू व सुखदेवप्रमाणेच चाफेकर बंधूही शहीद झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चाफेकर बंधूचे बलिदान एकोणविसाव्या शतकाच्या शेवटची सर्वात उल्लेखनीय घटना होय. स्वातंत्रलढ्यात बलिदानाची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील तीनही भाऊ भारतमातेस पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वत:चा प्राण अर्पण करतात, हे शौर्याच्या गाथेतील एकमेव उदाहरण आहे. पारतंत्र्य व परिकीयांचे भारतीय परंपरा व संस्कृतीवरील आक्रमण त्यांना कदापि मान्य नव्हते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:23:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वासुदेव बळवंत फडके]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/वासुदेव-बळवंत-फडके-108081200024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/वासुदेव-बळवंत-फडके-108081200024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ब्रिटिशांच्या दडपशाहीची आणि पारतंत्र्याची जाणीव त्यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्द बंड पुकारले. त्यांनी गावोगाव भटकत ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करत बंडाची पार्श्वभूमी तयार केली. गनिमी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->विजापूर जिल्ह्यात 20 जुलै1879 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पुण्यात तीन नोव्हेंबर 1879 रोजी राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके लहानपणापासूनच तडफदार व्यक्तिमत्त्वाचे होते. शिक्षणात त्यांचे मन विशेष रमले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी प्राथमिक शाळेत प्रवेश केला. हायस्कूल शिक्षणासाठी पुणे गाठून त्यांनी इंग्रजीचे शिक्षण घेतले. त्यांनी रेल्वेत लिपिकाची नोकरी केली. त्यानंतर 1864 मध्ये लष्कराच्या वित्त विभागात दाखल झाले. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी नोकरी सोडून दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटिशांच्या दडपशाहीची आणि पारतंत्र्याची जाणीव त्यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्द बंड पुकारले. त्यांनी गावोगाव भटकत ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करत बंडाची पार्श्वभूमी तयार केली. गनिमी कावा ही शिवकाळातील युक्ती त्यांनी आपल्या संघर्षासाठी उपयोगात आणली. या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटिश शासनाने त्यांच्या अटकेसाठी बक्षीस घोषित केली. १८७०- ७८ दरम्यान पडलेल्या दुष्काळात शेतकर्‍यांच्या दयनीय परिरिस्थतिविरूद्ध त्यांनी आवाज उठविला. आपल्या तडफदार भाषणातून त्यांनी स्वातंत्र्याची सिंहगर्जना केली. आमसभांच्या माध्यमातून त्यांनी देशाची हलाखीची स्थिती देशवासीयांसमोर मांडली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यच सर्व समस्यांचे समाधान असल्याचे त्यांचे मत होते. विजापूर जिल्ह्यात 20 जुलै1879 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पुण्यात तीन नोव्हेंबर 1879 रोजी राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्यांना जन्मठेप झाली. तुरूंगात असतानाच क्षयाने त्यांचे निधन झाले. भारतीयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत जागवण्याचे महान कार्य त्यांनी केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:21:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाळ गंगाधर टिळक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/बाळ-गंगाधर-टिळक-108081200023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/बाळ-गंगाधर-टिळक-108081200023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA['स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच', या सिंहगर्जनेने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणारे व देशबांधवात स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करणारे महान देशभक्त]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/12/images/img1080812023_1_1.jpg' Alt='tilak' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> '<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच', </b>या सिंहगर्जनेने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणारे व देशबांधवात स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करणारे महान देशभक्त बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी तालुक्यातील चिखली या खेडेगावांत झाला. त्यांचे वडील पंडित गंगाधर टिळक विद्वान शिक्षक होते. टिळकांच्या लहान वयातच वडिलांचे निधन झाले. आईनेच त्यांचे पालन पोषण केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बालवयापासूनच आईने सांगितलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या शौर्यकथांनी त्यांचे मन देशभक्तीने ठासून भरले गेले. कला शाखेत पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. वकिली पेशास प्रतिष्ठेसोबतच चांगली कमाई असल्याने त्या दिवसात या पदवीस विशेष महत्त्व होते. मात्र, टिळकांनी शांत व सुरक्षित जीवनाऐवजी इंग्रजाविरुद्ध दंड थोपटून स्वातंत्र्य संग्रामात स्वत:स झोकून दिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजजागृती व प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक असते. हे हेरून टिळकांनी चिपळूणकर, नामजोशी, आपटे व आगरकर या चार उच्चविद्याविभूषित तरूणांच्या साहाय्याने पुण्यात इंग्लिश स्कूलची स्थापना केली. कमी पैशांत उच्चशिक्षण देण्याच्या ध्येयाने प्रेरीत टिळकांनी येथे अध्यापनाचे काम केले. वर्तमानपत्र जनतेला जागृत करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे हेरून त्यांनी 'केसरी' व 'मराठा' ही अनुक्रमे मराठी व इंग्रजीतील साप्ताहिके सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी सिंहगर्जना करत जुलमी इंग्रजी सत्तेवर आसूड ओढून लोकजागृती केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारच्या अन्याय धोरणांचा त्यांनी अग्रलेखांतून खरपूस समाचार घेतला. सरकारने दडपशाहीचा मार्ग अवलंबत टिळकांना त्यासाठी अनेकदा तुरुंगातही टाकले. ब्रह्मदेशातील मंडाले येथील सहा वर्षांची शिक्षा यात सर्वांत मोठी आहे. टिळकांनी या काळात गीतारहस्य हा गीतेवरील टीका ग्रंथ लिहिला. याशिवाय आर्यांचे मूळ वसतीस्थान या विषयावरही ग्रंथ लिहिला. टिळकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करून स्वातंत्र्यप्राप्तीची इर्ष्या जागवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवजयंती व गणेशोत्सवास व्यापक स्वरूप देऊन त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत पेटवली. स्वातंत्र्य दान मागितल्याने मिळणार नसून त्यासाठी संघर्ष करावा लागेल यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतरच स्वराज्यप्राप्ती हेच कॉंग्रेसचे अंतिम ध्येय असल्याने निश्चित करण्यात आले. ब्रिटिश सत्तेचे आसन खिळखिळे करणार्‍या त्यांच्या डरकाळीमुळेच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले जाते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:20:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ने मजसी ने परत मातृभूमीला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/ने-मजसी-ने-परत-मातृभूमीला-108081200022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/ने-मजसी-ने-परत-मातृभूमीला-108081200022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।
मी नित्य पाहिला होता ॥]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/12/images/img1080812022_1_1.jpg' Alt='savarkar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>ने मजसी ने परत मातृभूमीला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥धृ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी नित्य पाहिला होता ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सृष्टिची विविधता पाहूं ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परि तुवां वचन तिज दिधले ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्वरित या परत आणिन ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वसलो या तव वचनीं । मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तव अधिक शक्त उद्धरणीं । मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही फसगत झाली तैशी ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दशदिशा तमोमय होती ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुणसुमनें मी वेचियली या भावें ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>की तिने सुगंधा घ्यावें ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा व्यर्थ भार विद्येचा ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ती आम्रवृक्षवत्सलता । रे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तो बाल गुलाबहि आतां ॥ रे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फुलबाग मला, हाय पारखा झाला ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥ </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:17:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/जयोस्तुते-श्रीमहन्मंगले-शिवास्पदे-शुभदे-108081200021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/जयोस्तुते-श्रीमहन्मंगले-शिवास्पदे-शुभदे-108081200021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:14:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वन्दे मातरम्‌!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/वन्दे-मातरम्‌-108081200020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/वन्दे-मातरम्‌-108081200020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वन्दे मातरम्‌!
सुजलाम, सुफलाम्‌ मलयज-शीतलाम्‌
शस्यश्यामलाम्‌ मातरम्‌
वन्दे मातरम्‌
शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीम्‌]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/12/images/img1080812020_1_1.jpg' Alt='vande' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुजलाम, सुफलाम्‌ मलयज-शीतलाम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शस्यश्यामलाम्‌ मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुहासिनीम्‌ सुमधुरभाषिणीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुखदाम्‌, वरदाम्‌, मातरम्‌!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:12:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-108081200018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/indepandance-day-marathi/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-108081200018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा
ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-</font><font style=' color:#000000;'>२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी-२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हो गए वतन पे निछावर वो वीर थे कितने गुमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>थे धन्य जवान वो अपने थी धन्य उनकी जवानी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेरों की तरह झपटे थे भारत के बहादुर बेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इस मुल्क की लाज बचाते मर गए बर्फ पर लेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संगीन पर धर कर माथा सो गए वीर बलिदानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कोई सिख कोई जाट मराठा, कोई गोरखा कोई मद्रासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>सरहद पर मरने वाला-२ हर वीर था भारतवासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिन्दुस्तानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थी खून से काया लथपथ काया फिर भी बन्दूक उठाके</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एक-एक ने दस को मारा फिर गए होश गवां के</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब अन्त समय आया तो-२ कह गए कि हम मरते हैं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खुश रहना देश के प्यारों अब हम तो सफर करते हैं।..</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तस्वीर नयन में खींची क्या लोग थे वो अभिमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबान</font><font style='font-size:11pt;'>ी. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Aug 2008 17:07:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
