<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[डॉ.आंबेडकर]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/baba-saheb-ambedkar-marathi</link>
    <description><![CDATA[A Tribute to Bharat Ratna Dr. Bhimrao Ramji Ambedkar. डॉ. आंबेडकरांच्या विविधांगी व्यक्तिमत्वाचा समग्र वेध, Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi, ambedkar date of birth and death, br ambedkar family,  Dr Ambedkar Biography and Life History, ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Tue, 09 Jun 2026 23:32:26 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>डॉ.आंबेडकर</title>
      <url>https://marathi.webdunia.com/baba-saheb-ambedkar-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/baba-saheb-ambedkar-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/baba-saheb-ambedkar-marathi-1010308.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील ५ प्रेरणादायी गोष्टी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/5-life-learning-from-dr-babasaheb-ambedkar-s-life-126041100030_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/5-life-learning-from-dr-babasaheb-ambedkar-s-life-126041100030_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/11/thumb/1_1/1681190668-9472.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/11/thumb/1_1/1681190668-9472.jpg</image>
      <description><![CDATA[१. ज्ञानाची अफाट ओढ (विद्यार्थी जीवन)
बाबासाहेब हे जगातील सर्वात सुशिक्षित व्यक्तींपैकी एक मानले जातात. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.
प्रेरणा: ते दिवसातील १८-१८ तास अभ्यास करत असत. त्यांच्या मते, ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/11/full/1681190668-9472.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:740px;">
			Bhimrao Ambedkar</p>
	</p>
	भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक सण नव्हे, तर तो विचार आणि प्रेरणेचा उत्सव आहे. बाबासाहेबांचे जीवन हे संघर्षातून यशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा एक देदीप्यमान प्रवास आहे. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील काही अत्यंत प्रेरणादायी गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>१. ज्ञानाची अफाट ओढ (विद्यार्थी जीवन)</strong></p>
<p>
	बाबासाहेब हे जगातील सर्वात सुशिक्षित व्यक्तींपैकी एक मानले जातात. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.</p>
<p>
	प्रेरणा: ते दिवसातील १८-१८ तास अभ्यास करत असत. त्यांच्या मते, "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षणानेच माणूस आपले नशीब बदलू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>२. वाचनाची आवड</strong></p>
<p>
	बाबासाहेबांचे पुस्तकांवर इतके प्रेम होते की, त्यांनी मुंबईत आपले घर &#39;राजगृह&#39; केवळ पुस्तकांसाठी बांधले होते. त्यांच्याकडे ५०,००० पेक्षा जास्त पुस्तकांचा वैयक्तिक संग्रह होता.</p>
<p>
	प्रेरणा: ते म्हणत, "ज्याचे वाचन समृद्ध, त्याचे विचार समृद्ध." संकटाच्या काळातही पुस्तकांनी त्यांना साथ दिली आणि त्यातूनच त्यांनी देशाची राज्यघटना लिहिण्याचे सामर्थ्य मिळवले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>३. समता आणि मानवी हक्कांचा संघर्ष</strong></p>
<p>
	महाडचा चवदार तळे सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदिर प्रवेश, बाबासाहेबांनी कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून अस्पृश्यता आणि विषमतेविरुद्ध लढा दिला.</p>
<p>
	प्रेरणा: अन्यायाविरुद्ध लढताना डोकं शांत आणि विचार प्रगल्भ असावेत, ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>४. बाबासाहेबांची त्रिसूत्री: &#39;शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा&#39;</strong></p>
<p>
	ही केवळ घोषणा नव्हती, तर समाजाच्या प्रगतीचा मार्ग होता.</p>
<p>
	शिका: आधी स्वतःला वैचारिकदृष्ट्या सक्षम करा.</p>
<p>
	संघटित व्हा: एकट्याने लढण्यापेक्षा संघटित शक्ती मोठी असते.</p>
<p>
	संघर्ष करा: हा संघर्ष शस्त्रांचा नसून हक्कांचा आणि विचारांचा असावा.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>५. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते</strong></p>
<p>
	बाबासाहेबांनी केवळ पुरुषांच्या हक्कासाठी लढा दिला नाही, तर स्त्रियांना सन्मान मिळावा यासाठी &#39;हिंदू कोड बिल&#39; मांडले. स्त्रियांना संपत्तीत अधिकार, घटस्फोटाचा अधिकार आणि शिक्षणाची संधी मिळावी, अशी त्यांची ठाम भूमिका होती.</p>
<p>
	प्रेरणा: "मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजतो," हे त्यांचे वाक्य आजही तितकेच लागू होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>६. अर्थशास्त्र आणि राष्ट्रनिर्मिती</strong></p>
<p>
	अनेकांना माहित नाही की, भारतीय रिझर्व बँकेची (RBI) स्थापना खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या &#39;The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution&#39; (रुपयाची समस्या: उगम आणि उपाय) या प्रबंधातील संकल्पनांवर आणि शिफारशींवर आधारित आहे. तसेच देशातील धरणे, वीज प्रकल्प आणि कामगारांचे ८ तासांचे काम यांमागे त्यांचीच दूरदृष्टी होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबासाहेबांचे तीन प्रेरक विचार</strong></p>
<p>
	"बुद्धीचा विकास करणे हेच मानवाच्या अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे."</p>
<p>
	"प्रारंभीपासून शेवटपर्यंत आपण केवळ भारतीय आहोत."</p>
<p>
	"जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे."</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2026 08:39:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2026 08:39:46 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[General Knowledge]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर डेस्क</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाबासाहेबांच्या जीवनातील 3 प्रेरक प्रसंग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/inspiration-stories-of-dr-bhimrao-ambedkar-life-on-ambedkar-jayanti-2025-121041200021_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/inspiration-stories-of-dr-bhimrao-ambedkar-life-on-ambedkar-jayanti-2025-121041200021_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/thumb/1_1/1681291226-1829.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/thumb/1_1/1681291226-1829.jpg</image>
      <description><![CDATA[अस्पृश्य मानल्या जाणार्‍या महार जातीचे बाबासाहेब होते. हेच कारण होते की त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांसह बसणे शक्य नव्हते आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा.

या शिवाय त्यांना त्या शाळेच्या नळालाही स्पर्श करण्याची परवानगी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="babasaheb ambedkar" class="imgCont" height="580" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/full/1681291226-1829.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="720" /></p>
	<strong>संस्कृत भाषेचं ज्ञान</strong></p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्त केले गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	अनुसूचित भाषांची यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनाही त्यातील सर्व भाषांची माता संस्कृत असे द्यायची फार इच्छा होती पण काही सदस्यांच्या विरोधामुळे हे शक्य झाले नाही. पण त्या काळात श्री लाल बहादूर शास्त्री आणि आंबेडकर ह्यांच्यात संस्कृत भाषे संदर्भात चर्चा झाली. त्या वेळी विरोधकांच्या लक्षात आले की दोन महान व्यक्ती संस्कृतभाषेत संभाषण करीत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	शास्त्रीजींना संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित होते, परंतु अशिक्षित दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचा संस्कृत भाषेवर प्रभुत्व असेल हे कोणालाही अपेक्षित नव्हते. ह्या मुळे ही माहिती लवकरच पसरली. त्या दिवसापासून सर्व आंबेडकरांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू लागले.</p>
<p>
	 </p>
<p>
	************<br />
	<br />
	<strong>शिपाई नाही तर पाणी नाही</strong></p>
<p>
	अस्पृश्य मानल्या जाणार्‍या महार जातीचे बाबासाहेब होते. हेच कारण होते की त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांसह बसणे शक्य नव्हते आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा.</p>
<p>
	 </p>
<p>
	या शिवाय त्यांना त्या शाळेच्या नळालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती, पण इतर विद्यार्थ्यांना असे कुठलेही बंधन नव्हते. ते पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकत होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांना पाणी तेव्हाच मिळू शकते ज्या वेळी तिथला शिपाई त्यांना नळ सुरु करून देत असत. तो नसल्यावर अजून कोणते ही इतर विध्यार्थी त्यांना नळ सुरु करून देत नव्हते. या परिस्थितीचा सारांश त्यांने आपल्या एका लेखात पण नमूद केला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	" शिपाई नाही पाणी नाही।"</p>
<p>
	 </p>
<p>
	***********</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबासाहेब आणि ग्रंथपाल</strong></p>
<p>
	डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. ते दररोज १४ ते १८ तास अभ्यास सहजच करत असे. बडोद्याचे शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. शिक्षण आणि कठोर परिश्रमाच्या त्यांच्या आग्रहाखातर.</p>
<p>
	 </p>
<p>
	* बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. असे आख्यादित आहे की त्यांची वैयक्तिक लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती आणि त्यात पुस्तकांची संख्या ५० हजारांपेक्षा देखील अधिक होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	लंडन येथे वास्तव्याच्या वेळी ते दररोज एका लायब्ररीत जात असे आणि तासंतास अभ्यास करत असे. एकदा ते दुपारच्या जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून भाकरी खात होते तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बघितले आणि त्यांना चिडवले आणि टोमणा दिला की कॅफेटेरिया जाण्याऐवजी ते येथे लपून- छपून भोजन करत आहे. ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्याचे सदस्यत्व संपविण्याची धमकी दिली. ते ऐकून बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या संघर्ष आणि इंग्लंडमध्ये येण्याचे कारण सांगितले. तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरिया जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही त्याने दिली. हे ऐकल्यावर ग्रंथपाल म्हणाला-</p>
<p>
	" आजपासून आपण दुपारच्या जेवण्याच्या वेळी येथे न बसता माझ्यासोबतच कॅफेटेरियात येणार आणि मी माझे भोजन तुमच्याबरोबर वाटून खाणार.</p>
<p>
	* ग्रंथपाल एक ज्यू (यहुदी) होता आणि त्याचा या वागणुकीमुळे बाबासाहेबांच्या मनात यहुदींसाठी एक विशेष स्थान होते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2026 07:41:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2026 08:38:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर डेस्क</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आंबेडकर जयंतीला बाबासाहेबांचे हे विचार वाचल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही Ambedkar Jayanti 2026 Quotes in Marahti]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasahbe-ambedkar-quotes-in-marahti-126041300017_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasahbe-ambedkar-quotes-in-marahti-126041300017_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/11/thumb/1_1/1681190668-9472.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/11/thumb/1_1/1681190668-9472.jpg</image>
      <description><![CDATA[भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार—महामानव डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर—यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते. बाबासाहेब हे केवळ एक महान नेतेच नव्हते, तर लक्षावधी लोकांसाठी ते एक प्रेरणास्रोतही होते. त्यांचे विचार आजही समाजासाठी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/11/full/1681190668-9472.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" />
	<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:740px;">
		Bhimrao Ambedkar</p>
</p>
भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार—महामानव डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर—यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते. बाबासाहेब हे केवळ एक महान नेतेच नव्हते, तर लक्षावधी लोकांसाठी ते एक प्रेरणास्रोतही होते. त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून कार्य करत आहेत. दरवर्षी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने, लोक त्यांचे संदेश स्मरणात आणतात आणि ते आपल्या स्वतःच्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण, समानता आणि अधिकार यांविषयीचे त्यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत, जितके ते भूतकाळात होते. या विशेष प्रसंगी, आम्ही तुमच्यासाठी ३० प्रेरणादायी सुविचार सादर करत आहोत; जे तुमच्या विचारसरणीला एक नवी दिशा आणि दृष्टी प्रदान करू शकतील.<br />
<br />
<p>
	शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.</p>
<p>
	जीवन महान असावे, दीर्घ नव्हे.</p>
<p>
	शिक्षण हीच सर्वात मोठी शक्ती आहे.</p>
<p>
	मनाची मुक्ती हीच खरी मुक्ती आहे.</p>
<p>
	समतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे.</p>
<p>
	ज्ञान हाच जीवनाचा पाया आहे.</p>
<p>
	संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे.</p>
<p>
	महान कार्ये केवळ कठोर परिश्रमानेच साध्य होतात.</p>
<p>
	समाजाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली जाते.</p>
<p>
	विचारांचा प्रसार करणे अत्यावश्यक आहे.</p>
<p>
	जे लोक इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.</p>
<p>
	मानव मर्त्य आहे; विचार मात्र अमर आहेत.</p>
<p>
	दारिद्र्य निर्मूलनाचे सर्वात मोठे साधन म्हणजे शिक्षण.</p>
<p>
	स्वाभिमान हीच सर्वात मोठी शक्ती आहे.</p>
<p>
	हक्क हे संघर्षातूनच प्राप्त होतात.</p>
<p>
	केवळ संघटित समाजच बलवान असतो.</p>
<p>
	न्याय आणि समता हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत.</p>
<p>
	धर्म हा मानवासाठी आहे, मानव धर्मासाठी नाही.</p>
<p>
	स्वावलंबन हेच ​​मदतीचे खरे स्वरूप आहे.</p>
<p>
	सेवा हाच मोठेपणाचा मार्ग आहे.</p>
<p>
	समाजाचे परिवर्तन केवळ शिक्षणाद्वारेच होऊ शकते.</p>
<p>
	स्वतंत्र विचारसरणी हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे.</p>
<p>
	समता हा प्रत्येक मानवाचा अधिकार आहे.</p>
<p>
	धैर्याशिवाय बदल अशक्य आहे.</p>
<p>
	एकतेमध्येच शक्ती असते.</p>
<p>
	सामाजिक सुधारणेसाठी जागृती अत्यावश्यक आहे.</p>
<p>
	विकास केवळ ज्ञानाद्वारेच शक्य आहे.</p>
<p>
	एक न्याय्य समाजच एका बलवान राष्ट्राची उभारणी करतो.</p>
<p>
	स्वप्ने केवळ कठोर परिश्रमानेच साकार होतात.</p>
<p>
	सकारात्मक विचारच बदल घडवून आणतात.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2026 07:40:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2026 08:02:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर डेस्क</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू Bhim Janm Bhoomi Mhow]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/dr-babasaheb-ambedkar-birth-place-bhim-janmabhoomi-mhow-123041000035_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/dr-babasaheb-ambedkar-birth-place-bhim-janmabhoomi-mhow-123041000035_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/10/thumb/1_1/1681123318-6047.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/10/thumb/1_1/1681123318-6047.jpg</image>
      <description><![CDATA[भीम जन्मभूमी हे भीमराव आंबेडकर यांना समर्पित स्मारक आहे, जे भारतातील मध्य प्रदेशातील महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) येथे आहे. 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे जन्मलेल्या आंबेडकरांचे हे जन्मस्थान आहे. जिथे स्थानिक सरकारने हे भव्य स्मारक बांधले. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="" class="imgCont" height="493" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/10/full/1681123318-6047.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Bhim Janm Bhoomi" width="740" /></p>
	</p>
	भीम जन्मभूमी हे भीमराव आंबेडकर यांना समर्पित स्मारक आहे, जे भारतातील मध्य प्रदेशातील महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) येथे आहे. 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे जन्मलेल्या आंबेडकरांचे हे जन्मस्थान आहे. जिथे स्थानिक सरकारने हे भव्य स्मारक बांधले. आंबेडकरांच्या 100 व्या जयंती - 14 एप्रिल 1991 रोजी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री सुंदर लाल पटवा यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी स्मारकाची रचना केली होती. नंतर 14 एप्रिल 2008 रोजी आंबेडकरांच्या 117 व्या जयंतीनिमित्त स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ४.५२ एकर जमीन स्मारकाशी संलग्न आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	दरवर्षी आंबेडकरांचे लाखो अनुयायी, बौद्ध आणि इतर पर्यटक या ठिकाणी भेट देतात, विशेषत: 14 एप्रिल रोजी आणि आंबेडकरांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. महू इंदूरपासून 20 किमी अंतरावर आहे. याच ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये 125 व्या आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी भेट दिली होती. 2018 मध्ये 127 व्या आंबेडकर जयंतीला भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी महूला भेट दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	हे स्मारक पंचतीर्थांपैकी एक आहे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित पाच पवित्र स्थळे आहेत. मध्य प्रदेश सरकार दरवर्षी आंबेडकर जयंतीला महू येथे &#39;सामाजिक समरसता संमेलन&#39; आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन येथे केले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांनी त्यांचे शिक्षण पुण्यातील पंतोजी शाळेत पूर्ण केले आणि ब्रिटिश भारतीय सैन्यात शिक्षक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ते मुख्याध्यापक आणि नंतर प्रधानाध्यापक म्हणून प्रसिद्ध झाले. 14 वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर, सैन्यात सुभेदार-मेजर या पदावर महू येथे वाढ झाली. महू हे युद्धाचे लष्करी मुख्यालय होते. आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथील काली पलटण परिसरात भीमाबाई आणि रामजी सकपाळ यांच्या घरी झाला. आंबेडकरांची जन्मनावे भीम, भिवा आणि भीमराव अशी होती. अस्पृश्यता निर्मूलन, भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन आणि इतर कार्यांमुळे बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावर एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व मानले जावे. दलितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी ही पवित्र भूमी आणि महत्त्वाचे स्थान बनले.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="" class="imgCont" height="609" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/10/full/1681123341-5553.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Bhim Janm Bhoomi" width="740" /></p>
	</p>
</p>
<p>
	27 मार्च 1991 रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती" चे संस्थापक अध्यक्ष बौद्ध भिक्षू संघशील यांनी समितीची बैठक आयोजित केली होती. स्मारकाच्या पायाभरणीसाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जन्मभूमी येथील स्मारक इमारतीची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी केली होती. जयंती साजरी करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भंतेजी (बौद्ध भिक्षू) आंबेडकरांचा कलश गोळा करण्यासाठी मुंबईला गेले आणि 12 एप्रिल 1991 रोजी कलश घेऊन महूला परतले. 14 एप्रिल 1991 रोजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते स्मारकाची पायाभरणी करण्यात आली. या संघटनेत अटलबिहारी वाजपेयी आणि मंत्री भेरूलाल पाटीदार आणि भन्ते धर्मशील उपस्थित होते. नंतर भव्य भीमजन्मभूमी स्मारक बांधण्यात आले आणि स्मारकाचे उद्घाटन 14 एप्रिल 2008 रोजी आंबेडकरांच्या 117 व्या जयंती दिवशी करण्यात आले.</p>
<p>
	 </p>
<p>
	या स्मारकाची रचना बौद्ध स्तूप वास्तुकलासारखी आहे. स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला आहे. स्मारकामध्ये पुतळ्याच्या वर "भीम जन्मभूमी" अशी हिंदी अक्षरे कोरलेली आहेत आणि एक मोठे अशोक चक्र आहे. स्मारकाच्या समोर आणि वरच्या बाजूला दोन बौद्ध ध्वज आहेत. स्मारकाच्या आत बाबासाहेबांच्या जीवनशैलीची अनेक चित्रे मांडण्यात आली आहेत. याशिवाय गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर यांच्याही मूर्ती आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबा साहेबांचे जन्मस्थान कसे ओळखले गेले ते जाणून घेऊया-</strong></p>
<p>
	1956 मध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे निधन झाले, त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे 1970 मध्ये महाराष्ट्रातील भंते धर्मशील यांनी बाबा साहेबांच्या जन्मस्थानाचा शोध सुरू केला. खरे तर बाबासाहेबांच्या जन्मस्थानाबाबत विरोधाभास असल्याने हे घडले. काही लोक तो महाराष्ट्रातील रत्नागिरीतील तर काही मध्य प्रदेशातील महू येथील असल्याचे मानले. यानंतर भन्ते धर्मशील यांनी शोध सुरू केला. बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यात सुभेदार असून महू येथे तैनात असल्याचे भंते धर्मशील यांना समजले. यानंतर ते महूला पोहोचले. वडील जिथे राहत होते तिथे त्यांना बॅरेक सापडली. तेथे बाबासाहेबांच्या जन्माचे पुरावे मिळाले. पुढे बाबासाहेबांचा जन्म याच बॅरेकीत झाल्याची अधिकृत माहितीही देण्यात आली. ती बॅरेक 22500 स्क्वेअर फूट होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	यानंतर भंते धर्मशील यांनी त्यांच्या स्मारकासाठी सरकारकडून 22500 चौरस फूट जागा मिळवण्यासाठी संघर्ष केला. अनेक वर्षे संघर्ष केला. आंबेडकर स्मारक उभारण्यासाठी डॉ. आंबेडकर मेमोरिअल सोसायटीची स्थापना करून जमीन मिळवण्यासाठी लष्कर व सरकारशी वर्षानुवर्षे पत्रव्यवहार केला. प्रदीर्घ संघर्षानंतर 1976 मध्ये स्मारकासाठी जमीन संपादित करण्यात आली. 14 एप्रिल 1991 रोजी 100 व्या जयंतीदिनी तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी जन्मस्थळी स्मारकाची पायाभरणी केली. या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी स्व. राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, कांशीराम, मायावती यांच्यासह देशातील सर्वोच्च नेते जन्मभूमीवर एकत्र जमले. स्मारकाच्या आत भित्तिचित्रे आहेत आणि बाबा साहेबांचा त्यांच्या पत्नीसोबतचा फोटोही आहे. त्यांचा अस्थी कलशही ठेवला आहे.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="" class="imgCont" height="729" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/10/full/1681123542-3419.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar birth place mhow" width="740" /></p>
	</p>
</p>
<p>
	<strong>भीम जन्मभूमी कसे पोहचाल How to Reach Bhim Janm Bhoomi (Mhow)</strong></p>
<p>
	विमानाने - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ हे इंदूर विमानतळ आहे जे भारतातील सर्व प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थानापासून 27 किमी अंतरावर आहे. विमानतळावरून अनेक भाड्याच्या कार सहज उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जातील.</p>
<p>
	 </p>
<p>
	आगगाडी - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानी जाण्यासाठी इंदूर रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	रस्त्याने - इंदूरहून टॅक्सी भाड्याने प्रवास करता येईल. तुम्ही तुमची कार देखील घेऊ शकता आणि वाटेत निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेत एक लहान रोड ट्रिप देखील करू शकता.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2026 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2026 09:07:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर डेस्क</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Ambedkar Jayanti 2026 Wishes in Marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2026-wishes-in-marathi-126041100027_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2026-wishes-in-marathi-126041100027_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/11/thumb/1_1/1775904600-7505.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/11/thumb/1_1/1775904600-7505.jpg</image>
      <description><![CDATA[समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या 
महासूर्याला विनम्र अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="dr babasaheb ambedkar jayanti 2026 wishes in marathi" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/11/full/1775904600-7505.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	</p>
	समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या </p>
<p>
	महासूर्याला विनम्र अभिवादन</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	ज्यांच्यामुळे आज आपण ताठ मानेने जगत आहोत, </p>
<p>
	त्या जगातील सर्वात विद्वान व्यक्तीला, </p>
<p>
	महामानवाला कोटी कोटी प्रणाम</p>
<p>
	भीम जयंतीच्या शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे </p>
<p>
	आणि जो ते प्राशन करेल </p>
<p>
	तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही! </p>
<p>
	अशा विचारांची प्रेरणा देणाऱ्या </p>
<p>
	बाबासाहेबांना जयंती निमित्त अभिवादन</p>
<p>
	 </p>
<p>
	अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद ज्यांनी दिली, </p>
<p>
	त्या क्रांतीसूर्याला मानाचा मुजरा</p>
<p>
	भीम जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, </p>
<p>
	भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!</p>
<p>
	 </p>
<p>
	शून्यातून विश्व निर्माण करणारी शक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर</p>
<p>
	अशा युगपुरुषाच्या विचारांना आज पुन्हा एकदा स्मरण्याचा दिवस</p>
<p>
	जय भीम!</p>
<p>
	 </p>
<p>
	तुमच्या विचारांची मशाल कायम तेवत राहील, </p>
<p>
	समतेचा विचार मनात सदैव राहील</p>
<p>
	बाबासाहेब जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	विद्वत्तेचे महासागर आणि कोट्यवधींच्या जीवनातील प्रकाश, </p>
<p>
	बाबासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा! </p>
<p>
	भीम जयंती निमित्त मंगलमयी शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	जगाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या </p>
<p>
	महामानवाला जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम</p>
<p>
	सर्वांना आंबेडकरी शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या, </p>
<p>
	म्हणजे तो बंड करून उठेल </p>
<p>
	या विद्रोही विचारांच्या जनकाला जयंती निमित्त अभिवादन</p>
<p>
	 </p>
<p>
	निळा झेंडा आणि भीमरायांचा विचार, </p>
<p>
	हाच आमचा खरा आधार</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपणास मन:पूर्वक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असावेत, </p>
<p>
	हा संस्कार देणाऱ्या घटनेच्या शिल्पकाराला त्रिवार वंदन</p>
<p>
	 </p>
<p>
	आजचा दिवस आनंदाचा, </p>
<p>
	आजचा दिवस उत्साहाचा, </p>
<p>
	कारण आज जन्म झाला </p>
<p>
	माझ्या भीमरायाचा</p>
<p>
	भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	ज्ञानाचा अथांग सागर </p>
<p>
	आणि जगातील सर्वात महान संविधान देणाऱ्या </p>
<p>
	महामानवाला विनम्र अभिवादन</p>
<p>
	जय भीम, जय भारत!</p>
<p>
	 </p>
<p>
	तुमच्यामुळे आम्हाला आमची ओळख मिळाली, </p>
<p>
	तुमच्यामुळे आम्हाला आमचे हक्क मिळाले</p>
<p>
	बाबासाहेब, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2026 07:19:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2026 08:02:01 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर डेस्क</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Dr Babasaheb Ambedkar Essay 2026 डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/essay-on-dr-babasaheb-ambedkar-123040400025_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/essay-on-dr-babasaheb-ambedkar-123040400025_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/thumb/1_1/1618034850-3322.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/thumb/1_1/1618034850-3322.jpeg</image>
      <description><![CDATA[भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने डॉ. बी. आर. आंबेडकरांना निमंत्रित केले होते. डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची भारताच्या नवीन घटना आणि संविधान निर्माण समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar quotes" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/full/1618034850-3322.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar jayanti quotes" width="740" /></p>
	प्रस्तावना</p>
<p>
	भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने डॉ. बी. आर. आंबेडकरांना निमंत्रित केले होते. डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची भारताच्या नवीन घटना आणि संविधान निर्माण समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. बांधकाम समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी घटनेच्या रचनेत महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. आंबेडकरांनी तयार केलेले संविधान हा पहिला सामाजिक दस्तावेज होता. त्यांनी सामाजिक क्रांतीच्या प्रचारासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांनी तयार केलेल्या तरतुदींनी भारतातील नागरिकांसाठी घटनात्मक आश्वासन आणि नागरी स्वातंत्र्याचे संरक्षण प्रदान केले. त्यात धर्मस्वातंत्र्य, सर्व प्रकारच्या भेदभावांवर बंदी आणि अस्पृश्यता निर्मूलनाचाही समावेश होता. आंबेडकरांनी स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक अधिकारांचा पुरस्कार केला. त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय सदस्यांसाठी प्रशासकीय सेवा, महाविद्यालये आणि शाळांमधील नोकऱ्यांच्या आरक्षणासाठी काम केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ भीमराव आंबेडकर यांचे सुरुवातीचे जीवन</p>
<p>
	भीमराव आंबेडकर भीमबाईंचे पुत्र होते आणि त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू आर्मी कॅन्टोन्मेंट, मध्य प्रांत मध्यप्रदेश येथे झाला. त्यांचे वडील भारतीय सैन्यात सुभेदार होते. 1894 मध्ये वडिलांच्या निवृत्तीनंतर ते संपूर्ण कुटुंबासह सातारा येथे राहायला गेले. चार वर्षांनंतर आंबेडकरांच्या आईचे निधन झाले आणि त्यांच्या काकूंनी त्यांची काळजी घेतली. बाबासाहेब आंबेडकरांना बलराम आणि आनंद राव हे दोन भाऊ आणि मंजुळा आणि तुळसा या दोन बहिणी होत्या आणि सर्व मुलांपैकी फक्त आंबेडकर हायस्कूलमध्ये गेले. त्यांच्या आईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि कुटुंब मुंबईला हलवले. वयाच्या 15 व्या वर्षी आंबेडकरांनी रमाबाई यांच्याशी विवाह केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांचा जन्म एका गरीब दलित जातीच्या कुटुंबात झाला त्यामुळे त्यांना बालपणीच जातीय भेदभाव आणि अपमानाचा सामना करावा लागला. त्यांच्या कुटुंबाला उच्चवर्गीय कुटुंबे अस्पृश्य मानत. आंबेडकरांच्या पूर्वजांनी आणि त्यांच्या वडिलांनी ब्रिटिश ईस्ट इंडियन आर्मीमध्ये दीर्घकाळ काम केले होते. आंबेडकर अस्पृश्य शाळांमध्ये शिकले, परंतु त्यांना शिक्षकांनी महत्त्व दिले नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	ब्राह्मण आणि विशेषाधिकारप्राप्त समाजातील उच्च वर्गाव्यतिरिक्त त्यांना वर्गाच्या बाहेर बसायला लावले होते, त्यांना पाणी प्यायचे होते तेव्हाही एका शिपायाने पाण्याला हात लावण्याची परवानगी नसल्यामुळे ते उंचावरून ओतले. कारण त्यांना पाणी आणि पाण्याच्या भांड्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. आंबेडकरांना लष्करी शाळेसह सर्वत्र समाजाकडून एकटेपणाचा आणि अपमानाचा सामना करावा लागला.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ भीमराव आंबेडकर यांचे शिक्षण</p>
<p>
	मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकणारे ते एकमेव दलित होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते 1908 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचे यश हे दलितांसाठी आनंदाचे कारण होते कारण असे करणारे ते पहिले व्यक्ती होते. 1912 मध्ये त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या योजनेअंतर्गत त्यांना बडोदा राज्य शिष्यवृत्ती मिळाली आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला.</p>
<p>
	 </p>
<p>
	जून 1915 मध्ये त्यांनी अर्थशास्त्र तसेच इतिहास, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान आणि राजकारण या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 1916 मध्ये ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेले आणि त्यांच्या "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: इट्स ओरिजिन अँड सोल्युशन" या प्रबंधावर काम केले, त्यानंतर 1920 मध्ये ते इंग्लंडला गेले जेथे त्यांनी लंडन विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आणि 1927 मध्ये त्यांनी डॉ. अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ भीमराव आंबेडकरांची जातिभेद संपवण्याची भूमिका</p>
<p>
	जातिव्यवस्था ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट गटातील व्यक्तीच्या जन्माच्या आधारावर व्यक्तीची स्थिती, कर्तव्ये आणि अधिकार वेगळे केले जातात. हे सामाजिक विषमतेचे गंभीर स्वरूप आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महार जातीतील गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबावर सतत सामाजिक आणि आर्थिक भेदभाव केला जात होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	लहानपणीच त्यांना अस्पृश्य जाती मानल्या जाणार्‍या महार जातीशी संबंधित असल्यामुळे सामाजिक बहिष्कार, अस्पृश्यता आणि अपमानाचा सामना करावा लागला. लहानपणी शाळेतील शिक्षकांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही, मुलंही त्याच्यासोबत बसून जेवत नाहीत, त्याला पाण्याच्या भांड्याला हात लावण्याचाही अधिकार नव्हता आणि त्याला वर्गाबाहेर बसवलं गेलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	जातीव्यवस्थेमुळे समाजात अनेक सामाजिक दुष्कृत्ये पसरली होती. बाबासाहेब आंबेडकरांसाठी जातिव्यवस्था ज्या धार्मिक श्रद्धेवर आधारित होती ती संपवणे आवश्यक होते. त्यांच्या मते जातिव्यवस्था ही केवळ श्रमांची विभागणी नव्हती तर कामगारांची विभागणीही होती. सर्व समाजाच्या एकतेवर त्यांचा विश्वास होता. ग्रेज इन येथे बार कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायदेशीर प्रॅक्टिस सुरू केली. जातिभेदाच्या खटल्यांची वकिली करण्यात त्यांनी आपले अद्भुत कौशल्य दाखवले. ब्राह्मणांविरुद्ध ब्राह्मणेतरांचे रक्षण करण्यात त्यांचा विजयाने त्यांच्या भविष्यातील लढायांचा पाया घातला.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांनी दलितांच्या पूर्ण हक्कासाठी अनेक चळवळी सुरू केल्या. त्यांनी सर्व जातींसाठी सार्वजनिक जलस्रोत आणि मंदिरांमध्ये प्रवेशाचा अधिकार मागितला. भेदभावाचे समर्थन करणाऱ्या हिंदू धर्मग्रंथांचाही त्यांनी निषेध केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ भीमराव आंबेडकरांनी जातिभेदाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांना आयुष्यभर वेदना आणि अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांनी अस्पृश्य आणि इतर उपेक्षित समुदायांसाठी स्वतंत्र निवडणूक प्रणालीची कल्पना मांडली. दलित आणि इतर बहिष्कृतांसाठीच्या आरक्षणाची संकल्पना त्यांनी मांडली आणि तिला आकार दिला. 1932 मध्ये तात्पुरत्या कायदेमंडळात सामान्य मतदारांमध्ये उदासीन वर्गासाठी जागांच्या आरक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी पूना करारावर स्वाक्षरी केली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	संयुक्त मतदारांच्या सातत्यात बदल करून खालच्या वर्गाला अधिक जागा देणे हा पूना कराराचा उद्देश होता. नंतर या वर्गांना अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती असे संबोधण्यात आले. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना सामाजिक दुष्कृत्यांचा नकारात्मक प्रभाव समजावून सांगण्यासाठी, आंबेडकरांनी मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब आंबेडकरही महात्मा गांधींच्या हरिजन चळवळीत सामील झाले. ज्यामध्ये त्यांनी भारतातील मागासलेल्या जातीतील लोकांवर होणाऱ्या सामाजिक अन्यायाविरोधात आंदोलनात योगदान दिले. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे एक प्रमुख व्यक्ती होते ज्यांनी भारतातून अस्पृश्यता संपवण्यात मोठे योगदान दिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बी. आर. आंबेडकरांचे बौद्ध धर्मात परिवर्तन</p>
<p>
	14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो समर्थकांसह नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. सुरुवातीला आंबेडकरांना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मही समजला.</p>
<p>
	 </p>
<p>
	1935 मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला येथे डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्समध्ये भीमराव आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली. हे कोणत्याही प्रकारचे वैर आणि हिंदू धर्माचा विध्वंस करण्यासाठी जाहीर करण्यात आले नव्हते, परंतु हिंदू धर्माशी अजिबात सुसंगत नसलेली काही मूलभूत तत्त्वे घेऊन निर्णय घेण्यात आला.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी आपल्या अनुयायांना हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले. या धर्मांतराच्या घोषणेनंतर हैदराबादच्या निजामापासून इस्लामच्या अनेक ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना कोट्यवधी रुपयांची प्रलोभने दाखवली, परंतु त्यांनी ती सर्व नाकारली. निःसंशयपणे, त्यांना दलित समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्याची देखील इच्छा होती, परंतु इतर लोकांच्या पैशावर अवलंबून न राहता, त्यांच्या मेहनतीने आणि संघटनेने. याशिवाय आंबेडकरांना असा धर्म निवडायचा होता ज्याच्या केंद्रस्थानी माणूस आणि नैतिकता असेल, त्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असेल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना जातीवाद आणि अस्पृश्यतेच्या रोगाने जखडलेला असा धर्म स्वीकारायचा नव्हता किंवा अंधश्रद्धा आणि दांभिकता असलेला धर्म निवडायचा नव्हता.</p>
<p>
	 </p>
<p>
	बौद्ध धर्म प्रज्ञा (अंधश्रद्धा आणि अलौकिकता ऐवजी तर्काचा वापर), करुणा (प्रेम) आणि समता (समानता) शिकवतो. ते म्हणाले की मनुष्याला या गोष्टी शुभ आणि आनंदी जीवनासाठी हव्या असतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	निष्कर्ष</p>
<p>
	अशा प्रकारे डॉ बीआर आंबेडकर यांनी आयुष्यभर न्याय आणि असमानता यासाठी लढा दिला. जातिभेद आणि विषमता निर्मूलनासाठी त्यांनी काम केले. न्याय आणि सामाजिक समतेवर त्यांचा ठाम विश्वास होता आणि संविधानात धर्म आणि जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव होणार नाही याची काळजी घेतली.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2026 06:58:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2026 08:01:30 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Ambedkar Jayanti 2026 Speech in Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/essay-marathi/dr-br-ambedkar-jayanti-2026-speech-in-marathi-126040600044_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/essay-marathi/dr-br-ambedkar-jayanti-2026-speech-in-marathi-126040600044_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/06/thumb/1_1/1775471389-2055.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/06/thumb/1_1/1775471389-2055.jpg</image>
      <description><![CDATA["शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!" हा महामंत्र देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत. सर्वात आधी तुम्हा सर्वांना 'भीम जयंती'च्या खूप खूप शुभेच्छा!

१४ एप्रिल १८९१ ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Ambedkar Jayanti 2026 Speech in Marathi" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/06/full/1775471389-2055.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	</p>
	आदरणीय मुख्य अतिथी महोदय, मान्यवर शिक्षकगण, प्राचार्य महोदय, उपस्थित मित्रांनो आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बांधवांनो,</p>
<p>
	"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!" हा महामंत्र देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत. सर्वात आधी तुम्हा सर्वांना &#39;भीम जयंती&#39;च्या खूप खूप शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	१४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका सामान्य कुटुंबात भीमरावांचा जन्म झाला. पण त्यांचे विचार आणि कार्य असामान्य होते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे संघर्षाची आणि ध्येयवादाची एक गाथा आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ. बाबासाहेबांचे कर्तृत्व आणि विचार</strong></p>
<p>
	बाबासाहेबांनी बालपणीच जातीभेद आणि अस्पृश्यतेचा कडवा अनुभव घेतला. शाळेत बसण्यासाठी वेगळी जागा, पाणी पिण्यासाठी वेगळी व्यवस्था अशा अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला. पण त्यांनी कधी हार मानली नाही. अथक परिश्रमाने त्यांनी उच्च शिक्षण घेतले. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा नामवंत संस्थांमधून अर्थशास्त्र, कायदे, राजकीय शास्त्र यात डॉक्टरेट मिळवली. ते जगातील पहिले भारतीय होते ज्यांना दोन विषयांत डॉक्टरेट मिळाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब म्हणायचे, "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले आणि सिद्ध केले की ज्ञान हेच प्रगतीचे सर्वात मोठे शस्त्र आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	ज्या काळात अस्पृश्यता आणि विषमतेने समाजाला ग्रासले होते, त्या काळात त्यांनी दीन-दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला. &#39;महाडचा चवदार तळे सत्याग्रह&#39; असो वा &#39;काळाराम मंदिर प्रवेश&#39;, त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारताला एका सूत्रात बांधणारी आणि सर्वांना समान हक्क देणारी जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. म्हणूनच त्यांना &#39;भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार&#39; मानले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी केवळ दलितांसाठीच नाही, तर महिलांच्या अधिकारांसाठीही &#39;हिंदु कोड बिल&#39;च्या माध्यमातून मोठे पाऊल उचलले.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब हे केवळ शिक्षण घेणारे नव्हते, तर ते समाजसुधारक, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि कायदेपंडित होते. त्यांनी दलित, शोषित, स्त्रिया आणि मागासवर्गीयांसाठी अथक लढा दिला.</p>
<p>
	 </p>
<p>
	मित्रांनो, बाबासाहेबांची जयंती केवळ मिरवणुका काढण्यासाठी किंवा घोषणा देण्यासाठी नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	 तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. अंधश्रद्धा सोडून विज्ञानाची कास धरणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जात-पात विसरून आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना जोपासणे गरजेचे आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	“शिक्षण, संघटन आणि संघर्ष” हेच तीन मंत्र त्यांनी दिले.</p>
<p>
	ते म्हणाले होते — “मी असा धर्म स्वीकारेन जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता शिकवतो.” त्यानुसार १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.१९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.</p>
<p>
	 </p>
<p>
	आजच्या या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अवलंब करूया. जाती-पाती, अस्पृश्यता, भेदभाव यांना दूर ठेवून समानता, न्याय आणि बंधुत्व असलेले समाज घडवूया. शिक्षण घेऊया, संघटित राहूया आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांचे शब्द आपल्याला नेहमी प्रेरणा देतील:</p>
<p>
	“ज्या समाजात असमानता आहे, त्या समाजात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असू शकत नाही.”</p>
<p>
	आपण सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याची शपथ घेऊया.</p>
<p>
	 </p>
<p>
	धन्यवाद!</p>
<p>
	जय भीम! जय संविधान!! जय भारत!!!</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>टीप:</strong></p>
<p>
	हे भाषण शाळा-कॉलेज कार्यक्रम, सार्वजनिक सभा किंवा ऑनलाइन साठी योग्य आहे.</p>
<p>
	तुम्ही वेळेनुसार छोटे (२-३ मिनिटे) किंवा लांब (५-७ मिनिटे) करू शकता.</p>
<p>
	भाषण देताना आत्मविश्वासाने, स्पष्ट उच्चाराने आणि भावनिक आवाजात बोला.</p>
<p>
	शेवटी जय भीम म्हणून संपवा — श्रोते जोरात प्रतिसाद देतील.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2026 06:47:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2026 08:00:46 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Essay Marathi]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Mahaparinirvan Din 2025 Messages In Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-bhimrao-ambedkar-mahaparinirvan-din-2025-messages-in-marathi-125120500028_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-bhimrao-ambedkar-mahaparinirvan-din-2025-messages-in-marathi-125120500028_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-12/05/thumb/1_1/1764928987-3591.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-12/05/thumb/1_1/1764928987-3591.jpg</image>
      <description><![CDATA[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना कोटी-कोटी विनम्र अभिवादन. 
तुमची समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण कायम आम्हाला प्रेरणा देत राहील. जय भीम!

“मी माझ्या लोकांसाठी जगलो आणि मरण पत्करले” ही बाबासाहेबांची शिकवण ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-12/05/full/1764928987-3591.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	</p>
	येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी मराठीत हृदयस्पर्शी संदेश:</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना कोटी-कोटी विनम्र अभिवादन. </p>
<p>
	तुमची समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण कायम आम्हाला प्रेरणा देत राहील. जय भीम!</p>
<p>
	 </p>
<p>
	“मी माझ्या लोकांसाठी जगलो आणि मरण पत्करले” ही बाबासाहेबांची शिकवण आजही जिवंत आहे. </p>
<p>
	महापरिनिर्वाण दिनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय भीम, जय भारत!</p>
<p>
	 </p>
<p>
	दलितांच्या मुक्तिदात्या, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन. </p>
<p>
	तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही घेतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	आज ६ डिसेंबर… बाबासाहेब नाहीत म्हणून शांतता आहे, पण त्यांची विचारधारा आजही लाखो हृदयांत धडकते. </p>
<p>
	महापरिनिर्वाण दिनी त्यांना त्रिवार श्रद्धासुमन.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब, तुम्ही गेलात पण तुमचे विचार कधीच जाणार नाहीत. </p>
<p>
	तुमच्या समतेसाठीच्या लढ्याला सलाम. </p>
<p>
	महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम. निळ्या झेंड्याला वंदन!</p>
<p>
	 </p>
<p>
	शिक्षण, संघटना, संघर्ष ही तुमची त्रिसूत्री आजही मार्गदर्शक आहे. </p>
<p>
	महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र श्रद्धांजली.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आज आपण श्वास घेत आहोत. </p>
<p>
	त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना मनापासून अभिवादन आणि कृतज्ञता.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब तुम्ही गेलात तरी तुमच्या विचारांची ज्योत विझणार नाही. </p>
<p>
	आजही आम्ही तुमची तळमळीने आठवण करतो. जय भीम, जय भारत!</p>
<p>
	 </p>
<p>
	ज्यांनी शोषित-वंचितांना जगण्याचे कारण दिले, </p>
<p>
	त्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनी मी लीन होऊन नमन करतो. </p>
<p>
	बाबासाहेब तुम्ही अमर आहात.</p>
<p>
	 </p>
<p>
	बुद्धाच्या करुणेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा लाभलेल्या बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी वंदन. </p>
<p>
	तुमच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब, तुमच्या बलिदानामुळे आज लाखो लोकांना मानाने जगता येते. </p>
<p>
	तुमच्या महापरिनिर्वाण दिनी मी तुमच्या चरणी श्रद्धासुमन अर्पित करतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर</p>
<p>
	यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!</p>
<p>
	 </p>
<p>
	हे संदेश सोशल मीडियावर (WhatsApp, Facebook, Instagram, X) किंवा वैयक्तिक शुभेच्छा म्हणून वापरता येतील. जय भीम! जय भारत!</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 06 Dec 2025 07:15:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 06 Dec 2025 08:00:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Mahaparinirvan Din Speech 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-din-2025-speech-in-marahti-125120500013_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-din-2025-speech-in-marahti-125120500013_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-12/05/thumb/1_1/1764915132-8102.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-12/05/thumb/1_1/1764915132-8102.jpg</image>
      <description><![CDATA[आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर अतिथीगण, प्रिय बंधू-भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो,
आज ६ डिसेंबर… हा दिवस भारतीय इतिहासातील एक अत्यंत दुःखद व वेदनामय दिवस आहे. आजपासून ठीक ६९ वर्षांपूर्वी, ६ डिसेंबर १९५६ रोजी भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-12/05/full/1764915132-8102.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	</p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण</p>
<p>
	(६ डिसेंबर – महापरिनिर्वाण दिन)</p>
<p>
	 </p>
<p>
	आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर अतिथीगण, प्रिय बंधू-भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो,</p>
<p>
	आज ६ डिसेंबर… हा दिवस भारतीय इतिहासातील एक अत्यंत दुःखद व वेदनामय दिवस आहे. आजपासून ठीक ६९ वर्षांपूर्वी, ६ डिसेंबर १९५६ रोजी भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलित-शोषित-वंचितांच्या कैवारी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यक्ती गेली नाही, तर एक युग संपले… एक क्रांती थांबली… आणि करोडो शोषितांचा आधार हरपला.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब म्हणजे फक्त नाव नव्हते… ते एक विचार होते, एक संघर्ष होता, एक स्वप्न होते… समतेचे, न्यायाचे आणि बंधुतेचे स्वप्न!</p>
<p>
	 </p>
<p>
	जन्मापासूनच त्यांना अस्पृश्यतेच्या जाचक बेड्या सहन कराव्या लागल्या. पाण्याच्या टाक्याला हात लावला म्हणून अपमान सहन करावा लागला, शाळेत वेगळे बसावे लागले, गुरुजीही पाणी प्यायला देत नव्हते… तरीही त्यांनी शिक्षण सोडले नाही. कोल्हापूरच्या महाराजांच्या मदतीने, स्वतःच्या अथक परिश्रमाने त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली, लंडनमधून बार-ऍट-लॉ आणि डी.एस्सी. पदवी मिळवली. जगातील सर्वाधिक शिकलेले नेते म्हणून त्यांचा आजही आदर केला जातो.</p>
<p>
	पण बाबासाहेबांनी शिक्षण फक्त स्वतःसाठी घेतले नाही. ते परत आले आणि म्हणाले,</p>
<p>
	“शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!!”</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा उभा केला, पूना करार केला, १९५१ मध्ये हिंदू कोड बिलासाठी संसदेत धडक दिली आणि शेवटी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६ लाख लोकांसमोर बौद्ध धम्म स्वीकारला. कारण त्यांना माहीत होते की, जोपर्यंत जातीआधारित धर्म आहे, तोपर्यंत खरी समता येणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	आणि सर्वात मोठे काम… भारतीय राज्यघटना!</p>
<p>
	जगातील सर्वात मोठी लेखी राज्यघटना… जी प्रत्येक भारतीयाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय देते… ती बाबासाहेबांनी आपल्या रक्ताने-पोटाने लिहिली. आज आपण घटनेच्या छायेत शांतपणे झोपतो, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.</p>
<p>
	पण आजही प्रश्न पडतो…</p>
<p>
	बाबासाहेब गेल्यानंतर ६९ वर्षे झाली, तरी का अजूनही दलितांवर अत्याचार होतात?</p>
<p>
	का अजूनही खेड्यांमध्ये अस्पृश्यता आहे?</p>
<p>
	का अजूनही मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करणारे आपले बंधू मरण पावतात?</p>
<p>
	का अजूनही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणावरून वाद होतात?</p>
<p>
	कारण बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले नाही… ते अर्धवट राहिले.</p>
<p>
	आज आपण फक्त त्यांची जयंती साजरी करतो, पुतळ्यांना हार घालतो, पण त्यांचा विचार जगतो का?</p>
<p>
	बाबासाहेब म्हणाले होते,</p>
<p>
	“मी तुम्हाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देऊ शकतो, पण ती टिकवण्याची जबाबदारी तुमची आहे.”</p>
<p>
	म्हणून आज महापरिनिर्वाण दिनी आपण प्रतिज्ञा करूया की,</p>
<p>
	आपण जाती-जातीत भेदभाव करणार नाही.</p>
<p>
	आपण बाबासाहेबांचे २२ प्रतिज्ञा पाळू.</p>
<p>
	आपण शिक्षण घेऊ आणि देऊ.</p>
<p>
	आपण बौद्ध धम्माच्या करुणा-मैत्री-समतेच्या मार्गावर चालू.</p>
<p>
	आणि सर्वांत महत्त्वाचे… आपण बाबासाहेबांचा विचार घेऊन त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करू!</p>
<p>
	 </p>
<p>
	जय भीम! जय बुद्ध! जय भारत!</p>
<p>
	बाबासाहेब अमर राहो! त्यांचा विचार अमर राहो!</p>
<p>
	धन्यवाद!</p>
<p>
	जय हिंद! जय भीम!!</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 06 Dec 2025 06:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 06 Dec 2025 08:01:07 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा Ambedkar Jayanti Wishes 2025 Marathi]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-wishes-2025-123040700031_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-wishes-2025-123040700031_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2022-05/02/thumb/1_1/1651490964-9064.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2022-05/02/thumb/1_1/1651490964-9064.jpg</image>
      <description><![CDATA[नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="middle" alt="" class="imgCont" height="503" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2022-05/02/full/1651490964-9064.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
	नमन त्या पराक्रमाला</p>
<p>
	नमन त्या देशप्रेमाला</p>
<p>
	नमन त्या ज्ञान देवतेला</p>
<p>
	नमन त्या महापुरुषाला</p>
<p>
	नमन अशा आपल्या बाबासाहेबांना</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,</p>
<p>
	भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर</p>
<p>
	जयंती निमित्त या पावन स्मृतीस,</p>
<p>
	विनम्र अभिवादन!</p>
<p>
	जय भीम</p>
<p>
	 </p>
<p>
	राजा येतोय संविधानाचा</p>
<p>
	भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार</p>
<p>
	ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला</p>
<p>
	दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला</p>
<p>
	डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त</p>
<p>
	सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	ज्याने सर्वांना समजले एक समान</p>
<p>
	असे होते आमचे बाबा महान</p>
<p>
	डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या </p>
<p>
	जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	निळ्या रक्ताची धमक बघ</p>
<p>
	स्वाभिमानाची आग आहे</p>
<p>
	घाबरू नको कुणाच्या बापाला</p>
<p>
	तू भीमाचा वाघ आहे</p>
<p>
	डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त</p>
<p>
	सर्वांना हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/32-degrees-of-ambedkar-list-125040200018_1.html" target="_blank">32 Degrees of Dr. BR Ambedkar डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या ३२ पदव्या</a></strong></p>
</p>
<p>
	मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू</p>
<p>
	जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची</p>
<p>
	भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-information-in-marathi-125041100030_1.html" target="_blank">भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती</a></strong></p>
</p>
<p>
	दलितांचे ते तलवार होऊन गेले</p>
<p>
	अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले</p>
<p>
	होते ते एक गरीबच पण या जगाचा</p>
<p>
	कोहिनूर होऊन गेले</p>
<p>
	जग खूप रडवीत होता</p>
<p>
	त्यांना पण ते या जगाला घडवून गेले</p>
<p>
	अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही</p>
<p>
	वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा</p>
<p>
	त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.</p>
<p>
	भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	सागराचे पाणी कधी आटणार नाही</p>
<p>
	भिमाची आठवण कधी मिटणार नाही</p>
<p>
	अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी</p>
<p>
	आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2025-speech-in-marathi-125040900018_1.html" target="_blank">Ambedkar Jayanti Speech 2025 डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर मराठी भाषण</a></strong></p>
</p>
<p>
	दगड झालो तर दिक्षाभुमीचा होईल</p>
<p>
	माती झालो तर चैत्यभूमीचा होईल</p>
<p>
	हवा झालो तर भीमाकोरेगावची होईल</p>
<p>
	पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल</p>
<p>
	आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला</p>
<p>
	तर आई शपथ फक्त आणि फक्त</p>
<p>
	जय भीमवालाच होईल</p>
<p>
	 </p>
<p>
	सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती</p>
<p>
	तुम्ही येणार म्हटल्यान</p>
<p>
	नसानसांत भरली स्फूर्ती</p>
<p>
	आतुरता फक्त आगमनाची</p>
<p>
	जयंती माझ्या बाबांची.</p>
<p>
	जय भीम</p>
<p>
	 </p>
<p>
	हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग होता…</p>
<p>
	अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता…</p>
<p>
	असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर</p>
<p>
	लाखात नाहीतर तर जगात एक होता…</p>
<p>
	 </p>
<p>
	ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,</p>
<p>
	दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…</p>
<p>
	कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला</p>
<p>
	ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला…</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 14 Apr 2025 07:28:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Apr 2025 08:31:13 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[32 Degrees of Dr. BR Ambedkar डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या ३२ पदव्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/32-degrees-of-ambedkar-list-125040200018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/32-degrees-of-ambedkar-list-125040200018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/02/thumb/1_1/1743577480-9236.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/02/thumb/1_1/1743577480-9236.jpg</image>
      <description><![CDATA[भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव आंबेडकर हे भारतीय इतिहासातील सर्वात शिक्षित नेते मानले जातात. त्याच्याकडे अनेक पदव्या असल्याचे म्हटले जाते. त्यांच्याकडे भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमधून पदव्या होत्या. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="" class="imgCont" height="377" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/02/full/1743577480-9236.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="dr ambedkar degrees" width="738" /></p>
	</p>
	भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव आंबेडकर हे भारतीय इतिहासातील सर्वात शिक्षित नेते मानले जातात. त्याच्याकडे अनेक पदव्या असल्याचे म्हटले जाते. त्यांच्याकडे भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमधून पदव्या होत्या. स्वातंत्र्यापूर्वी भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या काही मोजक्या भारतीयांपैकी ते एक होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. बी.आर. आंबेडकर ६४ विषयांमध्ये मास्टर होते. त्यांंना ९ भाषांचे ज्ञान होते. तसेच त्यांच्याकडे एकूण ३२ पदव्या होत्या. या लेखात डॉ. भीमराव आंबेडकरांच्या ३२ पदव्यांच्या नावांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	काही लोकांना विश्वास बसत नाही की आंबेडकरांकडे ३२ पदव्या होत्या. पण हे पूर्णपणे खरे आहे की डॉ. आंबेडकरांकडे ३२ वेगवेगळ्या विषयांमध्ये पदव्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांनी विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही मुख्य प्रवाहात पदवी आणि पदव्युत्तर पदव्या मिळवल्या होत्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या पदव्यांची यादी आणि विद्यापीठांची नावे</p>
<p>
	बीए - बॉम्बे युनिव्हर्सिटी</p>
<p>
	बीए - बॉम्बे युनिव्हर्सिटी</p>
<p>
	एमए - बॉम्बे युनिव्हर्सिटी</p>
<p>
	डीएससी - युनिव्हर्सिटी ऑफ लंडन</p>
<p>
	एलएलडी - लंडन विद्यापीठ</p>
<p>
	डीएससी - मुंबई विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - मुंबई विद्यापीठ</p>
<p>
	डीएससी - नागपूर विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - नागपूर विद्यापीठ</p>
<p>
	डीएससी - पंजाब विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - पंजाब विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - कर्नाटक विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - केरळ विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - बडोदा विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - म्हैसूर विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - सागर विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - रंगून विद्यापीठ</p>
<p>
	एलएलडी - उस्मानिया विद्यापीठ</p>
<p>
	डी. लिट - उस्मानिया विद्यापीठ</p>
<p>
	बॅरिस्टर अॅट लॉ - ग्रेज इन, लंडन</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-br-ambedkar-quotes-in-marathi-125040100033_1.html" target="_blank">प्रेरणा आणि संघर्षाची कहाणी दर्शवणारे डॉ. भीमराव आंबेडकरांचे मौल्यवान विचार</a></strong></p>
</p>
<p>
	डॉ. बी.आर. आंबेडकर हे अनेक प्रतिभांचे धनी होते. ते एक चांगले लेखक आणि चित्रकार देखील होते. त्यांना देश आणि परदेशातील एकूण नऊ भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या भाषेच्या संग्रहात फ्रेंच, जर्मन आणि इंग्रजी सारख्या परदेशी भाषा तसेच हिंदी, मराठी, संस्कृत आणि गुजराती सारख्या भारतीय भाषांचा समावेश होता. डॉ. बी.आर. आंबेडकर या सर्व भाषा खूप चांगल्या प्रकारे लिहू, वाचू, समजू आणि बोलू शकत होते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 14 Apr 2025 06:26:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Apr 2025 08:29:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Ambedkar Jayanti Speech 2025 डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर मराठी भाषण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2025-speech-in-marathi-125040900018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2025-speech-in-marathi-125040900018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/thumb/1_1/1681444035-9298.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/thumb/1_1/1681444035-9298.jpg</image>
      <description><![CDATA[सर्वांना शुभेच्छा. आंबेडकर जयंतीनिमित्त हे भाषण तुम्हा सर्वांसमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांनी आयुष्यभर समाजातील जातिवाद, भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. त्यांना त्यांच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="middle" alt="dr ambedkar" class="imgCont" height="443" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/full/1681444035-9298.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	<strong>डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावरील भाषण</strong></p>
<p>
	सर्वांना शुभेच्छा. आंबेडकर जयंतीनिमित्त हे भाषण तुम्हा सर्वांसमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांनी आयुष्यभर समाजातील जातिवाद, भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. त्यांना त्यांच्या काळातील स्त्रीवादी म्हणता येईल. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक योगदान दिले. आज हिंदू कोड बिलाचे श्रेय आंबेडकरांना जाते. त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते. भारतीय लोकशाहीतील त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील.</p>
<p>
	 </p>
<p>
	२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बी.आर. आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी इतर सात सदस्यांसह नियुक्त करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वैयक्तिक नागरिकांना अनेक नागरी स्वातंत्र्यांची हमी आणि संरक्षण देते, ज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्व प्रकारच्या भेदभावावर बंदी यांचा समावेश आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांच्या अनेक उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना निश्चितच "भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार" मानले जाऊ शकते. सामाजिक दुष्प्रवृत्ती दूर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत, म्हणूनच त्यांना भारतीय दलितांचे "मसीहा" म्हटले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेने संविधान मंजूर केले. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले, हा दिवस राष्ट्रीय स्तरावर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी भारतीय कायदा आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. डॉ. आंबेडकरांनी "स्वतंत्र मजूर पक्ष (इंडिपेंडेंट लेबर पार्टी)" नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ते पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते. भारताच्या कायदा, सुव्यवस्था आणि संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबा साहेब आंबेडकरांचे मोठे योगदान होते. ते नेहमीच दलितांवरील भेदभावाच्या विरोधात होते. त्यांनी दलितांच्या समर्थनार्थ नवीन कायदे केले आणि त्यांना इतर जातींप्रमाणे शिक्षण आणि समान अधिकार दिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या सर्वात मोठ्या कामगिरीपैकी एक म्हणजे भारतरत्न. १९९० मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते एक शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, तत्वज्ञानी आणि बरेच काही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आंबेडकर हे जगभरातील तरुण वकिलांसाठी प्रेरणास्थान आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतीय समाजाचे महान नेते भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या योगदानाद्वारे तत्कालीन समाजात सुधारणा घडवून आणण्याचे काम केले. त्यांच्या मते, "ज्या व्यक्तीला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते तो समाजापासून वंचित असतो." त्यांनी जातिवाद, असमानता आणि जमीन हडपण्याच्या विरोधात जोरदार भाषण दिले आणि समाजाला एकता आणि समृद्धीकडे वळवण्याबद्दल बोलले. भीमराव आंबेडकर हे एक महान नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपले जीवन भारताला समान आणि न्याय्य समाज बनवण्यासाठी समर्पित केले. त्यांचे विचार आणि आदर्श आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/32-degrees-of-ambedkar-list-125040200018_1.html" target="_blank">32 Degrees of Dr. BR Ambedkar डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या ३२ पदव्या</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>डॉ. भीमराव आंबेडकरांवर 10 ओळी</strong></p>
<p>
	भीमराव आंबेडकरांवरील हिंदीतील भाषण समजून घेण्यासोबतच, डॉ. भीमराव आंबेडकरांवरील १० ओळी येथे दिल्या जात आहेत ज्यावरून तुम्हाला या बाबा साहेबांबद्दल माहिती मिळेल-</p>
<p>
	 </p>
<p>
	राष्ट्रध्वज तिरंग्यात अशोक चक्र स्थापित करणारे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर होते.</p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकरांना सुमारे ९ भाषांचे ज्ञान होते.</p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याकडे सुमारे ३२ पदव्या होत्या आणि ते परदेशात जाऊन अर्थशास्त्रात पीएचडी करणारे पहिले भारतीय होते.</p>
<p>
	बाबासाहेबांचा पहिला पुतळा १९५० मध्ये त्यांच्या हयातीत कोल्हापूर शहरात बांधण्यात आला.</p>
<p>
	बाबासाहेब हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते.</p>
<p>
	डॉ. बी.आर. आंबेडकरांचे जीवन आणि कार्य शिक्षण, चिकाटी आणि सामाजिक न्यायासाठी दीर्घकालीन वचनबद्धतेची परिवर्तनकारी शक्ती प्रतिबिंबित करते.</p>
<p>
	बाबासाहेब हे मागासवर्गीय वर्गातील पहिले वकील होते.</p>
<p>
	बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जगभरातील सर्वाधिक पुस्तके लिहिली गेली आहेत.</p>
<p>
	१९५६ मध्ये डॉ. आंबेडकरांनी आपला धर्म बदलला आणि बौद्ध धर्म स्वीकारला.</p>
<p>
	बाबासाहेबांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे.<br />
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/hat-is-the-relationship-between-dr-babasaheb-ambedkar-and-the-color-blue-124041400021_1.html" target="_blank">डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय?</a></strong></p>
</p>
<br />
<br type="_moz" />]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 14 Apr 2025 06:11:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Apr 2025 08:33:27 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-information-in-marathi-125041100030_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-information-in-marathi-125041100030_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg</image>
      <description><![CDATA[बाबासाहेब आंबेडकरांचे सुरुवातीचे शिक्षण हे डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या परिचयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. १९०७ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर, डॉ. भीमराव आंबेडकर यांनी १९१२ मध्ये 'एली फिंस्टम कॉलेज' मधून पदवी प्राप्त केली. १९१३ मध्ये त्यांनी १५ ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="middle" alt="Ambedkar" class="imgCont" height="652" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/full/1649750168-7695.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar" width="740" /></p>
	डॉ. भीमराव आंबेडकर हे भारतीय समाजाचे एक महान नेते, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांच्या जीवन संघर्ष, शिक्षणाप्रती समर्पण आणि समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी दिलेले योगदान यामुळे त्यांना इतिहासात एक विशेष स्थान मिळते. अशा या महान विचारवंताचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील &#39;महू&#39; नावाच्या ठिकाणी झाला, जे आता डॉ. आंबेडकर नगर म्हणून ओळखला जाते. बाबासाहेब आंबेडकर हे जातीने दलित होते आणि त्या काळातील सामाजिक व्यवस्थेत त्यांना &#39;अस्पृश्य&#39; मानले जात असे. यामुळे त्यांचे बालपण अनेक अडचणी आणि भेदभावांनी भरलेले होते. पण त्यांनी कधीही हार मानली नाही आणि शिक्षणाला आपले सर्वात मोठे शस्त्र बनवले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रारंभिक जीवन</strong></p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकर यांचे चरित्र त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून सुरू होते. डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांचे वडील मुंबई शहरातील एका घरात राहायला गेले होते जिथे खूप गरीब लोक आधीच एकाच खोलीत राहत होते, त्यामुळे दोघांनाही एकत्र झोपण्याची व्यवस्था नव्हती, म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील आळीपाळीने झोपायचे. जेव्हा त्यांचे वडील झोपायचे तेव्हा डॉ. भीमराव आंबेडकर दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करायचे. भीमराव आंबेडकरांना संस्कृत शिकण्याची उत्सुकता होती, परंतु अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे आणि कनिष्ठ जातीमुळे ते संस्कृत शिकू शकले नाहीत. पण परदेशी लोक संस्कृत वाचू शकत होते ही एक विडंबना होती. भीमराव आंबेडकर यांनी जीवनात अपमानास्पद परिस्थितीचा सामना करत संयम आणि धैर्याने आपले शालेय शिक्षण आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रारंभिक शिक्षण</strong></p>
<p>
	बाबासाहेब आंबेडकरांचे सुरुवातीचे शिक्षण हे डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या परिचयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. १९०७ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर, डॉ. भीमराव आंबेडकर यांनी १९१२ मध्ये &#39;एली फिंस्टम कॉलेज&#39; मधून पदवी प्राप्त केली. १९१३ मध्ये त्यांनी १५ प्राचीन भारतीय व्यवसायांवर एक शोध प्रबंध लिहिला. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी १९१५ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. पदवी प्राप्त केली. १९१७ मध्ये त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांनी &#39;भारताचा राष्ट्रीय विकास आणि विश्लेषणात्मक अभ्यास&#39; या विषयावर संशोधन केले होते. १९१७ मध्येच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला पण साधनसंपत्तीअभावी ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.</p>
<p>
	<a href="https://marathi.webdunia.com/baba-saheb-ambedkar-marathi"><strong>बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी इतर महत्त्वाचे लेख</strong></a></p>
<p>
	काही काळानंतर, ते लंडनला गेले आणि &#39;लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स&#39; मधून त्यांचे अपूर्ण शिक्षण पूर्ण केले. यासोबतच त्यांनी एमएससी आणि बार एट-लॉ ची पदवी देखील मिळवली. ते त्यांच्या काळातील सर्वात सुशिक्षित राजकारणी आणि विचारवंत होते. ते एकूण ६४ विषयांमध्ये मास्टर होते, त्यांना ९ भाषा येत होत्या, यासोबतच त्यांनी जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च शिक्षण</strong></p>
<p>
	१९१५-१९१७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी असताना अमेरिकेत गेले. जून १९१५ मध्ये त्यांनी एम.ए. पूर्ण केले. अर्थशास्त्र हे प्रमुख विषय आणि समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान आणि मानववंशशास्त्र हे इतर विषय घेऊन परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्राचीन भारतीय वाणिज्य या विषयावरील संशोधन कार्य सादर केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांच्या प्राध्यापकांसह आणि मित्रांसह, आंबेडकर १९१६-१७ ते १९२२ पर्यंत बॅरिस्टर म्हणून लंडनला गेले आणि बॅरिस्टरच्या अभ्यासक्रमासाठी (कायद्याचा अभ्यास) ग्रे इनमध्ये आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सामील झाले जिथे त्यांनी अर्थशास्त्रातील डॉक्टरेट प्रबंधावर काम करण्यास सुरुवात केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबासाहेब आंबेडकरांकडे किती पदव्या होत्या?</strong></p>
<p>
	भारतरत्न यांच्याकडे ३२ पदव्या होत्या आणि त्यांना ९ भाषांचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ८ वर्षांचा अभ्यास फक्त २ वर्षे ३ महिन्यांत पूर्ण केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सकडून &#39;डॉक्टर ऑफ सायन्स&#39; ही दुर्मिळ डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगात पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/32-degrees-of-ambedkar-list-125040200018_1.html"><strong>पदव्याविषयी संपूर्ण माहिती</strong></a></p>
<p>
	 </p>
<p>
	पहिल्या महायुद्धामुळे त्यांना भारतात परतावे लागले. काही काळानंतर त्यांनी बडोदा राज्याचे लष्करी सचिव म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांना सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीने ते पुन्हा एकदा उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. त्यांच्या शिक्षणाची, संघर्षाची आणि कामगिरीची ही कहाणी भीम राव आंबेडकर यांच्या जीवन परिचयाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जी आपल्याला सांगते की कठीण परिस्थितीतही ते कधीही आपल्या ध्येयापासून मागे हटले नाहीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ. भीमराव आंबेडकर एक कष्टाळू समाजसुधारक</strong></p>
<p>
	इतक्या असमानतेचा सामना केल्यानंतर, डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांचे काम हाती घेतले. आंबेडकरांनी अखिल भारतीय वर्ग संघटना स्थापन केली. सामाजिक सुधारणांसाठी ते खूप कष्टाळू होते. ब्राह्मणांकडून अस्पृश्यता प्रथा, मंदिरात प्रवेश न देणे, दलितांविरुद्ध भेदभाव, शिक्षकांकडून भेदभाव इत्यादी सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. परंतु परकीय राजवटीमुळे ते फारसे यशस्वी झाले नाहीत. जर हे लोक एकत्र आले तर पारंपारिक आणि रूढीवादी वर्ग त्यांच्या विरोधात जाईल अशी भीती परदेशी राज्यकर्त्यांना होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>भीमराव आंबेडकरांच्या चरित्रातील अस्पृश्यताविरोधी लढा</strong></p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकरांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेचे दुःख होते. त्यांना केवळ जातीव्यवस्था आणि उच्च आणि नीच दर्जाच्या भेदभावाचा अनुभव आला नाही तर त्यामुळे त्यांना अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागला. त्यांनी आयुष्यभर या अन्यायाविरुद्ध लढा दिला. अस्पृश्यतेसारख्या अमानवी प्रथांपासून खालच्या जातींना मुक्त करणे आणि त्यांना समाजात समान हक्क आणि आदर प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	१९२० च्या दशकात मुंबईत दिलेल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, "जिथे माझे वैयक्तिक हित आणि देशाचे हित यांच्यात संघर्ष असेल तिथे मी देशाच्या हिताला प्राधान्य देईन. पण जिथे दलित जातींचे हित आणि देशाचे हित यांच्यात संघर्ष असेल तिथे मी दलित जातींना प्राधान्य देईन."</p>
<p>
	 </p>
<p>
	आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या दलित समुदायासाठी ते मसीहा म्हणून उदयास आले. १९२७ मध्ये त्यांनी अस्पृश्यांना सार्वजनिक जलस्रोतांमधून पाणी घेण्याच्या अधिकारासाठी सत्याग्रह केला आणि १९३७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात या मुद्द्यावर ऐतिहासिक विजय मिळवला.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ भीमराव आंबेडकर विरुद्ध गांधीजी</strong></p>
<p>
	१९३२ मध्ये, पुणे करारांतर्गत, महात्मा गांधी आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यातील चर्चेनंतर, दलितांना राजकीय अधिकार प्रदान करण्यासाठी एक समान उपाय ठरला. तथापि, ही फक्त सुरुवात होती - नंतर दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	१९४५ मध्ये, डॉ. आंबेडकरांनी गांधीजींच्या हरिजन (दलित) प्रतिनिधित्वाच्या दाव्याला आव्हान दिले आणि “What Congress and Gandhi Have Done to the Untouchables” नावाचे एक महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले. या लेखनात त्यांनी गांधी आणि काँग्रेसच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि दलितांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टीका केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वातंत्र्यानंतर, १९४७ मध्ये, डॉ. आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री बनले. ते गांधीजी आणि काँग्रेसचे, विशेषतः ग्रामव्यवस्थेबद्दल, तीव्र टीकाकार मानले जात होते. १९३२ मध्ये मुंबई विधानसभेत ग्रामपंचायत विधेयकावर चर्चा करताना डॉ. आंबेडकर म्हणाले: "अनेकांनी प्राचीन ग्रामपंचायत व्यवस्थेचे कौतुक केले आहे, काहींनी तर तिला ग्रामीण लोकशाही असेही म्हटले आहे. पण माझ्या मते ही व्यवस्था भारताच्या सार्वजनिक जीवनासाठी एक कलंक ठरली आहे. जर भारत राष्ट्रवाद आणि एकतेची भावना विकसित करण्यात अपयशी ठरला असेल, तर त्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामव्यवस्थेचे अस्तित्व."</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांचे हे मत दर्शवते की त्यांचे केवळ सामाजिक समानतेबद्दलच नव्हे तर आधुनिक भारताच्या रचनेबद्दल देखील स्पष्ट, टीकात्मक आणि दूरदृष्टीचे विचार होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ भीमराव आंबेडकर यांचा राजकीय प्रवास</strong></p>
<p>
	१९३६ मध्ये, बाबासाहेबांनी स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना केली. १९३७ च्या केंद्रीय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने १५ जागा जिंकल्या. आंबेडकरांनी त्यांचा पक्ष अखिल भारतीय अनुसूचित जाती पक्षात बदलला, ज्या पक्षासोबत ते १९४६ मध्ये संविधान सभेच्या निवडणुकीत उभे राहिले, परंतु त्यांच्या पक्षाची निवडणुकीत कामगिरी खूपच खराब झाली. काँग्रेस आणि महात्मा गांधींनी अस्पृश्य लोकांना हरिजन हे नाव दिले, त्यामुळे सर्वजण त्यांना हरिजन म्हणू लागले, परंतु आंबेडकरांना हे अजिबात आवडले नाही आणि त्यांनी त्याचा विरोध केला. ते म्हणाले की अस्पृश्य देखील आपल्या समाजाचा एक भाग आहेत, ते देखील इतरांसारखे सामान्य लोक आहेत. आंबेडकरांना संरक्षण सल्लागार समितीमध्ये ठेवण्यात आले आणि व्हाईसरॉय कार्यकारी परिषदेत कामगार मंत्री बनवण्यात आले. बाबासाहेब स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री देखील बनले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>पुरस्कार आणि सन्मान</strong></p>
<p>
	बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महान कार्यांसाठी अनेक पुरस्कार मिळाले, जे खालीलप्रमाणे आहेत:</p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकर यांचे स्मारक त्यांच्या २६ अलीपूर रोड, दिल्ली येथील घरी स्थापित करण्यात आले आहे.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी असते.</p>
<p>
	१९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला.</p>
<p>
	त्यांच्या सन्मानार्थ अनेक सार्वजनिक संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे जसे की डॉ. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, हैदराबाद, आंध्र प्रदेश, बी. आर. आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुझफ्फरपूर.</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आहे, जे पूर्वी सोनेगाव विमानतळ म्हणून ओळखले जात असे.</p>
<p>
	भारतीय संसद भवनात आंबेडकरांचे एक मोठे अधिकृत चित्र लावण्यात आले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ. भीमराव आंबेडकर यांचे निधन</strong></p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या मृत्यूचा उल्लेख एक दुःखद आणि महत्त्वाची घटना म्हणून केला आहे. डॉ. भीमराव आंबेडकर १९४८ पासून मधुमेहाने ग्रस्त होते आणि १९५४ पर्यंत त्यांची प्रकृती खराब होती. ३ डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी त्यांचे शेवटचे हस्तलिखित "बुद्ध आणि धम्म" पूर्ण केले, जे त्यांच्या जीवनाचे आणि विचारांचे एक महत्त्वाचे वर्णन आहे. यानंतर, ६ डिसेंबर १९५६ रोजी, डॉ. आंबेडकरांनी दिल्लीतील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. चौपाटी समुद्रकिनाऱ्यावर बौद्ध पद्धतीने बाबा साहेबांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि या दिवसापासून आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ. भीमराव आंबेडकर यांचे लेखन</strong></p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकरांचा जीवनप्रवास आणि त्यांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांची कामे खूप महत्त्वाची आहेत. भीमराव आंबेडकरांच्या चरित्रातील दोन प्रमुख कामांची नावे खालीलप्रमाणे आहेत:</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब अंबेडकर राइटिंग्स एंड स्पीचेज (महाराष्ट्र सरकारद्वारे प्रकाशित)</p>
<p>
	साहेब डॉ. अंबेडकर संपूर्ण वाड़्मय (भारत सरकारद्वारे प्रकाशित)</p>
<p>
	या कामांमध्ये डॉ. आंबेडकरांचे विचार, लेख आणि भाषणे यांचा संग्रह आहे, जो भारतीय समाज आणि त्यांच्या सामाजिक सुधारणांची सखोल समज प्रदान करतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके</strong></p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकर हे समाजसुधारक असण्यासोबतच एक महान लेखक देखील होते. लेखनाची आवड असलेल्या बाबासाहेबांनी आपले विचार आणि समाजातील गुंतागुंत स्पष्ट करण्यासाठी अनेक पुस्तके लिहिली. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रमुख पुस्तकांची यादी <strong><a href="https://marathi.webdunia.com/baba-saheb-ambedkar-marathi/list-of-books-written-by-dr-bhimrao-ambedkar-122041400017_1.html">लिंकमध्ये</a></strong> आहे: </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खास माहिती</strong></p>
<p>
	भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र लावण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.</p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकरांना जवळजवळ ९ भाषांचे ज्ञान होते.</p>
<p>
	वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी जवळजवळ सर्व धर्मांचा सखोल अभ्यास केला होता.</p>
<p>
	डॉ. आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्रात पीएचडी केली.</p>
<p>
	त्यांच्याकडे एकूण ३२ पदव्या होत्या, ज्या त्याच्या शिक्षण आणि समर्पणाचे प्रतिबिंब आहेत.</p>
<p>
	बाबासाहेब हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते.</p>
<p>
	बाबासाहेबांनी दोनदा लोकसभा निवडणूक लढवली, पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.</p>
<p>
	डॉ. आंबेडकर हे हिंदू महार जातीचे होते, ज्यांना समाज अस्पृश्य मानत असे.</p>
<p>
	डॉ. आंबेडकर काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० च्या विरोधात होते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 14 Apr 2025 05:44:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Apr 2025 08:27:56 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/hat-is-the-relationship-between-dr-babasaheb-ambedkar-and-the-color-blue-124041400021_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/hat-is-the-relationship-between-dr-babasaheb-ambedkar-and-the-color-blue-124041400021_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/09/thumb/1_1/1617954625-9401.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/09/thumb/1_1/1617954625-9401.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसाठी निळा रंग हा आंबेडकरी चळवळीसाठी समानार्थी शब्द आहे. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी देखील या निळ्या रंगाची निवड आपल्या ध्वजात केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar jayanti" class="imgCont" height="858" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/09/full/1617954625-9401.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="dr baba saheb ambedkar" width="740" /></p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसाठी निळा रंग हा आंबेडकरी चळवळीसाठी समानार्थी शब्द आहे. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी देखील या निळ्या रंगाची निवड आपल्या ध्वजात केली आहे. जगातील सर्व नद्या महासागराला येऊन मिळतात आणि सागर निळा होऊन जातो. त्याप्रमाणे सर्व प्रवाह राष्ट्रात विलीन व्हावे, वर्ग, वर्ण, जाती, लिंग मुक्त एकसंध भारतीय समाज निर्माण व्हावा, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं</p>
<p>
	<br />
	खरं तर बाबा साहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचं नातं काय आहे. बाबा साहेबांनी 1927 मध्ये स्थापित केलेल्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षाचा रंग निळा होता. या पक्षांच्या टोप्या देखील निळ्या होत्या. हा निळा रंग त्यांची परंपरा, जागृत ठेवणारा रंग आहे. आभाळासारखी निळाई समाजात रुजावी हा त्यामागचा उद्देश आहे</p>
<p>
	बाबासाहेबांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे इंडिपेंडेंट लेबर पार्टीची स्थापना केली.<br />
	<br />
	त्यावेळी मुंबई कौन्सिलच्या निवडणुकीत बाबा साहेब उभे होते. त्या पक्षाचे चिन्ह माणूस होते. नन्तर पुढे त्यांनी शेफाफे म्हणजे शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली त्याचे निवडणूक चिन्ह हत्ती होते. आणि झेंड्याचा रंग निळा होता. त्रिकोणी आकाराच्या निळा झेंड्यावर तारे असा पक्षाचा ध्वज होता. समता सैनिक दलाची परिषद 30 जानेवारी 1944 रोजी कानपुर येथे झाली. या परिषदेत काही ठराव मंजूर करण्यात आले. या मध्ये सत्मता सैनिक दलाचा झेंडा कसा असेल या बाबत चर्चा झाली. तर समता सैनिक दलाच्या ध्वजाची लांबी चार फूट आणि रुंदी अडीच फूट असले. रंग निळा असेल. तर ध्वजेच्या वर डाव्या बाजूला 11 तारे पांढऱ्या रंगात असतील.  मधोमध पांढऱ्या रंगात सूर्य असेल तर खाली SCF अशी अक्षरे असतील. खाली उजव्या बाजूला SSD अक्षरे असती.<br />
	<br />
	या ध्वजेचा अर्थ आहे स्वातंत्र्य , समता, बंधुता, आणि उध्दिष्टये पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणे.. पुढे कालांतरानंतर आंबेडकरांनी राजकीय भूमिका विस्तृत करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली. पण ही पार्टी तयार होण्याआधीच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.</p>
<p>
	<br />
	Edited By- Priya Dixit </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 12 Apr 2025 18:22:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 12 Apr 2025 18:22:42 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Ambedkar Jayanti 2025 Wishes in Marathi आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा संदेश]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-wishes-2025-in-marathi-125041100026_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-wishes-2025-in-marathi-125041100026_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/11/thumb/1_1/1681190668-9472.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/11/thumb/1_1/1681190668-9472.jpg</image>
      <description><![CDATA[आंबेडकर जयंती हा एक असा दिवस आहे जो तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास मदत करतो.
आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

आंबेडकर जयंतीनिमित्त, प्रत्येकाच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे.
आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...

आंबेडकर जयंती ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Ambedkar Jayanti 2025 wishes in marathi" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/11/full/1681190668-9472.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Bhimrao Ambedkar" width="740" /></p>
	आंबेडकर जयंती हा एक असा दिवस आहे जो तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास मदत करतो.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर जयंतीनिमित्त, प्रत्येकाच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर जयंती तुमच्या विचारांना स्वातंत्र्याची भावना देवो.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
<p>
	<br />
	आंबेडकर जयंतीनिमित्त, तुमच्या अंगणात आशावादाचा सूर्य उगवो.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
<p>
	<br />
	आंबेडकर जयंतीचा उत्सव समाजाला समानतेचा धडा शिकवायला हवा.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर जयंतीचा उत्सव तुम्हाला स्वप्न पाहण्याची प्रेरणा देवो.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर जयंतीनिमित्त, जगभरात शिक्षणाचा उत्सव साजरा होऊ द्या.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर जयंतीला प्रत्येक वेळी, भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकारांनी सुसज्ज केले पाहिजे.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर जयंतीनिमित्त, भारतातील तरुणांमध्ये देशभक्तीची एक नवी भावना जागृत झाली पाहिजे.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर जयंती तुम्हाला प्रत्येक परिस्थितीला हसतमुखाने तोंड देण्यास शिकवो.</p>
<p>
	आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...<br />
	<br />
	<p>
		आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे स्मरण करून, आपण न्यायाचे सारथी बनण्याची प्रतिज्ञा करूया.</p>
	<p>
		आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
	<p>
		 </p>
	<p>
		शिक्षणाचे दूध पिणारा प्रत्येक माणूस धाडसी असतो, तुम्हीही त्यापैकी एक आहात.</p>
	<p>
		आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
	<p>
		 </p>
	<p>
		आंबेडकर जयंतीनिमित्त, ज्ञानाच्या नदीत डुबकी मारण्यासाठी सज्ज व्हा.</p>
	<p>
		आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
	<p>
		 </p>
	<p>
		आंबेडकर जयंतीनिमित्त, जीवनातील प्रत्येक संघर्ष हसतमुखाने स्वीकारण्याची प्रतिज्ञा करा.</p>
	<p>
		आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
	<p>
		 </p>
	<p>
		आंबेडकर जयंती हा एक असा प्रसंग आहे जो तुम्हाला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देईल.</p>
	<p>
		आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
	<p>
		 </p>
	<p>
		आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने तुमच्या स्वप्नांना एक नवीन आकार द्या.</p>
	<p>
		आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
	<p>
		 </p>
	<p>
		आंबेडकर जयंतीनिमित्त आपण सर्वजण राष्ट्रहितासाठी समर्पित राहण्याची प्रतिज्ञा करूया.</p>
	<p>
		आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
	<p>
		 </p>
	<p>
		समाजाच्या उन्नतीसाठी लेखणी निवडा आणि समाजाला शिक्षित करण्याच्या उद्देशाने पुढे चला.</p>
	<p>
		आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...</p>
</p>
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2025-speech-in-marathi-125040900018_1.html" target="_blank">Ambedkar Jayanti Speech 2025 डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर मराठी भाषण</a></strong></p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 11 Apr 2025 15:13:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 11 Apr 2025 15:21:05 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रेरणा आणि संघर्षाची कहाणी दर्शवणारे डॉ. भीमराव आंबेडकरांचे मौल्यवान विचार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-br-ambedkar-quotes-in-marathi-125040100033_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-br-ambedkar-quotes-in-marathi-125040100033_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg</image>
      <description><![CDATA[शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा.
शिक्षण ही ती सिंहीण आहे. जो कोणी त्याचे दूध पिईल तो गर्जना करेल.
देशाच्या विकासासाठी तरुणांनी पुढे यावे.
जर तुम्ही मनाने मुक्त असाल तरच तुम्ही खरोखर मुक्त आहात.
चांगले दिसण्यासाठी नाही तर चांगले राहण्यासाठी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Ambedkar" class="imgCont" height="652" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/full/1649750168-7695.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar" width="740" /></p>
	डॉ. भीमराव आंबेडकर हे भारतीय समाजाचे एक महान विचारवंत, संविधानाचे शिल्पकार आणि दलित समुदायाचे लोकप्रिय नेते होते, ज्यांनी आयुष्यभर समाजातून अस्पृश्यता आणि जातीभेद नष्ट करून सर्वांना समान हक्कांचा पुरस्कार केला. त्यांनी केवळ भारतीय संविधानाला आकार दिला नाही तर समाजात पसरलेल्या असमानता आणि अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठवला. आजही त्यांचे संघर्षमय जीवन आणि त्यांचे विचार प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. त्यांच्या विचारांनी भारतीय लोकांची चेतना जागृत करण्यात आणि समाजाला एक नवीन दिशा देण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या विचारांनी सर्वांना समान हक्क आणि अखंड भारताचा पाया रचण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या लेखात तुम्हाला डॉ. भीमराव आंबेडकरांचे मौल्यवान विचार वाचायला मिळतील, जे तुम्हाला आयुष्यभर प्रेरणा देतील.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारतीय आहोत.</p>
<p>
	ज्ञान हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आधार आहे.</p>
<p>
	आयुष्य लांब असण्यापेक्षा उत्तम असायला हवे.</p>
<p>
	जो वाकू शकतो, तो इतरांनाही वाकवू शकतो.</p>
<p>
	सुरक्षित सीमेपेक्षा सुरक्षित सैन्य चांगले.</p>
<p>
	न्याय नेहमीच समानतेची कल्पना निर्माण करतो.</p>
<p>
	धर्म माणसासाठी बनवला जातो, माणूस धर्मासाठी नाही.</p>
<p>
	इतिहासकार हा अचूक, प्रामाणिक आणि निःपक्षपाती असला पाहिजे.</p>
<p>
	मनाची जोपासना हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.</p>
<p>
	वर्गविहीन समाज निर्माण करण्यापूर्वी समाजाला जातविहीन करावे लागेल.</p>
<p>
	समाजवादाशिवाय दलित आणि कष्टकरी लोकांची आर्थिक मुक्तता शक्य नाही.</p>
<p>
	उदासीनता हा सर्वात धोकादायक आजार आहे जो लोकांना प्रभावित करू शकतो.</p>
<p>
	संविधान हे केवळ वकिलांसाठी एक दस्तऐवज नाही; ती एक जीवनशैली आहे.</p>
<p>
	तुम्ही चव बदलू शकता पण विषाचे अमृतात रूपांतर करता येत नाही.</p>
<p>
	ज्या समुदायाला आपला इतिहास माहित नाही तो कधीही स्वतःचा इतिहास घडवू शकत नाही.</p>
<p>
	धर्मामागील मूळ कल्पना म्हणजे व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासाठी वातावरण निर्माण करणे.</p>
<p>
	इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा नैतिकता आणि अर्थशास्त्र यांच्यात संघर्ष झाला आहे तेव्हा अर्थशास्त्र नेहमीच जिंकले आहे.</p>
<p>
	जर आपल्याला एकात्म, एकात्मिक आधुनिक भारत हवा असेल तर सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचे सार्वभौमत्व संपले पाहिजे.</p>
<p>
	आपल्या देशाच्या संविधानात, मतदानाचा अधिकार ही अशी शक्ती आहे जी कोणत्याही ब्रह्मास्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे.</p>
<p>
	या संपूर्ण जगात, फक्त तोच गरीब आहे जो अशिक्षित आहे. म्हणूनअर्धी भाकर खा, पण तुमच्या मुलांना शिकवण्याची खात्री करा.</p>
<p>
	समानता हा एक भ्रम असू शकतो, परंतु विकासासाठी ती आवश्यक आहे.</p>
<p>
	पती-पत्नीमधील नाते जवळच्या मित्रांसारखे असले पाहिजे.</p>
<p>
	मी राजकीय सुख उपभोगण्यासाठी नाही तर माझ्या पीडित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी आलो आहे.</p>
<p>
	कायदा आणि सुव्यवस्था हे राजकारणाचे औषध आहे. जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.</p>
<p>
	नशिबापेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवा. नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी, शक्ती आणि कृतीवर विश्वास ठेवला पाहिजे.</p>
<p>
	पुरेसे बळजबरी वापरुन त्यांना भाग पाडले जात नाही तोपर्यंत निहित हितसंबंध स्वेच्छेने सोडले जात नाहीत.</p>
<p>
	एका महान माणसाचा आणि एका प्रतिष्ठित माणसाचा फरक फक्त या एका मुद्द्यावर असतो की एक महान माणूस समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो.</p>
<p>
	त्या दिवशी मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या लांब रांगा ग्रंथालयाकडे जातील. त्या दिवशी, माझ्या देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.</p>
<p>
	मी मोठ्या कष्टाने या कारवांला या टप्प्यावर आणले आहे. जर माझे लोक, माझे सेनापती या कारवांला पुढे नेऊ शकत नसतील, तर ते मागेही जाऊ देऊ नका.</p>
<p>
	एखाद्या वनस्पतीला जितकी पाण्याची गरज असते तितकीच एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते. नाहीतर दोघेही कोमेजून मरतील.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>विद्यार्थ्यांसाठी डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सुविचार</strong></p>
<p>
	शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा.</p>
<p>
	शिक्षण ही ती सिंहीण आहे. जो कोणी त्याचे दूध पिईल तो गर्जना करेल.</p>
<p>
	देशाच्या विकासासाठी तरुणांनी पुढे यावे.</p>
<p>
	जर तुम्ही मनाने मुक्त असाल तरच तुम्ही खरोखर मुक्त आहात.</p>
<p>
	चांगले दिसण्यासाठी नाही तर चांगले राहण्यासाठी जगा.</p>
<p>
	बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.</p>
<p>
	या जगात महान प्रयत्नांशिवाय मौल्यवान काहीही नाही.</p>
<p>
	शिक्षण हे पुरुषांइतकेच महिलांसाठीही महत्त्वाचे आहे.</p>
<p>
	हिरावून घेतलेले हक्क भीक मागून मिळत नाहीत, ते हक्क परत मिळवावे लागतात.</p>
<p>
	देशाच्या विकासापूर्वी आपल्याला आपली बुद्धिमत्ता विकसित करावी लागेल.</p>
<p>
	<br />
	<strong>आंबेडकर यांचे शैक्षिक विचार</strong></p>
<p>
	शिक्षण सर्वांना समान प्रमाणात उपलब्ध असले पाहिजे.</p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी सर्वांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला.</p>
<p>
	विद्यार्थ्याची जात, धर्म किंवा आर्थिक स्थिती काहीही असो, त्याची ओळख ज्ञानाने होते.</p>
<p>
	शिक्षण हे असे साधन आहे जे लोकांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देते.</p>
<p>
	विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण व्यावहारिक आणि उपयुक्त असले पाहिजे.</p>
<p>
	शिक्षणाचे महत्त्व असे आहे की ते नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी कार्य करते जेणेकरून एक सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल.</p>
<p>
	शिक्षणाद्वारे माणूस आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान आत्मसात करतो ज्यामुळे माणसाला यश मिळते.</p>
<p>
	शिक्षण नेहमीच धर्मनिरपेक्ष असले पाहिजे.</p>
<p>
	शिक्षण कोणत्याही विशिष्ट धर्माशी किंवा पंथाशी जोडले जाऊ नये.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबा साहब आंबडेकर यांचे मोटिव्हेशनल कोट्स</strong></p>
<p>
	जर आपल्याला आधुनिक विकसित भारत हवा असेल तर सर्व धर्मांना एकत्र यावे लागेल.</p>
<p>
	माझी स्तुती करण्यापेक्षा आणि माझे कौतुक करण्यापेक्षा, मी दाखवलेल्या मार्गावर चालणे चांगले.</p>
<p>
	ज्ञानी लोक पुस्तकांची पूजा करतात, तर अज्ञानी लोक दगडांची पूजा करतात.</p>
<p>
	जो माणूस आपल्या मृत्यूचे नेहमी स्मरण करतो तो नेहमीच चांगल्या कामात गुंतलेला असतो.</p>
<p>
	स्वातंत्र्य म्हणजे धैर्य, आणि धैर्य व्यक्तींच्या एका पक्षात एकत्र येण्यापासून येते.</p>
<p>
	मी एखाद्या समुदायाची प्रगती महिलांनी केलेल्या प्रगतीच्या प्रमाणात मोजतो.</p>
<p>
	जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य मिळवत नाही तोपर्यंत संवैधानिक स्वातंत्र्याला काही अर्थ नाही.</p>
<p>
	राजकारणात भाग न घेतल्याची सर्वात मोठी शिक्षा म्हणजे एक अक्षम व्यक्ती तुमच्यावर राज्य करू लागते.</p>
<p>
	जो धर्म एका व्यक्तीला जन्माने श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ ठरवतो तो धर्म नसून लोकांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र आहे.</p>
<p>
	जर मला वाटले की मी बनवलेल्या संविधानाचा गैरवापर होत आहे, तर मी सर्वात आधी ते जाळून टाकेन.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक विचार</strong></p>
<p>
	जेव्हा जात, वंश किंवा रंगाच्या आधारावर लोकांमधील फरक विसरला जाईल आणि त्यांच्यातील सामाजिक बंधुभावाला सर्वोच्च स्थान दिले जाईल तेव्हाच राष्ट्रवादाचे समर्थन केले जाऊ शकते.</p>
<p>
	जर आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल, आपल्या हक्कांसाठी लढायचे असेल तर आपली ताकद आणि शक्ती ओळखा. कारण सत्ता आणि प्रतिष्ठा ही संघर्षातूनच मिळते.</p>
<p>
	काही लोकांना वाटते की समाजासाठी धर्म आवश्यक नाही. मी हे मत मानत नाही. मी धर्माचा पाया समाजाच्या जीवनासाठी आणि पद्धतींसाठी आवश्यक मानतो.</p>
<p>
	ज्याला त्याच्या दुःखापासून मुक्तता हवी आहे त्याला लढावेच लागेल. आणि ज्याच्याशी तुम्ही लढू इच्छिता त्याच्याशी लढण्यापूर्वी तुम्हाला त्याच्याविरुद्ध चांगला अभ्यास करावा लागेल कारण जर तुम्ही ज्ञानाशिवाय लढायला गेलात तर तुमचा पराभव निश्चित आहे.</p>
<p>
	यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे आवश्यक नाही. राजकीय आणि सामाजिक हक्कांच्या न्यायावर, गरजेवर आणि महत्त्वावर खोलवर विश्वास असणे आवश्यक आहे.</p>
<p>
	अन्यायाविरुद्ध लढताना जर तुम्ही मृत्युमुखी पडलात तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या नक्कीच त्याचा बदला घेतील. जर तुम्ही अन्याय सहन करत असताना मरण पावला तर तुमच्या भावी पिढ्याही गुलाम राहतील.</p>
<p>
	समाजाला वर्गविहीन आणि जातविहीन बनवावे लागेल कारण वर्गाने माणसाला गरीब बनवले आहे आणि जातीने माणसाला अत्याचारित बनवले आहे. ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांना गरीब मानले जाते आणि ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांना दलित मानले जाते.</p>
<p>
	सामाजिक अत्याचाराच्या तुलनेत राजकीय अत्याचार काहीच नाही. समाजाला बदनाम करणारा सुधारक हा सरकारला आव्हान देणाऱ्या राजकारण्यापेक्षा चांगला माणूस असतो.</p>
<p>
	आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे आपण काय करत आहोत? आपली सामाजिक व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. जे असमानता, भेदभाव आणि आपल्या मूलभूत अधिकारांशी संघर्ष करणाऱ्या इतर गोष्टींनी भरलेले आहे.</p>
<p>
	समाजात निरक्षर लोक आहेत, ही आपल्या समाजाची समस्या नाही. पण जेव्हा समाजातील सुशिक्षित लोकही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देऊ लागतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून चुकीचे बरोबर दाखवतात, तेव्हा ही आपल्या समाजाची समस्या आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ. भीमराव अंबेडकर यांच्यावर महान लोकांचे विचार </strong></p>
<p>
	“डॉ. अंबेडकर एक असाधारण व्यक्ति होते. त्यांच्या विद्वत्ता आणि विचारशीलतेने भारतीय समाजातील वंचित घटकांना स्वाभिमान आणि हक्कांसाठी लढण्याचा मार्ग दाखवला.” – महात्मा गांधी<br />
	 </p>
<p>
	“डॉ. आंबेडकरांनी आपल्याला केवळ एक मजबूत संविधान दिले नाही तर त्यांनी सामाजिक समानतेचा पायाही घातला. ते खरे राष्ट्रनिर्माते होते.”  – पंडित जवाहरलाल नेहरू</p>
<p>
	 </p>
<p>
	“डॉ. आंबेडकरांचे दृष्टिकोन आणि संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील.” – सरदार वल्लभभाई पटेल</p>
<p>
	 </p>
<p>
	“डॉ. आंबेडकरांनी दलित समुदायाला केवळ हक्क मिळवून देण्याचे काम केले नाही तर त्यांना स्वाभिमान आणि जागरूकतेची शक्ती देखील दिली.” – कांशीराम</p>
<p>
	 </p>
<p>
	“एका व्यक्तीचे शिक्षण आणि दृढनिश्चय संपूर्ण समाज बदलू शकतो हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले. तो आमच्यासाठी एक आदर्श आहे.” – अटल बिहारी वाजपेयी</p>
<p>
	 </p>
<p>
	“डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान आणि शिक्षणाद्वारे समाजात बदल घडवून आणता येतो. त्यांचे दूरदृष्टी भारताच्या विकासाला प्रेरणा देते.” – डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम</p>
<p>
	 </p>
<p>
	“संविधान निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांनी भारताच्या भविष्याला एक मजबूत पाया घातला.” – डॉ. राजेंद्र प्रसाद</p>
<p>
	 </p>
<p>
	“डॉ. आंबेडकरांचे विचार त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. त्यांच्या विचारसरणीने समाजातील सर्व घटकांना समान हक्क देण्याचा प्रयत्न केला.” – रवींद्रनाथ टागोर</p>
<p>
	 </p>
<p>
	“डॉ. आंबेडकर हे केवळ एक नेते नव्हते, तर ते एक क्रांती होते. त्यांचे विचार आणि कृती आपल्या समाजाला दिशा देतील.” – नरेंद्र मोदी</p>
<p>
	 </p>
<p>
	“डॉ. आंबेडकरांनी जातिव्यवस्थेविरुद्ध केलेला संघर्ष केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे.” – माल्कॉम एक्स</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 01 Apr 2025 16:17:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 01 Apr 2025 16:22:09 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-din-121120600014_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-din-121120600014_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-12/04/thumb/1_1/1607060502-3793.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-12/04/thumb/1_1/1607060502-3793.jpg</image>
      <description><![CDATA[महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Mahaparinivan Din of Dr Babasaheb Ambedkar" class="imgCont" height="416" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-12/04/full/1607060502-3793.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar mahaparinirvan din" width="667" /></p>
	महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. </p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादर येथील राजगृहावर आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये 7 डिसेंबर 1956  रोजी 12 लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. </p>
<p>
	 </p>
<p>
	निधनापूर्वी आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक &#39;बोधिसत्व&#39; मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी &#39;महापरिनिर्वाण&#39; हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. सर्व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, घरात, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 06 Dec 2024 11:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 06 Dec 2024 12:17:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Dhammachakra Pravartan Din 2024: धम्मचक्र प्रवर्तन दिन का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्तव जाणून घ्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dhammachakra-pravartan-din-2024-date-history-124100800027_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dhammachakra-pravartan-din-2024-date-history-124100800027_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-10/08/thumb/1_1/1728374120-6801.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-10/08/thumb/1_1/1728374120-6801.jpg</image>
      <description><![CDATA[भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भीमराव आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांच्या ३ लाख अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="624" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-10/08/full/1728374120-6801.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="deekshabhoomi nagpur" width="740" /></p>
	</p>
	भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भीमराव आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांच्या ३ लाख अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला.</p>
<p>
	 </p>
<p>
	ज्या दिवशी हे घडले त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात. धर्मांतर 14 ऑक्टोबर रोजी झाले. 1956 मध्ये, धम्मचक्र प्रवर्तन दिनी, डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी नागपुरातील दीक्षाभूमी नावाच्या बौद्ध पवित्र स्मारकात बौद्ध धर्म स्वीकारला. या दिवशी अनेक बौद्ध धर्मांतराचा उत्सव साजरा करण्यासाठी दीक्षाभूमीवर जमतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर डॉ. आंबेडकर म्हणाले, "असामान्यता आणि दडपशाहीसाठी उभा असलेला माझा प्राचीन धर्म त्यागून मी आज पुनर्जन्म घेत आहे." याशिवाय डॉ. आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा देखील केल्या होत्या त्यापैकी एक म्हणजे, "मी माझा जुना धर्म, हिंदू धर्म नाकारतो, जो मानवजातीच्या उत्कर्षासाठी हानिकारक आहे आणि जो माणूस आणि माणूस यांच्यात भेदभाव करतो आणि जो मला हीन मानतो."</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी आपले जीवन दलितांवरील जातीभेदाविरुद्ध लढण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या &#39;मूकनायक&#39; जर्नलमध्ये त्यांनी हिंदू समाजाला एक &#39;टॉवर&#39; म्हटले आहे, जिथे प्रत्येक मजला विशिष्ट जातीसाठी नियुक्त केला आहे. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हा आहे की या टॉवरला जिना नाही आणि त्यामुळे एका मजल्यावरून वर किंवा खाली जाण्याचा कोणताही मार्ग नाही," असे त्यांनी लिहिले. डॉ. आंबेडकर म्हणाले की, या टॉवरमध्ये माणूस जिथे जन्माला येतो तिथेच मरतो. </p>
<p>
	 </p>
<p>
	पण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एका दिवसानंतर डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा ते म्हणाले, "मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी, मी हिंदू धर्मात मरणार नाही."</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा बुद्धधम्म (बौद्ध वर्ष) 2500 होते. जगातील अनेक देशांतून आणि भारतातील प्रत्येक राज्यातून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमी, नागपूर येथे येतात आणि 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सण म्हणून साजरा करतात आणि बौद्ध धम्माचा स्वीकार करून नैतिकता, समानतेवर आधारित जीवन जगतात. बंधुभावाचा, न्यायाचा समावेश करण्याचा संकल्प डॉ. आंबेडकरांच्या बौद्ध अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी हा दिवस निवडला कारण ईसापूर्व तिसऱ्या शतकात याच दिवशी सम्राट अशोकानेही बौद्ध धर्म स्वीकारला होता. तेव्हापासून हा दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विसाव्या शतकात बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या धर्माचे पुनरुज्जीवन केले.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 08 Oct 2024 13:06:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 08 Oct 2024 13:25:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे अनमोल विचार जाणून घ्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/br-ambedkar-jayanti-2024-thoughts-124041000060_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/br-ambedkar-jayanti-2024-thoughts-124041000060_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg</image>
      <description><![CDATA[आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी आपण काय करत आहोत? आपली समाजव्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. जे असमानता, भेदभाव आणि इतर गोष्टींनी भरलेले आहे जे आपल्या मूलभूत अधिकारांशी संघर्ष करतात.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Ambedkar" class="imgCont" height="652" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/full/1649750168-7695.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar" width="740" /></p>
	आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी आपण काय करत आहोत? आपली समाजव्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. जे असमानता, भेदभाव आणि इतर गोष्टींनी भरलेले आहे जे आपल्या मूलभूत अधिकारांशी संघर्ष करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण फक्त एक भारतीय आहोत.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वातंत्र्य म्हणजे धैर्य, आणि धैर्य हे पक्षातील व्यक्तींच्या संयोगातून निर्माण होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	महान प्रयत्नांशिवाय या जगात मौल्यवान काहीही नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिक्षण जेवढे पुरुषांसाठी आहे तेवढेच ते महिलांसाठीही महत्त्वाचे आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	काही लोकांना असे वाटते की समाजासाठी धर्म आवश्यक नाही. मी हे मत मानत नाही. मी धर्माचा पाया समाजाच्या जीवनासाठी आणि व्यवहारांसाठी आवश्यक मानतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	पुरुष नश्वर आहेत. त्यामुळे विचार आहेत. एखाद्या वनस्पतीला जशी पाण्याची गरज असते तितकीच एखाद्या कल्पनेच्या प्रसाराची गरज असते. नाहीतर दोघेही कोमेजून मरतील.</p>
<p>
	 </p>
<p>
	सामाजिक अत्याचारांच्या तुलनेत राजकीय अत्याचार हे काहीच नाही. सरकारला नाकारणाऱ्या राजकारण्यापेक्षा समाजाची बदनामी करणारा सुधारक चांगला असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे आवश्यक नाही. न्याय, गरज, राजकीय आणि सामाजिक अधिकारांच्या महत्त्वावर सखोल आणि प्रगाढ विश्वास असणे आवश्यक आहे.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 14 Apr 2024 08:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sun, 14 Apr 2024 09:02:10 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Essay on Dr Babasaheb Ambedkar निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/essay-on-dr-babasaheb-ambedkar-117041100029_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/essay-on-dr-babasaheb-ambedkar-117041100029_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/thumb/1_1/1618239279-2615.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/thumb/1_1/1618239279-2615.jpg</image>
      <description><![CDATA[भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar jayanti" class="imgCont" height="451" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/full/1618239279-2615.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="677" /></p>
	<br />
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2026-wishes-in-marathi-126041100027_1.html" target="_blank">Ambedkar Jayanti 2026 Wishes in Marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश</a></strong>भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.</p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.</p>
<p style="text-align: justify;">
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/essay-marathi/dr-br-ambedkar-jayanti-2026-speech-in-marathi-126040600044_1.html" target="_blank">Ambedkar Jayanti 2026 Speech in Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण</a></strong></p>
</p>
<p style="text-align: justify;">
	डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.</p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	<strong>डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय: </strong></p>
<p style="text-align: justify;">
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते. </p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	<strong>शैक्षणिक विचार: </strong></p>
<p style="text-align: justify;">
	शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. &#39;&#39;शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,&#39;&#39; असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. &#39;&#39;प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. </p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	<strong>सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले: </strong></p>
<p style="text-align: justify;">
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.</p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	<strong>प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा : </strong></p>
<p style="text-align: justify;">
	डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, &#39;&#39; आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा &#39;&#39; यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. </p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	<strong>स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारी : </strong></p>
<p style="text-align: justify;">
	स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.</p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. <span style="font-size:16px;"><span style="background-color: rgb(246, 246, 246); color: rgb(51, 51, 51); font-family: "Noto Sans", sans-serif;">अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.</span></span></p>
<p>
	 </p>
<p style="text-align: justify;">
	- महेश जोशी<br />
	<br />
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-quotes-in-marathi-डॉ-good-thoughts-of-babasaheb-ambedkar-122041300039_1.html" target="_blank">Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार</a></strong><br />
		<br />
		<p>
			<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/indian-constitution-is-invaluable-gift-of-babasaheb-ambedkar-122041300012_1.html" target="_blank">भारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी</a></strong></p>
	</p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 14 Apr 2024 08:11:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 13 Apr 2026 11:31:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/famous-quotes-by-dr-babasaheb-ambedkar-121041000019_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/famous-quotes-by-dr-babasaheb-ambedkar-121041000019_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/thumb/1_1/1618034850-3322.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/thumb/1_1/1618034850-3322.jpeg</image>
      <description><![CDATA[तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.

मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.

आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ambedkar quotes" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-04/10/full/1618034850-3322.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar jayanti quotes" width="740" /></p>
	</p>
	तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.</p>
<p>
	 </p>
<p>
	बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.</p>
<p>
	 </p>
<p>
	माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.</p>
<p>
	 </p>
<p>
	रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.</p>
<p>
	 </p>
<p>
	अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.</p>
<p>
	 </p>
<p>
	माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.</p>
<p>
	 </p>
<p>
	जेथे एकता तेथेच सुरक्षितता.</p>
<p>
	 </p>
<p>
	काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.</p>
<p>
	 </p>
<p>
	जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 14 Apr 2024 07:15:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sun, 14 Apr 2024 09:03:17 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/bibliography-of-dr-babasaheb-ambedkar-124040500037_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/bibliography-of-dr-babasaheb-ambedkar-124040500037_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/thumb/1_1/1681444035-9298.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/thumb/1_1/1681444035-9298.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इतर लेखन व ग्रंथसंपदा पुष्कळ प्रमाणात आहे. तसेच ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश त्यांच्या लेखन साहित्यात होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठया प्रमाणात लेखन केले आहे. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="dr ambedkar" class="imgCont" height="443" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/full/1681444035-9298.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इतर लेखन व ग्रंथसंपदा पुष्कळ प्रमाणात आहे. तसेच ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, स्फुटलेख, लेख, वर्तमानपत्रे, भाषणे, पत्रे यांचा समावेश त्यांच्या लेखन साहित्यात होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठया प्रमाणात लेखन केले आहे. आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा एकूण 22 ग्रंथ आणि पुस्तिका, 10 निवेदने किंवा साक्षीपुरावे, 10 शोधनिबंध, 10 अपूर्ण राहिलेले ग्रंथ, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आहे.<br />
	<br />
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषांचे ज्ञान होते तसेच ते खूप मोठे विद्वान होते.<br />
	<br />
	तसेच त्यांचे पुष्कळसे लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. तसेच समाजसुधारणा आणि धर्मसुधारणा यांकडे आपल्या लेखनातून प्रामुख्याने लक्ष दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण 22 खंड महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले असून पुष्कळ लेखन प्रकशित आहे.<br />
	<br />
	तसेच मल्याळम भाषेत देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्याचे 40 खंडावर प्रकाशीत झाली आहे. काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली नाही, पण त्यांनी लिहलेल्या लेखणीतून पुष्कळ साहित्याचे सृजन झाले आहे. व त्यांचे साहित्य इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वर्तमानात प्रासंगिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य व विचार संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. आज देखील अनेक लोक त्यांच्या साहित्याशी कमी परिचित आहेत. तर जाणून घ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>ग्रंथसंपदा- </strong></p>
<p>
	1. ॲडमिनीस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी</p>
<p>
	2. दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया</p>
<p>
	3. द प्रोब्लेम ऑफ द रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन</p>
<p>
	4. ॲन्हिलेशन ऑफ कास्ट</p>
<p>
	5. व्हिच वे टू इमॉन्सिपेशन</p>
<p>
	6. फेडरेशन वर्सेस फ्रिडम</p>
<p>
	7. पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया</p>
<p>
	8. रानडे, गांधी अँड जिन्नाह</p>
<p>
	9 .मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स</p>
<p>
	10. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स</p>
<p>
	11. कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट</p>
<p>
	12. व्हू वर द शुद्राज? हाऊ दे केम टू बी द फोर्थ वर्णा इन दि इन्डो-आर्यन सोसायटी</p>
<p>
	13. अ क्रिटीक ऑप द प्रोपोझल्स ऑफ कॅबिनेट मिशन फॉर इंडियन कोन्स्टिट्युशनल   </p>
<p>
	14. चेन्जेस इन सो फार ॲस दे अफेक्ट द शेड्युल्ड कास्ट्स (अनटचेबल्स)</p>
<p>
	15. द कॅबिनेट मिशन अँड दी अनटचेबल्स</p>
<p>
	16. स्टेट्स अँड माइनॉरिटीज</p>
<p>
	17. महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स</p>
<p>
	18. द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स</p>
<p>
	19. थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स: अ क्रिटीक ऑफ द रिपोर्ट ऑफ द स्टेट्स   </p>
<p>
	20. रिकग्नाईझेशन कमिशन</p>
<p>
	21. द बुद्धा अँड हिज धम्मा</p>
<p>
	22. रिडल्स इन हिंदुइझम</p>
<p>
	23. डिक्शनरी ऑफ द पाली लँग्वेज (पाली-इंग्लिश)</p>
<p>
	24. द पाली ग्रामर</p>
<p>
	25. वेटिंग फॉर अ व्हिझा (ऑटोबायोग्रफी)</p>
<p>
	26. अ पिपल ॲट बाय</p>
<p>
	27. अनटचेबल्स ऑर द चिल्ड्रेन ऑफ इंडियाज गेटो</p>
<p>
	28. कॅन आय बी अ हिंदू?</p>
<p>
	29. व्हॉट द ब्राह्मिन्स हॅव डन टू द हिंदुज</p>
<p>
	30. एसे ऑफ भगवद्गीता </p>
<p>
	31. इंडिया अँड कम्युनिझम</p>
<p>
	32. रिव्हॉल्युशन अँड काउंटर-रिव्हॉल्युशन इन एन्शण्ट इंडिया</p>
<p>
	33. बुद्धा अँड कार्ल मार्क्स</p>
<p>
	34. कोन्स्टिट्युशन अँड कोन्स्टिट्युशनालिझम </p>
<p>
	 </p>
<p>
	महान, विलक्षण, अद्भुत व्यक्तिमत्व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुष्कळ ग्रंथ लिहले तसेच त्यांच्या इतर लेखनात पुस्तके, शोधलेख, स्फुटलेख, भाषणे, प्रबंध, वर्तमानपत्र यांचा समावेश होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी ही सुंदर आणि विलक्षण होती.<br />
	<br />
	Edited By- Dhanashri Naik </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 14 Apr 2024 07:06:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sun, 14 Apr 2024 09:01:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शाहू महाराज जेव्हा दिल्लीत येऊन म्हणाले होते, 'आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहा']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/when-shahu-maharaj-came-to-delhi-and-said-stand-by-ambedkar-124032100012_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/when-shahu-maharaj-came-to-delhi-and-said-stand-by-ambedkar-124032100012_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-06/26/thumb/1_1/1593141848-7862.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-06/26/thumb/1_1/1593141848-7862.jpg</image>
      <description><![CDATA[21 आणि 22 मार्च 1920 ला कोल्हापुरातील माणगावमध्ये भरलेल्या बहिष्कृत वर्गाच्या परिषदेला आज 104 वर्षं पूर्ण होत आहेत.माणगाव परिषदेच्या निमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज हे एका व्यासपीठावर आले होते. 100 वर्षांपूर्वी भरलेल्या या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Shahu Maharaj" class="imgCont" height="423" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-06/26/full/1593141848-7862.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Shahu Maharaj" width="741" /></p>
	21 आणि 22 मार्च 1920 ला कोल्हापुरातील माणगावमध्ये भरलेल्या बहिष्कृत वर्गाच्या परिषदेला आज 104 वर्षं पूर्ण होत आहेत.माणगाव परिषदेच्या निमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज हे एका व्यासपीठावर आले होते. 100 वर्षांपूर्वी भरलेल्या या परिषदेच्या आठवणी लोक आजही जपतात. माणगाव परिषदेनिमित्त कार्यक्रम आयोजित करत असताना अनेकांना नागपूर आणि दिल्लीमध्ये झालेल्या परिषदांचा विसर पडतो किंवा त्याबद्दल फारसं भाष्य कुठे दिसत नाही. किंबहुना, माणगाव सोडून इतरत्र कुठे अशा काही परिषदा झाल्या होत्या, हेच अनेकांना ठाऊक नाहीय. नागपूर आणि दिल्लीतल्या परिषदांची चर्चा होणं आवश्यक आहे. हे मी म्हणतोय, हे तुम्हाला अधिक कळण्यासाठी या दोन्ही परिषदांमागची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आयुष्यात येण्यापूर्वी सत्यशोधक चळवळ आणि विशेष म्हणजे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गात अनेक चळवळी सुरू होत्या. मात्र, त्या सर्व चळवळींना अनेक भौगोलिक मर्यादा आणि मर्यादित दृष्टिकोन सुद्धा होता. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे एकत्रितपणे या दोन्ही मर्यादांच्या पलिकडे जाऊन चळवळ उभी करताना दिसतात. बी. सी. कांबळे यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या चरित्रात लिहिलंय की, बाबासाहेब जेव्हा लंडनहून परतले, तेव्हा बॉम्बे प्रातांत अनेक परिषदा झाल्या. मात्र, त्यांनी अशा परिषदांमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. माणगाव परिषदेला मात्र ते स्वत: पुढाकार घेताना दिसले. बाबासाहेबांचा हा पुढाकार चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता आणि तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>नेतृत्वाचा शोध घेणारे शाहू महाराज</strong></p>
<p>
	शाहू महाराजांनी 1902 साली जाहीर केलेलं आरक्षण आणि माणगावमध्ये 1920 साली भरलेल्या परिषेदेच्या घटनांमध्ये दोन दशकांचं अंतर दिसतं. या दोन दशकांचा आणि शाहू महाराजांच्या कामाचा आढावा घेतला असता, असं दिसून येतं की, शाहू महाराज ब्राह्मणेतर म्हणजेच आजचे अनुसूचित जाती आणि जमाती, भटके-विमुक्त, बारा-बलुतेदार, मराठा आणि मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी काम करताना दिसतात. त्याचवेळेस शाहू महाराज अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींकडे विशेष लक्ष देतानाही दिसतात. आपलं काम शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीपुरतं मर्यादित न ठेवता, या समुदायातून स्वतंत्र आणि स्वावलंबी चळवळ व नेतृत्व उभं राहायला हवं, असं शाहू महाराजांना पदोपदी वाटत होतं, हे लक्षात येतं. खरंतर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गात अनेक मंडळी काम करत होती. यात प्रामुख्यने विठ्ठल रामजी शिंदेंचं नाव घेता येईल. त्यांनी अनेक शाळा आणि वसतिगृहेही काढली होती. मात्र, विठ्ठल रामजी शिंदेंच्या कामाचा प्रवाह काँग्रेसकडे जाणारा होता. पर्यायानं, स्वतंत्र आणि स्वावलंबी चळवळींमध्ये हा फार मोठा अडथळा आहे, असं शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही वाटत होतं. म्हणूनच की काय, शाहू महाराज हे जोतिराव फुले यांना आपले आदर्श व्यक्तीमत्व मानून, स्वतंत्र आणि स्वावलंबी चळवळीचे पाठीराखे बनू पाहत होते. या सगळ्या त्यांच्या भूमिकांमुळेच ते नव्या नेतृत्वाच्या शोधात होते, असं एकूण शिवतकर मास्तर आणि शाहू महाराज यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारातून दिसून येतं. शिवतकर मास्तर हे चांभार समाजातील होते. अस्पृश्य निवारणाच्या कामात ते आधीपासूनच सक्रीय होते. पुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामातही हातभार लावला. या अनुषंगाने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या एका लेखात दिलेला पत्रव्यवहार फार महत्त्वाचा आहे. दिनांक 6 सप्टेंबर 1919 रोजी शिवतकरांना पाठवलेल्या पत्रात शाहू महाराज लिहितात की, ‘जर बडोद्याचे सयाजी गायकवाड, हैदराबादचे निजाम किंवा विठ्ठल रामजी शिंदे मदत करत असतील, तर ती घ्यावी. परंतु, या सर्व मंडळींना पुढारी मानू नका.’ असा सल्ला देत शाहू महाराज पुढे लिहितात की, ‘आपण पुढारी असा कोणाचंच घेऊ नये. सल्लागार म्हणून घ्यावं. पुढारी म्हणून घेतला की लगेच त्यांनी आपली अंमलबजावणी करून घेतलीच. माझं न ऐकाल तर तुमचे संस्थेशी माझा संबंध राहणार नाही.’ याच अनुषंगाने ते पुढे लिहितात, “पशूदेखील आपल्या जातीशिवाय पुढारी स्वीकारत नाहीत. मग मनुष्यानी का स्वीकारावा? हरणाच्या कळपात डुक्कर पुढारी नसतो. मग मनुष्याच्या कळपात दुसऱ्या जातीचे पुढारी का असावेत? याचे कारण थोडक्यात आहेत हे की, पुढारीपण घेतलं की बकऱ्यासारखी किंवा ढोरासारखी अवस्था होते. मोडका-तोडका आपल्या जातीचाच पुढारी घ्यावयास पाहिजे आहे. ब्राह्मणास जर आमचा पुढारीपणा घेणेस पाहिजे असेल, तर जातीभेद मोडून त्यांनी रोटी-बेटी व्यवहार कारावास पाहिजे. तरच त्यांना पुढारी मानू, नाहीतर माझ्यासारखी मंडळी दूर राहून यथाशक्ती सल्ला व द्रव्याद्वारे मदत करतील. सल्ला पाहिजे त्याचा घ्यावा, पण आपल्या मानला वाटेल ते करावे. अशा मंडळीस मी सल्ला आणि द्रव्यद्वारे मदत देण्यास तयार आहे. गाई-बैलासारखे दुसऱ्या जातीवर अवलंबून राहणाऱ्या लोकांशी संबध सुद्धा ठेवणे मला इष्ट वाटत नाही आणि मीही ठेवणार नाही.” शाहू महाराजांच्या या पत्रातून तीन गोष्टी ठळकपणे दिसतात. एक म्हणजे नेतृत्व करणारी व्यक्ती अस्पृश्य समाजातीलच असायला हवी, दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक मदत आणि सहाय्यक बनायला तयार आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते नेतृत्व म्हणून स्वत:ला पुढे करत नाहीत किंवा स्वत:ला लादत नाहीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>...आणि शाहूंना ‘बाबासाहेब’ भेटले</strong></p>
<p>
	नेतृत्वाच्या शोधात असताना शाहू महाराजांना ‘बाबासाहेब’ भेटले, ते दत्तोबा पवार, शिवतकर मास्तर आणि दत्तोबा दळवी या तीन व्यक्तींमुळे. यातील दत्तोबा पवार आणि शिवतकर हे चांभार समाजातील कार्यकर्ते होते, तर दत्तोबा दळवी हे मुंबईतील जे. जे. आर्ट कॉलेजमध्ये शिकायला होते. नंतर या दळवींनी कोल्हापूर संस्थांनात कामही केलं. दत्तोबा दळवी यांच्या कुटुंबाने प्रसिद्ध केलेल्या पत्रातून हे दिसून येते की, शाहू महाराज हे बाबासाहेबांना भेटण्यासाठी फार आतुर होते. मात्र, बाबासाहेबांना तेवढी आतुरता नव्हती, असं दिसून येतं. मात्र, पुढे दत्तोबा दळवींच्या पुढाकाराने बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांची भेट झाली आणि त्यानंतर ते कायमचे चळवळीतले सहकारी, तसंच व्यक्तिगत आयुष्यात मित्र बनले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>माणगाव परिषद : स्वतंत्र आंदोलन आणि नेतृत्व</strong></p>
<p>
	शाहू महाराजांना अपेक्षित असलेला नेतृत्वाचा शोध बाबासाहेबांच्या रूपानं लागलेला होता. मात्र, हे नेतृत्व जनमानसात जावं, असंही त्यांना वाटत होतं. त्यासाठी काही घटना घडत गेल्या आणि काही घटना घडवल्या गेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं कोल्हापुरातील आगमन आणि सत्कार असो, किंवा मग पुढे माणगावची बहिष्कृत वर्गाची परिषद असो, या सर्व घटना बाबासाहेबांना नेतृत्व म्हणून पुढे आणण्यास पूरक ठरत गेल्या. यातली महत्त्वाची घटना म्हणजे, अर्थातच माणगाव परिषद. ही बहिष्कृत वर्गाची परिषद कोल्हापुरात व्हावी, अशी मुळात बाबासाहेबांची इच्छा होती. मात्र, शाहू महाराज आणि सत्यशोधक चळवळीत काम करणारी अनेक मंडळींना वाटत होतं की, ही परिषद कोल्हापूरबाहेर व्हावी. त्यांची अशी का इच्छा होती, याचं ठोस असं कारण कुठे सापडत नाही. अखेर कोल्हापूरच्या दक्षिणेकडील माणगाव हे गाव शाहू महाराजांच्या सूचनेनुसार परिषदेच्या आयोजनासाठी ठरवण्यात आलं. विशेष म्हणजे, माणगावात अनुसूचित जातींची लोकसंख्या फार कमी होती. जैन समाज मोठ्या प्रमाणात होता. या गावचे पाटील हे सुद्धा जैन समाजाचे होते. मात्र, ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यांनीच या परिषदेच्या नियोजनाची जबाबदारी घेतली होती. शाहू महाराजांच्या मदतीनेच सुरू झालेल्या ‘मूकनायक’ वृत्तपत्रातील वृत्तानुसार, या सभेला (माणगाव परिषद) फार विरोध झाला होता. या सभेला ‘बाटल्या लोकांची सभा’ म्हणून उद्देशित केले गेले. विशेषत: जी मंडळी स्वतःला या वर्गाचे हितचिंतक आणि उद्धारक म्हणून मिरवायचे त्यांनी मात्र या सभेपासून स्वतःला दूर ठेवले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>माणगाव परिषदेत नेमकं काय झालं?</strong></p>
<p>
	परिषदेच्या पहिल्या दिवशी बाबासाहेबांनी अध्यक्ष स्थान स्वीकारलं. त्यानंतर आपल्या भाषणात मांडणी करताना त्यांनी सामाजिक संरचना कशा स्वरूपाची आहे, याची मांडणी केली. या भाषणात बाबासाहेब म्हणतात, “सर्वाज जन्माने श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो. दुसरा वर्ग, ज्याची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाची आहे, असा जो वर्ग, तो ब्राह्मणेतर वर्ग. तिसरा जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो वर्ग तो आपला बहिष्कृत वर्ग होय.” बाबासाहेब पुढे म्हणतात, “ब्राह्मणेतर जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे. त्यांच्यात विद्या नाही. म्हणून ते आज मागे राहिले आहेत. तरीपण विद्या व द्रव्य मिळवण्याचे मार्ग मोकळे आहेत. ही दोन्ही जरी त्यांच्या जवळ आज नसतील, तरी त्यांना ती उद्या मिळणार आहेत. आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोचनीय झाली आहे.” या सभेत बाबासाहेब जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यावर ताशेरे ओढतात. दुसऱ्या दिवशी शाहू महाराज बोधगयाहून परत येऊन या सभेला संबोधित करतात. शाहू महाराज आपल्या भाषणात बाबासाहेबांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देतात आणि बाबासाहेब हे कसे समस्त मागासवर्ग समूहाचा विचार करतात, याबद्दल आनंद व्यक्त करतात. तसंच, नेतृत्वाबद्दल शिवतकर मास्तरांना लिहिलेल्या पत्रातील सार ते या भाषणात पुन्हा मांडताना दिसतात. शाहू महाराज पुढे आपल्या भाषणात म्हणतात की, “आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहोचण्याचे कारण, आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवतात. पशू-पक्षीदेखील आपल्या जातीचा पुढारी करतात. पक्ष्यांत कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीच पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरं यांत मात्र धनगर पुढारी असतो. त्यामुळे त्यांना शेवटी कसाबखान्यात जावे लागते.” माणगाव परिषदेतल्या शाहू महाराजांच्या भाषणाचे मुद्दे पाहिल्यास आपल्याला लक्षात येतं की, वर्षभरापूर्वी शिवतकर मास्तरांना पत्रात त्यांनी नेतृत्वाबद्दल लिहिलं होतं, तेच त्यांनी इथं मांडलं. याचा अर्थ बहिष्कृत वर्गातून नेतृत्व उभं राहावं, याचा विचार त्यांच्या डोक्यात प्रदीर्घ काळापासून होता. याही पुढे जाऊन शाहू महाराज म्हणतात की, “मी लवकरच सेल्फ गव्हर्नमेंट थोड्या प्रमाणावर देणार आहे. त्याचा फायदा सर्वाना व विशेषत: अस्पृश्य मानलेल्यांना मिळावा म्हणून मी रिप्रेझेंटेशनही देणार आहे.” या परिषेदेत एकूण 15 ठराव संमत केले गेले. विशेष म्हणजे शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सणासारखा साजरा व्हावा, असाही ठराव इथं मांडला गेला.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>माणगाव परिषदेनं काय साध्य केलं?</strong></p>
<p>
	जे बाबासाहेब आंबेडकर केवळ बॉम्बे प्रांतातील सत्यशोधक आणि बहिष्कृत वर्गामधील शिक्षित वर्गापुरते परिचयाचे होते, ते माणगाव परिषदेनंतर दक्षिणेकडेही प्रसिद्ध होऊ लागले. शिवाय, ते केवळ शिक्षित व्यक्ती म्हणूनच नव्हे, तर सामाजिक भान असलेले नेते म्हणून मान्यता पावलेले नेतृत्व म्हणून पुढे आले. पुढे माणगाव परिषदेच्या 19 वर्षांनी म्हणजे 1939 साली कोल्हापुरात काँग्रेस प्रजा परिषद भरली होती. या काँग्रेस प्रजा परिषदेचा शाहू महाराजांना काही कारणास्तव विरोध होता. त्याचा उल्लेख बाबासाहेब असा करतात की, “प्रजा परिषदेचा हेतू प्रजेचे कल्याण करणे हा नसून कोल्हापूरकरांचा द्वेष करणे हा होता.” या प्रजा परिषदेला उत्तर देण्यासाठी बाबासाहेबांनी कोल्हापुरातच 30 सप्टेंबर 1939 रोजी परिषद भरवली. त्यात ते म्हणाले, “माझ्या सार्वजनिक आयुष्याचा श्रीगणेशा कै. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या माणगावच्या परिषेदत मी गिरवला होता. त्यांना आणि मला प्रिय असलेल्या समतेच्या प्रचारसाठी रुपये 2500 देऊन त्यांनी मला सदैव ऋणी केले.” याचच अर्थ, त्यांनी केवळ बाबासाहेबांना सार्वजनिक आयुष्यमध्ये पुढे केले नाही, तर त्यांना लागणारे आर्थिक बळसुद्धा पुरवले. माणगाव परिषदेचा असाही एक परिणाम झाला की, ही परिषद आयोजित करणाऱ्या अप्पासाहेब पाटलांना त्यांच्या समाजानं कायमचं बहिष्कृत केलं होतं. या परिषदेत शाहू महाराजांच्या आवाहनानुसार अनेक लोकांनी त्यांचे जातीआधारित व्यवसाय सोडले होते. मात्र, त्याचा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मकही झाला. कारण जातीआधारित व्यवसाय सोडल्यानं त्यांना बहिष्काराला सामोरं जावं लागलं. तिसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे मराठा समाजातील पुरोगामी मंडळी आधी सत्यशोधक चळवळीशी जोडली गेली होती, ती मोठ्या प्रमाणात या आंदोलनाशीही जोडली जाऊ लागली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित असलेलं नेतृत्व ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या रूपानं मिळालं! आता आपण अशा दोन परिषदांकडे येऊ, ज्यांची माहिती फारशी कुणाला असलेली दिसत नाही किंवा त्यांचा उल्लेख फारसा कुठे होताना दिसत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबासाहेब शाहूंना म्हणतात, ‘आम्ही तुमचे लेकरे नव्हेत काय’</strong></p>
<p>
	माणगावची परिषद ही बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये सामाजिक जीवनाची पायाभरणी होती. त्यापाठोपाठ 30 मे आणि एक जून, 1920 ला दुसरी परिषद नागपूरला शाहू महाराजांच्या अध्यक्षेत भरवण्यात आली. ही परिषदसुद्धा अनेक अंगांनी फार महत्त्वाची होती. नागपूर हे मध्य भारतात वसलेलं शहर. खरंतर नागपूर हा बाबासाहेबांच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेरचा भाग. या भागात किसन फागुजी बनसोड आणि विठ्ठल रामजी शिंदे यांचा बराच प्रभाव होता. नागपूरची ही परिषद होण्यापूर्वीच शाहू महाराजांच्या कन्या आजारी पडल्या. त्यामुळे शाहू महाराज उपस्थित राहू शकणार नाहीत, असा संदेश बाबासाहेबांना पाठवण्यात आला. ही परिषद होणार की नाही, याची काळजी सर्वांना होऊ लागली. विशेषत: बाबासाहेबांना अधिकच काळजी होऊ लागली होती. चळवळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मध्य भारतातील ही फार महत्त्वाची घटना ठरणार होती. त्यामुळे शाहू महाराजच येणार नसतील, तर सभा कशी होणार? असं एकूण संकट या सभेवर येऊन ठेपलं होतं. शाहू महाराज येऊ शकणार नसल्याचं कळल्यावर बाबासाहेबांनी त्यांना पत्र लिहिलं. पत्रात ते लिहितात, “नागपूरच्या परिषेदेस हुजुरचे येणे झाले नाही, तर आमचा सर्वनाश होणार, यात तीळमात्र शंका नाही. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी जर आपला आधार किंवा टेकू मिळाला नाही तर काय उपयोग? अक्कासाहेबांची तब्येत नादुरुस्त आहे, याबाबद्दल मला फार वाईट वाटत आहे. घरी अपत्य आजारी असता आपल्यावर सभेस गळ घालणे हे कठोरपणचे लक्षण आहे, असं मला वाटते. पण काय करावे? अक्कासाहेबाप्रमाणे आम्ही लेकरे नव्हेत काय? आपल्याशिवाय आमचा कोणी वाली आहे काय? आणि आम्ही आज किती काळापासून आजारी आहोत, हे आपल्याला सांगायला नको. मला वाटते आमचा परामर्श यावेळी आपण घेतलाच पाहिजे. नाहीतर आपल्यावर बोल नाही, रुसवा राहील. म्हणून माझी सविनय प्रार्थना आहे की, अन्य सर्व गोष्टींकडे कानाडोळा करून सभेचे अध्यक्षस्थान आपण मंडीत करून या आपल्या लडिवळ अस्पृश्य लेकास वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर त्याची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना काढणं अशक्य होईल.” बाबासाहेबांच्या या पत्राला शाहू महाराजांनी उत्तर दिलं आणि उत्तरात त्यांनी आश्वस्त केलं की, मुलीची प्रकृती ठीक नसली, तरीही नागपूरच्या परिषदेला हजर राहू. या परिषदेच्या उपस्थितांच्या नावांवर लक्ष टाकल्यास दिसतं की, अस्पृश्य समाजातील मंडळींनीच आयोजन केलं होतं. तसंच, सत्यशोधक समाजातील मंडळीही हजर होती. विशेष म्हणजे, नागपूरचे भोसले घराणे हे शाहू महाराज यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले नव्हते. अशी माहिती सत्यशोधक चळवळीचे नेते बाबुराव यांनी नमूद करून ठेवलीय. या बाबुराव यांनीच मराठा समाजाला आवाहन केलं होतं की, अस्पृश्य वर्गाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. ‘मूकनायक’नं त्यावेळी वृत्तांकनानुसार, नागपूरच्या परिषदेतही शाहू महाराज पुन्हा नेतृत्वाबद्दल भाष्य करतात. नागपुरात शाहू महाराज म्हणाले होते, “वास्तविक बघता मी कोणाचा पुढारी नाही; व पुढारी होऊही इच्छित नाही. मला पुढारी समजून माझ्या मागे कोणी येऊ लागल्यास त्यास आपण माझ्या मागे येऊ नका, असे नम्रतापूर्वक सांगतो.” याचाच अर्थ की, शिवतकर मास्तरांसोबतचा पत्रसंवाद, त्यानंतर माणगाव परिषद आणि आता नागपूर परिषदेतही शाहू नेतृत्व उभारणीवरच भर देताना दिसतात आणि त्यासाठी आग्रहीसुद्धा दिसतात. नागपूरच्या या परिषदेत शिवराम कांबळा, रा. बर्वे, शिवतकर यांचीही भाषणं झाली. चळवळ उभी राहावी म्हणून बॅरिस्टर बक यांनी निधी उभारण्याचं आवाहन केल्यानंतर शाहू महाराज यांनी 5,000 रुपये आणि कालिचरन यांनी 1 हजार रुपये देणगी दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाचा उदय</strong></p>
<p>
	नागपूरच्या परिषदेत अस्पृश्य समाजाच्या राजकीय वाटचालीसंदर्भात महत्त्वाची भाषणं झाली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेचा विरोध करण्यात आला. कारण शिंदेंच्या मते, डिप्रेस क्लासमधून उमेदवार निवडावे. मात्र, शिंदेंची ही मांडणी नागपूर परिषदेत खोडून काढण्यात आली आणि शिंदेंच्या डिप्रेस क्लास मिशनवर अविश्वास दाखवण्यात आला. ‘आमची मंडळी आम्हीच निवडणार’ हा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे शिंदेंचा प्रभाव कमी करण्यात फार मोठं काम या परिषदेनं केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मध्य भारतातात पोहोचलं. या परिषदेनंतर ब्राह्मणेतर आणि अस्पृश्य वर्गातील नेते मंडळींनी विठ्ठल रामजी शिंदे आणि काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली. महत्त्वाचं म्हणजे, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेलं काम या परिषेदेत पूर्ण झाल्याचं निदर्शनास येतं. नागपूरची परिषदेमुळे विठ्ठल रामजी शिंदेंच्या प्रभावाचा काहीसा अस्त होऊन, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. आता आपण तिसऱ्या परिषदेकडे म्हणजे दिल्लीतल्या परिषदेकडे येऊ. ही परिषद बॉम्बे प्रांताच्या बाहेर होतीच, मात्र उत्तर भारताच्या केंद्रस्थानी होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>शाहू म्हणतात, ‘लोकांनो, आंबेडकर तुमचे नेते आहेत’</strong></p>
<p>
	तिसरी परिषद 16 फेब्रुवारी 1922 रोजी दिल्लीत भरली होती. अनेकांना माणगाव आणि नागपूरला झालेल्या परिषदेबद्दल माहिती असते. मात्र, दिल्लीच्या परिषदेबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतात. ज्या मंडळींनी नागपूर परिषद आयोजित केली होती, त्यांनीच दिल्लीतली परिषद आयोजित केली होती. दक्षिण प्रांतात (माणगाव), मध्य प्रांतात (नागपूर) आणि आता उत्तर भारतात (दिल्ली) असंही या परिषदेचं आयोजन होतं. दिल्लीतल्या या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मात्र उपस्थित राहू शकले नव्हते. ते शिक्षणासाठी लंडनला होते. त्यांच्या अनुपस्थित या सभेला शाहू महाराजांनी अध्यक्षस्थान भूषविलं. दिल्लीतल्या या परिषदेत शाहू महाराज दोन गोष्टी प्रामुख्यानं मांडताना दिसतात. एक म्हणजे ते बाबासाहेबांबद्दल सांगतात की, आंबेडकर हे शिक्षण घेत आहेत आणि माझ्यापेक्षा ते जास्त शिकलेले आहेत. दुसरे म्हणजे शाहू महाराज उत्तर भारतातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना उद्देशून सांगतात की, तुम्ही बाबासाहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. एकूणच या तिन्ही परिषदा पाहिल्यास असं लक्षात येतं की, राजर्षी शाहू महाराज हे स्वतंत्र आंदोलन आणि नेतृत्व उभारणीसाठी अत्यंत आग्रही होते. दुसरं म्हणजे बाबासाहेब या परिषेदेनंतर बहिष्कृत समजल्या जाणाऱ्या वर्गाचे राष्ट्रीय नेते म्हणून उदयाला आले. पुढेही बाबासाहेब लंडनला शिकायला असताना आणि शाहू महाराज त्यांच्या शेवटच्या काळातापर्यंत, चळवळीत कुठेच खंड पडू देताना दिसत नाहीत. शिवाय, ‘आंबेडकर तुमचे नेते आहेत’ हे लोकांनाही सांगायलाही शाहू विसरले नाहीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Dhanashri Naik </p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 21 Mar 2024 10:31:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 21 Mar 2024 10:46:30 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मराठी पत्रकार दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता कशी होती?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/marathi-patrakar-din-how-was-dr-babasaheb-ambedkar-s-journalism-124010600046_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/marathi-patrakar-din-how-was-dr-babasaheb-ambedkar-s-journalism-124010600046_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/thumb/1_1/1618239279-2615.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/thumb/1_1/1618239279-2615.jpg</image>
      <description><![CDATA[6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे. लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग, वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे, समुदायाचे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar jayanti" class="imgCont" height="451" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/full/1618239279-2615.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="677" /></p>
	-तुषार कुलकर्णी</p>
<p>
	6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे. लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग, वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे, समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वातंत्र्यलढा असो वा सामाजिक सुधारणा, मराठी पत्रकारितेनी जनमानसांत एक चळवळ उभी केल्याचे आपण पाहिले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	सत्यशोधकी पत्रकारिता, ख्रिस्ती मिशनऱ्यांची पत्रकारितेने बहुजन समाजातील लोकांच्या उद्धारासाठी आपल्या जीवाचे रान केले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि आणीबाणीच्या काळातही मराठी पत्रकारितेने आपली धार कायम ठेवत एक नवा अध्याय लिहिला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या विविध प्रवाहांमध्ये आणखी एका प्रवाहाचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरते ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी मराठीतून पत्रकारिता करत कोट्यवधी लोकांना संघर्षाचे बाळकडू पाजले. त्यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही तर त्यातून कोट्यवधी लोकांचे आयुष्य आणि मराठी पत्रकारिता समृद्ध केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांची पत्रकारिता हा मराठी पत्रकारितेतील सोनेरी अध्याय आहे हे कुणीही नाकबूल करणार नाही. म्हणूनच मराठी पत्रकारदिनी त्यांच्या पत्रकारितेचे स्मरण करणे अगत्याचे ठरते.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेकडे पाहणे आणखी एका गोष्टीमुळे महत्त्वाचे ठरते ते म्हणजे की त्यांचे जीवन आणि त्यांची पत्रकारिता ही समांतरच चालली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	1920 मध्ये मूकनायक सुरू करण्यापासून ते 1956 ला प्रबुद्ध भारत सुरू करण्यापर्यंत म्हणजेच एकूण 36 वर्षांच्या काळात डॉ. आंबेडकरांनी आपल्या प्रचंड मोठ्या कामाचा व्याप सांभाळून पत्रकारिता केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	तो काळ नेमका कसा होता, त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी येत होत्या, त्यांच्यासमोर कोणती आव्हानं होती, तेव्हाची परिस्थिती कशी होती या सर्वांची साक्ष त्यांच्या नेतृत्वात निघत असलेल्या पत्रांतून आपल्या मिळते. त्यामुळेच डॉ. आंबेडकरांचे जीवन समजून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांची पत्रकारिता महत्त्वाची ठरते.</p>
<p>
	 </p>
<p>
	वृत्तपत्रं म्हणजे इतिहासाचा कच्चा मसुदा असं म्हटलं जातं पण डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेमुळे आपल्या डोळ्यांसमोर जिवंत इतिहासच उभा राहतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	जसं विविध स्तरांवर डॉ. आंबेडकरांचे संघर्षमयी जीवन आपल्याला दिसते तशीच त्यांची पत्रकारिताही खडतर काळातीलच होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण जशी त्यांनी आपल्या आयुष्यात सर्व आव्हानांवर मात करत आपल्या ध्येयाकडे वाटचाल चालू ठेवली तसंच त्यांच्या पत्रकारितेच्या बाबतीत देखील घडलं. त्यामुळेच त्यांची पत्रकारिता ही आगीतून तावून सुलाखून निघालेल्या बावनकशी सोन्यासारखी वाटते.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ, दलितोद्धारक, भारताचे पहिले कायदे मंत्री, शिक्षणाचे पुरस्कर्ते, मानवी हक्क चळवळीचे अध्वर्यू, मजूर चळवळीचे नेते अशा विविधांगी गोष्टीसाठी ओळखले जातात.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण त्यांची पत्रकारितादेखील सर्वोच्च प्रतीची असताना देखील त्याबद्दल फारसं बोललं जात नाही अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांनी अनेकवेळा व्यक्त केली आहे. आणि यातूनच साहित्यिक आणि विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणेंनी &#39;पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर&#39; हा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला.</p>
<p>
	 </p>
<p>
	तेव्हापासून अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेवर अभ्यास करत त्यांच्या पत्रकारितेचे विविध पैलू समोर आणले आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता कशी सुरू झाली, त्यांच्या पत्रकारितेतून त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न मांडले, ते कसे मांडले आणि त्याचा एकूणच मराठी पत्रकारितेवर काय परिणाम झाला हे आपण या लेखातून पाहू.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर 5 नियतकालिके सुरू केली. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी &#39;मूकनायक&#39; सुरू केले होते. भारतातील वर्तमानपत्रं ही एका विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी असून त्यांना बहिष्कृत वर्गातील जनतेच्या सुख-दुःखाची पर्वा नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	तेव्हा त्यांच्या हक्काचा लढा लढण्यासाठी आपल्याजवळ साधनही तसंच हवं अशी भूमिका घेत डॉ. आंबेडकरांनी &#39;मूकनायक&#39;ची मुहूर्तमेढ रोवली.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;मूकनायक&#39;ची कशी सुरुवात झाली?</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 मध्ये साऊथबरो कमिशनसमोर मुंबईत साक्ष दिली होती आणि यावेळी त्यांनी अस्पृश्य वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. या समितीला निवेदन करुन अस्पृश्यांना विधिमंडळात 9 जागा देण्याची विनंती केली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याचवेळी त्यांच्या मनात हा विचार सुरू झाला की आपल्या हक्काचे असे व्यासपीठ हवे की ज्यातून आपण आपल्या समस्या मांडू शकू, त्यावर विचार मंथन करता येईल आणि त्यावर उपाय योजना देखील सुचवता येईल.</p>
<p>
	 </p>
<p>
	ही गरज ओळखून त्यांनी मूकनायकची सुरुवात केली. दत्तोबा पवार या गृहस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याशी घडवून आणली होती. अस्पृश्य समुदायाचा पुढारी हा त्यांच्यातूनच असावा अशी भावना शाहू महाराजांची होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांशी झालेल्या भेटीगाठीनंतर शाहू महाराजांना खात्री पटली की हा पुढारी म्हणजे डॉ. आंबेडकरच ठरतील. पुढे एका कार्यक्रमात तर त्यांनी त्यांचा मनोदय बोलून पण दाखवला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना 2,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यातून 31 जानेवारी 1920 रोजी &#39;मूकनायक&#39;ची सुरुवात झाली आणि पुढे इतिहास घडला.</p>
<p>
	 </p>
<p>
	मूकनायकची जाहिरात &#39;केसरी&#39;मध्ये द्यावयाची होती. त्यावेळी लोकमान्य टिळक हयातही होते पण तेव्हा पैसे देऊनही ही मूकनायकाची जाहिरात द्यायला &#39;केसरी&#39;ने तयारी दर्शवली नव्हती.</p>
<p>
	 </p>
<p>
	याबाबत डॉ. आंबेडकरांनी लिहिले होते, "आम्हांस पक्के आठवते की जेव्हा आम्ही मूकनायक पत्र सुरू केला होते तेव्हा केसरीला आमची जाहिरात फुकट छापा अशी विनंती केली होती. पण ती धुडकावून लावण्यात आली. तदनंतर तुमचा आकार देतो, छापा असे लिहिल्यावर जागा रिकामी नाही असे उत्तर देण्यात आले!" (संदर्भ - 20 मे 1927, बहिष्कृत भारत, महाराष्ट्र शासन सोर्स मटेरिअल ग्रंथ)</p>
<p>
	 </p>
<p>
	यावरुन आपल्या हे लक्षात येऊ शकते की अस्पृश्य वर्गाच्या उत्थानासाठी त्याकाळात मुख्य प्रवाहातील वृत्तपत्र पोषक नाहीत, तेव्हा आपल्यालाच स्वतःला हे कार्य हाती घ्यावे लागेल असा विचार डॉ. आंबेडकरांनी केलेला दिसतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	मूकनायकच्या पहिल्या अंकातील मनोगतात ते आपली भूमिका मांडतात की, "आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	"परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रें विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहाणारी आहेत इतर जातींच्या हिताची त्यांना परवा नसते."</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकर पुढे म्हणतात, "दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठी, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका या पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो, त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग ऊहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही, हेही पण उघड आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	"त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे." ( संदर्भ - मूकनायक- 31 जानेवारी, 1920, महाराष्ट्र शासन सोर्स मटेरिअल ग्रंथमालिका )</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकर तेव्हा सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांनी या पत्राची जबाबदारी पांडुरंग नंदराम भटकर यांच्यावर सोपवली होती. काही अंक निघाल्यावर डॉ. आंबेडकर आपले अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात गेले. त्यानंतर मूकनायक बंद पडले. ते विलायतेला गेल्यानंतर केवळ एक अंक निघाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	मूकनायकचे एकूण 13 अंक निघाले. आपले शिक्षण पूर्ण होऊन जेव्हा आपण भारतात परत येऊ तेव्हा या वृत्तपत्राची भरभराट झालेली आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा डॉ. आंबेडकरांना वाटत होती पण त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	या गोष्टीची खंत त्यांच्या मनात राहिली. पण नाउमेद न होता त्यांनी 3 एप्रिल 1927 ला &#39;बहिष्कृत भारत&#39; सुरू केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	बहिष्कृतांवरील अन्यायाला जगासमोर आणणारे &#39;बहिष्कृत भारत&#39;</p>
<p>
	बहिष्कृत भारतासाठी डॉ. आंबेडकरांना आपले इतर व्याप सांभाळून काम करावे लागत असे.</p>
<p>
	 </p>
<p>
	प्रा. अरुण कांबळेंनी &#39;जनता पत्रातील लेख&#39; या पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अरुण कांबळेंनी &#39;बहिष्कृत भारता&#39;चे कामकाज डॉ. आंबेडकर कसे पाहायचे यावर प्रकाश टाकला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	अरुण कांबळे लिहितात की "बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड आर्थिक ओढग्रस्ती सोसूनही बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू ठेवले. बहिष्कृतच्या काळात ते 24-24 रकाने स्वतः भरुन काढत. कोणीही साहाय्यक त्यांना नव्हता, असा उल्लेख त्यांनी केला आहे."</p>
<p>
	 </p>
<p>
	बहिष्कृत भारत हे पाक्षिक दोन वर्षं चालले. बहिष्कृत भारत हे अल्पकाळासाठी चाललं असं कुणी म्हणू शकतं परंतु डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या अस्पृश्यतेविरोधातील लढ्याला लोक चळवळ बनवण्याचे श्रेय याच पत्राला द्यावे लागेल.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला केवळ 13 दिवस झाले होते. त्यानंतर हे पत्र सुरू करण्यात आले. ही दोन वर्षं डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. या दोन वर्षांत महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, पुण्यातील पर्वती मंदिरात प्रवेशाचा सत्याग्रह अशा महत्त्वपूर्ण घटना घडल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	याच काळात डॉ. आंबेडकरांची विधिमंडळातील कारकीर्द देखील बहरू लागली होती. राज्यभरात अस्पृश्य परिषदा, शेतकरी परिषदांच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर पूर्ण महाराष्ट्रभर फिरून लोकसंग्रह करत असत. &#39;बहिष्कृत भारत&#39; हे त्यांच्या चळवळीचे मुखपत्रच बनले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	महार वतने खालसा करण्यात यावी असं डॉ. आंबेडकरांना वाटत असे. ही प्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी बहिष्कृत भारतमधून आपली भूमिका लोकांना समाजावून सांगितली.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकर जिथे भाषण करत असत तेथील भाषण बहिष्कृत भारतमध्ये प्रसिद्ध केले जात असे.</p>
<p>
	 </p>
<p>
	बहिष्कृत भारतमध्ये केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच लेख येत असत असे नाही. त्यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांना त्यांनी लिहिण्यास प्रोत्साहित केले. राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी चळवळीसंबंधी ठराव होत असत, त्याचे वृत्त बहिष्कृत भारतात येत असे.</p>
<p>
	 </p>
<p>
	विचार मानस, पत्रव्यवहार अशा स्तंभातून समाजातील सर्व स्तरातील लोक आपल्या भावना व्यक्त करत. त्यांच्या लेखाला यथोचित स्थान पत्रातून मिळत असे. काही जण टोपणनावाने या पत्रातून लिहित असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	बहिष्कृत भारतातले वृत्तांकन</p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या कार्याने प्रोत्साहित होऊन पुरोगामी विचारसरणी अवलंबणाऱ्यांचे अभिनंदन करणाऱ्यांचे पत्र देखील लोक पाठवत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 12 ऑगस्ट 1927चा अंक.</p>
<p>
	 </p>
<p>
	या दिवशी प्रकाशित झालेल्या अंकात एका पत्रात डॉ. पंजाबराव देशमुखांनी अस्पृश्यता निवारणासाठी कार्य केल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या घरी दरवर्षी ब्राह्मण भोजन देण्याचा प्रघात होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	तो त्यांनी बंद करून वसतिगृहात शिकणाऱ्या मुलांना भोजन दिले होते. वसतिगृहातील मुलांमध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता डॉ. देशमुखांच्या मातोश्रींनी सर्वांचे आदरातिथ्य करून समभावाने जेऊ घातले असे &#39;अमरावतीकर&#39; या नावाने पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर कसा भेदभाव होतो याची माहिती तक्त्यातून दिली जात असे. मुलांना नेमकं कुठे बसवले जाते, त्या शाळेची इमारत कशा प्रकारची आहे, कोणत्या गावात कशी पद्धत आहे याचा तपशील या तक्त्यातून दिला जात असे.</p>
<p>
	 </p>
<p>
	9 तालुक्यातील वेगवेगळ्या लोकांकडून कोणत्या गावात कसा भेदभाव होतो याची माहिती घेऊन हा तक्ता तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसते. डॉ. आंबेडकरांना शिक्षणाविषयी तळमळ होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्यायलावर कुणी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,&#39; असे ते म्हणत असत. त्यांच्या याच तळमळीतून त्यांनी तत्कालीन शिक्षण व्यवस्थेचे प्रश्न आपल्या पत्रकारितेतून मांडले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	राज्यात जर कुठे अस्पृश्यांवर अत्याचार झाला असेल तर त्याचे वृत्त बहिष्कृत भारतमध्ये दिले जाई. गावगुंडांचे जुलुम, अस्पृश्यांवरील बहिष्कार, तथाकथित शुद्धीकरण अशा प्रकारच्या अनेक बातम्यांना बहिष्कृत भारतात स्थान मिळाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;बहिष्कृत भारत&#39; 15 नोव्हेंबर 1929 मध्ये बंद पडले. त्यानंतर एका वर्षाने &#39;जनता&#39; सुरू करण्यात आले.</p>
<p>
	 </p>
<p>
	बहिष्कृत भारताचे नाव बदलूनच जनता हे नाव देण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांनी चालवलेल्या नियतकालिकांपैकी सर्वाधिक काळ जनता हेच पत्र चालले.</p><p>
	&#39;जनतेच्या भाग्योदयासाठी जनता&#39;</p>
<p>
	24 नोव्हेंबर 1930 ला सुरू झालेले जनता पत्र 1955 पर्यंत चालले. काही काळ बंद पडून त्यानंतर &#39;जनता&#39; पत्राचे नाव हे &#39;प्रबुद्ध भारत&#39; ठेवण्यात आले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या वृत्तपत्र कारकीर्दीतील सर्वाधिक काळ चाललेले हे नियतकालिक होते. आपल्या वृत्तपत्रीय कारकीर्दीतील सर्वाधिक काळ लेखन डॉ. आंबेडकरांनी जनतासाठी केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;जनतेच्या भाग्योदयासाठी जनता पत्र प्रमुख साधन उपयोगी म्हणून पडेल,&#39; अशी आशा डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करुन द्या म्हणजे तो पेटून उठेल,&#39; हे ब्रीदवाक्य घेऊन जनता पत्र तत्कालिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणू लागले. &#39;जनता&#39; पत्र हे केवळ डॉ. आंबेडकरांच्याच नाही तर मराठी पत्रकारितेतील मैलाचा दगड ठरले.</p>
<p>
	 </p>
<p>
	1930 नंतरच्या काळात देशात अनेक राजकीय बदल घडू लागले होते. येत्या काळात स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित आहे पण कोट्यवधी अस्पृश्य आणि मागासवर्गीय जातीतील लोकांच्या स्थितीत बदल झाला नाही तर ते स्वातंत्र्यानंतरही गुलामगिरीतच राहतील, अशी मांडणी डॉ. आंबेडकरांनी केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	आर्थिक ताण सोसूनही सुरू ठेवला &#39;जनता&#39;</p>
<p>
	जनता या पत्रामुळे डॉ. आंबेडकरांवर खूप मोठा आर्थिक ताण पडत होता तरी देखील त्यांनी हे नियतकालिक सुरू ठेवले. त्यांनी 25,000 रुपये खर्च करून स्वतंत्र छापखाना उभा करुन दिला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण जसं त्यांचं वय आणि जबाबदाऱ्या वाढू लागल्या तसं जनताची जबाबदारी त्यांना एकट्याला सांभाळताना त्यांच्यावर ताण पडू लागला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपण आता पन्नाशीकडे झुकु लागलो आहोत आपण वेळोवेळी जनता या पत्राला जीवदान दिले आहे पण आता इतर सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही जबाबदारी पार पाडावी असे त्यांनी म्हटले होते. &#39;जनता&#39; सुरू ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी वर्गणीदार होऊन या पत्राची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले होते. (संदर्भ - विसाव्या शतकातील महाराष्ट्र, खंड - 5, लेखक य. दि. फडके)</p>
<p>
	 </p>
<p>
	इतर कुणाकडून आर्थिक मदत स्वीकारण्याऐवजी आपल्याच वाचक वर्गाने नियतकालिकांना सहकार्य करावे अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे वर्गणीदार जोडणे, सभासद जोडणे ही कामे करावीत असा सल्ला ते सहकाऱ्यांना देत.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;अस्पृश्य वर्ग कितीही गरीब असला तरी आठवड्याला एक आणा खर्च करण्याइतका तरी तो निश्चितच गरीब नाही&#39;, असं ते म्हणत. दुसरी गोष्टी म्हणजे समाजातील लोकांनी समोर येऊन जनतासाठी देणग्या द्याव्यात अन्यथा &#39;जनता&#39; बंद पडेल असं ते म्हणत.</p>
<p>
	 </p>
<p>
	समता साप्ताहिक</p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी 29 जून 1928 रोजी &#39;समता&#39; हे नियतकालिक सुद्धा सुरू केले होते. त्यांनीच स्थापन केलेल्या &#39;समता सैनिक दला&#39;चे हे मुखपत्र होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;समता&#39;ची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी देवराव विष्णू नाईक यांच्याकडे सोपवली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	पुढे हे नियतकालिक बंद पडले असले तरी चळवळीच्या ध्येयावर आधारित नियतकालिक असल्यामुळे महत्त्वपूर्ण ठरते.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;भारताला प्रबुद्ध करण्यासाठी प्रबुद्ध भारत&#39;</p>
<p>
	&#39;जनता&#39;चे नाव बदलून 4 फेब्रुवारी 1956 रोजी &#39;प्रबुद्ध भारत&#39; ठेवण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांची संपूर्ण देशाच्या सर्वांगीण उन्नतीबाबत असलेलं दूरदृष्टी, त्यांचे व्हिजन या नावातून दिसते. रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी प्रबुद्ध भारत मधूनच केली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	रिपब्लिकन पक्षाची दिशा कशी असेल, या पक्षाची घटना काय आहे, कोणत्या आदर्शांवर हा पक्ष चालणार यासंबंधित सर्व गोष्टी &#39;प्रबुद्ध भारत&#39; मधून प्रकाशित करण्यात आल्या होत्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हे वृत्तपत्र त्यांचे सुपुत्र यशवंतराव आंबेडकरांनी चालवले, पुढे ते बंद पडले.</p>
<p>
	 </p>
<p>
	वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच पुन्हा प्रबुद्ध भारत वृत्तपत्र आणि वेबसाईट सुरू केली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;भारताला प्रबुद्ध करण्याची त्याकाळी गरज होती, म्हणून प्रबुद्ध भारत हे नाव ठेवण्यात आलं होतं,&#39; असं अॅड. प्रकाश आंबेडकरांनी नव्याने प्रबुद्ध भारत सुरू केल्यानंतर म्हटले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत का सुरू केलं होतं हे सांगताना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी एका भाषणात सांगितले आहे की, "प्रबुद्ध सुरू करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनात पक्कं केलं होतं की आता आपल्याला आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	"बाबासाहेब आंबेडकरांना या गोष्टीची जाणीव होती की केवळ कुठल्याही धम्माच्या नुसत्या चालीरिती माहित असून माणसं बदलत नाहीत. त्याच्यामध्ये एक विचार असावा लागतो त्याच्यामध्ये एक जाणीवपूर्वक असं उचललेलं पाऊल असावे लागते.</p>
<p>
	 </p>
<p>
	"बाबासाहेबांनी दीक्षा घेतली म्हणून मला दीक्षा घ्यायची हे बाबासाहेबांना नको होतं. ज्या धर्माने आपले माणूसपण नाकारले त्या धर्माचा त्याग करून समता असणारा धम्म स्वीकारावा, सर्वांनी विचारपूर्वक कृती करावी हे त्यांना अपेक्षित होतं त्यातून त्यांनी प्रबुद्ध भारत सुरू केला," असं अंजलीताई सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्वसमावेशक आणि विविधांगी पत्रकारिता</p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत विविधांगी आणि विपुल लेखन केले. त्यांची विद्वता आणि ग्रंथांच्या व्यासंगामुळे ते कुठलाही विषय चटकन समजून घेऊ शकत आणि समजावून देखील सांगू शकत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	कठीणातील कठीण विषय सामान्य माणसापर्यंत कसा पोहचावता येईल हे ते पाहत. ते विषय देखील लोकांच्या जिव्ह्याळ्याचेच घेत. त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. मराठीच्या अभिजात साहित्याचा त्यांचा अभ्यास होता. अत्यंत ओघवत्या भाषेत ते आपला विषय मांडत.</p>
<p>
	 </p>
<p>
	कधी गोष्ट सांगून, कधी दृष्टांत देऊन ते लोकांच्या मनाचा ठाव घेत. तर कधी वीज कडाडल्याप्रमाणे गर्जना करत ते अन्यायाविरुद्ध तुटून पडत.</p>
<p>
	 </p>
<p>
	ग्रामीण भागात प्रचलित म्हणी असो वा जगभरातील उत्तमोत्तम साहित्यिकांचे वचन असो, त्या गोष्टीचा वापर ते अत्यंत चपखलपणे आपल्या लिखाणात करत. त्यांच्या लेखनात मराठी भाषेचं सौंदर्य आणि समृद्धी पाहायला मिळते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मागास जातीतील लोकांना त्यांचे हक्क मिळावेत, शिक्षणाचा प्रचार-प्रसार व्हावा, अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट व्हावी, महिला, अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, धर्मावरील धर्ममार्तंडांचा पगडा कमी होऊन जनतेनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा तरच त्यांची उन्नती होईल अन्यथा त्यांना गुलामगिरीतच खितपत पडावे लागेल, अशी भीती डॉ. आंबेडकरांना वाटत होती. त्यातूनच जनोद्धारासाठी त्यांनी पत्रकारिता केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	विशिष्ट जातसमूहाच्याच लोकांचे हितसंबंध जपणाऱ्या आणि इतर जातींबद्दल अनास्था दाखवणाऱ्या तत्कालीन वृत्तपत्रांना त्यांनी इशारा दिला होता की तुमच्या या वृत्तीचा फटका हा तुम्हालाही बसू शकतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	बहिष्कृत भारतातील मनोगतात ते म्हणतात, &#39;एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे....एका जातीचे नुकसान केल्यामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार,&#39; हे सांगत असताना ते समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून भाष्य करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात अस्पृश्यांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अन्यथा त्यांची अवस्था आता आहे त्याहून बिकट होईल असा इशारा त्यांनी दिला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	महारवतनं हे गुलामगिरीचे चिन्ह असून ती रद्द झाली पाहिजे हे देखील त्यांनी आपल्या पत्रकारितेतून सांगितले.</p>
<p>
	 </p>
<p>
	महिलांचे सबळीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, अल्पसंख्यांकांचे प्रश्न, भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा अशा विविध विषय त्यांनी हाताळले.</p>
<p>
	 </p>
<p>
	मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत ही नियतकालिकं डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू केली आणि त्यातून आपल्याला त्यांच्या वैचारिक प्रतिभेची आणि प्रतिमेचे दर्शन घडते. त्यांच्या पत्रकारितेचा वारसा अनेकांना घेत आपल्या परीने ही चळवळ जिवंत ठेवण्याचे कार्य केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या चळवळीशी जोडली गेलेली नियतकालिके</p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी स्वतः तर पत्रकारिता केलीच पण त्यांच्यामुळे चळवळीतील इतरांनाही प्रेरणा मिळाली आणि त्यांनी चळवळीला सहकार्य करण्याच्या हेतूने आपली नियतकालिके सुरू केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	गरुड, दलित बंधू आणि अरुण या नियतकालिकांचा या मध्ये समावेळ होतो. गरुड हे पाक्षिक दादासाहेब शिर्केंनी सुरू केले होते. दादासाहेब शिर्के हे कोल्हापूरचे होते आणि आंबेडकरी चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	दलित बंधू नियतकालिक डॉ. आंबेडकरांचे सहकारी आणि मुंबई काउन्सिलचे सदस्य पी. एन. राजभोज यांनी सुरू केले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	नागपूरहून प्रकाशित होणारे &#39;अरुण&#39; हे साप्ताहिक श्री. म. ठवरे यांनी सुरू केले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;अरुण&#39;ला डॉ. आंंबेडकरांनी आशीर्वाद दिले होते याची नोंद सापडते.</p>
<p>
	 </p>
<p>
	29 मे 1947 ला लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. या साप्ताहिकाची गरज दलित वर्गाला आहे असं डॉ. आंबेडकरांनी तेव्हा म्हटले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	"वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नासंबधी जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी हे वृत्तपत्र उत्तम तऱ्हेनी पार पाडील अशी आशा आहे, माझ्या दलितवर्गाने अरुणला पूर्ण सहकार्य द्यावे," असे आशीर्वाद डॉ. आंबेडकरांनी &#39;अरुण&#39;ला दिले होते. (संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड - 20, महाराष्ट्र शासन)</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेतून अनेक नियतकालिके त्या काळात निर्माण झाली होती असं चाळीसगाव येथील प्रा. गौतम निकम सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	बीबीसी मराठीला त्यांनी सांगितले की "1920 ते 1950 या कालखंडात बाबासाहेंबाच्या पत्राशिवाय अस्पृश्य समाजातून कितीतरी पत्रे निघाली. त्यात गरुड, दलितबंधू, पतितपावन, दलित सेवक, दलित निनाद, दलित भारत, अरुण जागृती, जयभीम, चोखामेळा, निर्धार, लोकसेवक, उद्धार, लोकप्रिय आणि सिद्धार्थ या नियतकालिकांचा समावेश होतो."</p>
<p>
	 </p>
<p>
	प्रा. निकम सांगतात, "या पत्रांच्या मालकांची संपादकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. अपुऱ्या सुविधा आणि वर्गणीदारांची मारामार होती. परंतु अशाही प्रतिकूल परिस्थितीत केवळ सामाजिक बांधिलकीपोटी त्यांनी उत्स्फूर्तपणे आंबेडकरी विचार आणि चळवळ तळागाळातील समाजापर्यंत पोहचविण्यासाठी अपार कष्ट केले."</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे महत्त्व</p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या पीडित असलेल्या वर्गाला, सर्व बाजूने उपेक्षित असलेल्या वर्गाला केंद्रस्थळी आणण्याचे काम डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेनी केले, असं हिंदी भाषेचे साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. सूर्यनारायण रणसुभे सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. रणसुभे यांनी &#39;पत्रकारिता के युगनिर्माता डॉ. भीमराव आंबेडकर&#39; हे पुस्तक लिहिले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. रणसुभे म्हणाले की "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन पद्धतीने लिहित होते. पहिले म्हणजे जागतिक पातळीवर काय सुरू आहे याचा संक्षिप्त आढावा ते घेत होते. दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्रातील उपेक्षित वर्गावर होणारा अत्याचार, अन्यायाच्या बातम्या ते देत असत. आणि तिसऱ्या पातळीवर ते या वर्गाच्या प्रबोधनाचे काम देखील करत असत. केवळ नकारात्मक भूमिका ते घेत नव्हते तर ते त्यांना पर्याय देखील सुचवत असत."</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता ही आधुनिक भारताच्या निर्माणासाठी होती असाही एक विचार त्यांच्या पत्रकारितेबाबत मांडण्यात येतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे विविध पैलू उलगडून दाखवणारा ग्रंथ &#39;डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता&#39; हा ग्रंथ लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजच्या पुढाकारातून प्रकाशित करण्यात आला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	या पुस्तकाचे संपादक डॉ. संभाजी पाटील याच पुस्तकातील आपल्या लेखात म्हणतात, "डॉ. आंबेडकरांनी चळवळीच्या माध्यमातून उभा केलेला लढा केवळ अस्पृश्यता निर्मूलन एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. त्यांचा लढा व्यवस्था परिवर्तनासाठी होता. मानवमुक्तिसाठी होता."</p>
<p>
	 </p>
<p>
	"भेदभावाच्या पलीकडे असणारा समाज त्यांना हवा होता. शेटजी-भटजी संस्कृती नष्ट करुन स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायावर आधारित नवसमाज निर्माण करण्यासाठी होता. त्यातूनच एकसंध आधुनिक भारत निर्माण होणार याची पूर्ण जाणीव त्यांना होती."</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. पाटील पुढे लिहितात, "भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहिष्कृत समाज मानवी पातळीवर येणे काळाजी गरज आहे, याच गरजेतून डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता उदयास आली."</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 06 Jan 2024 16:43:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 06 Jan 2024 16:46:01 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी जाहीर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkars-mahaparinirvana-day-announced-as-a-local-holiday-123120600002_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkars-mahaparinirvana-day-announced-as-a-local-holiday-123120600002_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/thumb/1_1/1681291226-1829.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/thumb/1_1/1681291226-1829.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई, :  मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="babasaheb ambedkar" class="imgCont" height="580" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/full/1681291226-1829.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="720" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:720px;">
			R S</p>
	</p>
	मुंबई, :  मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 06 Dec 2023 08:16:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 06 Dec 2023 08:21:24 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यामागे काय कारणं होती?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-what-were-the-reasons-behind-babasaheb-ambedkar-accepting-buddhism-122100500014_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-what-were-the-reasons-behind-babasaheb-ambedkar-accepting-buddhism-122100500014_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/thumb/1_1/1618034850-3322.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/thumb/1_1/1618034850-3322.jpeg</image>
      <description><![CDATA[रोहन नामजोशी

14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात.

हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	रोहन नामजोशी</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar quotes" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/full/1618034850-3322.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar jayanti quotes" width="740" /></p>
</p>
<p>
	14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	14 ऑक्टोबर 1956 या दिवशी दीक्षाभूमीवर नेमकं काय झालं होतं, त्या दिवशीचा घटनाक्रम, इतिहास आणि परिणाम आणि मुळात बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला या गोष्टी या लेखातून समजून घेऊ या...</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचीच दीक्षा का घेतली?</p>
<p>
	बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पट खूप मोठा आहे. ते वकील होते, विद्वान होते, सामाजिक चळवळीत अग्रेसर होते. मात्र त्यांच्या कार्याचा लसावि काढायचा झाल्यास दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं, त्यांचा आत्मसन्मान वाढवणं आणि आत्मोद्धार करण्यास समर्थ करणं ही त्यांच्या आयुष्याचे मुख्य कार्य होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करणे, हिंदू धर्माची मानहानी आणि अवनती रोखणे आंबेडकरांना अपेक्षित होते. &#39;मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही&#39; अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती. Anhilation of caste या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवर त्यांनी आसूड ओढले होते. शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार 14 ऑक्टोबर 1956 रोजी केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	मात्र हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत असताना आयुष्याच्या अगदी शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या रुपा कुलकर्णी बोधी म्हणतात, "त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस.एम जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	अनेक वर्तमानपत्रं केली. त्यातून सवर्ण समाजाचं प्रबोधन केलं. ती वापरत असताना सद्हेतुने कान उघडणी केली. 1942 पासून तर ते राजकारणातही होते. घटनाही लिहिली. घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते. तरीही त्यांचं समाधान झालं नाही. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला."</p>
<p>
	 </p>
<p>
	मे 1956 मध्ये बीबीसीने आंबेडकरांचे एक भाषण प्रसिद्ध केलं. भाषणाचा विषय होता मला बौद्ध धर्म का आवडतो? या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, "मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात.बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो.तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे."</p>
<p>
	 </p>
<p>
	असा केला बौद्ध धर्माचा स्वीकार</p>
<p>
	1955 सालानंतर त्यांची तब्येत ढासळत चालली होती. कोणत्याच उपचारांचा त्यांना फायदा होईना. त्याच काळात बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचे कामही सुरू होते. आपण हयात असतांनाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं अशी त्यांची इच्छा होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	24 मे 1956 ला आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली. बाबासाहेबांची प्रकृती खंगतच चालली होती. आपल्या समाजाच्या लोकांसाठी आपण काहीच करू शकलो नाही अशी बोच त्यांना लागली होती. राहिलेल्या अनेक गोष्टी त्यांना करायच्या होत्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	दीक्षासमारंभ कुठे करायचा यावर चर्चा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं. बुद्धधर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे त्यामुळे बौद्ध धर्माचं चक्र गतिमान कऱण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली. जर सर्व भक्तांनी धर्मांतर केलं नाही तर कसं ही भीती एकाने व्यक्त केली तेव्हा आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही ज्यांना माझ्याबरोबर धर्मातर करायचं आहे त्यांनी ते करावं असं बाबासाहेब म्हणाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	23 सप्टेंबर 1956 ला त्यांनी एक पत्रक काढलं आणि 14 ऑक्टोबर 1956 ला आपण धर्मांतर करत असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी तेव्हाचे सर्वात वयोवृद्ध भिक्खु महास्थविर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आलं. आंबेडकर आणि त्यांची पत्नी 11 ऑक्टोबरला नागपुरात आले. बाबासाहेब नागपूरला आल्याचे कळताच अस्पृश्य वर्गाचे अनेक लोक आठवडाभरापासून नागपुरात येऊ लागले. अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी केले, &#39;बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार&#39; अशा घोषणा नागपुरात दुमदुमल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	......आणि तो दिवस उजाडला</p>
<p>
	14 ऑक्टोबर ला सकाळी प्रात;काळी उठले. कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून डॉ.आंबेडकर सकाळी श्याम हॉटेलमधून दीक्षाभूमीवर यायला निघाले. तिथे पोहोचताच प्रचंड जनसमुदायाने त्यांचं स्वागत केलं. जेव्हा ते व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाटाने आसंमत निनादून गेला.</p>
<p>
	 </p>
<p>
	व्यासपीठावरच्या एका टेबलावर बुद्धाची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती. त्याच्या बाजूंना दोन वाघ होते. व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते. समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली. नंतर चार भिक्षू आंबेडकर आणि त्यांची पत्नी त्यांना &#39;बुद्धं शरणं गच्छमि&#39;, &#39;संघं शरणं गच्छमि&#39; हे मंत्र म्हणवून घेतले.</p>
<p>
	 </p>
<p>
	जीवहत्या, चोरी, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहण्याविषयीची पंचशीले म्हणवून घेत असताना तीन लाखांचा समूह तो सोहळा तन्मयतेने पाहत होता. आंबेडकर शपथ घेताना बुद्धाच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने नतमस्तक झाले. भगवान बुद्धाच्या चरणी मस्तक ठेवून तीन वेळा वंदन केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	बुद्धमूर्तीला कमलांचा पुष्पहार वाहिला. हे झाल्यावर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्याबरोबर &#39;बाबासाहेब आंबेडकर की जय&#39;, &#39;भगवान बुद्ध की जय&#39; असा जयजयकार करण्यात आला आणि विजयादशमीच्या मुहुर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की, "मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेला नाही, मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन.</p>
<p>
	 </p>
<p>
	बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन" त्यानंतर ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं रहावं असं आव्हान त्यांनी जनसमुदायाला केलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	जनतेचा तो समुदाय उभा राहिला. त्यांना पाच शपथा, पंचशील आणि बावीस शपथा म्हणावयास सांगितल्या. त्यादिवशी जवळजवळ तीन लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या कृतीचा परिणाम.</p>
<p>
	दलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं. आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मात्र त्यानंतर अगदी 50 दिवसात त्यांचा मृत्यू झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या या कृतीचा बौद्ध धर्मावर झालेल्या परिणामाविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही. 14 ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मात्र त्यात आंबेडकरांना सहभागी होता आलं नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचं आचरण करण्यात येतं पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. ज्या पद्धतशीर पद्धतीने व्हायला हवं होतं ते झालं नाही हे मान्य करावं लागेल."</p>
<p>
	 </p>
<p>
	1935 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्ष कृती करायला त्यांनां 21 वर्षं जावी लागली. या काळात त्यांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांच्या या कृतीची आठवण म्हणून अजुनही दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. दीक्षाभूमी हे नागपुरातील आणि भारतातील एक महत्त्वाचं स्थळ आहे. हजारो वर्षाच्या दडपशाहीविरुद्ध केलेल्या एल्गाराचे ते प्रतीक आहे. आज 65 वर्षानंतरही बाबासाहेबांची कृती अनेकांना प्रेरणा देते आणि देत राहील.</p>
<p>
	 </p>
<p>
	संदर्भ:</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ.बाबासाहेब आंबेडकर- धनंजय कीर</p>
<p>
	बाबासाहेबांची भाषणं आणि लेखन- भाग.1</p>
<p>
	Annihilation of caste- Dr. Babasaheb Ambedkar.<br />
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 06 Dec 2023 08:07:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 06 Dec 2023 08:55:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/india-first-labor-minister-dr-babasaheb-ambedkar-123072600022_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/india-first-labor-minister-dr-babasaheb-ambedkar-123072600022_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/thumb/1_1/1681291226-1829.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/thumb/1_1/1681291226-1829.jpg</image>
      <description><![CDATA[बाबासाहेब परेलमध्ये 10 वर्ष मुंबईचे विकास विभागाच्या चाळीत राहिले. ही चाळ कापड मिळ यात कार्य करणारे तसेच सर्वात खालील वर्गाच्या लोकांसाठी होती. हा अनुभव कदाचित भारताच्या कामगार चळवळीसाठी सर्वात मोठी देणगी होता.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="babasaheb ambedkar" class="imgCont" height="580" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/full/1681291226-1829.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="720" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:720px;">
			R S</p>
	</p>
	बाबा साहेब आंबेडकर हे केवळ महान दलित प्रतीक आणि स्वातंत्र्य भारताचे नायकच नव्हते तर त्यांनी देशातील कामगार चळवळीतही मोठे योगदान दिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब परेलमध्ये 10 वर्ष मुंबईचे विकास विभागाच्या चाळीत राहिले. ही चाळ कापड मिळ यात कार्य करणारे तसेच सर्वात खालील वर्गाच्या लोकांसाठी होती. हा अनुभव कदाचित भारताच्या कामगार चळवळीसाठी सर्वात मोठी देणगी होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	1936 मध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष [इंडिपेंडेंट लेबर पार्टी (ILP)] ची स्थापना केली, ज्याचा उद्देश्य श्रमिक लोकांच्या हक्कांसाठी कार्य करणे होता.  &#39;ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत&#39; असे त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते,</p>
<p>
	 </p>
<p>
	1937 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष मुंबईच्या प्रांतीय निवडणुकात उभे राहिले आणि 17 पैकी 15 जागा जिंकून सर्वांना आश्चर्यात टाकले. ह्या निवडणुकांमध्ये यशस्वी झाल्यानंतर त्यांनी एक मोठं पाऊल घेतला. बाबासाहेबांनी विधानसभेत खोटी व्यवस्था, ज्यामध्ये ते भाडेकरकडून महसूल गोळा करायचे, ह्या व्यवस्थेविरुद्ध विधेयक मांडण्याची भूमिका पुढे ठेवली. 27 नोव्हेंबर 1942 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या 7 व्या अधिवेशनात त्यांनी कामाच्या तासांची संख्या 14 तासांवरून 8 तास करण्याची घोषणा केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	15 सप्टेंबर 1938 च्या ट्रेड डिस्प्युट बिलाच्या संदर्भात कौन्सिलमध्ये डॉ. आंबेडकरांनी कामगाराचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला. याच पार्श्वभूमीवर 7 नोव्हेंबर 1938 ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्धार केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांचे कामगार मंत्रालयाचे पद सांभाळायचं हे कार्य त्या महत्त्वपूर्ण वेळी आले जेव्हा युद्ध अर्थव्यवस्थेने उद्योगाच्या विस्ताराची मागणी होती. औद्योगिक विवादांचे प्रभावी व्यवस्थापन आवश्यक होते. त्यांच्या बुद्धिमतेने केलेले कार्यांचे भांडवलदार आणि कामगार दोघांनी कौतुक केले. ह्याप्रकारे ते एकादृष्टीने पहिले कामगार मंत्री झाले !</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Jul 2023 12:28:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 26 Jul 2023 12:31:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) संस्था काय काम करते ?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-research-and-training-institute-barti-123041400018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-research-and-training-institute-barti-123041400018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/20/thumb/1_1/1637424023-7188.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/20/thumb/1_1/1637424023-7188.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) संस्था काय काम करते ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) संस्था काय काम करते ?</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="barti" class="imgCont" height="500" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/20/full/1637424023-7188.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याचवेळी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. असे वृत्त प्रसारित झाले आहे तीमुळे आता बार्टी हि संस्था चर्चेत आली आहे जाणून घेऊ की हि संस्था काय काम करते.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना शासननिर्णय क्र. युटीए - १०७८/डी-२५ दिनांक २२ डिसेंबर १९७८ अन्वये मुंबई इथे करण्यात आली. या विचारपीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था करण्यात आले. हि संस्था मुंबईहून सन १९८७ पुणे इथे स्थलांतरित करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर २००८ रोजी शासनाने या संस्थेला स्वायत्तेचा दर्जा प्रदान करण्यात आले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	संस्थेचे कार्य</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समानतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या संबंधाने संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, सामाजिक न्याय व समता या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुल्यांवर काम करते. संस्थेत अनुसूचित जातीसाठी अनेक प्रकल्प राबविले जातात त्यात कौशल्य विकास, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, समतादूत, युवा नेतृत्व, संशोधन, ग्रंथालय स्पर्धा परीक्षाची संधी आणि व्यावसायिक प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्र आणि त्याचे स्कॅनिंग आणि डिजिटाइझशन असे विविध प्रकल्प आहेत.या प्रकल्पांच्या माध्यमातून बार्टी संस्था अनुसूचित जातीच्या युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवणे याचे काम करते. बार्टी पुणे या संस्थेने अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवती व युवकांना कौशल्य पुर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोगारक्षम बनवले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	सामाजिक न्याय व समता या मुल्यांसाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांची स्वायंत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी), ही कटिबद्ध आहे.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="barti" class="imgCont" height="224" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/full/1681462153-4611.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="400" /></p>
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:400px;">
			R S</p>
	</p>
</p>
<p>
	विभागाची माहिती</p>
<p>
	संशोधन विभाग</p>
<p>
	उद्देश :- सामाजिक न्याय व समतेच्या दृष्टीने विविध विषयांचे व जातीसंदर्भातील माहिती संकलन, विश्लेषण व अहवाल तयार करून प्रसिद्ध करण्याचे कार्य संशोधन विभागामार्फत केले जाते. समता, सामाजिक न्याय, जातीय दुर्भावनांचे उच्चाटन, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, नैतिक मुल्ये, राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, महिलांसंदर्भातील विषय, भेदभावाचे उच्चाटन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील विविध पैलू, भारतातील विविध थोर समाज सुधारक जसे जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज वगैरे अशा विविध विषयांवर संशोधनाच्या माध्यमातून अभ्यास करून शासनाच्या धोरणात्मक पातळीवर शिफारसीसह अहवाल सादर करणे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी राज्य शासनास सादर करण्यात आलेले प्रकल्प</p>
<p>
	महाराष्ट्र राज्यातील धोबी समाजाचा अस्पृश्यतेसंबंधी सामाजिक स्थितीचा अभ्यास. (1996)</p>
<p>
	विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या संदर्भात इदाते अहवाल (1999)</p>
<p>
	हिंदू खाटिक समाजाची सद्यस्थिती.</p>
<p>
	सफाई कर्मचाऱ्यांचा वास्तववादी विश्लेषणात्मक अभ्यास</p>
<p>
	पुणे जिल्ह्यातील मांग गारुडी समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण</p>
<p>
	मादिगा समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण</p>
<p>
	कैकाडी समाजाचे क्षेत्रबंधन उठवून विमुक्त जातीतील कैकाडी समाजाचा समावेश अनुसूचित जाती मध्ये करण्याबाबत.</p>
<p>
	होलार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सद्यस्थिती.</p>
<p>
	गोसावी समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण</p>
<p>
	 </p>
<p>
	पूर्ण झालेले प्रकल्प</p>
<p>
	50% पेक्षा जास्त अनु जातींची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमधील सोयी सुविधांचे सर्वेक्षण.</p>
<p>
	 </p>
<p>
	संशोधन एकत्रीकरण प्रकल्प – 1 प्रकल्प पूर्ण - Educational and Socio-economic status of Gatai Charmkars in Aurangabad and Nashik.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान अर्थशास्त्रज्ञ – 3 प्रकल्प पूर्ण 1. Dr, B.R. Ambedkar Economic Thoughts to the Agrarian Distress and Farmer Suicide in Maharashtra 2. Collective Farming and contemporary challenge 3. Economic thoughts of Dr. Babasaheb Ambedkar and its Relevance in the world economic Context.</p>
<p>
	 </p>
<p>
	पारधी अहवाल : टाटा समाज सेवा संस्था यांच्यामार्फत सदर अहवाल पूर्ण करण्यात आला आहे.</p>
<p>
	सद्यस्थितीमध्ये सुरु असलेले प्रकल्प</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींच्या सामाजिक, आर्थिक शैक्षणिक विकासाबाबत बेंचमार्क सर्वेक्षण</p>
<p>
	बंगाली नमोक्षुद्र समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण</p>
<p>
	मेहतर – वाल्मिकी समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अभ्यास</p>
<p>
	वडार समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अभ्यास</p>
<p>
	रहाटेनगर नागपूर येथील मांग गारुडी समाजाचे सामाजिक, आर्थिक शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण</p>
<p>
	आंतरजातीय विवाह विषयक कृती संशोधन</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="barti" class="imgCont" height="302" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/full/1681462196-4443.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:653px;">
			R S</p>
	</p>
</p>
<p>
	संशोधन अहवाल</p>
<p>
	होलार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सद्यस्थिती (Click Here to download)</p>
<p>
	गोसावी समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण (Click Here to download)</p>
<p>
	50% पेक्षा जास्त अनु जातींची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमधील सोयी सुविधांचे सर्वेक्षण (Click Here to download)</p>
<p>
	महाराष्ट्र राज्यातील धोबी समाजाचा अस्पृश्यतेसंबंधी सामाजिक स्थितीचा अभ्यास. (1996) (Click Here to download)</p>
<p>
	हिंदू खाटिक समाजाची सद्यस्थिती (Click Here to download)</p>
<p>
	पुणे जिल्ह्यातील मांग गारुडी समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण (Click Here to download)</p>
<p>
	मादिगा समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण (Click Here to download)</p>
<p>
	कैकाडी समाजाचे क्षेत्रबंधन उठवून विमुक्त जातीतील कैकाडी समाजाचा समावेश अनुसूचित जाती मध्ये करण्याबाबत (Click Here to download)</p>
<p>
	खालील पैकी विविध प्रशिक्षण कार्यक्रम विभागाच्या विचाराधीन आहेत::</p>
<p>
	 </p>
<p>
	मूल्यमापन शाखा</p>
<p>
	शाखेची माहिती -</p>
<p>
	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय दुर्बल घटकांसाठी विशेष घटक योजनेंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात.</p>
<p>
	दि.07/12/2012 रोजीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत विषय क्रमांक 6 मान्य झाल्यानुसार त्यापैकी काही महत्वाच्या योजनांचे मूल्यमापन या संस्थेमार्फत करण्यात येते. या योजनांचा मूल्यमापन अहवाल शासनास धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त होतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	मूल्यमापनाची उद्दिष्टे</p>
<p>
	योजना /कार्यक्रमाचे मुख्य उद्देश कितपत  साध्य झाले आहेत ते पाहणे.</p>
<p>
	योजनेचे लाभार्थी लक्ष गटातील आहे का ते पाहणे.</p>
<p>
	योजनेअंतर्गत जे सहाय्य दिले जाते ते पुरेसे आहे का ते पाहणे.</p>
<p>
	योजना राबविल्यामुळे अपेक्षित परिणाम  झाला आहे का ते पाहणे.</p>
<p>
	योजना अंमलबजावणीमधील दोष, उणिवा, त्रुटी शोधणे व त्यावरील सुधारणा सुचविणे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मूल्यमापनाची कार्यपद्धती</p>
<p>
	योजनेविषयीची प्राथमिक माहिती (Primary Data Collection) सर्व जिल्हयांकडून प्राप्त करून घेतली जाते.</p>
<p>
	नमुना निवड करणे (Sampling) :- प्राथमिक माहितीच्या आधारे लाभार्थी निवड केली जाते.</p>
<p>
	प्रपत्र (Questionnaire) तयार करणे :- योजनेच्या / मूल्यमापनाच्या उद्दष्टिनुसार प्रपत्र तयार करण्यात येते.</p>
<p>
	पथदर्शी सर्वेक्षण (Pilot Survay) :- तयार केलेल्या प्रपत्रातील माहितीची चाचणी घेतली जाते.</p>
<p>
	प्रपत्र अंतिम करणे :- पथदर्शी सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सुचनेनुसार प्रपत्र अंतिम करण्यात येते.</p>
<p>
	अंतिम प्रपत्रामध्ये माहितीचे संकलन :- निवडलेल्या योजना/ लाभार्थी /संस्था यांची क्षेत्रीय पाहणी करून माहिती संकलित केली जाते.</p>
<p>
	माहिती नोंदणी :- प्रपत्रातील माहितीला संकेतांक देऊन माहितीची नोंदणी संगणकावर करण्यात येते.</p>
<p>
	माहितीचे पृथ्थ‍:करण :- नोंदविलेल्या माहितीचे पृथ्थ‍:करण व तक्तीकरण करण्यात येते.</p>
<p>
	अहवाल लेखन :- पृथ्थ:करण व तक्तीकरणाच्या आधारे अहवाल लेखन करण्यात येते आणि सदर अंतिम अहवाल मा. महासंचालक बार्टी, पुणे यांच्या मंजूरीस सादर करण्यात येतो.</p>
<p>
	मा. महासंचालक यांचे मान्यतेनंतर मूल्यमापन अहवाल शासनास व मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय यांना सादर करण्यात येतो.</p>
<p>
	मुल्यमापन कक्षामार्फत पूर्ण झालेले मूल्यमापन अहवाल</p>
<p>
	रमाई घरकुल योजना (ग्रामीण विभाग)</p>
<p>
	सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना</p>
<p>
	अनुसूचित जातीच्या 50 मुला-मुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना</p>
<p>
	राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना</p>
<p>
	अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य योजना</p>
<p>
	कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना</p>
<p>
	स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय अनुदानित वस्तीगृहांना सहाय्य अनुदान योजना</p>
<p>
	अनुसचित जाती व नवबौध्द घटकांतील उमेदवारांना मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना</p>
<p>
	विजाभज, इमाव व विमाप्र घटकांतील उमेदवारांना मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना</p>
<p>
	अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना</p>
<p>
	आश्रमशाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान योजना</p>
<p>
	गटई कारागीरांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजना</p>
<p>
	आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना</p>
<p>
	 </p>
<p>
	मुल्यमापन सुरू असलेल्या योजना</p>
<p>
	अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना</p>
<p>
	रमाई आवास योजना</p>
<p>
	कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेबाबत जिल्हानिहाय माहिती संकलन करून धोरणात्मक अहवाल सादर करणे</p>
<p>
	औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्याना विद्यावेतन योजना</p>
<p>
	बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करणे. (अधिछात्रवृत्ती योजना BANRF)</p>
<p>
	ऊसतोड कामगारांना आधुनिक उपकरणे उपलब्ध होणेबाबत</p>
<p>
	 </p>
<p>
	भविष्यात मुल्यमापनासाठीच्या योजना</p>
<p>
	शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना</p>
<p>
	बार्टीच्या योजनांचे मूल्यमापन करणे</p>
<p>
	विशेष घटक योजनेअंतर्गत कृषी खात्याच्या योजना</p>
<p>
	इतर विभागाच्या योजनांचे मुल्यमापन करणे</p>
<p>
	शासकीय अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण संस्था</p>
<p>
	About Projects संस्थेमार्फत खालील प्रकारचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केले जातात.</p>
<p>
	 </p>
<p>
	पायाभुत प्रशिक्षण कार्यशाळा</p>
<p>
	उजळणी प्रशिक्षण</p>
<p>
	नविन विषयाची ओळख प्रशिक्षण</p>
<p>
	पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण</p>
<p>
	तांत्रिक प्रशिक्षण</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="barti" class="imgCont" height="302" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/full/1681462237-7675.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:653px;">
			R S</p>
	</p>
</p>
<p>
	Project 1</p>
<p>
	मा. आयुक्त, समाज कल्याण यांच्या आस्थापनेवरी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमतावृध्दीसाठी आवश्यक्तेनूसार पायाभूत, उजळणी, पदोन्नतीनंतर प्रशिक्षण कार्यशाळा.</p>
<p>
	Project 2</p>
<p>
	अपंग कल्याण, आयुक्तालय व विजाभज कल्याण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमतावृध्दीसाठी आवश्यक्तेनूसार पायाभूत, उजळणी, पदोन्नतीनंतर प्रशिक्षण कार्यशाळा.</p>
<p>
	Project 3</p>
<p>
	ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका व महानगरपालिकेतील मागासवर्गीय लोकप्रतिनिधींना सामाजिक न्याय विभागातील विविध योजनांच्या महितीकरीता प्रशिक्षण देणे.</p>
<p>
	Project 4</p>
<p>
	जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.</p>
<p>
	 </p>
<p>
	Achievements</p>
<p>
	सन 2012-13 ते 2011-22 पर्यंत एकुण 145 उजळणी व पायाभूत कार्यशाळा घेण्यात आल्या असून, 6,828 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामध्ये समाज कल्याण, अपंग कल्याण व विजाभज कल्याण संचालनालयाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक गृहपाल, समाजकल्याण निरिक्षक, सहाय्यक शिक्षक व मुख्याध्यापक तसेच मतीमंद बालगृह कर्मचारी, शिपाई यांचा समावेश आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग विभाग जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग</p>
<p>
	विभागाची माहिती</p>
<p>
	महाराष्ट्र अधिनियम क्र.XXIII व्या अंतर्गत  २००१ आणि २०१२ अन्वये सर्व जातीचे प्रमाणपत्र छाननी करणे , समित्यांवर देखरेख ठेवणे  आणि समन्वय साधणे, यासाठी  BARTI ने २९.०८.२०१२ च्या जी.आर.नुसार  महासंचालकाची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. तो समित्यांच्या कामाचा आढावा घेणे,</p>
<p>
	आर्थिक  सहाय्यकाची तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविणे ,सदस्यांसाठी कार्यशाळा व  प्रशिक्षण व्यवस्था करणे ,सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना जातीचे प्रमाणपत्र देणे ही कामे&#39;करतो.<br />
	Edited by : Ratnadeep Ranshoor</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 14 Apr 2023 14:13:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Apr 2023 14:23:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे 'बाबासाहेब' कसे बनले?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/how-did-dr-bhimrao-ramji-ambedkar-become-babasaheb-123041400007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/how-did-dr-bhimrao-ramji-ambedkar-become-babasaheb-123041400007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/thumb/1_1/1681444035-9298.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/thumb/1_1/1681444035-9298.jpg</image>
      <description><![CDATA[आज (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर, डॉक्टर अशा मानाच्या पदव्या त्या काळात मिळाल्या होत्या. पुढे ते नेते झाले, मंत्री झाले त्यामुळे सर्वजण त्यांना साहेब किंवा डॉक्टरसाहेब असं म्हणत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	 </p>
<p>
	तुषार कुलकर्णी</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="dr ambedkar" class="imgCont" height="443" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/14/full/1681444035-9298.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	</p>
</p>
<p>
	आज (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर, डॉक्टर अशा मानाच्या पदव्या त्या काळात मिळाल्या होत्या. पुढे ते नेते झाले, मंत्री झाले त्यामुळे सर्वजण त्यांना साहेब किंवा डॉक्टरसाहेब असं म्हणत.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले म्हणून त्यांना &#39;बोधिसत्व&#39; देखील म्हटलं गेलं, त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न देखील देण्यात आला. इतक्या सर्व पदव्या आणि बहुमान आहेत पण देशातील कोट्यवधी लोकांसाठी ते &#39;बाबासाहेब&#39; आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	ही पदवी नाही की कोणते पद नाही पण कोट्यवधी जनतेनी प्रेमाने दिलेली हाक म्हणजेच बाबासाहेब हे कुणी नाकारू शकणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर त्यांचं कोणतं रूप सर्वांत आधी डोळ्यासमोर येतं. भारतातील वंचित समाजातील कोट्यवधी लोकांच्या मुक्तीची मार्ग दाखवणारा महामानव हे त्यांचं एक रूप आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार हे एक त्यांचे रूप आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	अर्थशास्त्रज्ञ, मानवंशशास्त्रज्ञ, कायदेपंडित, प्राध्यापक, प्राचार्य, मूकनायक, जनता-बहिष्कृत भारत सारख्या नियतकालिकांचे संपादक, ही देखील त्यांची रूपं आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	अशा विविध रूपांत त्यांचे आपल्याला दर्शन झाले आहे. पण त्यांचे अजून एक रूप आहे आणि ते सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ते रूप म्हणजे सर्वांच्या आदरस्थानी असलेलं त्यांचं &#39;बाबासाहेब&#39; हे रूप.</p>
<p>
	 </p>
<p>
	देशातील कोट्यवधी जनता त्यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना &#39;बाबासाहेब&#39; याच नावाने ओळखते. बाबासाहेब हयात असताना त्यांना त्यांचे सहकारी &#39;डॉक्टरसाहेब&#39; किंवा &#39;बॅरिस्टर साहेब&#39; असं म्हणत. पण सर्वांसाठी ते साहेब किंवा बाबासाहेबच होते. त्यांच्यासमोर जाणारी व्यक्ती त्यांच्या करिष्म्यामुळे भारावून जात असे पण बाबासाहेब सर्वांना समान वागणूक देत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तत्त्व त्यांच्या रोमारोमांत भिनलेले होते. त्यांचा हा साधेपणा, त्यांची जिव्हाळ्याची वागणूक पाहून ते पितृतुल्य आहेत याची जाणीव जनतेच्या मनात रूजू लागली आणि ते कोट्यवधी लोकांचे बाबासाहेब बनले.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांच्याबाबतच्या आठवणी अनेक लोकांनी शब्दबद्ध करून ठेवल्या आहेत. त्यांच्या मनात असलेली करुणा आणि जिव्हाळा लोकांनी कसा टिपला, लोकांना प्रेरित करून ते &#39;बाबासाहेब&#39; कसे बनले या गोष्टीचा शोध या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपल्या पक्षकारांसाठी स्वयंपाक बनवला</p>
<p>
	लंडनमधील ग्रेज इन या कॉलेजमधून वकिलीचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतात परतले.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी वकिलीच करायचे ठरवले. याचे कारण म्हणजे या व्यवसायातून मिळणारी सवड आणि स्वातंत्र्य. आणि वेळेचा उपयोग अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी देण्याचे त्यांनी ठरवले.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी वकिली सुरू केली पण त्यांचे बहुतांश पक्षकार हे वंचित आणि गरीबच असत. त्यामुळे त्यांची कामे बाबासाहेब फुकटच करत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात याविषयी लिहिले आहे की, "आंबेडकरांची वकील म्हणून प्रसिद्धी होताच गोरगरीब आपल्या गाऱ्हाण्यांची दाद लावून घेण्यासाठी बाबासाहेबांचे कार्यालय शोधीत येत. त्या पददलितांचे दुःख आणि दैन्य पाहून त्यांचे हृदय तीळतीळ तुटे. बाबासाहेब त्या गरिबांचे काम बहुधा फुकट करीत. त्याकरिता त्रास सहन करीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	"त्या काळी आंबेडकर हे गरिबांचे आशास्थान, चाहत्यांचे आनंद निधान आणि कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान बनले होते. घरातील मंडळी (रमाई) या बाहेरगावी गेली असता एके दिवशी बाहेरगावाहून दोन गृहस्थ त्यांच्याकडे सल्ल्यासाठी आले. न्यायालयात कामधंद्यासाठी जाण्यापूर्वी त्या दोन्ही गृहस्थांबरोबर त्यांनी न्याहारी केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	"आंबेडकर स्वयंपाकलेत कलेत निपुण. संध्याकाळी घरी लौकर परतून त्यांनी त्या गृहस्थांकरिता आपल्या हाताने स्वयंपाक करून ठेविला. रात्री जेवतेवेळी ती गोष्ट त्या पाहुण्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. जो मनुष्य मितभाषी आहे, ज्याचा स्वभाव गूढ आहे, ज्याचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आणि परिणामकारक आहे अशा थोर पुरुषाने गरिबांसाठी एवढे शारीरिक कष्ट घ्यावे ह्याविषयी त्या गरिबांना धन्यता वाटली.</p>
<p>
	 </p>
<p>
	सायमन कमिशनची साक्ष, तर दुसरीकडे पक्षकारांच्या जीवन मरणाचा प्रश्न</p>
<p>
	आपल्या अशिलांवर अतिप्रसंग ओढावू नये, त्यांची अडचण होऊ नये याची देखील डॉ. आंबेडकर काळजी घेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	ब्रिटिश सरकारसमोर दलित समाजाची स्थिती कशी आहे हे सांगण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सायमन कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी 1928 साली निवड झाली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	या कमिशनसमोर बाबासाहेब दलितांची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाय योजनांचे वर्णन करणार होते. या बैठकीसाठी एक नियोजित वेळ असे आणि त्यात त्यांना संपूर्ण दलित समाजाच्या वतीने बाजू मांडावी लागत असे.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांची यावेळी वकिली देखील सुरू होती. एका महत्त्वाच्या खटल्यासाठी त्यांना ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर आपल्या अशिलांची बाजू मांडायची होती. आणि त्याच वेळी सायमन कमिशनसमोर देखील साक्ष होती. जर बाबासाहेब त्या खटल्यासाठी उपस्थित राहिले नसते तर कदाचित त्या अशिलांपैकी काहींवर फासावर जाण्याची वेळ आली असती. आणि आपल्या अशिलांच्या ऐनवेळी आपण कामाला आलो नाहीत ही सल देखील त्यांना कायमची राहिली असती.</p>
<p>
	 </p>
<p>
	जर सायमन कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी हजर झालो नाहीत तर देशातील कोट्यवधी लोकांचे दुःख जगासमोर मांडण्याची संधी निघून जाईल या पेचप्रसंगात बाबासाहेब होते. त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली की अशिलांच्या बचावाचे भाषण फिर्यादी पक्षाच्या आधी होऊ द्यावे.</p>
<p>
	 </p>
<p>
	फिर्यादी पक्षाचे भाषण आधी व्हावे असा एक संकेत असतो पण कामाची गरज लक्षात घेऊन बाबासाहेबांनी परवानगी मागितली आणि त्यांना ती देण्यात आले. पक्षकारांची बाजू मांडून मग बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशनसमोर गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	धनंजय कीर बाबासाहेबांच्या चरित्रात म्हणतात की, "बचावासाठी मांडलेल्या मुद्यांची अचूकता नि आपल्या वकिली कौशल्यावरील त्यांचा विश्वास एवढा प्रगाढ होता की, त्या खटल्यातील बहुतेक आरोपी निर्दोषी म्हणून सुटले ह्यात नवल ते कोणते?"</p>
<p>
	 </p>
<p>
	दवाखान्यात उपचार मिळत नाही म्हणून एका भगिनीने बाबासाहेबांचे घर गाठले</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकनेते होते. त्यांच्या घराचे दार सर्वसामान्यासाठी सदैव उघडे असायचे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपल्या संग्रहातील असंख्य ग्रथांना हक्काचे घर मिळावे म्हणून बाबासाहेबांनी मुंबईमध्ये दादर येथे &#39;राजगृह&#39; हे घर बांधले.</p>
<p>
	 </p>
<p>
	वास्तू आणि स्थापत्यशास्त्राविषयी पुस्तकं वाचून त्यांनी आपल्या निवडीप्रमाणे हे घर बांधले. त्यात एका मजल्यावर कुटुंबातील सदस्य असत आणि एका मजल्यावर बाबासाहेब ग्रंथ सानिध्यात असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांचा स्वभाव असा होता की जर आपला कुणी सहकारी थंडीत आहे आणि त्याच्याकडे पुरेसे कपडे नाहीत तर ते स्वतःच्या अंगावरील पांघरूण काढून देत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	याबाबत धनंजय कीर यांच्या पुस्तकात उल्लेख आहे त्यात असं म्हटलं आहे की &#39;भर थंडीच्या रात्री आपले सहकारी बळवंतराव वऱ्हाळे यांना आपले पांघरूण देऊन आपण कडाक्याच्या थंडीत तसेच झोपी गेले.&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	ही तर झाली रोजच्या सहवासातील लोकांची गोष्ट. पण बाबासाहेबांचे घर म्हणजेच राजगृह हे अनेक दीनदुबळ्यांचे हक्काचे घर होते. तिथे लोक रात्री-अपरात्री येऊन बाबासाहेबांकडे गाऱ्हाणी मांडत.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपल्या गाऱ्हाण्यांची बाबासाहेब दखल घेतील हा विश्वास त्यांना होता त्यामुळेच ते त्यांच्याकडे जाऊ शकत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	एकदा एका महिलेनी राजगृहाचे दार रात्री दोन वाजता ठोठावले. तिने बाबासाहेबांना दुःखित हृदयाने सांगितले, माझा नवरा अत्यवस्थ आहे. त्याला गेल्या बारा तासांत प्रयत्न करूनसुद्धा रुग्णालयात प्रवेश मिळू शकला नाही.&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांनी तिला नि तिच्या नवऱ्याला गाडीत घालून तडक रुग्णालयाकडे नेले आणि तिच्या नवऱ्यास प्रवेश मिळवून दिला. पहाट झाली तेथून ते तडक आपले स्नेही आचार्य मो. वा. दोंदे यांच्या घरी गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपल्या घरी बागकाम करणाऱ्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले</p>
<p>
	बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या दिल्लीतील निवासस्थानी एक वृद्ध गृहस्थ बागकाम करत असत. त्यांची प्रकृती बरी नाही असे समजल्यावर ते आणि त्यांचे सहायक नानकचंद रट्टू हे त्यांच्या घरी पोहचले.</p>
<p>
	 </p>
<p>
	ते वृद्ध अंथरुणाला खिळून बसलेले होते. त्यांचं अंग तापेनं फणफणत होतं. शेजारी त्यांची पत्नी बसली होती. आपण गेल्यावर हिचं कसं होणार ही चिंता त्यांना सतावत होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	जेव्हा बाबासाहेब आपल्या घरी आले हे त्यांनी पाहिलं तेव्हा ते गहिवरून गेले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि साक्षात माझ्या भगवानानेच मला भेट दिली आहे असे ते म्हणाले. ते चिंताग्रस्त होते. त्यांचे बाबासाहेबांनी सांत्वन केले आणि भेट घेऊन ते घरी परतले.</p>
<p>
	 </p>
<p>
	विरोधकाला उदार मनाने माफ केलं</p>
<p>
	बाबासाहेबांचे मन किती विशाल होते याची कल्पना या पुढील गोष्टीवरून आपल्याला येऊ शकते.</p>
<p>
	 </p>
<p>
	देशातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायणराव काजरोळकर यांनी बाबासाहेबांचा 15,000 मतांनी पराभव केला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	विरोधक असून देखील नंतरच्या काळात बाबासाहेबांनी त्यांच्याविषयी मनात द्वेष ठेवला नाही उलट त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनच केले असं डॉ. सविता (माई) कुबेर यांनी आपल्या &#39;डॉ. आंबेडकरांच्या सहवासात&#39; या पुस्तकात लिहिले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्या लिहितात, "एकेदिवशी नारायणराव काजरोळकर साहेबांना भेटायला सिद्धार्थ कॉलेजमध्ये (मुंबई) आले. कदाचित त्यांना समोर येण्यात अपराधीपण म्हणा किंवा संकोच वाटत असावा असे मला वाटते. कारण ते संकोचानेच समोर आले. त्यांना पाहताच साहेबांनी त्यांना अत्यंत आपुलीकीने जवळ बोलवले. काजरोळकर आले आणि त्यांनी क्षणार्धात साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं."</p>
<p>
	 </p>
<p>
	"साहेबांनी दोन्ही हातांनी त्यांना उठविले आणि शेजारी बसवून घेतले व निवडून आल्याबद्दल उदार मनाने त्यांचे अभिनंदन केले. आत्मीयतेने चौकशी केली. इतकेच नव्हे तर सांगितले की दिल्लीला नेहमी भेटत राहा, तसेच कसलेही मार्गदर्शन वा मदत लागली तर संकोच करू नका. माझ्या बंगाल्याचे दार आपल्या लोकांसाठी नेहमी उघडे असते.</p>
<p>
	 </p>
<p>
	"त्यानंतर दिल्लीला काजरोळकर आमच्या बंगल्यावर नेहमी येत असत. साहेब त्यांना सर्व प्रकारची सहायता आणि मार्गदर्शन करत असत. काजरोळकरांबद्दल द्वेष किंवा आकस त्यांना चुकूनही कधी त्यांच्या मनात आला नाही. काजरोळकरांकडे प्रतिस्पर्धी म्हणून साहेबांनी कधी पाहिले नाही," अशी आठवण माई आंबेडकरांनी लिहिली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	कार्यकर्त्याला दिल्लीतील पर्यटन स्थळे दाखवली</p>
<p>
	आपल्या कार्यकर्त्यांवर किंवा सहकाऱ्यांवर बाबासाहेबांचे अतोनात प्रेम होते. त्यांना काय हवं नको याकडे ते स्वतः लक्ष तर देतच पण त्या कार्यकर्त्यांसाठी ते वेळ देखील देत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	याबद्दलचा एक किस्सा डॉ. सविता आंबेडकरांच्या डॉ. आंबेडकरांच्या सहवासात या पुस्तकात आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	घनश्याम तळवटकर नावाचे एक कार्यकर्ते काही कामानिमित्त दिल्लीत आले होते. त्यांनी बाबासाहेबांच्या आठवणीवर &#39;परिमल&#39; नावाचे पुस्तक संपादित केले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;हे पाहा याने आपल्या आठवणींचे पुस्तक छापले आहे&#39;, असं सांगत त्यांनी डॉ. सविता आंबेडकरांना ते पुस्तक दाखवले. यानंतर तळवटकर दोन तीन दिवस बाबासाहेबांकडेच राहिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना विचारले की &#39;तू दिल्ली बघितलीस काय?&#39; त्यावर ते नाही म्हणाले. यानंतर बाबासाहेब म्हणाले की &#39;आपण यांना दिल्ली दाखवून आणू.&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	माई आंबेडकर पुढे लिहितात, "त्याप्रमाणे आम्ही तळवटकरांना कुतूबमिनार, लाल किल्ला, बिर्ला मंदिर, पार्लमेंट हाऊस, राष्ट्रपती भवन इत्यादी प्रेक्षणीय स्थळे दाखवली. आम्ही प्रत्येक स्थळाला भेट देऊन येईपर्यंत साहेब आमची वाट पाहात गाडीतच बसून पुस्तक वाचत बसत असत. जेवताना देखील साहेब त्यांची विशेष काळजी घेत आणि आग्रह करून जेवू घालत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला चहा, जेवण वेळच्या वेळी मिळण्याबाबत ते अत्यंत जागरूक असत. इतकेच काय झोपण्याची व्यवस्था देखील ते प्रत्यक्ष पाहत. आपल्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जिवापाड पुत्रवत प्रेम केले, असं माई आंबेडकरांनी म्हटलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या वेळेचा उपयोग अत्यंत जपून करत. ग्रंथवाचन, लिखाण, राजकारण, समाजकारण यातून त्यांना मोकळा वेळ मिळणे अत्यंत दुरापास्त होते. पण त्यातही ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगणे या गोष्टी करत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	वसतीगृहाला भेट दिल्यानंतर तर ते मुलांशी गप्पा तर मारत असत पण कधीकधी क्रिकेटही खेळत असत. देशभरातून त्यांना विद्यार्थी पत्र पाठवत असत आणि त्यांचे मार्गदर्शन घेत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	एका मुलाने बाबासाहेबांना विचारले की &#39;मी माझे शिक्षण पूर्ण करू की नोकरी करू&#39;? जेव्हा पण एखाद्या व्यक्तीसमोर शिक्षण की नोकरी असा पेचप्रसंग उभा राहील त्यावेळी बाबासाहेबांनी दिलेलं हे उत्तर आजही मार्गदर्शक ठरू शकतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांना प्रश्न विचारणाऱ्या त्या मुलाचं नाव होतं तानाजी बाळाजी खरावतेकर.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याने बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं, "प्रिय बाबासाहेब, मी कोकणातला असून शिक्षणासाठी मुंबईत आलेलो आहे मी इंटर सायन्सच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे आणि आता लष्करामध्ये भरती चालू आहे. लष्करात नोकरी करायला गेलो तर माझे आर्थिक प्रश्न सुटतील लवकर नोकरी लागेल आणि पुन्हा अशी भरती कधी होईल हे माहीत नाही."</p>
<p>
	 </p>
<p>
	"मी एका पेचप्रसंगात सापडलेलो आहे की, मी नोकरी करू की शिक्षण घेऊ?" असं पंधरा ओळीचं पत्र त्याने बाबासाहेबांना लिहिलं होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	आता कोणताच चेहरा नसलेल्या या पत्राला किंवा कुठलीच ओळख नसलेल्या या पत्राची सुद्धा दखल बाबासाहेबांनी घेतल्याचं दिसून येतं आणि त्याच्या पत्राला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	"मला 21 तारखेला तुमचे पत्र मिळाले आहे ज्यात तुम्ही तुमच्या करिअरबाबत माझा सल्ला मागितला आहे. माझा सल्ला असा आहे की तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवावा आणि तुमची शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होईपर्यंत नोकरीचा विचार करू नये."</p>
<p>
	 </p>
<p>
	त्या मुलाने बाबासाहेबांचा हा सल्ला मान्य केला. त्यांनी बीएचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि शिकता-शिकताच बाबासाहेबांचे एक छोटेखानी चरित्र लिहिले. इकडून तिकडून निधी गोळा करून त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	1946 मध्ये हे चरित्र प्रसिद्ध झालं ते देखील कराचीत. त्या पुस्तकाचं नाव आहे &#39;डॉक्टर आंबेडकर&#39; मग त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या पुढे निघाल्या. परंतु दुर्दैव असे की हा तरुण लेखक वयाच्या 26 व्या वर्षीच हे जग सोडून गेला.</p>
<p>
	 </p>
<p>
	र. धों. कर्वेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले</p>
<p>
	र. धो. कर्वे हे त्याकाळातील अग्रगण्य समाजसुधारक होते. महिलांचे स्वास्थ आणि लैंगिक शिक्षणाबद्दल ते जागृती करण्याचे काम करत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणे हे भारतात अवघडच होते. या गोष्टींची त्यांना अनेक ठिकाणी किंमत मोजावी लागली.</p>
<p>
	 </p>
<p>
	कर्वेंना पुराणमतवादी, लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत असे. आपल्या &#39;समाजस्वास्थ&#39; या नियतकालिकातून ते अश्लीलतेचा प्रसार करत आहे असा दावा पुराणमतवाद्यांनी केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	इतके करून ते थांबले नाही तर र. धों. कर्वे यांच्याविरोधात त्यांनी एक खटला देखील भरला.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांचे वकीलपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले होते. या खटल्यावेळी त्यांनी केलेला युक्तिवाद हा काळाच्या किती पलीकडचा होता याची खात्री पटते. पण त्याचवेळी एका समाजसुधारकाला जेव्हा अनेकांनी एकटं पाडलं आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे आहोत हा विश्वास देखील त्यांनी दिला.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;समाजस्वास्थ&#39; या नियतकालिकामध्ये अनेक लोक आपल्या समस्यांविषयी किंवा त्यांना पडलेल्या प्रश्नांविषयी माहिती विचारत असत. त्यावर नियतकालिकात शास्त्रशुद्ध रीतीने उत्तरे दिली जात. याच प्रश्नांवर आक्षेप घेत त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	1934 साली झालेल्या खटल्यात बाबासाहेबांनी कर्व्यांची बाजू मांडली होती. नियतकालिकातील माहिती अश्लील स्वरूपाची आहे आणि विकृत आहे यावर तुमचे मत काय असा प्रश्न न्यायालयाने त्यांना विचारला.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की &#39;लैंगिक समस्यांविषयी कुणी जरी लिहिलं तर त्याला अश्लील समजू नये.&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	पुढे ते म्हणाले की &#39;जर लोकांनी त्यांच्या मनातील प्रश्न विचारले आणि त्याला जर विकृत समजण्यात येत असेल तर ज्ञानानेच विकृती दूर होऊ शकते. नाही तर ती कशी जाईल? त्यामुळे प्रश्नाला कर्व्यांनी उत्तर देणे हे क्रमप्राप्तच आहे.&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	हा खटला बाबासाहेब हरले पण एका त्यांनी आपले काळाच्या पलीकडील विचार आणि एका समाजसुधारकाला दिलेली साथ यामुळे तो हा खटला हरुन देखील जिंकले होते असं म्हटलं जातं.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकर हे बाबासाहेब कसे बनले?</p>
<p>
	डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे उच्चशिक्षण घेऊन भारतात परतले आणि अस्पृश्य-दीनदुबळ्यांसाठी त्यांनी लढा देण्यास सुरुवात केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या पितृतुल्य व्यक्तिमत्त्वामुळे ते बाबासाहेब बनले, पण ही प्रक्रिया नेमकी कशी झाली याबाबत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे सांगतात की "डॉ. आंबेडकर हे बाबासाहेब बनले ही प्रक्रिया अत्यंत उत्स्फूर्त आणि जैविक आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	"कुणी त्यांना ठरवून म्हटलं नाही की हे बाबासाहेब आहेत किंवा त्यांना बाबासाहेब म्हणण्यासाठी कुठलाही सत्कार समारंभ किंवा कार्यक्रम झाला नाही. लोकांना त्यांच्या मोठेपणाची, त्यांच्या आपुलकीची जाणीव झाली आणि त्यातून लोक उत्स्फूर्तपणे त्यांना बाबा किंवा बाबासाहेब म्हणू लागले.</p>
<p>
	 </p>
<p>
	"बाबा या शब्दाचा जर या संदर्भातील व्यापक अर्थ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की केवळ वडीलच किंवा वडिलांच्या स्थानी इतका ते मर्यादित नाही. काही जणांसाठी बाबासाहेब हे आई पण आहेत. कित्येक ठिकाणी त्यांना भिमाई म्हटलं आहे, निळाई म्हटलं आहे. बाबासाहेब हे या सर्व लोकांसाठी आई-वडील, मार्गदर्शक, मित्र, सहकारी सर्वकाही आहे. त्याचेच रूप हे बाबा या शब्दांत ते पाहतात," असं उत्तम कांबळे सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी घडलेला एक प्रसंग उत्तम कांबळे सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	ते म्हणतात, की "बाबासाहेबांच्या विरोधकांनी अशी अफवा पसरवली की दलितांच्या राजांचा म्हणजेच डॉ. आंबेडकरांचा मृत्यू झाला. हे ऐकून एक महिला रडू लागली. काही केल्या त्या महिलेचे रडणे थांबेना, शेवटी त्या महिलेला बाबासाहेबांच्या समोरच उभे करण्यात आले. त्यांना पाहून ती महिला रडता-रडता हसू लागली. इतकं प्रेम आणि जिव्हाळा हा बाबासाहेबांविषयी त्यांच्या अनुयायांमध्ये होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	पुढे कांबळे सांगतात की, "या सत्याग्रहावेळी त्यांनी महिलांना उद्देशून भाषण केले आणि ते ऐतिहासिक ठरले. भारतात महात्मा गांधी यांच्यानंतर कुणाच्या आंदोलनात इतक्या मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	"डॉ. आंबेडकरांनी महिलांना अनेक गोष्टी सांगितल्या. शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणात त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगितलं. स्वाभिमानाने जगण्यास सांगितलं, अस्वच्छ राहू नका, मृत जनावरांचे मांस खाऊ नका, दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला वाढू नका. याचा परिणाम हा झाला की ते लोकगीतांचे नायक बनले.</p>
<p>
	 </p>
<p>
	"या सत्याग्रहानंतर महिलांनी त्यांच्यावर अनेक गाणी रचली आणि त्यात ते त्यांचे बाबा बनले. समाज माणूस घडवतो तसं माणूस सुद्धा समाज घडवतो.बाबासाहेबांच्या बाबतीत ही प्रक्रिया फार लवकर घडली. तत्कालीन समाजाकडे पाहून त्यांनी निर्णय घेतले," उत्तम कांबळे सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	"त्यांच्या डोळ्यासमोर कोट्यवधी अस्पृश्य आणि गोरगरीब लोक होते. त्यांच्या प्रबोधनासाठी, त्यांचे ऐहिक कल्याण व्हावे यासाठी त्यांनी आपले शिक्षणाचे विषय, व्यवसाय निवडले. दुसऱ्या टप्प्यात ते प्रबोधन करू लागले. ही प्रक्रिया अत्यंत तीव्रगतीने झाली आणि त्यात अगदी तरुण वयातच ते एक आदराचे स्थान बनले आणि बाबासाहेब बनले."</p>
<p>
	 </p>
<p>
	"बाबा या शब्दाचा जर या संदर्भातील व्यापक अर्थ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की केवळ वडीलच किंवा वडिलांच्या स्थानी इतका ते मर्यादित नाही. काही जणांसाठी बाबासाहेब हे आई पण आहेत. महान माणसाचं समाजाच्या कणांकणांत वितळून जाणं म्हणजे बाबासाहेब होणं असं मी समजतो."</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांची सर्वसमावेशकता आणि व्यापकता</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यासमोर केवळ दलितांचेच हित होते असे नाही तर सर्वच घटकांच्या उन्नतीचा त्यांनी अत्यंत बारकाईने विचार केला आणि त्यातून ते केवळ दलित समाजाचेच न राहता समाजातील सर्वच घटकांचे आदरस्थान बनले.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याच आदरापोटी आणि प्रेमापोटी त्यांना बाबासाहेब म्हटलं जाऊ लागलं असा विचार निवृत्त न्यायाधीश आणि आंबेडकर चळवळीचे अभ्यासक सुरेश घोरपडे मांडतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांचा किंवा अस्पृश्यांचा विचार केला नाही. म्हणूनच त्यांनी हिंदू कोड बिल आणून सर्व महिलांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला. त्यांच्याविषयी विविध स्तरातील लोकांमध्ये जी आपुलकीची भावना होती त्याचीच अभिव्यक्ती ही बाबासाहेब या शब्दांत दिसते," असं सुरेश घोरपडे सांगतात.<br />
	Published By -Smita Joshi </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 14 Apr 2023 09:13:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Apr 2023 09:18:13 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[माईसाहेब आंबेडकर यांचं बाबासाहेबांच्या निधनानंतर 'कसोटीपर्व' का सुरू झालं?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/why-did-maisaheb-ambedkar-s-test-festival-start-after-babasaheb-s-death-121013000032_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/why-did-maisaheb-ambedkar-s-test-festival-start-after-babasaheb-s-death-121013000032_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-08/26/thumb/1_1/1566820482-3632.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-08/26/thumb/1_1/1566820482-3632.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकर यांचा या आठवड्यात (27 जानेवारी) जन्मदिन]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	नामदेव अंजना<br />
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar" class="imgCont" height="351" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-08/26/full/1566820482-3632.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="624" /></p>
</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकर यांचा या आठवड्यात (27 जानेवारी) जन्मदिन होता. माईंच्या शब्दात सांगायचं तर, बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचं आयुष्य म्हणजे एक &#39;कसोटीपर्व&#39; होतं. बाबासाहेबांना मारल्याचा त्यांच्यावर संशय का व्यक्त करण्यात आला? त्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला? माईंना पुन्हा सार्वजनिक जीवनात यायला कुणी मदत केली? माईसाहेब आंबेडकरांच्या जीवनातले काही महत्त्वाचे प्रसंग टिपणारा हा लेख.</p>
<p>
	 </p>
<p>
	1947 सालातील डिसेंबरचा महिना. भारताला स्वातंत्र्य मिळून चार-साडेचार महिने लोटले होते. भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीची धुरा खांद्यावर घेतलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीतून मुंबईत काही कामानिमित्त आले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबईत आल्यावर बाबासाहेब विलेपार्ले येथील एस. राव या आपल्या उच्चशिक्षित मित्राला नेहमी भेटायला जात असत. इथेच एस. राव यांच्या मुलींची मैत्रीण डॉ. शारदा कबीर बाबासाहेबांना पहिल्यांदा भेटल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	या काळात बाबासाहेब डायबेटीस, न्युरायटीस, संधिवात, रक्तदाब अशा आजारांनी त्रस्त होते. मुंबईतील गिरगाव येथील डॉ. मालवणकर यांच्या क्लिनिकमध्ये ते नियमित तपासणी करत असत. या क्लिनिकमध्ये डॉ. शारदा कबीरही काम करत होत्या. उपचारादरम्यान त्यांची बाबासाहेबांशी विविध विषयांवर चर्चा होत असे. त्यातून ओळखही वाढत गेली.</p>
<p>
	बाबासाहेबांबद्दल शारदा यांना प्रचंड आदर होता. त्यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिलंय, "डॉक्टरसाहेबांच्या सहवासात मला त्यांच्या ऐतिहासिक कार्याची जवळून प्रचिती आली आणि मी अक्षरश: दिपून गेले होते."</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट</p>
<p>
	1947 सालच्या डिसेंबर महिन्यातच बाबासाहेब क्लिनिकमध्ये आले असताना म्हणाले, "माझे लोक व सहकारी मला आग्रह करीत आहेत की सहचारिणी करा, परंतु मला माझ्या आवडीची, योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे. माझ्या कोट्यवधी लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे व जगण्यासाठी माझ्या लोकांच्या आग्रहाचा गंभीरपणे विचार करणे क्रमप्राप्त आहे. अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे मी तुमच्यापासून सुरू करतो."</p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेबांनी &#39;डॉ. आंबेडकरांच्या सहवासात&#39; या आपल्या आत्मकथेत ही आठवण लिहून ठेवली आहे.</p>
<p>
	बाबासाहेबांनी शारदा कबीर यांना लग्नाची मागणी घातली. मात्र त्यांनी सोबत हेही सांगितलं की, आपल्या वयातील फरक आणि माझी प्रकृती यामुळे तू नकार दिलास तरी मला बिलकुल दु:ख होणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	यानंतर शारदा कबीर गोंधळात पडल्या. काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही. त्यांनी वेळ मागून घेतला. तोपर्यंत बाबासाहेब पुन्हा दिल्लीत निघून गेले होते. दरम्यान शारदा यांनी डॉ. मालवणकर यांच्याशी याबाबत चर्चा केली. तसंच स्वतःच्या भावाचाही सल्ला मागितला.</p>
<p>
	 </p>
<p>
	शारदा कबीर यांचे थोरले बंधू म्हणाले, "म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार तर. अजिबात नकार देऊ नकोस. पुढे जा."</p>
<p>
	बाबासाहेबांबद्दल उपचारादरम्यान निर्माण झालेला जिव्हाळा, त्यांच्याबद्दल असलेली काळजी, प्रेम या सर्व गोष्टींचा विचार करता शारदा कबीर यांनी होकार कळवला. 15 एप्रिल 1948 रोजी दिल्लीत 15-20 निमंत्रितांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. शारदा कबीर यांचं लग्न झालं.</p>
<p>
	 </p>
<p>
	शारदा कबीर या कृष्णराव विनायकराव कबीर आणि जानकीबाई कबीर या मूळच्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील दांपत्याच्या पोटची मुलगी. सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील शारदा यांचा जन्म 27 जानेवारी 1912 रोजी झाला. घरात शारदा मिळून एकूण आठ भावंडं.</p>
<p>
	 </p>
<p>
	लग्नानंतर &#39;शारदा कबीर&#39;च्या &#39;सविता आंबेडकर&#39; झाल्या. मात्र, बाबासाहेबांसाठी त्या कायम &#39;शरू&#39;च राहिल्या, तर अनुयायांसाठी &#39;माईसाहेब&#39; बनल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास माईसाहेबांना नऊ वर्षेच लाभला. बाबासाहेबांच्या संघर्षात त्या साथी बनल्या. मात्र बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही त्यांना संघर्ष चुकला नाही. या काळाला माई &#39;कसोटीपर्व&#39; म्हणायच्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	माईंनी त्यांच्या आत्मकथेत लिहिलंय, "डॉ. आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले, त्याचा मी विचार करते तेव्हा, माझ्या डोक्यात असा विचार येतो की, मला वैधव्याच्या वणव्यात जो वनवास भोगावा लागला तसाच अन्याय डॉ. आंबेडकरांच्या हयातीत कोणा स्त्रीच्या नशिबी आला असता तर डॉ. आंबेडकर त्या स्त्रीच्या हक्कासाठी धावून गेले असते आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले असते."</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या निधनानंतर काही दिवसातचं हे &#39;अग्निदिव्य&#39; सुरू झालं. निमित्त ठरलं बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाचं. परिनिर्वाण झालं की घडवलं गेलं, असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केला गेला आणि या प्रश्नाचा रोख होता माईसाहेब आंबेडकरांकडे.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांना मारल्याचा माईंवर आरोप</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झालं. यानंतर बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल काहींनी संशय व्यक्त केला. अनेकांनी तर थेट माई आंबेडकरांवरच आरोप केले. यामुळे माई प्रचंड भीतीच्या वातावरणात जगू लागल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	माई आंबेडकर त्यांच्या आत्मकथेत लिहितात, "संपूर्ण समाजात माझ्याविरुद्ध वातावरण तयार व्हावे म्हणून साहेबांच्या मृत्यूबद्दल जाणूनबुजून संशय निर्माण केला गेला. समाजात माझ्याविरोधात जाणीवपूर्वक विष पेरले गेले."</p>
<p>
	 </p>
<p>
	माईंविरोधातलं वातावरण अत्यंत चिंताजनक आणि भीतिदायक होतं. माईंनी लिहिलंय की त्यांना मारण्यासाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत तीन माणसं पाठवण्यात आली होती. त्या तिघांची नावंही त्यांनी दिली आहेत. पण या तिघांनाही उपरती झाली आणि माई वाचल्या.</p>
<p>
	दलित समाजातील तेव्हाच्या राजकीय नेत्यांना डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूबद्दल संशय वाटत होता. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या भेटी घेतल्या. 19 खासदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्रही दिलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	आधी केंद्र सरकारने आरोपांकडे दुर्लक्ष केलं, मात्र खासदारांनी पत्र दिल्यानंतर चौकशीसाठी दिल्लीचे डेप्युटी इन्स्पेक्टर-जनरल ऑफ पोलीस सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनं मेडिकल बोर्डाच्या निष्कर्षाच्या आधाराने अहवालात म्हटलं, "कुठल्याही तऱ्हेच्या संशयास जागा नसताना असे सिद्ध झालेले आहे की, डॉ. आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झालेला आहे. म्हणून कुठल्याही गैरप्रकाराबद्दल संशय घेण्यास कुठलाही पुरावा उपलब्ध नाही."</p>
<p>
	 </p>
<p>
	या अहवालानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्तच केल्या गेल्या. लोकसभेत 9 डिसेंबर 1957 रोजी खासदार बी. सी. कांबळे यांनी डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशी अहवालाबाबत प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी उत्तर दिलं. पोलिसांचा गुप्त अहवाल जाहीर करणं योग्य होणार नसल्याचं सांगत त्यांनी त्यातील माहिती सभागृहासमोर समोर ठेवली.</p>
<p>
	 </p>
<p>
	"डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूबाबत संशय घेण्यास जागा नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे. या अहवालात डेप्युटी इन्स्पेक्टर-जनरल ऑफ पोलीस यांनी मुंबईचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तिरोडकर आणि डॉ. तुळपुळे यांची साक्षही नोंदवली आहे," असं गोविंद वल्लभ पंत यांनी लोकसभेत सांगितलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	इतकं सारं स्पष्ट झाल्यानंतरही बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल शंका घेतल्या जातच राहिल्या. माईंचं नाव घेऊनही आरोप अधूनमधून होत होते. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक आयुष्यापासून फारकत घेतली.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर आधीच म्हणाले होते, &#39;आपल्यानंतर शरूचे काय होईल?&#39;</p>
<p>
	21 फेब्रुवारी 1948 या तारखेला बाबासाहेबांनी माईंना लिहिलेलं पत्र बोलकं आहे. या दोघांचं लग्न ठरल्यानंतर आणि लग्नाच्या दोन महिन्यांआधी हे लिहिलं होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	या पत्रात बाबासाहेब लिहितात, "एका जीवात्म्याने दुसऱ्या जीवात्म्यास पाहिले, समान शील ओळखले आणि मिठी मारली. ही मिठी कधीतरी सुटेल का? मृत्यूशिवाय ही मिठी कोणी मोडू शकणार नाही, अशी राजाची खात्री आहे. दोघांनाही एकाच काळी मृत्यू यावा, अशी राजाची फार मोठी इच्छा आहे. शरूनंतर राजाचा सांभाळ कोण करणार? म्हणून राजाला आधी मरण यावं असं वाटतं."</p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेबांनी आपल्या आत्मकथेत हे पत्र प्रसिद्ध केलं आहे. या पत्रात बाबासाहेबांनी स्वत:चा &#39;राजा&#39;, तर माईसाहेबांचा &#39;शरू&#39; असा उल्लेख केलेला आढळतो.</p>
<p>
	या पत्रात बाबासाहेब पुढे लिहितात, "दुसऱ्या दृष्टीने राजाच्या मृत्यूनंतर शरूचं काय होईल, या प्रश्नाने राजाच्या मनाला शांतता नाही. सार्वजनिक कार्यास वाहून घेतल्यामुळे राजाने कसलाच द्रव्यसंग्रह केला नाही. पोटापुरता व्यवसाय, या पलीकडे शरूच्या राजाला काही करता आले नाही. शरूच्या राजाला पेन्शन नाही, शरूचा राजा निरोगी असता तर काही विपदा नव्हती, परंतु रोगपीडित असल्यामुळे संशय वाटतो आणि शरूचे काय होईल, याची आठवण झाली म्हणजे मन उद्विग्न होते. भगवान बुद्ध यातून काहीतरी मार्ग काढील, असा शरूच्या राजाला विश्वास वाटतो."</p>
<p>
	माई त्यांच्या आत्मकथेत या पत्राच्या अनुषंगाने लिहितात, &#39;बाबासाहेबांची विवंचना नि भीती किती रास्त होती, याचा दाहक अनुभव मी गेली 30 वर्षे घेतलेला आहे. साहेबांचं द्रष्टेपणही यातून प्रत्ययास येते. माझ्यात काही दोष असता तर बाबासाहेबांनी गांधी-नेहरू यांसारख्यांची कधी गय केली नाही, तर माझी का केली असती काय?&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	उलट परिनिर्वाणाच्या काही तास आधी बाबासाहेबांनी &#39;दि बुद्ध अँड हिज धम्म&#39; ग्रंथाच्या प्रस्तावनेत माझा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला, असंही माई लिहितात.</p>
<p>
	 </p>
<p>
	संपत्तीवरून माईसाहेब आणि भैय्यासाहेबांमध्ये वाद</p>
<p>
	बाबासाहेबांच्या निधनानंतर जसा त्यांच्या मृत्यूवरून वाद झाला, तसा संपत्तीवरूनही झाला. आपल्या मृत्यूनंतर वारसदारांनी कोर्टात जाऊ नये, म्हणून बाबासाहेबांनी मृत्युपत्र तयार केलं होतं आणि ते दिल्लीतून मुंबईला जाऊन मृत्युपत्राची नोंदणी करणार होते, असं माई लिहितात.</p>
<p>
	 </p>
<p>
	मात्र साक्षीदारांच्या सह्या नसल्यानं त्याची अधिकृत नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या मृत्युपत्राच्या सत्यतेबद्दल संशय होता. पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं. एका बाजूला सविता म्हणजे माई आंबेडकर तर दुसऱ्या बाजूला यशवंत म्हणजे भैयासाहेब आंबेडकर. भैयासाहेब हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते - ते बाबासाहेब आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे पुत्र.</p>
<p>
	पण बाबासाहेबांची संपत्ती किती होती? तर मुंबईतील राजगृह, दिल्लीतील लहानसा प्लॉट, तळेगावचा लहानसा प्लॉट आणि त्यावरील दोन खोल्या. माईंनी आत्मकथेत लिहिलं आहे की कोर्टात यशवंत आंबेडकरांनी सांगितलं की, "माझ्या वडिलांचे दुसरे लग्न झालेच नाही आणि मी एकुलता एक मुलगा नि एकमेव वारस आहे, तेव्हा त्यांची सारी इस्टेट मलाच मिळाली पाहिजे."</p>
<p>
	 </p>
<p>
	हे ऐकून न्यायाधीश सी. बी. कपूर अस्वस्थ झाले आणि ते संतापून यशवंत आंबेडकरांना म्हणाले, "Do you want me to believe that Dr. Ambedkar was in habit of keeping mistress? I have worked with Dr. Ambedkar and I have got very high regards for him." (डॉ. आंबेडकरांचे विवाहबाह्य संबंध होते, असं तुम्ही मला सांगत आहात का? मी त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि मला त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे.)</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;डॉ. आंबेडकरांच्या सहवासात&#39; या आत्मकथेत याबद्दल माईसाहेबांनी विस्तृतपणे लिहिलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आधी न्या. सी. बी. कपूर आणि नंतर जेव्हा संपत्तीचं प्रकरण मुंबईतील कोर्टात पाठवण्यात आलं तेव्हा, न्या. कोयाजींनीही आपापसात समेट घडवून आणण्यावर भर दिला आणि संपत्तीचा वाद मिटवला.</p>
<p>
	 </p>
<p>
	यातील न्या. सी. बी. कपूर हे बाबासाहेब केंद्रीय कायदेमंत्री असताना कायदा मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरी होते, तर न्या. कोयाजींचाही आंबेडकरांशी संबंध आला होता. त्यामुळे हे दोघेही आंबेडकरांना मानत होतं. आंबेडकर कुटुंबीयांच्या संपत्तीचा वाद सार्वजनिक होऊ नये, असं मनोमन त्यांना वाटत होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या संपत्तीच्या वादातली यशवंत (भैयासाहेब) आंबेडकर यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांचे पुत्र आनंदराज आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला. आनंदराज आंबेडकर म्हणाले, "बाबासाहेबांचे दोन्ही वारस (माईसाहेब आणि भैय्यासाहेब) आता हयात नाहीत. त्यामुळे आता या प्रकरणावर बोलणे उचित ठरणार नाही."</p>
<p>
	 </p>
<p>
	नेहरूंची ऑफर माईसाहेबांनी नाकारली</p>
<p>
	बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी माईसाहेबांना सरकारी हॉस्पिटलमध्ये &#39;मेडिकल ऑफिसर&#39;ची नोकरी देण्याची, तसंच राज्यसभेवर घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.</p>
<p>
	मात्र माई आंबेडकरांनी नेहरूंनी दिलेल्या या दोन्ही ऑफर्स नाकारल्या.</p>
<p>
	या गोष्टीचा संबंध त्या बाबासाहेबांच्या भूमिकेशी जोडतात. त्यांनी लिहिलंय, "डॉ. साहेबांनी आमच्या लग्नानंतर मला नोकरी सोडायला लावली. त्यांच्यानंतर त्यांच्या इच्छेला तोडणे मला योग्य वाटले नाही. तसंच, राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची मी तयारी दर्शवली असती तर काँग्रेसच्या दावणीला जाण्यासारखे झाले असते आणि डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वाविरुद्ध झाले असते."</p>
<p>
	 </p>
<p>
	पुढे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इंदिरा गांधींनीही राज्यसभेची ऑफर दिली होती, असं माई लिहितात. त्यांनी तेव्हाही नकार दिला.</p>
<p>
	 </p>
<p>
	"ज्या काँग्रेसविरोधात माझे महान पती आयुष्यभर लढले, त्याच काँग्रेसमध्ये त्यांच्या निधनानंतर जाणे माझ्या मनाला पटूच शकत नाही आणि माझ्या पतीच्या तत्त्वांशी मी कधीही प्रतारपण करू शकत नाही," असं त्यांनी आत्मकथेत लिहिलंय.</p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबईत राहताना माईसाहेब ओळख का सांगत नव्हत्या?</p>
<p>
	बाबासाहेबांच्या निधनानंतर माई दिल्लीतच थांबल्या. दिल्ली-हरियाणा सीमेलगत मेहरौली नावाच्या ठिकाणी त्या एकट्या राहत होत्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	माई दिल्लीतून ज्यावेळी मुंबईत स्थायिक व्हायला आल्या, तेव्हा त्या त्यांचे थोरले भाऊ वसंत कबीर यांच्या निवासस्थानी राहायला गेल्या. दादरमधल्या गोखले रोडवर पोर्तुगीज चर्चसमोर कबीर कुटुंबीय राहत होते. आठ-बाय-दहाच्या आकाराचं हे घर होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांच्या मृत्यूविषयी ज्या पद्धतीने सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात होत्या, त्या पाहता स्वत:ची ओळख न सांगता राहणं माईंना योग्य वाटत होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	माईंचे निकटवर्तीय राहिलेले विजय सुरवाडेंनी बीबीसी मराठीला याबाबत विस्तृतपणे सांगितलं:</p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेब पोर्तुगीज चर्चसमोरील कबीर कुटुंबीयांच्या घराबाहेर रोज संध्याकाळी खुर्चीत बसून मासिकं वाचत बसायच्या. त्यांच्या दिनक्रमाचा हा भाग बनला होता. त्या माईसाहेब आहेत, हे कुणाला माहीत नव्हते.</p>
<p>
	याच रस्त्यानं डी. डी. बाविस्कर येत जात असतं. बाविस्कर हे गृहस्थ भैयासाहेब आंबेडकरांचे निकटवर्तीय होते. बाविस्करांना भैयासाहेब भावासारखे मानायचे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते चैत्यभूमीच्या देखरेखीचं काम पाहत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाविस्करांनी एकदा माईसाहेबांना तिथे वृत्तपत्र वाचताना पाहिलं. खरंतर ते काही दिवस त्यांना पाहत होते. मात्र एक दिवस धाडस करून त्यांनी जाऊन विचारलं, &#39;तुम्ही माईसाहेब आंबेडकर आहात ना?&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	बाहेर जे वातावरण होतं, ते पाहता माईंनी सुरुवातीला बाविस्करांना आपली खरी ओळख सांगितली नाही. मात्र नंतर काही दिवस बाविस्कर सातत्यानं माईसाहेबांशी संवाद साधू लागल्यानं त्यांनी अखेर ओळख सांगितली. माई आंबेडकर सार्वजनिक आयुष्यात सक्रिय होण्यास बाविस्करांची भेट महत्त्वाची मानली जाते.</p>
<p>
	माई जेव्हा पुन्हा जगासमोर आल्या...</p>
<p>
	बाबासाहेबांच्या निधनानंतर पसरलेल्या शंकांमुळे माई सगळ्यांसमोर येण्यास धजावत नव्हत्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	माई सगळ्यांसमोर पहिल्यांदा आल्या त्या भैयासाहेब आंबेडकरांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण.</p>
<p>
	 </p>
<p>
	दलित पँथरचे सहसंस्थापक आणि लेखक ज. वि. पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "माईसाहेबांनी मला विनंती केली की मला समाजाच्या पुढे यायचं आहे. आम्ही या कार्यक्रमाचं निमित्त साधलं. भैयासाहेबांचीही त्यासाठी परवानगी घेतली. भैयासाहेबांनी भाषणात माईसाहेबांचा उल्लेख करायचा असं ठरलं होतं."</p>
<p>
	ज. वि. पवार पुढे सांगतात, "या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माईसाहेब, मीराताई (भैय्यासाहेबांच्या पत्नी), कुसुमताई (शंकरराव चव्हाण यांच्या पत्नी) या तिघीजणी पहिल्या रांगेत होत्या. भैयासाहेब ज्यावेळी भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा सगळ्यांनी कान टवकारले होते. ते कधी माईसाहेबांचं नाव घेतील का हे ऐकण्यासाठी. मात्र भैयासाहेबांनी समोरील लोकांच्या प्रतिक्रियेची भीती मनात आली असावी, म्हणून त्यांनी नाव घेणं टाळलं."</p>
<p>
	 </p>
<p>
	कार्यक्रम संपल्यानंतर माईंनी माझे कान पकडल्याचं ज. वि. पवारांचे सांगतात. पुढे अहमदाबादमध्ये दलित पँथरच्या सभेत माईसाहेब पहिल्यांदा नावानिशी आणि जाहीरपणे सगळ्यांसमोर आल्या, असं ते पुढे सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	दलित पँथरमध्ये माईसाहेबांचा तसा सक्रिय सहभाग नसला, तरी पुढे 1977 साली ज्यावेळी भैयासाहेबांनी मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा माईंनी राजा ढाले आणि ज. वि. पवार यांच्या सोबतीने प्रचारात आघाडी घेतली होती. भैयासाहेबांच्या प्रचाराच्या प्रत्येक सभेत माई प्रामुख्यानं उपस्थित राहत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	एकूणच 1972-73 नंतर माईसाहेब आंबेडकर महामहाराष्ट्रात दिसू लागल्या आणि सर्वांसमोर येऊ लागल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	दलित पँथर, रिडल्स, नामांतर, अयोध्या</p>
<p>
	1972 साली स्थापन झालेल्या &#39;दलित पँथर&#39;ला मानसिक बळ देण्यासाठीही माईसाहेब पुढे आल्याचं वैशाली भालेराव सांगतात. त्यांनी &#39;डॉ. माईसाहेब आंबेडकरांच्या सहवासात&#39; नावाचं चरित्र लिहिलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	भालेराव सांगतात, "सत्तरीनंतर दलित समाजात आशेचा नवा किरण उदयास आला तो दलित पँथरच्या रूपानं. आधुनिक विचारसरणी असणारे, नव्या ध्येयांनी प्रेरित झालेले, बंड पुकारणारे, अन्यायविरुद्ध आवाज उठवणारे हे तरुण होते. राजा ढाले यांच्या नेतृत्वात पँथर उभी राहिली होती."</p>
<p>
	 </p>
<p>
	दलित पँथरने माईसाहेबांची मार्गदर्शनपर सभा-संमेलने आयोजित केली. त्यामुळे माईसाहेबांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठा मार्ग मिळाला, असंही वैशाली भालेराव सांगतात.</p>
<p>
	पुढे मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनात तर माईसाहेब अगदी पुढाकार घेत होत्या. या काळात माईसाहेबांना तुरुंगावसही भोगावा लागला.</p>
<p>
	 </p>
<p>
	1987 साली ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा &#39;रिडल्स इन हिंदुइझम&#39; हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यावेळी महाराष्ट्रात वाद झाला. राम आणि कृष्णाबाबतच्या उल्लेखामुळे काही हिंदू संघटनांनी या ग्रंथाच्या प्रकाशनावर आक्षेप घेतला.</p>
<p>
	 </p>
<p>
	ग्रंथ प्रकाशित व्हावा आणि होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंनी आंदोलने-प्रतिआंदोलने सुरू झाली. सामाजिक तणावही निर्माण झाला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;रिडल्स इन हिंदुइझम&#39; ग्रंथ प्रकाशित व्हावा म्हणून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात &#39;रिडल्स समर्थन परिषद&#39; भरवण्यात आली होती. त्यावेळी माई आंबेडकर या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.</p>
<p>
	अयोध्या प्रकरणात माईसाहेबांनी 1993 साली कोर्टात दाखल केलेली याचिका चर्चेचा विषय ठरली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	उत्तर प्रदेशातल्या अयोध्येच्या ठिकाणी सापडलेल्या पुरातन अवशेषांचा दाखला देत हिंदूंनी रामजन्मभूमीचा दावा केला. तर मुस्लिमांनी इथे बाबरी मशीद होती म्हणून ही जागा आमची असा दावा केला. या दोन्ही दाव्यांना माईंनी विरोध केला. माईसाहेबांचं म्हणणं होतं की साकेत नामक बुद्धस्तूपाचे पुरातन ऐतिहासिक पुरावे आढळले असल्यानं ती जागा बौद्धांस मिळावी.</p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेबांनी या मागणीसाठी फैजाबाद कोर्टात याचिकाही दाखल केली होती. अर्थातच, कोर्टात हे प्रकरण खूप लाबलं आणि आता तर अयोध्येतील जमिनीचा निर्णय काय लागला आहे हे सर्वश्रुतच आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या &#39;भारतरत्न&#39;चा स्वीकार आणि सिंबॉयसिसमधील &#39;स्मृतिविहार&#39;</p>
<p>
	"1984 ची संध्याकाळ मला आजही आठवते. एक ट्रक भरून सामान 26, अलिपूर रोड, नवी दिल्ली येथून पुण्यात सिंबॉयसिस संस्थेत आलं. असेंब्ली हॉलमधील दोन गेस्टहाउसच्या खोल्यांमध्ये ते सामान उतरवून गेले." पुण्यातल्या सिंबॉयसिस शिक्षण संस्थेच्या मानद संचालिका डॉ. संजीवनी मुजुमदार बीबीसी मराठीला आठवण सांगतात. डॉ. बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तू माईसाहेबांनी पुण्यातील सिंबॉयसिस संस्थेत ठेवण्यास दिल्या होत्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	सिंबॉयसिस संस्थेचे डॉ. मुजुमदार यांचे भाऊ ठाण्यातील न्यायालयात न्यायाधीश होते. ठाण्याच्या कोर्टात माईसाहेबांच्या बहिणीचे जावई ठाकूर वकील होते. एकदा बहिणीसोबत चर्चा सुरू असताना, ठाकूर यांनी सिंबॉयसिसच्या डॉ. मुजुमदारांचा संदर्भ दिला. पुढे ठाकूरांनीच मध्यस्थी केली आणि बाबासाहेबांच्या मौल्यवान वस्तू सिंबॉयसिस संस्थेपर्यंत पोहोचल्या.</p>
<p>
	सिंबॉयसिस संस्थेत बाबासाहेबांच्या या वस्तूंच्या संग्रहलयाला &#39;स्मृतिविहार&#39; असं नाव देण्यात आलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	1990 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर &#39;भारतरत्न&#39; घोषित झाला, तेव्हा भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्या हस्ते माईसाहेबांनीच हा सन्मान स्वीकारला. हा पुरस्कारही माईसाहेबांनी सिंबॉयसिस संस्थेतील स्मृतिविहारात ठेवण्यासाठीच सुपूर्द केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	या स्मारकात एका फलकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माईसाहेबांबद्दल काढलेले उद्गार लिहिण्यात आलेत : "The Successful rekindling of this dying flame is due to the medical skill of my wife and Dr. Malvankar. I am immensely grateful. They alone have helped me to complete the work." ("माझ्या विझणाऱ्या प्राणज्योतीला हे तेज प्राप्त झालं आहे त्याचं श्रेय माझी पत्नी आणि डॉ. मालवणकरांना जातं. मी त्यांचा ऋणी आहे. माझं कार्य त्यांच्यामुळे पूर्ण होऊ शकलं.")</p>
<p>
	माईसाहेब बऱ्याचदा सिंबॉयसिस संस्थेला भेट देत. त्यांच्या शेवटच्या भेटीबद्दल सांगताना डॉ. संजीवनी मुजुमदार भावनिक होतात: "तो दिवस आठवतोय. त्या खूप थकल्या होत्या. संस्थेच्या पायऱ्या त्यांना चढता येत नव्हत्या. शेवटी खुर्चीत बसवून त्यांना आम्ही वर आणलं. प्रत्येक पायरी चढताना त्या आम्हाला &#39;जय भीम&#39; म्हणायला सांगत होत्या. संस्थेतील बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालताना सुद्धा त्या गहिवरल्या होत्या."</p>
<p>
	 </p>
<p>
	आम्हाला वाटलं नव्हतं, ही भेट माईसाहेबांची शेवटची असेल, असं डॉ. मुजुमदार सांगतात. माईसाहेबांचं 23 मे 2003 रोजी मुंबईतील जेजे रुग्णालयात निधन झालं.</p>
<p>
	 </p>
<p>
	शेवटच्या दिवसांत माईसाहेबांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारनं मदतनीस महिला दिली होती. आंबेडकर कुटुंबीय, तसंच रामदास आठवले, विजय सुरवाडे अशी मंडळी माईंच्या देखभालीसाठी आपापल्या परीने मदत करत असत.</p>
<p>
	मात्र माईसाहेबांना आपल्या हयातीत ज्या आरोपांना, वेदनांना सामोरं जावं लागलं, त्याची मोजदाद नाही, असं म्हणत विजय सुरवाडे दु:ख व्यक्त करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेब आंबेडकर यांच्याच वाक्यात शेवटी सांगायचं तर - "मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, आपल्या राजकीय स्वार्थासाठी व नेतृत्वाच्या लोभासाठी त्यांनी आंबेडकर वारसांना पद्धतशीरपणे डावलले. पण सर्व नेते शेवटी आपापसातील नेतृत्वासाठी झगडून संपले. विशेष म्हणजे, या राजकीय स्वार्थासाठी माझा राजकीय बळी देण्यात आला, हे ऐतिहासिक सत्य आहे."</p>
<p>
	 </p>
<p>
	या लेखासाठीचे संदर्भ :</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या सहवासात - डॉ. सविता भीमराव आंबेडकर (आत्मचरित्र)</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष (चरित्र) - विजय सुरवाडे</p>
<p>
	डॉ. माईसाहेब आंबेडकरांच्या सहवासात (चरित्र व आठवणी) - वैशाली भालेराव</p>
<p>
	माईसाहेबांचे निकटवर्तीय विजय सुरवाडे यांच्याशी बातचीत</p>
<p>
	दलित पँथरचे सहसंस्थापक आणि लेखक ज. वि. पवार यांच्याशी बातचीत</p>
<p>
	सिंबॉयसिस संस्थेच्या मानद संचालिका डॉ. संजिवनी मुजुमदार यांच्याशी बातचीत</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 14 Apr 2023 07:49:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Apr 2023 07:50:59 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[BBC Marathi News]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/biography-of-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-122041100023_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/biography-of-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-122041100023_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/thumb/1_1/1618239279-2615.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/thumb/1_1/1618239279-2615.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील श्री रामजी वल्द मालोजी सकपाळ हे महू येथेच मेजर सुभेदार पदावरील लष्करी अधिकारी होते. त्यांनी आणि त्यांची पत्नी भीमाबाई यांनी त्यांच्या सेवेची शेवटची वर्षे काली पलटण येथील जन्मस्थान ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar jayanti" class="imgCont" height="451" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/full/1618239279-2615.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="677" /></p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील श्री रामजी वल्द मालोजी सकपाळ हे महू येथेच मेजर सुभेदार पदावरील लष्करी अधिकारी होते. त्यांनी आणि त्यांची पत्नी भीमाबाई यांनी त्यांच्या सेवेची शेवटची वर्षे काली पलटण येथील जन्मस्थान स्मारकाच्या जागेवर असलेल्या बॅरेकमध्ये घालवली. 1891 मध्ये 14 एप्रिल रोजी रामजी सुभेदार कर्तव्यावर असताना रात्री 12 वाजता भीमरावांचा जन्म झाला. मुलाचा प्रारंभिक काळ कबीर पंथी वडील आणि धार्मिक आईच्या कुशीत शिस्तबद्ध होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>शिक्षण</strong></p>
<p>
	बालक भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. 1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला व भेट म्हणून त्यांचे शिक्षक श्री कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना &#39;बुद्ध चरित्र&#39; हा स्वलिखित ग्रंथ भेट म्हणून दिला. भीमरावांनी बडोदाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळाल्यानंतर 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली. संस्कृत शिकण्यास मनाई असल्याने ते फारसी घेऊन उत्तीर्ण झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका</strong></p>
<p>
	बी.ए नंतर एम.ए अध्ययन हेतू बडोदा नरेश सयाजी गायकवाड यांची पुन्हा फेलोशिप मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 1915 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यासाठी त्यांनी &#39;कॉमर्स ऑफ एन्शेंट इंडिया&#39; हा प्रबंध लिहिला. त्यानंतर 1916 मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. उपाधी प्राप्त केली. &#39;ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्ताचे विकेंद्रीकरण&#39; हा संशोधनाचा विषय होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स</strong></p>
<p>
	फेलोशिप पूर्ण केल्यानंतर त्यांना भारतात परतावे लागले, त्यामुळे ते ब्रिटनमार्गे परतत होते. तिथल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी एम.एससी. आणि डी.एससी आणि लॉ इन्स्टिट्यूटमध्ये बार-एट-लॉ पदवीसाठी नोंदणी केली आणि भारतात परतले. सर्वप्रथम शिष्यवृत्तीच्या अटीनुसार त्यांनी बडोद्याच्या राजाच्या दरबारात लष्करी अधिकारी आणि आर्थिक सल्लागार ही जबाबदारी स्वीकारली. संपूर्ण शहरात कोणीही त्याला कामावर घेण्यास तयार नसल्याच्या गंभीर समस्येमुळे तो काही काळानंतर मुंबईत परत आले. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>दलित प्रतिनिधी</strong></p>
<p>
	परळ येथे डबक चाळ आणि कामगार वसाहतीत अर्धवेळ अध्यापन आणि वकिली करून अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी तेथे राहत होते आणि पत्नी रमाबाई यांच्यासोबत राहत होते. 1919 मध्ये डॉ. आंबेडकरांनी राजकीय सुधारणांसाठी स्थापन केलेल्या साऊथबरो कमिशनसमोर राजकारणात दलित प्रतिनिधित्वाच्या बाजूने पुरावे दिले. अशिक्षित आणि गरीब लोकांना जागरूक करण्यासाठी त्यांनी मूकनायक आणि बहिष्कृत इंडिया या साप्ताहिकांचे संपादन करून मूक आणि अशिक्षित आणि गरीब लोकांना जागरुक केले आणि आपले अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते लंडन आणि जर्मनी येथे गेले आणि तेथून एम.एससी., डी.एससी., आणि बॅरिस्टर पदव्या प्राप्त केल्या. त्यांच्या M.Sc. चे संशोधनाचे विषय होते इम्पीरियल फायनान्सच्या प्राप्य विकेंद्रीकरणाचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि त्यांच्या D.Sc. पदवीचा विषय रुपयाची समस्या, त्याची उत्पत्ती आणि उपाय आणि भारतीय परिसंचरण आणि बँकिंगचा इतिहास होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	डी. लिट. बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने L.L.D आणि उस्मानिया विद्यापीठाने D. Litt या <strong>मानद पदवी</strong> बहाल केल्या. अशा प्रकारे डॉ. आंबेडकर जागतिक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले कारण त्यांनी बीए, एमए, एमएससी, पीएचडी, बॅरिस्टर, डीएससी, डी.लिट. एकूण 26 शीर्षके संबंधित आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>योगदान</strong></p>
<p>
	भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकरांनी आपल्या 65 वर्षांच्या आयुष्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, घटनात्मक अशा विविध क्षेत्रात अगणित कार्य करून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>सामाजिक आणि धार्मिक योगदान</strong></p>
<p>
	मानवधिकार जसे दलित आणि दलित आदिवासींचा मंदिर प्रवेश, पिण्याचे पाणी, अस्पृश्यता, जात, यांसारख्या सामाजिक दुष्कृत्यांचे निर्मूलन या मानवी हक्कांसाठी मनुस्मृती दहन (1927), महाड सत्याग्रह (वर्ष 1928), नाशिक सत्याग्रह (वर्ष 1930) येवला की गर्जना (वर्ष 1935), सारखे आंदोलन केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	आवाजहीन, शोषित आणि अशिक्षित लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी 1927 ते 1956 या काळात मूक नायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत या पाच साप्ताहिक आणि पाक्षिकांचे संपादन केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	कमजोर वर्गाचे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, रात्रशाळा, ग्रंथालये आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी अभ्यास करण्यास आणि उत्पन्न मिळविण्यास सक्षम करणे. 1945 मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. बौद्धिक, वैज्ञानिक, प्रतिष्ठेने 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात 5 लाख लोकांसह भारतीय संस्कृतीसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांच्या शेवटच्या पुस्तक "The Buddha and His Dhamma" द्वारे भारतात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना करण्याचा मार्ग मोकळा केला. जातपंत तोडक मंडळ (वर्ष 1937) लाहोर, त्यांच्या प्रबंधाच्या संमेलनासाठी तयार करण्यात आले, त्यांच्या जातिभेद निर्मूलन या ग्रंथाने भारतीय समाजाला धर्मग्रंथांमध्ये प्रचलित असलेल्या मिथक, अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेपासून मुक्त करण्याचे कार्य केले. हिंदू विधेयक संहितेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना घटस्फोट, मालमत्तेत उत्तराधिकार इत्यादींची तरतूद करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आयुष्यभर संघर्ष केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>भारतातील आर्थिक, वित्तीय आणि प्रशासकीय योगदान</strong></p>
<p>
	* डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या मजकुराच्या आधारे, रुपयाची समस्या - त्याचे मूळ आणि उपाय आणि भारतीय बँकिंग आणि बँकिंगचा इतिहास, ग्रंथ आणि हिल्टन यंग कमिशनच्या समक्ष त्यांचे पुरावे या आधारावर 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली गेली.</p>
<p>
	 </p>
<p>
	* &#39;ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्ताचा विकास&#39; या त्यांच्या दुसऱ्या संशोधन कार्याच्या आधारे देशात वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली.</p>
<p>
	 </p>
<p>
	* शेतीमध्ये सहकारी शेतीच्या माध्यमातून उत्पादनात वाढ करणे, सतत वीज व पाणीपुरवठा करणे यावर उपाय सांगितले.</p>
<p>
	 </p>
<p>
	* औद्योगिक विकास, पाणी साठवण, सिंचन, उत्पादकता आणि कामगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सामूहिक आणि सहकारी प्रगतीशील शेती, राज्याच्या मालकीसह सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताकची स्थापना आणि जमिनीचे राष्ट्रीयीकरण. </p>
<p>
	 </p>
<p>
	* 1945 मध्ये त्यांनी महानदीच्या व्यवस्थापनाची बहुउद्देशीय उपयुक्तता आणि औद्योगिकीकरणाची बहुउद्देशीय आर्थिक धोरणे आणि नद्या-नाले जोडणारे जल धोरण, हिराकुड धरण, दामोदर खोरे धरण, सोन नदी खोरे प्रकल्प, राष्ट्रीय जलमार्ग, केंद्रीय जल आणि विद्युत प्राधिकरणाचा मार्ग मोकळा केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	* 1944 मध्ये प्रस्तावित केंद्रीय जलमार्ग आणि सिंचन आयोगाच्या प्रस्तावाला व्हाईसरॉयने 4 एप्रिल 1945 रोजी मान्यता दिली आणि भारतात मोठ्या धरणाच्या तंत्राच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	* त्यांनी भारताच्या विकासासाठी मजबूत तांत्रिक संघटनेची नेटवर्क रचना मांडली.</p>
<p>
	 </p>
<p>
	* त्यांनी जलव्यवस्थापन आणि विकासाचा मार्ग मोकळा करून देशाच्या सेवेसाठी नैसर्गिक संसाधनांचा अर्थपूर्ण वापर केला. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>संविधान आणि राष्ट्र निर्माण</strong></p>
<p>
	त्यांनी 02 वर्षे, 11 महिने आणि 17 दिवसांच्या अथक परिश्रमाने समता, समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले. देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तीच्या अखंडतेच्या आणि प्रतिष्ठेच्या जीवनपद्धतीने भारावून गेलेली भारतीय संस्कृतीने अभिभूत केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	1951 मध्ये त्यांनी हिंदू कोड ऑफ वुमन एम्पॉवरमेंट विधेयक मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मंजूर झाले नाही तेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. सन 1955 मध्ये त्यांचा Thoughts on Linguistic States हा ग्रंथ प्रकाशित करून, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांची पुनर्रचना करून छोट्या आणि आटोपशीर राज्यांमध्ये पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जो 45 वर्षांनंतर काही प्रदेशांमध्ये प्रत्यक्षात आला.</p>
<p>
	 </p>
<p>
	निवडणूक आयोग, नियोजन आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरुषांसाठी एकसमान नागरी हिंदू संहिता, राज्य पुनर्रचना, मोठ्या राज्यांचे लहान आकारात संघटन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, निवडणूक आयुक्त आणि राजकीय संरचना मजबूत करण्यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि परराष्ट्र धोरण तयार केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	लोकशाही बळकट करण्यासाठी राज्याची तीन अंगे, न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ या स्वतंत्र आणि स्वतंत्र केल्या गेल्या आणि समान नागरी हक्कांनुसार एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हा घटक सुरू करण्यात आला.</p>
<p>
	 </p>
<p>
	विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेत अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांचा सहभाग घटनेने निश्चित केला आणि भविष्यात ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, पंचायत राज इत्यादी कोणत्याही प्रकारच्या विधिमंडळात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	सहकारी आणि सामूहिक शेतीबरोबरच, उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयीकरण करून, सार्वजनिक प्राथमिक उपक्रम जसे की बँकिंग, विमा इत्यादी राज्यांच्या नियंत्रणाखाली ठेवून जमिनीवर राज्याची मालकी प्रस्थापित करण्याची आणि अल्प शेतीधारकांवर अवलंबून असलेल्या बेरोजगार मजुरांना रोजगार देण्याची त्यांनी जोरदार शिफारस केली. अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिकीकरणाची देखील शिफारस केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	व्हाईसरॉय कौन्सिलमध्ये कामगार मंत्री म्हणून शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि कामगार कल्याण, कामगार कल्याण 12 तासांवरून 8 तास कामाचे तास, समान काम, समान वेतन, प्रसूती रजा, पगारी रजा, कर्मचारी राज्य विमा योजना, आरोग्य सुरक्षा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 तयार करणे, कामगार आणि दुर्बल घटकांच्या हितासाठी आणि सत्तेत थेट सहभागासाठी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना करुन 1937 च्या मुंबई अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी 17 पैकी 15 जागा जिंकल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	कर्मचारी राज्य विमा अंतर्गत, आरोग्य, रजा, अपंगत्व-समर्थन, काम करत असताना अपघाती घटनेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि इतर अनेक संरक्षणात्मक सुविधा कामगार कल्याणामध्ये समाविष्ट आहेत. कर्मचार्‍यांना दैनंदिन भत्ता, अनियमित कर्मचार्‍यांना रजेची सुविधा, कर्मचार्‍यांच्या वेतन श्रेणीचा आढावा, भविष्य निर्वाह निधी, 1944 मध्ये कोळसा खाणीत काम करणार्‍या कामगारांना सुरक्षा दुरुस्ती विधेयक आणि अभ्रक खाणकामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.</p>
<p>
	 </p>
<p>
	1946 मध्ये त्यांनी रहिवासी, पाणीपुरवठा, शिक्षण, करमणूक, सहकार व्यवस्थापन आदींपासून कामगार कल्याण धोरणाचा पाया घातला आणि आणि भारतीय कामगार परिषदेची सुरुवात केली जी आत्तापर्यंत सुरू आहे. ज्यात दरवर्षी मजुरांच्या ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चा करून ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	कामगार कल्याण निधीच्या अंमलबजावणीसाठी एक सल्लागार समिती स्थापन करून, जानेवारी 1944 मध्ये कार्यान्वित करण्यात आलं. भारतीय सांख्यिकी कायदा संमत करण्यात आला ज्यामुळे कामगार परिस्थिती, दैनंदिन मजुरी, उत्पन्नाचे इतर स्त्रोत, महागाई, पत, गृहनिर्माण, रोजगार, ठेवी आणि इतर निधी आणि कामगार विवादांशी संबंधित नियम शक्य झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	8 नोव्हेंबर 1943 रोजी त्यांनी 1926 पासून प्रलंबित असलेला भारतीय कामगार कायदा सक्रिय केला आणि त्याअंतर्गत भारतीय ट्रेड युनियन दुरुस्ती विधेयक प्रस्तावित केले आणि कामगार संघटनेची कडक अंमलबजावणी केली. कामगारांच्या कल्याणासाठी आरोग्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी कायदा, कारखाना दुरुस्ती कायदा, कामगार विवाद कायदा, किमान वेतन कायदा आणि कायदेशीर संप कायदे करण्यात आले. </p>
<p>
	 </p>
<p>
	टीप- हा लेख PIB मधून घेतला आहे, जे डॉ. आंबेडकर फाऊंडेशनचे संपादक यांनी लिहिलेला आहे.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 14 Apr 2023 07:06:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Apr 2023 07:42:34 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-quotes-in-marathi-122041300039_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-quotes-in-marathi-122041300039_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/11/thumb/1_1/1618121800-6972.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/11/thumb/1_1/1618121800-6972.jpeg</image>
      <description><![CDATA[14 एप्रिलला आंबेडकर यांची जयंती असते. त्यांचे काही सुविचार आपल्या जीवनात आत्मसात करू या.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Dr baba saheb ambedkar" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/11/full/1618121800-6972.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="740" /></p>
	14 एप्रिलला आंबेडकर यांची जयंती असते. त्यांचे काही सुविचार आपल्या जीवनात आत्मसात करू या.</p>
<p>
	 </p>
<p>
	1 माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी </p>
<p>
	 </p>
<p>
	2  समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही </p>
<p>
	 </p>
<p>
	3 माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी </p>
<p>
	 </p>
<p>
	4 अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही </p>
<p>
	 </p>
<p>
	5 जो तो परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर महत्पदाला चढतो </p>
<p>
	 </p>
<p>
	6 जेथे एकता तेथेच सुरक्षितता.</p>
<p>
	 </p>
<p>
	7 शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	8 हिंसा ही वाईट गोष्ट आहे त्या पेक्षा ही वाईट गोष्ट म्हणजे गुलामी आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	9 काम लवकर करावयाचे असल्यास, मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.</p>
<p>
	 </p>
<p>
	10 माणूस हा धर्म साठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	11 ग्रंथ हेच गुरु.</p>
<p>
	 </p>
<p>
	12  वाचाल तर वाचाल.</p>
<p>
	 </p>
<p>
	13 तिरस्कार हा माणसाचा नाश करतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	14 मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	15 तुम्ही वाघा सारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	16 ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	17 शक्तीचा उपयोग काळ-वेळ पाहून करावा.</p>
<p>
	 </p>
<p>
	18 नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.</p>
<p>
	 </p>
<p>
	19 माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे, लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.</p>
<p>
	 </p>
<p>
	20 जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	21 तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.</p>
<p>
	 </p>
<p>
	22 प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.</p>
<p>
	 </p>
<p>
	23 स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	24 एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.</p>
<p>
	 </p>
<p>
	25 धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	26 जो माणूस मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.<br />
	<br />
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 14 Apr 2023 07:05:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Apr 2023 07:54:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आंबेडकरांचे अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-struggle-against-untouchability-122041200013_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-struggle-against-untouchability-122041200013_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ta/img/article/2019-11/14/thumb/1_1/1573737012-5212.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ta/img/article/2019-11/14/thumb/1_1/1573737012-5212.jpg</image>
      <description><![CDATA[आंबेडकर म्हणाले होते "अस्पृश्यता गुलामगिरीपेक्षा वाईट आहे." आंबेडकरांना बडोदाच्या संस्थानाने शिक्षित केले होते, म्हणून त्यांची सेवा करण्यास ते बांधील होते. महाराजा गायकवाड यांचे लष्करी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="417" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ta/img/article/2019-11/14/full/1573737012-5212.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	आंबेडकर म्हणाले होते "अस्पृश्यता गुलामगिरीपेक्षा वाईट आहे." आंबेडकरांना बडोदाच्या संस्थानाने शिक्षित केले होते, म्हणून त्यांची सेवा करण्यास ते बांधील होते. महाराजा गायकवाड यांचे लष्करी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु जातीभेदामुळे त्यांना लवकरच नोकरी सोडावी लागली. त्यांनी या घटनेचे त्यांच्या आत्मचरित्र वेटिंग फॉर अ वीजा यात वर्णन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाढत्या कुटुंबासाठी उपजीविकेचे साधन शोधण्याचा पुन्हा प्रयत्न केला, ज्यासाठी त्यांनी लेखापाल म्हणून काम केले आणि खाजगी शिक्षक म्हणून काम केले आणि एका गुंतवणूक सल्ला व्यवसायाची स्थापना केली परंतू अपयशी ठरले जेव्हा त्यांच्या ग्राहकांना कळले की ते अस्पृश्य आहेत. 1918 मध्ये ते मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. ते विद्यार्थ्यांसोबत यशस्वी झाले असला तरी, इतर प्राध्यापकांनी त्याच्यासोबत पिण्याची भांडी शेअर करण्यास आक्षेप घेतला.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांना भारत सरकार कायदा, 1919 तयार करणाऱ्या साऊथबरो समितीसमोर साक्ष देण्यासाठी एक प्रमुख भारतीय विद्वान म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान, आंबेडकरांनी दलित आणि इतर धार्मिक समुदायांसाठी स्वतंत्र मतदार आणि आरक्षणाची वकिली केली. हे प्रकाशन लवकरच वाचकांमध्ये लोकप्रिय झाले, जेव्हा आंबेडकरांनी पुराणमतवादी हिंदू राजकारण्यांवर आणि भारतीय राजकीय समुदायाच्या जातीभेदाशी लढा देण्याच्या अनिच्छेवर टीका करण्यासाठी त्याचा वापर केला. डिप्रेस्ड क्लासेसच्या कॉन्फरन्समध्ये दिलेल्या त्यांच्या भाषणाने कोल्हापूर राज्यातील स्थानिक शासक शाहू चतुर्थावर खूप प्रभाव पाडला, ज्यांच्या आंबेडकरांसोबत भोजन केल्याने सनातनी समाजात खळबळ उडाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबई उच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करत त्यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रसार आणि उन्नतीसाठी प्रयत्न केले. त्यांचा पहिला संघटित प्रयत्न म्हणजे केंद्रीय संस्था बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, ज्याचा उद्देश शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक सुधारणा तसेच उदासीन वर्ग म्हणून संदर्भित "बहिष्कृत" लोकांच्या कल्याणाला चालना देणे तसेच दलित हक्कांचे संरक्षण करणे होते. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, प्रबुद्ध भारत आणि जनता अशी पाच मासिके काढली.</p>
<p>
	 </p>
<p>
	1925 मध्ये, त्यांना ऑल-युरोपियन सायमन कमिशनवर काम करण्यासाठी बॉम्बे प्रेसीडेंसी कमिटीवर नियुक्त करण्यात आले. बहुतेक भारतीयांनी या अहवालाकडे दुर्लक्ष केले असताना, आंबेडकरांनी भविष्यातील घटनात्मक सुधारणांसाठी स्वतंत्र शिफारस पाठवली.</p>
<p>
	 </p>
<p>
	दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात 1 जानेवारी 1818 रोजी कोरेगावच्या लढाईत शहीद झालेल्या भारतीय महार सैनिकांच्या स्मरणार्थ आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी कोरेगाव विजय स्मारक (जयस्तंभ) येथे समारंभाचे आयोजन केले होते. येथे महार समाजातील सैनिकांची नावे संगमरवरी शिलालेखावर कोरली गेली आणि कोरेगाव दलितांच्या स्वाभिमानाचे प्रतीक बनले.</p>
<p>
	 </p>
<p>
	1927 पर्यंत, डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध व्यापक आणि सक्रिय चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक चळवळी, सत्याग्रह आणि मिरवणुकांच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यांना हिंदू मंदिरांमध्ये प्रवेशाचा हक्क मिळवून देण्यासाठी तसेच समाजातील सर्व घटकांना पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत खुले करण्यासाठी संघर्ष केला. अस्पृश्य समाजाला शहराच्या चवदार जलाशयातून पाणी काढण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी महाड शहरात सत्याग्रहही केला. प्राचीन हिंदू ग्रंथ मनुस्मृतीचा जाहीर निषेध केला, ज्याचे श्लोक उघडपणे जातीय भेदभाव आणि जातीवादाचे समर्थन करतात, आणि त्यांनी औपचारिकपणे प्राचीन ग्रंथाच्या प्रती जाळले. त्याच्या स्मरणार्थ, दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस आंबेडकरवादी आणि हिंदू दलितांकडून मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	तीन महिन्यांच्या तयारीनंतर 1930 मध्ये आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. काळाराम मंदिर आंदोलनात सुमारे 15,000 स्वयंसेवक जमले, ज्यामुळे नाशिकमधील सर्वात मोठी मिरवणूक निघाली. मिरवणुकीचे नेतृत्व लष्करी बँड, स्काउट्सच्या तुकड्याने केले होते, महिला आणि पुरुष शिस्तीने, सुव्यवस्था आणि निर्धाराने देवाचे प्रथमच दर्शन घेत होते. जेव्हा ते गेटवर पोहोचले तेव्हा ब्राह्मण अधिकाऱ्यांनी दरवाजे बंद केले होते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Apr 2023 17:55:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 13 Apr 2023 18:00:00 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या किती व त्या कोणत्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-how-many-degrees-and-what-are-they-123041200030_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-how-many-degrees-and-what-are-they-123041200030_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/thumb/1_1/1681291226-1829.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/thumb/1_1/1681291226-1829.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या किती व त्या कोणत्या होत्या वाचूयात पूर्ण माहिती  ?

कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="babasaheb ambedkar" class="imgCont" height="580" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/12/full/1681291226-1829.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="720" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:720px;">
			R S</p>
	</p>
	<br />
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या किती व त्या कोणत्या होत्या वाचूयात पूर्ण माहिती  ?</p>
<p>
	 </p>
<p>
	कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , कार्य मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते.</p>
<p>
	 </p>
<p>
	 प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : </p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत. </p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, त्या पदव्यांकडे नजर जरी टाकली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड जगमान्य विद्वत्ता लक्षात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला आणि १९२३च्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. त्यांचा शैक्षणिक वर्षांचा प्रवास हा २७ वर्षांचा आहे. या २७ वर्षांमध्ये प्रचंड हाल-अपेष्ट आणि कष्ट सहन करून फक्त आणि फक्त ज्ञानग्रहण करणारे अद्वितीय असे ज्ञानोपासक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी बी.ए., एम.ए., पीएच.डी., एम.एस्सी., डी.एस्सी. आणि बार अ‍ॅक्ट लॉ अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ पदव्या प्राप्त केल्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील कॅम्प स्कूल येथे १८९६ला सुरू झाले. पुढे सातारा हायस्कूल येथे १९००मध्ये त्यांनी पाचवीत प्रवेश घेतला. कुमारवयामध्ये हॉकी, क्रिकेट आणि फूटबॉल खेळण्यामध्ये त्यांना विशेष रूची होती. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी अकरावीपर्यंतचा (जुनी मॅट्रीक) अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना या शाळेत संस्कृत भाषा घेता आली नाही म्हणून त्यांनी पार्शियन भाषा निवडली. </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Ambedkar" class="imgCont" height="652" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/full/1649750168-7695.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar" width="740" /></p>
</p>
<p>
	१९०७मध्ये ते मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून दरमहा २५ रुपयांची शिष्यवृत्ती बी.ए. होण्यासाठी प्राप्त झाली. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रीव्हीयसच्या वर्गात प्रवेश घेतला. १९१३मध्ये ते बी.ए. उत्तीर्ण झाले. पुढे वडिलांच्या दु:खद निधनानंतर अमेरिकेत जाऊन बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीद्वारे उच्चशिक्षण घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १९१३ला अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षणासाठी अर्थशास्त्र शाखेत प्रवेश मिळविला. तेथे त्यांनी अर्थशास्त्राच्या जोडीला दुय्यम विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. या विषयांचा अभ्यास त्यांनी तेथे केला. १९१३ ते १९१६पर्यंत तीन वर्षांत त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्यांचा अभ्यास केला. एम.ए.च्या पदवीसाठी त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार (Ancient Indian Commerce) या विषयावर लघुप्रबंध लिहिला या प्रबंधाआधारे १९१५मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांना एम.ए.ही पदवी दिली. ही पदवी मिळताच त्यांनी &#39;भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक व विश्लेषणात्मक अध्ययन&#39; (The National Dividend of India : A Historical and Analytical Study) या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. मिळविली. सोबतच त्यांनी १९१६ला एम.एस्सी. ही उच्च पदवी आणि डी.एस्सी. अतिउच्च पदवी मिळविण्याच्या हेतूने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. लंडन विद्यापीठातून एम.एस्सी., डी.एस्सी. पदव्यांचा अभ्यास करीत असतानाच बॅरिस्टर या कायद्याच्या क्षेत्रातील अतिउच्च पदवीचाही अभ्यास करण्यासाठी त्यांनी १९१६ला ग्रेज इन या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला. १९१७मध्ये त्यांना कोलंबिया विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर झाली. परंतु, पीएच.डी.चा प्रबंध छापून काही प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्यानंतरच ही पदवी बहाल केल्या जाईल, अशी अट टाकण्यात आली. &#39;ब्रिटीश भारतातील परकीय प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती&#39; या नावाने बाबासाहेबांचा पीएच.डी.चा प्रबंध पी. एस. किंग अ‍ॅण्ड कंपनी लंडन यांनी १९२५मध्ये प्रकाशित केला. त्या छापील प्रती कोलंबिया विद्यापीठाला सादर केल्या. पुढे ८ जून १९२७ रोजी बाबासाहेब आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर जाहीर झाली. </p>
<p>
	 </p>
<p>
	डी.एस्सी. साठी त्यांनी &#39;रुपयाचा प्रश्न&#39; (The Problem of Rupee) नावाचा प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला. १९२३मध्ये त्यांना डी.एस्सी. पदवी मिळाली. डी.एस्सी.नंतर त्यांनी &#39;बार अ‍ॅक्ट लॉ&#39;ची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन &#39;बॅरिस्टर&#39; ही पदवी मिळविली. डॉ. बाबासाहेबांनी बी.ए. ही एकच पदवी भारताच्या मुंबई विद्यापीठातून मिळविली. एम.ए., पीएच.डी. या त्यांच्या पदव्या अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाच्या आहेत. एम.एस्सी., डी.एस्सी. या त्यांच्या पदव्या ब्रिटनमधील लंडन विद्यापीठाच्या आहेत आणि &#39;बार अ‍ॅक्ट लॉ&#39; ही त्यांची कायद्याची सर्वोच्च पदवी ग्रेज इन या कायदाविषयक शिक्षण संस्थेची आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित अशा त्यांच्या उच्च-अतिउच्च पदव्या ह्या विदेशातीलच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विषयांमध्ये प्रबंध लिहिले ते विविध विषयांचे पुढे महान ग्रंथ म्हणून पुढे आलेत. </p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेबांची ज्ञानग्रहण करण्याची भाषा ही प्रामुख्याने इंग्रजी होती. त्यांना फ्रेंच, जर्मनी, पार्शियन, पाली, हिंदी, गुजराती आणि मराठी इत्यादी भाषा उत्तम प्रकारे अवगत होत्या. बाबासाहेबांची ज्ञानलालसा आणि त्यांचे समाजोद्धाराचे प्रचंड कार्य बघून ५ जून १९५२ रोजी कोलंबिया विद्यापीठाने एलएल.डी. (डॉक्टर ऑफ लॉज्) ही सन्माननीय पदवी आपल्या जागतिक कीर्तीच्या माजी विद्यार्थ्याला सन्मानाने बहाल केली. यानंतर उस्मानिया विद्यापीठाने १२ जानेवारी १९५३ रोजी हैदराबाद येथे त्यांना समारंभपूर्वक डी.लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही सन्माननीय पदवी प्रदान केली. भारत सरकारने या विश्व मानवाला त्याच्या जागतिक तोडीच्या कार्यकतृर्त्वाचा सन्मान म्हणून १९९०मध्ये मरणोपरांत &#39;भारतरत्न&#39; या सर्वोच्च सन्मानाने सन्मानीत केले. </p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेबांची प्रचंड ज्ञानलालसा, त्यांचा वाचन, चिंतन, लेखन आणि वक्तृत्वामधील विविधांगी व्यासंग बघितल्यावर त्यांच्या तोडीचा असा चौफेर बुद्धिमान माणूस शोधूनही सापडू शकत नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव ज्ञानव्रती आहेत. त्यांचे सर्व संशोधनात्मक लेखन जागतिक पातळीवर गौरविल्या गेले आहे. त्यांच्या ज्ञानलालसेचा वारसा संपूर्ण विश्वाने घेतला पाहिजे. आज आपल्या देशात &#39;गुणवत्तेचा ऱ्हास होत आहे&#39;, अशी जी ओरड होत आहे, त्याला पर्याय देण्यासाठी बाबासाहेबांसारखी ज्ञानलालसा वृद्धिंगत करणे हाच त्यावरचा एकमेव मार्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिवसाचे अठरा-अठरा, विस-विस तास स्वत:ला अभ्यासामध्ये गुंतवून घेत असत. प्रचंड वाचन, प्रत्येक क्षण अन् क्षण हा ज्ञान ग्रहणासाठीच असला पाहिजे, असा कटाक्ष त्यांनी पाळला. आयुष्यभर निर्व्यसनी राहून जीवनाच्या शेवटपर्यंत बाबासाहेब ज्ञानाचे उपासक राहिले. आजन्म विद्यार्थी असणारा हा ज्ञानयोगी, हजारो पदव्या आणि उपाधींच्या पुढे होता. कारण तो ज्ञानोपासक होता.<br />
	Edited by : Ratnadeep Ranshoor</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 12 Apr 2023 14:48:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 12 Apr 2023 15:01:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-quotes-in-marathi-123040800042_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-quotes-in-marathi-123040800042_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg</image>
      <description><![CDATA[ज्या व्यक्तीला आपल्या मृत्यूचं नेहमी स्मरण राहतं तो सदैव चांगल्या कामात व्यस्त असतो.

बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.

लक्षात ठेवा तलवारीच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Ambedkar" class="imgCont" height="652" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/full/1649750168-7695.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar" width="740" /></p>
	ज्या व्यक्तीला आपल्या मृत्यूचं नेहमी स्मरण राहतं तो सदैव चांगल्या कामात व्यस्त असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे. हे सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा.</p>
<p>
	 </p>
<p>
	ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपण प्रथम आणि शेवटी भारतीय आहोत.</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिक्षण हे पुरुषांसाठी जितके आवश्यक आहे तितकेच ते स्त्रियांसाठी आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.</p>
<p>
	 </p>
<p>
	उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.</p>
<p>
	 </p>
<p>
	बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.</p>
<p>
	 </p>
<p>
	महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो, तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिका !</p>
<p>
	संघटित व्हा !!</p>
<p>
	संघर्ष करा !!!</p>
<p>
	 </p>
<p>
	मी महिलांनी केलेल्या कामगिरीवरून समाजाची प्रगती मोजतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?</p>
<p>
	 </p>
<p>
	सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.</p>
<p>
	 </p>
<p>
	चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.</p>
<p>
	 </p>
<p>
	आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 08 Apr 2023 18:12:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 08 Apr 2023 18:17:22 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Ambedkar Jayanti 2023 Speech आंबेडकर जयंती स्पीच]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2023-speech-123040400013_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2023-speech-123040400013_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg</image>
      <description><![CDATA[आपणा सर्वांना माहिती आहेच की, आज आपण भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत, ज्यांनी दलित, वंचित आणि शोषित वर्गासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अशा परिस्थितीत आज या मेळाव्यात मी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Ambedkar" class="imgCont" height="652" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/full/1649750168-7695.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar" width="740" /></p>
	आदरणीय प्राचार्य, शिक्षक, संमेलनात उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे, माझे वर्गमित्र आणि प्रिय बंधू आणि भगिनी.</p>
<p>
	आपणा सर्वांना माहिती आहेच की, आज आपण भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत, ज्यांनी दलित, वंचित आणि शोषित वर्गासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अशा परिस्थितीत आज या मेळाव्यात मी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाविषयीचे माझे मत तुमच्यासमोर मांडणार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. भीमराव आंबेडकर हे राजकारणी, अर्थतज्ज्ञ आणि दलितांसाठी काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. बाबा भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपणीचे नाव भीम सकपाळ होते, ज्यांना त्यांच्या शिक्षकांनी आंबेडकर हे नाव दिले होते. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मोलाजी होते ते सैन्यात सुभेदार होते. त्यांची आई भीमाबाई सकपाळ या धार्मिक स्त्री होत्या. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झाले, त्यानंतर ते प्राथमिक शिक्षणासाठी मुंबईला गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	महार समाजाशी संबंधित असल्याने त्यांना सुरुवातीपासूनच जातीवादाला सामोरे जावे लागले, त्यामुळे त्यांनी आयुष्यात जातीवादाशी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. येथे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. भीमराव 1923 मध्ये भारतात परतले, त्यानंतर त्यांनी देशातील अस्पृश्यता, गरिबी आणि महिलांवरील भेदभावाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. जोपर्यंत देशातील दलित, वंचित, शोषित वर्गातील जनतेला समतेची दृष्टी मिळत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याला अर्थ नाही, असे त्यांचे मत होते. भीमराव आंबेडकर हे भारतातील पहिले नेते होते ज्यांनी तीनही गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला होता. त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि कार्यक्षमतेमुळे त्यांना भारताचे पहिले कायदा मंत्री बनवण्यात आले, ज्यांनी संविधान निर्मितीचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले.</p>
<p>
	 </p>
<p>
	आयुष्यभर दलित हितासाठी लढणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचे 1956 साली निधन झाले. आजच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे विचार स्मरणात ठेवावेत आणि मुख्य म्हणजे ते आपल्या जीवनातही आणावेत जेणेकरून देशाला आदर्श बनवण्याचे डॉ. आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होईल.</p>
<p>
	 </p>
<p>
	जय भारत, जय भीम</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 04 Apr 2023 11:21:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 04 Apr 2023 11:24:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महापरिनिर्वाण दिन : जेव्हा अत्रे म्हणाले, 'या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटतीये']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/mahaparinirvana-day-atre-122120600011_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/mahaparinirvana-day-atre-122120600011_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2018-01/18/thumb/1_1/1516272444-3474.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2018-01/18/thumb/1_1/1516272444-3474.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर 5 डिसेंबर 1956 च्या रात्री झोपले आणि त्याच झोपेत मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 6 डिसेंबरची सकाळ बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता घेऊनच उजाडली.

 शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या बाबासाहेबांच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="500" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2018-01/18/full/1516272444-3474.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="500" /></p>
	Author,नामदेव काटकर</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर 5 डिसेंबर 1956 च्या रात्री झोपले आणि त्याच झोपेत मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 6 डिसेंबरची सकाळ बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता घेऊनच उजाडली.</p>
<p>
	 </p>
<p>
	 शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळला. बाबासाहेबांच्या निधनाच्या वार्ता देशासह जगभर वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र एकच हंबरडा फुटला.</p>
<p>
	 </p>
<p>
	 दिल्लीतल्या ‘26,अलिपूर रोड’या निवासस्थानी बाबासाहेबांचं निधन झालं. तिथून त्यांचं पार्थिव नागपूर मार्गे मुंबईत आणलं गेलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	 बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आल्यानंतर प्रचंड गर्दी जमली. अंत्ययात्रेला ‘न भूतो न भविष्यति’संख्येत लोक आले. अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोनं मुंबापुरीचा आसमंत व्यापला गेला.</p>
<p>
	 </p>
<p>
	‘26,अलिपूर रोड’ते ‘चैत्यभूमी’अशी बाबाबासाहेबांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यादरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कुणी-कुणी अंत्यदर्शनसाठी उपस्थिती लावली आणि अंत्ययात्रा नेमकी कशी होती, याबाबत विस्तृतपणे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.</p>
<p>
	 </p>
<p>
	 तत्पूर्वी, आपण बाबासाहेबांचं निधन झाल्याचं कळताच, दिल्लीत काय घडामोडी घडल्या आणि पार्थिव मुंबईत नेण्याचं कधी ठरलं, हे जाणून घेऊ.</p>
<p>
	 </p>
<p>
	 बाबासाहेबांचं निधन झाल्याचं कळलं आणि...</p>
<p>
	6 डिसेंबर 1956 च्या सकाळी नेहमीप्रमाणे सविता (माईसाहेब) आंबेडकर बाबासाहेबांना उठवायला गेल्या. सकाळच्या सात-साडेसात वाजले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. दोन-तीन वेळा हाक मारून पाहिल्यानंतरही बाबासाहेब उठले नाहीत, म्हणून हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचं झोपेतच निधन झाल्याचं त्यांना कळलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	दुसऱ्या क्षणाला माईसाहेबांनी हंबरडा फोडला आणि त्याच थरथरत्या आवाजात माईसाहेबांनी सुदामाला हाक मारली. सुदामा माईसाहेब आणि बाबासाहेबांच्या मदतीसाठी ’26, अलिपूर रोड’ निवासस्थानी राहत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	सुदामा धावतच बाबासाहेबांच्या खोलीत आले. त्यानंतर माईसाहेबांनी तातडीनं डॉ. मालवणकरांना फोन लावला. हे डॉ. मालवणकर बाबासाहेबांचे स्नेही आणि डॉक्टर होते. त्यांनी कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. मात्र, बाबासाहेबांचा मृत्यू होऊन अनेक तास उलटून गेले होते. त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यानंतर माईसाहेबांनी सुदामा यांना गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना बोलावण्यासाठी पाठवलं. नानकचंद रट्टू हे बाबासाहेबांचे जवळपास 17 वर्षांपासूनचे सहकारी होते. दिल्लीत बाबासाहेबांना हवं-नको ते सर्वकाही नानकचंद रट्टू पाहत. ते आदल्या रात्रीच म्हणजे 5 डिसेंबरला बाबासाहेबांनी सांगितलेली पत्र टाईप करून घरी परतले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	सुदामा गाडी घेऊन नानकचं रट्टूंना आणण्यासाठी गेले आणि तातडे घेऊन आले. रट्टू आल्यानंतर तेही ओक्साबोक्सी रडू लागले. काही वेळानं माईसाहेब आणि नानाकचंद रट्टूंनी बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यानुसार नानकचंद रट्टूंनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI), यूएनआय, आकाशवाणी केंद्र आणि सरकारी खात्यांना फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली.</p>
<p>
	 </p>
<p>
	वणव्यासारखी ही वार्ता सर्वदूर पसरली आणि हजारो अनुयायी ’26, अलिपूर रोड’ या दिल्लीस्थित निवासस्थानाकडे येऊ लागले.</p>
<p>
	 </p>
<p>
	दिल्ली विमानतळापर्यंत पार्थिव आणताना अंत्ययात्रेचं रूप</p>
<p>
	नानकचंद रट्टूंनी सरकारी खात्यांना बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली होती. त्यामुळे नेहरूंच्या मंत्रिमंडळातील मंत्री, खासदारही ‘26, अलिपूर रोड’ निवासस्थानी आले. माईसाहेबांनी बाबासाहेबांचं पार्थिव सुदामा आणि नानकचंद रट्टूंच्या मदतीने हॉलमध्ये ठेवला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वत: पंडित जवाहरलाल नेहरूही अंत्यदर्शनासाठी आले. माईसाहेब त्यांच्या ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या आत्मचरित्रात लिहितात की, ‘नेहरूंनी माझे सांत्वन केले. साहेबांच्या वयाबद्दल, प्रकृतीबद्दल, आजारपणाबद्दल, कधी व कसे निधन झाले वगैरेची अत्यंत आस्थेने चौकशी केली. मी त्यांना सविस्तर माहिती दिली.’</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यानंतर केंद्रीय मंत्री बाबू जगजीवनराम अंत्यदर्शनासाठी आले. ते बाबासाहेबांना मानत असत. त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करणार याबाबत विचारणा केली. त्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्याचे माईसाहेबांनी सांगितल्यावर पार्थिव नेण्यासाठी निम्म्या किमतीत विमान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जगजीवनराम यांनी केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	6 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 26, अलिपूर रोड निवासस्थानीच बाबासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर एका सजवलेल्या ट्रकवर पार्थिव ठेवून सफदरजंग विमानतळाच्या दिशेनं नेण्यात आलं. बाबासाहेबांच्या पार्थिवाशेजारी माईसाहेब आंबेडकर, भदंत आनंद कौसल्यायन, सोहनलाल शास्त्री, नानकचंद रट्टू इत्यादी लोक पार्थिवाशेजारी होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	दिल्लीतल्या सफदरजंग विमानतळावरून रात्री 10.30 वाजता विमान सुटणार होते. संसद भवनापर्यंत पार्थिव ठेवलेल्या ट्रकमागे हजारोंच्या संख्येत लोक चालत होते. दिल्लीतल्या निवासस्थानापासून सफदरजंग हा जवळपास अर्धा ते पाऊणतासाचा रस्ता गाठण्यासाठी रात्रीचे दहा वाजले. विमानताच्या आवारातही मोठ्या संख्येत अनुयायी जमा झाले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	पार्थिव घेऊन विमान दिल्लीतून मुंबईत</p>
<p>
	बाबासाहेबांचं पार्थिव घेऊन विमान दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं रात्री साडेदहा वाजता निघालं. माईसाहेब, नानकचंद रट्टू, आनंद कौसल्यायन यांच्यासह एकूण दहा-एक जण विमानात होते. हे विमान नागपुरात थांबवण्यात आलं. तिथे बाबासाहेबांना वंदन करण्यात आलं आणि विमान मुंबईच्या दिशेनं उडालं.</p>
<p>
	 </p>
<p>
	विमान रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी (7 डिसेंबर 1956) मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावर उतरलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे, हे कळल्यावर राज्यासह देशभरातून लोकांचे थवेच्या थवे मुंबईत आले होते. आपला मायबाप गेल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	सांताक्रूझ विमानतळावरून रात्री 2.25 वाजता रुग्णावाहिकेत पार्थिव ठेवून, रुग्णवाहिका राजगृहाच्या दिशेनं निघाली. सांताक्रूझ ते दादर या रस्त्यादरम्यान मध्यरात्रीच्या वेळीही रस्त्याच्या दुतर्फा लोक फुलं घेऊन उभी होती आणि रुग्णवाहिका जवळ येताच तिच्यावर फुलं टाकून ढसाढसा रडत होती, असं चांगदेव खैरमोडे बाबासाहेबांवरील चरित्रात सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	रात्रीचा वेळ असूनही राजगृहावर रुग्णवाहिका पोहोचायला दोन तासांचा अवधी गेला. पहाटे 4.35 वाजता राजगृहावर बाबासाहेबांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका राजगृहावर पोहोचली, तेव्हा राजगृहाला लोकांनी वेढा घातला होता. हजारोंच्या संख्येत लोक जमा झाले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मृतदेह कुठे ठेवावा, यावर चर्चा सुरू झाली, तेव्हा भाऊराव गायकवाड आणि शंकरानंद शास्त्रींनी सांगितलं की, राजगृहाच्या पोर्चमध्येच पार्थिव ठेवावं, जेणेकरून लोकांना नीट दर्शन घेता येईल. मग आधी राजगृहात पार्थिव नेण्यात आलं आणि नंतर बाहेर पोर्चमध्ये ठेवण्यात आलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेब तिथं आल्या, तेव्हा त्या रडत होत्या. चांगदेव खैरमोडे लिहितात की, ‘माईसाहेबांना रडताना पाहून लोक तुच्छतेने टोचून बोलत होते. ते मी स्वत: ऐकले.’</p>
<p>
	 </p>
<p>
	दोन रांगा पुरुषांसाठी आणि दोन रांगा स्त्रियांसाठी करून, दर्शन घेण्यास सांगितलं गेलं. नप्पू रोडवरील रांगा राजगृहापासून दक्षिणेला फाळके रोडपर्यंत, तर खारेघाट रोडच्या रांगा किंग जॉर्ज (आताचं राजा शिवाजी) स्कूलच्या बाजूने सरकत होत्या. अर्धा मिनिट उभं राहून अनुयायांना पुढे सरकवावं लागत होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईचे तत्कालीन महापौर मिरजकर आणि कम्युनिस्ट नेते डॉ. रा. बा. मोरे हे हार घेऊन अंत्यदर्शनासाठी आले. ‘बाबासाहेब, दलितांचे राज्या स्थापण्याच्या आधीच निघून गेलात,’ असं तेव्हा मिरजकर म्हणाल्याची नोंद खैरमोडे करून ठेवतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यानंतर 7 डिसेंबरलाच दुपारी एक वाजता बाबासाहेबांचं पार्थिव सजवलेल्या ट्रकवर उंच आसनावर ठेवण्यात आलं. दिल्लीहून ज्या सुटात बाबासाहेबांना आणण्यात आलं होतं, तेच सुट अंत्ययात्रेदरम्यानही होतं. सव्वा एक वाजता राजगृहातून पार्थिव हलवण्यात आलं आणि अंत्यात्रेला सुरुवात झाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबई थांबली होती...</p>
<p>
	बाबासाहेबांच्या निधनामुळे मुंबईतील जवळपास दोन लाख कामगारांनी जवळपास बंदच पाळला होता. 25 कापड गिरण्या पूर्णपणे बंद, तर 5 गिरण्या अंशत: चालू होत्या. परळ, माटुंग्यातील रेल्वे वर्कशॉप संपूर्णत: बंद ठेवण्यात आले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) च्या गोदीतील सुमारे 25 हजार कामगार आले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारत सरकारनं 10 खास अधिकारी अंत्यदर्शनसाठी पाठवले होते, तसंच सांत्वनासाठी पाठवले होते. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि हंगामी राज्यपाल छगला यांनीही शोकप्रदर्शन करणारे संदेश पाठवले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबई हायकोर्टातील हंगामी प्रमुख न्यायमूर्ती एन. एच. सी. कोयाजी आणि औद्योगिक न्यायालयात प्रेसिडंट एम. आर. मेहेर आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	चौपाटीवर जनसागर</p>
<p>
	बाबासाहेबांच्या अंत्ययात्रा राजगृहावरून खोदादाद सर्कल, परळ ट्राम नाका, एल्फिन्स्टन ब्रिज, गोखले रोड, रानडे रोड अशा मार्गाने शिवाजी पार्कजवळील चौपाटीवर पोहोचली. लाखोंच्या संख्येत लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. मुंबईनं एवढी मोठी अंत्ययात्रा क्वचित पाहिली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	मिरवणुकीदरम्यान अंत्ययात्रा सयानी रोड आणि गोखले रोडच्या नाक्यावर आली, तेव्हा मागासवर्ग खात्याचे मंत्री ग. दे. तपासे, बांधकाम मंत्री नाईक-निंबाळकर, उपमंत्री भ. दा. देशमुख, मुंबई सरकारचे मुख्य चिटणीस एम. डी. भन्साळी हेही सहभागी झाले. तसंच, मंधू दंवडते, हॅरीस, आर. डी. भंडारे. बा. चं. कांबळे इत्यादी मंडळीही अंत्ययात्रेत सहभागी झाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	चौपाटीवर व्यासपीठ बनवण्यात आलं होतं. तिथं बाबासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं. पार्थिवाच्या बाजूला माईसाहेब आंबेडकर, पुत्र यशवंतराव आंबेडकर आणि पुतणे मुकुंदराव उभे होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	जळत्या मेणबत्त्या घेऊन इथेच बुद्ध भिक्षूंनी भिक्षू आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पूर्ण केला. हे दृश्य पाहून अंत्यविधीसाठी जमलेल्या जनसागरातून एकच हंबरडा फुटला.   </p>
<p>
	 </p>
<p>
	यानंतर आनंद कौसल्यायन यांनी भाऊराव गायकवाडांना भाषण करण्यास सांगितलं. गायकवाडांनी बाबासाहेब मुंबईत 16 डिसेंबरला बौद्ध धर्माची दीक्षा देण्यास येणार होते, या पुनरुच्चार केला. त्यानंतर लाखो अनुयायांनी पार्थिवासमोरच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.</p>
<p>
	 </p>
<p>
	यानंतर कौसल्यायन यांनी आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंना भाषण करण्यास सांगितलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	‘असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही’</p>
<p>
	आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले, “मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मराणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुंगवावर, एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली?</p>
<p>
	 </p>
<p>
	“महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा, असे भाग्य त्यांना लाभले. भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही. परंतु असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	“झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा बंडखोर, शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत.”</p>
<p>
	 </p>
<p>
	पु. ल. देशपांडेंनी केलं अंत्यसंस्काराचं धावतं वर्णन</p>
<p>
	चंदनाच्या चितेवर डॉ. बाबासाहेबांचं शव ठेवण्यात आलं. त्यानंतर शवाला सशस्त्र पोलीस दलाने त्रिस बंदुकीने बार काढून मानवंदना दिली. बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला यशवंतरावांच्या हस्ते संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी अग्नी दिला.</p>
<p>
	 </p>
<p>
	अखिल भारतीय नभोवाणीने या अंत्यसंस्काराचे धावते वर्णन ध्वनिक्षेपित केले. हे धावते वर्णन ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी केले होते. पु. ल. देशपांडे त्यावेळी आकाशवाणीत नोकरीला होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताच संपूर्ण परिसरत ओक्साबोक्सी रडू लागला. चितेवर कापूर आणि तूप घालण्यात आलं होतं. त्यामुळे ज्वाला उफाळल्या आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते चांगदेव भगवानराव खैरमोडेंनी बाबासाहेबांचे 12 खंडांचे चरित्र लिहिलंय. यातील शेवटच्या म्हणजे 12 व्या खंडात शेवटचं वाक्य वास्तव सांगणारंच होतं. ते वाक्य आहे – ‘सूर्य मावळल्यानंतर काजव्यांचे साम्राज्य सुरू होते, अगदी तशीच स्थिती लागलीच निर्माण झाली.’<br />
	<p>
		Published By -Smita Joshi </p>
	<p>
		 </p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 06 Dec 2022 10:34:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 06 Dec 2022 11:47:22 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनापूर्वी शेवटच्या 24 तासांत काय काय घडलं?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-what-happened-in-the-last-24-hours-before-the-death-of-babasaheb-ambedkar-122120500009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-what-happened-in-the-last-24-hours-before-the-death-of-babasaheb-ambedkar-122120500009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg</image>
      <description><![CDATA[6 डिसेंबर 1956. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं उजाडली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. 

जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	 Author,नामदेव काटकर</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Ambedkar" class="imgCont" height="652" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/full/1649750168-7695.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar" width="740" /></p>
</p>
<p>
	6 डिसेंबर 1956. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं उजाडली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. </p>
<p>
	 </p>
<p>
	जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता. </p>
<p>
	 </p>
<p>
	या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनीही ग्रासलं होतं. मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी अशा असाध्य आजारांनी ते त्रस्त होते. मधुमेहाने त्यांचं शरीर पोखरून जर्जर झाले होते. संधिवाताच्या त्रासामुळे त्यांना अनेक रात्री बिछान्यात तळमळत पडून राहावे लागत असे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या शेवटच्या काही तासांबाबत लिहिताना, त्यांच्या या आजारांचा उल्लेख आवश्यक आहे. शेवटच्या दिवसांमधील बाबासाहेबांच्या प्रकृतीची कल्पना यातून येईल. </p>
<p>
	 </p>
<p>
	पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेतच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. त्याआदल्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबरला काय काय घडलं, हे आपण या लेखातून जाणून घेऊच. तत्पूर्वी, निधनापूर्वी सार्वजनिकरित्या बाबासाहेब शेवटचे कुठे उपस्थित होते, हेही जाणून घेऊ.</p>
<p>
	 </p>
<p>
	राज्यसभेतील शेवटचा दिवस  </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेवटचे सार्वजनिक ठिकाणी दिसले, ते भारताच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत. </p>
<p>
	 </p>
<p>
	1956 च्या नोव्हेंबर महिन्यातले शेवटचे तीन आठवडे बाबासाहेब दिल्लीबाहेर होते. 12 नोव्हेंबरला ते पाटणामार्गे कांठमांडूला गेले. तिथे 14 नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती. </p>
<p>
	 </p>
<p>
	या परिषदेचं उद्घाटन नेपाळचे नरेश राजे महेंद्र यांनी केले. या कार्यक्रमात नेपाळच्या राजेंनी व्यासपीठावर बाबासाहेबांना शेजारीच बसायला सांगितले. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. बाबासाहेबांचं बौद्ध जगतातील स्थान यावरून ठळक दिसून येतो. </p>
<p>
	 </p>
<p>
	काठमांडूत विविध स्थळांना, लोकांच्या भेटीगाठीनं बाबासाहेब थकले होते. त्यात भारतात परतत असताना त्यांनी बौद्धधर्मीय तीर्थस्थळांनाही भेटी दिल्या. काठमांडूत गौतम बुद्धाचं जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला, ऐतिहासिक अशोक स्तंभाला, नंतर परतताना पाटण्याहून बुद्धगयेला बाबासाहेबांनी भेट दिली. </p>
<p>
	 </p>
<p>
	या भल्यामोठ्या प्रवासानंतर 30 नोव्हेंबरला जेव्हा दिल्लीत परतले, तेव्हा ते थकले होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	इकडे राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं. मात्र, प्रकृती बरी नसल्यानं बाबासाहेबांना जाता येत नव्हतं. तरीही 4 डिसेंबरला त्यांनी राज्यसभेत अधिवेशनाला जाण्याचा अग्रह धरला. </p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. मालवणकर बाबासाहेबांसोबत होते. त्यांनी तपासून जाण्यास हरकत नसल्याचं सांगितलं. </p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब राज्यसभेत गेले आणि दुपारीच परतले. दुपारी जेवल्यानंतर ते झोपले. बाबासाहेबांची संसदेतली ही शेवटची भेट ठरली. </p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबईतल्या धर्मांतर सोहळ्याचे नियोजन  </p>
<p>
	राज्यसभेतून आल्यानंतर बाबासाहेबांनी विश्रांती घेतली. त्यानंतर दुपारी सविता (माईसाहेब) आंबेडकरांनी उठवून कॉफी दिली. 26, अलिपूर रोडच्या बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर बाबासाहेब आणि माईसाहेब गप्पा मारत बसले होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	तितक्यात तिथे नानकचंद रट्टू आले.  </p>
<p>
	 </p>
<p>
	16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा नियोजित होता. बाबासाहेबांच्या हस्तेच नागपूरसारखं धर्मांतर व्हावं, असं मुंबईतील नेतेमंडळींना वाटत होतं. तिथे बाबासाहेब आणि माईसाहेब उपस्थित राहणार होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबईतील या धर्मांतर सोहळ्यासाठी जाण्यासाठी 14 डिसेंबरच्या तिकीट आरक्षणाची चौकशी बाबासाहेबांनी रट्टूंकडे केली. प्रकृती पाहता बाबासाहेबांनी विमानानं जावं, असं माईसाहेबांनी म्हटलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	मग त्यानुसार विमानाच्या तिकिटांची व्यवस्था करण्याचे बाबासाहेबांनी रट्टूंना सांगितलं. </p>
<p>
	 </p>
<p>
	नंतर बराच वेळ बाबासाहेब रट्टूंना टायपिंगचा मजकूर सांगत होते. नंतर अकरा-साडेअकराच्या सुमारास बासाहेब झोपले आणि रट्टूंनाही उशीर झाल्यानं ते तिथेच बंगल्यात झोपले.  </p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांचे शेवटचे 24 तास  </p>
<p>
	5 डिसेंबरला म्हणजे निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी साडेआठच्या दरम्यान बाबासाहेब उठले. माईसाहेबांनीच चहाचा ट्रे नेत त्यांना उठवलं. तिथेच दोघांनी चहा घेतला. तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी निघेलेले नानकचंद रट्टू तिथे आले. तेही चहा प्यायले आणि निघाले. </p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांना प्रात:र्विधी उरकण्यासाठी माईसाहेबांनी मदत केली. मग न्याहारीसाठी टेबलावर आणून बसवलं. बाबासाहेब, माईसाहेब आणि डॉ. मालवणकर अशा तिघांनी एकत्रित न्याहारी केली आणि नंतर बंगल्याच्या व्हरांड्यात गप्पा मारत बसले, बाबासाहेबांनी वर्तमानपत्रं वाचली. </p>
<p>
	 </p>
<p>
	मग माईसाहेबांना औषधं, इंजेक्शन देऊन स्वयंपाकघरात कामाला गेल्या. बाबासाहेब आणि डॉ. मालवणकर तिथंच गप्पा मारत बसले. </p>
<p>
	 </p>
<p>
	मग माईसाहेब बारा-साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेल्या. तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत लिहीत-वाचीत बसले होते. ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनालेखनाचं काम ते पूर्ण करत होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या. जेवण झाल्यावर बाबासाहेब झोपले. </p>
<p>
	 </p>
<p>
	दिल्लीतल्या घरात खाण्या-पिण्याच्या वस्तूंसह पुस्तकांपर्यंत माईसाहेब स्वत: खरेदी करत असत. बाबासाहेब संसदेत गेले असताना किंवा झोपलेले असताना त्या ही कामं करत. </p>
<p>
	 </p>
<p>
	5 डिसेंबरलाही बाबासाहेब झोपलेले असतानाच त्या खरेदीसाठी बाजारात गेल्या. डॉ. मालवणकर त्याच रात्री म्हणजे 5 डिसेंबरला विमानानं मुंबईला जाणार होते. त्यांना मुंबईला नेण्यासाठी काही खरेदी करायची होती, म्हणून तेही माईसाहेबांसोबत बाजारात गेले. </p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब झोपलेले असल्यानं त्यांची झोपमोड टाळण्यासाठी ते न सांगताच गेले. दुपारी अडीचच्या सुमारास बाजारात गेलेले माईसाहेब आणि डॉ. मालवणकर संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परतले. तेव्हा बाबासाहेब रागात होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेबांनी त्यांच्या ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या आत्मचरित्रात म्हटलंय की, ‘साहेब रागात येणे ही काही नवीन गोष्ट नव्हती. त्यांचे पुस्तक जरी जागेवर सापडलं नाही, पेन जागेवर सापडलं नाही, तर साहेब सारा बंगला डोक्यावर घेत. जरासे मनाविरुद्ध घडले वा अपेक्षेप्रमाणे झाले नाही की त्यांचा रागाचा पारा चटकन् वर चढे. त्यांचा राग म्हणजे गडगडाट वाटे. पण साहेबांचा राग क्षणिक असे. हवे असलेले पुस्तक, वही वा कागद सापडला म्हणजे दुसऱ्या क्षणी त्यांचा राग कोठे पळून जात असे.’ </p>
<p>
	 </p>
<p>
	बाजारातनं आल्यावर त्या थेट बाबासाहेबांच्या खोलीतच गेल्या. आपण वाटत पाहत असल्याचं बाबासाहेबांनी सांगितलं. मग त्यांना समजावून माईसाहेब बाबासाहेबांसाठी कॉफी बनवण्यासाठी थेट स्वयंपाकघरातच गेल्या. </p>
<p>
	 </p>
<p>
	रात्री 8 वाजता जैन धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बाबासाहेबांसोबत पूर्वनियोजित भेट होती. बाबासाहेब आणि ते शिष्टमंडळ दिवाणखान्यात बौद्धधर्म-जैनधर्मावर चर्चा करत होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	चांगदेव खैरमोडेंनी बाबासाहेबांच्या चरित्राच्या 12 व्या खंडात लिहिल्याप्रमाणे, 6 डिसेंबरला जैनांचे संमेलन भरणार होते आणि त्यात जैन मुंनींबरोबर चर्चा करून जैन धर्म आणि बौद्ध धर्मात ऐक्य घडवण्यासाठी बाबासाहेबांनी चर्चा करावी, असं त्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं. </p>
<p>
	 </p>
<p>
	याचदरम्यान डॉ. मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले. बाबासाहेब शिष्टमंडळासोबत चर्चेत अडकले होते. डॉ. मालवणकरांनी परवानगी घेतली आणि ते विमानतळाच्या दिशेनं निघाले, असं माईसाहेबांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मात्र, चांगदेव खैरमोडेंनी बाबासाहेबांवरील चरित्रात म्हटलंय की, ‘डॉ. मालवणकर निघताना बाबासाहेबांशी चकार शब्द बोलले नाहीत.’ </p>
<p>
	 </p>
<p>
	नंतर जैन धर्मियांचं शिष्टमंडळही निघून गेलं. “दुसऱ्या दिवशी (6 डिसेंबर) संध्याकाळची माझ्या सेक्रेटरींकडून माझी वेळ घ्या, आपण चर्चा करू,” असं बाबासाहेबांनी त्या शिष्टमंडळला सांगितलं होतं. </p>
<p>
	 </p>
<p>
	मग बाबासाहेबा ‘बुद्धमं सरणं गच्छमि’ या बुद्धवंदनेच्या ओळी शांतपणे म्हणू लागले. </p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेब सांगतात की, बाबासाहेब आनंद मन:स्थितीत असले म्हणजे ते बुद्धवंदना आणि कबिराचे दोहे म्हणत असत. </p>
<p>
	 </p>
<p>
	थोड्या वेळाने माईसाहेबांनी दिवानखाण्यात डोकावून पाहिले तेव्हा बाबासाहेब रेडिओग्रॅमवर बुद्धवंदनेची तबकडी लावण्यास नानकचंद रट्टूंना सांगत होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	मग जेवणाची वेळ झाल्यावर जेवणाच्या टेबलावर बसले. त्या दिवशी बाबासाहेबांनी थोडेच जेवण केले. त्यांचं जेवण झाल्यावर माईसाहेब जेवायला बसल्या. माईसाहेबांचं जेवण होईपर्यंत बाबासाहेब तिथेच बसले. ‘चलो कबीर तेरा भवसगर डेरा’ हा कबीरांचा दोहा बाबासाहेब तालसुरात गात होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	मग काठीच्या आधाराने ते शयनगृहाकडे वळले. त्यांच्या हातात काही ग्रंथही होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	 जाता जाता बाबासाहेबांनी नानकचंद रट्टूंना ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’च्या प्रस्तावनेची प्रत आणि एस. एम. जोशी, आचार्य अत्रेंसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रती टेबलावर ठेवण्यास सांगितल्या. मग ते काम करून नानकचंद रट्टूही त्यांच्या घरी गेले. माईसाहेब स्वयंकापघरात आवाराआवरीच्या कामात गुंतल्या. </p>
<p>
	 </p>
<p>
	...आणि बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं  </p>
<p>
	माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब रात्री उशिरापर्यंत लिहित-वाचीत बसत. बऱ्याचदा त्यांची तंद्री लागली तर अखंड रात्र त्यांचं वाचन-लिखाण चालत असे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण 5 डिसेंबरच्या रात्री नानकचंद रट्टू गेल्यानंतर बाबासाहेबांनी ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली. </p>
<p>
	 </p>
<p>
	मग एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रेंना, तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडेअकराच्या सुमारास झोपी गेले. </p>
<p>
	 </p>
<p>
	अत्यंत भावनिक होत माईसाहेब लिहितात की, 5 डिसेंबरची रात्र ही त्यांच्या आयुष्याची अखेरचीच रात्र ठरली. </p>
<p>
	 </p>
<p>
	‘सूर्यास्ता’नं उजाडलेली 6 डिसेंबरची सकाळ  </p>
<p>
	6 डिसेंबर 1956 ला माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या. चहाचा ट्रे तयार करून त्या बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडे गेल्या. सकाळचे सात-साडेसात वाजले होते.  </p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेब लिहितात की, “खोलीत गेल्यावर पाहिलं की, साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. मी साहेबांना दोन-तीनवेळा आवाज दिला. पण त्यांची काही हालचाल दिसली नाही. मला वाटले की, त्यांन गाढ झोप लागली असेल, म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि...” </p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांचे झोपेतच परिनिर्वाण झाले होते. माईसाहेबांना धक्का बसला. त्या तिथेच ओक्साबोक्सी रडू लागल्या. बंगल्यात माईसाहेब आणि मदतनीस सुदामा असे दोघेच होते. माईसाहेबांनी हंबरडा फोडला. त्याच रडवेल्या आवाजात सुदामाला हाक मारली. </p>
<p>
	 </p>
<p>
	मग माईसाहेबांनी डॉ. मालवणकरांना फोन लावला आणि काय करायचं विचारलं. डॉ. मालवणकरांनी ‘कोरामाईन’ इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. पण बाबासाहेबांचं निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते. त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही. तेव्हा मग माईसाहेबांनी सुदामाला पाठवून नानकचंद रट्टूंना बोलावून आणायला सांगितलं. </p>
<p>
	 </p>
<p>
	सुदामा गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना घेऊन आले. मग कुणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागले, तर कुणी कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करू लागले. पण काहीही उपयोग झाला नाही. बाबासाहेब सोडून गेले होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	माईसाहेब सांगतात की, मग तिघांनीही विचारविनियम करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. </p>
<p>
	 </p>
<p>
	नानकचंद रट्टूंनी प्रमुख परिचित लोकांना, सरकारी खात्यांना, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, यूएनआय आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली. ही वार्ता वणव्यासारखी पसरली आणि त्यासोबत बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या वेदनाही वणव्याच्या वेगानं देशभर पसरल्या. </p>
<p>
	 </p>
<p>
	हजारो अनुयायी दिल्लीतल्या 26, अलिपूर रोडच्या दिशेनं येऊ लागले. </p>
<p>
	 </p>
<p>
	चांगदेव खैरमोडे त्यांनी लिहिलेल्या चरित्रात म्हणतात की, ‘बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार सारनाथला करण्याचा आग्रह माईसाहेब करत होत्या.’ मात्र, बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार मुंबईत करण्याचा आग्रह माईसाहेबांनी धरल्याचं त्या आत्मचरित्रात म्हणतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	मात्र, अंत्यसंस्कार मुंबईतच करण्याचा निर्णय झाला. मग दिल्लीतल्या 26, अलिपूर रोडवर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक मंत्री, संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि बाबासाहेबांचे अनुयायी येण्यास सुरुवात झाली. </p>
<p>
	 </p>
<p>
	जगजीवनराम यांनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली आणि त्यानुसारच पुढे पार्थिव नागपूरमार्गे मुंबईच्या दिशेनं नेण्यात आलं. पुढे मुंबईत अभूतपूर्व अंत्ययात्रा देशानं पाहिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनावरून पुढे माईसाहेब आंबेडकरांवर अनेक आरोप झाले. अगदी माईसाहेबांच्याच भाषेत सांगायचं तर बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचं ‘कसोटीपर्व’ सुरू झालं.<br />
	Published By -Smita Joshi </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 05 Dec 2022 08:57:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 05 Dec 2022 09:27:40 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आंबेडकर हे यशस्वी पत्रकार आणि प्रभावी संपादक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-is-a-successful-journalist-and-influential-editor-122041400018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-is-a-successful-journalist-and-influential-editor-122041400018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/14/thumb/1_1/1649920917-2986.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/14/thumb/1_1/1649920917-2986.jpg</image>
      <description><![CDATA[आंबेडकर हे यशस्वी पत्रकार आणि प्रभावी संपादक होते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजात प्रगती होईल, असा त्यांचा विश्वास होता. चळवळीत ते वृत्तपत्र अत्यंत महत्त्वाचे मानत. शोषित आणि दलित समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पाच मासिके ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Ambedkar’s journalism" class="imgCont" height="583" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/14/full/1649920917-2986.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar’s journalism" width="740" /></p>
	</p>
	<strong>पत्रकारिता</strong></p>
<p>
	आंबेडकर हे यशस्वी पत्रकार आणि प्रभावी संपादक होते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजात प्रगती होईल, असा त्यांचा विश्वास होता. चळवळीत ते वृत्तपत्र अत्यंत महत्त्वाचे मानत. शोषित आणि दलित समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पाच मासिके प्रकाशित आणि संपादित केली. त्यांची दलित चळवळ पुढे नेण्यात त्यांना खूप मदत झाली. पक्ष्याप्रमाणे." डॉ. आंबेडकर हे दलित पत्रकारितेचे आधारस्तंभ आहेत कारण ते दलित पत्रकारितेचे पहिले संपादक, संस्थापक आणि प्रकाशक आहेत. आणि त्यावेळी महाराष्ट्रातील शोषित आणि दलित जनता फारशी शिक्षित नव्हती, त्यांना फक्त मराठी समजू शकत होती. अनेक दशके त्यांनी मूकनायक (1920), जनता (1930), बहिष्कृत भारत (1927), समता (1928) आणि प्रबुद्ध भारत (1956) या पाच मराठी नियतकालिकांचे संपादन केले. या पाच पत्रांमध्ये बाबासाहेब आंबेडकर देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर आपले विचार मांडत असत.</p>
<p>
	 </p>
<p>
	साहित्यिक आणि विचारवंत गंगाधर पानतावणे यांनी 1987 मध्ये भारतात प्रथमच आंबेडकरांच्या पत्रकारितेवर पीएच.डी केली. साठी प्रबंध लिहिला त्यात पानतावणे यांनी आंबेडकरांबद्दल लिहिले आहे की, "या मुकनायकाने बहिष्कृत भारतातील लोकांना प्रबुद्ध भारतात आणले. बाबासाहेब हे महान पत्रकार होते."</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>मूकनायक</strong></p>
<p>
	31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेबांनी अस्पृश्यांवर होणाऱ्या अत्याचारांवर प्रकाश टाकण्यासाठी "मूकनायक" नावाचे पहिले मराठी पाक्षिक सुरू केले. आंबेडकर आणि पांडुराम नंदराम भाटकर हे त्याचे संपादक होते. या वृत्तपत्राच्या वरच्या बाजूला संत तुकारामांचे वचन होते. त्यासाठी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून 25 हजार रुपयांची आर्थिक मदतही मिळाली. &#39;मूक नायक&#39; हा सर्व अर्थाने मूक दलितांचा आवाज होता, ज्यात त्यांचे दु:ख बोलले जाते, या पत्राने दलितांमध्ये एक नवीन चैतन्य संचारले आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. आंबेडकर अभ्यासासाठी विलायतला गेले आणि आर्थिक अडचणींमुळे हा पेपर 1923 मध्ये बंद झाला, पण चेतनेची लाट निर्माण करण्याच्या उद्देशात ते यशस्वी झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बहिष्कृत भारत</strong></p>
<p>
	आंबेडकरांनी मूकनायक बंद झाल्यानंतर अल्पावधीतच 3 एप्रिल 1924 रोजी ‘बहिष्कृत भारत’ हे दुसरे मराठी पाक्षिक काढले. त्याचे संपादन डॉ.आंबेडकरांनीच केले होते. हा शोधनिबंध मुंबईहून प्रकाशित झाला. याद्वारे ते अस्पृश्य समाजाच्या समस्या व तक्रारी समोर आणण्याचे तसेच टीकाकारांना उत्तरे देण्याचे काम करत असत. या पत्राच्या संपादकीयात त्यांनी लिहिले आहे की जर बाळ गंगाधर टिळक अस्पृश्यांमध्ये जन्माला आले असते तर त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असा नारा दिला नसता तर ‘अस्पृश्यता निर्मूलन हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे म्हटले असते. या पत्राने दलित प्रबोधनाचे महत्त्वाचे कामही केले. या वृत्तपत्राच्या वरच्या भागावर संत ज्ञानेश्वरांचे वचन होते. या पंधरवड्यासाठी एकूण 34 गुण काढण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे ते नोव्हेंबर 1929 मध्ये बंद झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>समता</strong></p>
<p>
	29 जून 1928 रोजी आंबेडकरांनी "समता" (हिंदी: समानता) हे पत्र सुरू केले. हे पत्र डॉ. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणेसाठी स्थापन केलेल्या समाज समता संघाचे (समता सैनिक दल) मुखपत्र होते. आंबेडकरांनी देवराव विष्णू नाईक यांची संपादक म्हणून नियुक्ती केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>जनता</strong></p>
<p>
	समता पत्र बंद झाल्यानंतर आंबेडकरांनी ते &#39;जनता&#39; या नावाने पुन्हा प्रकाशित केले. या पंधरवड्याचा पहिला अंक 24 फेब्रुवारी 1930 रोजी प्रकाशित झाला. 31 ऑक्टोबर 1930 रोजी ते साप्ताहिक झाले. 1944 मध्ये, बाबासाहेबांनी त्यात "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकासह एक प्रसिद्ध लेख लिहिला. या पत्राद्वारे आंबेडकरांनी दलितांच्या समस्या मांडण्याचे मोठे काम केले. फेब्रुवारी 1956 पर्यंत, म्हणजे एकूण 26 वर्षे हे पत्र चालू राहिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>प्रबुद्ध भारत</strong></p>
<p>
	आंबेडकरांनी 4 फेब्रुवारी 1956 रोजी पाचव्यांदा प्रबुद्ध भारत सुरू केला. त्यांनी &#39;जनता&#39; याचे नाव बदलून &#39;प्रबुद्ध भारत&#39; केले. या पत्राच्या मुखपृष्ठावर &#39;अखिल भारतीय दलित महासंघाचे मुखपत्र&#39; छापण्यात आले होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद झाले. 11 एप्रिल 2017 रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त, बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी "प्रबुद्ध भारत" ची नवीन सुरुवात करण्याची घोषणा केली आणि 10 मे 2017 रोजी त्याचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि तो पाक्षिक सुरू झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	या वृत्तपत्रांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्या विचारांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांचे प्रबोधन केले. त्यामुळे दलितांच्या विचारात आणि जीवनात बदल झाला.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Apr 2022 12:48:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 14 Apr 2022 12:52:03 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भीमराव आंबेडकर यांचे पुस्तके आणि इतर कामे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/list-of-books-written-by-dr-bhimrao-ambedkar-122041400017_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/list-of-books-written-by-dr-bhimrao-ambedkar-122041400017_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/14/thumb/1_1/1649919013-4032.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/14/thumb/1_1/1649919013-4032.jpg</image>
      <description><![CDATA[भीमराव आंबेडकर हे प्रतिभावान आणि झुझारू लेखक होते. आंबेडकरांना वाचनाची खूप आवड होती आणि त्यांना लेखनाचीही आवड होती. यामुळे त्यांनी मुंबईतील त्यांच्या राजगृहात एक समृद्ध ग्रंथालय बांधले होते, ज्यामध्ये 50 हजारांहून अधिक पुस्तके होती. त्यांनी आपल्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ambedkar books" class="imgCont" height="574" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/14/full/1649919013-4032.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar books" width="740" /></p>
	</p>
	भीमराव आंबेडकर हे प्रतिभावान आणि झुझारू लेखक होते. आंबेडकरांना वाचनाची खूप आवड होती आणि त्यांना लेखनाचीही आवड होती. यामुळे त्यांनी मुंबईतील त्यांच्या राजगृहात एक समृद्ध ग्रंथालय बांधले होते, ज्यामध्ये 50 हजारांहून अधिक पुस्तके होती. त्यांनी आपल्या लेखणीतून दलित आणि देशाच्या समस्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी लिहिलेल्या महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये अनहिलेशन ऑफ कास्ट, द बुद्ध अँड हिज धम्म, कास्ट इन इंडिया, हू वेअर द शूद्राज?, रिडल्स इन हिंदुइझम इतर सामील आहेत. 32 पुस्तके आणि मोनोग्राफ (22 पूर्ण आणि 10 अपूर्ण पुस्तके), 10 स्मरणपत्रे, पुरावे आणि विधाने, 10 शोधनिबंध, लेख आणि पुस्तक पुनरावलोकने आणि 10 प्रस्तावना आणि भविष्यवाण्या ही त्यांची इंग्रजी भाषेतील कामे आहेत. ते 11 भाषांचे जाणकार होते. ज्यामध्ये मराठी (मातृभाषा), इंग्रजी, हिंदी, पाली, संस्कृत, गुजराती, जर्मन, पर्शियन, फ्रेंच, कन्नड आणि बंगाली समाविष्ट आहे. त्यांनी बहुतांश लेखन इंग्रजीत केले. नेहमीच सक्रिय आणि सामाजिक संघर्षात व्यस्त राहण्याबरोबरच त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके, निबंध, लेख आणि भाषणांचा मोठा संग्रह त्यांच्याकडे आहे. त्याच्याकडे असामान्य प्रतिभा होती. त्यांची साहित्यकृती त्यांच्या विशिष्ट सामाजिक दृष्टीकोनासाठी आणि विद्वत्तेसाठी प्रख्यात आहे, जी त्यांच्या काळातील त्यांची दूरदृष्टी आणि पुढचा विचार दर्शवते. आंबेडकरांचे ग्रंथ भारतासह जगभर मोठ्या प्रमाणावर वाचले जातात. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे त्यांचे &#39;भारतीय बौद्धांचे धर्मग्रंथ&#39; आहे आणि बौद्ध देशांमध्ये महत्त्वाचे आहे. त्यांचे डी.एस्सी. रुपयाच्या समस्येचे व्यवस्थापन: त्याची उत्पत्ती आणि त्याचे निराकरण यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण साहित्य अनेक खंडांमध्ये प्रकाशित करण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने आखली असून त्यासाठी 15 मार्च 1976 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत 2019 पर्यंत &#39;डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे&#39; या नावाने 22 खंड इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले असून त्यांची पृष्ठसंख्या 15 हजारांहून अधिक आहे. या योजनेचा पहिला खंड आंबेडकर यांच्या जन्मदिनी, 14 एप्रिल 1979 रोजी प्रकाशित झाला. या 22 खंडांमध्ये खंड 14 दोन भागात, खंड 17 हा तीन भाग, खंड 18 हा तीन भाग आणि संदर्भ ग्रंथ 2 म्हणजे एकूण 29 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.पण ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. &#39;डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे&#39; या खंडांचे महत्त्व आणि लोकप्रियता लक्षात घेऊन, भारत सरकारच्या &#39;सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय&#39;च्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनने त्याचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली. हे खंड आणि या योजनेंतर्गत आतापर्यंत हिंदी भाषेत "बाबा साहेब डॉ. आंबेडकर: संपूर्ण वामय" या नावाने 21 खंड प्रकाशित झाले आहेत. हे 21 हिंदी खंड फक्त 10 इंग्रजी विभागांचे भाषांतर आहेत. या हिंदी खंडांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. आंबेडकरांचे संपूर्ण लेखन साहित्य महाराष्ट्र शासनाकडे असून, त्यापैकी अर्ध्याहून अधिक साहित्य अप्रकाशित आहे. त्यांचे संपूर्ण साहित्य अद्याप प्रकाशित झालेले नाही, त्यांचे अप्रकाशित साहित्य 45 खंडांपेक्षा जास्त असू शकते.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांचे साहित्य</p>
<p>
	पुस्तके</p>
<p>
	एडमिनिस्ट्रेशन एंड फिनांसेज़ ऑफ़ द ईस्ट इंडिया कंपनी (एम॰ए॰ थीसिस)</p>
<p>
	द एवोल्यूशन ऑफ़ प्रोविंशियल फिनांसेज़ इन ब्रिटिश इंडिया (पीएच॰डी॰ थीसिस, 1917, 1925 मध्ये प्रकाशित)</p>
<p>
	दी प्राब्लम आफ दि रुपी : इट्स ओरिजिन एंड इट्स सॉल्यूशन (डीएस॰सी॰ थीसिस, 1923 मध्ये प्रकाशित)</p>
<p>
	अनाइहिलेशन ऑफ कास्ट्स (जातिव्यवस्थेचा नाश) (मे 1936)</p>
<p>
	विच वे टू इमैनसिपेशन (मे 1936)</p>
<p>
	फेडरेशन वर्सेज़ फ्रीडम (1936)</p>
<p>
	पाकिस्तान और द पर्टिशन ऑफ़ इण्डिया/थॉट्स ऑन पाकिस्तान (1940)</p>
<p>
	रानडे, गांधी एंड जिन्नाह (1943)</p>
<p>
	मिस्टर गांधी एण्ड दी एमेन्सीपेशन ऑफ़ दी अनटचेबल्स (सप्टेबर 1945)</p>
<p>
	वॉट कांग्रेस एंड गांधी हैव डन टू द अनटचेबल्स ? (जून 1945)</p>
<p>
	कम्यूनल डेडलाक एण्ड अ वे टू साल्व इट (मे 1946)</p>
<p>
	हू वेर दी शूद्राज़ ? (ऑक्टोबर 1946)</p>
<p>
	भारतीय राज्यघटनेतील बदलांसाठी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावांपैकी,अनुसूचित जमाती (अस्पृश्य) (1946) वरील त्यांच्या प्रभावाच्या संदर्भात दिलेली टीका</p>
<p>
	द कैबिनेट मिशन एंड द अंटचेबल्स (1946)</p>
<p>
	स्टेट्स एण्ड माइनोरीटीज (1947)</p>
<p>
	महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक प्रोविन्स स्टेट (1948)</p>
<p>
	द अनटचेबल्स: हू वेर दे आर व्हाय दी बिकम अनटचेबल्स (ऑक्टोबर 1948)</p>
<p>
	थॉट्स ऑन लिंगुइस्टिक स्टेट्स: राज्य पुनर्रचना आयोगाच्या प्रस्तावांवर टीका (प्रकाशित 1955)</p>
<p>
	द बुद्धा एंड हिज धम्मा (भगवान बुद्ध आणि त्यांचे धम्म) (1957)</p>
<p>
	रिडल्स इन हिन्दुइज्म</p>
<p>
	डिक्शनरी ऑफ पाली लॅग्वेज (पालि-इग्लिश)</p>
<p>
	द पालि ग्रामर (पालि व्याकरण)</p>
<p>
	वेटिंग फ़ॉर अ वीज़ा (आत्मकथा) (1935-1936)</p>
<p>
	अ पीपल ऐट बे</p>
<p>
	द अनटचेबल्स और द चिल्ड्रेन ऑफ़ इंडियाज़ गेटोज़</p>
<p>
	केन आय बी अ हिन्दू?</p>
<p>
	व्हॉट द ब्राह्मिण्स हैव डन टू द हिन्दुज</p>
<p>
	इसेज ऑफ भगवत गिता</p>
<p>
	इण्डिया एण्ड कम्यूनिज्म</p>
<p>
	रेवोलोटिओं एंड काउंटर-रेवोलुशन इन एनशियंट इंडिया</p>
<p>
	द बुद्धा एंड कार्ल मार्क्स (बुद्ध और कार्ल मार्क्स)</p>
<p>
	कोन्स्टिट्यूशन एंड कोस्टीट्यूशनलीज़म</p>
<p>
	ज्ञापन, साक्ष्य और वक्तव्य</p>
<p>
	On Franchise and Framing Constituencies (मताधिकार आणि मतदारसंघ तयार करण्याच्या संदर्भात) (1919)</p>
<p>
	Statement of Evidence to the Royal Commission of Indian Currency (भारतीय चलनाच्या रॉयल आयुक्तालयाला दिलेले पुराव्याचे विवरण) (1926)</p>
<p>
	Protection of the Interests of the Depressed Classes (अत्याचारित/वंचित घटकांच्या हक्कांच्या संरक्षणावरील विधान) (मे 29, 1928)</p>
<p>
	State of Education of the Depressed Classes in the Bombay Presidency (बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील मागासवर्गीयांमधील शिक्षणाच्या पातळीबाबत) (1928)</p>
<p>
	Constitution of the Government of Bombay Presidency (बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारची घटना) (मे 17, 1929)</p>
<p>
	A Scheme of Political Safeguards for the protection of the Depressed in the Future Constitution of a Self- governing India (भविष्यातील स्वशासित भारतीय संविधानात मागासवर्गीयांसाठी राजकीय लसीकरण योजना) (1930)</p>
<p>
	The Claims of the Depressed Classes for Special Represention (मागासवर्गीयांना विशेष प्रतिनिधीत्व देण्याची मागणी) (1931)</p>
<p>
	Franchise and Tests of Untouchability (स्पर्श करण्याच्या चाचण्या आणि विशेषाधिकार) (1932)</p>
<p>
	The Cripps Proposals on Constitutional Advancement (घटनात्मक प्रगतीवर क्रिप्सचा प्रस्ताव) (जुलै 18, 1942)</p>
<p>
	Grievances of the Schedule Castes (अनुसूचित जातीच्या तक्रारी) (ऑक्टोबर 29, 1942)</p>
<p>
	संशोधन दस्तऐवज, लेख आणि पुस्तकांचे पुनरावलोकन</p>
<p>
	कास्ट्स इन इण्डिया : देयर जीनियस, मेकैनिज़म एंड डिवेलपमेंट (1918)</p>
<p>
	(मिस्टर रसेल एंड द रिकंस्ट्रक्शन ऑफ़ सोसाइटी) (1918)</p>
<p>
	स्माल होलिंग्स इन इंडिया एण्ड देयर रेमिडीज (1918)</p>
<p>
	करेंसी एंड एक्सचेंजेज़ (1925)</p>
<p>
	द प्रेजेंट प्रॉब्लम ऑफ द इंडियन करेंसी (अप्रैल 1925)</p>
<p>
	Report of Taxation Enquiry Committee (कर आकारणी चौकशी समितीचा अहवाल) (1926)</p>
<p>
	Thoughts on the Repform of Legal Education in the Bombay Presidency (बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील न्यायिक शिक्षणावरील सुधारणा) (1936)</p>
<p>
	राइजिंग एंड फाल ऑफ हिन्दू वुमन (1950)</p>
<p>
	Need for checks and Balances (चेक आणि बॅलन्सची गरज) (अप्रैल 23, 1953)</p>
<p>
	बुद्ध पूजा पाठ (मराठीत) (नोव्हेंबर 1956)</p>
<p>
	प्रस्तावना आणि भविष्यवाणी</p>
<p>
	Forward to Untouchable Workers of Bombay City (मुंबई शहरातील अस्पृश्य कामगारांचा परिचय) (1938)</p>
<p>
	Forward to commodity Exchange (पुस्तक: कमोडिटी एक्सचेंज प्रस्तावना) (1947)</p>
<p>
	Preface to the Essence of Buddhism (पुस्तक, द एसेंस ऑफ़ बुद्धिजमची भूमिका) (1948)</p>
<p>
	Forward to Social Insurance and India (सोशल इन्शुरन्स एंड इंडिया प्रस्तावना) (1948)</p>
<p>
	Preface to Rashtra Rakshake Vaidik Sadhan (पुस्तक, राष्ट्राच्या संरक्षणासाठी वैदिक माध्यमांची भूमिका) (1948)</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Apr 2022 12:17:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 14 Apr 2022 12:20:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Dr.Ambedkar Jayanti 2022  Marathi Wishes :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-jayanti-2022-marathi-wishes-डॉ-marathi-wishes-for-babasaheb-ambedkar-jayanti-122041300043_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-jayanti-2022-marathi-wishes-डॉ-marathi-wishes-for-babasaheb-ambedkar-jayanti-122041300043_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg</image>
      <description><![CDATA[* निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Ambedkar" class="imgCont" height="450" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/full/1649750168-7695.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar" width="740" /></p>
	* निळ्या रक्ताची धमक बघ</p>
<p>
	स्वाभिमानाची आग आहे,</p>
<p>
	घाबरू नको कुणाच्या बापाला</p>
<p>
	तू भीमाचा वाघ आहे…..</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* फुलांची कथा बहरांनी लिहिली होती</p>
<p>
	ताऱ्यांनी रात्रीची कथा लिहिली</p>
<p>
	आम्ही कोणाचे गुलाम नाही</p>
<p>
	कारण बाबासाहेबांनी आमचे जीवन लिहिले!</p>
<p>
	भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* मनुस्मृती’दहन करून “भारतीय महिलांना”</p>
<p>
	स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास कोटी-कोटी प्रणाम.</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,महाविद्वान,</p>
<p>
	महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,</p>
<p>
	संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,</p>
<p>
	परमपूज्य बोधीसत्व, महामानव,</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.</p>
<p>
	 </p>
<p>
	* ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,</p>
<p>
	दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…</p>
<p>
	कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला</p>
<p>
	ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…</p>
<p>
	डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त</p>
<p>
	सर्वांना हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची</p>
<p>
	तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची</p>
<p>
	तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते</p>
<p>
	तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे</p>
<p>
	खरे महामानव होते.</p>
<p>
	भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,</p>
<p>
	माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,</p>
<p>
	हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,</p>
<p>
	पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,</p>
<p>
	आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला</p>
<p>
	तर आई शपथ ,फक्त आणि फक्त</p>
<p>
	जय भीमवालाच होईल.</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* राजा येतोय संविधानाचा</p>
<p>
	भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार</p>
<p>
	ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,</p>
<p>
	दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…</p>
<p>
	डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त</p>
<p>
	सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती</p>
<p>
	तुम्ही येणार म्हटल्यान</p>
<p>
	नसानसांत भरली स्फूर्ती</p>
<p>
	आतुरता फक्त आगमनाची</p>
<p>
	जयंती माझ्या बाबांची.</p>
<p>
	डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त</p>
<p>
	सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,</p>
<p>
	शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,</p>
<p>
	अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,</p>
<p>
	माझे शत शत नमन चरणी त्यांचे…</p>
<p>
	अश्या महामानवाच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* सागराचे पाणी कधी आटणार नाही,</p>
<p>
	भिमाची आठवण कधी मिटणार नाही,</p>
<p>
	अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,</p>
<p>
	आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	* जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,</p>
<p>
	कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,</p>
<p>
	भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार</p>
<p>
	महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर</p>
<p>
	यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	* भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार</p>
<p>
	ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार</p>
<p>
	दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला</p>
<p>
	डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त</p>
<p>
	सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	* भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार</p>
<p>
	ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार</p>
<p>
	दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला</p>
<p>
	डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त</p>
<p>
	सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	* माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे मोठे</p>
<p>
	त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे</p>
<p>
	डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त</p>
<p>
	सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.</p>
<p>
	 </p>
<p>
	* 14 एप्रिल 1891 ला</p>
<p>
	सोनियाची उगवली सकाळ</p>
<p>
	जन्मास आले भीम बाळ.</p>
<p>
	सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	* दलितांचे ते तलवार होऊन गेले</p>
<p>
	अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,</p>
<p>
	होते ते एक गरीबच पण या जगाचा</p>
<p>
	कोहिनूर होऊन गेले,</p>
<p>
	जग खूप रडवीत होता</p>
<p>
	त्यांना पण ते या जगाला</p>
<p>
	घडवून गेले,</p>
<p>
	अरे या मूर्खाना अजून कळत</p>
<p>
	कस नाही,</p>
<p>
	वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा</p>
<p>
	त्यांनी या भारताचे संविधान लिहूनगेले.</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Apr 2022 07:53:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 14 Apr 2022 08:37:53 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/indian-constitution-is-invaluable-gift-of-babasaheb-ambedkar-122041300012_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/indian-constitution-is-invaluable-gift-of-babasaheb-ambedkar-122041300012_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-04/14/thumb/1_1/1618373508-0235.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-04/14/thumb/1_1/1618373508-0235.jpg</image>
      <description><![CDATA[गांधी आणि काँग्रेसवर कडवट टीका करूनही आंबेडकरांना एक अद्वितीय विद्वान आणि कायदेतज्ज्ञ अशी ख्याती होती. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार अस्तित्वात आले तेव्हा त्यांनी आंबेडकरांना देशाचे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left; width: 100%;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-04/14/full/1618373508-0235.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" />आंबेडकर संविधान निर्मिती</p>
</p>
<p>
	गांधी आणि काँग्रेसवर कडवट टीका करूनही आंबेडकरांना एक अद्वितीय विद्वान आणि कायदेतज्ज्ञ अशी ख्याती होती. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार अस्तित्वात आले तेव्हा त्यांनी आंबेडकरांना देशाचे पहिले कायदा व न्याय मंत्री म्हणून काम करण्याचे निमंत्रण दिले, जे त्यांनी स्वीकारले. 29 ऑगस्ट 1947 रोजी, आंबेडकरांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्यासाठी राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. आंबेडकरांनी सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या विधींचा आणि इतर बौद्ध ग्रंथांचा अभ्यासही संविधान बनवण्याच्या कामात उपयोगी पडला.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर हे एक बुद्धिमान घटनातज्ज्ञ होते, त्यांनी सुमारे 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास केला होता. आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे जनक" म्हणून ओळखले जाते. संविधान सभेत, मसुदा समितीचे सदस्य टी. टी. कृष्णमाचारी म्हणाले:</p>
<p>
	 </p>
<p>
	"सभापती महोदय, मी सभागृहातील अशा लोकांपैकी एक आहे ज्यांनी डॉ. आंबेडकरांचे खूप लक्षपूर्वक ऐकले आहे. मला या संविधानाचा मसुदा तयार करताना काम आणि उत्साहाची जाणीव आहे." त्याच वेळी, मला असे वाटते की या वेळी आपल्यासाठी संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या उद्देशाकडे जे लक्ष देणे आवश्यक आहे, त्याकडे मसुदा समितीने लक्ष दिले नाही. सदनाला कदाचित सात सदस्यांची माहिती आहे. आपण नामनिर्देशित एकाने सभागृहाचा राजीनामा दिला होता आणि त्यांची जागा घेतली होती. एकाचा मृत्यू झाला होता आणि कोणीही बदलले नाही. एक जण अमेरिकेत होता आणि त्याची जागा भरली गेली नाही आणि दुसरी व्यक्ती राज्याच्या कारभारात व्यस्त होती आणि त्या प्रमाणात पोकळी होती. एक किंवा दोन लोक दिल्लीपासून दूर होते आणि कदाचित प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना सहभागी होऊ दिले नाही. त्यामुळे शेवटी असे घडले की या संविधानाचा संपूर्ण भार डॉ. आंबेडकरांवर पडला आणि आपण त्यांचे आभारी आहोत यात मला शंका नाही. हे कार्य साध्य केल्यामुळे, मी निःसंशयपणे ते प्रशंसनीय मानतो."</p>
<p>
	 </p>
<p>
	ग्रॅनविले ऑस्टिन यांनी आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेचे वर्णन &#39;पहिले आणि सर्वात महत्त्वाचे सामाजिक दस्तऐवज&#39; असे केले. &#39;भारतातील बहुतांश घटनात्मक तरतुदी एकतर थेट सामाजिक क्रांतीचे कारण पुढे नेण्याच्या प्रयत्नात पोहोचल्या आहेत किंवा या क्रांतीला तिच्या यशासाठी आवश्यक परिस्थिती प्रस्थापित करून प्रोत्साहन देण्यासाठी आहेत.&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मजकूर धार्मिक स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्व प्रकारच्या भेदभावाचे उल्लंघन यासह वैयक्तिक नागरिकांच्या नागरी स्वातंत्र्याच्या विस्तृत श्रेणीसाठी घटनात्मक हमी आणि संरक्षण प्रदान करतो. आंबेडकरांनी महिलांच्या सर्वसमावेशक आर्थिक आणि सामाजिक हक्कांसाठी आणि अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) सदस्यांसाठी नागरी सेवा, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी युक्तिवाद केला, जे सकारात्मक होते आणि सुरुवातीला ते जिंकले. असेंब्लीचे समर्थन, जे होकारार्थी कृती होती.</p>
<p>
	भारताच्या कायदेकर्त्यांनी या उपाययोजनांद्वारे सामाजिक-आर्थिक असमानता आणि भारतातील निराश वर्गासाठी संधींचा अभाव दूर करण्याची आशा व्यक्त केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले. आपले काम पूर्ण केल्यानंतर बोलताना आंबेडकर म्हणाले:</p>
<p>
	 </p>
<p>
	मला असे वाटते की संविधान कार्यक्षम आहे, ते लवचिक आहे परंतु त्याच वेळी देशाला शांतता आणि युद्ध दोन्हीमध्ये एकसंध ठेवण्यासाठी पुरेसे मजबूत आहे. खरे तर मी असे म्हणू शकतो की कधी काही चुकले तर त्याचे कारण असे नाही की आपली राज्यघटना वाईट होती, पण त्याचा वापर करणारा माणूस हीन दर्जाचा होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	कलम 370 च्या विरोधात निषेध</p>
<p>
	जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणार्‍या आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध घटनेत समाविष्ट केलेल्या भारतीय संविधानाच्या कलम 370 ला आंबेडकरांनी विरोध केला. बलराज मधोक यांनी म्हटल्याप्रमाणे, आंबेडकरांनी काश्मिरी नेते शेख अब्दुल्ला यांना स्पष्टपणे सांगितले होते: "तुम्हाला भारताने तुमच्या सीमांचे रक्षण करायचे आहे, तुमच्या हद्दीत रस्ते बांधले पाहिजेत, तुम्हाला धान्य पुरवले पाहिजे. आणि काश्मीरला भारतासारखाच दर्जा दिला पाहिजे. पण भारत सरकारला फक्त मर्यादित अधिकार असले पाहिजेत आणि भारतीय लोकांना काश्मीरमध्ये कोणतेही अधिकार नसावेत. या प्रस्तावाला संमती देणे, भारताचा कायदा मंत्री म्हणून मी भारताच्या हिताच्या विरोधात विश्वासघात करणारी गोष्ट आहे, असे कधीही होणार नाही. " मग अब्दुल्ला नेहरूंशी संपर्क साधला, त्यांनी त्यांना गोपाल स्वामी अय्यंगार यांच्याकडे निर्देशित केले, त्यांनी वल्लभभाई पटेल यांच्याशी संपर्क साधला आणि सांगितले की नेहरूंनी स्काचे वचन दिले होते. नेहरू परदेश दौऱ्यावर असताना पटेल यांनी अनुच्छेद पारित केले होते. ज्या दिवशी हा लेख चर्चेसाठी आला, त्या दिवशी आंबेडकरांनी त्यावरील प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर इतर लेखांवर भाग घेतला. सर्व युक्तिवाद कृष्ण स्वामी अय्यंगार यांनी केले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	समान नागरी संहिता</p>
<p>
	आंबेडकर प्रत्यक्षात समान नागरी संहितेच्या बाजूने होते आणि काश्मीरच्या बाबतीत कलम 370 ला विरोध करत होते. आंबेडकरांचा भारत आधुनिक, वैज्ञानिक विचार आणि तर्कशुद्ध विचारांची भूमी असती, ज्यामध्ये वैयक्तिक कायद्याला स्थान मिळाले नसते, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. संविधान सभेतील चर्चेदरम्यान, आंबेडकरांनी समान नागरी संहिता स्वीकारण्याची शिफारस करून भारतीय समाजात सुधारणा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या हिंदू कोड बिलाचा (हिंदू कोड बिल) मसुदा संसदेत रोखण्यात आल्यानंतर आंबेडकरांनी 1951 मध्ये मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाद्वारे भारतीय महिलांना अनेक अधिकार देण्याची चर्चा होती. या मसुद्यात उत्तराधिकार, विवाह आणि अर्थव्यवस्थेच्या कायद्यांमध्ये लैंगिक समानतेची मागणी करण्यात आली होती. पंतप्रधान नेहरू, मंत्रिमंडळ आणि इतर काही काँग्रेस नेत्यांनी याला पाठिंबा दिला असला, तरी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि वल्लभभाई पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने संसद सदस्य याच्या विरोधात होते. आंबेडकरांनी 1952 मध्ये मुंबई (उत्तर मध्य) मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत आंबेडकरांना 123,576 तर नारायण सदोबा काजोळकर यांना 138,137 मते मिळाली, तोपर्यंत ते या सभागृहाचे सदस्य राहिले.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 13 Apr 2022 08:46:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 13 Apr 2022 08:49:27 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आंबडेकरांची धर्मांतराची घोषणा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-s-announcement-of-conversion-122041200034_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-s-announcement-of-conversion-122041200034_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/04/thumb/1_1/1620132472-2994.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/04/thumb/1_1/1620132472-2994.jpg</image>
      <description><![CDATA[बाबासाहेब आंबेडकरांनी 10-12 वर्षे हिंदू धर्मात राहून हिंदू धर्म आणि हिंदू समाज सुधारण्यासाठी, समानता आणि सन्मान मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न केले, परंतु सवर्ण हिंदूंचे हृदय बदलले नाही. उलट त्यांचा निषेध केला आणि हिंदू धर्माचा विध्वंस करणारा म्हटले. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="495" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/04/full/1620132472-2994.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="lord budda" width="619" /></p>
	बाबासाहेब आंबेडकरांनी 10-12 वर्षे हिंदू धर्मात राहून हिंदू धर्म आणि हिंदू समाज सुधारण्यासाठी, समानता आणि सन्मान मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न केले, परंतु सवर्ण हिंदूंचे हृदय बदलले नाही. उलट त्यांचा निषेध केला आणि हिंदू धर्माचा विध्वंस करणारा म्हटले. त्यानंतर ते म्हणाले होते, “हिंदू समाजात समानता आणण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न आणि सत्याग्रह केले, परंतु सर्व निष्फळ ठरले. हिंदू समाजात समानतेला स्थान नाही. हिंदू समाज म्हणतो की "माणूस धर्मासाठी आहे" तर आंबेडकरांचा असा विश्वास होता की "धर्म माणसासाठी आहे". आंबेडकर म्हणाले की, ज्या धर्मात माणुसकीची किंमत नाही अशा धर्माला काही अर्थ नाही. जो धर्म आपल्याच धर्माच्या अनुयायांना (अस्पृश्यांना) धार्मिक शिक्षण घेऊ देत नाही, नोकरी करण्यात अडथळे आणतो, बोलण्यावरून अपमानित करतो आणि पाणीही मिळू देत नाही अशा धर्मात राहण्यात अर्थ नाही. आंबेडकरांनी कोणत्याही प्रकारचे वैर आणि हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली नाही, परंतु त्यांनी काही मूलभूत तत्त्वांवर निर्णय घेतला जे हिंदू धर्माशी अजिबात सुसंगत नव्हते.</p>
<p>
	 </p>
<p>
	13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिकजवळील येवला येथे एका परिषदेत बोलताना आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	"मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही!"</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी आपल्या अनुयायांना हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले. या धर्मांतराच्या घोषणेनंतर, हैदराबादच्या निजामापासून इस्लामच्या अनेक ख्रिश्चन मिशनर्‍यांनी त्यांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली परंतु त्यांनी ती सर्व नाकारली. दलित समाजाची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे, पण परकीय पैशावर अवलंबून न राहता, त्यांच्या मेहनतीने आणि संघटनाने परिस्थिती सुधारली पाहिजे, अशी त्यांची इच्छाही होती. याशिवाय आंबेडकरांना असा धर्म निवडायचा होता ज्याच्या केंद्रस्थानी माणूस आणि नैतिकता असावी, त्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असावी. कोणत्याही परिस्थितीत त्यांना जातिभेद आणि अस्पृश्यतेने कलंकित असलेला धर्म स्वीकारायचा नव्हता किंवा अंधश्रद्धा आणि दांभिकता असलेला धर्म निवडायचा नव्हता.</p>
<p>
	 </p>
<p>
	21 मार्च 1936 च्या &#39;हरिजन&#39;मध्ये गांधी म्हणाले की, &#39;डॉ. आंबेडकरांनी हिंदू समाजात धर्मांतराच्या धोक्याचा भडीमार केला तेव्हापासून त्यांना त्यांच्या निर्धारापासून परावृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे.&#39; इथे गांधीजी पुढे एके ठिकाणी लिहितात, &#39;होय, अशा वेळी (सवर्ण) सुधारकांनी त्यांच्या हृदयाचा शोध घेणे आवश्यक आहे. माझ्या किंवा माझ्या शेजाऱ्यांच्या वागण्याने ते नाखूष असतील तर असे केले जात नाही, असा विचार त्याने केला पाहिजे. ...स्वतःला सनातनी म्हणवणाऱ्या मोठ्या संख्येने हिंदूंचे वर्तन असे आहे की त्यामुळे देशभरातील हरिजनांची मोठी गैरसोय आणि चीड होते हे सर्वमान्य सत्य आहे. आश्चर्य म्हणजे इतक्या हिंदूंनी हिंदू धर्म का सोडला आणि इतरांनीही का सोडला नाही? ही त्यांची वाखाणण्याजोगी निष्ठा किंवा हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व आहे की त्या धर्माच्या नावाखाली इतके निर्दयी असूनही लाखो हरिजन त्यात राहतात.&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांनी धर्म परिवर्तनाची घोषणा केल्यानंतर 21 वर्षांच्या कालावधीत त्यांनी जगातील सर्व प्रमुख धर्मांचा सखोल अभ्यास केला. त्याला एवढा वेळ लागण्याचे मुख्य कारण हे देखील होते की त्याने धर्मांतर केल्यावर त्याच्या अधिकाधिक अनुयायांनी त्याच्यासोबत धर्मांतर करावे अशी त्याची इच्छा होती. आंबेडकरांनी बौद्ध धर्माला प्राधान्य दिले कारण त्यात तीन तत्त्वांचे एकात्मिक स्वरूप आहे जे इतर कोणत्याही धर्मात आढळत नाही. बौद्ध धर्म प्रज्ञा (अंधविश्वास आणि अलौकिकतेच्या जागी बुद्धिमत्तेचा वापर), करुणा (प्रेम) आणि समता (समानता) शिकवतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	ते म्हणाले की माणसाला शुभ आणि आनंदी जीवनासाठी या गोष्टी हव्या असतात. देव आणि आत्मा समाजाला वाचवू शकत नाहीत. आंबेडकरांच्या मते, खरा धर्म तो आहे ज्याचे केंद्र मनुष्य आणि नैतिकता आहे, विज्ञान किंवा बौद्धिक घटकांवर आधारित आहे, धर्माचे केंद्र देव नाही, आत्म्याची मुक्ती आणि मोक्ष आहे. त्याचवेळी ते म्हणाले की, धर्माचे कार्य जगाची पुनर्बांधणी करणे हे असले पाहिजे, त्याचे मूळ आणि अंत स्पष्ट करणे नाही. ते लोकशाही समाजव्यवस्थेच्या बाजूने होते, कारण अशा परिस्थितीत धर्म हा मानवी जीवनाचा मार्गदर्शक बनू शकतो यावर त्यांचा विश्वास होता. या सर्व गोष्टी त्याला केवळ बौद्ध धर्मातच आढळल्या.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Apr 2022 15:42:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 12 Apr 2022 15:51:17 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आंबेडकरांची राजकीय कारकीर्द]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-bhimrao-ambedkar-political-journey-122041200023_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-bhimrao-ambedkar-political-journey-122041200023_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/thumb/1_1/1649750168-7695.jpg</image>
      <description><![CDATA[आंबेडकरांची राजकीय कारकीर्द 1926 मध्ये सुरू झाली आणि 1956 पर्यंत त्यांनी राजकीय क्षेत्रात विविध पदांवर काम केले. डिसेंबर 1926 मध्ये, मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबई विधान परिषदेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केले; त्यांनी आपली कर्तव्ये गांभीर्याने ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Ambedkar" class="imgCont" height="652" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/12/full/1649750168-7695.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ambedkar" width="740" /></p>
	</p>
	आंबेडकरांची राजकीय कारकीर्द 1926 मध्ये सुरू झाली आणि 1956 पर्यंत त्यांनी राजकीय क्षेत्रात विविध पदांवर काम केले. डिसेंबर 1926 मध्ये, मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबई विधान परिषदेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केले; त्यांनी आपली कर्तव्ये गांभीर्याने घेतली आणि अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. 1936 पर्यंत ते मुंबई विधान परिषदेचे सदस्य होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	13 ऑक्टोबर 1935 रोजी आंबेडकरांना शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्यांनी दोन वर्षे या पदावर काम केले. दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालयाचे संस्थापक श्री. राय केदारनाथ यांच्या निधनानंतर त्यांनी या महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. आम्बेडकर मुंबईत राहू लागले, येथे त्यांनी एक तीन मजली मोठं घर &#39;राजगृह&#39; निर्मित केले. जेथे त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात 50,000 हून अधिक पुस्तके होते. तेव्हा हे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय होते. त्याच वर्षी 27 मे 1935 रोजी त्यांच्या पत्नी रमाबाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रमाबाईंना मृत्यूपूर्वी तीर्थयात्रेसाठी पंढरपूरला जायचे होते, परंतु आंबेडकरांनी त्यांना परवानगी दिली नाही. आंबेडकर म्हणाले की, हिंदूंच्या यात्रेला जाण्याचे कोणतेही औचित्य नाही, जिथे त्यांना अस्पृश्य मानले जाते, त्याऐवजी त्यांनी त्यांच्यासाठी नवीन पंढरपूर बांधण्याची चर्चा केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	1936 मध्ये, आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, 1937 मध्य विधानसभेच्या निवडणुकीत 13 जागा जिंकल्या. आंबेडकर मुंबई विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. 1942 पर्यंत ते विधानसभेचे सदस्य होते आणि या काळात त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याच वर्षी, आंबेडकरांनी 15 मे 1936 रोजी त्यांचे &#39;अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट&#39; (जातिव्यवस्थेचे उच्चाटन) हे पुस्तक प्रकाशित केले, जे त्यांनी न्यूयॉर्कमध्ये लिहिलेल्या एका पेपरवर आधारित होते. यात त्यांनी हिंदू धार्मिक नेते आणि जाती व्यवस्थेची आलोचना केली. अस्पृश्य समाजाला हरिजन म्हणून संबोधण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र निषेध केला, ही संज्ञा गांधींनी तयार केली होती. नंतर, 1955 च्या बीबीसीच्या मुलाखतीत त्यांनी गांधींवर त्यांच्या गुजराती भाषेतील पेपर्समध्ये जातिव्यवस्थेचे समर्थन केल्याचा आणि त्यांच्या इंग्रजी भाषेतील पेपरमध्ये जातिव्यवस्थेला विरोध केल्याचा आरोप केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती ज्याची स्थापना आंबेडकरांनी 1942 मध्ये दलित समाजाच्या हक्कांसाठी मोहिमेसाठी केली होती. 1942 ते 1946 पर्यंत, आंबेडकरांनी संरक्षण सल्लागार समिती आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेवर कामगार मंत्री म्हणून काम केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला.</p>
<p>
	पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठराव (1940) नंतर आंबेडकरांनी "थॉट्स ऑन पाकिस्तान" नावाचे 400 पानांचे पुस्तक लिहिले, ज्यात "पाकिस्तान" या संकल्पनेचे सर्व पैलूंचे विश्लेषण केले. पाकिस्तानच्या वेगळ्या राज्याच्या मागणीवर टीका केली. असा युक्तिवाद केला की हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तान स्वीकारला पाहिजे. मुस्लिम आणि बिगर मुस्लिम बहुसंख्य भाग वेगळे करण्यासाठी पंजाब आणि बंगालच्या प्रांतीय सीमा पुन्हा रेखाटल्या जाव्यात असा प्रस्ताव त्यांनी मांडला. प्रांतीय सीमा पुन्हा रेखाटण्यास मुसलमानांना हरकत नसावी असे त्यांचे मत होते. जर त्यांनी तसे केले, तर त्यांना "त्यांच्या मागणीचे स्वरूप समजले नाही."</p>
<p>
	 </p>
<p>
	"व्हॉट काँग्रेस एंड गांधी हैव डन टू द अनटचेबल्स?" ("काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले?) या पुस्तकाद्वारे आंबेडकरांनी गांधी आणि काँग्रेस या दोघांवरही दांभिकतेचा आरोप करत आपल्या हल्ल्यांना धार दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय पक्षाचे ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन मध्ये रूपांतर पाहिले, जरी 1946 मध्ये झालेल्या भारतीय संविधान सभेच्या निवडणुकीत त्याचा फारसा परिणाम झाला नाही. नंतर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालमधून ते संविधान सभेवर निवडून आले.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांनी 1952 ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे नॉर्थमधून लढवली, परंतु त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण काजोलकर यांच्याकडून पराभव झाला. 1952 मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. भंडारा येथून 1954 च्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण ते तिसरे आले (काँग्रेस पक्ष जिंकला). 1957 च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी आंबेडकरांचा मृत्यू झाला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकर दोनदा भारतीय संसदेचे सदस्य बनले आणि भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ 3 एप्रिल 1952 ते 2 एप्रिल 1956 असा होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ 3 एप्रिल 1956 ते 2 एप्रिल 1962 या कालावधीत होणार होता, परंतु मुदत संपण्यापूर्वी 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	30 सप्टेंबर 1956 रोजी आंबेडकरांनी "अनुसूचित जाती फेडरेशन" नाकारून "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया" ची स्थापना करण्याची घोषणा केली होती, परंतु पक्षाच्या स्थापनेपूर्वी 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी या पक्षाच्या स्थापनेचे नियोजन केले. पक्ष स्थापनेसाठी 1 ऑक्टोबर 1957 रोजी नागपुरात अध्यक्षपदाची बैठक झाली. या बैठकीला एन.शिवराज, यशवंत आंबेडकर, पी. टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, डी.ए. रुपवते उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी झाली आणि एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Apr 2022 13:24:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 12 Apr 2022 13:26:19 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ भीमराव आंबेडकरांचे शिक्षण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/education-of-dr-bhimrao-ambedkar-122041100059_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/education-of-dr-bhimrao-ambedkar-122041100059_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/09/thumb/1_1/1617954625-9401.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/09/thumb/1_1/1617954625-9401.jpg</image>
      <description><![CDATA[प्राथमिक शिक्षण
आंबेडकरांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा नगर येथील राजवाडा चौकात असलेल्या शासकीय हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) येथे इंग्रजीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar jayanti" class="imgCont" height="450" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/09/full/1617954625-9401.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="dr baba saheb ambedkar" width="740" /></p>
	प्राथमिक शिक्षण</p>
<p>
	आंबेडकरांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा नगर येथील राजवाडा चौकात असलेल्या शासकीय हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) येथे इंग्रजीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. या दिवसापासून त्यांची शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली, म्हणून महाराष्ट्रात 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी त्यांना &#39;भिवा&#39; म्हणत. त्यावेळी &#39;भिवा रामजी आंबेडकर&#39; या शाळेत त्यांचे नाव हजेरी नोंदवहीत अनुक्रमांक - 1914 वर नमूद करण्यात आले होते. भीमरावांनी इंग्रजी चौथ्या इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर अस्पृश्यांमध्ये एक सार्वजनिक सोहळा म्हणून साजरा करण्यात आला, कारण अस्पृश्यांसाठी ते असामान्य होते. त्यांचे कौटुंबिक मित्र आणि लेखक दादा केळुसकर यांनी लिहिलेले &#39;बुद्ध की जीवनी&#39; हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले होते. हे वाचल्यानंतर त्यांना प्रथमच गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माची ओळख झाली आणि त्यांच्या शिकवणीने ते प्रभावित झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	माध्यमिक शिक्षण</p>
<p>
	1897 मध्ये, आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत आले जेथे त्यांनी एल्फिन्स्टन रोडवरील सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.</p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबई विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यास</p>
<p>
	1907 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढील वर्षी त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश केला, जो बॉम्बे विद्यापीठाशी संलग्न होता. या स्तरावर शिक्षण घेणारे ते त्यांच्या समुदायातील पहिले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	1912 पर्यंत, त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) मिळवले आणि बडोदा राज्य सरकारमध्ये काम करायला गेले. त्यांची पत्नी नुकतीच त्यांच्या नवीन कुटुंबात राहायला गेली होती आणि कामाला लागली होती जेव्हा त्यांना त्यांच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी मुंबईला परतावे लागले होते, त्यांचे 2 फेब्रुवारी 1913 रोजी निधन झाले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यास</p>
<p>
	आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी म्हणून (1915-1917) 1913 मध्ये, वयाच्या 22 व्या वर्षी, आंबेडकर युनायटेड स्टेट्समध्ये गेले जेथे त्यांना सयाजीराव गायकवाड तिसरे (बडोद्याचे गायकवाड) यांनी स्थापन केलेल्या योजनेअंतर्गत न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्षांसाठी $11.50 मिळाले. दरमहा बडोदा राज्य शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तेथे पोहोचल्यानंतर लवकरच ते पारशी मित्र नवल भटेना यांच्यासोबत लिव्हिंगस्टन हॉलमध्ये स्थायिक झाले. जून 1915 मध्ये त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) परीक्षा उत्तीर्ण केली, मुख्य विषय म्हणून अर्थशास्त्र आणि इतर विषयांसह समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र. त्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी प्राचीन भारतीय वाणिज्य (प्राचीन भारतीय वाणिज्य) संशोधन कार्य सादर केले. आंबेडकरांवर जॉन ड्यूई आणि लोकशाहीवरील त्यांच्या कार्याचा प्रभाव होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	1916 मध्ये, त्यांना त्यांच्या दुसऱ्या प्रबंधासाठी, नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टोरिक अँड अॅनालिटिकल स्टडीसाठी द्वितीय मास्टर ऑफ आर्ट्स देण्यात आला आणि अखेरीस ते लंडनला गेले. ब्रिटिश भारतातील त्यांच्या तिसर्‍या प्रबंधासाठी त्यांनी 1916 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी प्राप्त केली, त्यांचा प्रबंध प्रकाशित केल्यानंतर 1927 मध्ये अधिकृतपणे पीएचडी प्रदान केली. 9 मे रोजी त्यांनी मानववंशशास्त्रज्ञ अलेक्झांडर यांच्याकडून पीएचडी प्राप्त केली. त्यांनी संशोधन सादर केले. गोल्डनवेझरने आयोजित केलेल्या परिसंवादात भारतातील जाती त्यांची व्यवस्था, उत्पत्ती आणि उत्क्रांती या शीर्षकाचा पेपर, जो त्यांचा पहिला प्रकाशित पेपर होता. त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा त्यांनी तीन वर्षांच्या कालावधीसाठी वापर करून अमेरिकेतील त्यांचा अभ्यासक्रम अवघ्या दोन वर्षात पूर्ण केला आणि 1916 मध्ये लंडनला गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ भीमराव आंबेडकर 1922 मध्ये बॅरिस्टर म्हणून</p>
<p>
	ऑक्टोबर 1916 मध्ये, ते लंडनला गेले आणि त्यांनी ग्रेज इन येथील बॅरिस्टर कोर्स (कायदा अभ्यास) तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांनी अर्थशास्त्रातील डॉक्टरेट प्रबंधावर काम करण्यास सुरुवात केली. जून 1917 मध्ये, बडोदा राज्यातील त्यांची शिष्यवृत्ती संपुष्टात आल्याने त्यांना तात्पुरते शिक्षण सोडून भारतात परतावे लागले. परंतु आल्यावर त्यांचे पुस्तक संग्रह जर्मन पाणबुडीच्या टॉर्पेडोने बुडालेल्या जहाजापासून वेगळ्या जहाजात पाठवले गेले. हा पहिला महायुद्धाचा काळ होता. डॉ भीमराव आंबेडकर बडोदा राज्याचे लष्कर सचिव म्हणून काम करत असताना अचानक त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा भेदभाव झाल्यामुळे निराश झाले आणि त्यांनी खाजगी शिक्षक आणि लेखापाल म्हणून नोकरी सोडली. त्याने स्वतःचा सल्ला व्यवसाय देखील सुरू केला जो त्याच्या सामाजिक स्थितीमुळे अयशस्वी झाला. मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड सिडनम या त्यांच्या एका इंग्रजामुळे त्यांना मुंबईच्या सिडनम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. 1920 मध्ये कोल्हापूरचे शाहू महाराज आपल्या पारशी मित्राच्या मदतीने आणि काही वैयक्तिक बचतीच्या मदतीने पुन्हा एकदा इंग्लंडला परत येऊ शकले आणि 1921 मध्ये त्यांनी मास्टर ऑफ सायन्स (M.Sc.) मिळवले, ज्यासाठी त्यांनी &#39;प्रांतीय&#39; पदवी मिळविली. &#39;प्रोवेन्शियल डीसेन्ट्रलाईज़ेशन ऑफ इम्पीरियल फायनेन्स इन ब्रिटिश इण्डिया&#39; (ब्रिटिश भारतातील शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) सादर केले. त्यांची ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टर म्हणून नियुक्ती झाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	"द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन" या विषयावर त्यांचा प्रबंध होता. लंडनमधील शिक्षण पूर्ण करून भारतात परतले, भीमराव आंबेडकर तीन महिने जर्मनीत राहिले, तेथे त्यांनी बॉन विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू ठेवला. मात्र वेळेच्या कमतरतेमुळे ते विद्यापीठात जास्त काळ राहू शकले नाहीत. त्यांची तिसरी आणि चौथी डॉक्टरेट (LL.D., कोलंबिया विद्यापीठ, 1952 आणि D.L.D., उस्मानिया विद्यापीठ, 1953) मानद पदवी होती.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 11 Apr 2022 22:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2022 22:34:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भीमराव आंबेडकर कुटुंब माहिती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/bhimrao-ambedkar-family-information-122041100038_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/bhimrao-ambedkar-family-information-122041100038_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/04/thumb/1_1/1649053163-0442.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/04/thumb/1_1/1649053163-0442.jpg</image>
      <description><![CDATA[भारतीय राजकारणात खोलवर प्रभाव टाकणारे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची चौथी पिढी आता लोकांमध्ये आहे. त्यात काही कार्यकर्ते आहेत तर काही दलित चळवळ बळकट करण्यात हातभार लावत आहेत. आंबेडकर हे नाव या देशात खूप प्रसिद्ध आहे. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="baba saheb ambedkar ramabai" class="imgCont" height="580" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/04/full/1649053163-0442.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="baba saheb ambedkar ramabai" width="735" /></p>
	भारतीय राजकारणात खोलवर प्रभाव टाकणारे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची चौथी पिढी आता लोकांमध्ये आहे. त्यात काही कार्यकर्ते आहेत तर काही दलित चळवळ बळकट करण्यात हातभार लावत आहेत. आंबेडकर हे नाव या देशात खूप प्रसिद्ध आहे. आंबेडकरांचे कुटुंब किती मोठे होते ते जाणून घेऊया. त्यानंतर या कुटुंबाचे काय झाले? घरातील सदस्यांनी काय केले?</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकर यांना पाच अपत्ये झाली, पण यशवंत वगळता इतर चार मुले बालपणातच मरण पावली. रमाबाई 15 वर्षांच्या असताना त्यांचा विवाह झाला. तेव्हा रमा या 9 वर्षांच्या होत्या. रामा यांचे वयाच्या 37 व्या वर्षी निधन झाले. जरी त्या बराच काळ आजारी राहिल्या तरी आंबेडकरांच्या प्रगती आणि उच्च शिक्षणासाठी त्यांचे योगदान आणि समर्पण खूप मोठे होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांनीही त्यांच्या ‘दॅट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकातून त्यांच्या त्याग आणि कुटुंबाप्रती समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 1941 मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक त्यांनी त्यांची पहिली पत्नी रमाबाई यांना समर्पित केले. 1935 मध्ये प्रदीर्घ आजाराने रमाबाईंचे निधन झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	चाळीशीच्या दशकात आंबेडकरांची तब्येत ढासळू लागली आणि त्यांचा मधुमेह शरीरावर नियंत्रणाबाहेर होत होता, तेव्हा मुंबईत डॉक्टर म्हणून सविता यांनी आंबेडकरांना बरे केले. त्या ब्राह्मण कुटुंबातील होत्या. आंबेडकरांनी त्यांच्याशी दुसरे लग्न केले. मात्र आंबेडकरांच्या कुटुंबात या लग्नाला विरोध होता. 1948 मध्ये सवितासोबत त्यांचा विवाह झाला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबेडकरांनी नंतर पुस्तकाच्या रूपात सविताबद्दल लिहिले की तिच्या उपचाराने त्यांचे आयुष्य 08-10 वर्षांनी वाढले. 2003 मध्ये सविता यांच्या मुंबईत मृत्यू झाला. त्यांच्या नंतरच्या वर्षांत, त्यांनी आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये देखील सक्रिय होत्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	यशवंत आंबेडकर 5 भावंडांमध्ये एकटेच जगले. बाकी सर्वजण बालपणीच मरण पावले. ते त्यांच्या वडिलांच्या मार्गावर चालू राहिला. आंबेडकरी बौद्ध चळवळीलाही त्यांनी दीर्घकाळ बळ दिले. ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष झाले. यशवंत एक वृत्तपत्र काढायचे, त्यात ते मुख्य संपादक होते. त्यांनी दोन पुस्तकेही लिहिली. पुढे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही झाले. राजकारणातही ते सक्रिय झाले. 1977 मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेत 10 लाख लोकांचा जमाव उपस्थित होता यावरून त्याचा प्रभाव दिसून येतो. त्यांना चार मुले होती. तीन मुलगे आणि एक मुलगी.</p>
<p>
	 </p>
<p>
	प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांनंतरच्या या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील आहेत. यशवंत यांचा मोठा मुलगा. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे. दलितांच्या चळवळीशी त्यांचा संबंध राहिला आहे. ते लोकप्रियही आहे. समाजसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 2018 मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. ते दोन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत आणि एकदा राज्यसभेवर आहेत. प्रकाश यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	आनंदराज आंबेडकर हे डॉ. आंबेडकरांचे दुसरे नातू आहेत. त्यांनी इंजिनीअरिंग केले पण राजकारणात सक्रिय आहे. त्यांनी रिपब्लिकन सेना स्थापन केली, ते त्याचे नेता आहे. आनंदराज यांना साहिल आणि अमन ही दोन मुले आहेत. यशवंतरावांचा तिसरा मुलगा भीमराव याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बी.आर. आंबेडकर यांची एकुलती एक नात आणि यशवंत राव यांची मुलगी रमा आनंद यांचा विवाह आनंद तेलतुंबडे यांच्याशी झाला होता. आनंद हे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक आहेत. अनेक वृत्तपत्रांमध्ये ते स्तंभलेखन करत असतात. तसे, इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि त्यानंतर भारत पेट्रोलियममध्ये मोठ्या पदावर होते. त्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्राकडे वळले. देशातील जातिव्यवस्थेवर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. प्राची आणि रश्मी या त्यांच्या मुली आहेत, त्या दोघीही दीन-दलितांसाठी लिहित राहतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकरांच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व त्यांच्या अनेक चुलत भावांसह सुजात करतात. 26 वर्षीय सुजात सध्या ट्विटरवर खूप सक्रिय आहे. ते सार्वजनिक सभा घेतात, ज्यात खूप गर्दी जमते. त्यांचे कुरळे केसही त्यांना वेगळा लुक देतात. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी दलित आणि दलितांसाठी एक वेबसाइट सुरू केली, ज्यामध्ये ते त्यांना बळ देण्याचे काम करतात. फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी घेतली असली तरी प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात राजकारणात वडिलांना साथ देत आहे. कॉलेजमधील रॉक बँडचेही ते सदस्य होते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 11 Apr 2022 17:12:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2022 17:15:03 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Ambedkar Jayanti Wishes In Marathi बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-wishes-in-marathi-121041300038_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-wishes-in-marathi-121041300038_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/thumb/1_1/1618034850-3322.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/10/thumb/1_1/1618034850-3322.jpeg</image>
      <description><![CDATA[विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar quotes" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-04/10/full/1618034850-3322.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar jayanti quotes" width="740" /></p>
	विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,</p>
<p>
	महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,</p>
<p>
	संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,</p>
<p>
	परमपूज्य बोधीसत्व, महामानव,</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर</p>
<p>
	यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,</p>
<p>
	भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर</p>
<p>
	जयंती निमित्त या पावन स्मृतीस,</p>
<p>
	विनम्र अभिवादन!</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार</p>
<p>
	भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त</p>
<p>
	या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन</p>
<p>
	जय भीम</p>
<p>
	 </p>
<p>
	जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,</p>
<p>
	कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,</p>
<p>
	भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार</p>
<p>
	महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर</p>
<p>
	यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार</p>
<p>
	ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार</p>
<p>
	दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला</p>
<p>
	डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त</p>
<p>
	सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	निळ्या रक्ताची धमक बघ</p>
<p>
	स्वाभिमानाची आग आहे</p>
<p>
	घाबरु नको कुणाच्या बापाला</p>
<p>
	तू भीमाचा वाघ आहे...</p>
<p>
	डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त</p>
<p>
	सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	सागराचे पाणी कधी आटणार नाही</p>
<p>
	भिमाची आठवण कधी मिटणार नाही</p>
<p>
	अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी</p>
<p>
	आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही</p>
<p>
	महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर</p>
<p>
	यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Apr 2021 21:49:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 13 Apr 2021 21:51:44 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आंबडेकर जयंती विशेष : ज्ञानयोगी बाबासाहेब]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2021-121041200045_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-jayanti-2021-121041200045_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/thumb/1_1/1618239279-2615.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/12/thumb/1_1/1618239279-2615.jpg</image>
      <description><![CDATA[भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ambedkar jayanti" class="imgCont" height="451" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-04/12/full/1618239279-2615.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="677" /></p>
	</p>
	भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय:</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.</p>
<p>
	 </p>
<p>
	शैक्षणिक विचार:</p>
<p>
	शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. &#39;&#39;शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,&#39;&#39; असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. &#39;&#39;प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले:</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.</p>
<p>
	 </p>
<p>
	प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा :</p>
<p>
	डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, &#39;&#39; आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा &#39;&#39; यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारी :</p>
<p>
	स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.</p>
<p>
	अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय.</p>
<p>
	अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.</p>
<p>
	- महेश जोशी</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Apr 2021 06:22:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 12 Apr 2021 20:25:53 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/about-dr-bimrao-ambedkar-121041100007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/about-dr-bimrao-ambedkar-121041100007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/11/thumb/1_1/1618121800-6972.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/11/thumb/1_1/1618121800-6972.jpeg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Dr baba saheb ambedkar" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-04/11/full/1618121800-6972.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="740" /></p>
	</p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते.</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.</p>
<p>
	इ.स. २००४ मध्ये, कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली होती त्यात पहिलेनाव &#39;डॉ. भीमराव आंबेडकर&#39; हे होते. विद्यापीठाने त्यांचा उल्लेख आधुनिक भारताचे जनक असा केला होता.</p>
<p>
	इ.स. २०११ मध्ये, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते.</p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर देशभरात अनेक गोष्टी आहेत जसे उद्यान, गावे, शहरे व स्थळे, कारखाने, ग्रंथालय/वाचनालय, चौक व रस्ते/महामार्ग, दवाखाने, पक्ष, संस्था व संघटना, प्रतिष्ठान, देश- विदेशातील पुतळे, पुरस्कार व पारितोषिके, पुस्तके, चित्रपट, नाटकं, मालिका, बौद्ध विहारे, मंडळे, योजना, वसतिगृहे,विमानतळे, विद्यापीठे व शैक्षणिक संस्थाने, सभागृहे व भवने, संमेलने, वास्तू स्मारके, स्थानके, स्टेडियम, इतर.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 11 Apr 2021 11:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sun, 11 Apr 2021 11:47:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : 'ज्ञान दिन']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/gyan-din-celebration-on-dr-babasaheb-ambedkar-jayanti-121040900024_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/gyan-din-celebration-on-dr-babasaheb-ambedkar-jayanti-121040900024_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/09/thumb/1_1/1617954625-9401.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/09/thumb/1_1/1617954625-9401.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा एक प्रमुख भारतीय उत्सव आहे. हा दिवस दरवर्षी १४ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ambedkar jayanti" class="imgCont" height="858" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-04/09/full/1617954625-9401.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="dr baba saheb ambedkar" width="740" /></p>
	</p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा एक प्रमुख भारतीय उत्सव आहे. हा दिवस दरवर्षी १४ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला &#39;समता दिन&#39; म्हणून तर महाराष्ट्र शासन &#39;ज्ञान दिन&#39; म्हणून साजरा करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस&#39; म्हणून साजरी होऊ लागली.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. २०१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती जगातल्या १०२ देशांत साजरी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्राने आंबेडकरांना "विश्वाचा प्रणेता" म्हणून संबोधले. संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती आंबेडकरांची जयंती साजरी केली. याशिवाय जगात केवळ मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर आणि नेल्सन मंडेला या दोन व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. या दिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 09 Apr 2021 13:15:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 09 Apr 2021 13:20:32 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[निबंध भारतरत्न डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/essay-marathi/essay-bharat-ratna-dr-bhimrao-babasaheb-ambedkar-121040300049_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/essay-marathi/essay-bharat-ratna-dr-bhimrao-babasaheb-ambedkar-121040300049_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/01/thumb/1_1/1617292555-5913.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-04/01/thumb/1_1/1617292555-5913.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ.भीमराव आंबेडकर, भारताला संविधान देणारे थोर नेते. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील एका लहानशा गावात झाला.यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. हे आपल्या पालकांचे 14 वे अपत्य होते. ते जन्मजात बुद्धिमान]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar jayanti" class="imgCont" height="354" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-04/01/full/1617292555-5913.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="bhimrao ambedkar" width="630" /></p>
	डॉ.भीमराव आंबेडकर, भारताला संविधान देणारे थोर नेते. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील एका लहानशा गावात झाला.यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. हे आपल्या पालकांचे 14 वे अपत्य होते. ते जन्मजात बुद्धिमान होते. </p>
<p>
	अस्पृश्य आणि अत्यंत निम्न वर्ग मानल्या जाणाऱ्या महार जातीमध्ये यांचा जन्म झाला.यांच्या परिवाराशी सामाजिक आणि आर्थिक दृष्टया भेदभाव केले जात होते. यांचे बालपणीचे नाव रामजी सकपाळ होते.यांचे पूर्वज बऱ्याच काळ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात काम करायचे. त्यांचे वडील ब्रिटिश भारतीय सैन्याच्या महू छावणीत होते. त्यांचे वडील नेहमी त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर जोर देत असायचे. </p>
<p>
	1894 साली त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले .बाबासाहेंबाच्या आईच्या मृत्यू नंतर त्यांच्या काकूने त्यांचा आणि त्यांच्या भाऊ बहिणींचा सांभाळ केला. आपल्या सर्व भाऊ बहिणींमध्ये आंबेडकरच शिकले. त्यांना त्यांच्या एका ब्राह्मण शिक्षकांनी दत्तक घेऊन आपले नाव आंबेडकर दिले. </p>
<p>
	बाबासाहेबांनी आपले विचार एका शोषित वर्गाच्या परिषदेत राजकीय दृष्टी जगासमोर मांडले. आपले विवादास्पद विचार असून  देखील त्यांची प्रतिमा न्यायशास्त्रज्ञाची होती. स्त्रियांना देखील पुरुषाप्रमाणे हक्क मिळावे यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या.त्यांनी स्त्रियांची गुलामगिरी दूर केली.त्यांनी नागपुरातील एका परिषदेत महिलांना स्वच्छता पाळा,मुलामुलींना शिक्षित करून महत्त्वाकांक्षी बनवा,त्यांचे न्यूनगंड दूर करा.असं सांगितले.दलितांना त्यांचा हक्क मिळावा या साठी ते लढत राहिले. ते सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार,अनीती,अत्याचार,अन्यायाला त्यांचा विरोध होता.जातीभेदाचे ते प्रखर विरोधी होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे असे ते म्हणायचे. त्यांच्या आचारात-विचारात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा भरलेली होती.दलितांना देखील मानाचे जीवन जगता यावे. या साठी ते सातत्याने संघर्ष करत होते.त्यांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर शेतकरी आणि मजुरांसाठी देखील लढा दिला. अशा या महामानवाने समाजासाठी,देशासाठी महान कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वाला मिळालेली महान देणगीच आहे. भारताच्या संविधानाचे निर्मिते या महामानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला.   </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 03 Apr 2021 22:11:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 03 Apr 2021 22:14:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Essay Marathi]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्रद्धा पंढरपूरच्या ‘पांडुरंगा'वर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/shraddha-on-panduranga-of-pandharpur-121020600033_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/shraddha-on-panduranga-of-pandharpur-121020600033_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-02/06/thumb/1_1/1612605143-854.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-02/06/thumb/1_1/1612605143-854.jpg</image>
      <description><![CDATA[रमाचे वडील भिकूजी आणि आई रुख्माबाई यांची नितांत निष्ठा होती, पंढरपूरच्या पांडुरंगावर आणि]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="rakhmai ambedkar" class="imgCont" height="520" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-02/06/full/1612605143-854.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="400" /></p>
	</p>
	<strong>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची आज (7 फेब्रुवारी) जयंती. त्यानिमित्त ...</strong></p>
<p>
	रमाचे वडील भिकूजी आणि आई रुख्माबाई यांची नितांत निष्ठा होती, पंढरपूरच्या पांडुरंगावर आणि रुख्माबाईवर. ते वारकरी संप्रदायाचे होते. हेच संस्कार रमावर झाले. भगवान शंकराच्या नवसानं आपल्याला मुलगा झाला म्हणून त्यांनी मुलाचं नाव शंकर ठेवलं होतं. पण भीमरावांना देवदेवता हे देव देवता मान्य नव्हते. गोलमेज परिषद पूर्ण करून ते लंडनहून भारतात आले आणि चळवळीला पुन्हा संजीवन मिळाले. सगळं काही सुरळीत चालू होतं. एका रात्री रमा आपल्या साहेबांना म्हणाली, ‘आमचा बा नेहमी पंढरपूरला जायचा.&#39; </p>
<p>
	‘माहीत आहे मला.&#39; </p>
<p>
	‘माझ्या मायचं नाव रुखमाई हुतं.&#39; बाबासाहेब बोलले नाहीत.</p>
<p>
	‘मला भाऊ झाला तो बी भगवान शंकराच नवसानं.&#39; बाबासाहेब हसले. रमाची देवभोळी श्रद्धा  त्यांना आवडली होती. पण देवाचे पंडे, पंडित ठेकेदार आम्हा अस्पृश्यांना दूर का ठेवतात? हा त्यांच्या मनात जळत असलेला प्रश्न होता. प्रश्न म्हटलं की, त्याची उत्तरं असतातच. नाहीतर प्रश्न निर्माण झाले असते कशाला? पण काही प्रश्न असे असतात त्याची उत्तरं असतात पण कुणाला इतरांना सांगायची नसतात. काही सांगायची असतात पण नकळत सांगायची असतात. आणि काही प्रश्न असे असतात त्यांची अजिबात उत्तरं नसतात. रमाला नेमकं काय सांगायचं, हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. </p>
<p>
	‘रमा, आषाढी यात्रेला पंढरपूरला जाऊ म्हणतेस.</p>
<p>
	पण तू पुरतं आपल्याला ओळखलंस का?&#39;</p>
<p>
	‘काय ओळखायचं त्यात?&#39;</p>
<p>
	‘इथंच नेमकं चुकतेस तू. अगं आपण कोण?&#39; </p>
<p>
	‘आलं धेनात. पण संतचोखा कसा मंदिराच्या बाहीर उभा राहिला. दामू महार आपलाच ना? आला ना विठोबा धावून त्याच्या पाठीशी.&#39;</p>
<p>
	क्षणभर रमा बोलायची थांबली. भीमराव तिच्या भावभावनांचा अदमास चेहर्यातवर घेत राहिले. दुसर्याच क्षणी रमा म्हणाली, ‘हे जग कोणी घडवलं? देवानं. देवानंच माणसाला जन्म दिला. मरणबी तोच देनार.&#39; बाबासाहेब ऐकत होते कौतुकानं. आपली अडाणी रमा एवढी शहाणी कशी झाली?</p>
<p>
	‘देवानं फक्त माणूस घडवला आणि माणसानं घडवली जात. जी कधीच जात नाही ती जात.&#39;</p>
<p>
	बाबासाहेब बेडवरून उठून बसले. </p>
<p>
	‘रमा&#39;</p>
<p>
	‘माझं काही चुकलं का साहेब? चुकलं आसंल तर माफ करा.&#39;</p>
<p>
	‘नाही नाही रमा. तू अशी बोलतेस की मलाही क्षणभर ऐकत राहावंसं वाटतं.&#39;</p>
<p>
	‘मला असं वाटतं साहेब, देव सर्वश्रेष्ठच. तोच कर्ता करविता. त्याच्याशिवाय आपल्या शरीराचं घड्याळही बंद पडेल.&#39;</p>
<p>
	‘रमा अगं किती छान बोलतेस तू.&#39;</p>
<p>
	‘साहेब, एकच हात जोडून विनंती आहे. मला पंढरपूरला न्या.&#39;</p>
<p>
	‘अगं पण पंढरपूरला आपल्याला प्रवेश नाही.&#39;</p>
<p>
	‘मग तुम्ही नाशिकच्या काळाराम गोराराम मंदिरासाठी सत्याग्रह का केला?&#39;</p>
<p>
	बाबासाहेब अबोल.</p>
<p>
	‘अमरावतीला अंबादेवीच्या दर्शनासाठी तुम्ही एवढा जिवाचा आटापिटा का केला?&#39;</p>
<p>
	बाबासाहेब बॅरिस्टर होते. पण अडाणी रमाला उत्तर देण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यामधून  एक सत्य बाहेर पडलं. पुस्तकं माणसाला साक्षर करतात पण शहाणं करीत नाहीत.</p>
<p>
	बाबासाहेब हसले. शेवटी बाबासाहेबांनी रमाला परवानगी दिली. पण त्यांनी एकच विचारलं, ‘पंढरीच्या पांडुरंगाला काय मागशील तू?&#39;</p>
<p>
	‘तुमच्यासाठी दीर्घायुष्य.&#39;</p>
<p>
	‘रमा...&#39;</p>
<p>
	‘आणि तुमच्या सर्व सामाजिक कार्यात यश येवो, ही प्रार्थना.&#39; बाबासाहेब हसले. म्हणाले, ‘अगं देव सर्वांचा आहे. मग सवर्णांनी देवाची मक्तेदारी घेतली. हे मला पटलं नाही म्हणूनच मी सत्याग्रह केला. अगं मला सांग, देवदेवतांवर विशिष्ट समाजाची मिरासदारी का असावी? रमा, माझा खरा राग इथे आहे. तू मला समजून घे. खरा देव माणसात आहे. त्या माणसाची सेवा करणंच देवाची पूजा करणं होय. म्हणून तू पंढरपूरचा हट्ट सोड.&#39;</p>
<p>
	‘ठीक आहे. नाही जाणार पंढरपूरला. आता माझं घर, समाज हेच पंढरपूर.&#39; आणि बाबासाहेब प्रसन्न हसले.</p>
<p>
	बी. के. तळभंडारे </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 07 Feb 2021 06:17:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 06 Feb 2021 15:23:54 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. आंबेडकरांची विनोदवृत्ती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-120041400001_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-120041400001_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/home-page/2017-04/14/thumb/1_1/1492147235-3354.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/home-page/2017-04/14/thumb/1_1/1492147235-3354.jpg</image>
      <description><![CDATA[कुणीतरी म्हटलं की, हास्य असा अलंकार आहे की, तो कोणत्याही मुखकमलावर सुंदर दिसतोच. बाबासाहेब आंबेडकर आणि विनोद हे शक्य तरी आहे का? असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण होण्याची शक्यता नाकारता]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="babasaheb ambedkar" class="imgCont" height="416" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/hp/home-page/2017-04/14/full/1492147235-3354.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
कुणीतरी म्हटलं की, हास्य असा अलंकार आहे की, तो कोणत्याही मुखकमलावर सुंदर दिसतोच. बाबासाहेब आंबेडकर आणि विनोद हे शक्य तरी आहे का? असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला कारण बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्तवाची जनमानसात जी प्रतिमा आहे ती गंभीरपणाची, पण बाबासाहेबांच्या जीवनाचे बारकाईने अवलोकन केल्यास गंभीरपणा आणि गमतीदारपणा यांचा सुंदर संगम बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महासागरात कसा झाला होता, याचा मनोहरी प्रत्यय आपल्याला येतो. शब्दांना अनेक अर्थछटा असतात याची जाणीव बाबासाहेबांसारख्या प्रतिभावंतास होती म्हणून त्यांनी शब्दांचा शस्त्रासारखा वापर केला आहे. हास्य हे प्रभावी अस्त्रासारखे आहे असा महत्त्वपूर्ण विचार बाबासाहेबांनी मांडला आणि वेळप्रसंगी त्याचा प्रत्यय त्यांच्याजवळच्या सहकार्‍यांना आलेला आहे. विनोद सांगण्याची त्यांची खास अशी शैली होती. समोरच्याला विनोद सांगत असताना ते स्वतः अभिनय करून सांगत असल्याने विनोद अधिकच प्रभावी वाटत असे.<br />
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मि‍ष्किल स्वभावाची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. एकदा बाबासाहेब शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेले असता थोडावेळ गाणी ऐकल्यानंतर गमतीने ते म्हणाले, ‘शास्त्रीय संगीत म्हणजे काय असते ते आत्ता समजलं, पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळलं की, झालं शास्त्रीय संगीत.&#39; उपस्थित सर्व जण हसू लागले. बाबासाहेबांचे विनोद अतिशय मार्मिक  होते. 10 जुलै 1947 रोजी बाबासाहेब दिल्लीला जायला निघाले असताना ते विमानात बसतेवेळी हिंदू महासभेच्या पुढार्‍यांनी त्यांना भगवा ध्वज अर्पण केला व आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग भगवा असावा यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, एका महाराच्या मुलाकडून घटना समितीवर भगवा ध्वज लावणची अपेक्षा तुम्ही करता आहात नाही का?&#39; बाबासाहेबांच्या  विनोदातले मर्म अतिशय सखोल आणि विचार करायला भाग पाडणारे होते.<br />
बाबासाहेब प्रतिस्पर्धंना आपल्या वक्तृत्वाने चारीमुंड्या चीत करीत असत. एकदा काँग्रेस संबंधी बोलताना बाबासाहेब म्हणाले, ‘काँग्रेसच्या बाया महारवाड्यात जाऊन आमच्या बायांच्या डोक्यातील उवा काढतात, त्यांची लुगडी धुतात, पोरांना आंघोळी घालतात. नुकतेच काँग्रेसच्या बायांनी पुण्याच्या मांग वाड्यात जाऊन आमच्याम मुलांना दूध पाजले पण दुसर्‍या दिवशी त्या मुलांना हगवण लागली अशी बामती उठली.&#39; अर्थात या ठिकाणी अतिशोक्तीतून सहजपणे विनोद निर्मिती   साधली आहे. पण त्यांनी केवळ विनोदासाठी अतिशोक्तीचा वापर केला नसून त्यांनी विशिष्ट प्रवृत्तीचे दर्शन घडवावाचे होते.<br />
आंबेडकरी विनोद जातीवादी वृत्तीवर, ढोंगीपणावर, दांभिकतेवर कडाडून हल्ला करताना दिसतो. महात्मा गांधींनी गोमलेज परिषदेत अस्पृशविषयी काय भूमिका  घेतली होती हे सर्वश्रुत आहे. मुंबई येथे 6 मे 1939 रोजी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनात गांधीजींच्या   धोरणांवर बोलताना बाबासाहेब म्हणाले, ‘1928 साली काँग्रेस सात कोटी<br />
अस्पृश्याना शून्य समजत होते. दोन वर्षानंतर राऊंड टेबल परिषद भरली. तेथे अस्पृश्य लोकांनी शून्याचे दहा केले. एकावर पूज्य वाढवले पण गांधीजी दहाचे<br />
पुन्हा शून्य करण्याचा घाट घालत आहेत, पण त्यांना ते साधले नाही.&#39; मुंबईच्या  एका सभेत उपरोधिक शैलीत बोलताना ते म्हणाले, ‘हिंदूंनी आमच्यासाठी काय केले? त्यांनी एक सुधारणा केली. ती म्हणजे रेल्वेमध्ये जाताना ते आमच्या  डब्यामध्ये असतात तेही माहीत नसतं म्हणून.&#39;<br />
हसता हसता अंतर्मुख करायला लावणे हे आंबेडकरी विनोदाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. समाजाचे दोष दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी विनोद या शस्त्राचा अत्यंत कौशल्याने वापर केला. आंबेडकरी विनोद हा शस्त्रासारखा आहे पण तो गुंडाच्या शस्त्रासारखा जीव घेणारा नसून डॉक्टरच्या शस्त्रासारखा जीवदान  देणारा, समाजाच्या नकोशा गोष्टीची शस्त्रक्रिया करणारा आहे. म्हणजे आंबेडकरी<br />
विनोद प्रेममूलक आहे. त्यांचा विनोद स्वतःकडे तटस्थपणे पाहायला शिकवतो तसाच तो समाजाची कठोर चिकित्सा करण्याची दीक्षाही देतो. अंतर्मुख करण्याचे महान सामर्थ्य या विनोदात आहे. एकदा बाबासाहेबांना एक लाख अठरा हजारांची थैली देण्याचे ठरवले. त्या वेळी बोलताना समारंभात ते म्हणाले, ‘  आपण एक लाख अठरा हजार रुपयाची थैली दिली पण ती अगदीच हलकी आहे मला थोडा संशय आला.&#39; जनतेचा पैसा ते जनहितासाठी वापरत असत. मोठ्या कामासाठी पैसा कमी पडत असे, ही खंत ते विनोदी ढंगाने व्यक्त करीत.<br />
आमदार-खासदार हे अभ्यासू असावेत असे डॉक्टर आंबेडकरांचे मत होते. त्यांनी   समाजासाठी त्यागाची तयारी ठेवावी असे त्यांना वाटत होते. 2 एप्रिल 1939 रोजी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी त्यांनी भाषण केले. ते म्हणाले, ‘आपण आजच्या मुंबई असेंब्लीमधील काँग्रेस सभासदांकडे चिकित्सक दृष्टीने पाहिले की, हा किंग एडवर्ड हॉस्पिटलमधील लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे, म्हातारे वगैरे रोग्यांचा राखीव वॉर्ड हे की का? असा भास होतो.&#39; बाबासाहेबांच्या   आयुष्यातील अशा अनेक गमतीदार आठवणी माईसाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या आहेत. बाबासाहेबांचा प्रत्येक विनोद प्रसंगनिष्ठ होता. ते स्वतः विनोदी तर होतेच, त्यांना विनोदी स्वभावाची माणसे आवडत असत. ते<br />
विनोदाचा मनसोक्त आस्वाद घेत असत. ते सामान्य माणसात रमत, मनमोकळेपणाने विनोद करत. विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवूनही त्यांचा   विनोद फुलताना दिसतो. त्यांच्या भाषणातून वेळोवेळी मार्मिक विनोदांनी समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले होते. त्यांचा हा अज्ञात पैलू ज्ञात व्हावा हीच इच्छा आहे.<br />
डॉ. धम्पाल माशाळकर<br />
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2020 07:31:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2020 07:53:42 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबा साहेब आंबेडकर एक युग पुरुष ......]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/biography/biography-of-bhimrao-ambedkar-120032100006_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/biography/biography-of-bhimrao-ambedkar-120032100006_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ta/img/article/2016-03/27/thumb/1_1/1459054132-3037.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ta/img/article/2016-03/27/thumb/1_1/1459054132-3037.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेबांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आहे. यांचा जन्म दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर जवळ महू येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई यांच्याकडे झाला. यांचे वडील इंडियन आर्मीत सुभेदार होते. तीन वर्षानंतर त्यांचे वडील ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="400" src="https://media.webdunia.com/_media/ta/img/article/2016-03/27/full/1459054132-3037.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	डॉ. बाबासाहेबांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आहे. यांचा जन्म दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर जवळ महू येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई यांच्याकडे झाला. यांचे वडील इंडियन आर्मीत सुभेदार होते. तीन वर्षानंतर त्यांचे वडील सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थायिक झाले. </p>
<p>
	 </p>
<p>
	हे आपल्या आई- वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. बाबासाहेब महाराष्ट्रातील मराठी परिवाराचे होते. त्यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे असे. हे जातीने महार असल्याने त्यांच्यासोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात होता. लहानपणा पासूनच त्यांची अभ्यासात रुची होती. ते कुशाग्र आणि </p>
<p>
	तल्लख बुद्धीचे होते. यांचे वडील आर्मीत असल्याने त्यांचा शिक्षणासाठी विशेष अधिकार दिले जात असे. पण तिथे पण दलित असल्याचा भेदभाव केला जात असे. त्या काळात त्यांचा जातीचा विद्यार्थींना वर्गात बसण्याची तसेच शाळेतील टाक्यांचे पाणी पिण्याची कसलीही मुभा नव्हती. त्यांना शाळेतील चपराशी देखील वरून हातावर पाणी टाकत असे. ते चपराशी रजेवर असल्यास पाणी पिण्यासाठी मिळत नसे. अश्या विषम परिस्थितीतही बाबासाहेब उच्च विद्या विभूषित झाले. </p>
<p>
	 </p>
<p>
	ह्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण दापोलीत घेतले. मुंबईतील एल्फलिंस्टन हाय स्कुलाला प्रवेश घेतले. 1907 साली त्यांनी मेट्रिकची पदवी घेतली. 1908 ला डॉ. ने एलफ्न्सिटन कॉलेजला प्रवेश घेऊन इतिहास घडवला. त्यांनी 1912 साली मुंबई विश्वविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. फारसी भाषेतून उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञान विषयातून पदवी प्राप्त केली. 1915 साली ह्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातून समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानवविज्ञान, अर्थशास्त्रातून एम.ए ची पदवी घेतली. या नंतर त्यांनी प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयांवर संशोधन केले. </p>
<p>
	 </p>
<p>
	1916 साली अमेरिकेतील </p>
<p>
	कोलंबिया विश्वविद्यालयातून आंबेडकर यांना पी.एच.डी. मिळाली. त्यांचा शोध प्रबंधाचा विषय "ब्रिटिश भारतात प्रांतीय वित्त याचे विकेंद्रीकरण होता. फेलोशिप संपल्यावर भारतात येण्याच्या आधी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या विषयात एम.एस.सी. आणि डी.एस.सी. आणि विधी संस्थानात बार एट.लॉ. साठी रजिस्ट्रेशन केले आणि भारतात परत आले. आल्यानंतर त्यांनी बडोदाच्य राजांचा दरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची जबाबदारी पत्करली. राज्याचे रक्षा सचिव म्हणून देखील काम केले. जाती वाद्यांच्या झळा येथे पण लागल्या. त्यामुळे ह्यांना राहण्यासाठी घर देखील नव्हते. यांनी लवकरच सैन्य मंत्री पदावरूनही  राजीनामा दिला </p>
<p>
	आणि एक खासगी शिक्षक आणि अकाऊंटंटची नोकरी स्वीकारली. सल्लागार म्हणून व्यवसाय केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	1921 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्स अँड पॉलिटीकल सायन्स मधून मास्तर डिग्री मिळवली. 1927 साली अर्थशास्त्रातून डी.एस.सी. केले. न्याय शास्त्राचा अभ्यास करून बॅरिस्टर म्हणून काम केले. 8 जून 1927 रोजी कोलंबिया विश्वविद्यालयाद्वारे डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले. यांचा विवाह 1906 साली रमाबाई यांच्याशी </p>
<p>
	झाला. यांना एक पुत्ररत्न झाले. त्यांचे नाव यशवंत असे. 1935 साली त्यांच्या बायकोचे दीर्घ आजाराने निधन झाले. </p>
<p>
	 </p>
<p>
	1940 साली त्यांना अनेक आजारांनी ग्रसित केले. त्याचा उपचारासाठी ते मुंबईला गेले असताना त्यांची भेट डॉक्टर शारदा यांच्याशी झाली. त्यांच्याशी यांनी विवाह केला. डॉ शारदांने आपले नाव बदलून सविता आंबेडकर केले. बाबासाहेबांनी जाती पातीचा विरोध केला. भेदभावाच्या विरुद्ध लढले. त्यासाठी त्यांनी "सभा" संघटन पर्यायाची निवड केली. या संघटनेचा मुख्य उद्देश्य मागासलेल्या वर्गात शिक्षण देण्याचा आणि सामाजिक आणि आर्थिक सुधारण्या बाबत होता. त्यांनी कालकापूरच्या महाराजांच्या सहयोगाने "मूकनायक" या सामाजिक पात्राची स्थापना केली. </p>
<p>
	 </p>
<p>
	यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने झाले. बौद्ध धर्म स्वीकारल्याने त्यांचे अंतिम संस्कार केले गेले. </p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी अस्पृश्यतेला मिटविण्यासाठी सक्रिय रूपाने कार्य केले. यासाठी त्यांनी अहिंसेचा मार्ग पत्करला. यांनी दलितांच्या उत्थानासाठी अनेक कार्य केले. समाजात त्यांचे दिलेले योगदान आणि त्यांचा सन्मानासाठी त्यांच्या स्मारकाची स्थापना केली. त्यांचा जन्मदिन 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या रूपाने साजरा केला जातो. या दिनाला भीम जयंती असेही म्हटले जाते. यांनी आपल्या देशाला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, संवैधानिक अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्ये करून आपले अमूल्य योगदान देशासाठीचे दिले आहे. हे देश यांचे सदैव ऋणी राहील. त्यांना अनेक सन्मानाने सन्मानित केले आहे. त्यांना भारतरत्न या पारितोषकाने सन्मानित केले आहे.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 21 Mar 2020 10:50:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 21 Mar 2020 10:58:44 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Biography]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेबांची सजगता]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-awareness-of-babasaheb-120012100012_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-awareness-of-babasaheb-120012100012_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-04/13/thumb/1_1/1492083177-9194.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-04/13/thumb/1_1/1492083177-9194.jpg</image>
      <description><![CDATA[राज्य संस्थेच्या सनदशीर राज्य पद्धतीविषयी तयार केलेला नियमावलींचा मसुदा किंवा संहिता म्हणजे आपली राज्यघटना होय. या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांचा विकास]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="354" src="//media.webdunia.com/_media/hi/img/article/2017-04/13/full/1492083177-9194.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
	राज्य संस्थेच्या सनदशीर राज्य पद्धतीविषयी तयार केलेला नियमावलींचा मसुदा किंवा संहिता म्हणजे आपली राज्यघटना होय. या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांचा विकास व्हावा यासाठी &#39;शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा&#39; असा मंत्र सर्वच वंचित घटकांना दिला होता. संघटित शक्तीतून समाजाचा विधायक विकास साध्य करता येतो. संघटित होण्याची प्रक्रिया ही आपल्या कुटुंबापासून सुरु होऊन ती देशार्पंत पोहोचावी, हाच गर्भित अर्थ बाबासाहेबांना अभिप्रेत होता. संघटित होणे ही प्रक्रियाच मुळात प्रत्येकाला उत्कर्षाकडे घेऊन जाणारी आहे, हेच खरे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपल्याला लाभलेले महापुरुष आणि त्यांचे कार्य, त्यांचे विचार ही आपली संस्कार शिदोरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, वीर सावरकर, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, अहिल्याबाई होळकर यांसारख्या अनेक थोर महापुरुषांनी आपापल्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीला अनुसरून विधायक कार्य केले. हे सगळे महापुरुष त्यांच्या कार्याच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेले आहेत, आपल्याला त्यांना समजूनउमजून घ्यावे लागेल. ह्या महापुरुषांच्या केवळ मूर्तींचा किंवा छायाचित्रांचा उत्सव साजरा न करता त्यांच्या थोर विचारांचा उत्सव साजरा करणे, त्यांचे विचार आपल्या हृदयात सामावून घेणे ही आजची गरज बनली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांनी समाजातल्या वंचित घटकांच्या विकासाच्या मुद्द्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा विचारही तितक्याच प्रभावीपणे मांडला आहे. ज्या निसर्गावर मानवाचे संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे, त्या निसर्गाची काळजी आपण घेत राहणे, त्या निसर्गावर मनापासून प्रेम करत राहणे हे बाबासाहेबांना अपेक्षित होते. भारतीय राज्यघटनेची पायाभूत कर्तव्ये या भागामध्ये, &#39;पर्यावरण संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.&#39; असा उल्लेख आहे. अनुच्छेद 51 मध्ये, &#39;अरण्ये, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे.&#39; असे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे कलम 14,19 आणि 48-क या भागामध्ये पर्यावरण संरक्षण संदर्भात विस्तृत माहिती दिली आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	पर्यावरण संवर्धनाबरोबरच बाबासाहेबांनी या अनुच्छेदामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही सांगितले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी जागरूक आणि सतर्क राहता येणे शक्य आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचे सार्वभौमत्व, एकता व एकसंधता कायम राखणे, विविध धर्मीय लोकांमध्ये बंधुत्वाची भावना दृढ करणे, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे, हिंसाचार निषिद्ध मानणे व नशाबंदी यांचा समावेश आहे. आपल्या संविधानात असलेले र्पावरण विषयक मूलंना फाटा देत आर्थिक विकासाच्या मागे लागणे समर्थनीय नाही. जागतिकीकरणाच्या आजच्या आधुनिक युगात निसर्गामध्ये हस्तक्षेप करण्याचे प्रमाण प्रचंड वाढलचे कटू वास्तव आहे. आपण सार्‍यांनी &#39;पर्यावरण स्नेही&#39; बनणे अपेक्षित आहे. अनेक महत्त्वाच्या विषयांसोबत, विचारांसोबत &#39;निसर्ग&#39; संवर्धनाचा विचार जोपासणे आणि ज्या निसर्गावर सस्त सजीवांचे अस्तित्व टिकून आहे, त्या निसर्गाचा विचार व त्या संदर्भातली कृतिशील वाटचाल निरंतर करत राहणे किती महत्त्वाचे आहे याची कल्पना आपल्या सर्वांना असणे अभिप्रेत आहे. मानव आणि पर्यावरणाचं नातं अधिक दृढ करण्यासाठी आणि हे नातं चिरकाल टिकवण्यासाठी आपण सारे आता आपल्या चौकटीतून बाहेर पडून पर्यावरण संवर्धनाचे विधायक कार्य हाती घेणे आवश्यक आहे. आपण पर्यावरण रक्षणाची शपथ घेताना कुठल्याही प्रकारचे प्रदूषण मग ते जलप्रदूषण असो, ध्वनिप्रदूषण किंवा वायुप्रदूषण असो, या संदर्भातली जागरूकता जागी ठेवू या. आपल्याला आपल्या महापुरुषांची चरित्रे अजातशत्रू-पद्धतीने वाचायला लागतील, त्यांचे कार्य समजून आणि उमजून घेऊन राष्ट्रबांधणीसाठी निरंतर विधायक कार्य करत राहावे लागेल.</p>
<p>
	<br />
	अरविंद म्हेत्र</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 21 Jan 2020 11:35:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 21 Jan 2020 11:41:59 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिपाई नाही तर पाणी नाही]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/story-on-bhimrao-ambedkar-119120500025_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/story-on-bhimrao-ambedkar-119120500025_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/05/thumb/1_1/1575545976-2081.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/05/thumb/1_1/1575545976-2081.jpg</image>
      <description><![CDATA[अस्पृश्य मानल्या जाणार्‍या महार जातीचे बाबासाहेब होते. हेच कारण होते की त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांसह बसणे शक्य नव्हते आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ambedkar" class="imgCont" height="592" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-12/05/full/1575545976-2081.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="740" /></p>
	</p>
	अस्पृश्य मानल्या जाणार्‍या महार जातीचे बाबासाहेब होते. हेच कारण होते की त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांसह बसणे शक्य नव्हते आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा.</p>
<p>
	 </p>
<p>
	या शिवाय त्यांना त्या शाळेच्या नळालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती, पण इतर विद्यार्थ्यांना असे कुठलेही बंधन नव्हते. ते पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकत होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांना पाणी तेव्हाच मिळू शकते ज्या वेळी तिथला शिपाई त्यांना नळ सुरु करून देत असत. तो नसल्यावर अजून कोणते ही इतर विध्यार्थी त्यांना नळ सुरु करून देत नव्हते. या परिस्थितीचा सारांश त्यांने आपल्या एका लेखात पण नमूद केला आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	" शिपाई नाही पाणी नाही।"  </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 06 Dec 2019 10:07:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 05 Dec 2019 17:11:23 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संस्कृत भाषेचे ज्ञान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/baba-saheb-ambedkar-story-119120500011_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/baba-saheb-ambedkar-story-119120500011_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/05/thumb/1_1/1575529333-89.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/05/thumb/1_1/1575529333-89.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्त केले गेले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ambedkar" class="imgCont" height="592" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-12/05/full/1575529333-89.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="740" /></p>
	</p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्त केले गेले.//</p>
<p>
	 </p>
<p>
	अनुसूचित भाषांची यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनाही त्यातील सर्व भाषांची माता संस्कृत असे द्यायची फार इच्छा होती पण काही सदस्यांच्या विरोधामुळे हे शक्य झाले नाही. पण त्या काळात श्री लाल बहादूर शास्त्री आणि आंबेडकर ह्यांच्यात संस्कृत भाषे संदर्भात चर्चा झाली. त्या वेळी विरोधकांच्या लक्षात आले की दोन महान व्यक्ती संस्कृतभाषेत संभाषण करीत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	शास्त्रीजींना संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित होते, परंतु अशिक्षित दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचा संस्कृत भाषेवर प्रभुत्व असेल हे कोणालाही अपेक्षित नव्हते. ह्या मुळे ही माहिती लवकरच पसरली. त्या दिवसापासून  सर्व आंबेडकरांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू लागले.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 05 Dec 2019 11:47:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 05 Dec 2019 18:47:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Dr. Babasaheb Ambedkar यांचे प्रेरक विचार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-inspirational-quotes-119120400039_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-inspirational-quotes-119120400039_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/04/thumb/1_1/1575463978-0779.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/04/thumb/1_1/1575463978-0779.jpg</image>
      <description><![CDATA[(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही.

(२) देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="baba saheb ambedkar" class="imgCont" height="416" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-12/04/full/1575463978-0779.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="baba saheb ambedkar" width="740" /></p>
	</p>
	(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	(२) देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.</p>
<p>
	 </p>
<p>
	(३) माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	(४) वाचाल तर वाचाल.</p>
<p>
	 </p>
<p>
	(५) इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे.</p>
<p>
	 </p>
<p>
	(६)  मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	(७) तिरस्कार माणसाचा नाश करतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	(८) ज्यांच्या अंगी धैर्य नाही, तो पुढारी होऊ शकत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	(९) शक्तीचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.</p>
<p>
	 </p>
<p>
	(१०) शंका काढण्यास देखील ज्ञान लागतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	(११ ) आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?</p>
<p>
	 </p>
<p>
	(१२ ) हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	(१३ ) नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.</p>
<p>
	 </p>
<p>
	(१४) ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	(१५ ) वाणी व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. त्यासाठी मनाला संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.</p>
<p>
	 </p>
<p>
	(१६) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.</p>
<p>
	 </p>
<p>
	(१७ ) पती- पत्नी मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	(१८) जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	(१९) तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.</p>
<p>
	 </p>
<p>
	(२०) प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.</p>
<p>
	 </p>
<p>
	(२१) मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	(२२ ) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.</p>
<p>
	 </p>
<p>
	(२३) स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	(२४) कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	(२५) बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 05 Dec 2019 10:19:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 04 Dec 2019 18:23:22 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[माझ्या लोकांची काळजी कोण घेईल?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/real-incident-of-baba-saheb-ambedkar-119120400011_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/real-incident-of-baba-saheb-ambedkar-119120400011_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/04/thumb/1_1/1575435999-1037.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/04/thumb/1_1/1575435999-1037.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाची ही घटना आहे. ग्रंथालय सुरू होण्यापूर्वी ते दररोज सकाळी तिथे पोहचत असे आणि प्रत्येकासोबतच ते निघत असे. ते लायब्ररीची वेळ संपल्यावरदेखील तिथे बसण्यासाठी परवानगी मागत असे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ambedkar" class="imgCont" height="592" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-12/04/full/1575435999-1037.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="740" /></p>
	</p>
	डॉ बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाची ही घटना आहे. ग्रंथालय सुरू होण्यापूर्वी ते दररोज सकाळी तिथे पोहचत असे आणि प्रत्येकासोबतच ते निघत असे. ते लायब्ररीची वेळ संपल्यावरदेखील तिथे बसण्यासाठी परवानगी मागत असे.</p>
<p>
	 </p>
<p>
	दररोज त्यांना हे करताना पाहून शिपाई त्यांना म्हणाले, "तू नेहमीच गंभीर का असतोस, फक्त अभ्यासच करत असतो. मित्रांसोबत कधीही मजा करत नाहीस" </p>
<p>
	 </p>
<p>
	यावर बाबासाहेब म्हणाले- "मी जर का हे असे केले तर माझ्या लोकांची काळजी कोण घेईल?"</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 04 Dec 2019 10:35:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 04 Dec 2019 10:36:45 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाबासाहेब आणि ग्रंथपाल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/short-real-stories-on-bala-saheb-ambedkar-119120300013_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/short-real-stories-on-bala-saheb-ambedkar-119120300013_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/03/thumb/1_1/1575360589-5921.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/03/thumb/1_1/1575360589-5921.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. ते दररोज १४ ते १८ तास अभ्यास सहजच करत असे. बडोद्याचे शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. शिक्षण आणि कठोर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="bala saheb ambedkar" class="imgCont" height="592" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-12/03/full/1575360589-5921.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="bala saheb ambedkar" width="740" /></p>
	</p>
	डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. ते दररोज १४ ते १८ तास अभ्यास सहजच करत असे. बडोद्याचे शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. शिक्षण आणि कठोर परिश्रमाच्या त्यांच्या आग्रहाखातर.</p>
<p>
	 </p>
<p>
	 * बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. असे आख्यादित आहे की त्यांची वैयक्तिक लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती आणि त्यात पुस्तकांची संख्या ५० हजारांपेक्षा देखील अधिक होती. </p>
<p>
	 </p>
<p>
	लंडन येथे वास्तव्याच्या वेळी ते दररोज एका लायब्ररीत जात असे आणि तासंतास अभ्यास करत असे. एकदा ते दुपारच्या जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून भाकरी खात होते तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बघितले आणि त्यांना चिडवले आणि टोमणा दिला की कॅफेटेरिया जाण्याऐवजी ते येथे लपून- छपून भोजन करत आहे. ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्याचे सदस्यत्व संपविण्याची धमकी दिली. ते ऐकून बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या संघर्ष आणि इंग्लंडमध्ये येण्याचे कारण सांगितले. तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरिया जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही त्याने दिली. हे ऐकल्यावर ग्रंथपाल म्हणाला-</p>
<p>
	 </p>
<p>
	" आजपासून आपण दुपारच्या जेवण्याच्या वेळी येथे न बसता माझ्यासोबतच कॅफेटेरियात येणार आणि मी माझे भोजन तुमच्याबरोबर वाटून खाणार.</p>
<p>
	* ग्रंथपाल एक ज्यू (यहुदी) होता आणि त्याचा या वागणुकीमुळे बाबासाहेबांच्या मनात यहुदींसाठी एक विशेष स्थान होते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 03 Dec 2019 13:38:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 03 Dec 2019 13:40:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाबासाहेबांचा प्रामाणिकपणा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/short-real-stories-on-b-r-ambedkar-119120200025_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/short-real-stories-on-b-r-ambedkar-119120200025_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/02/thumb/1_1/1575287429-8491.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-12/02/thumb/1_1/1575287429-8491.jpg</image>
      <description><![CDATA[ही घटना स्वातंत्र्यापूर्वीची आहे. सन १९४३ मध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर ह्यांना व्हाईसराय कॉन्सिलमध्ये समाविष्ट करून कामगार मंत्री केले गेले. याच बरोबर ते सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) कडे देखील होते. या विभागाचे बजेट कोटींमध्ये होते आणि ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ambedkar" class="imgCont" height="592" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-12/02/full/1575287429-8491.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ambedkar" width="740" /></p>
	</p>
	ही घटना स्वातंत्र्यापूर्वीची आहे. सन १९४३ मध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर ह्यांना व्हाईसराय कॉन्सिलमध्ये समाविष्ट करून कामगार मंत्री केले गेले. याच बरोबर ते सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) कडे देखील होते. या विभागाचे बजेट कोटींमध्ये होते आणि कंत्राटदार त्याचे करार मिळविण्यासाठी आपआपसात स्पर्धा करायचे.</p>
<p>
	 </p>
<p>
	या लोभापायी दिल्लीच्या एका मोठ्या ठेकेदाराने आपल्या मुलाला बाबासाहेबांच्या मुलाकडे म्हणजेच यशवंत राव यांचा कडे पाठविले आणि आपला व्यवसायात भागीदारी आणि बाबासाहेबांमार्फत करार मिळाल्यावर टक्केवारी कमिशन देण्याचा प्रस्ताव दिला. यशवंतराव त्याचा या प्रस्तावास भूलीस पडला आणि त्याचा फसवणुकीत सापडला आणि त्याने आपल्या वडिलांना हा संदेश दिला.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांना हे ऐकल्यावरच राग आला आणि ते म्हणाले- "मी या पदावर फक्त समाजाच्या उद्धाराच्या उद्देश्याने आहे, माझ्या मुलाला वाढवायला नाही. कोणत्याही प्रकाराचा लोभ मला माझ्या कर्तव्याचे हनन करू देणार नाही".</p>
<p>
	 </p>
<p>
	स्रोत: पुस्तक &#39;युगपुरुष बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर&#39;</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 02 Dec 2019 17:13:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 02 Dec 2019 17:21:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर घडलेली एक प्रेरणादायक कथा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-baba-119031100014_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-baba-119031100014_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-01/16/thumb/1_1/1484560575-1764.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-01/16/thumb/1_1/1484560575-1764.jpg</image>
      <description><![CDATA[लंडनमध्ये घडलेली ही एक छोटी घटना आहे. डॉ. आंबेडकर एका ग्रंथालयात शिकत होते. एका दिवशी लंच ब्रेकमध्ये ग्रंथालयात बसून ब्रेड खाण्यासाठी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="354" src="//media.webdunia.com/_media/hi/img/article/2017-01/16/full/1484560575-1764.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
	लंडनमध्ये घडलेली ही एक छोटी घटना आहे. डॉ. आंबेडकर एका ग्रंथालयात शिकत होते. एका दिवशी लंच ब्रेकमध्ये ग्रंथालयात बसून ब्रेड खाण्यासाठी यहुदी ग्रंथपालाने त्यांना पकडले, त्याच वेळी बाकी सर्व लोक कॅफेटेरियाला गेले होते. त्या यहुदी ग्रंथपालाने त्यांना या कारणामुळे रागवाले आणि दंड आकारला, त्याचबरोबर त्यांना त्यांची सदस्यता रद्द करण्याची धमकी देखील दिली. डॉ. आंबेडकरांनी माफी मागितली आणि त्यांच्या नम्र परिस्थितीची व्याख्या केली आणि आपली कथा सांगितली, त्यांच्या समाजातील संघर्ष आणि ते कोणत्या कारणाने इंग्लंडला आहे हे देखील सांगितले. त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केले की त्यांच्याजवळ कॅफेटेरियामध्ये एक चांगले जेवण खाण्यासाठी पैसा आणि वेळ दोन्हीच नाही. त्यांचा प्रतिसाद ऐकून, ग्रंथपालाने त्यांना सांगितले, आजपासून तुम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळी येथे बसणार नाही परंतु आजपासून मी तुझ्याबरोबर जेवण नक्कीच वाटणार. </p>
<p>
	 </p>
<p>
	या घटनेने आंबेडकरांच्या यहुदीविरुद्ध विचार बदलला आणि त्यांनी एक नवीन मित्र बनविला. आणि भविष्यकाळात यहुदी संघर्ष आणि त्यांचे जीवन याबद्दल त्यांनी बरेच पुस्तक लिहिले.    </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 11 Mar 2019 11:42:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Mar 2019 12:47:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आंबेडकर- एक निष्णात वकील]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/babasaheb-ambedkar-113120600010_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/babasaheb-ambedkar-113120600010_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणून सर्व जग ओळखते. अमेरिकेतील कोंलबिया विद्यापीठात बाबासाहेबांचे विचारशिल्प आहे. बॅ. बाबासाहेब हे एक उत्तम वकील होते. तसेच त्यांनी उलटतपासात अनेकांची भंबेरी उडवली व खटल्यातील सत्य न्यायालयामसोर उघड ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image-->
<p class="wdp_articleLImg" style="text-align: justify;">
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="dr. babasaheb ambedkar" class="imgCont" height="426" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-04/14/full/1397455030-823.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="350" /></p>
	<span style="color: rgb(0, 0, 0); font-size: 11pt;">बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणून सर्व जग ओळखते. अमेरिकेतील कोंलबिया विद्यापीठात बाबासाहेबांचे विचारशिल्प आहे. बॅ. बाबासाहेब हे एक उत्तम वकील होते. तसेच त्यांनी उलटतपासात अनेकांची भंबेरी उडवली व खटल्यातील सत्य न्यायालयामसोर उघड करून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला, याची फार कमी लोकांना माहिती असेल. बॅ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने माढा तालुका न्यायालय व सोलापूर जिल्हा न्यायालय पावन झालेले आहे. बॅ. बाबासाहेब जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचित वर्गाकडून सामाजिक भावनेने लढले. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेताना त्यांना अतोनात त्रास झाला. बॅरिस्टर होऊन ते ज्यावेळी भारतात आले व मुंबई उच्च न्यायालयात वकिली चालू केली तेव्हा त्यंना अस्पृश्तेचा कटू अनुभव आला. बार लायब्ररीमध्ये ते ज्या टेबलावर बसत होते त्या टेबलाकडे उच्चभ्रू समाजातील वकील फिरकत नव्हते.</span></p>
<p style="text-align: justify;">
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">खरे म्हणजे तो प्रसंगच त्यांचे पुढील अस्पृश्तेविरूद्धच्या लढय़ाचे स्फुलिंल्ग ठरला व त्यांनी अस्पृश्तेविरूद्ध लढा देण्याचे ठरविले. बॅ. बाबासाहेबांचा उलट तपास अत्यंत भेदक होता. ज्येष्ठ स्वातंत्र्सेनानी शंकरराव मोरे व शंकरराव जेधे यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात थोर विचारवंत अण्णासाहेब भोपटकर यच्यावर कडक शब्दात टीका केलेली होती. भोपटकरांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेधे यच्याविरूद्ध खटला दाखल केला होता. बॅ. बाबासाहेब व शंकरराव मोरे, शंकरराव जेधे यांच्यात तीव्र राजकीय वैमनस्य होते. तरीही त्यांनी आपले वकीलपत्र बॅ. आंबेडकरांना दिले. या खटल्याच्य सुनावणीच्यावेळी बॅ. आंबेडकरांनी अण्णासाहेब भोपटकरांची भेदक उलटतपासणी केली व उत्तरे देताना भोपटकरांची दमछाक झाली. त्यांच्या उलटतपास अपूर्ण राहिला व त्यांनी पुढील तारीख घेतली. आण्णासाहेब भोपटकर महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ विचारवंत, त्यांची एवढी दमछाक झाली की, त्यांनी पुढील तारखेस खटलाच काढून घेतला. बॅ. बाबासाहेब यांची कुशाग्र बुद्धी व इंग्रजीवरील असामान्य प्रभुत्व यामुळे न्यायाधीश सुद्धा त्यांचा युक्तिवाद ऐकताना दंग होऊन जायचे. </font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">पुढे समाजसेवेमुळे त्यांनी वकिली व्यवसाय कमी केला. ते घटनेचे शिल्पकार झाले. ज्या उच्च न्यायालयात त्यांना अस्पृश्यतेचा कटू अनुभव आला त्या उच्च न्यायालयाचे कामकाज आज बॅ. आंबेडकरांनी तयार केलेल घटनेनुसार चालते, हा एक न्यायच आहे. घटनेच्या या थोर शिल्पकाराचे शिल्प उच्च न्यायालयात नसावे, याची फार मोठी खंत मनाला वाटते. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी याबाबत सत्वर पाऊल उचलून घटनेच्या या शिल्पकाराचे शिल्प मुंबई उच्च न्यायालयात साकार करणे, हीच या घटनेच्या थोर शिल्पकारास आदरांजली ठरेल.</font></p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">अ‍ॅड. धनंजय माने </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 06 Dec 2018 00:36:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 06 Dec 2018 10:12:01 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-118041400010_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-118041400010_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-04/13/thumb/1_1/1492078469-9099.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-04/13/thumb/1_1/1492078469-9099.jpg</image>
      <description><![CDATA[14 एप्रिल 1891 या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याचा उदय झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी कोट्यावधी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="354" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2017-04/13/full/1492078469-9099.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
	भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (दि. 14 एप्रिल) जयंती. त्यानिमित्त या महामानवाच्या विविध पैलूंवर नजर टाकणारा लेख. </p>
<p>
	 </p>
<p>
	14 एप्रिल 1891 या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याचा उदय झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी कोट्यावधी अनुयायांच्या आनंदाश्रुंना वाट करुन देत काळजाला स्पर्शून जातो. त्याचबरोबर जेथे जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत, तेथे तेथे उसळणारी गर्दी आणि प्रत्येकवर्षीचा ब्रेक होणारा गर्दीचा उच्चांक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या श्रद्धेचा अन्‌ आदराचा दाखलाही देवून जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबईच्या चैत्यभूमीवर तर एका बाजूला अथांग महासागर आणि दुसऱ्या बाजूला विराट जनसागर, असे अचंबित करुन टाकणारे चित्र इथे प्रत्येकाला पहायला मिळते! जगाच्या पाठीवर इतर कोणत्याच महापुरुषांच्या जयंतीला अथवा महापरिनिर्वाणदिनाला अशी ऐतिहासिक गदी कोठेच होत नाही. मात्र, या क्रांतिनायकाबाबत हे घडते ! केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील असंख्य अनुयायी जयंतीदिनी आंबेडकरांच्या ऐतिहासिक ठिकाणी दाखल होत असतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	महत्वाचे म्हणजे इथे येवून भौतिक सुखाची कोणी मागणी करीत नाही की, कोणी संतती अन्‌ संपत्तीसाठी नवस बोलत नाही. मुलाबाळांचे मंगल परिणय जुळावे म्हणून कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हातात गंडे-दोरे बांधत नाहीत की कुटुंब सुखी रहावे, रोगराईतून मुक्तता मिळावी म्हणून कोणी गळ्यात ताईत बांधत नाहीत. मात्र, तरीही इथे अचाट आणि अफाट अशी गर्दी उसळतेच !</p>
<p>
	 </p>
<p>
	का घडते हे? या प्रश्नाकडे वळले म्हणजे लक्षात येते की, या सृष्टीवर हजारो वर्षे सूर्य उगवत होता, पण तो कधीही शोषित, पीडित, वंचित दलितांना प्रकाशित करु शकला नाही. मात्र, या सूर्यापेक्षाही प्रखर तेजाने आपली बुध्दी उर्जा पेरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याने “अंधारयुगात’ चाचपडणाऱ्या माणसाला “ज्ञानप्रकाश’दिला. त्यांच्यातील जगण्याची उमेद अन्‌ उर्जा जागविली.</p>
<p>
	 </p>
<p>
	जो दलित माणूस शेकडो वर्षे जाती व्यवस्थेच्या एकदम तळाला गटांगळ्या खात होता. त्यांचे प्राण वाचविण्याचे तेजस्वी आंदोलन या क्रांतीसूर्याने छेडले. त्यामुळे स्वयंविश्वासाचा पूर्णतः चोळामोळा झालेल्या दलित, उपेक्षित माणसाला “माणूस’पण मिळाले. त्यांच्या अंगात दहा हत्तींचे बळ आले. तो ताठ उभा राहिला. त्याच्या धमण्या-धमण्यांतून स्वयंविश्वास आणि स्वयंअस्मितेचे रक्त सळसळू लागले. प्रस्थापित व्यवस्थेच्या गुलामगिरीचे साखळदंड त्याच्या पायातून निखळून पडले. तो मुक्त झाला. तो स्वतंत्र झाला…!आणि म्हणूनच मानवी स्वातंत्र्याच्या या उद्गात्याबद्दलची अपार श्रध्दा जयंती दिनी उफाळून येताना दिसते.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 127 वी जयंती आज साजरी होत आहे. सर्वत्र जयंतीचा उत्सवच नव्हेतर महामहोत्सव होत आहे. या महामहोत्सवात सहभागी होत असताना, आजवरच्या कालखंडामध्ये नेमके काय झाले याचे सिंहावलोकन करण्या बरोबरच इथून पुढच्या काळात पुरोगामी अनुयायांना अत्यंत गांभिर्यपूर्वक व जबाबदारीने पावले उचलावी लागणार आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचार चळवळ आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. त्यांचा समतामूलक समाजनिर्मितीचा लढा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा पातळ्यांवर आपण कुठपर्यंत पुढे नेला ? जाती निर्मूलनाची चळवळ आपण किती यशस्वी केली ? अन्याय, अत्याचार रोखण्याबरोबरच गुलामगिरी लादणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक बदलासाठी कोणती ठोस भूमिका घेतली.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण किती झटलो? सफलतेच्यादृष्टीने देश कुठपर्यंत नेला? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील मार्गदर्शक तत्वात नवभारताचे जे चित्र रेखाटले ते आपण साकारले काय ? स्वातंत्र्य, समता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, बंधूभाव, विवेकवाद ही मूलभूत तत्वे जर आदर्श समाज रचनेची तत्वे आहेत, तर या तत्वांशी भारत देश प्रामाणिक राहण्यासाठी आपण कोणत्या स्वरुपाची आंदोलने केली ? जीवनाच्या सुंदर उभारणीचा व सर्जनशील निर्माणाचा जोरकसपणे पुरस्कार करण्यासाठी आपण काय केले ? हजारो वर्ष प्रस्थापित व्यवस्थेने – संस्कृतीने इथल्या माणसाला नाकारून, झिडकारून, लाथाडून, गुलामगिरीच्या साखळदंडात आणि यातनांच्या-वेदनांच्या तुरंगात बंदीस्त केले, त्या बंदिवानाच्या मुक्ततेसाठी आपण कोणता संघर्ष छेडला ? कालबाह्य तत्वांचा, श्रध्दांचा, अंधश्रध्दांचा, कर्मकांडाचा, पूजाअर्चांचा, होमहवनांचा, दैववादाचा, उच्च-निचतेचा, विषमतेचा,वर्ण-वर्गभेदाचा सर्व धर्मसंभार गाढून ज्ञानवादी मनोधारणांसाठी, विज्ञानवादी भाववृत्तीसाठी, स्वयंप्रज्ञ चित्तवृत्तीसाठी आपण किती आणि कशी वाटचाल केली ? निरंतर मानवी प्रगती बुद्धिप्रामाण्यवाद, प्रतित्यसमुत्पाद आणि अनित्यवाद या अजरामर अशा तीन सिध्दांतावर होते. अशी सर्वोच्च विचारधारा पेरणारा सर्वोत्तम भूमीपुत्र जो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिला त्या गौतम बुध्दांचा आपण किती प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक स्वीकार केला ? का फक्त किर्तनात बुध्दाचे नाव आणि वर्तनात मात्र कुठेच नाव नाही ! असे तर आपण विसंगत वागत नाही ना ?या आणि अशा प्रश्नांचा “ठाव’घेऊन समग्र व्यवस्था परिवर्तनाची चळवळ आणखी गतीमान करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, याची खबरदारी पुरोगामी अनुयायांनी घ्यायला हवी.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचार चळवळ भावनिक पातळीपेक्षा बौध्दिक पातळीवर अधिक तेजस्वी आणि यशस्वी कशी करता येईल असा सामुहिक प्रयत्नही करणे गरजेचे आहे. केवळ जयंती दिनाला बाबासाहेबांना आदराने अभिवादन केले म्हणजे आपली “चळवळ’आणि आपले “कर्तव्य’संपले असे मानता कामा नये.</p>
<p>
	 </p>
<p>
	छत्रपती शिवरायांना ज्यांनी गुरु मानले त्या जोतीराव फुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले आणि अडीच हजार वर्षापूर्वी “अतः दीप भवः’ म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आणि “भवतु सब्ब मंगलम’म्हणजे लोकशाही समाजवाद या सुत्रांचा पुरस्कार करुन मानवी उन्नयनाचा जागर करणाऱ्या गौतम बुध्दांचा धम्म अनुसरला. हा बाबासाहेबांचा कृती कार्यक्रम भावनिंक पातळीवरचा नसून प्रचंड मनन, प्रगाढ चिंतन आणि अथक अभ्यासातून प्रसूत झालेला व आचरणातून साकारलेला अद्वितीय असा क्रांतीकारी इतिहास आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	तेंव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ प्रामाणिकपणे, निष्ठापूर्वक अभ्यासातून व आचरणातून पुढे नेल्याशिवाय आता आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही, हे पुरोगाम्यांनी गांभीर्यपूर्वक लक्षात ठेवले पाहिजे. नाहीतर दररोज सकाळी अत्यंत श्रध्दापूर्वक, आदराने व नम्रतेने आपल्या आईवडीलांच्या पाया पडणारा मुलगा आई वडीलांनी सांगितलेला अभ्यास करतच नसेल, त्यांचे विचार आचरणात आणतच नसेल, तर आदराने आणि नम्रतेने आई वडीलांच्या पाया पडणाऱ्या त्या कृतीला काहीच अर्थ उरत नाही, उलट तो ढोंगीपणा ठरतो ; नव्हेतर आई-वडीलांशी ती एक प्रकारची गद्दारी केल्यासारखेच होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 127 व्या जयंती निमित्त अभिवादन करताना तसे घडणार नाही ना, याची काळजी अभिवादन कर्त्यांनी घ्यायला हवी, इतकेच !</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 14 Apr 2018 12:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 14 Apr 2018 12:34:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आज जयंती बाबासाहेबांची]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-118041400008_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-118041400008_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-12/06/thumb/1_1/1417845358-1806.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-12/06/thumb/1_1/1417845358-1806.jpg</image>
      <description><![CDATA[सार्वभौमत्व बंधुत्व समता 
प्रस्धापित करण्या समरसता
शोषितांसाठी नवी वाट शोधली
अद्वितीय अशी घटना लिहीली]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="" class="imgCont" height="210" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2014-12/06/full/1417845358-1806.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="240" /></p>
	आज जयंती बाबासाहेबांची </p>
<p>
	विश्व विजेत्या घटनाकारांची......धृ</p>
<p>
	 </p>
<p>
	सार्वभौमत्व बंधुत्व समता </p>
<p>
	प्रस्धापित करण्या समरसता</p>
<p>
	शोषितांसाठी नवी वाट शोधली</p>
<p>
	अद्वितीय अशी घटना लिहीली</p>
<p>
	आज जयंती. ..........1</p>
<p>
	 </p>
<p>
	 अस्प्रृशतेच्या खाईत पडलेल्या </p>
<p>
	रूढी रिवाजाने बुरसटलेला</p>
<p>
	व्यसन अज्ञानाने मागासलेला</p>
<p>
	घडली क्रांती दिन दुबळ्या जनतेत</p>
<p>
	आज जयंती. .........2</p>
<p>
	 </p>
<p>
	धर्मांतर करूनी क्रांती घडवली</p>
<p>
	प्रज्ञा शिल करूणेचा धम्म दाखवला</p>
<p>
	जातियतेच्या प्रथेला सुरूंग लावला</p>
<p>
	विश्व बंधुत्वाचा दिप दाखवला</p>
<p>
	आज जयंती. .........3</p>
<p>
	 </p>
<p>
	राज्य घटना जरी श्रेष्ठ असली</p>
<p>
	हाल केले तिचे भ्रष्ट नेत्यांनी </p>
<p>
	खोटे जातीचे दाखले अन उमेदवार </p>
<p>
	आरक्षण ह्या हरामखोरांनी लाटले</p>
<p>
	आज जयंती.........4</p>
<p>
	 </p>
<p>
	आरक्षणावर करती टिका फार</p>
<p>
	जावई सरकारी आम्हा म्हणती </p>
<p>
	सत्तेचा माज उतरला तेंव्हा तर</p>
<p>
	आरक्षणाची भिक मागायला तयार </p>
<p>
	आज जयंती. ..........5</p>
<p>
	 </p>
<p>
	सारे काही आहे तरी बाबासाहेब </p>
<p>
	आज आम्हांस गरज तुमची आहे</p>
<p>
	चळवळीत आम्ही शोधीतो</p>
<p>
	निस्वार्थ निर्भिड सच्चा कार्यकर्ता </p>
<p>
	आज जयंती. ........6</p>
<p>
	 </p>
<p>
	डाॅ.मिलिंद शेजवळ</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 14 Apr 2018 10:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 14 Apr 2018 10:47:46 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ज्ञानयोगी बाबासाहेब]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-116120600010_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-116120600010_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[दलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजाला एक आव्हान होते. त्यांना भारत देश अप्रिय नव्हता, इथला धर्म अप्रिय नव्हता तर त्या धर्माने, जातिव्यवस्थेने केलेले समर्थन, संवर्धन ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	दलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजाला एक आव्हान होते. त्यांना भारत देश अप्रिय नव्हता, इथला धर्म अप्रिय नव्हता तर त्या धर्माने, जातिव्यवस्थेने केलेले समर्थन, संवर्धन त्यांना अमान्य होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबासाहेबांच्या कुटुंबाला लक्ष्मी प्रसन्न नव्हती तर सरस्वतीची आराधना करणारे कबीरपंथी व पुस्तकप्रेमी वडील होते. वडिलांच्या प्रयत्नाने व प्रेरणेने ते पुस्तकामध्ये रस घेऊ लागले आणि अभ्यासाच्या जोरावर, विद्येच्या जोरावर यश संपादन करू लागले. संपादित केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला सामर्थ्य व दिशा देण्यासाठी केला आणि महागड्या चवदार तळ्यातील पाणी प्राशन करून सामाजिक क्रांतीची मुर्हुतमेढ रोवली.</p>
<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="dr. babasaheb ambedkar" class="imgCont" height="426" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-04/14/full/1397455030-823.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="350" /></p>
</p>
<p>
	डॉ. आंबेडकरांची ज्ञानलालसा इतकी तीव्र होती की, त्यासाठी ते व्यक्तिगत, शारीरिक, मानसिक गरजांकडे दुर्लक्ष करायचे. इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमासाठी सामान्यपणे आठ वर्षे लागायची तो अभ्याक्रम त्यांनी अवघ्या दोन वर्षे तीन महिन्यातच पूर्ण केला. पण त्यासाठी त्यांना दिवसाकाठी 21 तास अभ्यास करावा लागला. रात्रीचा दिवस करावा लागला. वेळोवेळी उपाशीपोटी राहावे लागले. अशी त्यागीवृत्ती, अशी ज्ञानभक्ती आज किती जणात, किती प्रमाणात आढळेल हा मोठा प्रश्न आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	विद्येच्या जोरावर त्यांनी अनेक पदव्याही ग्रहण केल्या. राजयोग सोडून त्यांनी ज्ञानयोग, कर्मयोग अंगीकारला. आपल्या व्यक्तिगत ज्ञानसंपदेने त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. त्यासाठी त्यांनी अनेक आव्हाने स्वीकारली. जीवनातील प्रत्येक क्षण एक नवीन अनुभूती देत असतो, असे क्षण टिपण्यासाठी जीवनामागून जीवन लाभले तरी ते कमी वाटेल, असे त्यांचे मत होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	विद्या, स्वाभिमान व शील ही दैवते मानणार्‍या आंबेडकरांचे म्हणणे होते की केवळ विद्या असून चालत नाही तर तिचा सदुपयोग करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. विद्या ही दुधारी तलवार आहे. तिचा उपयोग आपण इष्ट कार्यांसाठी करायला हवा. त्यांच्या मते विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे. डॉ. आंबेडकरांजवळ 25 हजार पुस्तकांचा संग्रह होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	अशा या ज्ञानी माणसाला तरीही आपल्या विचारशीलतेचा, विद्वत्तेचा, व्यासंगाचा कधीच अभिमान, गर्व वाटला नाही. आपल्या वैचारिक जडणधडणीमध्ये विद्या, स्वाभिमान व शील यांना अग्रस्थान देणार्‍या बाबासाहेबांना ही त्रिसूत्री समाजाच्या भौतिक व नैतिक उन्नतीला उपयुक्त असल्याने तिचे अनुकरण आवश्यक निश्चित आहे, असं वाटायचं.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे काही झाले ते स्वकष्टाने. त्यांनी जे काही मिळवले ते स्वप्रयत्नाने. समाजातील आपले महत्त्व व मोठेपण ते ओळखून होते. लोकांनी आपल्याला देव बनवू नये, असे ते कळकळीने सांगायचे. त्यांना स्वत:लाच व्यक्तिपूजा, मूर्तिपूजा मान्य नव्हती.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असणार्‍या आणि संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या महामानवाची जेवढी स्तुतिसुमने गावीत तेवढी कमीच आहेत. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.</p>
<p>
	 </p>
<p>
	- पूजा स्वामी</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 13 Apr 2018 14:21:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 13 Apr 2018 14:22:54 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पददलितांचा कैवारी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-110041200041_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-110041200041_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, यादृष्टीने 'स्वातंत्र्य, समता व बंधुता' या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. गरीब-श्रीमंत, सवर्ण-मागसवर्गींय, कामगार-मालक हे भेदाभेद मिटवून सर्वधर्मीय ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p class="wdp_articleRImg">
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="" class="imgCont" height="200" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2015-05/30/full/1432988695-6727.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="230" /></p>
	भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, यादृष्टीने &#39;स्वातंत्र्य, समता व बंधुता&#39; या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. गरीब-श्रीमंत, सवर्ण-मागसवर्गींय, कामगार-मालक हे भेदाभेद मिटवून सर्वधर्मीय लोक हे कायद्यापुढे समान आहेत, ही संकल्पना त्यांनी जनमानसात दृढ करुन देशातल्या प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बहाल केला. आज (ता.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. ‍त्यानिमित्त त्यांच्या गौरवपूर्ण व महान कार्यावर टाकलेल्या हा दृष्टीक्षेप ....</p>
<p style="text-align: justify;">
	<span style="font-size:16px;"><font style="font-size:11pt; color:#000000">सामाजिक न्यायचे प्रणेते भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू गावी झाला आणि जणू काय, एका सामाजिक क्रांतीचा उदय झाला. खरं तर, शालेय जीवनात बाबासाहेबांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे वडील रामजी सुभेदारांनी शिकवलं. बाबासाहेब अवघे 5 वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे आकस्मिक निधन झालं आणि बाबासाहेबांच्या शिरावरची जणू मायेची सावलीच विरुन गेली. एकूण आर्थिक स्थिती बेताची असल्याचे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरी करुन पुढे त्यांच्या मदतीने डॉ. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले आणि पुढे समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन, सामाजिक न्याय प्रस्थापित केला.</font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">डॉ.आंबेडकर हे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ होते. गरीबी व निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणे असल्याने त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र रयतेला दिला. शिकल्याशिवाय आपल्यावर अन्याय होतोय हे कळत नाही आणि आपले हक्क मिळत नाहीत, हा विचार पददलितांना देऊन बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले आणि पाच हजार वर्षांपासून अमानुष व लाचारीचे जीवन जगणार्‍या जनमानसात आत्मसन्मानाची व अस्मितेची ज्योत पेटवली.</font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आयुध असून, त्यातूनच खर्‍या अर्थाने माणसाला आपल्या घटनादत्त अधिकार व कर्तव्याची जाणीव होऊन तो विवेकी व विचारी होतो. स्त्रियांना शिक्षण दिले तर त्या मुलांवर चांगले संस्कार घडवू शकतील, असा मोलाचा उपदेश बाबासाहेबांनी पददलितांना दिला. वंचित-उपेक्षित वर्गाच्या पाल्यांसाठी त्यांनी सोलापूर, पनवेल, ठाणे, पुणे, नाशिक, बेळगाव आदी ठिकाणी वसतिगृहे सुरु करुन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीचीही व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर डॉ. बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज, मुंबईत सिद्धार्थ कॉलेज व लॉ कॉलेज स्थापन केले. याशिवाय मुंबई, औरंगाबाद, पंढरपूर, दापोली, नांदेड आदी ठिकाणी शैक्षणिक संस्थांचं जाळंही निर्माण केलं.</font></span></p><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1004/12/images/img1100412041_2_1.jpg' alt='ambedkar'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. आंबेडकरांनी स्वकर्तृत्त्वाने व विद्वत्तेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी केली. स्वत: बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून 'भारताचे राष्ट्रीय उत्पन्न' या विषयावर संशोधन करुन पी.एच.डी. संपादन केली. तर 'रुपयाची समस्या' या विषयावर संशोधन करुन लंडन विद्यापीठातून डी.एस्सी. व बार एट लॉ ही पदवी प्राप्त केली. अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास करुन डॉ. आंबेडकरांनी विविध पदव्या संपादन केल्या. खरं पाहता, बाबासाहेबांनी सर्वप्रथम स्वत: शिकून-सवरुन शिक्षणाचे महत्त्व व उपयुक्तता चांगल्याप्रकारे जाणून घेतली आणि त्यांनतर पददलित बंधु-भगिनींमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करुन त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. म्हणूनच बाबासाहेबांना पददलितांचे कैवारी म्हणून संबोधले जाते.   </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शतकानुशतके दुर्लक्षित व वंचित समाजाला जागृत करण्यासाठी वृत्तपत्रासारखं दुसरं साधन नाही, असे बाबासाहेबांचं ठाम मत होतं. भारतीय समाजजीवनात ज्यांना कधीच आवाज उमटला नाही, अशांना बोलकं करण्याचं काम डॉ. आंबेडकरांनी प्रकाशित केलेल्या मूकनायकने केलं. त्यापाठोपाठ बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत सारखी वृत्तपत्रे त्यांनी लोकजागृती व लोकशिक्षणासाठी सुरु केली. वृत्तपत्रे हे जनतेचे एक जबाबदार सल्लागार असून वस्तुनिष्ठ बातम्या छापणे हे प्रत्येक वृत्तपत्राचे आद्यकर्तव्य आहे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. जातीभेदामुळे रुढ झालेली सामाजिक विषमता समाजातून हद्दपार करण्यासाठी बाबासाहेबांनी वृत्तपत्र या आयुधाचा वापर करुन समाजात समानतेची शिकवण दिली व समाजपरिवर्तन घडवून आणलं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. आंबेडकरांना विविध विषयांचे ग्रंथ संग्रहित करण्याचा दांडगा व्यासंग होता. अध्यापनाचे काम करणार्‍या शिक्षक, अध्यापकांनी आपल्या पगारातून ग्रंथ खरेदीसाठी काही प्रमाणात नियमित खर्च करावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. आर्थिक स्थिती बेताची असल्याने बाबासाहेबांनी कर्ज काढून मुंबईत राजगृह नामक भव्य ग्रंथालय उभारलं. जागतील विविध देशांच्या राज्यघटना तसेच सामाजिक, राजकीय क्रांतींचा इतिहास, धर्मग्रंथ, संतांची ‍चरित्रे व तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, विधीशास्त्र, इतिहास, भूगोल, शिक्षणशास्त्र आदी विषयांची सुमारे 50 हजार पुस्तके संग्रहित केली. याशिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी व पर्शियन गद्य-पद्य साहित्यांची पुस्तकेही त्यांनी संकलित करुन अभ्यासली. बाबासाहेब म्हणत ''जीवन कार्याला दिशा दाखविणारे व स्फुर्ती देणारे ग्रंथ हेच माझे खरे गुरुमि‍त्र होत.''</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजातून निरक्षरता, गरिबी, जातीभेद यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकशाही शासनप्रणाली सर्वोत्तम, अशी त्यांची ठाम भूमिका होती. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आदी मूलभूत अधिकार बहाल केले. कुठल्याही जाती-धर्माची मग ती स्त्री असो व पुरुष कायद्यापुढे समान असून, त्यांना समान नागरिकत्त्वाचा हक्क प्रदान करण्यात बाबासाहेबांनी पुढाकार घेतला. महाडचे चवदार तळे अस्पृशांसाठी खुलं करणे, नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी केलेला सत्याग्रह तसेच मनु्स्मृतीची जाहीररित्या होळी करुन त्यातील चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेला विरोध अशा ऐतिहासिक मोहिमा उभारुन बाबासाहेबांनी सार्‍या देशात समानतेची बिजे रोवली. सामाजिक लोकशाहीच्या पायावर राजकीय लोकशाहीची उभारणी झाली तरच, खर्‍याअर्थाने लोकशाही यशस्वी होऊ शकेल, असा राजकीय मंत्र त्यांनी राज्यकर्त्यांना दिला. बाबासाहेब हे लोकशाहीचे खरे उपासक व पुरस्कर्ते होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 10 Apr 2018 15:01:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 10 Apr 2018 15:03:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रिपब्लिकन ऐक्य हे मृगजळ?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-jayanti-110041200042_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-ambedkar-jayanti-110041200042_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-12/06/thumb/1_1/1417845358-1806.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-12/06/thumb/1_1/1417845358-1806.jpg</image>
      <description><![CDATA[चौदा एप्रिल हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिन. बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना दिली. त्याचबरोबर देशातील दलित, मागासवर्गीय, महिला यांना शोषणमुक्तीचा मार्ग दाखविला.समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचे विचार दिले. आपल्या माघारी ही]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image-->
<p class="wdp_articleLImg">
	<p>
		<p style="float: left;">
			<img align="left" alt="" class="imgCont" height="210" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2014-12/06/full/1417845358-1806.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="240" /></p>
		<span style="color: rgb(128, 128, 0); font-size: 11pt;">चौदा एप्रिल हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिन. बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना दिली. त्याचबरोबर देशातील दलित, मागासवर्गीय, महिला यांना शोषणमुक्तीचा मार्ग दाखविला.समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचे विचार दिले. आपल्या माघारी ही परंपरा चालू राहावी यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. पण दुर्देवाने आंबेडकरांनंतर त्यांची परंपरा चालविणारा समर्थ वारस मिळाला नाही. रिपब्लिकन पक्षाचे शतशः तुकडे झाले. </span></p>
</p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष वाढला असता तर देशाचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. महाराष्ट्राचे चित्र खूपच वेगळे राहिले असते. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाची वाट लावण्यात त्यांचे अनुयायीच आघाडीवर राहिले. निवडणूक आयुक्ताकडे- आज ३२ रिपब्लिकन पक्षाची नोंदणी आहे. प्रत्यक्षात शंभरपेक्षा अधिक रिपब्लिकन पक्ष असावेत असा अंदाज आहे. दर चार सहा महिन्याला रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा नारा दिला जातो. परंतु, प्रत्यक्षात काम मार्गी लागत नाही. रिपब्लिकन पक्षाचे नेते ‘मी सांगतो तेच अंतिम सत्य’ ही भावना सोडायला तयार नाहीत. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">पक्षाचे एक्य होत नाही. काँग्रेस किंवा राष्ट्वादी काँग्रेसला बाबासाहेबांचे अनुयायी संघटीत होणे पडवणारे नाही. बहुजन समाज संघटित झाला तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला मोठा प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतो, म्हणून या दोन्ही पक्षाला रिपब्लिकन पक्षाला संघटीत होऊ द्यायचे नाही. एखाद्या राजकीय पक्षात तात्विक राजकारणावरून फूट पडणे समजू शकते. परंतु, निव्वळ किरकोळ लोकांच्या स्वार्थासाठी फूट पडावी. पक्षाचे एक दोन नव्हे तर शंभर तुकडे व्हावेत यापेक्षा वाईट काही असू शकत नाही. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">आता रिपब्लिकन पक्षाच्या एकीकरणाचा खेळ पुरे झाला. जनतेने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. बहुजन समाजाला संघटीत व्हायचे असेल तर त्यांनी आता रिपब्लिकन पक्षाचे तुकडे पाडणार्‍या लोकांना पद्धतशिरपणे दूर ठेवले पाहिजे. जनतेने त्यासाठी नव्या नेत्यांचा शोध घ्यावा. रिपब्लिकन पक्षाच्या उभारणीसाठी नेतृत्व कोणत्या जातीचे असावे, हा मुद्दा तितका महत्त्वाचा नाही. तर पक्ष उभारणीचा आहे. उत्तर प्रदेशात मायावती यांनी क्रांती घडवली. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यां दोन्ही पक्षांना आडवे पाडून सत्ता मिळविली. मायावती यांचा प्रयोग इतर राज्यातही यशस्वी होऊ शकतो. महाराष्ट्रात त्यांनी पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">राज्यातील बहुजन समाजाने मायावतींचा वाढता प्रभाव लक्षात घेतला पाहिजे. मायावती प्रभावी होत आहे असे लक्षात आले तर किमान रिपब्लिकन पक्षाचे नेते स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ सोडतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आजच्या परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न हीच बाब महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल.<br />
<br />
- महेश जोशी</font><br />]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 10 Apr 2018 15:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 10 Apr 2018 15:05:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आंबेडकरांचा मार्क्‍सवाद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/babasaheb-ambedkar-116041400009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/babasaheb-ambedkar-116041400009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/14/thumb/1_1/1460619696-9565.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/14/thumb/1_1/1460619696-9565.jpg</image>
      <description><![CDATA[जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील कन्हैयाकुमार याने तुरुंगातून सुटून आल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये म्हटले होते की, पोलिसांनी आम्हाला निळ्या आणि लाल कटोरीमध्ये जेवायला दिले. त्यामुळे एक नवीन विचार विद्यार्थीजगतात पसरत आहे याचे भान यामुळे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="ambedkar" class="imgCont" height="792" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-04/14/full/1460619696-9565.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="264" /></p>
	<span style="font-size: 16px;">जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील कन्हैयाकुमार याने तुरुंगातून सुटून आल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये म्हटले होते की, पोलिसांनी आम्हाला निळ्या आणि लाल कटोरीमध्ये जेवायला दिले. त्यामुळे एक नवीन विचार विद्यार्थीजगतात पसरत आहे याचे भान यामुळे लोकांना आले आहे. कन्हैयाकुमार हा एआयएसएफचा कार्यकर्ता आहे आणि जेएनयूमध्ये मार्क्‍सवादाचा जबरदस्त प्रभाव आहे. अशा ठिकाणी निळी आणि लाल कटोरी एकत्र आणण्याची भाषा केली जाते, याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच 125 व जयंतीच्या पाश्र्वभूमीवर एक वेगळे महत्त्व असल्याचे दिसते. दुसरीकडे संघ आणि परिवारानेदेखील 125 वी जयंती साजरी करुन आंबेडकर आणि संघ यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पाश्र्वभूमीवर सध्या आंबेडकर आणि मार्क्‍सवाद यांची चर्चा चालू आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">वास्तविक, महाराष्ट्रामध्ये ही चर्चा 40-50 वर्षापूर्वीपासूनच सुरू आहे. मार्क्‍सवादाचा दलित चळवळींवर असणारा प्रभाव लक्षात घेण्यासारखा आहे. मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवाद यांचा संबंध कधी एकमेकांची स्पर्धा करण्यात तर एकमेकांचे सहकार्य करण्यामध्येच चळवळीच्या रुपात झाल्याचे दिसते. त्यात आश्चर्य काही नाही. कारण मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवाद हे मूलत: मानवकेंद्रित तत्त्वज्ञान आहे. दोन्ही तत्त्वज्ञानांचा केंद्रबिंदू हा मानव आणि शोषणमुक्त मानवी समाज निर्माण करणे आहे. दोन्ही तत्त्वज्ञानांचे मूळ उद्दिष्ट सारखेच आहे. त्यामुळे दोन्हींमध्ये प्रचंड साधम्र्य दिसते. 1950 मध्ये चीनमध्ये झालेल्या क्रांतीनंतर व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया, बर्मा आदी दक्षिण पूर्व आशियामध्ये कम्युनिस्टांचा प्रभाव खूप मोठय़ा प्रमाणात वाढू लागला. जिथे बौद्ध समाज मोठय़ा प्रमाणात राहतो, अशा ठिकाणीदेखील मार्क्‍सवादाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढीस लागला. काठमांडूला झालेल्या परिषदेत या सर्व देशांचे प्रतिनिधी होते. त्यासाठी बाबासाहेबांनाही आमंत्रण देण्यात आले होते. या परिषदेत बाबासाहेबांनी दिलेले भाषण ‘मार्क्‍स आणि बुद्ध’ या विषयावरचे होते. पण, भारतात त्यावरचे मराठी पुस्तक छापले गेले तेव्हा ते ‘मार्क्‍स की आंबेडकर’ असे मांडण्यात आले. त्यामुळे बरीच वर्षे महाराष्ट्रात संदिग्धता होती, गोंधळ होता. रावसाहेब कसबे यांनी हा गोंधळ दूर करताना आपल्या पुस्तकातून मार्क्‍स आणि आंबेडकर, मार्क्‍स आणि बुद्ध अशी मांडणी करून मार्क्‍स किंवा बुद्ध असे नाही, असा विचार स्पष्टपणाने उलगडून सांगितला. त्यातून बाबासाहेबांना जे म्हणायचे होते, ते मूळ पदावर आणले आहे. पण वास्तवात आपण दोन गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. पहिली म्हणजे मार्क्‍स हा समाजवादी विचारांचा होता आणि समाजवादी विचारांचा प्रभाव बाबासाहेबांवर होता. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आणि कम्युनिस्टांची चळवळ या दोन्ही मुंबईमध्ये एकाच वेळी वाढल्या. 1920 नंतर बाबासाहेब मुंबईला आले आणि 1920 साली मुंबईत आयटकची स्थापना झाली. 1925 साली कानपूरला कम्युनिस्ट पक्षांची स्थापना झाली. परंतु कम्युनिस्ट पक्षांचा आधार हा कामगार होता आणि मुंबईमध्ये कामगार हाच सर्वात मोठा पक्ष होता. हा कामगार प्रामुख्याने दलित होता.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">त्यामुळे आंबेडकरी चळवळ आणि कम्युनिस्ट चळवळ या दोघांमध्ये एकाच वेळी सहकार्यही होते आणि स्पर्धाही होती. आधी जातीय अंताला प्राधान्य द्यायचे की, आर्थिक समतेला द्यायचे अशी ती स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये हे दोघेही वाढलेले आहेत. ज्या जनतेच्या जोरावर चळवळ उभी करायची तो आधार गट मात्र एकच होता. त्यामुळे या दोन्हीमध्ये अनेक वेळा सहकार्य आणि स्पर्धा अशा प्रकारचे विचित्र वातावरण 1920 ते 1940 या काळात दिसून येते. 1940 नंतर मात्र देशाची फाळणी होणार, देशाला स्वातंर्त्य मिळणार, हिंदू-मुस्लीम वेगळे होणार अशा वातावरणात बाबासाहेबांनादेखील दलितांचे प्रश्न मांडण्यासाठी स्वतंत्र मंचांची गरज होती. त्यावेळी मजूर पक्षाला प्रतिनिधीत्व मिळू शकत नव्हते. त्यामुळे दलितांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी शेडय़ुल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून आपली स्वतंत्र भूमिका तयार करायला सुरुवात केली. मात्र बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट होती की, जातीच्याभोवती संघटन फिरवून जातीमुक्ती होणार नाही. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर लगेच शेडय़ुल कास्ट फेडरेशन सोडून रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">आज आंबेडकर वादाच्या नावाने लोक जातीनिहाय पक्ष काढतात. ते बाबासाहेबांना कधीच मंजूर नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मार्क्‍सवाद आणि बाबासाहेबांची भूमिका ही जातीच्या पलीकडे जाऊन पक्ष हीच होती. मनमाडच्या रेल्वे कामगारांसमोर भाषण करताना त्यांनी ब्राम्हणशाही, भांडवलशाही हे आमचे दोन प्रमुख शत्रू आहेत आणि प्रत्येक कामगार कार्यकर्त्याने, चळवळीतल्या माणसाने कम्युनिस्ट जाहीरनाम वाचला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. या वरुन त्यांची मार्क्‍सवादाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी स्पष्ट होते.</span></p><p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="ambedkar" class="imgCont" height="168" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-04/14/full/1460619997-0651.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="187" /></p>
	<span style="font-size:16px;">त्याचबरोबर कम्युनिस्टांनी 1930 साली त्यांच्या परिषदेत जातीय अंताचा ठराव केलेला होता. भारतामध्ये अनेक ठिकाणी कम्युनिस्टांनी समाज सुधारणेच्या चळवळीमध्ये पुढाकार घेतला होता. केरळ, बंगाल, तमिळनाडू, ओरिसा या ठिकाणी त्यांचा सहभाग होता. समाज सुधारणा झाली पाहिजे, जाती संपल्या पाहिजेत याबद्दल कम्युनिस्टांचाही आग्रह होता. पण भर कशावर द्यावा तर त्या काळी कामगार आणि या वर्गावर कम्युनिस्टांचा भर असल्यामुळे कामगार चळवळीवर त्यांचा प्राधान्याने भर होता. या चळवळीत फूट नको म्हणून जाती संदर्भातील विषय थोडासा मागे ठेवावा असा मुद्दा काही प्रमाणात पुढे आला. त्यामुळे असा समज निर्माण होऊ लागला की, बहुतेक कम्युनिस्ट हे सवर्ण असल्यामुळे त्यांचे जातीय लढय़ाकडे दुर्लक्ष झाले आहे. असा आरोप कम्युनिस्टावर होऊ लागला. आंबेडकर हे स्वत: मार्क्‍सबद्दल अतिशय स्पष्ट होते. त्यांची ही भूमिका स्पष्ट होण्यासाठी काठमांडू येथे ‘मार्क्‍स आणि बुद्ध’ हे जे भाषण केले त्यामध्ये बुद्धाचे जवळजवळ सर्व तत्त्वज्ञान हे मार्क्‍सचे तत्त्वज्ञान होते. फक्त हिंसेचा मार्ग मार्क्‍सवादी स्वीकारतात तो बरोबर नाही, असे त्यांचे म्हणणे होते. बाबासाहेबांच्या त्या मांडणीला ही सगळी जागतिक पाश्र्वभूमी होती. पण 1952 नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ज्यावेळी अधिकृतरीत्या घटना मान्य केली आणि लोकशाही मार्गाने परिवर्तन होऊ शकते, ही भूमिका मान्य केली. त्यानंतर या आक्षेपाला भारतात फारसा आधार राहिलेला नाही. त्यामुळे बाबासाहेबानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ज्या चळवळी केल्या त्या कम्युनिस्टांबरोबर झाल्या. भारतात स्त्रीमुक्ती आंदोलन झाले ते दादासाहेब गायकवाड आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिवीर नाना पाटील यांच्या संयुक्त नेतृत्वाने झाले. त्यात हजारो कम्युनिस्टांनी जमीन मुक्ती संग्रामामध्ये दलितांच्या बरोबरीने सहभाग घेतला. हा सहभाग इतका होता की, रिपब्लिकन पक्षामध्ये फूट पाडताना दादासाहेब गायकवाड हे मार्क्‍सवादी आहेत, कम्युनिस्टांच्या आहारी गेले आहेत, असा आरोप करण्यात आला. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">याची दुसरी बाजू लक्षात घेतली तर दिसते की आंबेडकरवाद आणि मार्क्‍सवाद हे दोन्ही अमलात आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जनसंघर्ष आणि जनतेच्या चळवळी या गोष्टी अपरिहार्य आहेत. त्यामुळे मार्क्‍सवादी आणि आंबेडकरवाद्यांची एकजूट हीदेखील अपरिहार्य आहे. ती काही ओडून-ताणून आणलेली नाही. विद्यापीठ नामांतराच्या चळवळीत सुद्धा कम्युनिस्टांनी दलितांच्या बरोबरीने भाग घेतला. दलित शिष्यवृत्ती आंदोलन, तमिळनाडू, दक्षिण भारतात ज्यावेळी दलितांवर अत्याचार होतात तेव्हा आंबेडकरवाद्यांबरोबर तेथील कम्युनिस्ट बरोबरीने संघर्षात असतात. आता परिस्थिती झपाटय़ाने बदललेली आहे. नवीन आर्थिक धोरणामुळे हळूहळू खासगीकरण वाढलेले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या संधी कमी झालेल्या आहेत. दुसरीकडे सवर्णाचीसुद्धा पंचायत झाली आहे की, जमीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे विनारोजगार विकास होत आहे. त्यांनाही नोकरीच्या संधी कमी कमी होत चाललेल्या आहेत. त्यामुळे ज्या जाती पूर्वी कधी राखीव जागांचा विचार करत नव्हत्या. त्या आता मैदानात उतरुन राखीव जागा मागत आहेत. ज्यांच्याकडे पूर्वी काही नव्हते. त्यांच्याकडे आता जमिनी आहेत, त्यांना राखीव जागाही मिळत आहेत त्यामुळे त्यांची अचानक प्रगती झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्हालाही राखीव जागा मिळाल्या पाहिजेत, असे त्यांना वाटत आहे. पण आता जागाच शिल्लक नाहीत. ज्या समाजाला घटनात्मक राखीव जागा मिळाल्या आहेत. त्यांना आता जागाच मिळत नाहीत, कारण जागा निघतच नाहीत. त्यामुळे त्याही जातीत बेकारी वाढली आहे. म्हणूनच आर्थिक निकषावर राखीव जागा द्या, ही मागणी आता जोर धरु लागली आहे. पुन्हा गरीब आणि श्रीमंत यांचा संघर्ष तीव्र होऊन, कायम कामगारांची संख्या कमी होत आहे, नोकर्‍या कमी होत आहेत. अशा वेळी पुढे कसे जायचे? असा पेच आहे. त्याचे उत्तर म्हणजे आंबेडकरवाद आणि मार्क्‍सवाद यांना एकत्र करुनच वाटचाल करता येईल. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">1970 साली दलित पँथर, युवक क्रांतिदल, माओवा विद्यार्थी संघटना यांनी मांडलेली ही भूमिका होती, ती घेऊन पुढे जावे लागेल. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अगदी नक्षलवादी सुद्धा या सगळ्या मार्क्‍सवादी संघटनांमध्ये हे भान आलेले दिसत आहे. दलितांच्या प्रश्नांवर आपण भूमिका घेतल्याशिवाय आपल्याला भारतीय क्रांतीचे परिवर्तनाचे घोडे पुढे नेता येणार नाही. तशीच भूमिका अनेक दलित संघटनांमध्ये सुद्धा दिसत आहे. पण प्रश्न फक्त असा आहे की, दलितांमधील मध्यमवर्गीय, ज्यांना आता संधी मिळत आहे. त्यांना असे वाटत आहे की, पुन्हा एकदा वर्ग संघर्षामध्ये गेलो तर आपल्या मुलांना संधी मिळणार नाही. आपल्याला मात्र राखीव जागामार्फत संधी मिळाली आहे. मग आपण कशाला क्रांती वगैरेच्या गप्पा मारायच्या? सत्ताधार्‍यांची जुळवून घेतले तर आपले काम होईल, केवळ निवडणुकांच्या काळात आपली ताकद दाखवावी असा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो. दलितांनी निवडणूक काळात आपली ताकद दाखविली तर तडजोडीची ताकद वाढते. ती ताकद घेऊन आपण जातीचे आणि समाजाचे परिवर्तन करु शकतो. पण ही भूमिका 1947 साली ठीक होती. पण आज त्यामधला फोलपणा सिद्ध होत आहे. त्यामुळे आता मोठय़ा प्रमाणावर मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवाद यांना भारतीय परिस्थितीच्या परिवर्तनासाठी एकत्र येऊन जाणे अपरिहार्य आहे. याची जाणीव दलितांमध्ये आणि मार्क्‍सवादामध्ये ज्यांना खर्‍या अर्थाने परिवर्तन हवे आहे, त्या दोघांना झालेली आहे.  </span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 10 Apr 2018 14:33:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 10 Apr 2018 15:06:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दलितांचे 'बाबा' गेले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-baba-110041200043_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkar-baba-110041200043_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-04/13/thumb/1_1/1492083177-9194.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-04/13/thumb/1_1/1492083177-9194.jpg</image>
      <description><![CDATA[बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image-->
<p class="wdp_articleLImg">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="354" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2017-04/13/full/1492083177-9194.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
	<span style="color: rgb(128, 0, 255); font-size: 11pt;">बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. </span></p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली ‘भीमा’ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच ‘लोकसभे’ त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, ‘हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.’ हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृति’मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ”हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !” हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’ वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.’पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,”स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!” नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, ‘जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!’ आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि ‘स्वातंत्र भारता’ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. ‘मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!’ घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही. </font><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा ‘साऱ्या भारताला मी बौध्द करीन!’ अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता. भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.’मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!’ ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वता त्यांचा त्याग, चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपापल्या जीवनांत निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहीलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उध्दार होईल. तीन कोटि मराठी जनतेच्या वतीनं व्याकूळ हृदयाने आणि अश्रपूर्ण नेत्रानीं आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 06 Dec 2017 11:52:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 06 Dec 2017 11:52:52 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ट्विटरकडून  बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkarjayanti-117041400006_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ambedkarjayanti-117041400006_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-04/13/thumb/1_1/1492082875-6733.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2017-04/13/thumb/1_1/1492082875-6733.jpg</image>
      <description><![CDATA[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीला ट्विटर बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन करणार आहे. #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="" class="imgCont" height="354" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2017-04/13/full/1492082875-6733.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
<font size="4" style="font-family: arial, sans-serif;">भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीला ट्विटर बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन करणार आहे. #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेलं इमोजी येईल.</font><font size="4" style="font-family: arial, sans-serif;"> ट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरनं पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे.</font><font size="4" style="font-family: arial, sans-serif;"> या संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे. हे आहेत पाच </font><font size="4" style="font-family: arial, sans-serif;">हॅशटॅग </font><br style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;" />
<font size="4" style="font-family: arial, sans-serif;"><strong>#AmbedkarJayanti,  </strong><strong>#अंबेडक</strong><strong>जयंती, #DalitLivesMatter,  #JaiBhim, #जयभीम. </strong></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 14 Apr 2017 07:54:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Apr 2017 07:56:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अस्मितेचा सूर्य : डॉ. आंबेडकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/song-of-dr-babasaheb-ambedkar-114120600008_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/song-of-dr-babasaheb-ambedkar-114120600008_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[बाबा, तूच आम्हाला लेखणी दिली, 
भावना दिल्या, करुणा दिल्या, 
विवेक प्रेरणा-धैर्य दिले 
निष्ठा दिल्या आणि]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="" class="imgCont" height="210" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2014-12/06/full/1417845274-6388.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="240" /></p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size: 16px;">बाबा, तूच आम्हाला लेखणी दिली, </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">भावना दिल्या, करुणा दिल्या, </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">विवेक प्रेरणा-धैर्य दिले </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">निष्ठा दिल्या आणि</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">दिशाही दिल!</span></span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तुझ्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाने </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">असंख्य शब्द निर्मात्यांना  </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">जाग आली</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">आत्मभान घेऊन जगाच्या शाळेत</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">वादळवारे झेलून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">स्वंतेजाने उभी राहिली ।</span></span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">प्रस्थापित व्यवस्थेनं दबलेल्या </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">वांझ शब्दाला विद्रोहाची धार आली</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">कळू लागल व्यथांच्या वेदना</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">अन् वास्तव जीवनाचं अस्तित्व</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">बाबा, तुझा आश्वासक हात</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">आमच्या पाठीवर टाकून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तू प्रहार केलेस लेखणीने</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">मानवाचे अस्तित्व नाकारणार्‍या अमानवतेला, अमानुषतेला </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">संस्कृतीच्या पिढीजात ठेकेदारांना</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">शोधून ठेचून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">शोषणाचे पाट फोडून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">पुरातन मूल्यांना जाळून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">विषमतेच्या भिंतीला गाडून </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">स्वातंत्र्य-समता-बंधुत्व-न्याय  </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">भारतीय संविधानात नोंद केलीस ।</span></span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तू दिलास आविष्कार स्वाभिमानाचा</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तू दिलेस सजीवत्व नाकारलेल्यांना  </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तू रोविलेस निशाण समतेचे</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तू अंधाराला छेदून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">व्यवस्‍थेला भेदून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">प्रज्ञेचे, करुणेचे दिवे पेटवून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">उजेडाचं दान देऊन</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तू अस्मितेचा सूर्य झालास ।</span></span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">अंधारलेली गावे उजेडात आली</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">गावकूस आणि </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">वेस कालबाह्य झाली !</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">मुक्यांना बोलतं करून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तू मूकनायक झालास</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">बाबा, आता व्हाला हवं संघटित</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तुझा अर्ध्यावर राहिलेला</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">क्रांती-प्रगतीचा रथ</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तुझी शिरसावंद्य आज्ञा</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">आसासह चाक पूर्ण फिरविण्याची  </span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">आम्ही घेत आहोत प्रतिज्ञा</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तथागताच्या शीलाचं तोरण बांधून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">प्रज्ञेचं गीत गाऊन</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">करुणेची जेत पेटवून</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">निळ्या किरणांच्या साक्षीने</span></span></p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">तुझ चरणी फुले वाहून</span></span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">फुले वाहून !..</span></span><br />
	 </p>
<p>
	<span style="color:#a52a2a;"><span style="font-size:16px;">अशोक जानराव</span></span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Apr 2017 11:06:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 13 Apr 2017 11:15:01 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जगातील आदिवासींचा मुक्तिदाता]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/song-of-dr-babasaheb-ambedkar-114120600009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/song-of-dr-babasaheb-ambedkar-114120600009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-12/06/thumb/1_1/1417857381-8755.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-12/06/thumb/1_1/1417857381-8755.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आणि डॉ. नेल्सन मंडेला ह्या दोन युगपुरुषांच्या जीवनप्रवासात अनेक साम्ये होती. एक भारतातील अस्पृश्य समाजातील होते, दुसरे दक्षिण आफ्रिकेतील आदिवासी होते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="nelsan and babasaheb" class="imgCont" height="200" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-12/06/full/1417857381-8755.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	<p style="text-align: justify;">
		<span style="font-size: 16px;">6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन! सारं जग त्यांना अभिवादन करते. मुंबईच्या चैत्भूमीवर जनसागर उसळतो. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे डॉ. नेल्सन मंडेला यांचे 2013 मध्ये महापरिनिर्वाण झाले! दक्षिण आफ्रिका शोकसागरात बुडाली. आदिवासींचा उद्धारकर्ता गेला! </span></p>
</p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">डॉ. बाबासाहेब आणि डॉ. नेल्सन मंडेला ह्या दोन युगपुरुषांच्या जीवनप्रवासात अनेक साम्ये होती. एक भारतातील अस्पृश्य समाजातील होते, दुसरे दक्षिण आफ्रिकेतील आदिवासी होते. दोघेही मागासवर्गीय! दोघांनी दोन वेगवेगळे महान लढे दिले. दोघेही वकील होते. दोघांनी आपल्या समाजासाठी वकिली केली. दोघांनाही ‘भारतरत्न’ किताब मिळाला होता. दोघांचेही 6 डिसेंबरला महानिर्वाण झाले. आज डॉ. नेल्सन मंडेलांचे युगकार्य शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. </span></p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">जगातील सर्व आदिवासींचे महानेते डॉ. नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व टोकावरील कुनू नावाच्या   दुर्गम खेडय़ात आदिवासीमधील थेंबू जमातीत झाला. त्यांची झोसा ही बोलीभाषा होती. त्यांचे वडील हेंड्री मंडेला शेती व्यवसाय करीत होते. मंडेलांचे खरे नाव रोलिलाहल्ला. मंडेलांचे सुरुवातीचे शिक्षण क्लार्क बेरी मिशनरी स्कूलमध्ये झाले. त्यांचे नेल्सन हे नाव त्यांच्या शिक्षिकेने ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव सकपाळ होते. त्यांचे आंबेडकर हे आडनाव शिक्षकांनीच ठेवले. उच्च शिक्षण हेल्डटाऊनमध्ये पूर्ण केले. आफ्रिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ फोर्ट हरेत शिक्षण घेताना विद्यार्थी चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कमी करण्यात आले. त्यांनी घर सोडले व ते थेट जोहान्सबर्गला आले. दोन वर्षानंतर आफ्रिकेत विट्स-वॉटरँड विद्यापीठात काद्याच्या पदवीसाठी नाव नोंदविले. तेथेच आफ्रिकेतील जाती आणि जमातींच लोकांशी-पुढार्‍यांशी ओळख झाली. 1944 साली ‘ए.एन.सी. युथ लीग’ची स्थापना केली आणि कृष्णवर्णिायांवर होणार्‍या अत्याचारांची व्यथा मांडणस सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिशांची जुलमी राजवट चालू होती. मंडेलांकडे उत्तम वक्तृत्व होते. गोर्‍यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी 1949 साली मंडेला यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरुद्ध बहिष्कार, बंद, असहकार ही आंदोलने सुरू केली व स्वातंत्र्याची जोरदार मागणी केली. त्या काळात जगातील अनेक देश स्वतंत्र झाले. भारतही स्वतंत्र झालेला होता. दुसरे महायुद्ध संपलेले होते. मंडेला देशभर दौरे करून ब्रिटिशांच्या विरोधात रान पेटवत होते. मंडेलांना अटक करण्यात आली. जोहान्सबर्गबाहेर जाण्यास मनाई केली. त्यांनी 1955 साली फ्रीडम चार्टर म्हणजेच स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करून ब्रिटिशांना नवे आव्हान दिले. 1956 साली मंडेलांना पकडले गेले व त्यांच्यासह 156 क्रांतिकारकांविरुद्ध राजद्रोहाचा खटला भरला. पाच वर्षे खटला चालल्यानंतर त्यांना सन 1961 साली सोडण्यात आले. 1960 साली आफ्रिकेतील शार्पफिल येथे तेथील गोर्‍या सरकारने कृष्णवर्णीय यांचा मोठा नरसंहार घडविला. मंडेलानीही अधिक हिंस्त्रक व्हाचे ठरविले. त्यांनी हातात शस्त्रे घेतली व आफ्रिकन युवकांच्या हातातही शस्त्रे दिली. परंतु 1962 साली ब्रिटिश सरकारने मंडेलांना पकडून त्यांच्यावर दुसर्‍यांदा देशद्रोहाचा खटला भरला. </span></p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">नेल्सन मंडेला 27 वर्षे तुरूंगात होते. वर्णभेदमुक्त दक्षिण आफ्रिका मला हवी आहे, अशी सिंहगर्जना मंडेलांनी तुरूंगातूनच केली होती. मंडेलांनी तुरूंगात 10 हजार दिवस काढले. परंतु जगातील 10 हजारांपेक्षा अधिक विचारवंत, कवी, लेखकांना त्यांनी चेतना दिली. मंडेलांची तुलना महात्मा गांधींशी न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी करायला हवी.</span></p>
<p style="text-align: justify;">
	 </p>
<p style="text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">प्रा. भगवान भोईर  </span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 13 Apr 2017 10:57:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 13 Apr 2017 11:16:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाबासाहेब म्हणजे अंधारातला एक दीपस्तंभ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-116041300007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-116041300007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[आंबेडकरांनी राष्ट्रीय चळवळीपासून अलिप्त राहून आपला वेगळा पक्ष स्थापला व अस्पृशंच संरक्षणासाठी राजकीय तरतुदीचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही म्हणू लागले. पण त्याला  कोणता आधार नाही. विरोधकांना बदनाम करण्यासाठी बहुसंख्य समाजाचे प्रवक्ते ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="dr. babasaheb ambedkar" class="imgCont" height="426" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-04/14/full/1397455030-823.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="350" /></p>
	<span style="font-size:16px;">डॉ. आंबेडकर म्हणजे महाप्रलयातला एक निवारा, अंधारातला एक दीपस्तंभ, महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे भूषण, नवभारताची घटना बनविणारे ते कायदे पंडित आहेत. हिंदुधर्माची नवस्मृती देणारे, स्त्रियांची मान उंच करणारे ते नवस्मृतिकार ठरले. ज्या समाजाला आजवर आम्ही दूर ठेवले त्या समाजाला नवा धर्म देणारे ते धर्मदीप होते.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">अति दारुण परिस्थितीत ते वाढले. भयानक अडचणीत सयाजीराव महाराजांची मदत मिळाली. ते बॅरिस्टर झाले. त्यांनी महाडचा सत्याग्रह, पुण्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह करून दलित समाज संघटित केला, त्यांच्यात चैतन्य आणले. हे आंबेडकरांचे सर्वात महान कार्य होय. डॉ. आंबेडकरांच्या घरी मोठे फर्निचर कधीच दिसणार नाही. परंतु ग्रंथांनी भरलेली कपाटे दिसतील. महर्षी सेनापती बापट म्हणत, ‘ डॉ. आंबेडकर खरे ब्राह्मण आहेत. ज्ञानाची उपासना करणारे आहेत. आंबेडकर म्हणजे एक प्रचंड महाप्रलय होय.’</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">आंबेडकरांनी राष्ट्रीय चळवळीपासून अलिप्त राहून आपला वेगळा पक्ष स्थापला व अस्पृशंच संरक्षणासाठी राजकीय तरतुदीचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही म्हणू लागले. पण त्याला  कोणता आधार नाही. विरोधकांना बदनाम करण्यासाठी बहुसंख्य समाजाचे प्रवक्ते पुष्कळदा राष्ट्रैक्य निष्ठेचे हुकमी हत्यार उपसतात. आंबेडकरांचा राष्ट्राभिमान जाज्वल्य होता. याचे पुरावे त्यांच्या  लिखाणात आढळतात. अस्पृश्य समाज भारतीय समाजाचा एक अविभाज्य घटक असला तरी अल्पसंख्य म्हणून सवर्ण हिंदू समाजाहून त्याचे वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. एवढेच त्यांचे  सांगणे होते. राष्ट्रातील फुटीर प्रवृत्तींना आळा बसून राष्ट्र बळकट व्हावे म्हणून केंद्रसत्ता नेहमी खंबीर ठेवली पाहिजे. अशीच तंची भूमिका होती. पुढे हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा राष्ट्रीय ऐक्याला बाधा येऊ नये म्हणून भारतीय परंपरेशी सुसंगत असा बौद्ध धर्म स्वीकारला. राष्ट्रप्रेमाबरोबर लोकशाहीवरही त्यांची अपार श्रद्धा होती. देशातील संस्कृतीत रुजलेला बौद्ध धर्म  स्वीकारणारे आंबेडकर धर्मद्रोही कसे? हे वादळ सडेतोड, निर्भीड, कर्तव्यकठोर होते. स्त्रिांना ताठ मानेने जगावयास लावणारे आंबेडकर, दलितांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविणारे आंबेडकर हे या भारताच्या इतिहासाचे एक सोनेरी पान आहे. कार्ल मार्क्सचा ‘वर्गकलह’ हा शब्द जगात जसा गाजला तसा आंबेडकरांचा ‘जातिकलह’ हा शब्द सर्व जगात निनादला. आंबेडकरांची चळवळ, दलितांच संघटना, चळवळीचे यश व अपयश सध्या महाराष्ट्रात एका वादळात तशाच घिरटय़ा घेत आहेत. याचे कारण म्हणजे आंबेडकरांना योग्य शिष्य मिळाले नाहीत. राजकीय डावपेच, उणे-दुणे, थोडासा स्वार्थ, स्वत्वाची तहान या गोष्टींमुळे ही चळवळ थांबली आहे. सध्याचे  नेतृत्व लंगडे आहे. अनेक गट, पक्ष यामुळे समाज चक्रात सापडला आहे. विशिष्ट दलित वर्ग हाच चळवळीसाठी धडपडतो आहे. पुढे धावतो आहे, संघर्ष करतो. बाकीचे दलित आपल्याच गटात, प्रभागात संघटना करून स्तब्ध आहेत. काही सत्ताधारी पक्षाकडे स्वप्रगतीसाठी लाळ घोटत आहेत. तर काही स्वाभिमानाने सत्ताधार्‍यांना चुकीचा मार्ग दाखवून मार्ग काढत आहेत. सर्व दलितांनी आंबेडकरांच्या विचारांचे मंथन पाहून एकत्र येण्याची गरज आहे. संघशक्तीशिवाय विकास नाही हे ओळखले पाहिजे. सच्चा अनुयायांनी दलित समाजातील विस्कळीतपणा नाहीसा होण्यासाठी   चळवळीला हातभार लावावा. दलित समाजाची एकजूटच आंबेडकरांची चळवळ नेटाने पुढे घेऊन जाईल.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">लेखनक्रीडा आंबेडकरांना मुळीच मान्य नव्हती. जीवनसंबंध संघर्ष विचार करणाराच त्यांचा लेखनधर्म होता. माणसाच्या मुक्तीचा विचार हाच त्यांच्या लेखणीचा ध्येवाद होता. धर्मपरिवर्तनाच्या क्षेत्रात ‘बुद्ध अँन्ड हिज धम्म’ हा तंचा ग्रंथ नवीन संहिता झाला. बहिष्कृत भारत जनता साप्ताहिकातून समाजव्यवस्थेतील हीन परंपरेवर आगपाखड करून दलितांच्या जीवनात त्यांनी दीप लावला. अनेक महान ग्रंथ लिहून आंबेडकरांनी देशाला ज्ञान देण्याचा चंग बांधला होता. या समाजाला उजळून काढले पाहिजे. समाजाची नवनिर्मिती केली पाहिजे, ही काळाची गरज आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">डॉ. प्रमोद लांडगे</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 12 Apr 2017 22:48:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 12 Apr 2017 23:11:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कोलंबिया विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-110041300020_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-110041300020_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-04/14/thumb/1_1/1428994076-8023.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-04/14/thumb/1_1/1428994076-8023.jpg</image>
      <description><![CDATA[वॉशिंग्टन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारच्या सहाय्याने शिष्यवृत्तीही जाहिर करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर हे या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image-->
<p class="wdp_articleLImg">
	<p style="text-align: justify;">
		<p style="float: left;">
			<img align="left" alt="baba saheb ambedkar" class="imgCont" height="200" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-04/14/full/1428994076-8023.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="230" /></p>
		<span style="color: rgb(0, 0, 0); font-size: 11pt;">भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारच्या सहाय्याने शिष्यवृत्तीही जाहिर करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. </span></p>
</p>
<p style="text-align: justify;">
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">भारताच्या अमेरिकेतील राजदूत मीरा शंकर यांनी विद्यापीठाने घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. विसाव्या शतकातील भारतातील महान नेत्यांपैकी एक आणि सामाजिक बदल आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते असलेल्या आंबेडकरांचा हा गौरव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. </font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">डॉ. आंबेडकरांना बडोद्याच्या महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले होते. एमए केल्यानंतर डिएससी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये केले. त्यानंतर १९२७ मध्ये कोलंबिया विद्यापीठात पीएचडी केली. डॉ. आंबेडकरांच्या थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सत्कार केला. पुढे १९९५ मध्ये बुद्दिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडमतर्फे लेहमन ग्रंथालयाला आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला. </font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जॉन डेवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेवीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच आपण समानतेचा अनुभव घेतल्याचे आंबेडकरांनीही लिहून ठेवले आहे. कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेवी, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले, असे डॉ. आंबेडकरांनी न्यूयॉर्क टाईम्सला १९३० मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.</font></p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 10 Apr 2017 20:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 11 Apr 2017 20:01:32 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ध्येयवादी डॉ. बाबासाहेब]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ध्येयवादी-डॉ-बाबासाहेब-116041400010_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ध्येयवादी-डॉ-बाबासाहेब-116041400010_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/14/thumb/1_1/1460624010-0998.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/14/thumb/1_1/1460624010-0998.jpg</image>
      <description><![CDATA[शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे आपल्या समाजबांधवाना सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सवर्णाच्या जुलङ्कांविरुध उगारलेली वज्राची ङ्कूठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर, विषमतेवर, धर्ममार्तडांच्या वर्चस्वावर, समाजातील वतनदार सत्ताधार्‍यांवर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ambedkar" class="imgCont" height="460" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-04/14/full/1460624010-0998.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="500" /></p>
	<span style="font-size:16px;">शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे आपल्या </span><span style="font-size: 16px;">समाज</span><span style="font-size:16px;">बांधवाना सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सवर्णाच्या जुलमांविरुध उगारलेली वज्राची मूठ </span><span style="font-size: 16px;">होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर, विषमतेवर, धर्ममार्तडांच्या वर्चस्वावर, समाजातील वतनदार सत्ताधार्‍यांवर सदैव पुकारलेले युद्धच होय.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन-दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला . गलितगात्र झालेल्या मनामनातून समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. समतेवर आधारित समाजरचना घडावी असे त्यांचे ध्येय होते .</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<strong><span style="color:#0000cd;"><span style="font-size:16px;">शैक्षणिक ध्येय :</span></span></strong></p>
<p>
	<span style="font-size:16px;">शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश समाजाला सत्त्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिला तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे ते समाजबांधवाना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे ते सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की मुलगी किंवा मुलगा एकदा शाळेत दाखल झाले की ते परिपूर्ण सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष दय़ायला हवे. डॉ. बाबासाहेबांचे म्हणणे होते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्टय़ा सशक्त होतो . व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील ङ्खरक समजायला लागतो . प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये, तर मुलांची मने सुसंकृत व गुणवत्तामय बनवावीत. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत, असे शिक्षण असावे. शला म्हणजे उत्तम नागरिक बनविणारे आहेत याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. 1946 साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 Apr 2016 14:19:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 14 Apr 2016 14:25:23 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-111120600001_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-111120600001_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. बाबासाहेब आंबेडकारांची ओळख घटनाकार, घटनातज्ञ, कायदेपंडित, अर्थतज्ञ अशा अनेक अंगांनी जगाला परिचित आहे, परंतु, पत्रकार डॉ. आंबेडकर म्हणून अद्यापही वृत्तपत्रसृष्टीने बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतल्याचे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image-->
<p class="wdp_articleLImg">
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="" class="imgCont" height="210" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2015-04/13/full/1428908933-2599.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="240" /></p>
	<span style="color: rgb(0, 0, 0); font-size: 11pt;">डॉ. बाबासाहेब आंबेडकारांची ओळख घटनाकार, घटनातज्ञ, कायदेपंडित, अर्थतज्ञ अशा अनेक अंगांनी जगाला परिचित आहे, परंतु, पत्रकार डॉ. आंबेडकर म्हणून अद्यापही वृत्तपत्रसृष्टीने बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही काही पोटभरू किंवा प्रचारकी पत्रकारिता नव्हती, तर तिला समाजोद्धाराचे पर्यायाने राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान लाभलेले होते. या बाबीकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकतर जाणीवपूर्वक कानाडोळा केला किंवा पारंपरिक मानसिकतेमुळे या पत्रकारितेची दखल घ्यावी, असे त्यांना वाटले नसावे. </span></p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), जनता (1930) आणि प्रबुद्ध भारत (1956) या नावांनी पाक्षिके चालविली. यापैकी जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत: न करता सहकार्‍यांकडून करून घेतले. मात्र &#39;मूकनायक&#39; आणि &#39;बहिष्कृत भारत&#39; या दोन्ही पत्रांचे संपादन मात्र त्यांना स्वत:लाच करावे लागले. बहिष्कृत भारताच्या संपादनात बाबासाहेब स्वत: ओळ न ओळीकडे लक्ष देत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, &#39;&#39;बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची सांपत्तिक स्थिती नव्हती तसेच बिनमोली संपादकी काम करण्यास स्वार्थ्यत्यागी असा दलितातील माणूसही लाभला नाही. बहिष्कृत भारताच्या संपादकाच्या प्रौढ लिखाणास दबून गेल्याने म्हणा किंवा सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे म्हणा, बाहेरच्या लोकांचा त्यास मिळावा तितका पाठिंबा मिळाला नाही. अशा स्थतीत बहिष्कृत भारताचे 24-24 रकाने लिहून काढण्याची सारी जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली.&#39;&#39;</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">थोडक्यात, बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी &#39;मूकनायक&#39; आणि &#39;बहिष्कृत भारत&#39; ही पत्रे त्यासाठी आधारभूत आहेत. या पत्रांमधून डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">काय करूं आतां धरूनिया भीड। नि:शंक हें तोंड वाजविले।।</font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित।।</font><br />
<br />
&#39;<font style="font-size:11pt; color:#000000">मूकनायक&#39;च्या सुरवातीलाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या या ओळीतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. मूकनायकाने त्याकाळी सर्वार्थाने मुक्या असलेल्या समाजाला खर्‍या अर्थाने आवाज दिला. त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश दिसून येतात. पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरा म्हणजे समाज सुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता मात्र यापेक्षा वेगळी म्हणजेच संपूर्ण मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरपांगी समाज सुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते याच देशात माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, यासाठी तोंडातून शब्दसुद्धा काढायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत दुसर्‍या बाजूला माणसाला माणूसकीचे निसर्गदत्त हक्क मिळवून देण्याचा, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांच्या पत्रातून केला जात होता. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला मूकनायकच्या रूपाने नवा आवाज मिळाला. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">त्यातून बाबासाहेबांच्या लेखणीचे अनेक पैलूही स्पष्ट होतात. बाबासाहेबांची पत्रकारिता जशी आक्रमक, तितकीच संयमी होती. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांच्या प्रचंड विद्धत्तेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. मूकनायकमधील बाबासाहेबांचे लेख प्रचंड कोटीचे तत्वज्ञान होते. उदाहरण म्हणून काही वाक्ये निश्चितपणे पाहावीत.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणार्‍या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही, आधी नाही तर मागाहून का होईना जलमाधी घ्यावी लागणार आहे. (मूकनायक अंक पहिला 31 जानेवारी 1920)</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">राजकारणाचे सर्वसाधारण असे दोन हेतू आहेत. एक शासन व दुसरा संस्कृती. (मूकनायक अंक दुसरा 14 फेब्रुवारी 1920) </font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">अन्याय सहन न होणे, हेच मनुष्याच्या मनाचे उन्नत स्वरूप होय. (मूकनायक - अंक 14 वा 14 ऑगस्ट 1920)</font><br />
<br /><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1112/06/images/img1111206001_2_4.jpg' alt='baba'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>ND</p></p><!--endImage-->   <font  style='font-size:11pt; color:#000000'>पत्रकारितेसाठी आवश्यक असणारी अत्युच्च दर्जाची पात्रता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. उच्च कोटीचे तत्त्वज्ञान, प्रकांड पांडित्य, गाढा अभ्यास, समुद्राचा ठाव घेणारी विश्लेषण क्षमता याचबरोबर भाषिक सौंदर्याचे उत्तुंग दर्शन त्यांच्या पत्रांमधून होते. तत्कालीन परिस्थितीत फक्त आपल्या चळवळीची मुखपत्रे म्हणून ही वृत्तपत्रे चालविली नाहीत, तर एकूण जागतिक घडामोडींचा आढावादेखील त्यातून व्यक्त होत होता. उच्च शिक्षणासाठी लंडनला जाताना त्यांनी 'मूकनायक'ची जबाबदारी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे सोपवली. तरीही विदेशातून बातम्या, लेख व इतर माहिती ते स्वत: पाठवीत असत. बाबासाहेब शिक्षण संपवून परत येईपर्यंत मात्र ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आणि काही इतर कारणांमुळे मूकनायक बंद पडले. त्याचे त्यांना अतीव दु:ख झाले.  </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोणत्याही चळवळीत वृत्तपत्राचे योगदान काय असते, याची बाबासाहेबांना पूर्ण जाणीव होती. म्हणून पुन्हा जुळवाजुळव करून 'बहिष्कृत भारत'च्या रूपाने त्यांचे नवे पाक्षिक उदयाला आले. तो दिवस होता 3 एप्रिल 1927. या पाक्षिकाच्या मांडणीतून बाबासाहेबांची पत्रकारिता सर्वार्थाने अगदीच प्रगल्भ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रातील मजकूर, मांडणी, सदरे अगदीच अप्रतिम होती. या पाक्षिकामध्ये मुख्यत: 'आजकालचे प्रश्न' नावाने चालू घडामोडींविषयीचे सदर, अग्रलेख, 'आत्मवृत्त', 'विचार-विनिमय', 'वर्तमान सार' याबरोबरच 'विविध विचारसंग्रह' अशी अनेक सदरे नियमितपणे सुरू होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>बहिष्कृत भारत' सुरू झाले त्याचवेळी महाड येथील धर्मसंगरालाही सुरवात झालेली होती. त्यामुळेच या काळात या पत्राने चळवळीसाठी अतिशय अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात मोलाची भर घातल्याचे दिसून येते. या पत्रातूनदेखील बाबासाहेबांचे भाषावैभव अत्यंत खुलून दिसते. उदाहरण म्हणून लोकभाषेत त्यांनी दिलेली काही लेखांची शीर्षके पाहता येतील. 'आरसा आहे, नाक असेल तर तोंड पाहून घ्या!', 'खोट्याच्या साक्षीने खरे सिद्ध होते काय?', 'आपलेपणाची साक्ष दे, नाहीतर पाणी सोड', 'गुण श्रेष्ठ की जात श्रेष्ठ', 'बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय?', 'खरे बोल निश्चयात आहे, समुच्चयात नाही' अशा प्रकारच्या लेखांमधून बहिष्कृत भारताने अक्षरश: रान पेटवले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याकाळी वरवर बोलघेवडेपणाने अस्पृश्यता निवारण्यासाठी सल्ला देणारी काही राष्ट्रीय स्वरूपाची वृत्तपत्रे होती. मात्र, प्रत्यक्ष त्या कार्याला वाहून घेणारे मात्र एकमेव बहिष्कृत भारत होते. किंबहुना ही तथाकथित राष्ट्रीय वृत्तपत्रे डॉ. बाबासाहेंबाच्या आंदोलनाची टवाळी करण्यासाठी आघाडीवर असल्याचे पदोपदी जाणवते. म्हणूनच पत्रकार म्हणून बाबासाहेबांना त्याकाळी प्रस्थापित वृत्तपत्रकारांशीदेखील ‍तेवढ्याच निकराने झुंज द्यावी लागली, याची प्रचीती ही पत्रे वाचताना येते. बहिष्कृत भारताच्या दिनांक 19 जुलै 1927च्या अंकातून, ''आमच्या टीकाकारांना आमचा सवाल आहे, की तुम्ही जर एखाद्या बहिष्कृत-अस्पृश्य मानलेल्या जातीत जन्मला असता तर तुम्ही असेच शांतिब्रह्म राहिला असता काय? ... दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांना तुच्छतेने वागविण्यात येते म्हणून तुमच्या अंगाचा संताप होतो. या देशात युरोपीयन, युरेशियन लोकांसाठी वेगवेगळे आगगाडीचे डबे राखून ठेवले तर तुम्हास खपत नाही. फार काय पण एडिंबरो येथील हिंदी लोकांना तेथल्या कित्येक हॉटेलांमध्ये जाऊन गोर्‍या मडमांबरोबर नाचण्याची बंदी केली एवढ्याच गोष्टीवरून तुम्ही आकाशपाताळ एक केले! पण अस्पृश्यतेच्या पायी होणारी मानहानी आणि उन्नतीच्या मार्गात होणारी कायमची बंदी यांच्यापुढे सदरील निर्बंध म्हणजे काहीच नव्हेत, ही गोष्‍ट तुम्हाला अद्यापि पटत नाही.'' असे खडसावून विचारायला बाबासाहेब मागेपुढे पाहात नाहीत. टीकाकारांपुढे बाबासाहेब कधीही झुकले नाही, तर आपल्या विद्वत्तेने, वाकचातुर्याने आणि हजरजबाबी स्वभावाने त्यांनी त्यांच्या टीकाकारांना नामोहरम केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकूणच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही त्यावेळच्या इतर पत्रकारांपेक्षा अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारी म्हणूनच भिन्न स्वरूपाची होती. त्यांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागत होते. अशिक्षित, दारिद्रयाने पिचलेल्या समाजाचे नेतृत्व करायचे, त्यात वृत्तपत्र स्वत:च्या आर्थिक पायावर भक्कमपणे उभे नसलेले. अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही वृत्तपत्रासाठी केवळ बातम्या किंवा लेख लिहून रकानेच्या रकाने भरण्याचा धंदा त्यांनी कधीही केला नही. तर त्यातला प्रत्येक शब्द तोलून मापून लोकांपर्यंत जाईल, यासाठी ते सतत दक्ष राहिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सध्याच्या पत्रकारितेने डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. सध्या अनेक वृत्तपत्रे सवंग लोकप्रियतेसाठी अनेक नैतिक-अनैतिक मार्गसुद्धा बिनबोभाटपणे चोखाळताना दिसतात. वृत्तपत्र चालवणे हा व्यवसाय झाला असल्याने स्पर्धा प्रचंड वाढलेली असल्याने अनेक तडजोडी स्वीकाराव्या लागतात, अशी मल्लिनाथी करून आपल्या कृतीचे समर्थनदेखील केले जाते. आजच्या परिस्थितीत सर्व प्रकारची साधन सामग्री, तंत्रज्ञान उपलब्ध असूनसुद्धा कोणत्याही वृत्तपत्राचा मालक, संपादक जनतेच्या मनावर कायमची पकड घेऊ शकत नाही. याची कारणे अनेक असली तरी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या वृत्तपत्रांची समाजाशीच फारकत झालेली आहे. दारिद्रयरेषेखाली असलेल्या 40 कोटी जनतेच्या कोणत्याही प्रश्नांपेक्षा क्रिकेट, शेअर निर्देशांक आणि पुढार्‍यांच्या प्रसिद्धीला आजच्या वृत्तपत्रात सर्वाधिक जागा दिली जाते. आजही देशातल्या 50 टक्के लोकसंख्येला पुरेशा कॅलरीजचे अन्न मिळत नाही, ही आजच्या बातमी होत नाही. या अर्थाने देशातील कोट्यावधी बालके कुपोषित असल्याचीदेखील बातमी होत नाही. मात्र कोणता अभिनेता साईबाबांच्या दर्शनाला गेला, कोणत्या अभिनेत्यावर खटले चालू आहेत, हे मात्र वेगवेगळ्या अंगांनी चवीचवीने बातमीचे विषय होतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज क्वचितच एखाद्या दैनिकाचा मालक अथवा संपादक जनतेचा पुढारी असतो, मात्र तो फक्त 'राजकीय नेता' म्हणून वावरताना दिसतो. सर्व प्रश्नांची उत्तरे राजकीय सत्तेत शोधण्याची सवय त्याला लागलेली असल्याने तो फक्त पुढारी होतो. सत्ता आणि संपत्ती या दोन कारणांसाठीच त्याचं पुढारीपण उरतं. अनेक सामाजिक विषयावर निकराची लढाई देण्याची आवश्यकता असूनही ते विषय त्याच्या गावीही नसतात. म्हणूनच आजच्या पत्रकारिता विश्वाला बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता अभ्यासण्याची नितांत आवश्यकता आहे. बाबासाहेब हे एकाच वेळी वृत्तपत्राचे संपादक होते, त्याचवेळी ते कोट्यावधी जनेतेचे नेते होते. कारण त्यांनी कधीही व्यावसायिक तडजोड केली नाही. म्हणूनच आजही पत्रकार म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कारकीर्द अंतर्मुख व्हायला भाग पाडते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 13 Apr 2016 11:12:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 13 Apr 2016 11:19:10 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाबासाहेब समजले पाहिजेत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/बाबासाहेब-समजले-पाहिजेत-115041400007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/बाबासाहेब-समजले-पाहिजेत-115041400007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2015-04/10/thumb/1_1/1428651880-0053.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2015-04/10/thumb/1_1/1428651880-0053.jpg</image>
      <description><![CDATA[शतकानुशतकं ज्या बहुजन समाजाचं धर्म आणि धार्मिक रूढी परंपरा यांच्या नावानं शोषण केलं जात होतं त्यांची राजकीय उपेक्षा केलेली होती, आर्थिक नाकेबंदी केलेली होती,]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="" class="imgCont" height="220" src="http://media.webdunia.com/_media/ml/img/article/2015-04/10/full/1428651880-0053.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="300" /></p>
	<span style="font-size: 16px;">शतकानुशतकं ज्या बहुजन समाजाचं धर्म आणि धार्मिक रूढी परंपरा यांच्या नावानं शोषण केलं जात होतं त्यांची राजकीय उपेक्षा केलेली होती, आर्थिक नाकेबंदी केलेली होती, या सर्व प्रश्नांची सोडवणूक करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वच क्षेत्रातल्या परिवर्तनाला चालना देऊन मुर्दाड समाजाला त्यांच्या स्वत्वाचं भान निर्माण करून दिलं. म्हणूनच त्यांचा लढा, त्यांचा विचार, त्यांच्या चळवळीचे विविध पैलू लक्षात घेऊन तशा पद्धतीची वाटचाल करणे काळाची गरज आहे. बाबासाहेबांची चळवळ ही क्रांतीबा फुले-राजर्षी शाहू महाराज यांच्या  कर्तृत्वाला शिरोधार्थ मानत गतिमान झाली. जाती-जातीत, पोटजातीत विभागलेला समाज एकसंघ करू आणि जगणसाठी आवश्यक असणार्‍या साधनांची निर्मिती करू, अशा स्वाभिमानी मूल्यांना बाबासाहेबांनी आपल्या लढय़ाचा केंद्रबिंदू बनविलं होतं. हे भान बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सतत निसटलं गेललं आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. बाबासाहेबांची लढाई ही स्वाभिमानाची होती. त्यांचा लढा आत्मभान जागवणारा होता. तसा तो न्याय्य वाटा सिद्ध करणारा होता. मानवतेच्या वाटांना बाबासाहेबांच्या लढय़ानं प्रशस्त तर केलचं, परंतु तेजांकितही केलं.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">आपण गुलाम आहोत याची जाणीवही नसलेल्या समाजाला गुलामगिरीची जाणीव करून देऊन किडय़ा मुंग्यासारखं जगू नका. तुम्हीही माणूस आहात, तुम्हालाही माणसासारखं जगण्याचा हक्क आहे. हा सामाजिक स्वाभिमानाचा संदेश देत त्यांनी या समाजातलं माणूसपणं जाणवलं. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">बाबासाहेब आंबेडकर हयात असताना भारतीय परंपरेतल्या सर्व व्यवस्थांना मग ती समाजसंस्था असो, धर्मसंस्था असो किंवा राजकीय क्षेत्र असो या सगळ्यांनाच त्यांचा धाक होता. त्यांच मुख्य कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या ठायी अविचल बलदंड स्वाभिमान होता. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">आंबेडकर अनुयायी हा अन्यायाच्या विरुद्ध झुंजणारा लढाऊ बाण्याचा शिलेदार मानला जातो. अन्यायविरुद्धची प्रखर प्रतिक्रिया स्वातंत्रनंतरच्या काळात जर कुणी दिली असेल तर ती आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. अगदी मंडल आयोगासाठी रस्त्यावर कोण आलं असेल तर ते आंबेडकर अनुयायी. प्रश्न होता ओबीसी समाजाच्या वाटय़ाचा, हा समाज अविकसित आहे. त्याच्या कल्याणासाठी   समंजसपणाची भूमिका घेऊन अतिशय आक्रमक पद्धतीनं बाबासाहेबांना शिरोधार्ह मानणारा समाज रस्त्यावर आला. पण आजच्या चंगळवादी युगामध्ये आपले सगळेच प्रश्न संपले आहेत का? हा विचार करण्याची गरज भासत आहे. वामनदादा कर्डक आपल्या काव्यातून म्हणायचे. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">भीमा तुझ मताचे जर पाच लोक असते; </span></p>
<p>
	<span style="font-size:16px;">तलवारीच तांचे नरेच टोकं असते. </span></p>
<p>
	<span style="font-size:16px;">वाणीत भीम आहे. करणीत भीम असता.</span></p>
<p>
	<span style="font-size:16px;">वर्तन ता पिलांचे सारेख चोख असते. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">वामनदादांना जी खंत वाटली त्याचं काय? मग असचं म्हणावं लागेल आजही आपण बाबासाहेबांच्या मताचे झालो नाहीत. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">अन्यायविरुद्ध झुंजणारी सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याची चिंता वाहणारी निकोप समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणारी भीम ही प्रवृत्ती नष्ट झाली की काय? असा प्रश्न पडावा इतकी मनं मेलेली आहेत का? बोथट झालेली आहेत? आजूबाजूला प्रश्नाचं जाळं निर्माण होत आहे. अशावेळी त्यांच्या प्रश्नांना समोर ठेवून कुठे मोर्चा निघत नाही. अन्यायाची परिसीमा जरी झाली तरी कुठे निषेधाचा आवाज उठत नाही. एवढा मुर्दाडपणा समाजात आला की, नेतृत्वाच कमरेत बळं उरलं नाही. नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नाही. पण एक मात्र सत्य    असं आहे की, नेतृत्वात द्रष्टेपण राहिलं नाही. हे द्रष्टेपण जर असतं, तर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मोर्चाच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल असत्या. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानी वाटा निर्माण केलेल्या होत्या. आपली स्वाभिमानी राजकीय शक्ती उभी करण्याचा बाबासाहेबांनी आदेश दिलेला होता. जाती निर्मूलनाची चळवळ कशी करावी याचे धडे दिलेले होते. आर्थिक समता निर्माण करण्याची हमी दिलेली होती. पण बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी वाटा चोखाळण्याच्या ऐवजी पळवाटांचा आश्रय घेतो की काय, असे चित्र दिसत आहे. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">आजचा तरूण दिशाहीन झाला आहे. त्याला योग्य दिशा प्राप्त करून घ्यायची असेल त्याला आंबेडकरी चळवळ व बाबासाहेब समजले पाहिजेत, त्यासाठी लोप पावत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाली पाहिजे. यासाठी तरुणांनी वाचलं पाहिजे. विचार केला पाहिजे. चळवळीला गतिमान करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जयंती, धम्मचक्रप्रर्वतन, महापरिनिर्वाणदिन या दिवशी बाबासाहेबांचे फोटो लावून त्यांचे विचार समजणार नाहीत. विचारांचा प्रवाह असणार्‍या बाबासाहेबांच्या विचार धारेतील एक थेंब जरी विचार आपल्या आचरणात उतरवला तरच आपल्याला बाबासाहेबांची ओळख होईल, असे जेव्हा घडेल तेव्हा ती प्रज्ञासूर्यास मानवंदना ठरेल.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">डॉ. धम्मपाल माशाळकर</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2015 12:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2015 12:02:42 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सुधारवादी संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/सुधारवादी-संपादक-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-110120600001_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/सुधारवादी-संपादक-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-110120600001_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-12/06/thumb/1_1/1417845274-6388.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-12/06/thumb/1_1/1417845274-6388.jpg</image>
      <description><![CDATA[अस्पृष्यांचे मुक्तीदाते व घटनाकार म्हणून प्रसिध्द असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ दर्जाचे पत्रकार आणि संपादकही होते. लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेचा उपयोग परकीय इंग्रजा विरुध्द केला.त्यामुळे ते स्वजनात लोकप्रिय ठरले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image-->
<p class="wdp_articleLImg">
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="" class="imgCont" height="210" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2014-12/06/full/1417845274-6388.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="240" /></p>
	<span style="color: rgb(0, 0, 0); font-size: 11pt;">अस्पृष्यांचे मुक्तीदाते व घटनाकार म्हणून प्रसिध्द असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ दर्जाचे पत्रकार आणि संपादकही होते. लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेचा उपयोग परकीय इंग्रजा विरुध्द केला.त्यामुळे ते स्वजनात लोकप्रिय ठरले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा स्वकियाविरुध्द धर्मसुधारणेसाठी होता . त्यामुळे प्रस्थापित अशा स्वकिय यामध्ये त्यांची पत्रकारिता लोकप्रिय झाली नाही . </span></p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडिल रामजी मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे या गावचे . ते सैन्यात सुभेदार मेजर होते. भिमराव हे त्यांचे चौदावे आपत्य. पाच वर्षाचे असतांनाच त्यांचे मातृछत्र हरपले . आंबावडेकर कुंटूंबावर संत कबीरांचा प्रभाव होता. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर ते सातार्‍याला स्थायिक झाले. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण सातारा व मुंबईच्या इल्फिस्टन हायस्कूलमध्ये झाले. ते 1907 मध्ये मॅट्रिक, 1912 मध्ये बी.ए.झाले. बडोद्याचे राजे सयाजीाव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिल्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले . 1913 ते 1916 दरम्यान त्यांनी कोलबिंया विद्यापीठात शिक्षण घेतले . एम.ए. पी.एच.डी. या पदव्या प्राप्त केल्या. काही दिवस बडोदा संस्थानात नौकरी केल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर, 1918 ते जुलै 1920 या दरम्यान मुंबईच्या सिडेनेहॅम महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची नौकरी केली.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">ब्रिटीश सरकारने त्यांना न्यायाधीशाची नौकरी देऊ केली होती. त्यांनी लंडनला जाऊन डी.एससी व बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या. मुंबईला परतल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली . हिंदू धर्मातील चातुर्वण्य पध्दतीमुळे दलितांचा होणारा छळ त्यांनी अनुभवलेला होता. या लोकांच्या उध्दारासाठी त्यांनी कार्य सुरु केले. </font><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना जुलै , 1924 मध्ये केली. कुलाबा जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यांच्या पाण्याला स्पर्श करुन त्यांनी जातीभेदाच्या भिंतीला पहिला धक्का दिला. मनस्मृतीचे दहन केले . नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला. 1935 मध्ये येवला येथे त्यांनी " मी हिंदू धर्मात जन्मलो असतो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली. 1936 </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्ये त्यांनी इंन्डिपेंन्डेट लेबर पार्टीची स्थापना केली. या पक्षाच्या झेंड्याखाली त्यांनी मुंबई प्रांतिक विधीमंडळाची निवडणूक जिंकली . 1942 ते 46 दरम्यान ते मध्यवर्ती कायदेमंडळात होते. मजूरमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले . त्यांनी मुंबईत सिध्दार्थ आणि औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरु केले. स्वतंत्र्य भारतात कायदामंत्री म्हणन त्यांनी काम पाहिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1952 <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्ये ते राज्यसभेवर निवडले गेले. 14 ऑक्टोंबर, 1956 ला त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला . 6 डिसेंबर, 1956 रोजी त्यांचे निधन झाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. आंबेडकर परदेशात शिकलेले उच्चविद्याविभूषित होते. दलित बांधवामध्ये जागृती आणि त्यांचे संघटन धरण्याच्या उद्दशाने त्यांनी पत्रकारिता सुरु केली. दलित समाज अशिक्षित होता. त्यामुळे त्यांनी आपली वर्तमानपत्रे मराठीतूनच काढली  मूकनायक, बहिष्कृत भारत , जनता आणि प्रबुध्द भारत  या चार वर्तमानपत्रांचे संपादन त्यांनी केले . </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाक्षिक मूकनायक जानेवारी, 1920 मध्ये सुरु झाले . शाहु महाराजांनी त्यांना या कामी साह्य केले . केसरीने मूकनायकची जाहिरात छापण्यास नकार दिला होता. अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे व त्यांची उन्नती साधने हा मुकनायकाचा उद्देश होता. पाडुंरंग भटकर यांची त्यांनी संपादकपदी नियुक्ती केली. मूकनायक हे डॉ. आंबेडकरांच्या राजकीय नेतृत्वाच्या प्रारंभीचे वर्तमानपत्र होते. ते 8 एप्रिल , 1923 ला बंद पडले. मूकनायकमधून त्यांचे विचार प्रभावीपणे लोकांसमोर आले. पुढे 3 एप्रिल , 1927 ला त्यांनी पाक्षिक बहिष्कृत भारत सुरु कले . उत्तम कदम, भा. वि. प्रधान आदींनी त्यांना या कामी साह्य केले . या पत्राची आर्थिक आवस्था खूपच नाजूक होती. या पत्रातून त्यांनी अनेकांवर कठोर टीका केली . 15 नोव्हेंबर, 1929 ला बहिष्कृत भारत बंद पडले. 1930 मध्ये त्यांनी पाक्षिक जनता व 1955 मध्य प्रबुध्द भारत हे साप्ताहिक सुरु केले . </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. आंबेडकरांचे शिक्षण इंग्रजीतून झाले होते. त्यामुळे सुरवातीला मराठीतून लिहिण्यात त्यांना अडचण येत असे . मराठी भाषा भारदस्त करण्यासाठी संत वाड:मय, नव्या जुन्या लेखकांचे साहित्य व समकालिन पत्रकारांच्या लेखनाचा अभ्यास त्यांनी केला. आपला वाचकवर्ग डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी सोप्या पध्दतीने लेखन केले. त्यांचे लेखन नशिब व ते तर्कशुध्द पध्दतीने मांडित असत. बहिष्कृत भारतमधून त्यांनी लोकहितवादींच्या पत्रांचे पुनर्मुद्रण केले . डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिभाशाली , ध्येयवादी व सुधारणावादी संपादक होते. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2015 11:05:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Apr 2015 11:09:32 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मानवमुक्तीचा झंझावात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/मानवमुक्तीचा-झंझावात-114041400002_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/मानवमुक्तीचा-झंझावात-114041400002_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[डॉ. आंबेडकर म्हणजे महाप्रलयातला एक निवारा, अंधारातला एक दीपस्तंभ, महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे भूषण, नवभारताची घटना बनविणारे ते कायदे पंडित आहेत. हिंदुधर्माची नवस्मृती देणारे, स्त्रियांची मान उंच करणारे ते नवस्मृतिकार ठरले. ज्या समाजाला आजवर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="dr. babasaheb ambedkar" class="imgCont" height="426" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-04/14/full/1397455030-823.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="350" /></p>
सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न म्हणजे विषमतेचा बुरूज ढासळून एक वादळ निघून गेल्याचा दिवस. डॉ. आंबेडकर म्हणजे महाप्रलयातला एक निवारा, अंधारातला एक दीपस्तंभ, महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे भूषण, नवभारताची घटना बनविणारे ते कायदे पंडित आहेत. हिंदुधर्माची नवस्मृती देणारे, स्त्रियांची मान उंच करणारे ते नवस्मृतिकार ठरले. ज्या समाजाला आजवर आम्ही दूर ठेवले त्या समाजाला नवा धर्म देणारे ते धर्मदीप होते.<br />
<br />
अति दारुण परिस्थितीत ते वाढले. भयानक अडचणीत सयाजीराव महाराजांची मदत मिळाली. ते बॅरिस्टर झाले. त्यांनी महाडचा सत्याग्रह, पुण्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह करून दलित समाज संघटित केला, त्यांच्यात चैतन्य आणले. हे आंबेडकरांचे सर्वात महान कार्य होय. डॉ. आंबेडकरांच्या घरी मोठे फर्निचर कधीच दिसणार नाही. परंतु ग्रंथांनी भरलेली कपाटे दिसतील. महर्षी सेनापती बापट म्हणत, ‘ डॉ. आंबेडकर खरे ब्राह्मण आहेत. ज्ञानाची उपासना करणारे आहेत. आंबेडकर म्हणजे एक प्रचंड महाप्रलय होय.’<br />
<br />
आंबेडकरांनी राष्ट्रीय चळवळीपासून अलिप्त राहून आपला वेगळा पक्ष स्थापला व अस्पृशंच संरक्षणासाठी राजकीय तरतुदीचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही म्हणू लागले. पण त्याला  कोणता आधार नाही. विरोधकांना बदनाम करण्यासाठी बहुसंख्य समाजाचे प्रवक्ते पुष्कळदा राष्ट्रैक्य निष्ठेचे हुकमी हत्यार उपसतात. आंबेडकरांचा राष्ट्राभिमान जाज्वल्य होता. याचे पुरावे त्यांच्या  लिखाणात आढळतात. अस्पृश्य समाज भारतीय समाजाचा एक अविभाज्य घटक असला तरी अल्पसंख्य म्हणून सवर्ण हिंदू समाजाहून त्याचे वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. एवढेच त्यांचे  सांगणे होते. राष्ट्रातील फुटीर प्रवृत्तींना आळा बसून राष्ट्र बळकट व्हावे म्हणून केंद्रसत्ता नेहमी खंबीर ठेवली पाहिजे. अशीच तंची भूमिका होती. पुढे हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा राष्ट्रीय ऐक्याला बाधा येऊ नये म्हणून भारतीय परंपरेशी सुसंगत असा बौद्ध धर्म स्वीकारला. राष्ट्रप्रेमाबरोबर लोकशाहीवरही त्यांची अपार श्रद्धा होती. देशातील संस्कृतीत रुजलेला बौद्ध धर्म  स्वीकारणारे आंबेडकर धर्मद्रोही कसे? हे वादळ सडेतोड, निर्भीड, कर्तव्यकठोर होते. स्त्रिांना ताठ मानेने जगावयास लावणारे आंबेडकर, दलितांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविणारे आंबेडकर हे या भारताच्या इतिहासाचे एक सोनेरी पान आहे. कार्ल मार्क्सचा ‘वर्गकलह’ हा शब्द जगात जसा गाजला तसा आंबेडकरांचा ‘जातिकलह’ हा शब्द सर्व जगात निनादला. आंबेडकरांची चळवळ, दलितांच संघटना, चळवळीचे यश व अपयश सध्या महाराष्ट्रात एका वादळात तशाच घिरटय़ा घेत आहेत. याचे कारण म्हणजे आंबेडकरांना योग्य शिष्य मिळाले नाहीत. राजकीय डावपेच, उणे-दुणे, थोडासा स्वार्थ, स्वत्वाची तहान या गोष्टींमुळे ही चळवळ थांबली आहे. सध्याचे  नेतृत्व लंगडे आहे. अनेक गट, पक्ष यामुळे समाज चक्रात सापडला आहे. विशिष्ट दलित वर्ग हाच चळवळीसाठी धडपडतो आहे. पुढे धावतो आहे, संघर्ष करतो. बाकीचे दलित आपल्याच गटात, प्रभागात संघटना करून स्तब्ध आहेत. काही सत्ताधारी पक्षाकडे स्वप्रगतीसाठी लाळ घोटत आहेत. तर काही स्वाभिमानाने सत्ताधार्‍यांना चुकीचा मार्ग दाखवून मार्ग काढत आहेत. सर्व दलितांनी आंबेडकरांच्या विचारांचे मंथन पाहून एकत्र येण्याची गरज आहे. संघशक्तीशिवाय विकास नाही हे ओळखले पाहिजे. सच्चा अनुयायांनी दलित समाजातील विस्कळीतपणा नाहीसा होण्यासाठी   चळवळीला हातभार लावावा. दलित समाजाची एकजूटच आंबेडकरांची चळवळ नेटाने पुढे घेऊन जाईल.<br />
<br />
लेखनक्रीडा आंबेडकरांना मुळीच मान्य नव्हती. जीवनसंबंध संघर्ष विचार करणाराच त्यांचा   लेखनधर्म होता. माणसाच्या मुक्तीचा विचार हाच त्यांच्या लेखणीचा ध्येवाद होता. धर्मपरिवर्तनाच्या क्षेत्रात ‘बुद्ध अँन्ड हिज धम्म’ हा तंचा ग्रंथ नवीन संहिता झाला. बहिष्कृत भारत जनता साप्ताहिकातून समाजव्यवस्थेतील हीन परंपरेवर आगपाखड करून दलितांच्या जीवनात त्यांनी दीप लावला. अनेक महान ग्रंथ लिहून आंबेडकरांनी देशाला ज्ञान देण्याचा चंग बांधला होता. या समाजाला उजळून काढले पाहिजे. समाजाची नवनिर्मिती केली पाहिजे, ही काळाची गरज आहे.<br />
<br />
<strong>डॉ. प्रमोद लांडगे</strong><br />]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 14 Apr 2014 11:23:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Apr 2014 11:28:33 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/-आम्हा-भारतीयांचे-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-113043000008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/-आम्हा-भारतीयांचे-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर-113043000008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आला. समता प्रबोधिनी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट भारतीय छात्र संसद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीशेष शामराव ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1304/30/images/img1130430008_1_1.jpg' alt='ambedkar'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आला. समता प्रबोधिनी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट भारतीय छात्र संसद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीशेष शामराव जाधव स्मृती व्याख्यान-2013 चे पहिले पुष्प आज प्रा. नरके यांनी गुंफले. यावेळी एमआयटीचे राहुल विश्वनाथ कराड उद्घाटक म्हणून तर डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी उपस्थित होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक वर्षे खाजगी सचिव असणाऱ्या परंतु प्रकाशझोतापासून दूर असलेल्या शामराव जाधव यांच्या मुलांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा व्याख्यानमालेचा उपक्रम हाती घेतला आहे. 'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असा यंदाच्या पहिल्या व्याख्यानाचा विषय होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रा. हरी नरके यांनी दीनदलितांचे कैवारी म्हणूनच केवळ डॉ. आंबेडकरांकडे पाहणे हा त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अपमान असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी एक सच्चा भारतीय व राष्ट्रीय नेता म्हणून भारतीय समाजजीवनावर करून ठेवलेल्या अनंत उपकारांची आणि त्यांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे, त्यांच्या भाषणांचे अनेक दाखले देऊन अतिशय सूत्रबद्ध मांडणी केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रा. नरके यांनी भाषणाच्या सुरवातीलाच डॉ. रामचंद्र गुहा यांनी 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' या ग्रंथात डॉ. आंबेडकरांचा आघाडीचे शिल्पकार म्हणून उल्लेख केल्याचे सांगितले. प्रा. नरके यांचे भाषण त्यांच्याच शब्दांत---</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दि. 4 एप्रिल 1938 रोजी आमदार म्हणून केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी कोणाही नागरिकाच्या भारतीयत्वाला हिंदू, मुस्लीम अथवा तत्सम दुसरी पर्यायी ओळख असू नये किंवा असताच कामा नये, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. इथला नागरिक हा सर्वप्रथम भारतीयच असला पाहिजे, शेवटीही भारतीयच असला पाहिजे आणि फक्त भारतीय आणि भारतीय हीच त्याची ओळख असली पाहिजे. अनुसूचित जाती-जमातींसाठी बाबासाहेबांनी केलेले काम वंदनीयच आहे, पण त्यांना केवळ त्याच चौकटीत बंदिस्त करणे अन्यायकारक आहे. केंद्रीय कामगारमंत्री म्हणून डॉ. आंबेडकरांनी काम केल्याचे सर्वांना माहिती आहे. पण त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पाटबंधारे विमान वाहतूक आदी आठ ते नऊ खात्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभारही बाबासाहेबांनी यशस्वीपणे सांभाळल्याचे फार कमी लोकांना ज्ञात आहे. जो मंत्री खऱ्या अर्थाने वजनदार आहे, त्याच्याकडेच अशी महत्त्वाची, जबाबदारीची खाती दिली जात असतात. कोणतीही पूर्वपिठिका अथवा पाठबळ नसताना बाबासाहेबांवर इतकी मोठी जबाबदारी सोपविण्यामागे ते ती यशस्वी करणारच, हा एक प्रकारचा विश्वासच यंत्रणेला होता. बाबासाहेबांच्या अभ्यासूपणाची तर कमालच होती. प्रत्यक्ष नेहरूंसमोर जायला न कचरणारे सचिव बाबासाहेबांनी बोलावल्याचे समजले की अस्वस्थ होत, इतका आदरयुक्त दरारा त्यांच्याविषयी प्रशासनात होता. विभागाच्या चार ओळींच्या नोटवर सचिवांपर्यंत स्वाक्षरी होऊन आल्यानंतरही त्यावर सोळा पानांची नोट लिहीणारा अभ्यासू मंत्री म्हणजे केवळ डॉ. आंबेडकरच होते. आजच्या केवळ कोंबडा उठविणाऱ्या मंत्र्यांच्या जमान्यात असं उदाहरण चुकूनही सापडण्याची शक्यता नाह</font><font style='font-size:11pt;'>ी. </font><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/1304/30/images/img1130430008_2_1.jpg' alt='ambedkar'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वीजनिर्मिती, सिंचन सुविधांचा विकास, अन्नधान्य उत्पादनाची वृद्धी आणि दळणवळणाच्या साधनांची, विशेषतः जलवाहतुकीचा विकास व विस्तार या सर्व बाबी परस्परांशी निगडित व अवलंबून असून त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना बाबासाहेबांनी 1942 साली केली होती, हे त्यांचे द्रष्टेपण होते. 1942 साली आंबेडकरांनी सन 2000 मध्ये भारतीयांना किती पाण्याची आवश्यकता असेल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काय करावे लागेल, याचा आराखडा तयार करण्याची सूचना विभागाला केली होती. त्याचप्रमाणं 25 ऑक्टोबर 1943 रोजी ऊर्जा विभागाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या भाषणामध्ये 'भारतातल्या लोकांना स्वस्त वीज मिळता कामा नये; तर जगातली सर्वात स्वस्त वीज मिळाली पाहिजे,' असे म्हटले होते. ज्या माणसाच्या पूर्वीच्या कित्येक पिढ्या थेंब थेंब पाण्यासाठी आक्रोशल्या होत्या आणि ज्याच्या कित्येक पिढ्यांनी केवळ अंधारच पाहिला होता, तो माणूस या देशाच्या पुढच्या साठ  वर्षांच्या पाण्याचे आणि ऊर्जेचे नियोजन करत होता, सर्वंकष पायाभूत सुविधा विकासाची जबाबदारी उचलत होता, हा एक प्रकारे नियतीवर त्यांनी उगवलेला वेगळ्या प्रकारचा 'सूड'च होता. 5 सप्टेंबर 1943 रोजी कटक येथील भाषणात बाबासाहेबांनी जलसाक्षरता आणि ऊर्जासाक्षरतेची गरज प्रतिपादित केली होती. एकविसाव्या शतकात अलीकडे या संज्ञांचा वापर होऊ लागला असताना 1943मध्ये त्यांचं सूतोवाच करणं, हे बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाचं आणखी एक उदाहरण आहे. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>प्रो. हर्ट या अमेरिकन अभ्यासकानं त्याच्या पुस्तकात भारतात पाटबंधारे विकास आणि व्यवस्थापनाची राजकीय इच्छाशक्ती डॉ. आंबेडकर या मंत्र्यांनी दाखविली नसती तर पुढची 25-30 वर्षे भारतात या क्षेत्राचा विकास खुरटला असता, असे म्हटले आहे. नदीजोड प्रकल्पाची संकल्पनाही देशात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनींच सन 1942मध्ये मांडली होती, जिच्या उपयुक्ततेवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं.</font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1304/30/images/img1130430008_3_1.jpg' alt='babasaheb ambedkar'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>दि. 27 जानेवारी 1919 रोजी साऊथबरो कमिशनसमोर साक्ष देत असताना केवळ दलित-आदिवासींनाच नव्हे, तर तमाम भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, असे ठासून सांगणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय होते. त्यानंतर पुढं दहा वर्षांनी काँग्रेसनं सन 1929मध्ये तसा ठराव केला. म्हणजे बाबासाहेब त्यांच्याही 10 वर्षं पुढंच होते.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकाच दिवशी स्वतंत्र झाले असले तरी आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळं इथली लोकशाही सार्वभौम आणि सुदृढ झाली, आणि पाकिस्तानात मात्र ती लष्कराच्या ताब्यात गेली. पाकिस्तानात एका व्याख्यानाच्या निमित्तानं गेलो असताना तिथल्या लोकांनी 'हमें भी एक डॉ. आंबेडकर चाहिए होते।' अशा शब्दांत खंत व्यक्त केली. नेपाळच्या संसदेला संबोधित करण्यासाठी गेलो असता तिथल्या लोकांनीही आज डॉ. आंबेडकर असते, तर त्यांनी नेपाळची राज्यघटना कशी लिहीली असती, या विषयावर मत मांडण्यास सांगितलं, यापेक्षा आणखी मोठी पोचपावती त्यांच्या कार्याला दुसरी कोणती असू शकेल?</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>भारतीय राज्यघटनेची सुरवातच 'आम्ही भारताचे लोक..' अशी करून लोकशाहीमध्ये जनतेचं सर्वोच्च स्थान त्यांनी अधोरेखित केलं. 1946मध्ये घटना परिषदेमध्ये 'देव विरुद्ध लोक' असा प्रस्ताव मतास टाकण्यात आला आणि तिथं लोकांचा विजय झाला. हा केवळ बाबासाहेबांचा नव्हे, तर भारताच्या लोकशाहीचा विजय होता. परंपरा आणि परिवर्तनाचं महासूत्र राज्यघटनेत ओवण्याचं महाकठीण काम बाबासाहेबांनी अथक परिश्रमांनी साकार केलं. इथल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देऊन जणू त्यांनी या प्रत्येक नागरिकाची देशाच्या सातबाऱ्यावर नोंदच केली. 1918 साली लिहीलेल्या 'स्मॉल होल्डींग्ज इन इंडिया ॲन्ड देअर रिमेडीज्' या शोधप्रबंधात देशाच्या शेती क्षेत्रासमोरील आव्हानांचा सांगोपांग आढावा त्यांनी घेतला होता. शेती क्षेत्राचं योग्य व्यवस्थापन वेळीच केलं नाही, तर इथल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांनी देऊन ठेवला होता. आपण त्यांचं ऐकलं नाही आणि आज खरोखरीच ती वेळ इथल्या शेतकऱ्यावर आली आहे.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>कुटुंब नियोजनाच्या संदर्भात सुद्धा जन्मदरापेक्षा पोषण दर महत्त्वाचा आणि जास्त मुलं जन्माला घालणं हा कायद्यानं गुन्हा करण्याची मागणी केली होती. तसा कायदा करण्यासाठी ते आग्रही होते. पण त्याला साथ मिळाली नाही. भारताचा जन्मदर असाच राहिला तर सन 2000 साली भारताची लोकसंख्या शंभर कोटींवर जाईल, आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा, राहणीमान सांभाळणं अवघड होऊन बसेल, असा इशारा त्यांनी सन 1938 साली दिला होता. पाकिस्तान आणि बांग्लादेश वेगळा होऊनही सन 2001 साली भारताची लोकसंख्या 120 कोटींवर गेली, हे सुद्धा आंबेडकरांच्या दूरदृष्टीचं प्रतीक होतं. बाबासाहेबांनी दिलेल्या स्त्री-पुरूष समानता, संसाधनांचे फेरवाटप, सक्तीचे, मोफत व सार्वत्रिक शिक्षण, जातिनिर्मूलन व आंतराजातीय विवाह आणि धर्मचिकित्सा या पंचसूत्रीच्या सहाय्यानंच आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख आपल्याला उंचावता येणार आहे. बाबासाहेब हे भारतीय सामाजिक न्यायाचे प्रतीक तर निश्चितपणानं आहेतच, पण त्याचबरोबर राज्यघटनेमध्ये 'आम्ही भारताचे लोक…' असं म्हणून इथल्या प्रत्येक नागरिकाला सार्वभौम ओळख प्रदान करणारे बाबासाहेब हे खरे 'आम्हा भारतीयांचे डॉ. आंबेडकर' होते. पण त्यांची ही ओळख अजूनही आपण पटवून घ्यायला तयार नाही आहोत, हे खरं दुखणं आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 30 Apr 2013 12:07:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:58:32 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ओढ दीक्षा भूमीची !]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ओढ-दीक्षा-भूमीची-110101900009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/ओढ-दीक्षा-भूमीची-110101900009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1_1/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1_1/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[नागपूरचे सारे रस्ते सध्या दीक्षा भूमीच्या दिशेने वाहताना दिसत आहेत. ५४ वर्षापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या पवित्र भूमीत आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा दिली होती. त्याचे स्मरण म्हणून या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1010/19/images/img1101019009_1_2.jpg' alt='diksha' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MHNEWS</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>नागपूरचे सारे रस्ते सध्या दीक्षा भूमीच्या दिशेने वाहताना दिसत आहेत. 56 वर्षापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या पवित्र भूमीत आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा दिली होती. त्याचे स्मरण म्हणून या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने बौध्द बांधव नागपुरात येतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>आँरेज सिटी ' बरोबरच नागपूरची ओळख आता दीक्षा भूमीच्या नावाने होऊ लागली आहे. येथे बांधण्यात आलेले स्तूप हे एक उत्तम वास्तूशिल्पाचा नमुना आहे. येथील वास्तू पाहण्यासाठी आणि अभ्यासणासाठी अभ्यासक येतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>दीक्षाभूमी' ही पवित्र भूमी झाली आहे. गेल्या तीन वर्षापासून मी जवळून न्याहळतो आहे. येथे येणारा भाविक कांही मिळविण्यासाठी नव्हे तर येथील माती कपाळाला लावण्यासाठी येतो. हजारो मैलावरुन लाखोंच्या संख्येने लोक येतात. बसने, रेल्वेने मिळेल त्या वाहनाने येतात. जो येतो तो येथून काही तरी घेऊन जातो. काही तरी म्हणजे बाबासाहेबांचे विचार...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुमारे १५ ते २० लाख लोक शहरात येतात. प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी केली जाते परंतु येथे येणारा बौध्द बांधव शिस्तीत येतो. कुठलीही गडबड गोंधळ होत नाही. चेंगरा चेंगरी होत नाही. आपापल्या भक्तीभावात रममाण होतात. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही मोठया संख्येने बौध्द बांधव येतात. त्यांची शिस्तबध्दता खरोखरच वाखाणण्यासारखी असते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या ठिकाणचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे पुस्तकांची दालने! अनेक प्रकाशन संस्था या ठिकाणी येतात. नवनवी पुस्तके पाहायला मिळते. तरुणापासून ते वृध्दापर्यंत बहुतांशी लोकांच्या हातात पुस्तक दिसते. या पुस्कातून बाबासाहेबांचे विचार वाचायला मिळते. त्यांचे विचारच तर आम्हाला बळ देऊन जाते, अशा कृतज्ञेचे भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या ठिकाणी अंध, अपंग, वृध्द, अशिक्षित, सुशिक्षित, कलावंत सर्वच स्तराचे लोक पाहायला मिळतात. दीक्षाभूमीवर येणार्‍या बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांची आठवण व्हावी यासाठी बीड जिल्हयातून केज या गावातील ४० वर्षीय विष्णू शेषराव ओव्हाळ दहा वर्षांपासून नित्यनेमाने दीक्षाभूमीवर येतात. येथे बाबासाहेबांची गाणी गातात. त्यांची पत्नी वंदना ही तुणतुण्याची साथे देते. मोठी बहीण हरीबाई घाडगे या विष्णूच्या सुरात सूर मिळवितात. सोपान घाडगे हार्मोनियम वाजवितात.विष्णू जन्मापासून आंधळा आहे. सूर-तालांच्या आविष्कारात त्याचे अंधत्व कुठेच आड येत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ढोलकीवरील त्याची थाप थेट ऐकणार्‍याच्या हृदयाला साद घालते. ७० वर्षांचे अंध सोपान हे विष्णूला लयबध्द साथ देतात. विष्णू आणि मंडळी ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक, विष्णू शिंदे यांची सर्वच गाणी गातात. बाबासाहेबांच्या गाण्यावर आतापर्यंत जगलो आहे. यापुढेही जगेन, असा आत्मविश्वास आहे. जगण्यासाठी मला पैसे नकोत. परंतु माझ्या या गाण्यातून बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाचा एकदा तरी विचार करा, अशी कळकळीची विनंती आपल्या गाण्यामधून करतो. त्याच्या कलेला सलाम करावा असा कलावंत ! त्यांच्याकडे पाहून 'जरी आंधळा मी तुला पाहतो ' या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रसंग दुसरा पाहायला मिळाला. फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! हातात काठी. डोक्यावर लाल पगडी आणि बोधिवृक्षाखाली थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करुन बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७५ वर्षीय वृध्द. वयाने थकलेला मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृध्दाचा हा प्रवास २३ वर्षांपासूनचा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कबीरदास गायकवाड त्या व्यक्तीचे नाव आहे. लातूर जिल्हयातील निलंगा या गावातून ते आले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले. २३ वर्षांपासून दीक्षाभूमीवर येतोय. घरची मंडळी वय झाल्यामुळे जाऊ देत नाही गुपचुप आलो. राहावतच नाही. येथे येऊन आपल्या लोकांची गाठभेट होते. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगतो. अशिक्षित असलो तरी जे काही चार गोष्टी माहीत आहे ते सांगतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शाळा शिकणं म्हणजे बाबासाहेबांची भक्ती करण्यासारखं आहे. बाबासाहेबानं त्याग केला म्हणून आपण सुखी आहोत. कबीरदास दीक्षाभूमीवरुन घरी जाताना परिसरात भोजन वाटणार्‍यांना पाच किलो तांदूळ देऊन जातो आणि पुढच्या वर्षी कुणाले उपासी ठेऊ नका अशी कळकळीची विनंतीही करतात. माणूस मोठा नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे झाल्याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही, हे दोन अनुभव प्रतिनिधीक स्वरुपात म्हणावी लागेल असे असंख्य लोक भेटतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दीक्षा भूमीच्या पवित्रस्थळी येणार्‍या प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडत असते. दीक्षा भूमीचा सोहळा कधी संपूच नये असे वाटत होते. यानिमित्ताने जनसागर जवळून पाहता आला. अनेकांचे विचार ऐकायला मिळाले. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 13 Apr 2012 17:42:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 14:38:41 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महामानव डॉ. आंबेडकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/महामानव-डॉ-आंबेडकर-110041200039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/महामानव-डॉ-आंबेडकर-110041200039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1397455030-823.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-04/14/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1397455030-823.jpg</image>
      <description><![CDATA[भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1004/12/images/img1100412039_1_1.jpg' alt='Dr. Ambedkar'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#0000FF'>भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय: </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>शैक्षणिक विचार: </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले: </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा : </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारी : </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 13 Apr 2012 16:52:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Baba Saheb Ambedkar]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
