<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[स्वातंत्र्य दिन]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/independenceday-marathi</link>
    <description><![CDATA[Independence Day In Marathi - 15th August is celebrated as Independence Day of India. Know more about Independence Day in In Marathi language on Independence Day Marathi special page! स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनची संपूर्ण माहिती मराठी ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Fri, 12 Jun 2026 08:40:21 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>स्वातंत्र्य दिन</title>
      <url>https://marathi.webdunia.com/independenceday-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/independenceday-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/independenceday-marathi-1021204.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[नेहरूंनी १७ वेळा फडकवला तिरंगा!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/नेहरूंनी-१७-वेळा-फडकवला-तिरंगा-109081500004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/नेहरूंनी-१७-वेळा-फडकवला-तिरंगा-109081500004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या सहा दशकांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल १७ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. कणखर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/15/images/img1090815004_1_1.jpg' alt='independance day'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PIB</p></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या सहा दशकांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल १७ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या पाठोपाठ १६ वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. पं. जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वतंत्र झाल्यावर पहिल्यांदा १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. २७ मे १९६४ पर्यंत ते पंतप्रधान होते. या कालावधीत त्यांनी १७ स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण केले. गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर या नेत्यांचे दूर्दैव म्हणजे हे दोघेही भारताचे पंतप्रधान तर झाले, मात्र त्यांना स्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहण करण्याची संधीच प्राप्त झाली नाही. नेहरू यांचे निधन झाल्यावर २७ मे १९६४ रोजी गुलझारीलाल नंदा पंतप्रधान झाले. मात्र, १५ ऑगस्टपूर्वी ९ जून १९६४ रोजी त्यांनी हे पद सोडले. त्यांची जागा लाल बहादूर शास्त्री यांनी घेतली. यानंतर गुलझारीलाल नंदा यांनी १९६६ मध्ये केवळ ११ ते २४ जानेवारी या १३ दिवसांत पंतप्रधानपद सांभाळले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्याप्रमाणे चंद्रशेखर १० नोव्हेंबर १९९० रोजी पंतप्रधान झाले. मात्र, २१ जून १९९१ रोजी त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर नंदा काही दिवस पंतप्रधानपदावर होते. यानंतर २४ जानेवारी १९६६ रोजी इंदिरा गांधी यांनी सत्तेची सूत्र सांभाळली. नेहरू यांच्यानंतर सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याचा मान इंदिरा गांधी यांनी पटकवला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंदिरा गांधी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत आणि १४ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर १९८४ पर्यंत भारताच्या पंतप्रधान होत्या. पहिल्या कार्यकाळात त्यांनी ११ वेळा तर दुसर्‍या कार्यकाळात ५ वेळा ध्वजारोहण केले. २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८९ या कालावधीत पंतप्रधान असलेले चौधरी चरणसिंग यांनी एक वेळा ध्वजारोहण केले. त्यांच्याप्रमाणे २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या कालावधीत पंतप्रधान असलेले विश्वनाथ प्रतापसिंग यांनी एकदा, १ जून १९९६ ते २१ जुलै १९९७ या कालावधीतील पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी एकदा आणि २१ एप्रिल १९९७ ते २८ नोव्हेंबर १९९७ या कालावधीतील पंतप्रधान आय.के. गुजराल यांनी एकदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लाल बहादूर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांनी दोन वेळा ध्वजारोहण केले. स्वातंत्र्यदिनाला ५ वेळा किंवा त्यापेक्षा अधिक ध्वजारोहण करण्याची संधी राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी आणि वर्तमान पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना मिळाली आहे. राजीव गांधी यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ ते १ डिसेंबर १९८९ पर्यंत आणि नरसिंहराव २१ जून १९९१ ते १० मे १९९६ पर्यंत पंतप्रधानपदावर होते. या दोन्ही नेत्यांना प्रत्येकी ५ वेळा ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रालोआचे नेतृत्व केलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत सत्तेची सूत्र सांभाळली या कालावधीत त्यांनी ६ वेळा ध्वजारोहण केले. यापूर्वी ते १ जून १९९६ साली पंतप्रधान झाले; परंतु २१ एप्रिल १९९७ रोजी त्यांचे सरकार कोसळले. २००४ साली रालोआचा पराभव करून संपुआ सत्तेत आली व २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून पाच वेळा त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. आज ६३ वा स्वातंत्रदिन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग सहाव्यांदा ध्वजारोहण करून राष्ट्राला उद्देशून भाषण केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 15 Aug 2009 11:17:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महात्मा गांधी यांचे लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/महात्मा-गांधी-यांचे-लॉर्ड-माऊंटबॅटन-यांना-पत्र-109081300066_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/महात्मा-गांधी-यांचे-लॉर्ड-माऊंटबॅटन-यांना-पत्र-109081300066_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांची बाजू न्याय्य असल्याचा विचार आपण करत असल्याचे पाहून मी तर चकित झालो आहे, आणि म्हणूनच कदाचित तुम्ही जिना यांच्या मागणीला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813066_1_1.jpg' alt='gandhi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#008000'><b>कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांची बाजू न्याय्य असल्याचा विचार आपण करत असल्याचे पाहून मी तर चकित झालो आहे, आणि म्हणूनच कदाचित तुम्ही जिना यांच्या मागणीला जास्त महत्त्व देत आहात. माझे स्पष्ट मत आहे की हे शक्य नाही. तुलनाच जर करायची असेल तर सातत्यतेशी करा. तुम्हाला कायदे आझम जीना कॉंग्रेसच्या तुलनेत जास्त समजूतदार आणि न्यायप्रिय वाटत असतील, तर मग तुम्ही मुस्लिम लीगच्या नेत्यांशीच सल्ला मसलत केली पाहिजे. आणि मुक्तपणे त्यांची धोरणे स्वीकारली पाहिजे. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कायदे आझम जीना यांना अनुकूल अशा पद्धतीने कॉंग्रेसचे मंत्री सरकार चालवत नसल्याने, जीना तुम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत सत्ता हस्तांतरणाला विरोध करतील, असा इशारा तुम्ही दिला आहे. माझ्यासाठी चिंता आणि आश्चर्याचे मिश्रण असलेले हे वृत्त आहे. मी सुरवातीपासूनच फाळणीला विरोध केला आहे. फाळणीची सूचना करणे ही ब्रिटिश साम्राज्याने सुरवातीलाच केलेली घोडचुक आहे. याही क्षणी तुम्ही ही चुक सुधारू शकता. पण मनातील किल्मिष आणि कटूता वाढविणे हे काही योग्य नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंग्रजांच्या उपस्थितीत विभाजन न झाल्यास बहुसंख्याक हिंदू मुसलमानांना गुलाम बनवून राज्य करतील आणि त्यांना कधीच न्याय मिळणार नाही, या आपल्या धारणेने मी तिसर्‍यांदा चकित झालो आहे. आपल्या मनातील ही धारणा निराधार आहे. हिंदूंची संख्या येथे महत्त्वाची नाही. एक लाखापेक्षा कमी असलेल्या इंग्रजांनी चाळीस कोटी भारतीयांवर दडपशाही करून राज्य केलेच ना. ठीक आहे, आपल्या विचारार्थ मी पाच सूचना पाठवत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसने अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे, की कोणत्याही प्रांताला जबरदस्तीने भारतात सामील करण्यात येणार नाही. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजात एवढी ताकद नाही की ते दहा कोटी मुसलमानांवर दडपशाही करू शकतील. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>मोगलांनीही इंग्रजांप्रमाणेच हिंदूस्थानावर मोठ्या कालखंडात राज्य केले आहे. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुसलमानांनी आपल्याबरोबर हरीजन आणि आदिवासींना आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न केला आहे. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>जे मुसलमांवर दडपशाही करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जाते, ते सवर्ण हिंदू संख्येने अगदी नगण्य आहेत. यातील राजपुतांमध्ये अद्याप राष्ट्रीयतेचा उदय झालेला नाही. ब्राह्मण आणि वैश्यांना शस्त्र पकडताही येत नाही. त्यांची सत्ता असलीच तर ती नैतिक आहे. शूद्र हरीजनांमध्ये गणले जातात. असा हिंदू समाज केवळ बहुसंख्याक असल्याने मुसलमानांवर दडपशाही करून त्यांना समूळ नष्ट करून टाकेल, ही अगदी कपोलकल्पित कहाणी आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळे आपल्या हे लक्षात आले असेल की सत्य आणि अहिंसेच्या नावावर मी एकटाच उरेल. आणि अहिंसेचा अधार असलेल्या पुरूषापुढे अणूशक्तीसुद्धा क्षुद्र असते. तेथे नौदलाची काय कथा. मी हे पत्र माझ्या मित्रांना दाखविलेले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>सादर</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>मोहनदास करमचंद गांधी</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>दिनांक २८ जून १९४७  </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 16:35:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी तिरंगा बोलतोय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/मी-तिरंगा-बोलतोय-109081300064_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/मी-तिरंगा-बोलतोय-109081300064_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813064_1_1.jpg' alt='tiranga'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>प्रिय भारतवासीयांनो, </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आले ते रेशमी खादी आणि सुती खादीमध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम तुम्हाला माहित हवेत. ते आता सांगतो. भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:३ असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चोवीस आर्‍या असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढर्‍या रंगाच्या पट्टीच्या रूंदीएवढा असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीचा एक वर्ग फूट कपड्याचे वजन २०५ ग्रॅम व्हायला हवे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासाठी हाताने तयार केलेल्या खादीचे उत्पादन स्वातंत्र्य सेनानींच्या गरग नावाच्या गावत केले जाते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यात बंगळूर- पुणे रस्त्यावर हे गाव आहे. येथे या केंद्राची स्थापना १९५४ मध्ये करण्यात आली. मात्र, आता शहाजानपूर येथील ऑर्डिनेन्स क्योरिंग फॅक्टरी, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई व खादी ग्रामोद्योग आयोग दिल्ली येथेही माझे उत्पादन होऊ लागले आहे. माझी निर्मिती खासगी तत्वावरही होऊ शकतो. मात्र, माझा मानसन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी आयएसआय मार्क हवा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगतीही कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 16:23:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गांधीजींना पूजणारे गाव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/गांधीजींना-पूजणारे-गाव-109081300061_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/गांधीजींना-पूजणारे-गाव-109081300061_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात भतरा गावाला राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अतिशय प्रेम आहे. कारण या गावात महात्मा गांधींचे मंदिर आहे. विशेष, म्हणजे येते गांधीजींची कांस्य मूर्ती सिद्धासन अवस्थेत आहे. या मूर्तीची रोज पूजाअर्चना केली जाते. सकाळ-संध्याकाळ ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813061_1_1.jpg' alt='gandhi mandir'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात भतरा गावाला राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अतिशय प्रेम आहे. कारण या गावात महात्मा गांधींचे मंदिर आहे. विश</font><font style='font-size:11pt;'>े</font><font style='font-size:11pt;'>ष, म्हणजे येते गांधीजींची कांस्य मूर्ती सिद्धासन अवस्थेत आहे. या मूर्तीची रोज पूजाअर्चना केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती होते. प्रसाद वाहिला जातो. येथील स्थानिक लोक गांधीजींचे दर्शन केल्यानंतरच आपल्या रोजच्या कामाची सुरुवात करतात. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813061_1_2.jpg' alt='gandhi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या मंदिराची कल्पना माजी आमदार अभिमन्यू कुमार यांना सुचली. ते रेढाखोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी सन 1971 मध्ये या मंदिराची निर्मिती केली. 11 मीटर लांब व साडेसहा मीटरहून रूंद आणि 12 मीटर उंच या मंदिराला पूर्ण करण्यासाठी 3 वर्षे लागली.यात एक मीटरपेक्षा जास्त उंचीची गांधीजींची मूर्ती येथील स्थानिक कला महाविद्यालयाच्या कलाकाराने तयार केली आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813061_1_3.jpg' alt='ashok stambh'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></p><!--endImage--> 26 <font  style='font-size:11pt; color:#000000'>जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबरला येथे विशेष पूजेचा कार्यक्रम होतो. आजूबाजूच्या गावातील लोक पूजेसाठी येतात. दुसर्‍या मंदिराच्या परिसरात जेथे गरूड किंवा एखादा स्तंभ असतो. तसाच या मंदिराच्या परिसरात अशोक स्तंभ आहे. मंदिरात भारतमातेची प्रतिमा आहे तिच्या हातात अशोक स्तंभ आहे. किमान दीड हजार लोकसंख्या असलेले हे गाव देशभरात या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>छायाचित्र : सौजन्य गांधी मंदिर</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 16:08:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-109081300059_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-109081300059_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा
ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए
कुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-२]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8040'>ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>कुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-</font><font style=' color:#000000;'>२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी-२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>हो गए वतन पे निछावर वो वीर थे कितने गुमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थे धन्य जवान वो अपने थी धन्य उनकी जवानी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेरों की तरह झपटे थे भारत के बहादुर बेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इस मुल्क की लाज बचाते मर गए बर्फ पर लेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संगीन पर धर कर माथा सो गए वीर बलिदानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>कोई सिख कोई जाट मराठा, कोई गोरखा कोई मद्रासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>सरहद पर मरने वाला-२ हर वीर था भारतवासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिन्दुस्तानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>थी खून से काया लथपथ काया फिर भी बन्दूक उठाके</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>एक-एक ने दस को मारा फिर गए होश गवां के</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>जब अन्त समय आया तो-२ कह गए कि हम मरते हैं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>खुश रहना देश के प्यारों अब हम तो सफर करते हैं।..</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>तस्वीर नयन में खींची क्या लोग थे वो अभिमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 15:50:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नियतीशी केलेला करार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/नियतीशी-केलेला-करार-109081300058_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/नियतीशी-केलेला-करार-109081300058_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813058_1_1.jpg' alt='nehru ji'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>चौदा ऑगष्टच्या रात्री दिल्लीत घटना सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले भाषण..... </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा ये</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे योग्य ठरेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इतिहासाच्या उषःकालात भारताने स्वतःच्या शोधास अनंतात प्रारंभ केला. या काळातील अनेक शतके या देशाचे कर्तृत्व, त्याचे यशापयश यांनी भरलेली आहेत. भलेबुरे दिवस येत जात राहिले पण या देशाने आपले स्वत्व शोधण्याचे ध्येय डोळ्यांपुढून हलू दिले नाही. ही शक्ती देणारे आदर्शही तो विसरला नाही. आज आम्ही दुर्भाग्याच्या एका कालखंडावर पडदा पाडतो आहोत. भारताला अखेर स्वत्वाची ओळख झाली आहे. आज आम्ही साजरा करत असलेला आनंदोत्सव म्हणजे आगामी काळात आणखी कीर्ति आणि विजय मिळविण्यासाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे. असा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी यापुढेही मिळणार आहेत. ही संधी साधण्यासाठी आणि भविष्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी आमच्यात तेवढे धाडस आणि बुद्धिकौशल्य आहे? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्य व शक्तीच्या बरोबरच जबाबदारीही वाढते. भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्‍या या सभेवर ही जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या जन्मापूर्वी आपण सर्व प्रसववेदना सहन केल्या. त्याच्या स्मृती हृदयात जतन करून ठेवल्या आहेत. यातील काही वेदनांची ठसठस आजही होतेय, पण तरीही भूतकाळ संपून भविष्याचे आव्हान आपल्यासमोर आहे हेही विसरता कामा नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे भविष्य आरामात घालवण्यासाठी वा विश्रांती घेण्यासाठी नाही. आतापर्यंत आपण जे संकल्प केले आणि आजही करत आहोत, त्यांना पूर्ण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहण्यासाठी आहे. भारताची सेवा म्हणजे कोट्यवधी दीनदलितांची सेवा आहे. याचा अर्थ दारिद्र्य, अज्ञान व संधीची विषमता आपल्याला संपवावी लागणार आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसले पाहिजेत, अशी आमच्या पिढीतील सर्वांत मोठ्या व्यक्तीची आकांक्षा आहे. कदाचित हे आपल्या क्षमतेपलिकडील असेल. पण जोपर्यंत अश्रू आहेत, दुःख आहेत, तोपर्यंत आपले काम पूर्ण होणार नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच आम्हाला काम करायचे आहे. परीश्रम घ्यायचे आहेत. ही स्वप्ने केवळ भारताची नसून वैश्विक आहेत. वैश्विक वातावरणात देश व नागरिकांची ‍वीण परस्परांशी इतकी जुळलेली आहे की तिला अलिप्त करता येणार नाही. शांततेच्या संदर्भात असे म्हटले जाते की तिचे विभाजन करता येत नाही. स्वातंत्र्याचेही आणि आता समृद्धीचेही तसेच आहे. इतकेच काय पण संकटांनाही विभक्त करता येत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या भारतीयांचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या पाठिशी विश्वासाने आणि निश्चयपूर्वक उभे रहावे. कुणावरही फुटकळ आणि विखारी टीकेची ही वेळ नाही. त्याचवेळी दुसऱ्यांवर आरोप करण्याची सुद्धा ही वेळ नाही. आपली आगामी पिढी सुखासमाधानाने राहू शकेल अशा बलाढ्य व विशाल भारताची इमारत आपल्याला उभारायची आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महोदय, मला हा प्रस्ताव मांडण्याची परवानगी द्यावी - </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे मनाशी पक्के ठरवा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>1. <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मध्यरात्रीचे टोले पडल्यानंतर याप्रसंगी उपस्थित घटना सभेच्या सदस्यांनी अशी शपथ द्यावी की- </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, मी भारतीय घटना सभेचा सदस्य, भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवी कल्याण साधण्यासाठी मी सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>2. <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>जे सदस्य यावेळी उपस्थित नाहीत. ते पुढील वेळी या अधिवेशनात उपस्थित असतील त्यावेळी त्यांनी ही शपथ घ्यावी. (सभापतींनी निश्चित केलेल्या काही शाब्दिक बदलासह)</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रकाशन विभागाकडून प्रकाशित 'जवाहरलाल नेहरू के भाषण' या पुस्तकातून साभार )</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 15:48:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विनायक दामोदर सावरकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/विनायक-दामोदर-सावरकर-109081300055_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/विनायक-दामोदर-सावरकर-109081300055_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ब्रिटिशांविरोधात क्रांतीची ज्योत पेटवून त्यात स्वतःच्या आयुष्याची आहूती देणारे वीर सावरकर म्हणजे एक धगधगते जीवन आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813055_1_1.jpg' alt='sawarkar'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#800040'><b>ब्रिटिशांविरोधात क्रांतीची ज्योत पेटवून त्यात स्वतःच्या आयुष्याची आहूती देणारे वीर सावरकर म्हणजे एक धगधगते जीवन आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्म झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या शिवाजी हायस्कूलमदून झाले. येथून 1901 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. अभ्यासात त्यांना विशेष रुची होती. लहानपणी त्यांनी काही कविताही रचल्या होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काम करण्याकरता त्यांनी गुप्तपणे 'मित्र मेळा' संस्थाही चालवली होती. अभिनव भारत ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. बंगालच्या फाळणीनंतर त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळीही केली. पुण्यात फर्गसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी दिलेली भाषणे राष्ट्रभक्तीने ओसंडून वाहणार्‍या खळाळत्या झर्‍यासारखीच होते. टिळकांच्या शिफारशीने त्यांना 1906 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली आणि ते लंडनला गेले. 'इंडियन सोशोलॉजिस्ट व तलवार या वृत्तपत्रातून त्यांनी अनेक लेख लिहिले. ते नंतर कलकत्ता येथील 'युगांतर' मध्येही प्रकाशित झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रशियन क्रांतिकारकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. लंडनच्या वास्तव्यात त्यांची गाठ लाला हरदयाल यांच्याशी पडली. हरदयाल तेथे इंडिया हाउस चालवायचे. मदनलाल धिग्रास फाशी दिल्यानंतर त्यांनी 'लंडन टाइम्स' मध्येही एक लेख लिहिला होता. धिंग्रांचे म्हणणे मांडणारी पत्रके त्यांनी वाटली. त्यांचे जहाल विचार अडचणीचे ठरतील हे हेरून त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली. तेथून बोटीने भारतात आणताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ बोटीतून उडी गाठून बंदर गाठले. पण फ्रान्सच्या सैनिकांनी त्यांना परत ब्रिटिशांच्या ताब्यात दिल्याने त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात त्यांच्यावर खटला चालवून त्यांना पन्नास वर्षांच्या दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी ब्रिटिश शासन तरी शंभर वर्षे टिकेल काय असा प्रश्न विचारला. १९११ ते १९२१ पर्यंत ते अंदमान तुरुंगात राहिले. २१ मध्ये काही अटींवर त्यांना भारतात परत आणले. त्यानंतर तीन वर्षे ते नजरकैदेत होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुरूंगाच्या कालावधीत त्यांनी हिंदुत्वावर शोध ग्रंथ लिहिला. १९३७ मध्ये त्यांची हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. १९४३ नंतर त्यांचे दादर, मुंबई येथे त्यांचे वास्तव्य होते. ते अखेरपर्यंत अखंड भारताचे पुरस्कर्ते राहिले. स्वातंत्र्यप्राप्तीबद्दल गांधीजी व सावरकरांच्या विचारधारेत भिन्नता होती. सावरकरांनी १८५७ वर पुस्तक लिहून तोपर्यंत बंड म्हणून हिणवण्यात येत असलेल्या या लढ्याला स्वातंत्रसमर संबोधले. २६जानेवारी १९६६ मध्ये प्रायोपवेशन करून त्यांनी प्राण सोडले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 15:38:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मजसी ने परत मातृभूमीला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/मजसी-ने-परत-मातृभूमीला-109081300054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/मजसी-ने-परत-मातृभूमीला-109081300054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।
मी नित्य पाहिला होता ॥]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>ने मजसी ने परत मातृभूमीला</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>सागरा प्राण तळमळला ॥धृ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>मी नित्य पाहिला होता ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>सृष्टिची विविधता पाहूं ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>परि तुवां वचन तिज दिधले ॥</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्वरित या परत आणिन ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वसलो या तव वचनीं । मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तव अधिक शक्त उद्धरणीं । मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही फसगत झाली तैशी ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दशदिशा तमोमय होती ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>गुणसुमनें मी वेचियली या भावें ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>की तिने सुगंधा घ्यावें ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>हा व्यर्थ भार विद्येचा ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>ती आम्रवृक्षवत्सलता । रे</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>तो बाल गुलाबहि आतां ॥ रे</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>फुलबाग मला, हाय पारखा झाला ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥ </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 15:31:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाळ गंगाधर टिळक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/बाळ-गंगाधर-टिळक-109081300053_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/बाळ-गंगाधर-टिळक-109081300053_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA['स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच', या सिंहगर्जनेने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणारे व देशबांधवात स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करणारे महान देशभक्त बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी तालुक्यातील चिखली ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813053_1_1.jpg' alt='tilak'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>ND</p></p><!--endImage--> '<font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच', या सिंहगर्जनेने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणारे व देशबांधवात स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करणारे महान देशभक्त बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी तालुक्यातील चिखली या खेडेगावांत झाला. त्यांचे वडील पंडित गंगाधर टिळक विद्वान शिक्षक होते. टिळकांच्या लहान वयातच वडिलांचे निधन झाले. आईनेच त्यांचे पालन पोषण केले. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बालवयापासूनच आईने सांगितलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या शौर्यकथांनी त्यांचे मन देशभक्तीने ठासून भरले गेले. कला शाखेत पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. वकिली पेशास प्रतिष्ठेसोबतच चांगली कमाई असल्याने त्या दिवसात या पदवीस विशेष महत्त्व होते. मात्र, टिळकांनी शांत व सुरक्षित जीवनाऐवजी इंग्रजाविरुद्ध दंड थोपटून स्वातंत्र्य संग्रामात स्वत:स झोकून दिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजजागृती व प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक असते. हे हेरून टिळकांनी चिपळूणकर, नामजोशी, आपटे व आगरकर या चार उच्चविद्याविभूषित तरूणांच्या साहाय्याने पुण्यात इंग्लिश स्कूलची स्थापना केली. कमी पैशांत उच्चशिक्षण देण्याच्या ध्येयाने प्रेरीत टिळकांनी येथे अध्यापनाचे काम केले. वर्तमानपत्र जनतेला जागृत करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे हेरून त्यांनी 'केसरी' व 'मराठा' ही अनुक्रमे मराठी व इंग्रजीतील साप्ताहिके सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी सिंहगर्जना करत जुलमी इंग्रजी सत्तेवर आसूड ओढून लोकजागृती केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारच्या अन्याय धोरणांचा त्यांनी अग्रलेखांतून खरपूस समाचार घेतला. सरकारने दडपशाहीचा मार्ग अवलंबत टिळकांना त्यासाठी अनेकदा तुरुंगातही टाकले. ब्रह्मदेशातील मंडाले येथील सहा वर्षांची शिक्षा यात सर्वांत मोठी आहे. टिळकांनी या काळात गीतारहस्य हा गीतेवरील टीका ग्रंथ लिहिला. याशिवाय आर्यांचे मूळ वसतीस्थान या विषयावरही ग्रंथ लिहिला. टिळकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करून स्वातंत्र्यप्राप्तीची इर्ष्या जागवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवजयंती व गणेशोत्सवास व्यापक स्वरूप देऊन त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत पेटवली. स्वातंत्र्य दान मागितल्याने मिळणार नसून त्यासाठी संघर्ष करावा लागेल यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतरच स्वराज्यप्राप्ती हेच कॉंग्रेसचे अंतिम ध्येय असल्याने निश्चित करण्यात आले. ब्रिटिश सत्तेचे आसन खिळखिळे करणार्‍या त्यांच्या डरकाळीमुळेच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले जाते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 15:28:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रादेशिकतेपेक्षा देश महत्त्वाचा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/प्रादेशिकतेपेक्षा-देश-महत्त्वाचा-109081300047_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/प्रादेशिकतेपेक्षा-देश-महत्त्वाचा-109081300047_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाचा ६2 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती मात्र तितकीशी आशादायक नाही. भ्रष्टाचार, अविकास यासारख्या नेहमीच्या समस्या तर आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रांतीयतावादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे विकासाच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813047_1_1.jpg' alt='tiranga'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#800080'><b>देशाचा ६2 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती मात्र तितकीशी आशादायक नाही. भ्रष्टाचार, अविकास यासारख्या नेहमीच्या समस्या तर आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रांतीयतावादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे विकासाच्या वाटेवर चालत असताना आता आपण प्रांतीयतावादाच्या रूपाने विघटनाकडे तर वाटचाल करत नाही ना? याचा विचार करायची वेळ आली आहे. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रादेशिकतावाद तसा नवा नाही. देशाच्या प्रत्येक भागात लहान-मोठ्या प्रमाणात तो आहे आणि होता. पण त्याची टोके आता टोचू लागली आहेत. पाकिस्तानच्या भडकावण्यातून पंजाबातही खलिस्तानी आंदोलन पेटले होते. ते कसेबसे शांतही झाले. त्यासाठी एका पंतप्रधानाचा बळीही दिला. तमिळनाडूतही तशा मागण्या अधून-मधून होत असतात. म्हणून तर श्रीलंकेच्या प्रश्नावर नीट काही भूमिका घेता येत नाही आणि घेतल्यानंतर काय होते, हे राजीव गांधींच्या हत्येच्या रूपाने समोर आले आहे. पण प्रांतीयतावाद फक्त इथे आहे, असे नाही. आसाममध्येही तो आहे. उल्फा त्यासाठीच आंदोलन करते आहे. ईशान्येच्या राज्यांमध्येही स्वतंत्रतेच्या मागण्या अधूमधून डोके काढत असतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगमध्ये आंदोलन पेटले आहे. उत्तर प्रदेशाचे त्रिभाजन करण्याची मागणी समोर आहेच. आंध्र प्रदेशमध्ये स्वतंत्र तेलंगाणा राज्यासाठी आंदोलने होत आहेत. त्यासाठी तर एक पक्षही स्थापन झाला. कर्नाटकातही प्रादेशिकतावाद फोफावतो आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कन्नड अस्मिता हाही मुद्दा होता. कन्नड रक्षण वेदिके सारखी संघटना तर केवळ प्रांतीय अस्मितेच्या जोरावरच स्थापन झाली आहे. गुजरातमध्येही सौराष्ट्र वेगळा व्हावा यासाठी मागणी होते. महाराष्ट्रातही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निमित्ताने मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे 'मराठा तितुका मेळवावा' असे होत असताना दुसरीकडे मराठीच असलेला विदर्भ वेगळा करण्याची मागणीही तितकीच जोर लावून केली जाते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सगळे चित्र पहाताना प्रांतीय अस्मिता भडकत चालल्याचे दिसून येते. या सगळ्यातून किमान काही साम्य असणार्‍या लोकांचे एक राज्य करण्याचा घाट घातला जातो आहे. हे साम्य भाषा, संस्कृती, वंश या माध्यमातून शोधले जाते आहे. या सगळ्यातून 'आमच्या लोकांचे आमचे राज्य' अशी आयडेंटिटी निर्माण होईल. पण त्यामुळे इतर प्रांतातून तिथे लोक येऊ शकतील का? त्यांचे स्थान काय असेल हा प्रश्न निर्माण होतो. प्रांतीय अस्मिता जोपासताना इतरांचा द्वेष करण्याची वृत्ती बोकाळली जाईल आणि त्यातून देशाच्या ऐक्यालाच धोका निर्माण होऊ शकतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या मोठ्या राज्यांचे विभाजन करण्याच्या मागणीत गैर नाही. कारण ही राज्ये आकाराने प्रचंड मोठी आहेत. छत्तीसगड वेगळे करूनही मध्य प्रदेश मोठे आहे. उत्तर प्रदेशात २६ प्रशासकीय विभाग आहेत. एका मुख्यमंत्र्याने ठरवले तरी सगळ्या विभागाना एका वर्षात तो भेट देऊ शकत नाही. बिहारची परिस्थितीही तशीच आहे. असे असेल तर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्यांचे विभाजन करणे गरजेचे आहे. त्यातून विकासालाही वाव मिळू शकतो. पण हे विभाजन एक संस्कृती जोडण्याच्या दृष्टिकोनातून होत असल्यास त्यातून प्रांतीय अस्मिताही डोकावतील. प्रांत म्हणून वेगळे अस्तित्व असायलाही हरकत नाही. पण त्यातून इतरांच्या विषयीची द्वेषभावना निर्माण व्हायला नको.   </font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813047_2_1.jpg' alt='tiranga'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>महाराष्ट्रात शिवसेनेने प्रांतीय अस्मितेतूनच आंदोलन सुरू केले. ते थंड झाल्यावर आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तोच मुद्दा हाती घेऊन आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला प्राधान्य यात गैर काही नाही. पण एकूणात परप्रांतीयांविरोधात आंदोलन करताना त्यांच्याविषयी द्वेषभावना बाळगली गेल्यास त्याचा वेगळा संदेश जाईल आणि मग मानसिकताच फुटीरतावादी बनल्यास आश्चर्य वाटायला नको. उदाहरण घ्यायचे तर आसामचे घेता येईल. विकासात मागे पडलेल्या आसामवर बांगलादेशीयांचे लोंढे आदळायला लागले तेव्हा उल्फाचे आंदोलन सुरू झाले. त्याला सुरवातीच्या काळात आसाम साहित्य सभा या बुद्धिवाद्यांचे नेतृत्व करणार्‍या संघटनेनेही पाठिंबा दिला होता. त्यातलेच अनेक लोक त्यात नेते होते. या आंदोलनाची परिणती काय झाली हे आज आपण पहातो आहे. हे राज्यच या संघटनेने अस्थिर करून टाकले आहे. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रत्येक राज्यात त्या राज्यातील नागरिकाला प्राधान्य द्यायला हवे. यात चुकीचे काहीही नाही. पण या माध्यमातून इतरांचा त्या राज्यात जाण्याचा रस्ता बंद करण्यात अर्थ नाही. कारण यातून विकास रोखला जाऊ शकतो. कारण एका राज्याच्या सर्व गरजा भागतील असे मनुष्यबळापासून वस्तुंपर्यंत काहीही त्या राज्यात उत्पादित होत नाही. त्याला दुसर्‍या रा्ज्यांवर अवलंबून रहावेच लागते. असे असताना विरोध फक्त मनुष्यबळाला केला जातो, वस्तूंना नाही. कारण त्या आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असतात. उत्तर प्रदेशात महाराष्ट्रानंतर सर्वांधिक साखरेचे उत्पादन होते. ती साखर आपल्याला हवी, पण ती निर्मिती करणारे हात आपल्याकडे आल्यावर त्यांना विरोध होतो. मध्य प्रदेशात डाळींचे मोठे उत्पादन होते. ते हवे. पण तिथली माणसे नकोत, ही मानसिकता चुकीची आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रात औद्योगिक विकास जास्त आहे. पण बाकीच्या क्षेत्रांचाही तितका विकास झाला असे नाही. शेतीच्या बाबतीत पंजाब जेवढा समृद्ध आहे, तेवढा महाराष्ट्र नाही. गव्हासाठी आपल्याला पंजाब व मध्य प्रदेशावरच अवलंबून रहावे लागते. असे असताना त्या लोकांना विरोध करून आपण काय साध्य करू पहातो. आपल्या राज्यावर भार नको ही बाब खरी. पण येणारी मंडळी आपल्या हातातील तर काही हिसकावून घेत नाही ना? त्यांचे ते स्वतंत्रपणे जगतात ना? मग आपण एवढे हिंसक पातळीवर का उतरतो आहोत? </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करताना तो पूर्ण देशाचा असतो. त्याचवेळी प्रांतीय अस्मितेसाठी इतर राज्याच्या नागरिकांना हाकलून देण्याची आंदोलने होतात, याला काय अर्थ आहे. याचाच अर्थ आपण आपल्या देशापेक्षा राज्याचे अधिक आहोत. मग राष्ट्रीय भावनाच उत्पन्न न झाल्यास प्रादेशिक अस्मिता आणखी टोकदार होऊन उद्या या राज्यांतून स्वतंत्र राष्ट्र हवे याची हाक आली तर आश्चर्य वाटायला नको. मग महत्प्रयासाने मिळालेले स्वातंत्र्य कवडीमोल ठरेल. शिवाय त्या स्वातंत्र्ययोद्ध्यांचा अपमानही ठरेल. गांधींनी गुजरातसाठी, टिळक-सावरकरांनी महाराष्ट्रासाठी, सुभाषबाबूंनी बंगालसाठी, राजेंद्रप्रसादांनी बिहारसाठी, भगतसिंगांनी पंजाबसाठी स्वातंत्र्य मागितले नव्हते. ते पूर्ण भारतासाठी मागितले होते. वास्तविक त्यांना त्यांच्या प्रांतासाठीही लढता आले असते. पण त्यांनी तसे केले नाही. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले.  </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण मात्र आता प्रांतीय अस्मितेच्या नावावरून एकमेकांशी लढतो आहोत. स्वतंत्र राज्यांच्या अस्मितांसाठी भांडतो आहोत. उद्या त्या राज्यांची स्वतंत्र राष्ट्रे व्हावीत यासाठी लढलो तर आश्चर्य वाटायला नको. कारण अस्मितांची टोके एवढी टोकदार झाली आहेत, की त्याची टोचणी बसायला लागली आहेत. युगोस्लाव्हियाचे विभाजन केवळ वांशिक दृष्टिकोनातून झाले. पण विकासाच्या पटलावर ही नवनिर्मित राज्ये किती दिसतात? सोव्हिएत संघराज्य तसे मारूनमुटकूनच बनवले होते. ते कोसळून पडले. त्यांच्या ऐक्यात आणि भारतीय ऐक्यात बराच फरक आहे. भारतीय ऐक्य हे किमान सांस्कृतिक व धार्मिक एकतेतून साधले गेले आहे. विविधता असली तरीही एकात्मता आहे. म्हणूनच हा देश अजूनही टिकला आहे. तमिळनाडू आणि स्पेनच्या संस्कृतीत काहीही साम्य नाही. पण तमिळनाडू आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत भिन्नता आढळूनही काहीतरी साम्य आढळेल ते कुटुंब व्यवस्थेपासून अन्य कितीतरी विषयांमध्ये आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळेच केवळ प्रांतीयतावाद करून भागणार नाही. इतर प्रांतियांविषयी द्वेषभावना बाळगून कुणाचाच विकास होणार नाही. उलट होत असलेल्या विकासालाच अडसर निर्माण होईल. विकासाची चाके थांबतील. देशाचे ऐक्य धोक्यात येईल आणि त्याचा फायदा घ्यायला बाकीचे देश टिपलेलेच आहेत. आधीच दहशतवादाने देश पोखरून निघाला आहे. तो आवरता आवरता नाकी नऊ येताहेत. प्रांतीय आंदोलने वाढली तर या दहशतवादाला खतपाणीच मिळेल. त्यामुळे देशाचे अखंडत्व धोक्यात येईल. विविधता हे वैशिष्ट्य असले तरी त्यातील एकता हीच आपली ताकद आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 14:54:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[स्वातंत्र्याकडे पाहण्याची 'नवी दृष्टी']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/स्वातंत्र्याकडे-पाहण्याची-नवी-दृष्टी-109081300045_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/स्वातंत्र्याकडे-पाहण्याची-नवी-दृष्टी-109081300045_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशातील सात कोटीपेक्षा जास्त लोक असे आहेत, ज्यांनी पंधऱा ऑगस्ट १९४७ ला देश स्वातंत्र्य होताना पाहिला. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील देश मोठी प्रगती करेल]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813045_1_1.jpg' alt='tiranga'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>देशातील सात कोटीपेक्षा जास्त लोक असे आहेत, ज्यांनी पंधऱा ऑगस्ट १९४७ ला देश स्वातंत्र्य होताना पाहिला. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील देश मोठी प्रगती करेल अशी त्यांची अपेक्षा होती. राजा आणि प्रजा, गरीब आणि श्रीमंत, शहरी व ग्रामीण, ब्राह्मण व शूद्र असे भेद मिटतील. प्रत्येकाची स्थिती बदलून प्रगतीचा रस्ता त्याच्यासाठी खुला होईल. गरीबी, उपासमार, बेरोजगारी, महागाई, रोगराई, निरक्षरता, भ्रष्टाचार याचा विचारही कुणाच्या डोक्यात नसावा. कायदा, घटना यावरचा लोकांचा विश्वास उडेल अशा काही घटना घडतील असा विचारही कुणी केला नसेल. स्वातंत्र्याला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली तर त्यांचे उत्तर काय असेल?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नक्कीच यांच्यापैकी कुणीच खूप दुःखी नसेल. फारसे निराशही कुणी नसेल. चांगल्या आणि मनाला दुःख देणार्‍या घटनाही या काळात घडल्या. स्वातंत्र्याच्या लाभ ज्यांना मिळाला ते आज अतिशय आनंदी जीवन जगत आहेत. पण अनेकांसाठी हे स्वातंत्र्य कुचकामी असल्याची भावनाही आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील अनेक वृद्धांनी, ज्यांनी ब्रिटिश काळ पाहिला आहे, त्यातील अनेक जण सध्याच्या स्वातंत्र्यानंतरच्या स्वैराचारवर तोंडसुख घेताना दिसतात. नैतिक अधःपतन, अतिपैशाने फिरलेली तरूण पिढीची मती, त्यांच्याकडून होणारा वारेमाप खर्च, भ्रष्टाचार, महागाई, गुन्हेगारी, भांडवलशाही आणि त्याला जोडून येणाऱ्या साऱ्या प्रश्नांवर ते भारताच्या सध्याच्या प्रश्नांचे खापर फोडतात. गेल्या काही वर्षातील प्रगतीची झेपही त्यांना सोसवत नाही. प्रगतीचा आवाकाही त्यांच्या मर्यादेत येत नाही. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारतात होणाऱ्या गुंतवणूकीत त्यांना भारताला पुन्हा गुलामगिरीच्या शृंखलेत घालण्याचा डाव दिसतो आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्या मते इंग्रजांचा काळ किंवा राजे-महाराजांचा काळ चांगला होता. वस्तूंच्या किमती कमी होत्या. शिस्त, एकत्र कुटुंबपद्दती, जाती-धर्माचे महत्त्व, मर्यादीत असलेला भ्रष्टाचार, फॅशनचा अभाव, गुन्हेगारीचा कमी असलेला आकडा आदी उदाहरणे त्यांच्याकडून दिली जातात. त्यावेळच्या किराणाचे भाव तोंडावर फेकून महागाई किती कमी होती असे सांगतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण हे सांगताना ते हे विसरतात की त्यावेळी व्यक्तीचे उत्पन्न किती होते. शेतात पीक किती येत होते. पाणी किती लांबून आणावे लागत होते. शौचालये कशी होती. शहरात जाण्यासाठी बैलगाडी होती. शिस्त होती, पण ब्रिटिशांच्या, राजाच्या शिपायांच्या काठ्या कशा खाव्या लागत </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सारासार विचार केल्यास भारताची स्थिती आज एवढीही खराब नाही. त्यांचे मते पूर्ण विहिरीतच भांग पडलीये. पण तसे भारताची स्थिती सारासार विचार केल्यास भारताची स्थिती आज एवढीही खराब नाही. त्यांचे मते पूर्ण विहिरीतच भांग पडलीये. पण तसे नाही. विहिरीत चांगले पाणीही आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आताचा भारत यांची तुलना केल्यास अनेक चांगले मुद्देही आढळतात. नाही. विहिरीत चांगले पाणीही आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आताचा भारत यांची तुलना केल्यास अनेक चांगले मुद्देही आढळतात. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरही देशात लोकशाही अस्तित्वात आहे, ही मोठी कमाई आहे. अनेक राजकीय पक्षांची मोट बांधलेल्या आघाड्या चांगला कारभार करीत आहेत. हुकुमशाही देशात येण्याची शक्यताही नाही. पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात आपण त्यांचे नाक ठेचले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाची लोकसंख्या 29 कोटींहून 103 कोटींवर पोहोचली आहे, पण प्रती व्यक्ती उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक यातही वाढ झाली आहे. जगण्याचा स्तर वाढला आहे. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात आली आहे. परकीय गंगाजळीने तीनशे अब्ज डॉलरचा आकडा गाठला आहे. रशिया आणि समाजवादी देशच नाही, तर अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स, मॉरीशस, चीन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिाया, इंडोनेशिया, थायलंड, कोरीया हे सर्व देश भारताबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेने भारताबरोबर केलेला अणू करार हे तर त्याचे ताजे उदाहरण आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात झालेले हे बदल आवडो न आवडो तुम्हाला ते स्वीकारावे लागतील. खरे तर या बदलाच्या प्रवाहात आपणही शिरणे हेच जास्त चांगले. केवळ साक्षीदार म्हणून रहाणे याला काही अर्थ नाही. आपण मागच्या पिढीचे मग आपल्याला भवितव्य नाही असे मानणे चुकीचे ठरेल. नव्या सोयीसुविधांचा लाभ घेऊन स्वतःला आजमावून पाहिले पाहिजे. स्वातंत्र्यासाठी जे कष्ट आपण घेतले त्याचा लाभ घेण्याची ही वेळ आहे. तो उठवलाच पाहिजे. महागाई वाढली असेल, पण आपल्या हातात ती परवडण्याइतका पैसाही येतो आहे. त्यामुळे त्याची चिंता करायचे काम नाही. नव्या पिढीच्या नव्या प्रवाहात सामील होणे हाच योग्य आणि चांगला पर्याय आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 14:35:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/स्वातंत्र्य-म्हणजे-काय-बरे-109081300043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/स्वातंत्र्य-म्हणजे-काय-बरे-109081300043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नुकतेच पंख फ़ुटलेले ते पाखरू आभाळात विहरतांना स्वत:शीच म्हणाले,
स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813043_1_1.jpg' alt='tiranga'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>नुकतेच पंख फ़ुटलेले ते पाखरू आभाळात विहरतांना स्वत:शीच म्हणाले,</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>त्याची नजर खाली असलेल्या एका मुलाकडे गेली,</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>त्याने मुलास विचारले, स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>खपाटीला गेलेल्या पोटावरून हात फ़िरवत</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>मुलगा म्हणाला, दोन वेळचं पोटभर जेवण</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>म्हणजे स्वातंत्र्य, मित्रा.</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाखराचं समाधान झालं नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते जवळच्या झाडावर जाऊन बसलं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तोच त्याच्या शेजारी एक पाखरू येवून बसलं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या पाखराने या दुसरया पाखराला विचारलं,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरं पाखरू म्हणालं,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चल तुला दाखवतो, स्वातंत्र्य म्हणजे काय ते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोघेही उडाले, पेरूच्या बागेत आले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसर्या पाखराने एका पेरूवर झेप घेवून,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चोचीत मावेल तेवढा तुकडा तोडला,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तोच राखणदार त्यांना मारायला धावला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चपळाईने दोघे भुर्रकन उडाले, त्याच झाडावर येऊन बसला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरं पाखरू गर्वाने हसत पहिल्याला म्हणालं,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्याला हवं ते, हवं तेव्हा मिळवता येणं, म्हणजे स्वातंत्र्य.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पहिल्या पाखराला हेही उत्तर पटलं नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते पुन्हा उडालं, आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसलं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'><b>त्या झाडाला नुकतच एक फळ आलं होतं. भुकेल्या पाखराने फळावर झेप घेतली,</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'><b>ते आता खाणार इतक्यात खाली उभ्या त्या भुकेल्या मुलाकडे त्याचे लक्ष गेले, </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'><b>क्षणार्धात पाखराने मुलाच्या दिशेने झेप घेतली, आणि चोचीतले फळ त्याच्या हातात टाकले. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'><b>पाखराने आता आभाळात उंच भरारी घेतली. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'><b>मोकळी हवा छातीत भरून घेतली आणि त्या </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'><b>अथांग निळाईत स्वत:ला झोकून दिले. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'><b>स्वातंत्र्याचा अर्थ कुणाला विचारायची गरज आता त्याला राहिली नव्हती.  </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 13:56:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कर्नाटकात गांधीजींचे मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/कर्नाटकात-गांधीजींचे-मंदिर-109081300037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/कर्नाटकात-गांधीजींचे-मंदिर-109081300037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांचा आदर करतोच. पण कर्नाटकात मात्र गांधीजींचे मंदिर आहे. शिवाय नेहमी देवाची पूजा करतो, तशी त्यांचीही रोज पूजा केली जाते. विशेष म्हणजे आज या काळातही ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813037_1_1.jpg' alt='gandhi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांचा आदर करतोच. पण कर्नाटकात मात्र गांधीजींचे मंदिर आहे. शिवाय नेहमी देवाची पूजा करतो, तशी त्यांचीही रोज पूजा केली जाते. विशेष म्हणजे आज या काळातही त्यांचे दर्शन घ्यायला गर्दी होत असते. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वास्तविक आजच्या काळात गांधीजी फक्त नोटेपुरते आणि भाषणापुरते उरले आहेत. राजकारण्यांनी त्यांचे नाव वापरून राजकारण तेवढे केले. पण असे असले तरी गांधींच्या मंदिराच्या रूपाने त्यांचा विचार जपण्याचेही काम एकीकडे केले जात आहे. कर्नाटकाच्या समुद्र किनार्‍यावरील सुंदर शहर असलेल्या मंगलोरपासून तीन किलोमीटरवर हे मंदिर आहे. बंगलोर- मंगलोर महामार्गावर कनकंडी या गावात श्री ब्रह्म बैदरकला गराडी क्षेत्र आहे. याच्या आवारातच गांधीजींचे मंदिर आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा मंदिर परिसर आगळा आहे. मुख्य मंदिर हे तुलू गावातील लढवय्ये तरूण कोटी व चेन्नय्या या बंधूंच्या स्मृत्यर्थ बांधले आहे. त्यालाच ब्रह्म बैदरकला गराडी क्षेत्र असे म्हणतात. त्यांच्या बहिणीचे मायंदलचेही येथे मंदिर आहे. त्याचबरोबर ब्रह्मर्षी नारायण गुरू, गणपती बालपरमेश्वरी, आनंद भैरव, सुब्रमण्य यांचीही मंदिरे या आवारात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गराडी ही एक पारंपरिक व्यायामशाळा आहे. येथे मार्शल आर्टसह तलवारीसारख्या शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाई. कोटी व चेन्नयाना यांनी येथेच शस्त्र प्रशिक्षण घेतले. त्यांच्या शौर्यामुळेच या परिसरात विशेषतः तुळू भाषिकांमध्ये त्यांच्या नावाने एका पंथाची सुरवात झाली. हे दोघे बंधू त्या परमेश्वराचे अवतार आहेत, अशी त्यांची श्रद्धा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>गराडी क्षेत्राची स्थापना ४ मार्च १८७४ मध्ये झाली. पण १२ डिसेंबर १९४८ ला या क्षेत्राचे व्यवस्थापक सोमाप्पा पंडित व अध्यक्ष नरसप्पा सालियन यांनी येथे गांधीजींचे मंदिर उभारण्याचे ठरविले व या क्षेत्राला शांतता व अहिंसेचे केंद्र बनविण्याचे ठरविले. वेंकप्पा पूजारी यांनी लगोलग गांधीजींची मूर्ती भेट दिली.</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इतर मंदिरांप्रमाणे येथेही गांधीजींची रोज पूजा केली जाते. त्यासाठी एक पुजारीही आहे. तो रोज येथे दूध, केळी व भात ठेवतो. गांधी जयंतीच्या दिवशी तर विशेष पूजा केली जाते. शिवाय मिरवणूकही काढली जाते.</font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या मंदिरातील गांधीजींची मूर्ती लोभस आहे. ते पुस्तक वाचण्याच्या पवित्र्यात आहेत, अशी त्यांची मूर्ती आहे. येथे भेट देणारी मंडळी गांधीजींच्या मंदिराला भेट देण्यास अजिबात विसरत नाहीत. कारण याच साबरमतीच्या संताने सत्य आणि अहिंसेचे शिकवण लोकांना दिली आणि त्याच बळावर स्वातंत्र्य खेचून आणले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गांधीजींच्या जयंती आणि पुण्यतिथीदिनी येथे गर्दी होतेच. शिवाय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनीही येथे कार्यक्रम होतात. आता हे मंदिर आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत चालले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 13:39:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/राष्ट्रध्वज-फडकवण्याची-नियमावली-109081300036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/independenceday-marathi/राष्ट्रध्वज-फडकवण्याची-नियमावली-109081300036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0908/13/images/img1090813036_1_2.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Aug 2009 12:55:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[independenceday]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
