<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[महाराष्ट्र दिन]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/maharashtra-din</link>
    <description><![CDATA[A complete coverage of foundation day of Maharashtra state.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Tue, 16 Jun 2026 07:34:04 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>महाराष्ट्र दिन</title>
      <url>https://marathi.webdunia.com/maharashtra-din</url>
      <link>https://marathi.webdunia.com/maharashtra-din</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/maharashtra-din-1010309.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Din Ghoshvakya महाराष्ट्र दिन २०२६ घोषवाक्य मराठी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-ghoshvakya-125043000034_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-ghoshvakya-125043000034_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/30/thumb/1_1/1746004952-115.png"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/30/thumb/1_1/1746004952-115.png</image>
      <description><![CDATA[मराठी भाषा आहे सक्षम, करण्या संस्कृतीचे रक्षण

मराठी भाषा गोड, वाढवी शिक्षणाची ओढ

मराठी ज्ञानाचा कल्पतरू, हात मराठीचा धरू]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/30/full/1746004952-115.png" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="maharashta din ghoshvakya" width="740" /></p>
	</p>
	मराठी भाषा आहे सक्षम, करण्या संस्कृतीचे रक्षण</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी भाषा गोड, वाढवी शिक्षणाची ओढ</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी ज्ञानाचा कल्पतरू, हात मराठीचा धरू</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठीचे आद्यदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेवी</p>
<p>
	 </p>
<p>
	विकासाचे आणि प्रगतीचे महाद्वार, मराठीचा झेंडा अटकेपार</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी भाषा पोहचवू घरोघरी, नांदेल सर्वत्र ज्ञनाची पंढरी</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी आपली आण, बाण, शान </p>
<p>
	मराठी आहे आपुला प्राण</p>
<p>
	 </p>
<p>
	अभंगाचा रचूनी पाया, संतांनी घडवली मराठीची काया</p>
<p>
	 </p>
<p>
	साहित्याचा हा खजिना, मराठी आपल्या सौंदर्याचा दागिना</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्र भारताची शान, गर्वाने उंचावते मान</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्र माझा, अभिमान माझा</p>
<p>
	 </p>
<p>
	शौर्य, संस्कृती आणि स्वाभिमान – महाराष्ट्राचा मान!</p>
<p>
	 </p>
<p>
	माझा महाराष्ट्र</p>
<p>
	एकता, प्रगती आणि परंपरेचा संगम</p>
<p>
	 </p>
<p>
	जय महाराष्ट्र, जय भारत</p>
<p>
	एक उर्जा, एक दिशा!</p>
<p>
	 </p>
<p>
	तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारा महाराष्ट्र</p>
<p>
	 </p>
<p>
	युवा घडवा, महाराष्ट्र घडवा!</p>
<p>
	 </p>
<p>
	शिकूया, संघटित होऊया, महाराष्ट्र घडवूया!</p>
<p>
	 </p>
<p>
	भाषा, जात, धर्म न पाहता – महाराष्ट्र आपला एकच आहे!</p>
<p>
	 </p>
<p>
	जिथे माणुसकी मोठी, तिथेच खरा महाराष्ट्र!</p>
<p>
	 </p>
<p>
	सर्वधर्म समभावाचा संदेश – महाराष्ट्राच्या मातीचा स्पंदन!</p>
<p>
	 </p>
<p>
	शेतकऱ्याच्या घामात – महाराष्ट्राची शान!</p>
<p>
	 </p>
<p>
	औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक – सर्वांगीण प्रगतीचा मार्ग: महाराष्ट्र!</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वावलंबी महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत!</p>
<p>
	 </p>
<p>
	स्त्रीशक्तीचा जागर – प्रगतीचा आधार!</p>
<p>
	 </p>
<p>
	मुलगी शिकली, महाराष्ट्र पिकला!</p>
<p>
	 </p>
<p>
	पर्यावरणाचे रक्षण – महाराष्ट्राचे भविष्य!</p>
<p>
	 </p>
<p>
	भक्ती, शक्ति, संस्कृती – महाराष्ट्राची ओळख!</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 May 2026 11:48:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 May 2026 11:51:41 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर टीम</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[१ मे रोजी आज महाराष्ट्रात काय उघडे आणि बंद राहील?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/what-is-open-and-closed-in-the-state-today-126050100010_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/what-is-open-and-closed-in-the-state-today-126050100010_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/11/thumb/1_1/1757558528-4583.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/11/thumb/1_1/1757558528-4583.jpg</image>
      <description><![CDATA[आज महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा वर्धापनदिन म्हणून हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील याच दिवशी, १ मे रोजी येतो, ज्यामुळे त्याचे महत्त्व वाढते. तर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="middle" alt="Maharashtra" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/11/full/1757558528-4583.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Maharashtra" width="1200" /></p>
आज महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा वर्धापनदिन म्हणून हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील याच दिवशी, १ मे रोजी येतो, ज्यामुळे त्याचे महत्त्व वाढते. तर राज्यात आज काय उघडे आणि बंद आहे चला तर जाणून घेऊ या.<br />
<ul>
	<li>
		बँका आणि सरकारी कार्यालये बंद- सरकारी कार्यालये आणि बँका बंद राहतील. कोणतीही तातडीची कामे आता फक्त सोमवारीच शक्य होतील.</li>
	<li>
		पर्यटन स्थळे खुली आणि सार्वजनिक वाहतूक सुरू</li>
	<li>
		महाराष्ट्रातील अनेक अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.</li>
	<li>
		गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राइव्हसह मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली राहतील.</li>
	<li>
		ऐतिहासिक स्मारके, मंदिरे आणि समुद्रकिनारे देखील नेहमीप्रमाणे खुले राहतील.</li>
	<li>
		लोकल ट्रेन, मेट्रो, बस आणि टॅक्सी यांसारखी सार्वजनिक वाहतूक सेवा देखील सुरू राहील</li>
</ul>
<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/maharashtra-labour-act-2026-126050100008_1.html" target="_blank">महाराष्ट्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठे बदल केले</a></strong><br type="_moz" />
Edited By- Dhanashri Naik<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/palghar-mp-hemant-vishnu-savaras-car-meets-with-an-accident-126050100009_1.html" target="_blank">ठाण्यात भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या कारचा भीषण अपघात</a></strong></p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 May 2026 11:18:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 May 2026 11:23:20 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया न्यूज टीम</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Marathi Rajbhasha Din 2026 Wishes in Marahti मराठी राजभाषा दिन शुभेच्छा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/marathi-rajbhasha-din-2026-wishes-in-marahti-126043000028_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/marathi-rajbhasha-din-2026-wishes-in-marahti-126043000028_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/30/thumb/1_1/1777550510-3458.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/30/thumb/1_1/1777550510-3458.jpg</image>
      <description><![CDATA[मराठी ही केवळ भाषा नाही, 
तर ती आपली संस्कृती आणि ओळख आहे
या थोर भाषेचा वारसा आपण जपूया
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/30/full/1777550510-3458.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	</p>
	मराठी ही केवळ भाषा नाही, </p>
<p>
	तर ती आपली संस्कृती आणि ओळख आहे</p>
<p>
	या थोर भाषेचा वारसा आपण जपूया</p>
<p>
	मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	अमृताहुनीही गोड असणाऱ्या </p>
<p>
	आमच्या मराठी भाषेचा जयजयकार असो! </p>
<p>
	मराठी राजभाषा दिनानिमित्त </p>
<p>
	प्रत्येक मराठी मनाला मानाचा मुजरा</p>
<p>
	 </p>
<p>
	जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी, </p>
<p>
	मराठीची गोडी काळजात कायम राहील</p>
<p>
	आपली मायबोली, आपली शान! </p>
<p>
	मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	साहित्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या </p>
<p>
	आपल्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगूया</p>
<p>
	मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी संस्कृती, मराठी बाणा आणि मराठी भाषा... </p>
<p>
	हीच आमची खरी ओळख! </p>
<p>
	मराठी राजभाषा दिनानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी बोलूया, मराठी लिहूया </p>
<p>
	आणि मराठी भाषेचा सन्मान वाढवूया</p>
<p>
	मराठी राजभाषा दिनाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या वाणीतून सजलेली </p>
<p>
	आणि शिवरायांच्या शौर्याने गाजलेली आपली मराठी! </p>
<p>
	राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	गर्व आहे मला मी मराठी असल्याचा </p>
<p>
	आणि सार्थ अभिमान आहे माझ्या मराठी भाषेचा</p>
<p>
	मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करूया!</p>
<p>
	 </p>
<p>
	आपली मायबोली, </p>
<p>
	आपली ओळख, </p>
<p>
	आपला अभिमान</p>
<p>
	मराठी भाषा हीच आपली खरी ताकद</p>
<p>
	चला, मराठीचा सन्मान करूया, </p>
<p>
	तिचा अभिमान बाळगूया </p>
<p>
	आणि पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा जपूया</p>
<p>
	मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 May 2026 08:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 May 2026 09:47:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर टीम</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Din 2026 महाराष्ट्र दिन २०२६ इतिहास, महत्त्व, उत्सव आणि सोहळे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-2026-date-importance-significance-126042500022_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-2026-date-importance-significance-126042500022_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg</image>
      <description><![CDATA[थोडक्यात सांगायचे तर, याच चळवळीचा परिपाक म्हणून 'मुंबई पुनर्रचना कायदा, १९६०' संमत करण्यात आला. या कायद्यानुसारच १ मे १९६० रोजी 'मुंबई राज्या'चे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. मुंबई शहराला महाराष्ट्राची राजधानी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="middle" alt="maharashtra din wishes" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/full/1588268464-5785.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Maharashtra diwas wishes" width="740" /></p>
	१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली; या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी १ मे रोजी &#39;महाराष्ट्र दिन&#39; साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याच्या मुद्द्याने जोर धरला होता. &#39;संयुक्त महाराष्ट्र चळवळी&#39;च्या माध्यमातूनच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची गरज प्रकर्षाने अधोरेखित झाली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	थोडक्यात सांगायचे तर, याच चळवळीचा परिपाक म्हणून &#39;मुंबई पुनर्रचना कायदा, १९६०&#39; संमत करण्यात आला. या कायद्यानुसारच १ मे १९६० रोजी &#39;मुंबई राज्या&#39;चे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. मुंबई शहराला महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. अशा प्रकारे एका नव्या राज्याच्या प्रवासाचा शुभारंभ झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी ही एक अत्यंत सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व असलेली घटना आहे. हा दिवस केवळ राज्याच्या स्थापनेचा उत्सवच ठरत नाही, तर तो येथील संस्कृती, भाषा आणि परंपरांचाही गौरव करतो. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, त्यांच्या योगदानाची ही एक प्रकारे दखलच असते; तसेच राज्यातील जनतेमध्ये एकतेची प्रबळ भावना निर्माण करण्यासही या दिवसाचा हातभार लागतो. भारताची अर्थव्यवस्था, संस्कृती आणि समाजजीवन यांमध्ये महाराष्ट्राने दिलेल्या योगदानाचा हा दिवस एक ज्वलंत पुरावाही ठरतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	उत्सव आणि सोहळे</p>
<p>
	हा दिवस संपूर्ण राज्यात विविध स्वरूपांत साजरा केला जातो. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये लावणीसारखे पारंपारिक नृत्य आणि संगीताचा समावेश असलेले सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	या दिवशी होणारे मुख्य कार्यक्रम आणि उपक्रम:</p>
<p>
	ध्वजारोहण आणि मुख्य सोहळा: या दिवसाचा मुख्य सोहळा मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित केला जातो. येथे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात आणि जनतेला संबोधित करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	पोलीस संचलन: शिस्त आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडवणारे पोलीस संचलन आणि संचलन (मार्च पास्ट) आयोजित केले जाते. यामध्ये राज्य राखीव पोलीस दल, मुंबई पोलीस, होमगार्ड इत्यादींचा सहभाग असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	सांस्कृतिक कार्यक्रम: महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये प्रामुख्याने लावणी, लोकगीते आणि इतर पारंपारिक मराठी कलाप्रकारांचा समावेश असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	हुतात्म्यांना अभिवादन: संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्या नेत्यांनी आणि क्रांतिकारकांनी योगदान दिले आणि बलिदान दिले, त्यांना या दिवशी विशेष श्रद्धांजली वाहिली जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	पुरस्कार वितरण: महाराष्ट्राच्या प्रगतीत विविध क्षेत्रांत (जसे की शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, कृषी) मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्य सरकारतर्फे या दिवशी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.</p>
<p>
	 </p>
<p>
	प्रदर्शने आणि स्पर्धा: अनेक शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये महाराष्ट्राच्या ऐतिहासिक प्रवासावर आधारित व्याख्याने, स्पर्धा आणि प्रदर्शने आयोजित केली जातात.</p>
<p>
	 </p>
<p>
	नवीन प्रकल्पांचे उद्घाटन: राज्य सरकार आणि खाजगी संस्था अनेकदा १ मे या मुहूर्तावर नवीन प्रकल्प किंवा लोककल्याणकारी योजनांचा शुभारंभ करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	हा दिवस केवळ एक सुट्टी नसून महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती आणि भाषिक अस्मितेचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे.</p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 May 2026 08:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 May 2026 09:05:47 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर टीम</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[१ मे रोजी मराठी राजभाषा दिन; गल्लत नको, स्पष्टता हवी! १ मे, २७ फेब्रुवारी आणि ३ ऑक्टोबर: मराठी भाषेचे तीन सन्मान सोहळे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/marathi-rajbhasha-din-2026-on-1-may-maharashtra-din-126043000026_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/marathi-rajbhasha-din-2026-on-1-may-maharashtra-din-126043000026_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/30/thumb/1_1/1777549501-2285.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/30/thumb/1_1/1777549501-2285.jpg</image>
      <description><![CDATA[१ मे मराठी राजभाषा दिनाविषयी महत्त्वाचे:
स्थापना व दर्जा: महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर, 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार मराठी ही राज्याची अधिकृत भाषा बनली.
उद्देश: प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि तिचा गौरव ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/30/full/1777549501-2285.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	</p>
	मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्याच दिवशी मराठी भाषेला राज्याची अधिकृत &#39;राजभाषा&#39; म्हणून मान्यता मिळाली. तेव्हापासून, दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिनासोबतच &#39;मराठी राजभाषा दिन&#39; म्हणून साजरा केला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>१ मे मराठी राजभाषा दिनाविषयी महत्त्वाचे:</strong></p>
<p>
	स्थापना व दर्जा: महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर, &#39;महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४&#39; नुसार मराठी ही राज्याची अधिकृत भाषा बनली.</p>
<p>
	उद्देश: प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढवणे आणि तिचा गौरव करणे.</p>
<p>
	साजरा करण्याचा काळ: १९६६ पासून या दिवशी सरकारी स्तरावर मराठीचा वापर अनिवार्य करण्यात आला.</p>
<p>
	 </p>
<p>
	अनेक वेळा सर्व सामान्यांकडून मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिन याची गफलत केली जाते. तर जाणून घ्या मराठी भाषेचे तीन महत्त्वाचे विशेष दिन-</p>
<p>
	<strong>१ मे रोजी मराठी राजभाषा दिन (जागतिक मराठी दिन) : </strong>१९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर १९६४ च्या राजभाषा अधिनियमानुसार मराठीला &#39;राजभाषेचा&#39; अधिकृत दर्जा मिळाला. हा दिवस प्रशासकीय अंमलबजावणीचा उत्सव आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन: </strong>ज्येष्ठ कवी आणि ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा सन्मान म्हणून २०१३ पासून हा दिवस &#39;गौरव दिन&#39; म्हणून साजरा होतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>३ ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा दिन: </strong>केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला &#39;अभिजात भाषेचा&#39; (Classical Language) दर्जा बहाल केला. मराठी भाषेचा प्राचीन वारसा सिद्ध झाल्याचा हा ऐतिहासिक विजय दिन आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>१. मराठी राजभाषा दिन (१ मे)</strong></p>
<p>
	हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेशी जोडलेला आहे.</p>
<p>
	उद्देश: शासन व्यवहारात मराठीचा वापर वाढवणे.</p>
<p>
	राज्य स्थापनेवेळी कारभार इंग्रजीत चालत असे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी &#39;महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४&#39; मंजूर करून मराठीला राजभाषेचा मान मिळवून दिला. याच दिवशी जगभरातील मराठी भाषिक &#39;जागतिक मराठी भाषा दिन&#39; म्हणूनही साजरा करतात.</p>
<p>
	<br />
	<strong>२. मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)</strong></p>
<p>
	हा दिवस मराठी साहित्यातील ऋषीप्रुल्य व्यक्तिमत्व कुसुमाग्रजांना समर्पित आहे.<br />
	उद्देश: मराठी साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपणे.<br />
	कुसुमाग्रजांच्या निधनानंतर, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि मराठी साहित्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी २०१३ रोजी या दिनाची घोषणा केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>३. अभिजात मराठी भाषा दिन (३ ऑक्टोबर)</strong></p>
<p>
	मराठी भाषेच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे.<br />
	उद्देश: मराठी भाषेची प्राचीनता आणि समृद्धी साजरी करणे.</p>
<p>
	३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठीला &#39;अभिजात भाषा&#39; म्हणून मान्यता दिली. मराठी भाषा ही केवळ जुनीच नाही, तर ती स्वयंभू आणि अतिशय समृद्ध आहे हे या निमित्ताने जगाने मान्य केले.<br />
	<br />
	<strong>१ मे हा &#39;अंमलबजावणीचा&#39; आणि &#39;अस्तित्वाचा&#39; दिवस आहे.</strong></p>
<p>
	<strong>२७ फेब्रुवारी हा &#39;साहित्याचा&#39; आणि &#39;सांस्कृतिक गौरवाचा&#39; दिवस आहे.</strong></p>
<p>
	<strong>३ ऑक्टोबर हा आपल्या भाषेच्या &#39;प्राचीनतेचा&#39; आणि &#39;अभिमानाचा&#39; सन्मान सोहळा आहे.</strong></p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 May 2026 08:20:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 May 2026 09:47:05 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर टीम</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Day 2026 Speech in Marathi महाराष्ट्र दिन भाषण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-2026-speech-in-marathi-126042500051_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-2026-speech-in-marathi-126042500051_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/25/thumb/1_1/1777121724-2122.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/25/thumb/1_1/1777121724-2122.jpg</image>
      <description><![CDATA[आज १ मे. आजचा दिवस आपल्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर तो आपल्या अस्मितेचा, कष्टाचा आणि गौरवशाली इतिहासाचा उत्सव आहे. १ मे १९६० रोजी थोर सेनानींच्या बलिदानातून आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संघर्षातून आपला 'महाराष्ट्र' नावाचा मंगल कलश स्थापन झाला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="Maharashtra Din 2026 Bhashan in Marathi" class="imgCont" height="447" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/25/full/1777121724-2122.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="819" /></p>
	</p>
	सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	"अभिमान वाटे आम्हा महाराष्ट्राचा,</p>
<p>
	जिथे जन्म झाला शिवरायांचा,</p>
<p>
	ज्याने घडविला इतिहास पराक्रमाचा,</p>
<p>
	अशा या पावन भूमीला माझा मानाचा मुजरा!"</p>
<p>
	 </p>
<p>
	आज १ मे. आजचा दिवस आपल्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर तो आपल्या अस्मितेचा, कष्टाचा आणि गौरवशाली इतिहासाचा उत्सव आहे. १ मे १९६० रोजी थोर सेनानींच्या बलिदानातून आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संघर्षातून आपला &#39;महाराष्ट्र&#39; नावाचा मंगल कलश स्थापन झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास आहे. सह्याद्रीच्या कडांनी आपल्याला वाकायला नाही, तर लढायला शिकवलं. संतांच्या शिकवणीने आपल्याला माणुसकी दिली, तर शिवरायांच्या तलवारीने आपल्याला स्वराज्य दिलं. आज आपला महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचे इंजिन म्हणून ओळखला जातो. उद्योग असो, कला असो, क्रीडा असो की शिक्षण; प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने आपला ठसा उमटवला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा विचारांचा वारसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रज्ञा आणि शाहू महाराजांचा समतेचा विचार या राज्याच्या मातीत रुजलेला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आज महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे. शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान, कला आणि क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने आपला झेंडा फडकवला आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, तर पुणे ही विद्येचे माहेरघर! नाशिक, नागपूर, संभाजीनगर यांसारख्या शहरांनी राज्याच्या वैभवात मोलाची भर घातली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मित्रांनो, महाराष्ट्र दिन साजरा करणे म्हणजे केवळ झेंडा वंदन करणे नव्हे, तर या राज्याच्या प्रगतीसाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करणे होय. हा महाराष्ट्र केवळ आर्थिकदृष्ट्या नाही, तर विचारांनीही समृद्ध बनवायचा आहे. आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या मातीचा अभिमान बाळगत असतानाच, आपण महाराष्ट्राला प्रदूषणमुक्त, व्यसनमुक्त आणि सुशिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्राची संस्कृती, गडकिल्ले आणि मराठी भाषा जपणे ही आपली जबाबदारी आहे. चला तर मग, आज आपण शपथ घेऊया की आपण आपल्या कष्टाने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार नेऊ.</p>
<p>
	 </p>
<p>
	जाता जाता एवढेच म्हणेन...</p>
<p>
	 </p>
<p>
	"मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा</p>
<p>
	प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा!"</p>
<p>
	 </p>
<p>
	जय हिंद, जय महाराष्ट्र!</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 May 2026 08:15:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 May 2026 09:05:08 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर टीम</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Day 2026 Wishes in Marathi महाराष्ट्र दिन शुभेच्छा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-2026-wishes-in-marathi-126042700020_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-2026-wishes-in-marathi-126042700020_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/27/thumb/1_1/1777277901-5592.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/27/thumb/1_1/1777277901-5592.jpg</image>
      <description><![CDATA[मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या
सर्व मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="Maharashtra Din 2026 Wishes in Marahti" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-04/27/full/1777277901-5592.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	</p>
	लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी! </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या<br />
	सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	संकल्प उन्नतीचा, समृद्ध महाराष्ट्राचा! </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा! </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा! </p>
<p>
	दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा!<br />
	महाराष्ट्र दिनच्या शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या<br />
	सर्व मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा! </p>
<p>
	अभिमानाने सांगतो मी मराठी, गर्जा महाराष्ट्र माझा! </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	दरीदरीतून घुमतो नाद, शिवरायांचा आशिर्वाद!</p>
<p>
	संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील वीरांना अभिवादन<br />
	आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	कपाळी केशरी टिळा, मुखी मराठी शब्द!</p>
<p>
	आपल्या संस्कृतीचा आणि<br />
	परंपरेचा सार्थ अभिमान बाळगूया</p>
<p>
	महाराष्ट्र दिन चिरायू होवो!</p>
<p>
	 </p>
<p>
	सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा!</p>
<p>
	मराठी अस्मितेच्या या महान पर्वावर </p>
<p>
	सर्व महाराष्ट्रप्रेमींना कोटी कोटी शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	जगातील सर्वात सुंदर भाषा &#39;मराठी&#39;<br />
	आणि सर्वात महान राज्य &#39;महाराष्ट्र&#39;!</p>
<p>
	या पवित्र भूमीला माझा मानाचा मुजरा</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	माझा महाराष्ट्र, माझा अभिमान!</p>
<p>
	विविधतेने नटलेल्या आणि शौर्याने गाजलेल्या </p>
<p>
	या भूमीचा मला गर्व आहे</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	रंगाने भगवा, रक्ताने मराठा!</p>
<p>
	महाराष्ट्राची शान, मराठी मान<br />
	आणि शिवरायांचा सन्मान</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	पराक्रमाची गाथा, महाराष्ट्राचा माथा! </p>
<p>
	संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या<br />
	हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन</p>
<p>
	महाराष्ट्र दिन चिरायू होवो</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी आमची मातृभाषा, महाराष्ट्र आमचा प्राण!</p>
<p>
	या मंगल दिनी साऱ्या महाराष्ट्राला </p>
<p>
	सुख-समृद्धी लाभो, हीच सदिच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा!</p>
<p>
	आपल्या राज्याच्या प्रगतीचा रथ असाच वेगाने पुढे जावो</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	दगडांच्या देशातून पाझरणाऱ्या<br />
	प्रेमाचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र!</p>
<p>
	या मातीतील प्रत्येक कणाकणाला वंदन</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा<br />
	 </p>
<p>
	मराठी माणूस, मराठी मन, आज आनंदाचा सण!</p>
<p>
	चला एकत्र येऊया आणि आपल्या महाराष्ट्राचा गौरव वाढवूया</p>
<p>
	शुभ महाराष्ट्र दिन!</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी पाऊल पडते पुढे!</p>
<p>
	कला, क्रीडा, साहित्य आणि </p>
<p>
	संस्कृतीच्या क्षेत्रात महाराष्ट्र सदैव अग्रगण्य राहो</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	साडेतीन शक्तीपीठांचा आणि संतांच्या भूमीचा सार्थ अभिमान!</p>
<p>
	सर्व मराठी जनांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 May 2026 07:14:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 May 2026 09:02:54 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया फीचर टीम</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Day 2025 Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-2025-wishes-in-marathi-125042900023_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-2025-wishes-in-marathi-125042900023_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/29/thumb/1_1/1745911947-2354.png"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/29/thumb/1_1/1745911947-2354.png</image>
      <description><![CDATA[जय जय महाराष्ट्र माझा, 
गर्जा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/29/full/1745911947-2354.png" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="maharashtra diwas shubhechha" width="740" /></p>
	</p>
	जय जय महाराष्ट्र माझा, </p>
<p>
	गर्जा महाराष्ट्र माझा</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	भाव-भक्तीच्या देशा</p>
<p>
	बुद्धीच्या देशा</p>
<p>
	शाहिरांच्या देशा</p>
<p>
	कर्त्यां मर्दांच्या देशा… </p>
<p>
	जय जय महाराष्ट्र देशा </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी</p>
<p>
	गुणगुणलो जे गीत गीत मराठी</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	ज्ञानाच्या देशा,</p>
<p>
	प्रगतीच्या देशा</p>
<p>
	आणि संताचा देशा</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा  </p>
<p>
	 </p>
<p>
	शिव निष्ठा येथ असे सतत जागती…</p>
<p>
	अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या</p>
<p>
	प्रत्येकाला मानाचा मुजरा</p>
<p>
	अखंड महाराष्ट्राच्या सर्व जनांना</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र</p>
<p>
	माझ्या राजाचा महाराष्ट्र</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा </p>
<p>
	 </p>
<p>
	भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा</p>
<p>
	अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा</p>
<p>
	सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा</p>
<p>
	दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा  </p>
<p>
	 </p>
<p>
	लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,</p>
<p>
	जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा </p>
<p>
	 </p>
<p>
	मंगल देशा</p>
<p>
	पवित्र देशा</p>
<p>
	महाराष्ट्र देशा</p>
<p>
	प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	कपाळी केशरी टिळा लावितो</p>
<p>
	महाराष्ट्र देशा तुला वंदितो</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा </p>
<p>
	 </p>
<p>
	पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन</p>
<p>
	आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन</p>
<p>
	धन्य आहे ही महाराष्ट्राची माती</p>
<p>
	कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद</p>
<p>
	महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	मर्द मराठ्यांचा हा मुलुख</p>
<p>
	शांतता, आनंद आणि अभिमान असलेल्या</p>
<p>
	महाराष्ट्राचा अभिमान आहे मला</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्राची यशोगाथा,</p>
<p>
	महाराष्ट्राची शौर्यगाथा,</p>
<p>
	पवित्र माती लावू कपाळी</p>
<p>
	धरणी मातेच्या चरणी माथा</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <br />
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-in-2025-history-significance-125042900019_1.html" target="_blank">Maharashtra Din 2025: महाराष्ट्र दिन संस्कृती आणि परंपरा जपणारा खास दिवस</a></strong></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 01 May 2025 05:53:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 01 May 2025 07:40:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Din 2025: महाराष्ट्र दिन संस्कृती आणि परंपरा जपणारा खास दिवस]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-in-2025-history-significance-125042900019_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-in-2025-history-significance-125042900019_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg</image>
      <description><![CDATA[दरवर्षी महाराष्ट्र सरकारने राज्याच्या जन्मदिनानिमित्त १ मे हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून मानला आहे. या खास दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये अशा बहुतेक शैक्षणिक संस्था बंद राहतात. दिवसाची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्क येथे परेडने होते. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="maharashtra din wishes" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/full/1588268464-5785.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Maharashtra diwas wishes" width="740" /></p>
	महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र दिवस हा महाराष्ट्र राज्यात साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जाणारा हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा साजरी करणारे राजकीय भाषणे आणि परेड हे या दिवसाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ ने प्रत्येक भारतीय राज्याचे भाषेच्या आधारावर विभाजन केले. तथापि पूर्वीच्या मुंबईत मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी यासारख्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात होत्या. याच वेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतंत्र राज्याची मागणी करण्यासाठी चळवळ सुरू केली. संघटनेची इच्छा होती की मुंबईचे दोन भाग करावेत - एक भाग ज्यामध्ये मराठी आणि कोकणी भाषिक लोक असतील आणि दुसरे ज्यामध्ये प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी भाषिक लोक असतील.</p>
<p>
	 </p>
<p>
	समांतरपणे, महागुजरात चळवळ नावाची आणखी एक चळवळ सुरू झाली. नंतरची मागणी सर्व गुजराती भाषिक लोकांसाठी वेगळे राज्य असावे. या चळवळींमुळे त्यांच्या समुदायासाठी वेगळे राज्य मागणाऱ्या दोन्ही गटांमध्ये वारंवार संघर्ष झाला. अखेर मुंबई पुनर्गठन कायदा लागू झाल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली. या चळवळी किंवा आंदोलनाच्या परिणामी, मुंबई पुनर्गठन कायदा, १९६० नुसार महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची स्थापना झाली. हा कायदा १ मे १९६० रोजी, आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या दिवशीच लागू झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा</strong></p>
<p>
	महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा ही विविध परंपरा आणि पद्धतींचे सुसंवादी मिश्रण आहे. भव्य ऐतिहासिक स्मारके, उत्साही उत्सव आणि अपवादात्मक कलात्मकतेने नटलेला महाराष्ट्र एकतेचे प्रतीक म्हणून उभा आहे. शतकानुशतके राज्य करणाऱ्या अनेक राज्यांच्या गौरवशाली वारशाचा मराठी संस्कृतीवर प्रचंड प्रभाव आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>वास्तुकला</strong></p>
<p>
	महाराष्ट्रात अनेक राजवंशांचा आणि परदेशी स्थापत्य शैलींचा प्रभाव मुबलक प्रमाणात आढळतो. बौद्ध परंपरांच्या दगडी बांधकामापासून ते वसाहतीकालीन इमारतींपर्यंत, महाराष्ट्र स्थापत्य चमत्कारांनी भरलेला आहे. कला आणि हस्तकलेचा विचार केला तर, या प्रदेशात अनेक प्रसिद्ध चित्रकला शैलींचा उगम झाला आहे. वरली चित्रकला, सावंतवाडी कला आणि बिदरी क्राफ्ट ही काही प्रसिद्ध महाराष्ट्रीयन कला शैली आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>साहित्य</strong></p>
<p>
	मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक वारसा आहे. शिवाजी सावंत, भालचंद्र नेमाडे आणि विष्णू सखराम खांडेकर यांसारख्या लेखकांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे. अनेक प्रशंसित लेखकांसह, मराठी साहित्य महाराष्ट्राच्या जीवन, इतिहास, धर्म, तत्वज्ञान आणि सामाजिक समस्यांचे चित्रण करण्यासाठी ओळखले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>संगीत आणि नृत्य</strong></p>
<p>
	महाराष्ट्र त्याच्या संगीत प्रतिभेसाठी देखील ओळखले जाते. झाकीर हुसेन, आशा भोसले, किशोरी आमोणकर आणि पंडित भीमसेन जोशी हे काही दिग्गज मराठी संगीतकार आहेत. लावणी, तमाशा आणि कोळी सारखे लोकनृत्य प्रकार देखील उत्सव आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सादर केले जातात, ते देखील महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा भूमीची विविधता आणि चैतन्य प्रदर्शित करतो. उत्कृष्ट कला आणि हस्तकला, ​​संगीत आणि नृत्य, विस्मयकारक वास्तुकलेसह, महाराष्ट्राच्या विशिष्ट संस्कृती आणि परंपरा प्रतिबिंबित करते.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-wishes-in-marathi-124042900041_1.html" target="_blank">Maharashtra Day Wishes In Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो?</strong></p>
<p>
	दरवर्षी महाराष्ट्र सरकारने राज्याच्या जन्मदिनानिमित्त १ मे हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून मानला आहे. या खास दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये अशा बहुतेक शैक्षणिक संस्था बंद राहतात. दिवसाची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्क येथे परेडने होते. राज्याचे राज्यपाल राज्य राखीव पोलिस, गृहरक्षक दल, मुंबई पोलिस, बीएमसी फोर्स, वाहतूक पोलिस यांच्यासह इतर कर्मचारी परेडमध्ये भाग घेतात. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा दर्शविणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.</p>
<p>
	 </p>
<p>
	या दिवशी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून दिवस साजरा करताना संबंधित जिल्हा मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. राज्याच्या या उल्लेखनीय सेवेबद्दल खेळाडू, पोलिस अधिकारी आणि डॉक्टर अशा विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना बक्षीस दिले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील लोक पारंपारिक लावणी सादरीकरण - मराठी संतांनी लिहिलेल्या कवितांचे कथन - यासह हा दिवस साजरा करतात, तर राज्यभर मिरवणुका काढल्या जातात. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकार आणि अनेक खाजगी कंपन्या नवीन प्रकल्प आणि योजनांचे उद्घाटन आणि लाँच करण्याची संधी घेतात. योगायोगाने, हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो, जो १९ व्या शतकापासून साजरा केला जात आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र दिन म्हणजे भाषिकतेवर आधारित मराठी राजकीय चळवळीचा विजयोत्सव. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९६० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या आवाजाच्या एकत्रीकरणाचा महाराष्ट्रातील लोकांवर, त्याच्या संस्कृतीवर आणि परंपरांवर खोलवर परिणाम झाला आहे.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 01 May 2025 05:11:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 01 May 2025 07:41:59 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र दिनाशी संबंधित तथ्ये, नक्की वाचा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-2025-facts-and-information-125043000044_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-2025-facts-and-information-125043000044_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/30/thumb/1_1/1746006429-5807.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/30/thumb/1_1/1746006429-5807.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र स्थापना दिवस दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला, जो १९६० मध्ये मुंबई राज्याच्या विभाजनानंतर झाला. हा दिवस महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे आणि तो ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/30/full/1746006429-5807.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="maharshtra din 2025" width="740" /></p>
	</p>
	महाराष्ट्र स्थापना दिवस दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला, जो १९६० मध्ये मुंबई राज्याच्या विभाजनानंतर झाला. हा दिवस महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच १ मे हा दिवस गुजरातसाठी देखील विशेष महत्त्वाचा आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, ही महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्ये बॉम्बे नावाच्या एका मोठ्या प्रदेशाचा भाग होती. या दिवशी महाराष्ट्र भारताचे वेगळे राज्य बनले. हा दिवस १ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन महाराष्ट्र आणि गुजरात या भाषिक राज्यांमध्ये झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे प्रतीक आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्र दिनाबद्दल</strong></p>
<p>
	१ मे रोजी साजरा होणारा महाराष्ट्र स्थापना दिन हा त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा आणि व्यक्तींचा सन्मान करण्याचा आणि त्यांचे स्मरण करण्याचा एक गौरवशाली प्रसंग आहे. यामध्ये महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्यात रूपांतर करण्यासाठी लढा देण्यात आला.</p>
<p>
	 </p>
<p>
	ही कथा ब्रिटीश काळाची आहे जेव्हा गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील काही भागांनी &#39;बॉम्बे प्रेसीडेंसी&#39; नावाचा एक लांब प्रदेश बनवला होता आणि तो ब्रिटीशांच्या ताब्यात होता. मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना, गुजरात आणि दक्षिण भारतातील अनेक व्यापारी आणि व्यावसायिक महाराष्ट्रात येऊ लागले.</p>
<p>
	 </p>
<p>
	कामगार वर्गाच्या मुळांचे आणि मातीचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करत लोकांनी राज्यभर निदर्शने केली होती. १ मे १९६० हा दिवस महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य घोषित करण्यात आले.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-ghoshvakya-125043000034_1.html" target="_blank">महाराष्ट्र दिन घोषवाक्य मराठी Maharashtra Din Ghoshvakya</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>महाराष्ट्र दिनाचा इतिहास काय आहे?</strong></p>
<p>
	महाराष्ट्राचा इतिहास समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. ६३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन भारतीय राज्ये वेगळी झाली. १७ व्या ते १९ व्या शतकापर्यंत मराठा साम्राज्याने या प्रदेशाचा बराचसा भाग राज्य केला. १९४७ मध्ये भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, बॉम्बे प्रेसीडेन्सीची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये सध्याच्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकचा काही भाग समाविष्ट होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतात भाषिक राज्यांची मागणी वाढत होती आणि १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायदा मंजूर करण्यात आला, ज्याने भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती केली. या कायद्यानुसार मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये विभाजन करण्यात आले.</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी लोकांना मुंबई हवी होती कारण तिथे त्यांची भाषा बोलणारे बरेच लोक होते, तर गुजरातींना असे वाटत होते की मुंबई त्यांच्यामुळेच आहे. अखेर मुंबई (आता मुंबई) महाराष्ट्राची राजधानी बनली.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?</p>
<p>
	दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिन साजरा केला जातो. १९६० मध्ये आजच्याच दिवशी महाराष्ट्र मुंबई राज्यापासून वेगळे झाले आणि त्याचे स्वतंत्र राज्य बनले.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-2025-wishes-in-marathi-125042900023_1.html" target="_blank">Maharashtra Day 2025 Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>महाराष्ट्र दिनाचे महत्त्व काय आहे?</strong></p>
<p>
	भाषिक अस्मितेवर आधारित वेगळ्या राज्यासाठी दीर्घ संघर्षानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याचे महाराष्ट्र दिनाचे प्रतीक आहे.</p>
<p>
	हा उत्सव महाराष्ट्रीय लोकांच्या वारसा, परंपरा, भाषा आणि राज्य घडवण्यात त्यांच्या पूर्वजांच्या योगदानाबद्दलचा अभिमान प्रतिबिंबित करतो.</p>
<p>
	महाराष्ट्र हा विविध संस्कृती, धर्म आणि समुदायांचे मिश्रण आहे.</p>
<p>
	छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या समाजसुधारकांनी आणि तुकाराम आणि साने गुरुजींसारख्या साहित्यिकांनी भरलेला समृद्ध इतिहास महाराष्ट्राला लाभला आहे.</p>
<p>
	महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर तो राज्यासमोरील आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम करतो.</p>
<p>
	भारताच्या इतिहास, राजकारण आणि संस्कृतीला आकार देण्यात या राज्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिनेमा, संगीत, साहित्य आणि विज्ञान यासारख्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाने संपूर्ण देश समृद्ध झाला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?</strong></p>
<p>
	महाराष्ट्र स्थापना दिन हा एक खास दिवस आहे जिथे लोक महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा साजरे करण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या दिवशी, राज्यभर नेत्यांची भाषणे आणि उत्सव होतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्र दिनाशी संबंधित तथ्ये</strong></p>
<p>
	महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे.</p>
<p>
	दरवर्षी १ मे रोजी येणारा महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी आहे.</p>
<p>
	महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला &#39;स्वप्नांचे शहर&#39; असेही म्हणतात.</p>
<p>
	महाराष्ट्र ही भारताची आर्थिक आणि मनोरंजन राजधानी आहे.</p>
<p>
	हे राज्य त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते, ज्यामध्ये प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ले समाविष्ट आहेत.</p>
<p>
	महाराष्ट्र राज्य कृषी, उद्योग आणि तंत्रज्ञानात आघाडीवर आहे.</p>
<p>
	येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या गेटवे ऑफ इंडिया, एलिफंटा लेणी आणि अजिंठा-वेरूळ लेणी यासारख्या प्रतिष्ठित खुणा आहेत.</p>
<p>
	१ मे २०११ रोजी राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला.</p>
<p>
	दरवर्षी महाराष्ट्र दिनी एक परेड आयोजित केली जाते आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भाषण देतात.</p>
<p>
	महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्राकडून विविध नवीन प्रकल्प आणि योजना सुरू केल्या जातात.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 01 May 2025 04:15:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 30 Apr 2025 15:20:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र दिन: इतिहास आणि संस्कृती आणि समाजिक चेतनेचा संदेश देणारे 10 मराठी चित्रपट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/top-10-marathi-movie-shows-maharashtra-history-culture-and-social-responsibility-125043000023_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/top-10-marathi-movie-shows-maharashtra-history-culture-and-social-responsibility-125043000023_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/30/thumb/1_1/1745998178-0618.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/30/thumb/1_1/1745998178-0618.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्राच्या अभिमान, संस्कृती, इतिहास आणि सामाजिक चेतनेचा वास्तव आणि प्रभावी संदेश देणारे अनेक मराठी चित्रपट आहेत. खाली 10 निवडक चित्रपटांची यादी दिली आहे, जे महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचा, सामाजिक भानाचा आणि संस्कृतीचा गौरव करतात:]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="570" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/30/full/1745998178-0618.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="watching programme" width="740" /></p>
	</p>
	महाराष्ट्राच्या अभिमान, संस्कृती, इतिहास आणि सामाजिक चेतनेचा वास्तव आणि प्रभावी संदेश देणारे अनेक मराठी चित्रपट आहेत. खाली 10 निवडक चित्रपटांची यादी दिली आहे, जे महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचा, सामाजिक भानाचा आणि संस्कृतीचा गौरव करतात:</p>
<p>
	 </p>
<p>
	1. हरिश्चंद्राची फॅक्टरी (2009)</p>
<p>
	दिग्दर्शक: पाआ रंजन</p>
<p>
	भारतातील पहिला चित्रपट "राजा हरिश्चंद्र" बनवणाऱ्या दादासाहेब फाळके यांचा संघर्षमय प्रवास.</p>
<p>
	मराठी माणसाने भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेले योगदान याचा अभिमान निर्माण करणारा.</p>
<p>
	 </p>
<p>
	2. शिवराज्याभिषेक (2024)</p>
<p>
	दिग्दर्शक: डॉ. चंद्रकांत गवळी</p>
<p>
	छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेकाचा प्रसंग आणि त्यामागील राजकीय, सामाजिक अर्थ.</p>
<p>
	महाराष्ट्राच्या इतिहासाचा सन्मान करणारा, नव्या पिढीला प्रेरणा देणारा.</p>
<p>
	 </p>
<p>
	3. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009)</p>
<p>
	दिग्दर्शक: संतोष मांजरेकर</p>
<p>
	एका सामान्य माणसाच्या आत्ममंथनाची कथा, जिथे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्याला मार्गदर्शन करतात.</p>
<p>
	"स्वत्व, आत्मभान आणि मराठी अस्मिता" यांचे जागरण करणारा सशक्त चित्रपट.</p>
<p>
	 </p>
<p>
	4. सैराट (2016)</p>
<p>
	दिग्दर्शक: नागराज मंजुळे</p>
<p>
	प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर जातीय विषमता, ग्रामीण समाजरचना, आणि मराठी ग्रामीण जीवनशैलीचे वास्तव.</p>
<p>
	महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा आणि सामाजिक वास्तवाचा जिवंत आलेख.</p>
<p>
	 </p>
<p>
	5. टिळक (2022)</p>
<p>
	दिग्दर्शक: चंद्रकांत गवळी</p>
<p>
	लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित, स्वातंत्र्यलढा, पत्रकारिता आणि शिक्षणाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन.</p>
<p>
	महाराष्ट्राच्या इतिहासातील एका विचारवंत क्रांतिकारकाचा सखोल परिचय देणारा.</p>
<p>
	 </p>
<p>
	6. शेर शिवराज (2022)</p>
<p>
	दिग्दर्शक: दिग्पाल लांजेकर</p>
<p>
	छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक वीर प्रसंग.<br />
	वैशिष्ट्य: इतिहास, पराक्रम, स्वाभिमान यांचे प्रभावी चित्रण.</p>
<p>
	 </p>
<p>
	7. फँड्री (2013)</p>
<p>
	दिग्दर्शक: नागराज मंजुळे</p>
<p>
	जातीव्यवस्था, सामाजिक विषमता आणि एका मुलाचे स्वप्न.</p>
<p>
	ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक वास्तव.</p>
<p>
	 </p>
<p>
	8. कट्यार काळजात घुसली (2015)</p>
<p>
	दिग्दर्शक: सुभोध भावे</p>
<p>
	संगीत, संस्कृती आणि मानवी मूल्यांची लढाई.</p>
<p>
	शास्त्रीय संगीताचा इतिहास आणि सौंदर्य.</p>
<p>
	 </p>
<p>
	9. तुकाराम (2012)</p>
<p>
	दिग्दर्शक: चंद्रकांत कुलकर्णी</p>
<p>
	संत तुकारामांचे जीवन आणि अध्यात्मिक कार्य.</p>
<p>
	भक्ति परंपरेचा प्रभावी गौरव.</p>
<p>
	 </p>
<p>
	10. देऊळ (2011)</p>
<p>
	दिग्दर्शक: उमेश कुलकर्णी</p>
<p>
	धर्म, राजकारण आणि ग्रामीण समाजातील बदल.</p>
<p>
	आधुनिकतेच्या नावाखाली चालणाऱ्या विकृतीवर मार्मिक भाष्य.</p>
<p>
	 </p>
<p>
	हे सर्व चित्रपट महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती, अस्मिता आणि सामाजिक वास्तव यांची प्रामाणिक मांडणी करतात. ते तरुण पिढीला त्यांच्या मराठी अस्मितेबद्दल अधिक आत्मभान आणि अभिमान देऊ शकतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आ‍धारित आहे. वेबदुनिया द्वारे या माहितीचा दावा केला जात नाही.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 30 Apr 2025 12:53:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 30 Apr 2025 13:00:08 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-song-jai-jai-maharashtra-maja-garja-maharashtra-maja-123042600023_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-song-jai-jai-maharashtra-maja-garja-maharashtra-maja-123042600023_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619872535-3271.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619872535-3271.jpg</image>
      <description><![CDATA[जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/full/1619872535-3271.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="maharashtra divas" width="740" /></p>
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">ज</font><font style="font-size: 11pt;">य </font><font style="font-size: 11pt;">ज</font><font style="font-size: 11pt;">य </font><font style="font-size: 11pt;">महाराष्ट्</font><font style="font-size: 11pt;">र </font><font style="font-size: 11pt;">माझ</font><font style="font-size: 11pt;">ा, </font><font style="font-size: 11pt;">गर्ज</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">महाराष्ट्</font><font style="font-size: 11pt;">र </font><font style="font-size: 11pt;">माझ</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">॥ध</font><font style="font-size: 11pt;">ृ.॥</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">रेव</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">वरद</font><font style="font-size: 11pt;">ा, </font><font style="font-size: 11pt;">कृष्</font><font style="font-size: 11pt;">ण </font><font style="font-size: 11pt;">कोयन</font><font style="font-size: 11pt;">ा, </font><font style="font-size: 11pt;">भद्र</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">गोदावर</font><font style="font-size: 11pt;">ी</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">एकपणाच</font><font style="font-size: 11pt;">े </font><font style="font-size: 11pt;">भरत</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">पाण</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">मातीच्य</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">घागर</font><font style="font-size: 11pt;">ी</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">भीमथडीच्य</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">तट्टांन</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">य</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">यमुनेच</font><font style="font-size: 11pt;">े </font><font style="font-size: 11pt;">पाण</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">पाज</font><font style="font-size: 11pt;">ा</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">ज</font><font style="font-size: 11pt;">य </font><font style="font-size: 11pt;">ज</font><font style="font-size: 11pt;">य </font><font style="font-size: 11pt;">महाराष्ट्</font><font style="font-size: 11pt;">र </font><font style="font-size: 11pt;">माझ</font><font style="font-size: 11pt;">ा ... </font><font style="font-size: 11pt;">॥1</font><font style="font-size: 11pt;">॥</font><br />
<br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">भीत</font><font style="font-size: 11pt;">ी न </font><font style="font-size: 11pt;">आम्ह</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">तुझ</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">मुळ</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">ह</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">गडगडणार्‍य</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">नभ</font><font style="font-size: 11pt;">ा</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">अस्मानाच्य</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">सुलतानील</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">जवा</font><font style="font-size: 11pt;">ब </font><font style="font-size: 11pt;">देत</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">जीभ</font><font style="font-size: 11pt;">ा</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">सह्याद्रीच</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">सिं</font><font style="font-size: 11pt;">ह </font><font style="font-size: 11pt;">गर्जत</font><font style="font-size: 11pt;">ो, </font><font style="font-size: 11pt;">शिवशंभ</font><font style="font-size: 11pt;">ू </font><font style="font-size: 11pt;">राज</font><font style="font-size: 11pt;">ा</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">दरीदरीतू</font><font style="font-size: 11pt;">न </font><font style="font-size: 11pt;">ना</font><font style="font-size: 11pt;">द </font><font style="font-size: 11pt;">गुंजल</font><font style="font-size: 11pt;">ा, </font><font style="font-size: 11pt;">महाराष्ट्</font><font style="font-size: 11pt;">र </font><font style="font-size: 11pt;">माझ</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">॥2</font><font style="font-size: 11pt;">॥</font><br />
<br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">काळ्य</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">छातीवर</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">कोरल</font><font style="font-size: 11pt;">ी, </font><font style="font-size: 11pt;">अभिमानाच</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">लेण</font><font style="font-size: 11pt;">ी</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">पोलाद</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">मनगट</font><font style="font-size: 11pt;">े </font><font style="font-size: 11pt;">खेळत</font><font style="font-size: 11pt;">ी, </font><font style="font-size: 11pt;">खे</font><font style="font-size: 11pt;">ळ </font><font style="font-size: 11pt;">जीवघेण</font><font style="font-size: 11pt;">ी</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">दारिद्र्याच्य</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">उन्हा</font><font style="font-size: 11pt;">त </font><font style="font-size: 11pt;">शिजल</font><font style="font-size: 11pt;">ा</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">निढ़ळाच्य</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">घामान</font><font style="font-size: 11pt;">े </font><font style="font-size: 11pt;">भिजल</font><font style="font-size: 11pt;">ा</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">देशगौरवासाठ</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">झिजल</font><font style="font-size: 11pt;">ा</font><br />
<font style="font-size: 11pt; color: rgb(0, 0, 0);">दिल्लीचेह</font><font style="font-size: 11pt;">ी </font><font style="font-size: 11pt;">तख्</font><font style="font-size: 11pt;">त </font><font style="font-size: 11pt;">राखित</font><font style="font-size: 11pt;">ो, </font><font style="font-size: 11pt;">महाराष्ट्</font><font style="font-size: 11pt;">र </font><font style="font-size: 11pt;">माझ</font><font style="font-size: 11pt;">ा </font><font style="font-size: 11pt;">॥3</font><font style="font-size: 11pt;">॥</font>
<p>
	 </p>
<p>
	कवि - राजा बढे</p>
<p>
	संगीत - श्रीनिवास खळे</p>
<p>
	गायक - शाहीर साबळे</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 01 May 2024 12:26:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 01 May 2024 12:26:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/happy-maharashtra-day-in-marathi-from-modi-124050100020_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/happy-maharashtra-day-in-marathi-from-modi-124050100020_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg</image>
      <description><![CDATA[१ मे महाराष्ट्र दिन : लोकसभा निवडणूक निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. महारष्ट्रातील जनतेला आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="maharashtra din wishes" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/full/1588268464-5785.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Maharashtra diwas wishes" width="740" /></p>
	१ मे महाराष्ट्र दिन : लोकसभा निवडणूक निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. महारष्ट्रातील जनतेला आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	आज १ मे आहे म्हणजे महाराष्ट्र दिवस. आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. महाराष्ट्राला सुंदर निसर्ग, संत, संतांचे अभंग, भारूड, गौळणी, विविध जागृत देवस्थाने यांचे वैभव लाभले आहे. या दिवशी राज्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिवस साजरा केला जातो. आज संयुक्त महाराष्ट्राला ६५ वर्षे पूर्ण होत आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झेंडा वंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. </p>
<p>
	 </p>
<blockquote class="twitter-tweet">
	<p dir="ltr" lang="mr">
		महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे.…</p>
	— Narendra Modi (@narendramodi) <a href="https://twitter.com/narendramodi/status/1785507477104271444?ref_src=twsrc%5Etfw">May 1, 2024</a></blockquote>
<script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
<p>
	पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रगती, परंपरा, एकता या उत्तुंग दिपस्थंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा. </p>
<p>
	 </p>
<p>
	एप्रिल महिन्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निडणुकीसाठी महाराष्ट्रात होते. तसेच महाराष्ट्रात नागरिकंना त्यांनी आवाहन केले की, भाजप आणि आमच्या मित्रपक्षाला भरपूर मतांनी विजयी करा.  <br />
	<br />
	Edited By- Dhanashri Naik  </p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 01 May 2024 11:48:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 01 May 2024 11:58:13 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-quotes-in-marathi-122042900031_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-quotes-in-marathi-122042900031_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619857581-9226.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619857581-9226.jpg</image>
      <description><![CDATA[भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा 

बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…

शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती…

जन्मलो ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Maharashtra Song" class="imgCont" height="297" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/full/1619857581-9226.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="maharashtra geet" width="600" /></p>
	भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा </p>
<p>
	 </p>
<p>
	बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…</p>
<p>
	 </p>
<p>
	शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती…</p>
<p>
	 </p>
<p>
	जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. </p>
<p>
	 </p>
<p>
	लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…</p>
<p>
	 </p>
<p>
	जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…</p>
<p>
	 </p>
<p>
	मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा…. </p>
<p>
	 </p>
<p>
	कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. </p>
<p>
	 </p>
<p>
	मराठा तितुका  मेळवावा… महाराष्ट्र अखंड राखावा…. </p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद… महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास… </p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त, त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त</p>
<p>
	 </p>
<p>
	मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा माझा आहे महाराष्ट्र माझा</p>
<p>
	 </p>
<p>
	भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा</p>
<p>
	अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा</p>
<p>
	सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा</p>
<p>
	दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा </p>
<p>
	 </p>
<p>
	दगड होईन तर सह्याद्रीचा होईन</p>
<p>
	माती झालो तर महाराष्ट्राची होईन</p>
<p>
	तलवार झालो तर आई भवानीची होईन</p>
<p>
	जय भवानी जय शिवाजी</p>
<p>
	 </p>
<p>
	पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन</p>
<p>
	आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन</p>
<p>
	 </p>
<p>
	धन्य आहे ही महाराष्ट्राची माती</p>
<p>
	कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 01 May 2024 07:50:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 01 May 2024 07:58:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Day Wishes In Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-wishes-in-marathi-124042900041_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-wishes-in-marathi-124042900041_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-05/01/thumb/1_1/1588312315-4187.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-05/01/thumb/1_1/1588312315-4187.jpg</image>
      <description><![CDATA[मंगल देशा... 
पवित्र देशा... 
महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा 
हा महाराष्ट्र देशा.... 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="maharashtra din" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-05/01/full/1588312315-4187.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	मंगल देशा... </p>
<p>
	पवित्र देशा... </p>
<p>
	महाराष्ट्र देशा...</p>
<p>
	प्रणाम घ्यावा माझा </p>
<p>
	हा महाराष्ट्र देशा.... </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	कपाळी केशरी टिळा लावितो... </p>
<p>
	महाराष्ट्र देशा तुला वंदितो.... </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा </p>
<p>
	 </p>
<p>
	दगड होईन तर सह्याद्रीचा होईन</p>
<p>
	माती झालो तर महाराष्ट्राची होईन</p>
<p>
	तलवार झालो तर आई भवानीची होईन</p>
<p>
	जय भवानी जय शिवाजी</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	धन्य आहे ही महाराष्ट्राची माती</p>
<p>
	कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... </p>
<p>
	गुणगुणलो जे गीत गीत मराठी.... </p>
<p>
	मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	धन्य आहे ही महाराष्ट्राची माती</p>
<p>
	कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... </p>
<p>
	मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक</p>
<p>
	नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा... </p>
<p>
	जय जय महाराष्ट्र माझा... </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	जय जय महाराष्ट्र माझा... </p>
<p>
	गर्जा महाराष्ट्र माझा...</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..<br />
	दरीदरीतून नाद गुंजला,<br />
	महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा…<br />
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्रदिन चिरायु होवो </p>
<p>
	महाराष्ट्रदिनाच्या सर्व महाराष्ट्र वासीयांना<br />
	मनापासुन महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 01 May 2024 07:26:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 01 May 2024 07:55:28 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जय महाराष्ट्र!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-special-information-110042900022_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-special-information-110042900022_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619857581-9226.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619857581-9226.jpg</image>
      <description><![CDATA[संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्‍ट्र राज्याची निर्मिती झाली. या चळवळीत पत्रकार, राजकारणी, लेखक आणि विचारवंत यांनी सहभाग....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Maharashtra Song" class="imgCont" height="297" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/full/1619857581-9226.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="maharashtra geet" width="600" /></p>
	<span style="font-size:16px;">संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्‍ट्र राज्याची निर्मिती झाली. या चळवळीत पत्रकार, राजकारणी, लेखक आणि विचारवंत यांनी सहभाग घेतला होता. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 जणांनी आपले बलिदान दिले.</span><br />
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">संयुक्त महाराष्‍ट्र स्थापनेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे या दिवसाला &#39;सोन्याचा दिवस&#39; असे संबोधले होते. संयुक्त महाराष्‍ट्र राज्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलले होते, की &#39;महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे आपल्याला भरभराटीचे आणि सुखाचे दिवस आले असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हा महाराष्‍ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेमागील मुख्य धोरण आहे, हे सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावे.`</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">1 मे 1960 हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस! या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मं‍त्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता, अशा विचाराला यत्किंचितही थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्‍ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो. असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">‘माझा महाराष्ट्र हा मला प्राणापेक्षा प्रिय असल्याचे कवीवर्य श्री. कृ. कोल्हटकर यांनी म्हटले होते. तसेच कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितेत म्हणतात की, &#39;&#39;माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा, तिच्यासंगे जागतील मायदेशातील शिळा&#39;&#39;. महाराष्‍ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मुंबईसह संयुक्त महाराष्‍ट्राची मागणी करणार्‍या आंदोलकांवर तत्कालीन मोरारजी देसाई सरकारच्या पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्याच एकूण 106 जणांनी हौतात्म्य पत्करले. त्यांनंतर मराठी भाषिक प्रदेश एकसंध करून संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी व्यासपीठ असावे, यासाठी संयुक्त महाराष्‍ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादी‍अनेक महत्त्वांच्या व्यक्तींनी संयुक्त महाराष्ट्र निर्मीतीसाठी मोलाचे योगदान दिले. या महान व्यक्तींचे आम्ही सदैव ऋणी राहू!!!</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">महाराष्ट्र चिरायू होवो! जय महाराष्‍ट्र! </span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 27 Apr 2024 12:19:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 27 Apr 2024 12:19:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/importance-of-maharashtra-day-121043000016_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/importance-of-maharashtra-day-121043000016_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="maharashtra din wishes" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2020-04/30/full/1588268464-5785.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Maharashtra diwas wishes" width="740" /></p>
	महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व...</p>
<p>
	स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देणं नाकारलं होतं. आपली मुंबई हिसकावून घेण्याची चिड मराठी माणसांमध्ये धुमसत होती. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमला. प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत होता. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. तरी पोलिसांना हा मोर्चा आवरेना. पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. </p>
<p>
	 </p>
<p>
	या बलिदानापुढे नमते घेत अखेर सरकारने १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. हुतात्म्यांच्या बलिदानार्थ १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची निर्मिती करण्यात आली.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 27 Apr 2024 12:01:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 27 Apr 2024 12:01:47 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashatra Day आधारस्तंभ आम्हीच, हे काम अभिमानाचे!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-day-2023-123050100022_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-day-2023-123050100022_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/20/thumb/1_1/1682014815-1132.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/20/thumb/1_1/1682014815-1132.jpg</image>
      <description><![CDATA[दिसभर घाम गाळून, मिळते मज भाकर,
विटा मातीने घर बांधून देतो, मी चाकर,
 वर असते आभाळ माझ्या छताला ,
अन धोंडा नेहमीच असतो मम उष्याला,
पर मिळे शांती, दिवसभर मज राबूनी,]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="480" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2023-04/20/full/1682014815-1132.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	दिसभर घाम गाळून, मिळते मज भाकर,</p>
<p style="text-align: center;">
	विटा मातीने घर बांधून देतो, मी चाकर,</p>
<p style="text-align: center;">
	वर असते आभाळ माझ्या छताला ,</p>
<p style="text-align: center;">
	अन धोंडा नेहमीच असतो मम उष्याला,</p>
<p style="text-align: center;">
	पर मिळे शांती, दिवसभर मज राबूनी,</p>
<p style="text-align: center;">
	चिंता न कसली, न काळजी मना लागूंनी,</p>
<p style="text-align: center;">
	आमच्या वीण काम अधुरे साऱ्यांचे,</p>
<p style="text-align: center;">
	आधारस्तंभ आम्हीच, हे काम अभिमानाचे!</p>
<p style="text-align: center;">
	जादूची कांडी च जणू आमचे हाती  असते,</p>
<p style="text-align: center;">
	स्वप्न लोकांचे पूर्ण करणे, हेच आमचे ध्येय असते.</p>
<p style="text-align: center;">
	...अश्विनी थत्ते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 01 May 2023 13:14:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 01 May 2023 13:22:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashatra Day 2023 समुद्रात ढोल ताशाचं वादन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-day-2023-drumming-in-the-sea-123050100021_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-day-2023-drumming-in-the-sea-123050100021_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/01/thumb/1_1/1682926489-7917.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/01/thumb/1_1/1682926489-7917.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रासाठी 1  मे हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. या दिवसाला जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जगभरात हा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="maharashatra din" class="imgCont" height="350" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/01/full/1682926489-7917.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="650" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:650px;">
			social media</p>
	</p>
	महाराष्ट्रासाठी 1 मे हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. या दिवसाला जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जगभरात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. </p>
<p>
	 </p>
<p>
	सातासमुद्रपार असलेल्या मराठी माणूसदेखील वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करतो. आखाती देशातील पहिले आणि एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक त्रिविक्रम ढोल ताशा यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्यांनी चक्क एक लक्झरी योटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल &#39;बुर्ज अल अरब&#39; याच्यासमोर पाण्यात ढोल ताशाचं वादन केलं. पथकाचे संस्थापक सागर पाटील यांच्या डोक्यातून ही आगळी वेगळी संकल्पना समोर आली.</p>
<p>
	 </p>
<p>
	या उपक्रमात पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यात महिलांचाही समावेश होता. ही योट दुबई मरीनामधून वादकांना घेऊन निघाली आणि वाटेत  Dubai Eye Giant Wheel समोरून वादन करीत बुर्ज अल अरब या हॉटेलच्या समोर थांबली. या ठिकाणी ढोल ताशाचे वादन करून या पथकाने परतीचा प्रवास केला. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 01 May 2023 12:59:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 01 May 2023 13:05:25 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Day  महाराष्ट्र दिन: इतिहास, महत्त्व आणि निर्मिती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-2023-maharashtra-foundation-day-importance-and-its-history-123050100018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-2023-maharashtra-foundation-day-importance-and-its-history-123050100018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/01/thumb/1_1/1682923907-0847.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/01/thumb/1_1/1682923907-0847.jpg</image>
      <description><![CDATA[1956च्या राज्य पुनर्गठन अधिनियमानुसार अनेक राज्यांची स्थापना करण्यात आली. भाषावर प्रांतरचना करण्यात आली. कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. तर तेलुगू भाषिकांसाठी आंध्रप्रदेश आणि मल्याळम बोलमआऱ्यांसाठी केरळा राज्याची ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="maharashatra day" class="imgCont" height="494" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/01/full/1682923907-0847.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="620" /></p>
	</p>
	1956च्या राज्य पुनर्गठन अधिनियमानुसार अनेक राज्यांची स्थापना करण्यात आली. भाषावर प्रांतरचना करण्यात आली. कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. तर तेलुगू भाषिकांसाठी आंध्रप्रदेश आणि मल्याळम बोलमआऱ्यांसाठी केरळा राज्याची स्थापना करण्यात आली. तामिळ बोलणाऱ्यांसाठी तामिळनाडूची निर्मिती झाली. पण त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यांसाठी वेगळं राज्य निर्माण करण्यात आलं नाही. गुजरात आणि महाराष्ट्र हा मुंबई प्रांताचाच एक भाग होता.</p>
<p>
	मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरू होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 105 जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मा झाले. त्यानंतर केंद्र सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबई प्रांताला बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्याच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरही आंदोलन सुरू झाले.</p>
<p>
	काय होता निकष?</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="maharashatra din" class="imgCont" height="503" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/01/full/1682923982-0151.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="670" /></p>
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:670px;">
			R S</p>
	</p>
</p>
<p>
	मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत. भाषावार प्रांतरचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, असा आग्रह मराठी भाषकांनी धरला. तर मुंबईची जडणघडण आमच्यामुळेच झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषकांनी केली होती. पण मराठी भाषकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.</p>
<p>
	1 मे हा महाराष्ट्र दिन (महाराष्ट्र दिवस) म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबई पुनर्रचना कायदा लागू झाला. हा कायदा वैयक्तिक राज्याच्या निर्मितीची मागणी करणाऱ्या अनेक निषेध आणि चळवळींमुळे झाला. स्वतंत्र राज्याची मागणी सर्वप्रथम संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने केली. या लेखात आपण महाराष्ट्र दिनाचा इतिहास आणि महत्त्व अभ्यासू.<br />
	 </p>
<p>
	महाराष्ट्र दिन</p>
<p>
	महाराष्ट्र दिन, सामान्यतः &#39;महाराष्ट्र दिवस&#39; म्हणून ओळखला जातो, हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक राज्य सुट्टी आहे, जो 1 मे 1960 रोजी मुंबईच्या फाळणीपासून महाराष्ट्राच्या निर्मितीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड, राजकीय भाषणे आणि समारंभ आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा साजरे करणार्‍या इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी प्रसंगी संबंधित असतो. मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा आनंदोत्सव साजरा केला जातो.</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाचा इतिहास</p>
<p>
	बॉम्बे (मुंबई) राज्याचे 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यात आले. राज्य पुनर्रचना कायदा, 1956 अंतर्गत, राज्याच्या सीमा परिभाषित केल्या गेल्या.</p>
<p>
	मराठी, गुजराती आणि कोकणी भाषिकांमध्ये मोठी तफावत असल्याने मुख्य मुद्दा भाषिक होता.</p>
<p>
	मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी 1940 मध्ये सुरू झाली आणि राज्य चळवळीसाठी आजच्या मुंबईत संयुक्त महासभा स्थापन करण्यात आली.</p>
<p>
	तथापि, भारत छोडो आंदोलन आणि दुसरे महायुद्ध यांनी संघर्ष मागे ढकलला.</p>
<p>
	वेगळ्या राज्याची बाजू मांडण्यासाठी अनेक आयोगांना दोन दशकांहून अधिक काळ लागला. 1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी 5 वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. नंतर   लोकसभेने द्विभाषिक बॉम्बे (मुंबई) राज्याचा ठराव मंजूर केला. मार्च 1960 मध्ये लोकसभेने राज्याचा ठराव मंजूर केला.</p>
<p>
	एका महिन्यानंतर कनिष्ठ सभागृहाने मुंबई राज्याचा ठराव मंजूर केला. 1 मे 1960 रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="maharashatra din" class="imgCont" height="367" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/01/full/1682924041-3797.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:653px;">
			R S</p>
	</p>
</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाचे महत्त्व</p>
<p>
	भाषणांपासून ते रंगीत परेडपर्यंत, महाराष्ट्र हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील बहुतांश शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये या दिवशी बंद असतात.</p>
<p>
	महाराष्ट्र दिन शिवाजी पार्क, दादर येथे परेडद्वारे साजरा केला जातो, जेथे महाराष्ट्राचे राज्यपाल भाषण करतात.</p>
<p>
	राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्र या दिवशी नवीन प्रकल्प आणि योजनांचा शुभारंभ करतात.</p>
<p>
	महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात भारतीयांना दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.<br />
	<p>
		 </p>
	<p>
		Edited by : Ratnadeep Ranshoor</p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 01 May 2023 12:17:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 01 May 2023 12:26:34 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रातील प्रभावशाली व्यक्ती Famous Personalities of Maharashtra]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/famous-personalities-of-maharashtra-122043000037_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/famous-personalities-of-maharashtra-122043000037_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-02/19/thumb/1_1/1645246330-6572.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-02/19/thumb/1_1/1645246330-6572.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र ही स्वराज्याचे संस्थापक आणि आदर्श राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी होती, जिथे त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत एक आदर्श आणि लोकाभिमुख राज्य स्थापन केले आणि सर्वसामान्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="shivaji maharaj" class="imgCont" height="600" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-02/19/full/1645246330-6572.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="shivaji maharaj" width="637" /></p>
	<strong>शिवाजी महाराज</strong></p>
<p>
	महाराष्ट्र ही स्वराज्याचे संस्थापक आणि आदर्श राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी होती, जिथे त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत एक आदर्श आणि लोकाभिमुख राज्य स्थापन केले आणि सर्वसामान्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले आजही आपल्याला त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देतात आणि त्यांच्या अफाट योगदानापुढे नतमस्तक होण्याची इच्छा जागृत करतात. त्यांच्या प्रमुख किल्ल्यांमध्ये सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी, रायगड इत्यादींचा समावेश आहे, जे आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>ज्योतिराव फुले-<span style="white-space: pre;"> </span>सावित्रीबाई फुले</strong></p>
<p>
	ज्योतिराव फुले यांच्या नावाचा समावेश महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारकांमध्ये होतो, ज्यांनी समाजातून जातिव्यवस्था आणि स्त्री शिक्षणावरील बंधने नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही मिळाले. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचेही मोलाचे योगदान लाभले, त्यात या दाम्पत्याने आयुष्यभर कामगार, शेतकरी, शोषित, जातिव्यवस्थेने ग्रासलेल्या लोकांच्या न्याय्य हक्कासाठी काम केले. त्यापुढे देश व राज्य नतमस्तक झाले. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>राजर्षी शाहू महाराज</strong></p>
<p>
	कोल्हापूर संस्थानाचे राजे, शिक्षणप्रेमी आणि जातिव्यवस्थेचे कडवे विरोधक अशी शाहू महाराजांची देशाच्या इतिहासात ओळख आहे. महाराजांनी संस्थानांतर्गत अत्याचारित वर्गातील मुलांना शिक्षण व निवासस्थान दिले. परदेशात हुशार मुलांसोबत. वाचायला आणि लिहायला पाठवले. महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते, ज्यांनी आपल्या प्रजेचे सुनेचे पालन केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>लोकमान्य टिळक</strong></p>
<p>
	कोकणात जन्मलेले लोकमान्य टिळक हे एक विपुल वक्ते आणि नेते होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना अनेक जन मोहिमेद्वारे कडवा सूड दिला, ज्यामध्ये त्यांची पूर्ण स्वराज्याची मागणी, राष्ट्रीय शिक्षण अभियान, सार्वजनिक गणेश आणि शिवजयंती उत्सवासारखे कार्यक्रम होते. अस्मिता जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यापूर्वी 1920 पर्यंत लोकमान्य टिळकांनी देश आणि राज्यातील अनेक मोठ्या जनआंदोलनांचे नेतृत्व केले, ज्यामध्ये त्यांनी चापेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींसह अनेक क्रांतिकारकांना देशहितासाठी संघटित केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>डॉ. बाबासाहेब आंबेडकर</strong></p>
<p>
	भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे मुख्य कार्यस्थान महाराष्ट्रात राहिले, जिथे त्यांनी समाजातून अस्पृश्य भेदभाव नष्ट करण्यासाठी संघर्ष केला, त्यात त्यांनी महाड, नाशिक, पुणे, मुदखेड इत्यादी ठिकाणी काही जनआंदोलनांना यशस्वी रूप दिले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावणारे आंबेडकर हे जगातील मोजक्या विद्वानांपैकी एक होते, ज्यांच्या पवित्र स्मृतींना देश आणि जगाकडून सदैव विनम्र अभिवादन केले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>दादासाहेब फाळके</strong></p>
<p>
	भारतीय चित्रपटसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांचे नाव अत्यंत आदराने आणि अभिमानाने घेतले जाते, ज्यांनी सर्वप्रथम राजा हरिश्चंद्र नावाचा चित्रपट बनवला, जो तत्कालीन व्यवस्था आणि तांत्रिक पाठबळाच्या दृष्टीने अतिशय चांगला ठरला. यानंतर भारतात चित्रपट निर्मितीत सुधारणा सुरू झाल्या आणि चित्रपट निर्मिती हे व्यावसायिक क्षेत्र बनले, ज्यामध्ये आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती झाली. तत्कालीन भारताची परिस्थिती आणि सामाजिक वातावरण पाहिल्यास दादासाहेबांनी घेतलेला चित्रपट बनवण्याचा निर्णय हा एक धाडसी पाऊल असल्याचे दिसून येते, त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकाचे नाव त्यांच्यासाठी ऐकायला मिळते. एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांची निर्मिती करून एक प्रेरणादायी उदाहरण देशासमोर आणि जगासमोर मांडणाऱ्या दादासाहेबांचाही मूळ महाराष्ट्राच्या भूमीत जन्म झाला, अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>लता मंगेशकर</strong></p>
<p>
	संगीत आणि गायनाच्या दुनियेत कोयलच्या नावाने जगभर प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर या महाराष्ट्र राज्यातील आहेत, ज्यामध्ये त्यांचा संगीताचा जवळपास संपूर्ण प्रवास महाराष्ट्र राज्यात झाला आहे. त्यांनी शेकडोहून अधिक वेगवेगळ्या भाषांमधील गाणी गायली आहेत, ज्यात त्यांच्या मधुर मधुर आवाजाने जगभरातील श्रोत्यांना भावूक केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>सचिन तेंडुलकर</strong></p>
<p>
	सचिन तेंडुलकर, जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आणि एक मजबूत फलंदाज, मूळचा महाराष्ट्र राज्याचा आहे, ज्यांच्या नावाने क्रिकेट जगतात अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याला क्रिकेटचा देव देखील म्हटले जाते, ज्यांच्या उपस्थितीत भारताने अनेक कठीण सामने जिंकले आहेत, सचिन तेंडुलकरला भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्कारही मिळाला आहे, यासोबतच त्याच्याकडे अनेक वर्षे राज्यसभेचे सदस्यत्वही होते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 01 May 2023 10:20:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 01 May 2023 10:34:22 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र स्थापना दिवस कधी आहे आणि त्याचा इतिहास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-foundation-day-and-its-history-122043000040_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-foundation-day-and-its-history-122043000040_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg</image>
      <description><![CDATA[भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्ये सारखीच होती. पण हळूहळू ही राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतातील अनेक नवीन राज्ये निर्माण झाली. सध्या आपल्या देशात 29 ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="maharashtra din wishes" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/full/1588268464-5785.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Maharashtra diwas wishes" width="740" /></p>
	भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्ये सारखीच होती. पण हळूहळू ही राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतातील अनेक नवीन राज्ये निर्माण झाली. सध्या आपल्या देशात 29 राज्ये आहेत, ज्यांच्या स्वतःच्या भाषा आणि वेशभूषा आहेत. त्याच वेळी, भारतातील जवळजवळ सर्व राज्ये देखील दरवर्षी त्यांच्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याच प्रकारे, महाराष्ट्रात, दरवर्षी मे महिन्यात स्थापना दिवस साजरा केला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो Maharashtra Day Date</strong></p>
<p>
	दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करतात. या दिवशी 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. या दिवशी राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्र हे वेगळे राज्य कसे झाले? Hiostory of Maharashtra</strong></p>
<p>
	भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतांश प्रांतीय राज्ये बॉम्बे प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी या भाषेच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषेतील लोकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. त्याचवेळी मराठी भाषा बोलणारे लोक स्वत:साठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करत होते. या दरम्यान देशात अनेक आंदोलनेही झाली आणि या चळवळींचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा, 1960 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे पूर्वी एकच राज्य म्हणून ओळखले जात होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	वास्तविक अनेक राज्ये "राज्य पुनर्रचना कायदा" 1956 अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यानंतर या लोकांनी स्वत:साठी स्वतंत्र राज्याची मागणी करत अनेक आंदोलने सुरू केली.</p>
<p>
	<br />
	1960 मध्ये जिथे एका बाजूला गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी चळवळ सुरू झाली. त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या मागणीसह संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. 1 मे 1960 रोजी भारताच्या विद्यमान सरकारने बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन केले. मराठी भाषिक लोकसंख्येसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि गुजराती भाषिक लोकसंख्येसाठी गुजरात राज्याची निर्मिती झाली. पण त्याच दरम्यान या दोन राज्यांमध्ये बॉम्बेवरून भांडण सुरू झाले, जे मुंबई खूप चांगले प्रेक्षणीय ठिकाण आहे. जिथे महाराष्ट्र राज्यातील लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग हवा होता, कारण तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते. त्याचवेळी मुंबईच्या प्रगतीत आपला जास्त हात असल्याचे गुजराती लोक म्हणाले. त्यामुळे तो त्यांच्या राज्याचा भाग असावा. पण शेवटी बॉम्बे महाराष्ट्राचा भाग बनला.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याच वेळी, जेव्हा भारत सरकारने गोवा राज्य पोर्तुगीजांपासून स्वतंत्र केले तेव्हा महाराष्ट्र राज्याला आपल्या राज्याचा एक भाग बनवायचा होता. परंतु गोव्यातील जनतेने स्वत:साठी स्वतंत्र राज्याची मागणी केली आणि त्यामुळे गोवा महाराष्ट्र राज्यात सामील होऊ शकला नाही. गोव्यातही खूप चांगली आणि सुंदर ठिकाणे आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो Maharashtra Day celebration</strong></p>
<p>
	महाराष्ट्र दिनाचा दिवस विशेष व्हावा यासाठी राज्य शासनातर्फे येथे अनेक प्रकारचे सोहळे आयोजित केले जातात. हा दिवस खास बनवण्यासाठी राज्य सरकार अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करते, ज्यामध्ये मराठी संस्कृतीची झलक पाहायला मिळते. याशिवाय राज्य सरकारतर्फे या दिवशी परेडही काढण्यात येते. दरवर्षी ही परेड शिवाजी पार्कमध्ये आयोजित केली जाते. एवढेच नाही तर शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी या दिवशी राज्यपालांचे भाषणही केले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याचवेळी या राज्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी योगदान दिले त्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री &#39;हुतात्मा चौक&#39;ला भेट देतात. वास्तविक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या आंदोलनात शहीद झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा चौक बांधण्यात आला आहे. याशिवाय या दिवशी राज्यात मद्यविक्री होत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>शाळांमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात</strong></p>
<p>
	शालेय विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व कळावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर मुले या दिवशी अनेक प्रकारचे नृत्य आणि गाणी सादर करतात. त्याचबरोबर राज्यातील शाळांव्यतिरिक्त महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्येही अनेक प्रकारचे उत्सव आयोजित केले जातात. मात्र या दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. म्हणूनच हे सर्व कार्यक्रम एक दिवस अगोदर केले जातात.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्र राज्याबद्दल मनोरंजक माहिती Interesting Facts About Maharashtra</strong></p>
<p>
	<strong>देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य</strong></p>
<p>
	महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्र 307,713 किमी इतके पसरले आहे. भारतातील राज्यांमधील क्षेत्रफळाच्या आधारावर हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यापूर्वी राजस्थान आणि मध्य प्रदेश ही क्षेत्रफळाच्या आधारावर भारतातील सर्वात मोठी राज्ये आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्र राज्याच्या शेजारची राज्ये</strong></p>
<p>
	महाराष्ट्र राज्याचा दक्षिण भाग कर्नाटक राज्याला लागून आहे. त्याच वेळी या राज्याचा आग्नेय भाग आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याच्या सीमेला लागून आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील भाग मध्य प्रदेश राज्याला जोडलेला आहे आणि राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>महाराष्ट्र विधानसभा</strong></p>
<p>
	भारताच्या राजकारणात या राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. या राज्यात विधानसभेच्या एकूण 228 जागा आहेत. त्याच वेळी, लोकसभेच्या 543 जागांपैकी 48 जागा या राज्याच्या आहेत आणि या राज्यात राज्यसभेच्या 19 जागा आहेत.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 01 May 2023 07:10:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 01 May 2023 07:11:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गरमागरम उथळ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/veer-savarkar-literature-on-marathi-language-117032700006_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/veer-savarkar-literature-on-marathi-language-117032700006_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-03/27/thumb/1_1/1490595736-7049.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-03/27/thumb/1_1/1490595736-7049.jpg</image>
      <description><![CDATA[सावरकरांनी दिलेल्या साहित्यरुपी गरमागरम चिवड्याचा तुम्ही आस्वाद घेतला असेलच. जर घेतला नसेल तर अवश्य घ्या. चिवडा जसा खमंग असतो आणि त्याची चव जिभेवर तरळत राहते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="literature" class="imgCont" height="337" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2017-03/27/full/1490595736-7049.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	</p>
	<span style="font-size:16px;">सावरकरांनी दिलेल्या साहित्यरुपी गरमागरम चिवड्याचा तुम्ही आस्वाद घेतला असेलच. जर घेतला नसेल तर अवश्य घ्या. चिवडा जसा खमंग असतो आणि त्याची चव जिभेवर तरळत राहते. सावरकरांनी दिलेल्या गरमागरम चिवड्याची चव आजही माझ्या मनात तरळत आहे. असो. तुम्ही गरमागरम उसळ खालली असेलच. पण आज आपण गरमागरम उथळ विषयी चर्चा करणार आहोत. होय, होय उथळ. आजकाल ही उथळ बाजारात उपलब्ध झाली आहे. ती पूर्वी नव्हती असे नव्हे. पण पूर्वी तिची मार्केटिंग करणारे महाभाग आजच्या मानाने कमी होते.</span><br />
	 </p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">मला अनेकदा बलात्काराने ही उथळ खायला घालण्यात आली होती. पण सर्वशक्तीनिशी मी हा डाव हाणून पाडला. एकदा मी विले पार्लेला एका कार्यक्रमात गेलो होतो. विषय होता "मराठी शाळा". मराठी शाळेसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे एक सदगृहस्थ मराठी शाळेच्या महतीबद्दल सांगत होते. सांगता सांगता त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले "इंग्रजी शाळेतली मुले व्यसनांच्या आहारी जातात". मी त्यांना म्हटले "मराठी शाळेतली मुले व्यसन करत नाही का?" यावर ते म्हणाले, "इंग्रजी माध्यमातील मुलांना विषय समजत नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर त्राण पडतो आणि ते व्यसनाधीन होतात". मी पुन्हा म्हटले, "अहो मग मराठी माध्यमातील मुले व्यसन करतात, तेव्हा त्यांच्या डोक्यावर मराठीचा त्राण असतो का?" यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. ते काहीही अद्वा तदवा बोलू लागले. प्रकरण तिथेच थांबवावे लागले. पण असे उथळ विधान करण्याचे हल्ली टूम निघाले आहे. आपण काय बोलतो? कसे बोलतो? आपला त्या विषयाचा अभ्यास आहे का? आपण संदर्भ तपासले आहेत का? याचा जरा सुद्धा अभ्यास ही मंडळी करत नाही. कोणतेही संशोधन नसताना एकाएकी असे आरोप करणे म्हणजे उथळपणाचा कळस. जसे उथळ विधानं होतात, तसे उथळ समजही होतात बरं का. माझ्या अनेक लेखांमध्ये जे मी लिहिलेच नाही, ते मुद्दे विरोधकांनी काढून दाखवले. तेव्हा मला समजवून सांगावं लागलं आहे की अमूक अमूक शब्द वापरले की त्याचा अर्थ असा असा होतो वगैरे वगैरे. पण समजतील ते उथळवीर कसले? राग आणि द्वेष या दोन वेगळ्या भावना आहेत. हे उथळवीरांना कळत नाही. </span></p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	 </p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">सध्या ही गरमागरम उथळ बर्‍याच ठिकाणी मिळते आणि अनेक बडे बडे लोक ही उथळ बनवतात. भापजचे नेते प्रशांत परिचालक याचं उथळ विधान भलतंच गाजलं होतं. आता त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पण अशा लोकांना हे सुचतंच कसं हा प्रश्न नेहमी मला सतावतो? संजय राऊत साहेबांनी मुंबई निवडणूकीच्या निकाला वेळी आम्ही शाहिस्तेखानाची बोटे छाटली असे विधान केले होते आणि नंतर त्यांचाच पचका झाला. कारण नंतर भाजपला ८२ जागा आणि शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या. राऊत साहेब अशा विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. कॉंग्रेसच्या काळात हे पेटेंट दिगविजय सिंह यांच्याकडे होते. गांधी परिवाराचे युवराज सुद्धा अशा उथळपणात माहीर आहेत. असो. </span><br />
	 </p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">उद्धव ठाकरे यांना निवडणूक निकालानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की भाजपला ८२ जागा मिळाल्या म्हणजे नोटबंदीचा परिणाम झाला नाही का? तेव्हा उद्धवजींसारख्या जबाबदार व्यक्तीने जे उत्तर दिले ते आश्चर्यकारक होते. ते म्हणाले इतर ठिकाणी भाजप जिंकली नाही हा नोटबंदीचाच परिणाम आहे. म्हणजे उद्धवजींना नेमके काय म्हणायचे होते. नोटबंदी झाली नसती तर भाजपला सगळ्या जागा मिळाल्या असत्या? किंवा शिवसेनेला बाकी ठिकाणी जागा मिळाल्या नाहीत, मग हा कसला परिणाम होता? इतके बडे आणि समाजात मान सन्मान प्राप्त झालेले लोक जेव्हा उथळ विधानं करतात तेव्हा या देशाचं काय होणार हा प्रश्न आपल्याला सतावतो. बारा रुपयात जेवण, पाच रुपायात जेवण असली थट्टा काही कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली होती. मी जर चुकत नसेन तर कॉंग्रेस प्रमाणे कुण्या भाजपच्या नेत्यानेही असला पांचटपणा केला होता. नेत्यांच्या उथळ विधानांची यादी जर द्यायला लागलो तर एक स्वतंत्र ग्रंथ बनेल. म्हणून आपण ते टाळूया. कारण या ग्रंथाचं पारायण करण्याचं धाडस माझ्यात तरी नाही. </span></p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	 </p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">मुळात आपण ज्या भाषेत लिहितो, बोलतो त्या भाषेचं एक सौंदर्य असतं. मराठी भाषेत तर अनेक बोली भाषा आहेत. वाक्य रचना करताना त्यात वापरलेल्या शब्दांना फार महत्व असतं. मी सह्याद्रीवर एका एपिसोडीक मालिकेचे काही भाग लिहिले होते. एका प्रसंगासाठी मी संवाद लिहिला, तो असा होता "वाईट का होईना, पण तू विनोद केलास". जो सिनियर नट हा संवाद बोलणार होता, त्याला ते जमतच नव्हतं. तो म्हणायचा, "तू चांगला विनोद केलास". दुर्दैवाने मी सेटवर होतो. मी त्यांना समजावून सांगितलं, "सर, वाईट का होईना, पण तू विनोद केलास. या वाक्यात त्याच्या परिस्थितीची भावना व्यक्त झाली आहे. त्याला अनेक अडचणी आहेत म्हणून त्याने बर्‍याच दिवसात विनोद केला नाही, म्हणजे तो हसत खेळत जीवन जगत नाहीये आणि आता त्याने विनोद केला. म्हणून हे पात्र म्हणतं, वाईट का होईना, पण तू विनोद केलास." पण माझ्या समझवण्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी ते सिनियर, त्यांनी "तू चांगला विनोद केलास" असंच म्हटलं. हा सुद्धा एक प्रकारचा उथळपणाच आहे. प्रत्येक लेखकाचे एक वेगळे कौशल्य असते. स्वा. सावरकर उपहासात्मक लिहिताना त्यांच्या लेखणीला बहार यायची. एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन हा लेख वाचण्यासारखा आहे. "काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे" असे सावरकरांनी लिहिले आहे. या लेखावरुन सावरकरांवर पुष्कळ टिका झाली. तेव्हा ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना &#39;धर्मद्रोही&#39; ठरवलं आणि "त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते" असा ठराव मांडला. सावरकरांशी कुणीही शब्दात जिंकू शकलेलं नाही. सावरकर म्हणजे साक्षात भाषाप्रभू. त्यावर तात्याराव म्हणाले "शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता". त्याकाळी असली बुद्धीवादी विधाने वाचायला आणि ऐकायला मिळायची. पण आजकालच्या राजकारण्यांसाठी बुद्धीवाद अस्पृश्य झाला आहे. तात्याराव सावरकर म्हणजे प्रचंड बुद्धीमत्ता. साक्षात सरस्वती आईनेच त्यांना विद्या दिली असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. अत्रे आणि फडक्यांचा वाद तर आपल्याला माहितच आहे. एकदा अत्रे म्हणाले, "फडकेंचं कोणतंही पुस्तक घ्या आणि असं झटका तर त्यातून श्रूंगार रस बाहेर पडेल". अत्रे म्हणजे कमाल माणूस. आज दुर्दैवानं अशी माणसं आपल्यात नाहीत. </span></p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	 </p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">सावरकरांच्या सहा सोने पाने या पुस्तकात त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. तेव्हा एका वॉट्सअप ग्रूपवर एका ब्रीगेडी प्रेमी मित्राने सावरकरांनी शिवरायांचा अपमान केला असं म्हटलं. मी त्याला पुरावे द्यायला सांगितले. आज जवळ जवळ दोन वर्षे झाली. तो मित्र अजूनही माझ्या संपर्कात आहे. पण माझ्या प्रिय मित्राने अजूनही पुरावे दिलेले नाही. पुरावे देणे किती सोपे आहे. सहा सोनेरी पाने हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे. ते विकत घ्यायचे आणि त्यातील अपमानास्पद मजकूर दाखवायचा. पण उथळवीरांना स्वतःची बुद्धी नसते. ते इतरांच्या दुर्बुद्धीने चालत असतात. सोशल मिडियाचा उदय झाल्यापासून आपण जे फॉरवर्डेड मेसेज पाहतो, ते उधळच असतात. त्या मेसेजला आई-बाप असे कुणीच नसते. ते पोरके असतात, बेघर झाल्या प्रमाणे इथे तिथे फिरत असतात आणि आपण ते फिरवत असतो. या ग्रूपवरुन त्या ग्रूपवर. सांगायचं तात्पर्य या अशा युगात आपण जगतोय. हे उथळवीरांचं युग आहे. या उथळवीरांच्या संगतीमुळे आपल्याकडूनही काही वेळा उथळपणा होतो, हे मान्य करण्यास मला कोणताही उथळपणा वाटत नाही. पण आपण शक्यतो हा उथळपणा टाळावा. आपण भाषेची गोडी जपावी. संदर्भहीन किंवा वायफळ लिहू नये, बोलू नये. कारण उथळपणा हा गरमागरम आणि तिखट वगैरे असला तरी आमचे वैद्य मित्र सांगतात जास्त तिखट खाऊ नये. त्याने बरेच आजार होतात. या तिखट आणि गरमागरम उथळपणामुळे समाजात बैद्धीक आजार बळावत आहे. त्यामुळे आपण तरी हा असला उथळपणा सोडून देऊ. कधी कधी माणसाकडून चुका होतात. परंतु उथळपणा हा स्वभाव होऊ नये. अजून बरेच मुद्दे लिहिवेसे वाटतायत. पण माझा हा लेख उथळ होऊ नये, म्हणून थांबतोय. आता तो उथळ झाला आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार रसिक प्रेक्षकांचाच... </span></p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	 </p>
<p style="font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
	<span style="font-size:16px;">- जयेश शत्रुघ्न मेस्त्री </span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Apr 2023 15:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 27 Apr 2023 15:57:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Regional news]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कामगार दिन : भारतातील कामगार कायद्यानं तुम्हाला दिलेले 'हे' 7 हक्क नेहमी लक्षात ठेवा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/labor-day-always-remember-the-these-7-rights-given-to-you-by-the-labor-act-of-india-122050100004_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/labor-day-always-remember-the-these-7-rights-given-to-you-by-the-labor-act-of-india-122050100004_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2020-11/19/thumb/1_1/1605766924-012.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2020-11/19/thumb/1_1/1605766924-012.jpg</image>
      <description><![CDATA[आज 1 मे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या दिवसाला प्रचंड महत्त्व आहे. 1960 साली 1 मेच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="450" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2020-11/19/full/1605766924-012.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	आज 1 मे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या दिवसाला प्रचंड महत्त्व आहे. 1960 साली 1 मेच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळे हा दिवस &#39;महाराष्ट्र दिन&#39; म्हणून साजरा केला जातो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण यासोबतच 1 मे या दिवसाला आणखी एक विशेष महत्त्व आहे. 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. जगभरात हा दिवस &#39;कामगार दिन&#39;, &#39;मे दिन&#39; या नावानेही ओळखला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	कामगार हा विषय भारतीय संविधानातील समवर्ती सूचीपैकी एक आहे. यामध्ये भारतातील कामगारांना मिळालेल्या हक्कांची माहिती देण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पूर्वी भारतात विविध राज्यांमध्ये सर्व मिळून शंभराहून अधिक आणि केंद्रीय 40 कायदे अस्तित्वात होते. पण श्रमसंहिता अधिनियम 2019 अंतर्गत या सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून नवे चार कायदे आणण्याची शिफारस देण्यात आली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यानुसार देशात सप्टेंबर 2020 मध्ये कोड ऑफ व्हेजेस, द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी आणि द इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड ही चार विधेयके दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आली आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	पूर्वी देशातील कामगारांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, हक्क किंवा अधिकार यांच्यात काही दुरूस्तीही यामध्ये करण्यात आली आहे. राज्ये या कायद्यांमध्ये त्यांच्या गरजेनुसार बदल करून त्यांची अंमलबजावणी करू शकतील. आगामी काळात कोणत्याही क्षणी नवे कामगार कायदे देशभरात लागू होऊ शकतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	आज कामगार दिनाच्या निमित्ताने भारतीय कामगार कायद्यात प्रत्येकाला असलेल्या 7 प्रमुख हक्कांची आपण माहिती घेऊ -</p>
<p>
	 </p>
<p>
	1. कामाचे तास आणि सुटी</p>
<p>
	ज्या मुद्द्यावरून कामगार दिन सुरू झाला तोच विषय आपण सर्वात आधी जाणून घेऊ. कोणत्याही संस्थेत कामगाराला 8 तासांपेक्षा जास्त वेळ कामास ठेवून घेता येणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	8 तासांपेक्षा जास्त काम करून घ्यावयाचे असल्यास त्याबदल्यात ओव्हरटाईमच्या कामाचा अतिरिक्त पगार देण्याची सोय करावी, अशी सूचना कामगार कायद्यात करण्यात आली आहे.</p>
<p>
	पण असं असलं तरी कोणत्याही स्थितीत एखाद्या कर्मचाऱ्यास आठवड्यात 6 दिवसांपेक्षा जास्त सलग काम करण्यास सांगता येऊ शकत नाही. 6 दिवसांच्या कामानंतर एक दिवस विश्रांतीची सुटी घेण्याचा अधिकार कर्मचाऱ्यास असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	नव्या कायद्यातील तरतुदींनुसार, कामाच्या तासांमध्ये वाढ करण्याचा अधिकार कंपनीकडे आहे. कंपनी कामाचे तास 8 तासांवरून 12 तासांपर्यंत वाढवू शकेल. पण त्यासाठी त्यांना कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस कमी करावे लागू शकतात. म्हणजेच चार दिवस काम आणि तीन दिवस सुटी अशी स्थितीही असू शकेल.</p>
<p>
	 </p>
<p>
	नव्या कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांना ठराविक मुदतीसाठी म्हणजेच गरजेनुसार एक-दोन किंवा पाच वर्षांसाठी कामावर ठेवलं जाऊ शकतं. ही पद्धत आगामी काळात अधिकृत मानली जाईल. ठराविक मुदतीसाठी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांना नियमित नोकरदारासारख्या सगळ्या सुविधा देणं बंधनकारक असेल. त्यांचा करार संपल्यानंतर त्यामध्ये वाढ करावी की नाही, याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाकडे असेल.</p>
<p>
	 </p>
<p>
	2. कामाच्या ठिकाणी लैंगिक समानता</p>
<p>
	तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री. तुम्हाला तुमच्या कामाच्या स्वरुपानुसार पगार मागण्याचा अधिकार कायद्यानुसार असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	नव्या कायद्यातील तरतुदींनुसार, कर्मचारी कामावर ठेवून घेताना त्यादरम्यान लैंगिक समानता पाळणे, हे प्रत्येक आस्थापनांना बंधनकारक आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	यामध्ये महिला कर्मचाऱ्यांबाबत विशेष उल्लेख करण्यात आला आहे. कोणत्याही संस्थेत महिलांना कोणत्याही पदावरील कामावर रुजू होण्याचा अधिकार असेल. शिवाय त्या कामासाठी इतर पुरुष सहकाऱ्याला मिळणारा पगार हा महिलांनाही मिळायला हवा, अशी तरतूद करण्यात आलेली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	उदा. समजा, एखाद्या कार्यालयात अकाऊंटचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये एक पुरुष आणि एक महिला आहे. दोघांच्या कामाचं स्वरुप, जबाबदारी, अनुभव आदी गोष्टी समान आहेत. अशा स्थितीत पुरुषाला 25 हजार पगार आणि स्त्रीला 20 हजार पगार देता येणार नाही. संबंधित स्त्रीला या कामाचा मोबदला म्हणून 25 हजार इतकाच पगार द्यावा लागेल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	3. महिला आणि बाळंतपण</p>
<p>
	 </p>
<p>
	कामगार कायद्यात महिला कर्मचाऱ्यांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. महिलांना कामाच्या ठिकाणी सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत काम करण्यास सांगता येऊ शकतं. महिला कर्मचाऱ्यांची इच्छा आणि परवानगीनुसार 7 नंतरच्या वेळेत त्यांना काम दिलं जाऊ शकतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याचप्रमाणे 50 पेक्षा जास्त कर्मचारी सेवेत असलेल्या आस्थापनेत महिला कर्मचाऱ्यांना बाळंतपणाच्या रजेची विशेष तरतूदही करण्यात आलेली आहे. पूर्वी 12 आठवडे मिळणारी बाळंतपणाची रजा आता वाढवून 26 आठवडे करण्यात आली आहे. पण या रजेचा लाभ घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्याने संबंधित कंपनीत काम सुरू करून 80 दिवसांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	नियमात बसणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास 26 आठवड्यांची पगारी रजा मिळू शकते. तर मूल दत्तक घेतलेल्या महिलाही बाळंतपणाच्या रजेसाठी अर्ज करू शकतात. त्यांना मूल दत्तक घेतल्याच्या तारखेपासून पुढील 12 आठवडे बाळंतपणाची रजा लागू होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	4. PF, विमा आणि ग्रॅच्युइटी</p>
<p>
	 </p>
<p>
	प्रत्येक आस्थापनेत कर्मचाऱ्यांसाठी PF आणि विमा यांची तरतूद करण्यात आलेली असते. कामास रुजू होताक्षणी कंपनीमार्फत मिळणारं विमा संरक्षण कर्मचाऱ्यांना लागू होतं. तसंच एकूण पगारातील 12 टक्के रक्कम प्रॉव्हिडंट फंड अर्थात PF मध्ये जमा केली जाते. कंपनीही तितकीच रक्कम त्यांच्यामार्फत PF खात्यात जमा करते.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याचप्रमाणे, सलग पाच वर्षे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा (उपदान) लाभ देण्यात येतो. प्रत्येक वर्षास 15 दिवसांचे वेतन यानुसार सेवेच्या एकूण वर्षांसाठी ग्रॅच्युइटी दिली जाते. नव्या कायद्यानुसार, हा कालावधी एका वर्षावर आणण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	5. स्थलांतरित कामगारांसाठी तरतुदी..</p>
<p>
	सर्व प्रकारच्या कामगारांना अपॉईंटमेंट लेटर आता मिळू शकतं. तसंच स्थलांतरित कामगारांना वर्षाातून एकदा त्यांच्या घरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रवासभत्ता मिळण्याची तरतूद नव्या कामगार कायद्यात आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी करण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत आंतर-राज्य स्थलांतरित कामगारांना रेशन कार्डच्या सुविधा नोकरी मिळालेल्या राज्यातही मिळू शकतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	6. कंपनीने नोकरीवरून काढल्यास..</p>
<p>
	ज्या कंपन्यांमध्ये तीनशे किंवा त्याहून कमी कामगार काम करतात अशा कंपन्यांना कंपनी किंवा कंपनीतला एक विभाग बंद करताना केंद्रसरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. नोकर कपात करतानाही तशी गरज नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण, उद्यापासून कामावरून येऊ नका, असं कंपनी कधीच सांगू शकत नाही. कर्मचाऱ्यांना त्यासाठीची नोटीस आधी देणं कंपनीला बंधनकारक असतं. शिवाय, कंपनीने नोकरीवरून कमी केल्यास कर्मचारी नुकसान भरपाईची मागणी करू शकतात. तरतुदींनुसार त्यांना योग्य ती रक्कम देण्याची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	7. संप आणि धरणे</p>
<p>
	आपल्या मागण्यांसाठी संप आणि बंद पुकारण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना आहे. पण त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	नव्या कायद्यानुसार, कोणताही कर्मचारी अथवा कर्मचारी संघटना कंपनीला नोटीस न देता संपावर जाऊ शकणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	कामगारांना आपल्या मागण्यांसाठी बंद पुकारायचा असेल तर कंपनी मालकांना साठ दिवसांची नोटिस द्यावी लागेल. आधी ही मुदत 30 ते 45 दिवसांची होती, त्यामुळे केंद्र सरकारच्या या नव्या धोरणावर टीकाही करण्यात येत आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	कामगार दिनाचा इतिहास</p>
<p>
	1 मे रोजीचा कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येतो. जगभरातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये या दिवशी सार्वजनिक सुटी दिली जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	19 व्या शतकात जगभरात औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांचा छळ करणे, त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेणे असे शोषणाचे प्रकार निदर्शनास आले होते. याविरोधात कामगार संघटनांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यामध्ये प्रतिदिवस आठ तास काम करण्याची प्रमुख मागणी कामगार संघटनांकडून केली जात होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	1 मे 1986 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे यासाठी एक मोठं आंदोलन झालं होतं. यादरम्यान बॉम्बस्फोट, गोळीबार असा प्रकार घडला. त्यामध्ये काही पोलीस आणि मजूरांचाही बळी गेला. या घटनेनंतर प्रशासनाने कामगार संघटनांची 8 तासांच्या कामाच्या वेळेची मागणी मान्य केली. या घटनेच्या स्मरणार्थच कामगार दिन साजरा करण्याचा विचार पुढे आला.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतात 1923 साली पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये लेबर किसान पक्षाकडून कामगार दिन साजरा करण्यात आला होता. त्यानंतर मात्र भारतात सर्वत्र कामगार दिन साजरा करण्याची पद्धत प्रचलित झाली.</p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 01 May 2022 10:31:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sun, 01 May 2022 10:35:52 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र दिवस : देशा, नाव तुझं माझिया ओठी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-122043000057_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-din-122043000057_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619842799-7399.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619842799-7399.jpeg</image>
      <description><![CDATA[धन्य जाहले जीवन हे, जन्मलो तुझ्या पोटी,
कणखर डोंगर, खोल दऱ्या वैभव आपुले,]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Maharashtra Din" class="imgCont" height="500" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/full/1619842799-7399.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Maharashtra diwas" width="653" />मंगल देशा, नाव तुझं माझिया ओठी,</p>
</p>
<p style="text-align: center;">
	धन्य जाहले जीवन हे, जन्मलो तुझ्या पोटी,</p>
<p style="text-align: center;">
	कणखर डोंगर, खोल दऱ्या वैभव आपुले,</p>
<p style="text-align: center;">
	महाराष्ट्राची शान आहेत कित्ती तरी किल्ले!</p>
<p style="text-align: center;">
	मातीत तुझ्या सापडलेत</p>
<p style="text-align: center;">
	रत्ने मौल्यवान,</p>
<p style="text-align: center;">
	लेखक, कवी, गायक, वादकानी वाढविला मान,</p>
<p style="text-align: center;">
	खेळाडूंनी मान आपली कित्ती उंचावली,</p>
<p style="text-align: center;">
	आणिक ही गुणी खेळाडूंनी मैदाने गाजविली,</p>
<p style="text-align: center;">
	शेतकरी ही कष्टकरितो ,सोनं पिकवितो,</p>
<p style="text-align: center;">
	कामगार ही आपुला कित्ती घाम गाळीतो,</p>
<p style="text-align: center;">
	कित्ती तरी श्रेष्ठ वैज्ञानिक झाले,</p>
<p style="text-align: center;">
	मान महाराष्ट्रा चा वाढवुन गेले.</p>
<p style="text-align: center;">
	संत महंतांनी केली ही पावन धरती,</p>
<p style="text-align: center;">
	अनेक तीर्थक्षेत्र आजही वाढवीत आहे कीर्ती,</p>
<p style="text-align: center;">
	ऋणातून या सर्वांच्या मुक्त न व्हायचे,</p>
<p style="text-align: center;">
	ऋणात राहून या सकलांच्या, गुणगान गायचे!</p>
<p style="text-align: center;">
	...अश्विनी थत्ते</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 30 Apr 2022 22:23:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 30 Apr 2022 22:29:27 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि कोणते ?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/list-of-districts-of-maharashtra-122042800025_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/list-of-districts-of-maharashtra-122042800025_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/28/thumb/1_1/1651135895-5924.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/28/thumb/1_1/1651135895-5924.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि कोणते ?]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Maharashtra" class="imgCont" height="609" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-04/28/full/1651135895-5924.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Maharashtra" width="717" /></p>
	</p>
	महाराष्ट्र या नवीन राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. सुरुवातीला म्हणजेच 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते. त्यानंतर प्रशासकीय कारणांसाठी 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली असून, 2021 पर्यंत राज्यातील जिल्ह्यांची संख्या 36 आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	जिल्हे खालील प्रशासकीय विभागांमध्ये विभागलेले आहेत.</p>
<p>
	कोकण</p>
<p>
	देश (पुणे विभाग)</p>
<p>
	खानदेश</p>
<p>
	मराठवाडा</p>
<p>
	विदर्भ<br />
	<br />
	<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="width:576px;" width="576">
		<tbody>
			<tr>
				<td style="width:59px;height:44px;">
					<strong>No</strong></td>
				<td style="width:119px;height:44px;">
					<strong>प्रशासकीय</strong> <strong>विभाग</strong></td>
				<td style="width:399px;height:44px;">
					<strong>जिल्हे</strong></td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:59px;height:59px;">
					1</td>
				<td style="width:119px;height:59px;">
					<strong>कोकण</strong></td>
				<td style="width:399px;height:59px;">
					मुंबई शहर,मुंबई उपनगर, पालघर ,ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:59px;height:59px;">
					2</td>
				<td style="width:119px;height:59px;">
					<strong>औरंगाबाद</strong></td>
				<td style="width:399px;height:59px;">
					औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना व हिंगोली</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:59px;height:44px;">
					3</td>
				<td style="width:119px;height:44px;">
					<strong>पुणे</strong></td>
				<td style="width:399px;height:44px;">
					कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:59px;height:44px;">
					4</td>
				<td style="width:119px;height:44px;">
					<strong>अमरावती</strong></td>
				<td style="width:399px;height:44px;">
					अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ व वाशिम</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:59px;height:44px;">
					5</td>
				<td style="width:119px;height:44px;">
					<strong>नागपूर</strong></td>
				<td style="width:399px;height:44px;">
					भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व गोंदिया</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:59px;height:44px;">
					6</td>
				<td style="width:119px;height:44px;">
					<strong>नाशिक</strong></td>
				<td style="width:399px;height:44px;">
					अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार</td>
			</tr>
		</tbody>
	</table>
	 <br />
	महाराष्ट्रातील जिल्हानिहाय माहिती<br />
	<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="width:615px;" width="615">
		<tbody>
			<tr>
				<td style="width:43px;height:61px;">
					<strong>No</strong></td>
				<td style="width:85px;height:61px;">
					<strong>नाव</strong></td>
				<td style="width:72px;height:61px;">
					<strong>मुख्यालय</strong></td>
				<td style="width:71px;height:61px;">
					<strong>प्रशासकीय</strong> <strong>विभागणी</strong></td>
				<td style="width:63px;height:61px;">
					<strong>क्षेत्रफळ</strong> <strong>(</strong><strong>किमी </strong><strong>2)</strong></td>
				<td style="width:85px;height:61px;">
					<strong>लोकसंख्या</strong><strong> (</strong><strong>२०११ जनगणना)</strong></td>
				<td style="width:75px;height:61px;">
					<strong>घनता(प्रति</strong> <strong>किमी</strong><strong>2)</strong></td>
				<td style="width:59px;height:61px;">
					<strong>शहरी</strong><strong> (%)</strong></td>
				<td style="width:63px;height:61px;">
					<strong>साक्षरता</strong><strong> (%)</strong></td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					1</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					अहमदनगर</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					अहमदनगर</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नाशिक</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					17,048</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					45,43,159</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					234.77</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					19.67</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					80.22</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					2</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					अकोला</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					अकोला</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					अमरावती</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					5,428</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					18,13,906</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					300.78</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					44.04</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					88.05</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					3</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					अमरावती</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					अमरावती</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					अमरावती</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					12,235</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					28,88,445</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					206.4</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					34.5</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					82.5</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					4</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					औरंगाबाद</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					औरंगाबाद</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					औरंगाबाद</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					10,100</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					37,01,282</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					286.83</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					37.53</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					61.15</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					5</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					बीड</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					बीड</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					औरंगाबाद</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					10,693</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					25,85,049</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					207.04</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					17.91</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					68</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					6</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					भंडारा</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					भंडारा</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नागपूर</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					3,717</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					12,00,334</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					305.58</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					15.44</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					68.28</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					7</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					बुलढाणा</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					बुलढाणा</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					अमरावती</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					9,661</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					24,86,258</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					230.63</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					21.2</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					75.8</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					8</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					चंद्रपूर</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					चंद्रपूर</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नागपूर</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					11,443</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					22,04,307</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					193.65</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					32.11</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					73.03</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					9</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					धुळे</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					धुळे</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नाशिक</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					7,195</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					20,50,862</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					211.83</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					26.11</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					71.6</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					10</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					<u><a href="https://byjusexamprep.com/gadchiroli-district-in-marathi-i" target="_blank">गडचिरोली</a></u></td>
				<td style="width:72px;height:20px;">
					गडचिरोली</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नागपूर</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					14,412</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					10,72,942</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					67.33</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					6.93</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					60.1</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					11</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					गोंदिया</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					गोंदिया</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नागपूर</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					5,234</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					13,22,507</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					247.81</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					11.95</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					67.67</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					12</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					हिंगोली</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					हिंगोली</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					औरंगाबाद</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					4,526</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					11,77,345</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					218.11</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					15.2</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					66.86</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					13</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					जळगाव</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					जळगाव</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नाशिक</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					11,765</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					42,29,917</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					312.79</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					71.4</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					76.06</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					14</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					जालना</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					जालना</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					औरंगाबाद</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					7,687</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					19,59,046</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					211.82</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					19.09</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					64.52</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					15</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					कोल्हापूर</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					कोल्हापूर</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					पुणे</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					7,685</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					38,76,001</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					457.44</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					29.65</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					77.23</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:34px;">
					16</td>
				<td style="width:85px;height:34px;">
					लातूर</td>
				<td style="width:72px;height:34px;">
					लातूर</td>
				<td style="width:71px;height:34px;">
					औरंगाबाद विभाग</td>
				<td style="width:63px;height:34px;">
					7,157</td>
				<td style="width:85px;height:34px;">
					24,54,196</td>
				<td style="width:75px;height:34px;">
					282.19</td>
				<td style="width:59px;height:34px;">
					23.57</td>
				<td style="width:63px;height:34px;">
					71.54</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					17</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					मुंबई शहर</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					मुंबई</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					कोकण</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					157</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					30,85,411</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					49,140.90</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					100</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					86.4</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					18</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					मुंबई उपनगर</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					वांद्रे</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					कोकण</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					446</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					93,56,962</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					23,271</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					100</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					86.9</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					19</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					नागपूर</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					नागपूर</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नागपूर</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					9,892</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					46,53,570</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					409.36</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					64.33</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					84.18</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					20</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					नांदेड</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					नांदेड</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					औरंगाबाद</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					10,528</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					33,61,292</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					275.98</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					28.29</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					68.52</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					21</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					नंदुरबार</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					नंदुरबार</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नाशिक</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					5,955</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					16,48,295</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					260</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					15.5</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					46.63</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					22</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					<u><a href="https://byjusexamprep.com/maharashtra-police-bharti-nashik-district-in-marathi-i" target="_blank">नाशिक</a></u></td>
				<td style="width:72px;height:20px;">
					नाशिक</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नाशिक</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					15,582</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					61,07,187</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					321.56</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					38.8</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					74.4</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					23</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					उस्मानाबाद</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					उस्मानाबाद</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					औरंगाबाद</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					7,569</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					16,57,576</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					197.89</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					17</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					78.4</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					24</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					पालघर</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					पालघर</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					कोकण</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					5,344</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					 </td>
				<td style="width:75px;height:20px;">
					562</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					50</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					80</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					25</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					परभणी</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					परभणी</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					औरंगाबाद</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					6,251</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					18,36,086</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					244.4</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					31.8</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					55.15</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					26</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					<u><a href="https://byjusexamprep.com/maharashtra-police-bharti-exam-pune-district-i" target="_blank">पुणे</a></u></td>
				<td style="width:72px;height:20px;">
					पुणे</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					पुणे</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					15,643</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					94,29,408</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					461.85</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					58.1</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					80.78</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					27</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					रायगड</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					अलिबाग</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					कोकण</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					7,152</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					26,34,200</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					308.89</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					24.2</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					77</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					28</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					रत्नागिरी</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					रत्नागिरी</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					कोकण</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					8,208</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					16,15,069</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					206.72</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					11.3</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					65.13</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					29</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					सांगली</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					सांगली</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					पुणे</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					8,578</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					28,22,143</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					301.18</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					24.5</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					62.41</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					30</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					सातारा</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					सातारा</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					पुणे</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					10,480</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					30,03,741</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					266.77</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					14.2</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					78.52</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					31</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					सिंधुदुर्ग</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					ओरोस</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					कोकण</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					5,207</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					8,49,651</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					166.86</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					9.5</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					80.3</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					32</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					सोलापूर</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					सोलापूर</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					पुणे</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					14,895</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					43,17,756</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					259.32</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					31.8</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					71.2</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					33</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					ठाणे</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					ठाणे</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					कोकण</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					4,214</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					1,10,60,148</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					850.71</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					72.58</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					80.67</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					34</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					वर्धा</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					वर्धा</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					नागपूर</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					6,310</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					13,00,774</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					195.03</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					25.17</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					80.5</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					35</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					वाशिम</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					वाशिम</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					अमरावती</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					5,150</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					11,97,160</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					275.98</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					17.49</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					74.02</td>
			</tr>
			<tr>
				<td style="width:43px;height:20px;">
					36</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					यवतमाळ</td>
				<td style="width:72px;height:20px;">
					यवतमाळ</td>
				<td style="width:71px;height:20px;">
					अमरावती</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					13,582</td>
				<td style="width:85px;height:20px;">
					27,72,348</td>
				<td style="width:75px;height:20px;">
					152.93</td>
				<td style="width:59px;height:20px;">
					18.6</td>
				<td style="width:63px;height:20px;">
					57.96</td>
			</tr>
		</tbody>
	</table>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 28 Apr 2022 14:05:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 28 Apr 2022 14:21:41 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maharashtra Day Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-wishes-in-marathi-121050100009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-wishes-in-marathi-121050100009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-04/30/thumb/1_1/1588268464-5785.jpeg</image>
      <description><![CDATA[दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा... 
जय जय महाराष्ट्र माझा... 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय जय महाराष्ट्र माझा... 
गर्जा महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="maharashtra din wishes" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2020-04/30/full/1588268464-5785.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Maharashtra diwas wishes" width="740" /></p>
	दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा... </p>
<p>
	जय जय महाराष्ट्र माझा... </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	जय जय महाराष्ट्र माझा... </p>
<p>
	गर्जा महाराष्ट्र माझा...</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... </p>
<p>
	मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	मंगल देशा... </p>
<p>
	पवित्र देशा... </p>
<p>
	महाराष्ट्र देशा...</p>
<p>
	प्रणाम घ्यावा माझा </p>
<p>
	हा महाराष्ट्र देशा.... </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	कपाळी केशरी टिळा लावितो... </p>
<p>
	महाराष्ट्र देशा तुला वंदितो.... </p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा </p>
<p>
	 </p>
<p>
	दगड होईन तर सह्याद्रीचा होईन</p>
<p>
	माती झालो तर महाराष्ट्राची होईन</p>
<p>
	तलवार झालो तर आई भवानीची होईन</p>
<p>
	जय भवानी जय शिवाजी</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	धन्य आहे ही महाराष्ट्राची माती</p>
<p>
	कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... </p>
<p>
	गुणगुणलो जे गीत गीत मराठी.... </p>
<p>
	मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>
<p>
	 </p>
<p>
	धन्य आहे ही महाराष्ट्राची माती</p>
<p>
	कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला</p>
<p>
	महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 28 Apr 2022 13:43:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 28 Apr 2022 13:46:59 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्राची खाद्यपरंपरा : 'अन्न हे पूर्णब्रम्ह']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/about-maharashtra-food-on-maharashtra-day-119050100013_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/about-maharashtra-food-on-maharashtra-day-119050100013_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-05/01/thumb/1_1/1556697170-5381.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-05/01/thumb/1_1/1556697170-5381.jpg</image>
      <description><![CDATA[’अन्न हे पूर्णब्रम्ह’ हे तत्त्व महाराष्ट्रीय अगदी मनापासून पाळतात. म्हणजेच मराठी संस्कृतीत अन्नाचा मान विश्वनिर्मिती करणा-या ब्रम्हदेवासमान आहे. इथली माणसं अन्न सेवन करण्यापूर्वी ते देवाला नैवेद्य म्हणून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="recipe maharashatra day" class="imgCont" height="530" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-05/01/full/1556697170-5381.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	</p>
	’अन्न हे पूर्णब्रम्ह’ हे तत्त्व महाराष्ट्रीय अगदी मनापासून पाळतात. म्हणजेच मराठी संस्कृतीत अन्नाचा मान विश्वनिर्मिती करणा-या ब्रम्हदेवासमान आहे. इथली माणसं अन्न सेवन करण्यापूर्वी ते देवाला नैवेद्य म्हणून कृतज्ञतेने अर्पण करतात. हेतू हा की ’त्याने’ जे दिले, त्यावर ’त्याचा’ मान पहिला. विशेषत: सणासुदीला काही नैवेद्याचे पदार्थ खास इष्टदेवतेसाठी करण्याची प्रथा येथे आहे. उदा. उकडीचे मोदक (गणेश चतुर्थी), सत्यनारायण महापूजा (शिरा), इ.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्रात पक्वान्नांचे स्वाद-सुगंध, स्वरुप- शैली इतक्या विविध आहेत, की हे पदार्थ सेवन करणे म्हणजे पर्वणीच असते. महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती मध्ये प्रामुख्याने कोंकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खानदेशी व-हाडी असे पाच मुख्य प्रकार आहेत. कोकणी पध्दतीत खोबरे विशेषत्वाने वापरतात, तर वर्हा्डी पध्दतीत तेल विशेष वापरतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	खोवलेले (किसलेले) खोबरे बर्या्च पाककृतींच्या मसाल्यात वापरतात, पण तरीही खोबरेल तेल मात्र तितकंसं वापरलं जात नाही. भाज्यांमध्ये शेंगदाणे, काजू बर्यातचदा वापरले जातात, पण तरीही शेंगदाण्याचं तेल मुख्य स्वयंपाकासाठी वापरतात. दुसरा महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे कोकम पेय (कोकम फळांपासून बनविलेल व सोलकढी) जेवणानंतर पाचक पेय म्हणून कोकणात दिली जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मत्स्याहारात सर्वात लोकप्रिय मासा आहे बोंबील, जो तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो. जेवणात भात किंवा तांदळाच्या, ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर शाकाहारी किंवा मांसाहारी मत्स्याहारात सर्वात लोकप्रिय मासा आहे बोंबील, जो तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो. जेवणात भात किंवा तांदळाच्या, ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ सेवन केले जातात. तांदळाचे वडे आणि आंबोळ्या /घावन हे तांदळाचे पीठ आंबवून तव्यावर केले जाते. शाकाहारी बेत असला की सर्वाधिक पसंती मिळते ती वांग्याला. भरली वांगी म्हणजे वांगी मधोमध चिरुन त्यात खोबरं व इतर मसाला भरुन ही कढईत तळतात. पापडाशिवाय शाकाहारी बेत अपूर्ण वाटतो पापड भाजून किंवा तळून खातात. पुरणपोळी हा महाराष्ट्रात सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे. हरभर्‍याची डाळ आणि गूळ एकत्र शिजवून त्याचे सारण तयार करतात. त्याला पुरण म्हणतात. हे पुरण कणकेच्या गोळ्यात भरुन त्याची पोळी लाटतात व ती तव्यावर भाजतात. या पोळीला पुरणपोळी म्हणतात. पुरणपोळीप्रमाणेच केशर घातलेलं श्रीखंड हाही तितकाच आवडता पदार्थ आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>सणासुदीचे पदार्थ:</strong></p>
<p>
	 </p>
<p>
	गुढी पाडवा, होळी, हरतालिका, गणेश चतुर्थी, दिवाळी, मकर संक्रांत हे महाराष्ट्राचे खास सण आहेत. या सणांसाठी खालील विशेष पदार्थ करतात:</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>गुढी पाडवा</strong>: कडूलिंब व गूळ व वाटली डाळ व मोड आलेल्या हरभर्यारची उसळ</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>होळी</strong>: पुरणपोळी</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>गणेश चतुर्थी</strong>: उकडीचे मोदक</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>दिवाळी</strong>: करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसा</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>मकर संक्रांत</strong> : तिळगूळ, तीळवडी, पांढरा शुभ्र काटेरी हलवा.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>विवाहप्रसंगीचे विविध पदार्थ:</strong></p>
<p>
	 </p>
<p>
	विवाहाचे विधीनंतर केळीच्या पानावर पारंपरिक पंगती बसत असत. हे भोजन पूर्णत: शाकाहारी व कांदा, लसूण याशिवाय असावे असा प्रघात असे. यामध्ये खोबरं घालून केलेली आळुभाजी, कैरीची चटणी, बटाटाभाजी, भजी, कोशिंबीर, भात (केशरी भात, मसालेभात), पुर्‍या, वरण व त्याबरोबर जिलबी, मलईदार बासुंदी, केशरयुक्त श्रीखंड, कोथिंबीर-मीठ घातलेलं ताक आणि शेवटी वेलची व लवंगासह विडा (पान) असा बेत असतो.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 28 Apr 2022 10:05:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 28 Apr 2022 13:46:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र दिन : हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा ‍दिवस, हुतात्म्यांची नावे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-a-day-to-remember-the-martyrs-the-names-of-the-martyrs-121050100015_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-day-a-day-to-remember-the-martyrs-the-names-of-the-martyrs-121050100015_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619851472-4272.jpeg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619851472-4272.jpeg</image>
      <description><![CDATA[राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="maharshtra day" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-05/01/full/1619851472-4272.jpeg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="hutatma din" width="740" /></p>
	</p>
	महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.</p>
<p>
	 </p>
<p>
	२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे</p>
<p>
	 </p>
<p>
	सिताराम बनाजी पवार</p>
<p>
	जोसेफ डेव्हिड पेजारकर</p>
<p>
	चिमणलाल डी. शेठ</p>
<p>
	भास्कर नारायण कामतेकर</p>
<p>
	रामचंद्र सेवाराम</p>
<p>
	शंकर खोटे</p>
<p>
	धर्माजी गंगाराम नागवेकर</p>
<p>
	रामचंद्र लक्ष्मण जाधव</p>
<p>
	के. जे. झेवियर</p>
<p>
	पी. एस. जॉन</p>
<p>
	शरद जी. वाणी</p>
<p>
	वेदीसिंग</p>
<p>
	रामचंद्र भाटीया</p>
<p>
	गंगाराम गुणाजी</p>
<p>
	गजानन ऊर्फ बंडू गोखले</p>
<p>
	निवृत्ती विठोबा मोरे</p>
<p>
	आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर</p>
<p>
	बालप्पा मुतण्णा कामाठी</p>
<p>
	धोंडू लक्ष्मण पारडूले</p>
<p>
	भाऊ सखाराम कदम</p>
<p>
	यशवंत बाबाजी भगत</p>
<p>
	गोविंद बाबूराव जोगल</p>
<p>
	पांडूरंग धोंडू धाडवे</p>
<p>
	गोपाळ चिमाजी कोरडे</p>
<p>
	पांडूरंग बाबाजी जाधव</p>
<p>
	बाबू हरी दाते</p>
<p>
	अनुप माहावीर</p>
<p>
	विनायक पांचाळ</p>
<p>
	सिताराम गणपत म्हादे</p>
<p>
	सुभाष भिवा बोरकर</p>
<p>
	गणपत रामा तानकर</p>
<p>
	सिताराम गयादीन</p>
<p>
	गोरखनाथ रावजी जगताप</p>
<p>
	महमद अली</p>
<p>
	तुळशीराम पुंजाजी बेलसरे</p>
<p>
	देवाजी सखाराम पाटील</p>
<p>
	शामलाल जेठानंद</p>
<p>
	सदाशिव महादेव भोसले</p>
<p>
	भिकाजी पांडूरंग रंगाटे</p>
<p>
	वासुदेव सुर्याजी मांजरेकर</p>
<p>
	भिकाजी बाबू बांबरकर</p>
<p>
	सखाराम श्रीपत ढमाले</p>
<p>
	नरेंद्र नारायण प्रधान</p>
<p>
	शंकर गोपाल कुष्टे</p>
<p>
	दत्ताराम कृष्णा सावंत</p>
<p>
	बबन बापू भरगुडे</p>
<p>
	विष्णू सखाराम बने</p>
<p>
	सिताराम धोंडू राडये</p>
<p>
	तुकाराम धोंडू शिंदे</p>
<p>
	विठ्ठल गंगाराम मोरे</p>
<p>
	रामा लखन विंदा</p>
<p>
	एडवीन आमब्रोझ साळवी</p>
<p>
	बाबा महादू सावंत</p>
<p>
	वसंत द्वारकानाथ कन्याळकर</p>
<p>
	विठ्ठल दौलत साळुंखे</p>
<p>
	रामनाथ पांडूरंग अमृते</p>
<p>
	परशुराम अंबाजी देसाई</p>
<p>
	घनश्याम बाबू कोलार</p>
<p>
	धोंडू रामकृष्ण सुतार</p>
<p>
	मुनीमजी बलदेव पांडे</p>
<p>
	मारुती विठोबा म्हस्के</p>
<p>
	भाऊ कोंडीबा भास्कर</p>
<p>
	धोंडो राघो पुजारी</p>
<p>
	ह्रुदयसिंग दारजेसिंग</p>
<p>
	पांडू माहादू अवरीरकर</p>
<p>
	शंकर विठोबा राणे</p>
<p>
	विजयकुमार सदाशिव भडेकर</p>
<p>
	कृष्णाजी गणू शिंदे</p>
<p>
	रामचंद्र विठ्ठल चौगुले</p>
<p>
	धोंडू भागू जाधव</p>
<p>
	रघुनाथ सखाराम बीनगुडे</p>
<p>
	काशीनाथ गोविंद चिंदरकर</p>
<p>
	करपैया किरमल देवेंद्र</p>
<p>
	चुलाराम मुंबराज</p>
<p>
	बालमोहन</p>
<p>
	अनंता</p>
<p>
	गंगाराम विष्णू गुरव</p>
<p>
	रत्नु गोंदिवरे</p>
<p>
	सय्यद कासम</p>
<p>
	भिकाजी दाजी</p>
<p>
	अनंत गोलतकर</p>
<p>
	किसन वीरकर</p>
<p>
	सुखलाल रामलाल बंसकर</p>
<p>
	पांडूरंग विष्णू वाळके</p>
<p>
	फुलवरी मगरु</p>
<p>
	गुलाब कृष्णा खवळे</p>
<p>
	बाबूराव देवदास पाटील</p>
<p>
	लक्ष्मण नरहरी थोरात</p>
<p>
	ठमाबाई विठ्ठल सूर्यभान</p>
<p>
	गणपत रामा भुते</p>
<p>
	मुनशी वझीऱअली</p>
<p>
	दौलतराम मथुरादास</p>
<p>
	विठ्ठल नारायण चव्हाण</p>
<p>
	देवजी शिवन राठोड</p>
<p>
	रावजीभाई डोसाभाई पटेल</p>
<p>
	होरमसजी करसेटजी</p>
<p>
	गिरधर हेमचंद लोहार</p>
<p>
	सत्तू खंडू वाईकर</p>
<p>
	गणपत श्रीधर जोशी</p>
<p>
	माधव राजाराम तुरे(बेलदार)</p>
<p>
	मारुती बेन्नाळकर</p>
<p>
	मधूकर बापू बांदेकर</p>
<p>
	लक्ष्मण गोविंद गावडे</p>
<p>
	महादेव बारीगडी</p>
<p>
	कमलाबाई मोहित</p>
<p>
	सीताराम दुलाजी घाडीगावकर</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 26 Apr 2022 17:04:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 28 Apr 2022 13:47:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गर्जा महाराष्ट्र माझा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/garja-maharashatra-majha-110043000050_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/garja-maharashatra-majha-110043000050_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/30/thumb/1_1/1462009462-631.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/30/thumb/1_1/1462009462-631.jpg</image>
      <description><![CDATA[संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यकारभाराची सूत्रे मराठी माणसाच्या हाती आली तरी धनदांडग्या अमराठी भाषिकांचे वर्चस्व उत्तरोत्तर वाढतच गेले. 'मराठे लढाया जिंकताना आणि हाता हरतात' हे इतिहासातील भूत वर्तमानकाळातही छळत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="maharashatra din" class="imgCont" height="293" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-04/30/full/1556609410-3928.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	</p>
	<br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#800040">लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी</font><br />
	<font style="font-size:11pt; color:#800040">जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी</font><br />
	<font style="font-size:11pt; color:#800040">धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी</font><br />
	<font style="font-size:11pt; color:#800040">एवढ्या जगात माय मानतो मराठी </font></p>
<font style="font-size:11pt; color:#000000">संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यकारभाराची सूत्रे मराठी माणसाच्या हाती आली तरी धनदांडग्या अमराठी भाषिकांचे वर्चस्व उत्तरोत्तर वाढतच गेले. &#39;मराठे लढाया जिंकताना आणि हाता हरतात&#39; हे इतिहासातील भूत वर्तमानकाळातही छळत आहे. व्यापार, गिरण्या, कारखाने, सार्वजनिक उपक्रम विकसित झाले. त्यात मराठी माणसांना धूर्तपणे डावलून, अमराठी लोकांना नोकर्‍यांमध्ये सामावले गेले. त्याविरूद्ध आवाज उठवण्याची, लढण्याची हिम्मत केवळ बाळासाहेबांनी आणि त्यांच्या शिवसेनेने केली. महाराष्ट्र , मराठी भाषा, मराठी संस्कृती सातत्याने जागृत आणि ज्वलंत ठेवण्याचे सत्कार्य गेली 4 दशके अथक करण्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेना जाते. देशपरदेशातील प्रत्येक मराठी घरामध्ये, मनामध्ये त्यांना अढळ स्थान आहे. ते अनभिषिक्त मराठी हृदयसम्राट आहेत. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">मराठी जणांची प्रवृती आणि इतिहासावरून असे लक्षात येते की कला, सामाजिक विचार आणि अध्यात्म या तीन क्षेत्रांत ते कायम प्रभावी आहेत. ज्ञानेश्वर (ज्ञानेश्वरी), तुकाराम (गाथा), एकनाथ (भारूड), रामदास (दासबोध, मनाचे श्लोक), मोरोपंत (आर्या) बहिणाबाई चौदरी, जी.ए. कुलकर्णी, माडगुळकर बंधू, जयवंत दळवी, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, नरेंद्र जाधव, गौरी देशपांडे, भालचंद्र नेमाडे, दि.पु. चित्रे, वीणा गवाणकर, कृष्णमेघ कुंटे यांचे साहित्य जागतिक दर्जाचे आहे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, समाजसुधारक आगरकर, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शि.म. परांजपे इत्यादींच्या सामाजिक विचारांची प्रभावळ मराठीला लाभली. त्यांच्या प्रगतीशील विचारांमुळे विसाव्या शतकाच्या सुरूवातीस महाराष्ट्र संपूर्ण देशात अग्रेसर होता. आजही आहे. सामाजिक समता, स्त्रीमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, आदिवासींचे हक्क, पर्यावरण संवर्धन विकास इ. बाबतीत मराठीतील विचारमंथन लक्षणीय आहे. उदाहरणेच द्यायची झाली तर आनंदवनचे कै. बाबा आमटे, साधनाताई आमटे, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, डॉ. अभय आणि राणी बंग, लेखक विश्वास पाटील, ‍कविता महाजन, ज्योतिदर्भास्कर साळगांवकर, मुक्तांगणचे डॉ. अनिल अवचट, डॉ. सुनंदा अवचट इ. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">महाराष्ट्रासाठी देशासाठी त्याग करणे हे जणू मराठी माणसांचे परंपरागत, पिढीजात कर्तव्य असल्याने (छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य, पेशवे-शिंदे-होळकरांचे अटकेपार झेंडे आणि पानिपतची मर्दुमकी, तात्या टोपे, झाशीची राणी, स्वातंत्र्यसेनानी वासुदेव फडके, उमाजी नाईक, नाना पाटील, लोकमान्य टिळत, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा चाफेकर इत्यादींचा स्वातंत्र्यलढ्या, छ‍त्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज, विनोबा भावे, साने गरूजी, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे इ. ची समाजसुधारणा) मराठ्यांचे शौर्य, हौतात्म्य, सामाजिक कार्य उपेक्षित राहिले. </font><br />
<br />
&#39;<font style="font-size:11pt; color:#000000">प्राप्तकाल हा विशाल भुधणल सुंदर लेणी त्यात खोदा&#39; असे आवाहन केशवसुतांनी 100 वर्षांपूर्वी केले. त्यापुढे त्यांनी असेतही सांगितले, &#39;निजनामे त्यावरती नोंदा&#39; यात मराठी माणूस मागे पडतो. त्यामुळे काम मराठी माणसांनी करायचे आणि त्याचे श्रेय लाटणार इतर उपटसुंभ. आपली मराठी माणसं प्रसिद्धीपराङमुख राहण्यात धन्यता मानतात. पानिपतच्या लढाईमदील मराठ्यांच्या शौर्याचे पोवाडे, पानिपत परिसरात आजही गायले जातात. अहमदशहा अब्दाली विरूद्ध लढण्यासाठी केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर अखंड हिंदुस्थानातून अवघे मराठी सैन्य गोळा झाले होते. दिल्लीचे तख्‍त राखणे आणि परकीय अब्दालीपासून हिंदुस्थानी जनतेते रक्षण करणे या ध्येयाने ते प्रेरित झाले होते. अपुर्‍या पाठबळावर आणि भुकेल्या पोटीदेखील मराठ्यांनी आक्रामकांना परतवून लावले. परिणामी लुटालूट, जाळपोळ, धर्मांतर अशी अनेक संकटे टळली. पानिपतच्या लढाईचे हे राजकीय आणि सामाजिक फलित मराठ्यांच्या बलिदानामुळे शक्य झाले. मराठ्यांची प्राण पणाला लावून दिलेल्या शब्दाला जागण्याची वृती आणि कडवा प्रतिकार यामुळेच हे घडले. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा चाफेकर इ. मराठी नेते कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय केवळ राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन, सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र लढ्यात झुंजले. त्यासाठी लोकमान्यांना मंडालेत कारावास, स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानात काळ्या पाण्याची जन्मठेप आणि चाफेकरांना फाशीची शिक्षा भोगावी लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने </font><font style="font-size:11pt; color:#000000">मराठी स्वातंत्र्यसेनांनींची उपेक्षाच नव्हे तर मानहानी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी - हत्येच्या खटल्यात गोवले. त्यांची बी.ए.ची पदहवीही रोखली. चिंतामणराव देशमुखांसारख्या विद्वान अर्थतज्ज्ञाला नेहरूंनी अपमानास्पद वागणूक देऊन राजीनामा देण्यास भाग पाडले. याविरूद्ध मोहनदास गांधींनी आपल्या वैयक्तिक अपमानाचा (रेल्वे फर्स्टक्लासच्या डब्यामधून ब्रिटिश अधिकार्‍याने हाकलेले) बदला घेण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. तुरुंगात असताना गांधींना श्रम, छळ झाल्याचे ऐकिवात नाही. तरीही त्यांना म्हणायचे राष्ट्रपिता, महात्मा आणि सर्व सार्वजनिक ठिकाणांना त्यांच्याच नावाच्या पाट्या! </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">अलिकडे मराठी मंडळींनी अमेरिकेत आपला जरीपटका फडकावला आहे. अमेरिकेतील धरणे, रस्ते, उड्डाणपूल बांधणार्‍यांमध्ये, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा निर्माण करणार्‍यांमध्ये मराठी माणसे आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डॅक्टर्स, आर्कीटेक्टस् मराठी आहेत. ते सर्व तेथे परप्रांतीय आहेत आणि अमेरिकेच्याच (कर्मभूमीत) समृद्दीत भर घालीत आहेत. तिथे झोपड्या बांधून, कचरा टाकून, थुंकून गलिच्छपणा करीत नाहीत. गुंडगिरी, अरेरावी, धाकदपटशाही, बेकायदेशीर कृत्ये करीत नाहीत. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">बहुतेक मराठी घरांमधून मुलांवर संस्कार होतात &#39;बेटा, भरपूर अभ्यास कर, उच्चशिक्षण घे, शिक्षणाच्या जोरावर चांगली नोकरी मिळव, पण पैशांच्या मागे लागू नकोस. त्याऐवजी समाजसेवा कर.&#39; मुले शिकतात, मुली डॉक्टर्स, मुलगे इंजिनियर्स होतात. मनापासून समाजकार्यात रमतात पण पैशांच चणचण कायमचीच, त्यामुळे गिरगाव, दादरच्या मध्यवर्ती जागा सोडून कल्याण, डोंबिवली, विरार-वसईकडे ढकलले जातात. यावर उपाय म्हणजे संस्कार करणार्‍या वडीलधार्‍या मंडळींचे प्रबोधन केले पाहिजे. बालमनावर, युवापिढीवर यश-संपत्तीचा संस्कार करणे आवश्यक आहे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">महाराष्ट्रात थोर साधुसंत,वीर लढवय्ये, मुत्सद्दी राजकरणी, प्रतिभावंत कवी, लेखक निर्माण झाले आहेत. आपल्या समृद्ध, प्रगल्भ ज्ञानाने मराठीची मशाल धगधगत ठेवण्याची ऊर्जा मराठी माणसात आहे. गरज आहे निर्धाराची! </font><br />
<br />
(&#39;<font style="font-size:11pt; color:#000000">आपले वसंतश्री&#39; या दिवाळी अंकातून साभार) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 26 Apr 2022 12:14:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 28 Apr 2022 13:45:06 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-song-jai-jai-maharashtra-majha-garja-maharashtra-majha-121050100032_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-song-jai-jai-maharashtra-majha-garja-maharashtra-majha-121050100032_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619872535-3271.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619872535-3271.jpg</image>
      <description><![CDATA[जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="495" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-05/01/full/1619872535-3271.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="maharashtra divas" width="619" /></p>
	</p>
	जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा</p>
<p>
	रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी</p>
<p>
	एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी</p>
<p>
	भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा</p>
<p>
	जय जय महाराष्ट्र माझा ...</p>
<p>
	 </p>
<p>
	भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा</p>
<p>
	अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा</p>
<p>
	सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा</p>
<p>
	दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा</p>
<p>
	 </p>
<p>
	काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी</p>
<p>
	पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी</p>
<p>
	दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला</p>
<p>
	देशगौरवासाठी झिजला</p>
<p>
	दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा</p>
<p>
	 </p>
<p>
	कवि - राजा बढे</p>
<p>
	संगीत - श्रीनिवास खळे</p>
<p>
	गायक - शाहीर साबळे</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 01 May 2021 17:59:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 01 May 2021 18:06:05 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र गीत : मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/govindagraj-poem-maharashtra-geet-mangal-desha-pavitra-desha-maharashta-desha-121050100018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/govindagraj-poem-maharashtra-geet-mangal-desha-pavitra-desha-maharashta-desha-121050100018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619857581-9226.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/01/thumb/1_1/1619857581-9226.jpg</image>
      <description><![CDATA[मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Maharashtra Song" class="imgCont" height="297" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2021-05/01/full/1619857581-9226.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="maharashtra geet" width="600" /></p>
	</p>
	मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!</p>
<p>
	प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।।</p>
<p>
	 </p>
<p>
	राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।</p>
<p>
	नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।</p>
<p>
	 </p>
<p>
	अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।</p>
<p>
	बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।।</p>
<p>
	 </p>
<p>
	भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।</p>
<p>
	शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।</p>
<p>
	ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी।।</p>
<p>
	जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी</p>
<p>
	वैभवासी वैराग्यासी।।</p>
<p>
	जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा।।</p>
<p>
	प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।1।।</p>
<p>
	 </p>
<p>
	अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा</p>
<p>
	सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा</p>
<p>
	पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा</p>
<p>
	गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा</p>
<p>
	तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची</p>
<p>
	मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची</p>
<p>
	ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥</p>
<p>
	 </p>
<p>
	कवी -गोविंदाग्रज</p>
<p>
	संगीतकार - वसंत देसाई</p>
<p>
	मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 01 May 2021 13:54:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 01 May 2021 13:56:29 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचा महाराष्ट्र]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-after-yashwantrao-chavan-120050100008_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-after-yashwantrao-chavan-120050100008_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-05/01/thumb/1_1/1588312315-4187.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-05/01/thumb/1_1/1588312315-4187.jpg</image>
      <description><![CDATA[1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याचे उद्‌घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="maharashtra din" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2020-05/01/full/1588312315-4187.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	</p>
	1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याचे उद्‌घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. 1 मे 2020 ला आपण महाराष्ट्राचा साठावा वर्धापन दिन साजरा करत आहोत. महाराष्ट्राची साहित्य-संस्कृती वर्धिष्णू राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. येथील समाज हा पुरोगामी विचारांचा, विज्ञाननिष्ठ, ज्ञानपिपासू, सदविचारी, कुलशीलाचा, आचारधर्म पाळणारा, आध्यात्मिकतेची कास धरणारा, ललितकलांचा आनंद घेणारा, असा आहे. अशा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भव्य-दिव्य स्वप्नात यशवंतरावांनी आपल्या प्रेरणा शोधल्या. महाराजांचे शौर्य, धैर्य, चारित्र्य यास विधायक दृष्टी देऊन पुन्हा महाराष्ट्रात नूतन सृष्टी निर्माण व्हावी, असे तंना वाटत असे. महाराष्ट्र राज्य हे चंद्र कलेप्रमाणे वृद्धिंगत व्हावे आणि त्याची प्रभा जगभर पसरावी अशी यशवंतराव चव्हाण यांची अपेक्षा होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी  केलेल्या भाषणात त्याचा प्रत्यय येतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्राची सेवा करण्यात मी रंगून गेलो असताना मात्र दिल्लीचे बोलावणे आले. मराठी ने एकसंध करणे हे पहिले साध्य आहे. ही भावना यशवंतराव चव्हाण यांची होती. राजकारण, प्रशासन, अर्थकारण, कृषी औद्योगिक धोरण, ग्रामविकासाची संकल्पना, न्यायव्यवस्था, जलसंस्कृती, शिक्षण, जल व्यवस्थापन, समाजकारण, भाषा आणि साहित्य, कला-यामध्ये या सारख्या असंख्य विषयांवर यशवंतराव चव्हाणांनी मूलगामी विचार मांडले आहेत. सामान्यांचे कल्याण आणि मूल्यावरची निष्ठा ठेवत या विषयाकडे ते पाहात. लोकांचे समाधान ही चांगल्या राज्यकारभाराची कसोटी असते. राज्याचा बौद्धिक आणि वैचारिक आत्मा कोरडा राहणार नाही, याची ते पुरेपूर दक्षता घेत होते. आजच्या राज्यकर्त्यांमधला आणि यशवंतरावांच्या मधला हा फरक आपण आज तीव्रतेने अनुभवत आहोत. महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व स्वीकारताना त्यांच्या मनात उद्याच्या महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट होते. त्यात रंग भरताना केवळ बांधेसूद प्रशासनावर अवलंबून राहिल्यास ही प्रक्रिाया यांत्रिक बनेल, प्रभावी लोकनेतृत्वाची त्याला जोड दिली तरच ती लोकाभिमुख बनेल, अशी त्यांची श्रद्धा होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	यशवंतराव राजकारण व समाजकारण करीत असताना कटुता आणि आकस न ठेवता मणुसकीच्या भावनेने राजकारण करत असत. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर एकाही परराज्यातील माणसाला, कुटुंबाला मुंबई सोडून जावेसे वाटले नाही. 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 या काळात यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पुढे चीनने भारतावर केलेल्या आक्रमणामुळे राष्ट्रीय संकटाच्या मुकाबल्यासाठी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला या शब्दात त्यांची राजकीय उंची कवीने कथन केली आहे. त्यांच्यानंतर देशाच्या राजकारणात आजच्या घडीला नाव घ्यावे असे दमदार नेतृत्व आपल्याकडे निर्माण होऊ शकले नाही. आपल्याकडे राजकारणाच्या वाटेचा हा मार्ग झाला नाही, ती पायवाट झाली असेच म्हणावे लागेल.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="yashwant rao chouhan" class="imgCont" height="415" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2020-05/01/full/1588312770-7983.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	</p>
</p>
<p>
	यशवंतराव चव्हाण राजकारणातील एक उत्तुंग शिखर होते. संवेदनशीलता, सभ्यता आणि न्रमता याचे ते मूर्तिमंत राजकारणातील रूप होते. महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, महाराष्ट्र हे मराठ्यांचे राज्य होणार नाही तर समस्त मराठी लोकांचे राज्य असेल. कठीण परिस्थितीतही महाराष्ट्राने शिस्तीची कास सोडली नाही. म्हणूनच महाराष्ट्राची बाजारातील पत ही नेहमीच उच्चतम प्रतीची होती. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करता आला.</p>
<p>
	 </p>
<p>
	सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी समजला जातो. अनेक नामांकित सहकारी संस्था, साखर कारखाने, पतसंस्था, सूतगिरण्या, दुग्ध उत्पादक संघ,विपणन संस्था यासारख्या संस्था महाराष्ट्रात पथदर्शक आहेत. एका अर्थाने सहकारी चळवळ ग्रामीण भागात घट्ट रोवली गेली. सहकारी क्षेत्रालाही अर्थव्यवस्थेत आढळ स्थान देण्यात आले. यातून लोकशाही प्रभावीपणे भक्कम करणे हे स्वप्न यशवंतराव चव्हाण यांचे होते. तरुण पिढीवर व त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. शिक्षणातून नवीन पिढी निर्माण व्हावी, यावर त्यांचा अधिक कटाक्ष होता. माणसांच्या मनाचा सांधा जोडण्यावर त्यांनी अधिक भर दिला होता. दुर्बलांना सामर्थ्य देण्यासाठी सहकार चळवळीचा जन्म झाला आहे, असे ते सांगत. सामान्य माणसांचे अर्थकारण सहकाराशिवाय सुटणार नाही, ही त्यांची धारणा होती. महाराष्ट्राची जडणघडण रचनात्मक व लोकाभिमुख पद्धतीने करण्यासाठी त्यांनी आपल्या राजकारणाची दिशा निश्चित केली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	यापूर्वी राजकारणात असलेली माणसे स्वच्छ, चारित्र्यसंपन्न होती. स्वतःच आदर्श प्रतिेमेला जपणारी होती. आपले कार्य लोकशाही पद्धतीने चालणारे आहे की नाही, याचे कठोर आत्मपरीक्षण करणारी होती. गरीब, शेतकरी जनतेच्या कल्याणासाठी झटत होती. नैतिकता पाळत होती. सत्ता ही विश्वस्त या नात्याने सांभाळायची असते हे तत्त्व आता राहिले नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या काळातील राजकारणातील नैतिकता व जनकल्याणकारी चेहरा बराच विद्रूप झाल्याचे दिसते. पक्षांतर स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत त्यांच्या मनात लोककल्याणकारी भावना, नैतिकता, समाजाप्रती बांधिलकी यांचा अभाव दिसतो. आदर्श वाटावे असे नेतृत्व दुर्मीळ झाल्याची खंत वाटते आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	लोकाभिमुख राज्यकारभार या यंत्राचा विसर पडत आहे. म्हणून खंबीर नेतृत्व, स्वच्छ, पारदर्शक लोकशाही याची आज गरज आहे. राज्यातील एकता मजबूत केली पाहिजे. सामाजिक, आर्थिक विकास करताना मतभेद निर्माण न होता, ऐक्यास तडा जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विरोध विधायक असावा, तो आंधळा किंवा विरोधासाठी, विरोध नसावा. वादामधून तत्त्वबोध व्हावा. महाराष्ट्र राज्य हे जगन्नाथाचा रथ आहे. या रथास सर्वांचा हात लागला पाहिजे. त्यातच जनतेचे कल्याण आहे. जनकल्याणची चिंता सदैव मनात सर्वांनी बाळगूनच राजकारण केले पाहिजे. गरिबीशी आपण तडजोड करता कामा नये, त्यासाठी जिव्हाळ्याच्या शक्ती असतील त्या मोकळ्या केल्या पाहिजेत. विधायक विचाराचे बीज रक्तात भिजत घातले पाहिजे, ते रुजले पाहिजे तर त्यांना कोंबे फुटतील व कालांतराने फळे येतील. यासाठी आपण सर्वांनी आपल्या मनात विकासासाठी निर्धाराचे दुर्ग उभे केले पाहिजे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बहु असोत सुंदर संपन्न की महा,</strong></p>
<p>
	<strong>प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा,</strong></p>
<p>
	<strong>जय हिंद, जय महाराष्ट्र.</strong></p>
<p>
	<strong>यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचा महाराष्ट्र</strong></p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. शिवाजीराव देशमुख</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 May 2020 11:12:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 May 2020 11:31:27 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अशी आहे 'मर्‍हाटी' संस्कृती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/such-is-the-marthati-culture-120050100001_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/such-is-the-marthati-culture-120050100001_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-02/27/thumb/1_1/1582780818-6486.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-02/27/thumb/1_1/1582780818-6486.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारतीय संस्कृतीचा मिलाफ आढळतो]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="marathi din 2020" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2020-02/27/full/1582780818-6486.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="marathi bhasha din" width="740" /></p>
महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारतीय संस्कृतीचा मिलाफ आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिंठा व वेरूळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बिबी का मकबरा येथे पाहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक गड, किल्ले व दुर्ग आहेत. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग अशी काही महत्त्वपूर्ण नावे सांगता येतील.<br />
<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="gondhal" class="imgCont" height="200" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-09/29/full/1411972653-9057.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
<br />
महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारूड आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीचे रचयिते) यांच्यापासून सुरू होणारी ही परंपरा प्र.के. अत्रे, व्यंकटेश माडगूळकर, पु.ल. देशपांडे आदी  साहित्यिकांनी समृद्ध केली आहे. दरवर्षी हजारो मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणीचे प्रमुख केंद्र मुंबई हेच आहे आणि बहुतेक मारठी कलाकार या सर्व माध्यमांतून काम करतात. बाबूराव पेंटर, बाबूराव पेंढारकर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यांच्यापासून आजच्या सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीला मोलाचे योगदान दिले आहे. <br />
<br />
मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खालिडकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी प्रभृतींनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवरा भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनाथ मंगेशकर या महान कलाकारांनी रंगभूमीची अविरत सेवा केली. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसह अनेक खाजगी उपग्रह वाहिन्या आज 247 कार्यरत आहेत. राज्यातीलच नव्हे परदेशांतील मराठी भाषिकांनाही त्यांचा आस्वाद घेता येऊ लागला आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, बाजरी आणि ज्वारी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टोमॅटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापले जातात. सामिष अन्नही आवडीने खाल्ले जाते. <br />
<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="paithani sari" class="imgCont" height="335" src="https://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-12/02/full/1449055768-9196.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="350" /></p>
<br />
मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरूषांचा धोतर, पायजमा आणि सदरा असा आहे. शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात. भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ इथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ बालकांचे आवडते आहेत. दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यापैकी गणेशोत्सव सर्वात मोठा व लोकप्रिय सण आहे. त्याचबरोबर शिवजयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा व दिवाळी इत्यादी सणही साजरे केले जातात.<br />]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 May 2020 07:36:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 May 2020 07:43:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बॉम्‍बेहून कशा प्रकारे वेगळे झाले महाराष्ट्र आणि गुजरात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-and-gujarat-from-bombay-119050100009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashtra-and-gujarat-from-bombay-119050100009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2019-03/08/thumb/1_1/1552056805-9462.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2019-03/08/thumb/1_1/1552056805-9462.jpg</image>
      <description><![CDATA[पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात यांचे वेगळे अस्तित्व नव्हते. दोन्ही एकच प्रदेश बॉम्‍बे याचा भाग होते. त्यावेळी बॉम्‍बे प्रदेशात मराठी आणि गुजराती भाषा बोलणार्‍यांची संख्या अधिक होती. नंतर भाषेच्या आधारावर वेगळं राज्य व्हावे याची मागणी व्हायला लागली. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="450" src="//media.webdunia.com/_media/ml/img/article/2019-03/08/full/1552056805-9462.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात यांचे वेगळे अस्तित्व नव्हते. दोन्ही एकच प्रदेश बॉम्‍बे याचा भाग होते. त्यावेळी बॉम्‍बे प्रदेशात मराठी आणि गुजराती भाषा बोलणार्‍यांची संख्या अधिक होती. नंतर भाषेच्या आधारावर वेगळं राज्य व्हावे याची मागणी व्हायला लागली. गुजराती वेगळं राज्य इच्छित होते आणि मराठी वेगळ्या राज्यांची मागणी करू लागले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	खरं म्हणजे, राज्‍य पुनर्गठन अधिनियम 1956 अंतर्गत अनेक राज्य गठित केले गेले होते. या अंतर्गत कन्नड बोलणाऱ्या लोकांसाठी कर्नाटक राज्‍य, आणि तेलुगू बोलणार्‍यांसाठी आंध्र प्रदेश राज्य गठित करण्यात आले होते. या प्रकारेच मल्ल्याळम भाषिकांना केरळ आणि तमिळ भाषिकांसाठी तामिळनाडूची निर्मिती केली गेली. परंतू मराठी आणि गुजराती भाषिकांना वेगळे राज्य मिळाले नव्हते. म्हणून मागणी करण्यात आली.</p>
<p>
	 </p>
<p>
	वर्ष 1960 मध्ये पृथक गुजरातची मागणी करत महा गुजरात आंदोलन करण्यात आले. तसेच संयुक्त महाराष्ट्र समिती गठित करून महाराष्ट्र राज्याची मागणी व्हाल लागली. नंतर 1 मे 1960 मध्ये भारताच्या तत्कालीन नेहरू सरकार बॉम्‍बे प्रदेशाला दोन राज्यांमध्ये वाटले- महाराष्ट्र आणि गुजरात. </p>
<p>
	 </p>
<p>
	प्रकरण येथे शांत झाले नाही आता दोन्ही राज्यांमध्ये बॉम्‍बे यावरून भांडण सुरू झाले. मराठी बॉम्‍बे ठेवू बघत होते कारण तिथे अनेक लोक मराठी भाषा बोलायचे तर प्रदेशाच्या प्रगतीत योगदान असल्याचे गुजराती म्हणत होते. शेवटी बॉम्‍बेला महाराष्ट्राची राजधानी घोषित केले गेले.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 01 May 2019 12:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 01 May 2019 12:48:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मराठी असे जरी आमुची मायबोली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-din-119043000018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-din-119043000018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/home-page/2015-04/30/thumb/1_1/1430379301-2231.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/home-page/2015-04/30/thumb/1_1/1430379301-2231.jpg</image>
      <description><![CDATA[मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="maharashatra day653" class="imgCont" height="350" src="//media.webdunia.com/_media/mr/img/hp/home-page/2015-04/30/full/1430379301-2231.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार व परिस्थितीनुसार बदलत असली तरी ती एका ठराव‍िक संथ गतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही. साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून थटवून सुंदर केले, शुध्द केले. महाराष्ट्रातील आचार व‍िचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व कालात सहज संथप्रवाही स्थितीत बहरत राहिले. </p>
<p>
	 </p>
<p>
	भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी भाषिकांना मात्र वेगळे राज्य न दिल्याने महाराष्ट्रावर अन्याय झाला व मराठी अस्मिता दुखावली. त्याचेच प्रत्यंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होऊन तेरा वर्षे एकीकडे वनवास तर दुसरीकडे लढा यात माणसे व वेळ खर्ची पडली. शेवटी चळवळीला यश येऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले व मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु त्या अगोदर परप्रांतीय अमराठी लोकांनी मुंबईत मूळ धरले, एवढेच नव्हे तर त्यांचा वाढता प्रभाव जाणवू लागला होता. मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली. असे हे मराठीचे दुखणे सुरू झाले. अन्य प्रांतात व्यवहारासाठी तेथली भाषा येणे गरजेचे असते. तसे महाराष्ट्रात नाही. मराठीशिवाय महाराष्ट्रात अन्य प्रांतीय पिढ्यानपिढ्या राहू शकतात. हा आपल्या भाषेवर अन्याय आहे असे म्हणण्याचे धाडस कोण करेल? वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहूनही आमची भाषा इतरांना येत नाही यात भूषणावह काय आहे? </p>
<p>
	 </p>
<p>
	मातृभाषिक लोकसंख्येचे संतुलन बिघडले तर कालांतराने त्याचे परिणाम दिसतात. अमराठी लोकांचे वर्चस्व मराठीभाषिक राज्यात अशा काही तर्‍हेने होत राहिले की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे, असे खेदाने म्हणण्याची पाळी आली. आता तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांत अमराठी लोकच जास्त आहेत. </p>
<p>
	 </p>
<p>
	ज्यांची मातृभाषा मराठी नाही असे महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल आत्मियता दाखवतील व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहतील अशी आशा करणे फोल आहे. प्रांतात राहायचे म्हणून वरवर मराठीबद्दल आस्था असल्याचा वरवर देखावा करणे वेगळे व आम्ही मराठी आहोत व मराठी आमची भाषा असे म्हणणे वेगळे. तेव्हा मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रा‍त अमराठी लोकांचे मराठीकरण करणे हाच यावर तोडगा दिसतो. मुंबईसारख्या ठिकाणी अमराठी लोकांसाठी मराठी शिकण्याचे अल्प दरात विशेष वर्ग सुरू करायला हवेत. मुंबईत अमराठी लोकांच्या शेकडोंनी संख्या असाव्यात. त्यांची जवळीक साधून अशा संस्थांतून मराठी वर्ग चालवले तर त्यांचा जास्त उपयोग होईल. यासाठी मराठी भाषा प्रसार समिती नावाची एखादी संस्था काढायला हरकत नाही. मराठी शिकणार्‍या व शिकविणार्‍यांना उत्तेजनाथो पारितोषिके देता येतील. अमराठी लोकांमध्ये मराठीचा प्रसार करण्यासाठी असे अनेक उपक्रम योजिता येतील. भाषाभाषांमधील स्पर्धेत मराठीला आपले अस्तित्व व अस्मिता टिकवायची असेल तर हे अपरिहार्य आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आर्थिक व्यवहार व सुबत्ता यांचेशी भाषेचे फार जवळचे नाते असते. ज्याच्या हातात आर्थिक सत्तेची दोरी त्याचीच भाषा प्यारी न्यारी-अशी परिस्थिती नाकारून चालणार नाही. यासाठी मराठी लोकांनी चाकरमानी मानसिकता सोडून स्वतंत्र व्यवसायात पडावे. स्वत:चे उद्योग सुरू करावे. या सुरू झालेल्या चळवळीचे स्वगतच करायला हवे. नाहीतर इतरांची नोकरी करून कालांतराने त्यांच्या भाषेचे आक्रमण थोपविणे कठिण होईल. घराघरातून स्वतंत्र व्यवसायी उद्योगपती तयार होतील व अर्थकारणाच्या सर्व नाड्या आपल्या ताब्यात येतील तो मराठी भाषेचा सुदिन ठरेल. </p>
<p>
	 </p>
<p>
	गेल्या पन्नास वर्षात दर दहा वर्षांनी महाराष्ट्रातले चित्र कसे बदलले आहे व मराठी भाषेची परिस्थिती कुणीकडे झुकत आहे याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यादृष्ट्रीने पुढील गोष्टींचा विचार होणे अगत्याचे वाटते. </p>
<p>
	 </p>
<p>
	भारतीय जनगणनानुसार मराठी मातृभाषिक लोकसंख्या किती वाढली आहे? इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे? इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली? त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे? इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे? या सर्वांची कारणमीमांसा होऊन मराठी भाषेवर त्याचे काय परिणाम होत आहेत यांचा शोध घ्यायला हवा.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिक्षणाच्या बाबतीत मराठी भाषा अथवा माध्यमांतून शिकणार्‍यांची संख्या गेल्या पन्नास वर्षात किती वाढली? मराठी माध्यामाच्या शाळा किती वाढल्या? लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात त्यांची टक्केवारी किती आहे? मराठी बाबतीत महाविद्यालयीन व विद्यापीठांची परिस्थिती काय दर्शविते? </p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्रात हजारो मराठी स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांच्या कार्याची माहिती एकत्रित केलेली कुठे आढळत नाही. मराठी पुस्तकांचे प्रकाशक आहेत. त्या पुस्तकांसाठी ग्रंथालये आहेत, त्यांच्या वाचकांची शक्यताही वाढत असवी. वेळोवेळी यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. नियतकालिके सुरू होतात व बंदही पडतात. मराठी वर्तमान पत्रे आहेत पण जास्त करून अमराठी मालकांची. इतर भाषांच्या मानाने मराठी चि‍त्रपट कमी निघतात व त्यांना मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा तितका नसतो. या सर्व माध्यमांचे मराठी भाषेला काय योगदान आहे, हे अभ्यासायला हवे. </p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्रात शासकीय व गैरशासकीय स्तरांवर मराठीचा वापर किती होत आहे याचे काही मोजमाप योजून, त्याचे एकूण मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीवर काय परिणाम होत आहेत हे बघायला हवे. </p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी भाषा व मराठी माणूस यांना केन्द्रीभूत धरून या समाजाच्या घटकांची समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, राजकीय, शैक्षणिक इ. दृष्ट्रीकोनातून स्वतंत्र वेगवेगळ्या पातळींवर शास्त्रीय पाहणी करून त्यांचे संशोधनात्मक निष्कर्ष काय निघतात ते पाहणे मोठे उदबोधक ठरेल हे निश्चित. अशा निष्कर्षांवरून मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने व्हायला हवी हे स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी हे काम हाती घ्यायला हरकत नाही. </p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी भाषा व भाषिकांच्या समस्या महाराष्ट्रापुरत्या वेगळ्या, तर महाराष्ट्राबाहेर भारतात म्हणजे बृहन्महाराष्ट्रात वेगळ्या, तसेच भारताबाहेर परदेशात आणखीन वेगळ्या आहेत. मराठी भाषा व संस्कृतीची पाळेमुळे महाराष्ट्रात असल्यामुळे तेथे खतपाणी जितके जास्त मिळेल तितकी त्याची फळे सुमधुर चाखायला मिळतील. राज्यकर्ते मराठी असल्याने या बाबतीतले नीतीनियम हवे तसे योग्य तर्‍हेने ठरविणे कठीण नाही. </p>
<p>
	 </p>
<p>
	बृहन्महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा तर इतर प्रांतात मराठी व मराठीपण टिकविण्यासाठी हजाराहून अधिक संस्था धडपडत आहेत. त्यांची माहिती &#39;&#39;बृहन्महाराष्ट्र परिचय सूची&#39;&#39; या पुस्तकात अलिकडेच प्रसिध्द झाली आहे. बृहन्महाराष्ट्रात मराठी शिक्षणाच्या संस्था हळूहळू कमी होत आहेत. संस्थाचालक मराठी असले तरी मराठी शिक्षणाची तेथील लोकांना गरज वाटत नाही. त्यामुळे मराठीसाठी विद्यार्थी नाहीत अशी अवस्था आहे. इतर &#39;महाराष्ट्र मंडळ&#39; किंवा &#39;समाज&#39; नावाच्या संस्था आहेत. त्या आर्थिक दृष्ट्या तितक्या सबळ नाहीत. (अपवाद सोडून). तेव्हा महाराष्ट्र शासनाने व तेथील जनसामान्यांनी आपल्या बृहन्महाराष्ट्रातील बांधवांसाठी जाणीवपूर्वक आर्थिक पदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर दूरवर अनेक ठिकाणी त्यांच्यातले मराठीपण सरून पंत, खेर यांच्यासारखी आडनावेच तेवढी शिल्लक राहतील. याबाबतीत महाराष्ट्राचा दूरदर्शीपणा कमी पडू नये. </p>
<p>
	 </p>
<p>
	भारताबाहेरचा मराठी समाज हा मुख्यत: धनिक वर्ग आहे. त्यामुळे मराठीच्या संवर्धनार्थ कार्य करणे त्यांना सुलभ जाते. सर्व क्षेत्रातील मराठी श्रेष्ठ दिग्गज व्यक्तींना महाराष्ट्रातून आमंत्रित करून मराठीचा संपर्क कायम ठेवणे तेथे पैशाच्या पाठबळावर सोपे काम आहे. मराठीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ते भरपूर उपयोग करीत असतात. तिकडील मराठी संस्था व त्यांचे कार्यकर्ते मराठीच्या संवर्धनार्थ नेहमी प्रयत्नशील असतात. हे उल्लेखनीय व अभिनंदनीय आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी, भाषा, साहित्य, संस्कृती यांत इतरांना देण्यासारखे खरंच काही नाही का, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असेल तर ते नेमके काय आहे? असे देणे इतरांना आमच्या हातून दिले गेले नाही की इतरांनी ते जाणीवपूर्वक स्वत:च्या अभिमानाखातर टाळले, की आमची लेणी त्यांना क्षुल्लक वाटली? </p>
<p>
	 </p>
<p>
	खरे तर सध्याचे जग हे स्पर्धेचे जग आहे. त्यात निरनिराळ्या भाषांची वर्चस्वासाठी स्पर्धा टाळता येणार नाही. मराठीपुरते बोलायचे तर मराठीने आपली खिडक्यादारे दुसर्‍यांना आत शिरण्यासाठी सदैव खुली ठेवली. आपण त्यांची भाषा शिकलो ते त्यांच्या भाषेतील साहित्य आमच्या भाषेत आणण्यासाठी. हा उदारपणा एकतर्फी असता कामा नये हे भान मात्र आम्ही ठेवले नाही. महाराष्ट्राजवळ व मराठी साहित्यात असलेला अमोल ठेवा इतर भाषिकांनी घ्यावा यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न झाले असले तर ते नगण्यच. </p>
<p>
	 </p>
<p>
	तेव्हा, मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीची ओळख इतर भाषिकांना व्हावी यासाठी चिकाटीने विशेष प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी स्वतंत्र प्रकल्प, स्वतंत्र निधी व विश्वस्तांची योजना आखायला हवी. सुरूवातीस शंभर उत्कृष्ठ मौल्यवान मराठी ग्रंथांची निवड करून त्यांचे रूपांतर, भाषांतर निदान बंगाली, उडीया, तेलगु, तामीळ, कानडी, मल्याळम, गुजराथी, असमी, हिंदी भाषांमध्ये करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. तसेच या भाषांमधून स्वतंत्र मासिक अथवा द्वैमासिक काढून त्यातून मराठीतील निवडक ललित व इतर साहित्याचे अनुवाद प्रसिध्द करायला हवे. अनुवादकांची साखळी निर्माण करून यासाठी लागणारा खर्च व विक्री यंत्रणा उभी करायला हवी. </p>
<p>
	 </p>
<p>
	निरनिराळ्या प्रांतातील मराठी भाषिक संस्थांनी या उपक्रमास हातभार लावायला हवा. आम्ही आता एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. संपर्क साधने, दूरदर्शन, संगणक, फॅक्स, इ-मेल इ. सुविधा प्राप्त झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे सर्व जग एकमेकापासून हाकेच्या अंतरावर आले आहे. या साधनांचा उपयोग मराठी भाषेच्या प्रचार प्रसारार्थ करायला हवा. दूरचित्रवाणीवर आता काही मराठी वाहिनी उपलब्ध झाल्याने मराठी कार्यक्रम बघण्याची सोय झाली आहे. परंतु मराठी वाहिनी किंवा रेडिओचे मराठी कार्यक्रम ज्या प्रमाणात संपूर्ण देशभर जायला पाहिजेत त्या प्रमाणात जात नाहीत ही दूरवरची खंत आहे. वाहिनी वितरक व केबलवाल्यांच्या मर्जीवर बर्‍याच जणांना अवलंबून राहवे लागते. यातून काही मार्ग काढायला हवा. ध्वनीफीतींद्वारे मराठी संगीत घरोघरी ऐकण्यास खूपच मदत झाली. पुढील पिढ्यापर्यंत मराठी मातृभाषेचे प्रेम टिकून राहावे व वृध्दिंगत व्हावे यासाठी आजच्या पिढीने दूरदृष्टीने ही वाटचाल मार्गी लावणे फार आवश्यक आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	मराठी भाषेचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जागतिक परिषद, साहित्य संमेलने, बृहन्महाराष्ट्र मंडळ इ. सारख्या मराठीसाठी झटणार्‍या देशपरदेशातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने काम केल्यास समर्थांनी सांगितल्याप्रमाणे &#39;मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा&#39; या उपदेशाचे पालन करून मायमराठीचे ऋण फेडल्यासारखे होईल. जय मराठी!</p>
<p>
	 </p>
<p>
	(महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या &#39;मालविका&#39; या स्मरणिकेतून साभार)</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 30 Apr 2019 13:04:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 30 Apr 2019 13:10:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र दिन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-day-110050100010_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-day-110050100010_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-04/30/thumb/1_1/1493574730-4162.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-04/30/thumb/1_1/1493574730-4162.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="maharashatra" class="imgCont" height="407" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-10/18/full/1476770316-9155.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	<font style="font-size:11pt; color:#800040">महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषात महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले. नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंतांनी गायिली आहे. तर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापटांनी दिली आहे.</font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">मराठी भाषेचे राज्य आल्यावर आपल्या मातृभाषेला चांगले दिवस येतील, अशी केवळ अपेक्षाच नव्हे, तर खात्री मराठी जनतेला वाटत होती. पारतंत्र्याच्या काळात, नसे आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, असे भावपूर्ण स्वप्न माधव ज्यूलियन यांनी शब्दबद्ध केले होते. मराठी भाषा मृत होऊ लागली आहे. मरू घातली आहे, असे अनेक शहाणेसुरते उघड-उघड बोलू लागले.</font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">अरे, गीतोपदेशाच्या अमृताचा महाराष्ट्र शारदेवर महाभिषेक करणार्‍या ज्ञानोबांनी या मराठीच्या बोलांनी आपण अमृतालाही पैजेवर जिंकू, अशी प्रतिज्ञा केली होती. अमृतालाही जिंकणारी भाषा मृत होईल? संतांनी लोकगीतांपासून, ब्रह्मपदाचा मार्ग सांगणार्‍या विचारगर्भ अध्यात्मापर्यंत या मराठी भाषेचा मुक्त संचार सर्वत्र घडविला. ही कधी पायात सुवर्णशब्दांचे नादमधुर पैंजण बांधून लोकरंजनासाठी नाचली, तर कधी डफ-तुणतुण्यांच्या साथीने वीराचे बाहू स्फुरण पावण्यासाठी शाहिरांच्या वीररसात न्हाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेतच आपले लोककल्याणाचे आदेश दर्‍याखोर्‍यांत आणि खेड्यापाड्यात पोहोचविले. मराठी भाषेने सप्तसुरांच्या नादात आणि नवरसांच्या रंगांत इथल्या रंगभूमीवर असे काही, वैभव संपादन करून ठेवले की, भारतातल्याच नव्हे, जगातील भाषांना मराठीचा हेवा वाटावा.</font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">फार कशाला, या महाराष्ट्राच्या लेकरांनी मराठी भाषेची अनेकविध प्रकाराने सेवा तर केलीच, पण हिंदी भाषेचा आद्य पत्रकारही मूळचा महाराष्ट्रीय होता. गुजराती भाषेच्या व्याकरणाचे नियम करण्यात ज्याने फार मोठी कामगिरी बजावली तो विद्वान या मराठी भूमीचा पुत्र होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गर्जून सांगणारे नरकेसरी लोकमान्य या मराठी भूमीतच जन्माला आले. देशाला समानतेचा मंत्र देणारे फुले-आंबेडकर या महाराष्ट्रातच निर्माण झाले. संगीतशास्त्राच्या क्षेत्रात आसेतुहिमाचल ज्यांची कारकीर्द गाजली, मौलिक स्वरुपाची ठरली ते पलुस्कर, भातखंडे इथलेच. अहो, बोलपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके काय किंवा पहिले मराठी चित्रपटातील राष्ट्रपती पदक मिळविण्याचा पराक्रम करणारे आचार्य अत्रे काय, मराठी मातीचेच सुपुत्र. देशाला प्रचलित काळानुसार धर्मशास्त्र समजावून सांगून धर्मसिंधु सारखा सर्वमान्य ग्रंथ लिहिणारे बाबा पाध्ये आपल्या पंढरपूरचे. किती नावे सांगावीत? नाटक कंपनीबरोबर गावोगावी फिरून असंख्या हातांचे ठसे घेऊन त्रिरेखावेलाप्रबोध नावाचा लोकोत्तर ग्रंथ लिहिणारे ज. वा. जोशी इथलेच. केवळ मराठीतच नव्हे, तर इंग्रजी, गुजरातीपासून हिब्रूपर्यंत विविध प्रकारचे टाईप तयार करणारे आद्य मुद्रक महर्षि जावजी दादाजी हे महाराष्ट्राचेच.</font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">कालमापनाच्या क्षेत्रात भारतीयांची कामगिरी विश्वभाषेतून मांडतांना एका इंग्रजसाहेबाला साहाय्य घ्यावे लागले ते मराठीभाषिक शं. बा. दीक्षित यांचेच. मराठी भाषिक कर्तृत्वाची ही केवळ एक झलक.</font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">इतक्या थोरांनी गौरविलेली भाषा मृत होणार असे आपण कसे म्हणे शकू ? मराठी भिकारीण झाली, तरीही कुशीचा तिच्या तीस केवि त्यजी या शब्दांत मराठीचे पुत्र मराठीला अंतर देणार नाहीत, अशी आत्मविश्वासपूर्ण भविष्यवाणी माधव ज्यूलियन यांनी कित्येक वर्षांपूर्वी वर्तविली होती. ती सार्थ आणि यथार्थ ठरेल, अशी अपेक्षा आपण यंदाच्या महाराष्ट्र दिनी बाळगूया.</font><br />
	 <br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">साभार : महान्यूज</font></p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 30 Apr 2019 12:25:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 30 Apr 2019 12:35:53 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आज कामगार दिन. त्यानिमित्त ... विडी कामगारांच्या व्यथा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/beedi-workers-labour-day-special-118050100012_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/beedi-workers-labour-day-special-118050100012_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-05/01/thumb/1_1/1525167637-3285.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-05/01/thumb/1_1/1525167637-3285.jpg</image>
      <description><![CDATA[बरेच दिवस माझी विद्यार्थिनी ज्योती कॉलेजमध्ये दिसली नाही. तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केल्यावर कळलं की, तिला घरातून शिक्षणाची परवानगी नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="labour day special" class="imgCont" height="354" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2018-05/01/full/1525167637-3285.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
	</p>
	बरेच दिवस माझी विद्यार्थिनी ज्योती कॉलेजमध्ये दिसली नाही. तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केल्यावर कळलं की, तिला घरातून शिक्षणाची परवानगी नाही. पण काही दिवसांपूर्वी अचानक ज्योती कॉलेजमध्ये दिसली. मी तिला कॉलेजला न येण्याचं कारण विचारताच &#39;मॅडम, मला जगायचं नाही, मरायचं आहे. मी आत्महत्या करण्याचा विचार करते.&#39; या तिच्या हेलावून टाकणार उत्तराने मी स्तब्ध झाले. कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये बसून बराच वेळ रडून झाल्यावर ज्योती बोलू लागली...</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;मॅडम, माझी आई आणि मी विड्या करून घर चालवत होतो. घरात दोन लहान भाऊ आहेत. वडील मिलमध्ये कामगार म्हणून काम करीत होते. आणि मिल बंद पडली तसं ते हळूहळू दारूच्या आहारी गेले. मग रोज दारू पिण्यासाठी आई आणि माझ्याकडे पैशांची मागणी करू लागले. मारहाण, उपासार हे रोजचेच झाले. आई दोन वर्षांपूर्वी वारली. आणि घर माझ्या एकटीवर येऊन पडले. शिक्षणाचा काहीही संबंध नसलेल्या माझ्या वडिलांनी मुलगी म्हणजे त्यांच्या दृष्टीने चूल आणि मूल इतकेच मर्यादित होते. वडिलांनी माझे लग्र एका अशा मुलाशी लावून दिले जो व्यसनी, बाहेरख्याली होता. </p>
<p>
	 </p>
<p>
	सासरच्यांनी माझ्या शिक्षणावर बंदी आणली आणि विड्या करण्याची सक्ती करू लागले. बरं ज्याच्या जवळ मन मोकळं करावं तो नवरा मात्र व्यसनात, चुकीच्या संबंधात बुडालेला. शेवटी कंटाळून मी माहेरी आले.</p>
<p>
	 </p>
<p>
	मॅडम, आता समाजात विड्या करणार्‍या मुलींची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. या विडी व्यवसायात महिला कामगारांचा अधिक सहभाग आहे. शहरातील गिरण्या बंद पडल्यामुळे, जागतिकीकरण, महागाई, आर्थिक मंदी याचा फटका विडी उद्योगातील कुटुंबीयांना बसला.</p>
<p>
	 </p>
<p>
	हजारो कामगारांची घरे चरितार्थ चालविण्यासाठी विडी उद्योगावर अवलंबून आहेत. या व्यवसायात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मालकवर्गाकडून ठराविक विड्या वळण्याची सक्ती, कामाच्या मोबदल्यात कमी पगार, रजा नाही. अशा परिस्थितीत कामगार जगत असताना कुटुंबाची दैनंदिन उपजीविका भागविण्यासाठी नाईलाजाने लहान मुलांना शाळेत न जाता बांधकाम मजुरी, कामगार, हॉटेल कामगार, कपडे शिलाई कामगार, चादर कारखाना कामगार अशी कामे करावी लागतात. पर्यायाने मुले शाळेत न जाता बालमजूर म्हणून जगतात. मुलींना आईच्या हाताखाली विड्या वळण्याचे काम करावे लागते. आणि हळूहळू त्यादेखील शाळा सोडून विडी वळण्यात सक्रिय होतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	विडी कामगार म्हणून जगण्यास सुरुवात करतात. विडीचे कार्ड असेल तर त्या मुलीचे लग्र लवकर होते. लग्रानंतर गरोदरपणातही तिला विड्या वळण्याचे काम करावे लागते. तंबाखूच्या सान्निध्यात काम करत असताना कर्करोग, क्षयरोग, रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अगदी कमी पगारात काम करत आल्याने त्यांच्या कुटुंबाला निरक्षरता, गरिबी, बालकामगार आणि बालविवाह प्रथेचे वेष्टन आवळले गेले आहे. या निरक्षरतेमुळे विडी कागारांचे राहणीमान सुधारत नाही. जीवन उंचावत नाही. यामुळे समाजातील काम करणार्‍या विडी कामगारांचा विकास खुंटला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	विडी कामगार ज्या परिसरात, झोपडपट्ट्यांमधून राहातात तो परिसर शहरातील गलिच्छ वस्ती म्हणून ओळखला जातो. येथे साठणारा तेंदूपत्तचा कचरा, अस्वच्छ घरे, उघडी असणारी ड्रेनेजस, शहरातील कारखान्यांमधून सांडपाण्याचे नाले यामुळे विडी कागारांना सतत आजारांना सामोरे जावे लागते.&#39; ज्योती न थांबता बराच वेळ बोलत होती. तिच्या बोलण्यामधून विडी कागारांच्या व्यथा व त्यांच्या अवस्थेबद्दलचा तीव्र संताप व्यक्त होत होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	खरंच, आज गरज आहे कामगारांचे आयुष्य आणि भविष्य सुधारण्यासाठी आवश्यक वेतन, मजुरी देण्याची. विडी कामगारांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याची आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन एक सुशिक्षित व सुसंस्कृत समाज निर्माण करण्याची.</p>
<p>
	प्रा. डॉ. वंदना भानप</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 01 May 2018 15:05:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 01 May 2018 15:12:08 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मराठी असे जरी आमुची मायबोली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatara-day-110042900028_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatara-day-110042900028_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-02/27/thumb/1_1/1425013265-515.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-02/27/thumb/1_1/1425013265-515.jpg</image>
      <description><![CDATA[मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="maharashatra din" class="imgCont" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-05/01/full/1398925465-1199.jpg" style="border: 1px solid rgb(221, 221, 221); margin-right: 0px; z-index: 0; width: 370px; height: 205px;" title="" /></p>
<p style="text-align: justify;">
	<font style="font-size:11pt; color:#000000">मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार व परिस्थितीनुसार बदलत असली तरी ती एका ठराव‍िक संथ गतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही. साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून थटवून सुंदर केले, शुध्द केले. महाराष्ट्रातील आचार व‍िचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व कालात सहज संथप्रवाही स्थितीत बहरत राहिले. </font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी भाषिकांना मात्र वेगळे राज्य न दिल्याने महाराष्ट्रावर अन्याय झाला व मराठी अस्मिता दुखावली. त्याचेच प्रत्यंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होऊन तेरा वर्षे एकीकडे वनवास तर दुसरीकडे लढा यात माणसे व वेळ खर्ची पडली. शेवटी चळवळीला यश येऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले व मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु त्या अगोदर परप्रांतीय अमराठी लोकांनी मुंबईत मूळ धरले, एवढेच नव्हे तर त्यांचा वाढता प्रभाव जाणवू लागला होता. मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली. असे हे मराठीचे दुखणे सुरू झाले. अन्य प्रांतात व्यवहारासाठी तेथली भाषा येणे गरजेचे असते. तसे महाराष्ट्रात नाही. मराठीशिवाय महाराष्ट्रात अन्य प्रांतीय पिढ्यानपिढ्या राहू शकतात. हा आपल्या भाषेवर अन्याय आहे असे म्हणण्याचे धाडस कोण करेल? वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहूनही आमची भाषा इतरांना येत नाही यात भूषणावह काय आहे? </font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">मातृभाषिक लोकसंख्येचे संतुलन बिघडले तर कालांतराने त्याचे परिणाम दिसतात. अमराठी लोकांचे वर्चस्व मराठीभाषिक राज्यात अशा काही तर्‍हेने होत राहिले की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे, असे खेदाने म्हणण्याची पाळी आली. आता तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांत अमराठी लोकच जास्त आहेत. </font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">ज्यांची मातृभाषा मराठी नाही असे महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल आत्मियता दाखवतील व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहतील अशी आशा करणे फोल आहे. प्रांतात राहायचे म्हणून वरवर मराठीबद्दल आस्था असल्याचा वरवर देखावा करणे वेगळे व आम्ही मराठी आहोत व मराठी आमची भाषा असे म्हणणे वेगळे. तेव्हा मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रा‍त अमराठी लोकांचे मराठीकरण करणे हाच यावर तोडगा दिसतो. मुंबईसारख्या ठिकाणी अमराठी लोकांसाठी मराठी शिकण्याचे अल्प दरात विशेष वर्ग सुरू करायला हवेत. मुंबईत अमराठी लोकांच्या शेकडोंनी संख्या असाव्यात. त्यांची जवळीक साधून अशा संस्थांतून मराठी वर्ग चालवले तर त्यांचा जास्त उपयोग होईल. यासाठी मराठी भाषा प्रसार समिती नावाची एखादी संस्था काढायला हरकत नाही. मराठी शिकणार्‍या व शिकविणार्‍यांना उत्तेजनाथो पारितोषिके देता येतील. अमराठी लोकांमध्ये मराठीचा प्रसार करण्यासाठी असे अनेक उपक्रम योजिता येतील. भाषाभाषांमधील स्पर्धेत मराठीला आपले अस्तित्व व अस्मिता टिकवायची असेल तर हे अपरिहार्य आहे.</font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">आर्थिक व्यवहार व सुबत्ता यांचेशी भाषेचे फार जवळचे नाते असते. ज्याच्या हातात आर्थिक सत्तेची दोरी त्याचीच भाषा प्यारी न्यारी-अशी परिस्थिती नाकारून चालणार नाही. यासाठी मराठी लोकांनी चाकरमानी मानसिकता सोडून स्वतंत्र व्यवसायात पडावे. स्वत:चे उद्योग सुरू करावे. या सुरू झालेल्या चळवळीचे स्वगतच करायला हवे. नाहीतर इतरांची नोकरी करून कालांतराने त्यांच्या भाषेचे आक्रमण थोपविणे कठिण होईल. घराघरातून स्वतंत्र व्यवसायी उद्योगपती तयार होतील व अर्थकारणाच्या सर्व नाड्या आपल्या ताब्यात येतील तो मराठी भाषेचा सुदिन ठरेल. </font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">गेल्या पन्नास वर्षात दर दहा वर्षांनी महाराष्ट्रातले चित्र कसे बदलले आहे व मराठी भाषेची परिस्थिती कुणीकडे झुकत आहे याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यादृष्ट्रीने पुढील गोष्टींचा विचार होणे अगत्याचे वाटते. </font><br />
	<br />
	<font style="font-size:11pt; color:#000000">भारतीय जनगणनानुसार मराठी मातृभाषिक लोकसंख्या किती वाढली आहे? इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे? इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली? त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे? इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे? या सर्वांची कारणमीमांसा होऊन मराठी भाषेवर त्याचे काय परिणाम होत आहेत यांचा शोध घ्यायला हवा. </font></p><font style="font-size:11pt; color:#000000">शिक्षणाच्या बाबतीत मराठी भाषा अथवा माध्यमांतून शिकणार्‍यांची संख्या गेल्या पन्नास वर्षात किती वाढली? मराठी माध्यामाच्या शाळा किती वाढल्या? लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात त्यांची टक्केवारी किती आहे? मराठी बाबतीत महाविद्यालयीन व विद्यापीठांची परिस्थिती काय दर्शविते? </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">महाराष्ट्रात हजारो मराठी स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांच्या कार्याची माहिती एकत्रित केलेली कुठे आढळत नाही. मराठी पुस्तकांचे प्रकाशक आहेत. त्या पुस्तकांसाठी ग्रंथालये आहेत, त्यांच्या वाचकांची शक्यताही वाढत असवी. वेळोवेळी यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. नियतकालिके सुरू होतात व बंदही पडतात. मराठी वर्तमान पत्रे आहेत पण जास्त करून अमराठी मालकांची. इतर भाषांच्या मानाने मराठी चि‍त्रपट कमी निघतात व त्यांना मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा तितका नसतो. या सर्व माध्यमांचे मराठी भाषेला काय योगदान आहे, हे अभ्यासायला हवे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">महाराष्ट्रात शासकीय व गैरशासकीय स्तरांवर मराठीचा वापर किती होत आहे याचे काही मोजमाप योजून, त्याचे एकूण मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीवर काय परिणाम होत आहेत हे बघायला हवे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">मराठी भाषा व मराठी माणूस यांना केन्द्रीभूत धरून या समाजाच्या घटकांची समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, राजकीय, शैक्षणिक इ. दृष्ट्रीकोनातून स्वतंत्र वेगवेगळ्या पातळींवर शास्त्रीय पाहणी करून त्यांचे संशोधनात्मक निष्कर्ष काय निघतात ते पाहणे मोठे उदबोधक ठरेल हे निश्चित. अशा निष्कर्षांवरून मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने व्हायला हवी हे स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी हे काम हाती घ्यायला हरकत नाही. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">मराठी भाषा व भाषिकांच्या समस्या महाराष्ट्रापुरत्या वेगळ्या, तर महाराष्ट्राबाहेर भारतात म्हणजे बृहन्महाराष्ट्रात वेगळ्या, तसेच भारताबाहेर परदेशात आणखीन वेगळ्या आहेत. मराठी भाषा व संस्कृतीची पाळेमुळे महाराष्ट्रात असल्यामुळे तेथे खतपाणी जितके जास्त मिळेल तितकी त्याची फळे सुमधुर चाखायला मिळतील. राज्यकर्ते मराठी असल्याने या बाबतीतले नीतीनियम हवे तसे योग्य तर्‍हेने ठरविणे कठीण नाही. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">बृहन्महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा तर इतर प्रांतात मराठी व मराठीपण टिकविण्यासाठी हजाराहून अधिक संस्था धडपडत आहेत. त्यांची माहिती &#39;&#39;बृहन्महाराष्ट्र परिचय सूची&#39;&#39; या पुस्तकात अलिकडेच प्रसिध्द झाली आहे. बृहन्महाराष्ट्रात मराठी शिक्षणाच्या संस्था हळूहळू कमी होत आहेत. संस्थाचालक मराठी असले तरी मराठी शिक्षणाची तेथील लोकांना गरज वाटत नाही. त्यामुळे मराठीसाठी विद्यार्थी नाहीत अशी अवस्था आहे. इतर &#39;महाराष्ट्र मंडळ&#39; किंवा &#39;समाज&#39; नावाच्या संस्था आहेत. त्या आर्थिक दृष्ट्या तितक्या सबळ नाहीत. (अपवाद सोडून). तेव्हा महाराष्ट्र शासनाने व तेथील जनसामान्यांनी आपल्या बृहन्महाराष्ट्रातील बांधवांसाठी जाणीवपूर्वक आर्थिक पदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर दूरवर अनेक ठिकाणी त्यांच्यातले मराठीपण सरून पंत, खेर यांच्यासारखी आडनावेच तेवढी शिल्लक राहतील. याबाबतीत महाराष्ट्राचा दूरदर्शीपणा कमी पडू नये. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">भारताबाहेरचा मराठी समाज हा मुख्यत: धनिक वर्ग आहे. त्यामुळे मराठीच्या संवर्धनार्थ कार्य करणे त्यांना सुलभ जाते. सर्व क्षेत्रातील मराठी श्रेष्ठ दिग्गज व्यक्तींना महाराष्ट्रातून आमंत्रित करून मराठीचा संपर्क कायम ठेवणे तेथे पैशाच्या पाठबळावर सोपे काम आहे. मराठीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ते भरपूर उपयोग करीत असतात. तिकडील मराठी संस्था व त्यांचे कार्यकर्ते मराठीच्या संवर्धनार्थ नेहमी प्रयत्नशील असतात. हे उल्लेखनीय व अभिनंदनीय आहे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">मराठी, भाषा, साहित्य, संस्कृती यांत इतरांना देण्यासारखे खरंच काही नाही का, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असेल तर ते नेमके काय आहे? असे देणे इतरांना आमच्या हातून दिले गेले नाही की इतरांनी ते जाणीवपूर्वक स्वत:च्या अभिमानाखातर टाळले, की आमची लेणी त्यांना क्षुल्लक वाटली? </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">खरे तर सध्याचे जग हे स्पर्धेचे जग आहे. त्यात निरनिराळ्या भाषांची वर्चस्वासाठी स्पर्धा टाळता येणार नाही. मराठीपुरते बोलायचे तर मराठीने आपली खिडक्यादारे दुसर्‍यांना आत शिरण्यासाठी सदैव खुली ठेवली. आपण त्यांची भाषा शिकलो ते त्यांच्या भाषेतील साहित्य आमच्या भाषेत आणण्यासाठी. हा उदारपणा एकतर्फी असता कामा नये हे भान मात्र आम्ही ठेवले नाही. महाराष्ट्राजवळ व मराठी साहित्यात असलेला अमोल ठेवा इतर भाषिकांनी घ्यावा यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न झाले असले तर ते नगण्यच. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">तेव्हा, मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीची ओळख इतर भाषिकांना व्हावी यासाठी चिकाटीने विशेष प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी स्वतंत्र प्रकल्प, स्वतंत्र निधी व विश्वस्तांची योजना आखायला हवी. सुरूवातीस शंभर उत्कृष्ठ मौल्यवान मराठी ग्रंथांची निवड करून त्यांचे रूपांतर, भाषांतर निदान बंगाली, उडीया, तेलगु, तामीळ, कानडी, मल्याळम, गुजराथी, असमी, हिंदी भाषांमध्ये करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. तसेच या भाषांमधून स्वतंत्र मासिक अथवा द्वैमासिक काढून त्यातून मराठीतील निवडक ललित व इतर साहित्याचे अनुवाद प्रसिध्द करायला हवे. अनुवादकांची साखळी निर्माण करून यासाठी लागणारा खर्च व विक्री यंत्रणा उभी करायला हवी. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">निरनिराळ्या प्रांतातील मराठी भाषिक संस्थांनी या उपक्रमास हातभार लावायला हवा. आम्ही आता एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. संपर्क साधने, दूरदर्शन, संगणक, फॅक्स, इ-मेल इ. सुविधा प्राप्त झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे सर्व जग एकमेकापासून हाकेच्या अंतरावर आले आहे. या साधनांचा उपयोग मराठी भाषेच्या प्रचार प्रसारार्थ करायला हवा. दूरचित्रवाणीवर आता काही मराठी वाहिनी उपलब्ध झाल्याने मराठी कार्यक्रम बघण्याची सोय झाली आहे. परंतु मराठी वाहिनी किंवा रेडिओचे मराठी कार्यक्रम ज्या प्रमाणात संपूर्ण देशभर जायला पाहिजेत त्या प्रमाणात जात नाहीत ही दूरवरची खंत आहे. वाहिनी वितरक व केबलवाल्यांच्या मर्जीवर बर्‍याच जणांना अवलंबून राहवे लागते. यातून काही मार्ग काढायला हवा. ध्वनीफीतींद्वारे मराठी संगीत घरोघरी ऐकण्यास खूपच मदत झाली. पुढील पिढ्यापर्यंत मराठी मातृभाषेचे प्रेम टिकून राहावे व वृध्दिंगत व्हावे यासाठी आजच्या पिढीने दूरदृष्टीने ही वाटचाल मार्गी लावणे फार आवश्यक आहे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">मराठी भाषेचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जागतिक परिषद, साहित्य संमेलने, बृहन्महाराष्ट्र मंडळ इ. सारख्या मराठीसाठी झटणार्‍या देशपरदेशातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने काम केल्यास समर्थांनी सांगितल्याप्रमाणे &#39;मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा&#39; या उपदेशाचे पालन करून मायमराठीचे ऋण फेडल्यासारखे होईल. जय मराठी!</font><br />
<br />
(<font style="font-size:11pt; color:#000000">महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या &#39;मालविका&#39; या स्मरणिकेतून साभार) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 30 Apr 2018 13:18:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 30 Apr 2018 13:23:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्राची खाद्यपरंपरा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-day-113050100009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatra-day-113050100009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA["’अन्न हे पूर्णब्रम्ह’ हे तत्त्व महाराष्ट्रीय अगदी मनापासून पाळतात. म्हणजेच मराठी संस्कृतीत अन्नाचा मान विश्वनिर्मिती करणा-या ब्रम्हदेवासमान आहे. इथली माणसं अन्न सेवन करण्यापूर्वी ते देवाला नैवेद्य म्हणून कृतज्ञतेने अर्पण करतात. हेतू हा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="maharashtra bhojan" class="imgCont" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-02/27/full/1456556260-0387.jpg" style="border: 1px solid rgb(221, 221, 221); margin-right: 0px; z-index: 0; width: 410px; height: 283px;" title="" /></p>
<font style="font-size:11pt; color:#800040">’अन्न हे पूर्णब्रम्ह’ हे तत्त्व महाराष्ट्रीय अगदी मनापासून पाळतात. म्हणजेच मराठी संस्कृतीत अन्नाचा मान विश्वनिर्मिती करणा-या ब्रम्हदेवासमान आहे. इथली माणसं अन्न सेवन करण्यापूर्वी ते देवाला नैवेद्य म्हणून कृतज्ञतेने अर्पण करतात. हेतू हा की ’त्याने’ जे दिले, त्यावर ’त्याचा’ मान पहिला. विशेषत: सणासुदीला काही नैवेद्याचे पदार्थ खास इष्टदेवतेसाठी करण्याची प्रथा येथे आहे. उदा. उकडीचे मोदक (गणेश चतुर्थी), सत्यनारायण महापूजा (शिरा), इ.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">महाराष्ट्रात पक्वान्नांचे स्वाद-सुगंध, स्वरुप- शैली इतक्या विविध आहेत, की हे पदार्थ सेवन करणे म्हणजे पर्वणीच असते. महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती मध्ये प्रामुख्याने कोंकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खानदेशी व-हाडी असे पाच मुख्य प्रकार आहेत. कोकणी पध्दतीत खोबरे विशेषत्वाने वापरतात, तर वर्हा्डी पध्दतीत तेल विशेष वापरतात.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">खोवलेले (किसलेले) खोबरे बर्या्च पाककृतींच्या मसाल्यात वापरतात, पण तरीही खोबरेल तेल मात्र तितकंसं वापरलं जात नाही. भाज्यांमध्ये शेंगदाणे, काजू बर्यातचदा वापरले जातात, पण तरीही शेंगदाण्याचं तेल मुख्य स्वयंपाकासाठी वापरतात. दुसरा महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे कोकम पेय (कोकम फळांपासून बनविलेल व सोलकढी) जेवणानंतर पाचक पेय म्हणून कोकणात दिली जाते.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">मत्स्याहारात सर्वात लोकप्रिय मासा आहे बोंबील, जो तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो. जेवणात भात किंवा तांदळाच्या, ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर शाकाहारी किंवा मांसाहारी मत्स्याहारात सर्वात लोकप्रिय मासा आहे बोंबील, जो तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो. जेवणात भात किंवा तांदळाच्या, ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ सेवन केले जातात. तांदळाचे वडे आणि आंबोळ्या /घावन हे तांदळाचे पीठ आंबवून तव्यावर केले जाते. शाकाहारी बेत असला की सर्वाधिक पसंती मिळते ती वांग्याला. भरली वांगी म्हणजे वांगी मधोमध चिरुन त्यात खोबरं व इतर मसाला भरुन ही कढईत तळतात. पापडाशिवाय शाकाहारी बेत अपूर्ण वाटतो पापड भाजून किंवा तळून खातात. पुरणपोळी हा महाराष्ट्रात सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे. हरभर्याीची डाळ आणि गूळ एकत्र शिजवून त्याचे सारण तयार करतात. त्याला पुरण म्हणतात. हे पुरण कणकेच्या गोळ्यात भरुन त्याची पोळी लाटतात व ती तव्यावर भाजतात. या पोळीला पुरणपोळी म्हणतात. पुरणपोळीप्रमाणेच केशर घातलेलं श्रीखंड हाही तितकाच आवडता पदार्थ आहे.</font><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1305/01/images/img1130501009_2_1.jpg' alt='maharastra fesvital food recipe' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MH GOVT</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#800040'><b>सणासुदीचे पदार्थ:</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>गुढी पाडवा, होळी, हरतालिका, गणेश चतुर्थी, दिवाळी, मकर संक्रांत हे महाराष्ट्राचे खास सण आहेत. या सणांसाठी खालील विशेष पदार्थ करतात:</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'><b>गुढी पाडवा: </font><font style=' color:#000000;'></b>कडूलिंब व गूळ  व वाटली डाळ व मोड आलेल्या हरभर्यारची उसळ</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'><b>होळी: </font><font style=' color:#000000;'></b>पुरणपोळी</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'><b>गणेश चतुर्थी: </font><font style=' color:#000000;'></b>उकडीचे मोदक</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'><b>दिवाळी: </font><font style=' color:#000000;'></b>करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसा</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#8000FF'><b>मकर संक्रांत : </font><font style=' color:#000000;'></b>तिळगूळ, तीळवडी, पांढरा शुभ्र काटेरी हलवा.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#800080'><b>विवाहप्रसंगीचे विविध पदार्थ:</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>विवाहाचे विधीनंतर केळीच्या पानावर पारंपरिक पंगती बसत असत. हे भोजन पूर्णत: शाकाहारी व कांदा, लसूण याशिवाय असावे असा प्रघात असे. यामध्ये खोबरं घालून केलेली आळुभाजी, कैरीची चटणी, बटाटाभाजी, भजी, कोशिंबीर, भात (केशरी भात, मसालेभात), पु-या , वरण व त्याबरोबर जिलबी, मलईदार बासुंदी, केशरयुक्त श्रीखंड, कोथिंबीर-मीठ घातलेलं ताक आणि शेवटी वेलची व लवंगासह विडा (पान) असा बेत असतो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 30 Apr 2017 23:19:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sun, 30 Apr 2017 23:19:54 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['चव्हाण' ते 'चव्हाण' एक प्रवास...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/-चव्हाण-ते-चव्हाण-एक-प्रवास-110043000055_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/-चव्हाण-ते-चव्हाण-एक-प्रवास-110043000055_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[१ मे १९६० ला महाराष्ट्राची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० पासून १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत धुरा सांभाळली. यशवंतराव चव्हाण यांचे 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' असेही वर्णन केले जाते. नावातच "यश" आणि "यशवंत" ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1004/30/images/img1100430055_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">MH Govt</p>MH GOVT</p></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>१ मे १९६० ला महाराष्ट्राची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० पासून १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत धुरा सांभाळली.  यशवंतराव चव्हाण यांचे 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' असेही वर्णन केले जाते. नावातच "यश" आणि "यशवंत" असल्यामुळे त्यांना प्रारब्ध भाग्य आणि नशीब  दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य केले.  ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असेही  त्यांना म्हणता येईल. गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना समाजातील तळागाळाच्या घटकांच्या समस्या ज्ञात होत्या, त्या दृष्टीने देखील त्यांनी योजना आखल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात सहकार चळवळीपासून अनेक साखर कारखान्यांच्या स्थापनेसह कृषि, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यशवंतरावांनी मुख्यमंत्री पदानंतर उपपतंप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री अशी महत्वाची पदे देखील सांभाळली. यशवंतराव यांची दुसरी ओळख म्हणजे त्यांचा  साहित्यातही नावलौकिक असून ऋणानुबंध आणि कृष्णाकाठ या लिखित पुस्तकांमध्ये त्यांच्यातला चांगला लेखक दिसतो. याचबरोबर त्यांची पत्रं, त्यांना आलेली  महनीयांची पत्रं देखील अजूनही जतन केलेली असून या पत्रांमुळे त्यांचा जनसंपर्क दिसून येतो. कराड येथे त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्या विविध वस्तूंचे जतन  करण्यात आले आहे. यशवंतरावांना चीन युद्धाच्या वेळी संरक्षणमंत्री पदावर नियुक्त करण्यात येऊन यावेळी त्यांनी त्यांचे कर्तृत्वाचे आणि निर्णयक्षमतेचा आदर्श  जगासमोर उभा केला. हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्री धावून गेल्याची अखिल महाराष्ट्राची त्यावेळी प्रतिक्रिया होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चव्हाणांचीच परंपरा राज्याचे तिसरे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी पुढे चालविली. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक,  शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, अ. र. अंतुले, बाबासाहेब भोसले, पुन्हा वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, शंकरराव चव्हाण, पुन्हा शरद  पवार, सुधाकरराव नाईक, शरद पवार, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पुन्हा विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले.  २० वे मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विलासराव देशमुख आणि वसंतराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद दीर्घकाळ उपभोगले. शरद पवार राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा मुख्यमंत्री  झाले, तेव्हा ते महाराष्ट्राचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री ठरले. त्यावेळी ते अवघ्या ३७ वर्षांचे होते. वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांनी  दोनदा मुख्यमंत्रिपद मिळविले. त्यातही शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पितापुत्रांनी राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा नवा विक्रम केला. मनोहर जोशींच्या  रूपाने पहिल्यांदा बिगर कॉंग्रेसी व्यक्ती मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवाजीराव निलंगेकर आणि अ. र. अंतुले या मुख्यमंत्र्यांना अनैतिक वर्तनासाठी राजीनामा द्यावा लागल्याचा कलंकही महाराष्ट्रावर लागला. अंतुलेंनी प्रतिभा  प्रतिष्ठानद्वारे सिमेंटचा गैरव्यवहार केला, तर निलंगेकरांनी मुलीचे गुण वाढविण्यासाठी दबाव टाकल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400080'>अशोक चव्हाण </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1004/30/images/img1100430055_1_2.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">MH News</p>MHNEWS</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजकीय वारसा आहेच. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. मुंबई  हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर अशोक चव्हाण यांची या पदावर वर्णी लागली. राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून ८ डिसेंबर  २००८ ला विराजमान झाले. यानंतर झालेल्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील श्री. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस विजयी होऊन मुख्यमंत्री  पदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. मितभाषी आणि कर्तव्यदक्ष प्रशासक अशी चव्हाण यांची ख्याती आहे. सामान्य प्रशासन, नगरविकास, सांस्कृतिक  कार्य, माहिती व जनसंपर्क, गृहनिर्माण, कमाल नागरी जमीन धारणा, झोपडपट्टी सुधारणा, घरदुरुस्ती व पुर्नंबांधणी इ. जबाबदार्‍या देखील श्री. चव्हाण पार पाडत  आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 01 May 2013 16:09:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्री पृथ्वीराज चव्हाण (व्यक्तिगत माहिती)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/श्री-पृथ्वीराज-चव्हाण-व्यक्तिगत-माहिती-113050100011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/श्री-पृथ्वीराज-चव्हाण-व्यक्तिगत-माहिती-113050100011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[कराड, जि. सातारा. १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा सदस्य म्हणून निवड. राज्यसभा सदस्य म्हणून दोन वेळा निवड. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1305/01/images/img1130501011_1_1.jpg' alt='chouhan' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MH GOVT</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>जन्‍म दिनांक </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१७ मार्च १९४६ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>जन्‍म ठिकाण </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंदोर (मध्य प्रदेश) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>​शिक्षण </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बी. ई. (ऑनर्स), एम्.एस्. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए). </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>ज्ञात भाषा </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठी, हिंदी आणि इंग्रजी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>कौटुंबिक माहिती </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वडिल - स्व. दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण, ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात. पं. जवाहरलाल नेहरूंचे सहकारी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आई - स्व. प्रेमलाकाकी चव्हाण, माजी खासदार </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>वैवाहिक माहिती </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विवाहित, पत्नी श्रीमती सत्वशीला यांच्या बरोबर १६ डिसेम्बर मध्ये विवाह. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>अपत्ये </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोन (एक मुलगा, एक मुलगी) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>​व्‍यवसाय </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अभियंता, तंत्रज्ञ. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>विशेष आवड </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाषांच्या संगणीकरणाविषयी संशोधन </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>मतदार संघ </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कराड, जि. सातारा. १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा सदस्य म्हणून निवड. राज्यसभा सदस्य म्हणून दोन वेळा निवड. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>राजकीय पक्ष </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय राष्ट्रीय काँग्रेस </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९७३ पासून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>धारण केलेली पदे </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९९१ मे १९९६ : सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समिती </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९९२-९३ : सदस्य, १० वी लोकसभा, १९९१-९६ सदस्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समिती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९९४-९६ : सदस्य, वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समिती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९९५-९६ : सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्य, दुय्यम विधि-विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्लागार समिती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९९६-९७ : सदस्य, ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद, लोकसभा, काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य, ऊर्जा समितीवर सदस्य, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वित्त मंत्रालयाची सल्लागार समित, १९९६-९७ आणि १९९८-२०००सदस्य. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९९६-९८ : कॉंग्रेस संसदीय पक्षाचे सचिव, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९९८-२००० : सदस्य, सार्वजनिक लेखा समिती </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>२०००-२००१ : प्रवक्ता, अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एप्रिल २००२ : राज्यसभेवर निवड, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एप्रिल २००८ : राज्यसभेवर फेरनिवड, राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार), </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>२००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत पंतप्रधान, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्यालयाचे राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र कार्यभार), </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भू-विज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन खात्यांचे राज्यमंत्री. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून दि. ११ नोव्हेंबर २०१० रोजी शपथविधी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दि. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दि. ३० एप्रिल २०११ रोजी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यसभा सदस्यत्वाचा दि. ६ मे २०११ रोजी राजीनामा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>छंद: </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दिबळ, गोल्फ आणि वाचन. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>परदेश प्रवास: </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिका, फ्रान्स, जपान, युके, पाकिस्तान, बांगलादेश, तैवान, जर्मनी, श्रीलंका, नेपाळ, ओमान, बहामा चीन, हॉंगकॉंग, इंडोनिशिया, इटली, मलेशिया, नेदरलँड, पनामा, पोर्तुगाल,सिंगापूर, स्वित्झरलंड, थायलंड या देशांना विविध परिषदांच्या निमित्त भेटी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>कार्यालयाचा पत्ता </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्यालय : मुख्यमंत्र्यांचे सचिवालय, ६ वा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२. दूरध्वनी क्र. : ०२२-२२०२५१५१, २२०२५२२२, फॅक्स : ०२२-२२०२९२१४ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ई-मेल ओळख </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>chiefminister@maharashtra.gov.in</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 01 May 2013 15:19:22 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:02:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/महाराष्ट्र-दिन-आणि-कामगार-दिनानिमित्त-शुभेच्छा-112050100001_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/महाराष्ट्र-दिन-आणि-कामगार-दिनानिमित्त-शुभेच्छा-112050100001_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे ध्येय राज्य शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी पारदर्शक आणि गतिमान शासन देण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे. यामुळे राज्याचा विकास]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1205/01/images/img1120501001_1_1.jpg' alt='maharashatra day' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MH GOVT</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#800040'><b>प्रत्येक घटकाच्या विकासाचे राज्य शासनाचे ध्येय - मुख्यमंत्री</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे ध्येय राज्य शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी पारदर्शक आणि गतिमान शासन देण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे. यामुळे राज्याचा विकास होण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त व्यक्त केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रादेशिक समतोल राखण्यात येईल. आवश्यक सुविधा उपलब्ध करून राज्याच्या प्रत्येक भागाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे, या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन गांभीर्याने प्रयत्न करीत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>औद्योगिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असला तरी येत्या काळात राज्याला एका अत्युच्च पातळीवर नेण्याचा संकल्प या निमित्ताने करु या, असे मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'><b>महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणतात, देशातील सर्वात प्रगतीशील आणि पुरोगामी विचारांचे राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या हा लौकीक वाढविण्याबरोबरच राज्याच्या सर्वांगीण प्रगतीची घोडदौड कायम ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देण्याची गरज आहे. आपली आतापर्यंतची वाटचाल नेत्रदीपक असली तरी, भविष्यात आपली स्पर्धा ही देशांतर्गत राज्यांशी नसून जगातील प्रगत राष्ट्रांशी आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यासाठी गुणवत्तावाढीचे लक्ष्य ठेवून आपण सर्वांनीच कठोर परिश्रम केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील काही तालुक्यांमध्ये असलेल्या टंचाई निवारणासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून शासनाच्या या प्रयत्नांना निश्चितच यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करुन महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी आणि राज्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.</font><font style='font-size:11.5pt;'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 01 May 2012 11:51:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 15:31:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[यशवंतरावांच्या `रोडमॅप`नुसार घडला `महा`राष्ट्र!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/यशवंतरावांच्या-रोडमॅप-नुसार-घडला-महा-राष्ट्र-110043000060_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/यशवंतरावांच्या-रोडमॅप-नुसार-घडला-महा-राष्ट्र-110043000060_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[काही लोक महाराष्ट्राची काहीच प्रगती झाली नाही, असा निराशेचा सूर काढतात. अशा लोकांना माझं एकच सांगणं आहे की, टीकाटिप्पणी न करता एकवार महाराष्ट्राच्या वाटचालीवर दृष्टीक्षेप टाका आणि मनातला निराशावाद झटकून टाका, तरच]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/30/images/img1100430060_1_1.jpg' alt='maharashtra' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MHNEWS</p></td></tr></table><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>काही लोक महाराष्ट्राची काहीच प्रगती झाली नाही, असा निराशेचा सूर काढतात. अशा लोकांना माझं एकच सांगणं आहे की, टीकाटिप्पणी न करता एकवार महाराष्ट्राच्या वाटचालीवर दृष्टीक्षेप टाका आणि मनातला निराशावाद झटकून टाका, तरच महाराष्टने केलेली प्रगती आपल्या डोळ्यात भरेल. या देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे, हे याठिकाणी मला अभिमानाने नमूद करावेसे वाटते.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार या दूरदृष्टीच्या नेत्यांमुळे महाराष्ट्राची एक प्रगतशील, विकसित आणि पुरोगामी राज्य म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली. यामुळेच आज सुवर्णमहोत्सव साजरा करीत असलेल्या महाराष्ट्राने कृषी, सहकार, उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यटन, शिक्षण आदी अनेक क्षेत्रांत मोठी भरारी मारली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आणि गुंतवणूकविषयक सकारात्मक धोरणांची तुलना केवळ देशातील अन्य राज्यांशीच नव्हे तर जगातील काही देशांशी केली जाते. या बाबतीत महाराष्ट्राचा कित्येक विकसनशील देशांपेक्षाही (रशिया, कोरिया, इटली आदी) वरचा क्रमांक लागतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राच्या या प्रगतीशील वाटचालीत अनेक अडचणी आल्या, पूर आले, दुष्काळ आले. बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ल्यांनाही तोंड द्यावे लागले. पण या सर्व संकटांवर मात करीत महाराष्ट्राने आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली. इतकेच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक पुरोगामी, क्रांतीकारक तसेच लोकहिताचे कार्यक्रम राबविण्यात आपली आघाडी कायम ठेवली. रोजगार हमी योजना, ग्रामस्वच्छता अभियान, माहितीचा अधिकार, महिला आरक्षण आदी अनेक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्राने आधी घेतले आणि नंतर ते केंद्गीय पातळीवर स्वीकारले गेले, ही गोष्ट खचितच अभिमानास्पद आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सहकाराच्या माध्यमातून तळागाळातल्या सर्वसामान्य व्यक्तीला चळवळीशी जोडण्याचे काम या राज्यात झाले. गावागावांत ही चळवळ रुजली, फोफावली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर रस्ते, परिवहन (एसटी), पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी अशा अनेक मूलभूत समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने कंबर कसली. राज्यातला लहानातला लहान माणूसही आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, हा हेतू मनाशी धरून राज्याने आजवरची वाटचाल केली आहे. राज्यकर्त्यांनी नेहमीच सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केल्याने राज्याची आजची प्रगती आपल्याला दिसते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्व. यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षण, शेती, कला, क्रीडा, संस्कृती आदी सर्वच क्षेत्रांसाठी महाराष्ट्राला एक रोडमॅप आखून दिला. वसंतराव नाईक यांच्या कारकीर्दीत प्रचंड दुष्काळ पडला तर त्यांनी राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा चंग बांधला. गावोगावी जाऊन नागरिकांचे प्रबोधन केले आणि हरितक्रांती घडवून आणली. शंकररवा चव्हाण यांनी प्रशासनावर वचक ठेवून अनेक जनहिताची कामे मार्गी लावली. वसंतदादा पाटील यांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली. आणि शरद पवार यांनी तर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वच क्षेत्रांत काम केले. या सर्व नेत्यांमुळे आणि त्यांच्या ध्येयवादी कार्यामुळेच महाराष्ट्र हा खज्या अर्थाने `मह</font><font style='font-size:11pt;'>ा`</font><font style='font-size:11pt;'>राष्ट्र बनला, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1990<font  style='font-size:11pt; color:#000000'>च्या दशकात आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारलेल्या भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. यामुळे वित्तीय आणि उद्योग क्षेत्र  गुंतवणुकीसाठी अधिक खुले झाले. परिणामी देशात आणि राज्यात वित्त, माहिती तंत्रज्ञान, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आदी क्षेत्रांसाठी उच्चशिक्षित व कुशल मनुष्यबळाची उपलब्धता होण्याच्या बाबतीत वृद्धी झाली. जागतिकीकरणाच्या लाटेवर स्वार होत महाराष्ट्रानेही गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी ध्येयधोरणे आखली आणि नव्या औद्योगिक संधी निर्माण केल्या. राज्यात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले. नवनवीन महामार्गांची उभारणी, आस्तित्वात असलेल्या रस्त्यांचा दर्जा उंचावणे, रुंदीकरण करणे आदी बाबींनाही प्राधान्य देण्यात आले. नवनव्या रोजगार संधी आणि उद्योगवृद्धी यासाठी राज्यात 71 विशेष आर्थिक क्षेत्रांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात येणाज्या नव्या उद्योगांना तत्काळ मंजुरीसाठी एक खिडकी योजना (सिंगल विंडो क्लिअरन्स) राबविली. यामुळे मंजुरी प्रक्रियेसाठीचा 90 दिवसांचा कालावधी 30 दिवसांपर्यंत खाली आला. थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र आज देशात अग्रेसर आहे, याला आपली औद्योगिक धोरणेच कारणीभूत आहेत.</font><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/30/images/img1100430060_2_1.jpg' alt='mumbai' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही वर्षांपासून मी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार सांभाळत आहे. रस्ते म्हणजे विकासाचे राजमार्ग आहेत, ही जाणीव ठेवून आम्ही काम करीत आहोत. आमच्या कामाला यशही लाभत आहे. सन 1981 ते 2001 या रस्ते विकास आराखड्यानुसार राज्याने एकूण 2 लाख, 70 हजार, 10 किलोमीटर लांबीच्या रस्ते विकासाचे उद्दिष्ट ठरवले आहे. यापैकी सुमारे 2 लाख, 37 हजार, 668 किलोमीटर (88.02 टक्के) रस्ते विकासाचे उद्दिष्ट मार्च 2009अखेर साध्य झालेले आहे. एकूण विकसित लांबीपैकी 1 लाख, 37 हजार, 266 किलोमीटर (57.76 टक्के) लांबीचे रस्ते डांबरीकृत आहेत. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगायचे झाले तर आज राज्यातल्या 40 हजार, 412 गावांपैकी 40 हजार, 137 गावे (99.32 टक्के) रस्त्यांनी जोडलेली आहेत. त्यापैकी 39 हजार, 206 गावे (97.16 टक्के) बारमाही; तर, 872 गावे (2.16 टक्के) आठमाही रस्त्याने जोडलेली आहेत. केवळ 275 (0.68 टक्के) गावे भूसंपादन, वनजमीन अथवा नक्षलग्रस्त भाग आदी कारणांमुळे रस्त्यांनी जोडावयाची बाकी आहेत. त्यांची कामेही हाती घेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सन 1981-2001 च्या योजनेअंतर्गत रस्ते विकास करण्यासाठी रोजगार हमी योजना, नाबार्ड, हुडको यांच्याबरोबरच जागतिक बँकेच्या सहाय्यानेही कोट्यवधी रुपये खर्चाची कामे हाती घेण्यात आली. केंद्गीय मार्ग निधी योजना राबविण्यातही महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. पण रस्तेविकासाचे निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी सुमारे 26 हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याने आणि इतका प्रचंड निधी केवळ शासनाच्या माध्यमातून उभा करणे शक्य नसल्याने रस्ते विकासात खाजगी क्षेत्रालाही सामावून घेण्यात आले. `बांधा-वापरा-हस्तांतरित कर</font><font style='font-size:11pt;'>ा` (</font><font style='font-size:11pt;'>बीओटी) या तत्त्वावर राज्यातील रस्ते विकासाला प्रचंड मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली. सहापदरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी उभे राहात असलेले फ्लायओव्हर्स, गेल्या वर्षी बांधून पूर्ण झालेला राजीव गांधी वांद्गे-वरळी सागरी सेतू अशी काही उदाहरणे सांगता येतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>`<font  style='font-size:11pt; color:#000000'>बीओट</font><font style='font-size:11pt;'>ी` </font><font style='font-size:11pt;'>तत्त्वाचा अंगिकार केल्यामुळे रस्त्यांच्या दुपदरीकरण, चौपदरीकरण आदी कामांबरोबरच विविध शासकीय बांधकामांच्या प्रकल्पांना गती आली. `बीओट</font><font style='font-size:11pt;'>ी`</font><font style='font-size:11pt;'>तून विकास केल्यामुळे संबंधित खाजगी कंत्राटदार कंपनीकडून टोल आकारण्यात येतो. पण सुलभ, जलद आणि सुखकर प्रवासाची सोय उपलब्ध झाल्यामुळे, त्या तुलनेत कमी असलेला हा टोल भरण्यास वाहनधारकांची तयारी आहे, ही यातली महत्त्वाची बाब आहे. या पद्धतीने येत्या काही वर्षांतच राज्यातील सर्व प्रमुख शहरे चौपदरी, सहापदरी रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. राज्यातील तसेच राज्याबाहेरील लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेता तीर्थक्षेत्रांतर्गत महत्त्वाचे पालखी मार्ग, अष्टविनायक जोडणारे रस्ते यांची सुधारणा करण्याबरोबरच सप्तशृंगीगड, माहूरगड, हाजी मलंग गड आणि जेजुरी या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉलीचा अभिनव प्रकल्पही हाती घेण्यात येत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही वर्षांत विविध शासकीय इमारतींच्या बांधकामांतील `टाइपकास्</font><font style='font-size:11pt;'>ट`</font><font style='font-size:11pt;'>पणा अर्थात साचेबद्धपणा किंवा एकसुरीपणा दूर करून खाजगी क्षेत्राच्या तोडीच्या आकर्षक इमारतींच्या बांधकामांना आम्ही प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी अत्याधुनिक आणि अत्याकर्षक अशा शासकीय इमारती उभ्या राहात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रस्ते विकास योजना 1981-2001 ची मुदत संपली असल्याने आता रस्ते विकासाची पुढील योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेचा आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेनुसार राज्यातील 3 लाख, 35 हजार, 775 किलोमीटर लांबीच्या रस्ते विकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून त्यासाठी साधारणपणे 88 हजार कोटी रुपये एवढ्या निधीची आवश्यकता आहे. अशा प्रकारे राज्याच्या रस्ते विकासाच्या क्षेत्रात आपण फार मोठ्या प्रमाणात काम चालविले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राची यापुढील काळातील वाटचालीची ताकद ही युवाशक्तीच्या बळावर होणार आहे. सन 2020पर्यंत येथील युवाशक्ती अत्यंत मजबूत असणार आहे. त्यामुळे युवकांची मोठी संख्या ही प्रगतीच्या वाटेतील आडकाठी न ठरता याच शक्तीच्या बळावर आपण मोठी मुसंडी मारणार आहोत, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र संदेह नाही. आज आपल्या राज्यातील युवकांना प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे. या संधीचा लाभ घेत युवकांनी आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करावं, प्रामाणिकपणे काम करावं, असं माझं सांगणं आहे. आपल्या बळावरच आम्ही महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहतो आहोत, याचं भान ठेवून आपण वाटचाल करावी, एवढीच या प्रसंगी अपेक्षा! </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 30 Apr 2012 18:12:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्राच्या समस्या व उपाय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/महाराष्ट्राच्या-समस्या-व-उपाय-110043000047_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/महाराष्ट्राच्या-समस्या-व-उपाय-110043000047_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्टात मुंबई दिसत असली तरी मुंबईत महाराष्ट्रात दिसत नाही. कायदेशीर व शासकीयदृष्‍ट्या मुंबई महाराष्ट्राची राजधानी मानली तरी प्रत्यक्षात ती उत्तर प्रदेश अथवा बिहारसारख्या हिंदी भाषिक राज्याची राजधानी वाटते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जितका]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/30/images/img1100430047_1_1.jpg' alt='balasaheb' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्टात मुंबई दिसत असली तरी मुंबईत महाराष्ट्रात दिसत नाही. कायदेशीर व शासकीयदृष्‍ट्या मुंबई महाराष्ट्राची राजधानी मानली तरी प्रत्यक्षात ती उत्तर प्रदेश अथवा बिहारसारख्या हिंदी भाषिक राज्याची राजधानी वाटते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जितका परप्रांतीय, विशेषत: हिंदी भाषिक त्रिवर्ग आढळतो तसा इतर दाक्षिणात्य राज्यांत आढळत नाही. महाराष्ट्रात प्रत्येक पाच माणसांमध्ये एक परप्रांतीय आहे. व जनसंख्येत 20 टक्के जनता परप्रांतीय आहे. दक्षिणेतील इतर कोणत्याही राज्यात परप्रांतीयांचे प्रमाण इतके नाही.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हिंदुस्थान जरी संघराज्य (फेडरल स्वरूपाचे) असले तरी आपल्या 'संविधानात' कश्मीर व नागलॅण्ड सोडून इतर राज्यांतील मूळच्या भाषिक समाजाच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या मुंबई येथील मंत्रालयात उत्तर व दक्षिणेतील धनाढ्य व्यापार्‍यांचे, कारखानदारांचे, कंत्राटदारांचे भूमिगत गुन्हेगार जगाच्या (अंडरवर्ल्ड) चमच्यांचे व हिंदी सिनेनटांच्या शब्दांना जितका मान दिला जातो तितका मान गरीब मराठी जनतेच्या प्रतिनिधीला दिला जात नाही. याचे कारण महाराष्ट्र राज्याची सरकारी यंत्रणा मराठी माणसांच्या हातून निसटून गेली आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रात अनेक उच्चपदस्थ सरकारी ‍अधिकारी, जिल्हा प्रशासक, उच्च पोलीस अधिकारी, विविध खात्यांतील आयएएस अधिकारी परप्रांतीय व अमराठी असल्यामुळे त्यांना मराठी माणसाबद्दल आस्था व आत्मीयता वाटणे संभवनीय नाही. आजच्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात जे मराठी मंत्री आहेत त्यांना केवळ आपल्या खुर्चीची चिंता लागून राहिलेली आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची पा‍त्रता व इच्छा या दोन्ही गणांचा अभाव त्यांच्यामध्ये प्रकर्षाने जाणवतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यरातून आपणास परप्रांतीय धनिकवर्ग आढळतो. हा व्यापाराच्या निमित्ताने येऊन स्थायिक झाला आहे. महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था परप्रांतीय धनाढ्य समाजाच्या मुठीत बंद झाली आहे. मराठी माणसाची 'इमेज' (प्रतिमा) 'एक गरीब नोकरदार माणूस' अशी इतर भाषिकांच्या डोळ्यासमोर उभी राहत आहे. सध्याची परिस्थिती अशीच टिकली तर त्याचा परिणाम मराठी भाषा, मराठी लोकजीवन व संस्कृतीवर झाल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयास मराठी जनतेने न केल्यास आधीच आर्थिकदृष्टया दुबळा असणारा मराठी समाज इतर धनाढ्य भाषिकांचा अंकित बनून आपले सांस्कृतिक वैशिष्ट्‍य गमावून बसेल. आम्ही सर्व हिंदुस्थानी एक असलो तरी प्रत्येक हिंदुस्थानी भाषिक समाजाचा समान आर्थिक व सामाजिक विकास होने आवश्यक आहे. आर्थिक विषमता द्वेषाला व हिंसाचाराला जन्म देतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र हिंदुस्थानच्या दक्षिण भागात असला तरी मराठी राज्यकर्त्यांनी दाक्षिणात्य राज्यांच्या भाषिक धोरणांचा कधीच अभ्यास व अनुकरण केले नाही. आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू व केरळ या दाक्षिणात्य राज्यांनी मातृभाषेच्या बरोबरीने इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिल्यामुळे आज हा समाज उच्च शिक्षणात अग्रणी असून देशातील अनेक सरकारी व खासगी उद्योगांत उच्चपदे भूषवीत आहे. भाषेपेक्षा ज्ञान महत्त्वाचे आहे. ज्या भाषेत ज्ञानाचा संग्रह आहे ती भाषा शिकायलाच पाहिजे. आजपर्यंत अनेक वर्षे महाराष्ट्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रात इंग्रजीच्या शिक्षणाला गौण स्थान दिले. आज सर्व आधुनिक विषयांच्या ज्ञानाचा संग्रह इंग्रजी भाषेत आहे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकण्याला प्राधान्य देऊन इंग्रजी भाषेत प्रावीण्य संपादन केल्यास मराठी तरुण सरकारी, खासगी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांतील उच्च पदावर नियुक्त होण्यास समर्त होईल. स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होऊन इतर भाषिकांच्या बरोबरीने आपली गुणवत्ता सिद्ध करू शकेल.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंग्रजी शिक्षणाने मराठीचा विकास होणार नाही हा विचार मात्र संयुक्तिक नाही. आंध्र, तामीळ, मल्याळम, बंगाली साहित्यिक इंग्रजी भाषेत प्रवीण असूनही त्यांनी आपले मातृभाषेबद्दल लिखाण सोडून दिले नाही. बंगाली ‍भाषिकांचे आपल्या मातृभाषेबद्दलचे प्रेम व अभिमान सर्व जाणतातच. बंगाली भाषेला पाकिस्तानने उचित राज्यभाषेचा सन्मान न दिल्यामुळे पूर्व पाकिस्तानी जनतेत अतिशय असंतोष निर्माण झाला होता. बांगलादेशाच्या निर्मितीत बंगाली भाषिकांचा असंतोष पूर्व व पश्चिम पाकिस्तानी धर्मबंधू असूनही महत्त्वाचे कारण ठरले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज मराठीत जे विविध वाङ्‍मय प्रकार आहेत ते इंग्रजी साहित्याच्या अभ्यासानेच मराठीत, उदयाला आले आहे. कादंबरी, लघुकथा, व्यंगात्मक विनोदी साहित्य, मुक्तछंद काव्य, साहित्यिक टीकात्मक लेख, राजकीय समीक्षात्मक लेख, जुन्या मराठी साहित्याला अपरिचित होते. गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, समाजसुधारक आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, साहित्यसम्राट न. चि. केळकर आदी इंग्री शासन कालातील नेते इंग्रजी भाषेचे पंडित होते. लोकमान्यांचे 'केसरी'तील अग्रलेख, स्वातंत्र्यवीरांचे साहित्य भराठीत अजरामर झाले आहे. मातृभाषेच्या प्रेमामुळेच या सर्वांनी मराठीत लेखन केले आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाषावर प्रांतरचनेचा पुरेपूर फायदा दाक्षिणात्य राज्यांनी करून घेतला आहे. त्याला फक्त महाराष्ट्रच अपवाद आहे. मराठी समाजाच्या आजच्या स्थितीला गेल्या 50 वर्षांची काँग्रेसची राजवट कारणीभूत आहे. दुर्बल व गरीब प्रजेला सबल व धनवान बनविण्याचे कर्तव्य राजकर्त्यांचे असते. मराठी समाजाच्या व भाषेच्या उत्कर्षाकडे काँग्रेसी राज्यकर्त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मराठीची राज्यव्यवहारात दयनीय स्थिती आहे. इतर भाषिकांना मराठी शिकण्याची आवश्यकता भासत नाही. आंध्र प्रदेशातील सरकारी कर्मचार्‍यांना तेलगू भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. कर्नाटक, तामीळनाडू व केरळमध्ये हीच स्थिती आहे. शिक्षणात राज्यभाषेचा एक विषय प्रत्येक भाषिकांसाठी अनिवार्य ठेवण्यात आला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राची आज जी औद्योगित प्रगती दिसत आहे त्यात महाराष्ट्रीयन उद्योजक किती आहेत? महाराष्ट्रात उद्योग, व्यापार धंदा व व्यवसाय क्षेत्रांत काम करणार्‍या मराठी माणसांचे प्रमाण, ट्ककेवारी ‍किती आहे ? महाराष्ट्रातील विविध कंपन्यांचे किती उच्च पदाधिकारी, मॅनेजिंग डायेक्टर्स महाराष्ट्रीयन आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे निराशजनक आहेत. महाराष्ट्राच्या अर्धव्यवस्थेत मराठी माणसाचा वाटा किती आहे?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र दिसणारी श्रीमंती महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या अमराठी उद्योगपती व व्यापारीवर्गाची आहे. ती येथील भूमिपुत्रांची म्हणता येत नाही. ''बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना'' म्हटल्याप्रमाणे मराठी माणूस स्वत:ची फसवणूक करून घेत आहे. मराठी समाजात प्रामुख्याने दोनच वर्ग आढळतात. खेड्यांतील शेतकरीवर्ग व शहरातील बौद्धिक काम करणारा मध्यमवर्ग. मोठे मोठे धनाढ्य कारखानदार, धनिक उद्योजक, विविध प्रकारचे धंधा करणारे व्यापारी, कुशल व तंत्रज्ञ कामगार वर्ग यांची मराठी समाजात कमतरता असल्यामुळे इतर भाषिक उद्योजकांना महाराष्ट्रात उद्योगव्यवसाय करून स्थायिक होण्यास अडचण नाही. स्थानिय भूमिपुत्रांशी स्पर्धा व संफर्ष करण्याची वेळयेत नाही. आज मराठी समाजाला सर्व कार्यक्षेत्रांत स्वयंपूर्ण करण्याची वेळ आली आहे. तामीळनाडू, आंध्र, कर्नाटक, केरळ या राज्यांतील जनता दैनंदिन व्यवहारात आपल्या मातृभाषेचाच उपयोग करते. त्यामुळे तेथे व्यापार, धंदा व इतर चिल्लर व्यवसाय करणार्‍या परप्रांतीय गुजराती, मारवाडी, सिंधी इत्यादिकांना तेथील लोगभाषा शिकावीच लागते. अन्यथा स्थानीय व्यापार्‍यांशी स्पर्धा करण्यात त्यांना यश मिळू शकत नाही. कारण ग्राहकवर्ग आपल्या मातृभाषेतूनच बोलतो आणि सर्व प्रकारच्या उद्योगधंद्यात स्थानीय भाषिक कार्यरत आहे. या उलट महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता हिंदी सिनेमातील 'बंबब्या' हिंदीतून इतर भाषिक उद्योजकांशी व कामगारांशी बोलतात. त्यामुळे या व्यापारी लोकांना महाराष्ट्रात व्यापार-धंदा करण्यास फारच सुलभ जाते. मराठी समाजाने आपले सर्व दैनंदिन व्यवहार मराठी भाषेतच केले पाहिजेत. त्यामुळे परप्रांतीय जनतेचे आपोआप 'मराठीकरण' होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रात मराठी जनतेने निवडून दिलेला, महाराष्ट्राचा भाग्योदय करण्याचा विडा उचललेला, मराठी माणसांचाच पक्ष सत्तेवर आल्याखेरीज मराठी जनतेचा उत्कर्ष असंभव आहे. दिल्लीच्या अंकित असलेला भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष हे काम कधीच करू शकणार नाही. सुदैवाने आज महाराष्ट्रात शिवसेनेसारखा मराठी माणसाचा पक्ष कार्यरत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा देशातील एकमेव स्पष्टवक्ता महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्रीयत्व व हिंदुत्व भिन्न नसून महाराष्ट्रात शिवसेनेचे बलशाली राज्य स्थापन झाल्यास ते हिंदुत्वाला पोषकच ठरेल. महाराष्ट्रात 25 टक्के रहिवासी परभाषिक, परप्रांतीय असल्यामुळे 70 टक्के कर्मचारी सर्व खासगी, निमसकारी व इतर संस्थांतून 'भूमिपुत्रच' असावेत असा नियम लागू करण्यात यावा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>('<font  style='font-size:11pt; color:#000000'>आपले वसंतश्री' या दिवाळी अंकातून साभार) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 30 Apr 2012 18:06:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मराठी आपल्या श्वासात भरून राहू दे !]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/मराठी-आपल्या-श्वासात-भरून-राहू-दे-110043000044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/मराठी-आपल्या-श्वासात-भरून-राहू-दे-110043000044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[25 वर्ष झाली महराष्ट्राच्या राजधानीत पहिलं पाऊल टाकलं. एकाला पत्ता मराठीत विचारला. त्यानं वाट चुकल्या वाटसरूकडं बघावं]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/30/images/img1100430044_1_1.jpg' alt='mumbai' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> 25 <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>वर्ष झाली महराष्ट्राच्या राजधानीत पहिलं पाऊल टाकलं. एकाला पत्ता मराठीत विचारला. त्यानं वाट चुकल्या वाटसरूकडं बघावं, तसं मला बधून गेत विचारलं, 'कहाँ जाना है भाई?' अजूनही मला त्याचं उत्तर देता आलेलं नाही! माझ्याच घरच्यांनी माझ्या घरात 'कोण पाहिजे तुम्हाला?' विचारावं तसं झालं.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भवताल माणसांनी भरला होता. पण या गर्दीत मराठी बोलणारा-कळणारा कुणी असेल, यावर विश्वास ठेवायला माझं मन तयार नव्हतं. कुठल्या अनोळखी मुलखात येऊन पडलोयसं झालं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>700 <font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षापेक्षा अधिक काळ मार्ग गेलाय. ज्ञानदेवांपासून कुसुमाग्रजांपर्यंत आपण मराठी बोलत - लिहीत-वाचत आलोय. पण अजून ती महाराष्ट्राच्या राजधानीत बळचणीला अंग चोरून उभी आहे. तिचे हाल काही सरेनात. महाराष्ट्राचं मंत्रालय सारा कारभार मराठीतून केल्यासारखं करीत, मराठी साहित्य संमेलनांना अनुदान देतं, प्रसरंगाप्रसंगानं भित्तीपत्रकांचे उत्सव करतं आणि उत्साहानं 'आपल्या आवडीच्या' कामला पुन्हा जुंपून घेतं. आजच्या घडीला दादर, गिरगाव, लालबाग आणि विलेपार्ल्यात मराठीचा श्वास चालू आहे   इतकचं !</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता तिथंही मराठी माणूस मराठी माणसाला हिंदीत पत्ता विचारू लागला आहे. असली मानसिकता कुठल्या संकटाला निमंत्रण देतेय, हे सर्व मराठी भाषाप्रेमींनी विचारात घेण्यासारखं आहे! मुंबईत महानगरपालिका, मराठी रंगभूमी, पोलीस, बेस्य इथं मराठी माणसांची हुकुमत आहे. बाकी सारा बहुभाषिक -बहुरंगी जल्लोष!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अखिल मानवजात एक आहे, हा लाडका सिद्धांत बोलून दाखवून आपण आपल्या विशालतेचा गौरव करतो. नव्या काळच्या नव्या म्हणी 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' ऐकाव्या लागतात. अशी विपरीत, अपमानित स्थिती आज घरोघरी घुसलीय. असून मालक घरता म्हणती चोर त्याला असा उलटा न्याय झालाय.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थोडं मागल्या काळात, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी ज्यांनी आपली सारी शक्ती वापरायची शपथ घेतली होती, मराठी माणसाचा (मुंबईतल्या) विश्वास पदरात घेतला होता, त्यांनी बदलत्या काळात बदलत्या आपली पकड सैल केली आणि आपल्याच 'शाश्वत' सुखात सुकावले !</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत मराठी नाही. हे सपशेल खरं असलं तरी महाराष्ट्रात मराठी माणूस अल्पसंख्‍याक नाही, हे मुंबईतल्या इतर भाषिकांनी पक्कं ध्यानात ठेवावं आणि बर्‍या बोलानं आपल्या राज्यात पाहिजे तर निघू जावे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता आणि या पुढं, महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या सरकारनं, मराठी माणसाला सर्व क्षेत्रांत प्रथम खास सवलती द्याव्यात ! तरच मराठी माणूस मुंबईत उठून दिसेल ! इतर भाषिकांच्या मतांच्या जाळ्यात अडकून आपला, ‍महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा विश्वासगात करू नये !</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आठवणीनं - व्यासपीठावरून ' मराठी पाऊल पडते पुढे, वाजती मराठीचे चौघडे' म्हणत गर्जणार्‍या सरकारं पाऊल मागं का? देशाच्या भल्यासाठी - काश्मीरसाठी वेगळे कायदे करता येतात. मग महाराष्ट्रासाठी नवे कायदे का करू नयेत? परंतु आपणा मराठी माणसांची, नव्या सहस्त्रकातली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. मराठी आपल्या अख्या जगण्यात श्वासात भरुन राहिली पाहिजे! </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठी बोला ! मराठीतच लिहा आणि मराठीतच वाचा - मराठी साहित्य, कला आणि संस्कृती जपा आणि जोपासा ! एक विसरू नका, जगात नावाजायला मराठी भाषा अपुरी पडत नाही! </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता अधिक अंत न बघता, नव्या शतकाच्या !सहस्त्रकाच्या पहाटवेळी, निव्वळ मराठीत बोलायची मनातून शपथ घेऊ या. ज्यांना मराठी हेत नाही आणि जो पाहुणा आहे त्याच्याशी शक्य त्या भाषेत संवाद साधू या!</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठीनं केला कानडी भ्रतार हे विसरून मराठीनं केला मराठी भ्रतार असं एकमुखानं गाऊ या ! आपण आता शिवजयंतीला आणि साहित्य संमेलनात मराठीचे गोडवे गाऊन भागायचं नाही! महाराष्ट्रात - मराठी माणसाच्या मनात - स्वप्नात मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे. मराठीतून लिहितो -वाचो - बोलतो आणि मराठीपण जगतो, तो कुणीही का असेना, तो आपला मराठीच मानू या ! आईच्य दुधाला पर्याय असूच शकत नाही, हे निसर्गाचं जालीम उत्तर आहे. तसचं मातृभाषेला, मराठी मुलखात तरी, दुसरा पर्याय असूच शकत नाही! आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संपूर्ण मुंबईत मराठी मालकीची उपाहारगृहं हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी का आहेत? मराठी कुटुंबात जन्मदात्यांना 'आई, बाबा' म्हणणारी मुलं शोधूनही का सापडत नाहीत? घरोघरी मराठी वर्तमानप‍त्र आग्रहानं का घेतलं जात नाही? मराठी माणूस चार महिन्यांतून एक निवडक मराठी चित्रपट आणि एक मराठी नाटक का बघत नाही? लिहिता-वाचता येणार्‍यांनी वर्षातून पाच मराठी निवडक पुस्तक का वाचू नयेत? महाराष्ट्र-आपला देश कसा आहे हे मराठी कुटुंबानं आयुष्यात एकदा तरी का बघू नये? मराठी माणसानं नोकरचाकर म्हणून - सटरफटर कामं करीत केविलवाणं जगणं सोडून देऊन, मराठीची तुतारी फुंकत शेती, व्यापार, उद्योगात आणि कला, साहित्य, क्रीडा, विज्ञानात आपली मुद्रा का उमटवू नये ?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अजूनही मराठी माणसाला मराठीशिवाय, मंत्रालय आणि न्यायालयात ठेचकाळत का हिंडावं लागतं? आकाशवाणी, दूरदर्शन आणि काही अपवाद सोडल्यास मराठी वर्तमानपत्रंही धड मराठी भाषा वापरीत नाहीत. चार-पाच मुद्रणसंस्‍था सोडल्यास पुस्तक छपाईचाही 'आनंद' आहे. आकाशवाणी, दूरदर्शनातल्या अनेक जबाबदार अधिकार्‍यांना प्रमाण मराठी भाषा बोलता आणि लिहिताही येत नाही ! प्राथमिक, माध्‍यमिक आणि महाविद्यालयातल्या मराठी शिकवणार्‍या कैकांना निकोप मराठी येत नाही. तिथं इतरांची काय कथा! अखेर प्रश्न आहे तो, नुसत्या साहित्य संमेलनाचे मोसमी वार्षिक उत्सव भरवून, ज्यांना पाहिजे त्यांना मिरवता येईल. पण, मायमराठीला सावता येईल का? </font><br/>('<font  style='font-size:11pt; color:#000000'>आपले वसंतश्री' या दिवाळी अंकातून साभार) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 30 Apr 2012 18:05:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मराठी माणूस महाराष्ट्रातच उपरा !]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/मराठी-माणूस-महाराष्ट्रातच-उपरा-110043000042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/मराठी-माणूस-महाराष्ट्रातच-उपरा-110043000042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्राचे सुपुत्र कै. यशवंतराव चव्हाण यांनी बर्‍याच वर्षापूर्वी 'मुंबईत मला महाराष्ट्र दिसत नाही' असे उद्‍गार काढले होते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनीदेखील]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/30/images/img1100430042_1_1.jpg' alt='mumbai' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राचे सुपुत्र कै. यशवंतराव चव्हाण यांनी बर्‍याच वर्षापूर्वी 'मुंबईत मला महाराष्ट्र दिसत नाही' असे उद्‍गार काढले होते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनीदेखील 'मुंबई केवळ मराठी भाषिकांचे शहर नाही, हे बहुभाषिकांचे शहर आहे' असे उद्‍गार काढून त्यावर कडी केली. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत आहे. कारण त्यासाठी परप्रांतीयांचे अतिशय पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. मराठी माणूस धोरणाने वागल्यास अजूनही या आपत्तीला तोंड देऊ शकतो. मात्र त्यासाठी बाहेरून अंकुशाची आवश्यकता आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हिंद‍ुस्थानातील उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य म्हणून गणले जाते. त्यायोगे परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे मुंबईमध्ये संघटित होऊ लागले आणि त्याचा परिणाम अर्थकारणावर होऊन त्याचे रूपांतर महागाईत झाले. मतांच्या लाचरीपायी राज्यकर्त्यांनी परप्रांतीयांना आश्रय दिला. एक गोष्‍ट प्रकर्षाने जाणवते की, मुंबईप्रमाणेच बंगलोर शहर हे बहुभाषिक कन्नडिंग अल्पसंख्याक असूनदेखील कन्नड संस्कृतीची छाप अजूनही अबाधित आहे. त्याचप्रमाणे कोलकाता-बंगाली, चेन्नई-तामिळी. मग मुंबईतच मराठी का असू नये? आणि याबाबत कोणी चळवळ केल्यास कायदा व सुव्यवस्थेला बाधा येते हा कोणता न्याय?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र शासनाच्या योजनांते विश्लेषण केल्यास पुष्कळसे मराठी उद्योजक पुढे येऊन त्यांनी कारखानदारीचा मार्ग अवलंबिला. ग्रामीण महाराष्ट्रात साखर व इतर उद्योगाचे आर्थिक केंद्र निर्माण केले. ग्रामीण भागात मराठी तरूणांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करून कारखानदारीकडे झेप घेलती. त्यात रोजगार हमी, दूध, कुक्कुटपालन व मत्स्यव्यवसाय या गोष्टींचा समावेश आहे आणि या कारणास्तव मराठी तरूणांचा मुंबईकडे येणाला लोंढा काही प्रमाणात रोखला गेला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत पूर्वी किरकोळ व्यापार मराठी तरुणच करीत होते. त्याचबरोबर मिरची, कोथिंबीर, पालेभाज्या, कांदे-बटाटे या वस्तू विकून स्त्रियांदेखील आपल्या कुटुंबाला हातभार लावत असत. परंतु गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत असे का घडले की मराठी माणूस स्वयंरोजगारातून कायमचा उखडला गेला?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठी माणसाला नोकरीचे जास्त आकर्षण आहे ही गोष्ट जरी नाकारता येत नसली तरी लहान-सहान स्वयंरोजगाराला लागलेला मराठी तरूण मागे का पडू लागला?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पूर्वी वसई-विरार येथून येऊन मराठी तरूण व्यवसाय करीत असे. परंतु आजच्या घडीला नजर फिरवल्यास एखाददुसरा तरूण, तो पण कोपर्‍यात भीत-भीत व्यवसाय करताना दिसतो. याचे कारण असे की उत्तर व दक्षिण हिंदुस्थान्यांनी मराठी माणसांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. दहपशाही व पैशांच्या जोरावर जवळ-जवळ मुंबईतील सर्व बाजारपेठा त्यांनी काबीज केल्या आहेत. स्वयंरोजगाराची मुळात कमी आवड असलेल्या मराठी लोकांना या क्षेत्रातून कायमचे हुसकावून आपले बस्तान बसवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करण्यात आला आहे. यावर उपाय आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पहिला मार्ग म्हणजे मुंबईत राहणार्‍या बहुसंख्य मराठी माणसांनी भाजीपाला व दैंनदिन लागणार्‍या वस्तू फक्त मराठी माणसांकडून खरेदी करण्याचा निर्धार करावा. शिवसेनेसारखी मोठी संघटना मराठी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यामुळे मुंबई तालुक्यातील शाखेच्या वतीने प्रभावी प्रचार करता येण्यासारखा आहे. शिवाय आजच्या घडीला एकाकी पडलेल्या मरठी फेरीवाल्यांना संरक्षण देता येईल. मग दांडगाई व वरून दबाद आणण्याची परप्रांतीयांची हिंमतच होणार नाही. राज्य शासनाने मार्केटिंग फेडरेशनच्या सहकार्याने या क्षेत्रात उतरणे आवश्यक आहे. मोक्याचा टिकाणी स्टॉल्स उपलब्ध करून मार्केटिंग फेडरेशनने त्या जागेत कांदे-बटाटे व भाजीपाला विक्रीची केंद्रे सुरू करून ती फक्त मराठीच माणसांना दिली तर मुंबईकरांना रास्त भावात या जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत काय? त्यामुळे उत्तर-दक्षिण हिंदुस्थानी फेरीवाल्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कृषी उद्योग मंडळ सध्या ग्रामीण महाराष्ट्रातील चांगली भाजी खरेदी करून मुंबईत आणते आणि साफ करून परदेशात निर्यात करते. ज्या भावाने निर्यात दलालांना विकली जाते त्याच भावाने मुंबईच्या मध्यमवर्गीयांना ती विकली तर ते सहेज राजी होतील. राज्य शासनाच्या निरनिराळ्या महामंडळांनी मुंबई, पुणे, नागपूरसारख्‍या जगबजलेल्या शहरांची काळजी अधिक घ्यावयाची की परकीय देशांची? महामंडळांनी प्रथम मुंबईकरांची सोय व सर्वत्र रास्त भावांची विक्री क्रेंदे उघडा असा सक्त दम भरला पाहिजे. मराठी माणसाला विक्रीकला अवगत नाही, तो संयमाने वागत नाही, असे म्हणण्यात थोडेफार तथ्य असले तरी अपना बाजार व सहकारी भांडारसारख्या संस्था मराठी तरूण चालवीत आहेतच ना? मग त्यांना विक्रीकला अवगत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. ग्रामीण तरूण अशा स्वयंरोजगारासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करतील यात वाद नाही. त्याचप्रमाणे फेडरेशनने याबाबत ठोस योजना आखून हजारो बेकार मराठी तरूणांना सहकारी तत्त्वावर हातगाड्या व इतर साहित्य पुरविल्यास (फेडरेशनने तयार केलेल्या मालालाच) त्यांना व्यवसाय करता येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जर मुंबईत महाराष्ट्र दिसायला हवा असेल तर फास्ट फूड सेंटर्सऐवजी लोणी, थालीपीठ, तूप-पुरणपोळी यांची विक्री ठिकठिकाणी निघायला हवीत. महिला आर्थिक विकास महामंडळतर्फे गरजू महिलांकडून मोठ्या प्रमाणावर हे पदार्थ घेता येतील.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई सर्वांची आहे' या पंतप्रधानांच्या वाक्यावर मराठी माणसाने तरी जोरदार आक्षेप घेतलाच पाहिजे. परकीय लोंढे रोखण्यासाठी कायदा हाती न घेता बरेच काही करता येण्यासारखे आहे. त्यासाठी तरूण पिढीने पुढे आले पाहिजे, अन्यथा 'मुंबई कुणाची' ? या प्रश्नाचे उत्तर 'परप्रांतीयांची' असेच द्यावे लागेल.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/>( '<font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आपले वसंतश्री' या दिवाळी अंकातून साभार) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 30 Apr 2012 17:54:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['महाकांतार' ते ' महाराष्ट्र' (१)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/-महाकांतार-ते-महाराष्ट्र-१-110043000040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/-महाकांतार-ते-महाराष्ट्र-१-110043000040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये 'राष्ट्र' या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात 'राष्ट्रीय' आणि नंतर 'महाराष्ट्र' या नावाने ओळखले जाऊ लागले, असे ह्यू एन त्संग तसेच इतर प्रवाशांच्या नोंदीवरून दिसून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये 'राष्ट्र' या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात '</font><font style=' color:#FF0080;'><b>राष्ट्रीय' आणि नंतर 'महाराष्ट्र' </font><font style=' color:#000000;'></b>या नावाने ओळखले जाऊ लागले, असे ह्यू एन त्संग तसेच इतर प्रवाशांच्या नोंदीवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील 'महाराष्ट्री' या शब्दावरुन पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा संबंध महार व रट्टा यांच्याशी लावतात तर काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने-दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील नद्या, पर्वत व इतर स्थळांचा रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैद्राबादचा निजाम, इंग्रज इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे तिसर्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्‍ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. श्रीराम व हनुमान यांची भेट पंचवटी (नाशिक) येथे झाली होती. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे आजच्या मुंबईच्या उत्तरेस असून नाला सोपारा या नावाने ओळखले जाते.) प्राचीन, भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपो‍टेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रिस्तपूर्व 230-225 पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरित झाली.) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. 78 मध्ये महाराष्‍ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेले शालिवाहन शक आजही रुढ आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाकाटक (इ.स. 250 - 525) यांच्या राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. इ.स. 75 मध्ये राष्ट्रकुट साम्राज्य महाराष्ट्रावर राज्य करीत होते. इ.स. 753 मध्ये चालुक्यांनी पुन्हा सत्ता हस्तगत केली आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर इ.स. 1189 पर्यंत राज्य केले. त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. 13व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. 1347 मध्ये तुघलकांच्या पाडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे 150 वर्षे राज्य केले. 16व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत मुघल साम्राज्याशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीजांचा अंमल होता.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 30 Apr 2012 17:50:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[' महाकांतार' ते ' महाराष्ट्र' (२)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/-महाकांतार-ते-महाराष्ट्र-२-110043000038_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/-महाकांतार-ते-महाराष्ट्र-२-110043000038_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्राची अस्मिता जागृत करण्याचे खरे श्रेय जाते ते शिवाजीराजांना. १६२७ मध्ये जन्मलेल्या या व्यक्तीने महाराष्ट्र अस्मिता तयार केली आणि]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/30/images/img1100430038_1_2.jpg' alt='shivaji' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राची अस्मिता जागृत करण्याचे खरे श्रेय जाते ते शिवाजीराजांना. १६२७ मध्ये जन्मलेल्या या व्यक्तीने महाराष्ट्र अस्मिता तयार केली आणि त्याला फुंकर घातली. 1647 मध्ये अवघ्या सतराव्या वर्षी शिवाजीराजेंनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणागड जिंकला आणि 17व्या शतकाच्या मध्यास पश्चिम महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजी महाराजांमुळे प्रथमच विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्याविरोधात स्वतंत्र मराठा राज्य उदयास आले. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचे अनन्यसाधारण असे स्थान आहे. शिवाजी महारजांचा 1674 मध्ये राज्याभिषेक झाला.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे यांनी औरंगजेबाशी सुमारे 28 वर्षे झुंज दिली. पण अखेरीस औरंगजेबाने संभाजीराजांचे धाकटे बंधू राजाराम यांना दक्षिणेस पिटाळले. राजाराम महाराजांनी 18व्या शतकाच्या सुरवातीला जिंजीच्या किल्ल्याची दुरुस्ती केली. त्यांचे पुतणे शाहूराजे हे 1708 मध्ये मराठी दौलतीच्या गादीवर बसले. या कामी त्यांचे पेशवे (मुख्‍य मंत्री) बाळाजी विश्वनाथ यांची त्यांना साथ मिळाली. राजारामांची विधवा पत्नी ताराबाई यांच्याशी शाहू राजे यांचे मतभेद होते. त्यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. चार दशकांनंतर 'छत्रपतींच्या' (भोसले राजघराण्याच्या) नावाने राज्य कारभार पाहणार्‍या पेशव्यांच्या हाती मराठा साम्राज्याची सूत्रे आली. मुघलांना हरवून पेशवे नवे राज्यकर्तें म्हणून उदयास आले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बाळाजी विश्वनाथ व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य वाढवले. त्यांनी मुघल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांच्या अंमलाखाली प्रगत व्यापार आणि अर्थकारण यांचे जाळे आस्तित्वात आले. मुख्य कार्यालय पुण्यात व शाखा गुजरात, गंगेचे खोरे आणि दक्षिणेपर्यंत वाढल्या. शेतीचा देखील विस्तार झाला. त्याचबरोबर पेशव्यांनी दर्यावर्दी कान्होजी आंग्रे यांना हाताशी धरून कुलाबा व पश्चिम तटावरील इतर बंदरे उदयास आणली.  या जहाजांनी मुंबईतील ब्रिटीश, गोव्यातील, वसई दमणमधील पोर्तुगीज यांना काबूत ठेवले. त्याच बरोबर मराठा साम्राज्याच्या बाहेर आपल्या सरदारांना जा‍हागिरी देऊन त्यांच्यामार्फत आपले स्वामित्व अबाधित ठेवले. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले. पेशव्यांच्या काळात दिल्ली (पानिपत), गुजरात (महेसाणा), मध्यप्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर) व दक्षिणेत तंजावरपर्यंत मराठी साम्राज्यविस्तार झाला.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इ.स. 1761 मध्ये पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली याने पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपमा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थांनांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपापले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशव्यांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापुरात गेली तर मुख्य शाखा सातारा येथे राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे वंशज यांनी इ.स. 1708 मध्‍ये शाहूंचे राज्य अमान्य केले. 19व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटीश काळ व स्वातंत्र्योत्तर काळ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान थाटल्यानंतर मराठे व ब्रिटीश यांच्यात इ.स. 1777-1818 या कालावधीत तीन युद्धे झाली.  इ.स. 1819 मध्ये ब्रिटीशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटीशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटीशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळत होते. आजचे नागपूर, सातारा व कोल्हापूर हे त्या काळात विविध राज्यकर्तांच्या ताब्यात होते. सातारा इ.स. 1848 मध्ये बॉम्बे राज्यात तर नागपूर इ.स. 1853 मध्ये नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामील करण्यात आला. बेरार हे हैद्राबादच्या निजामाच्या राज्याचा एक भाग होते. ब्रिटीशांनी इ.स. 1853 मध्ये बेरार काबीज केले व 1902 मध्ये मध्य प्रांतात समाविष्ट केले. मराठवाडा निजामाच्या अंमलखाली राहिला. ब्रिटीशांनी अनेक सामाजिक सुधारण तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या, परंतु त्यांच्या भेदभावी निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणीवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटीशांविरूद्ध लढा उभारला. पुढे महात्मा गांधी यांनी हा लढा व्यापक अहिंसात्मक मागनि पुढे नेला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महत्वाचे केंद्र होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 30 Apr 2012 17:49:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[असा साकारला संयुक्त महाराष्ट्र]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/असा-साकारला-संयुक्त-महाराष्ट्र-110043000036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/असा-साकारला-संयुक्त-महाराष्ट्र-110043000036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्‍ट्र चळवळ उभारली गेली. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य आस्तित्वात आले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विभर्द]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्‍ट्र चळवळ उभारली गेली. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य आस्तित्वात आले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विभर्द, मराठवाडा, खान्देश व अजूनही महाराष्ट्रबाहेरच असेलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रोत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी ही चळवळ उभी राहिली. ब्रिटीशांनी आपल्या राज्य कारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती, परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. 1920 मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनावेळी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधी यांनी मान्य केला होत. लोकमान्य टिळक हे देखील भाषावार प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला, विशेषत: पंडित नेहरु संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1938 <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्ये पटवर्धन व 1940 मध्ये ग. त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याने व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. 1946चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेतलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यिकांनी पाठविले, ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. 1946मध्ये भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत स.का. पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचनेसाठी नेमलेल्या कमिशनने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>दार कमिशन व जे.व्ही.पी. कमिटी </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डिसेंबर 1948 मध्ये प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावार प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.व्ही.पी. कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णांच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे, असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेल यांनी मुंबईचा विकास गुजराती भाषिकांनी केल्याने नमूद केले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>फाजल अली आयोग </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डिसेंबर 1953 मध्ये फाजलअली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस. एम. जोशी, धनंजय गाडगीळ यांच्यासह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. 1955मध्ये आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत व सगळ्यांना सारखी लागू केलली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादासाठी एकभाषिकाचे तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचे. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ, बेळगाव, कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळ ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकशी ' आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त कमी होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गजुराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्याची नव्हती, असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरुंनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालच पाहिजे', हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले. महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसतरंनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, कॉ. श्रीपाद डांगे, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्वाचे नेते ठरले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एस.एण.जोशी, डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्रे यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकातून संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला आणि विरोधकांवर कठोर व बोचरी टीका केली. त्यांनी आपल्या भाषणांतून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>20 <font  style='font-size:11pt; color:#000000'>नोव्हेंबर, 1955 रोजी मोरारजी देसाई व स.का. पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटील यांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही' तर मोरारजी देसाई यांनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तसेच गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल', अशी विधाने केली. लोकांनी संतापून सभा उधळली. 21 नोव्हेंबर, 1955 रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये 15 जणांना प्राण गमवावा लागला. जानेवरी-फेब्रुवारी 1956 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाले. मोरारजींच्या सरकारने सत्तेचा दुरूपयोग करून निष्ठूरपणे 80 लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण 105 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी महाराष्ट्रावर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>संयुक्त महाराष्ट्राची स्थापन</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></font><br/>1 <font  style='font-size:11pt; color:#000000'>नोव्हेंबर, 1956 रोजी केंद्राने सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाला महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व 1962ला होणार्‍या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. ‍इंदिरा गांधी यांनी नेहरू यांचे मन वळविले. द्विभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरातला दहा कोटी द्यायचे व पुढील चार वर्षात ती रक्कम कमी करत आणायची, अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास आणि उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली, असा दावा गुजराती भाषिक करीत होते. त्याचे 'व्याज' म्हणून एकूण 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावाबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' हे नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र' असे नाव ठरविले व राज्याची स्थापना कामगार दिनास म्हणजे 1 मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर निश्चित झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>('<font  style='font-size:11pt; color:#000000'>निर्मिक'च्या दिवाळी अंकातून साभार) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 30 Apr 2012 17:47:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र दिन!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/महाराष्ट्र-दिन-111043000010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/महाराष्ट्र-दिन-111043000010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1104/30/images/img1110430010_1_1.jpg' alt='maharashatra day' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MHNEWS</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषात महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले. नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंतांनी गायिली आहे. तर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापटांनी दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठी भाषेचे राज्य आल्यावर आपल्या मातृभाषेला चांगले दिवस येतील, अशी केवळ अपेक्षाच नव्हे, तर खात्री मराठी जनतेला वाटत होती. पारतंत्र्याच्या काळात, नसे आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, असे भावपूर्ण स्वप्न माधव ज्यूलियन यांनी शब्दबद्ध केले होते. मराठी भाषा मृत होऊ लागली आहे. मरू घातली आहे, असे अनेक शहाणेसुरते उघड-उघड बोलू लागले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अरे, गीतोपदेशाच्या अमृताचा महाराष्ट्र शारदेवर महाभिषेक करणार्‍या ज्ञानोबांनी या मराठीच्या बोलांनी आपण अमृतालाही पैजेवर जिंकू, अशी प्रतिज्ञा केली होती. अमृतालाही जिंकणारी भाषा मृत होईल? संतांनी लोकगीतांपासून, ब्रह्मपदाचा मार्ग सांगणार्‍या विचारगर्भ अध्यात्मापर्यंत या मराठी भाषेचा मुक्त संचार सर्वत्र घडविला. ही कधी पायात सुवर्णशब्दांचे नादमधुर पैंजण बांधून लोकरंजनासाठी नाचली, तर कधी डफ-तुणतुण्यांच्या साथीने वीराचे बाहू स्फुरण पावण्यासाठी शाहिरांच्या वीररसात न्हाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेतच आपले लोककल्याणाचे आदेश दर्‍याखोर्‍यांत आणि खेड्यापाड्यात पोहोचविले. मराठी भाषेने सप्तसुरांच्या नादात आणि नवरसांच्या रंगांत इथल्या रंगभूमीवर असे काही, वैभव संपादन करून ठेवले की, भारतातल्याच नव्हे, जगातील भाषांना मराठीचा हेवा वाटावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फार कशाला, या महाराष्ट्राच्या लेकरांनी मराठी भाषेची अनेकविध प्रकाराने सेवा तर केलीच, पण हिंदी भाषेचा आद्य पत्रकारही मूळचा महाराष्ट्रीय होता. गुजराती भाषेच्या व्याकरणाचे नियम करण्यात ज्याने फार मोठी कामगिरी बजावली तो विद्वान या मराठी भूमीचा पुत्र होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गर्जून सांगणारे नरकेसरी लोकमान्य या मराठी भूमीतच जन्माला आले. देशाला समानतेचा मंत्र देणारे फुले-आंबेडकर या महाराष्ट्रातच निर्माण झाले. संगीतशास्त्राच्या क्षेत्रात आसेतुहिमाचल ज्यांची कारकीर्द गाजली, मौलिक स्वरुपाची ठरली ते पलुस्कर, भातखंडे इथलेच. अहो, बोलपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके काय किंवा पहिले मराठी चित्रपटातील राष्ट्रपती पदक मिळविण्याचा पराक्रम करणारे आचार्य अत्रे काय, मराठी मातीचेच सुपुत्र. देशाला प्रचलित काळानुसार धर्मशास्त्र समजावून सांगून धर्मसिंधु सारखा सर्वमान्य ग्रंथ लिहिणारे बाबा पाध्ये आपल्या पंढरपूरचे. किती नावे सांगावीत? नाटक कंपनीबरोबर गावोगावी फिरून असंख्या हातांचे ठसे घेऊन त्रिरेखावेलाप्रबोध नावाचा लोकोत्तर ग्रंथ लिहिणारे ज. वा. जोशी इथलेच. केवळ मराठीतच नव्हे, तर इंग्रजी, गुजरातीपासून हिब्रूपर्यंत विविध प्रकारचे टाईप तयार करणारे आद्य मुद्रक महर्षि जावजी दादाजी हे महाराष्ट्राचेच. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कालमापनाच्या क्षेत्रात भारतीयांची कामगिरी विश्वभाषेतून मांडतांना एका इंग्रजसाहेबाला साहाय्य घ्यावे लागले ते मराठीभाषिक शं. बा. दीक्षित यांचेच. मराठी भाषिक कर्तृत्वाची ही केवळ एक झलक. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इतक्या थोरांनी गौरविलेली भाषा मृत होणार असे आपण कसे म्हणे शकू ? मराठी भिकारीण झाली, तरीही कुशीचा तिच्या तीस केवि त्यजी या शब्दांत मराठीचे पुत्र मराठीला अंतर देणार नाहीत, अशी आत्मविश्वासपूर्ण भविष्यवाणी माधव ज्यूलियन यांनी कित्येक वर्षांपूर्वी वर्तविली होती. ती सार्थ आणि यथार्थ ठरेल, अशी अपेक्षा आपण यंदाच्या महाराष्ट्र दिनी बाळगूया. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना या सार्‍या गोष्टी आठवल्या. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 30 Apr 2011 13:08:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 14:56:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[देशाची आर्थिक नाडी महाराष्ट्राच्या हातात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/देशाची-आर्थिक-नाडी-महाराष्ट्राच्या-हातात-110042900026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/देशाची-आर्थिक-नाडी-महाराष्ट्राच्या-हातात-110042900026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या महानगराची लोकसंख्या सव्वा कोटीच्या आसपास आहे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/29/images/img1100429026_1_1.jpg' alt='mumbai' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या महानगराची लोकसंख्या सव्वा कोटीच्या आसपास आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये मुंबई एक आहे. मुंबई महानगर म्हणून जो भाग ओळखला जातो, त्याची एकूण लोकसंख्या दीड ते पावणे दोन कोटीच्या आसपास आहे. त्यात नवी मुंबई आणि ठाणे या महागनर पालिकांचाही समावेश होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1970<font  style='font-size:11pt; color:#000000'>च्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला, पण विदर्भ, मराठवाडा आणि कोकणासारखे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात न नोकरशहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव पाहायला मिळतो. अलीकडच्या काही वर्षांत मात्र राज्याचा सर्वां‍गीण विकास साधण्याच्या दृष्टीने राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक पावले उचलण्यास सुरवात केल्याचे दिसते. त्यादृष्टीने औद्योगिक तसेच सिंचनासाठीच्या थोरणांत बदल व सुधारणा करण्यात आली आहे. नागपूर अधिवेशनासह मराठवाडा, कोकण तसेच नाशिक याठिकाणी मंत्रीमंडळाच्या विशेष बैठका आयोजित करून त्या त्या विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यावरही भर देण्यात येत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्याचे 2004 सालचे वार्षिक उत्पन्न 106 अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचे 13 टक्के योगदान आहे. 64.14 टक्के लोक कृषी व संबंधित उद्योगांत रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी 46 टक्के हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगांतून मिळतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>महत्त्व मुंबईचे </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगातील दहा व्यावसायिक केंद्रांमध्ये मुंबईचा समावेश होतो, यावरून मुंबईचे जागतिक पातळीवरील महत्त्व लक्षात यावे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी जशी आहे, तशीच ती मनोरंजनाचीही राजधानी आहे. देशातील २५ टक्के व्यापार, बंदराच्या माध्यमातून होणारा ४० टक्के व्यापार आणि ७० टक्के भांडवली व्यवहार भारताच्या गंगाजळीत भर घालत असतात. मुंबईतच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आहे. शिवाय अनेक बड्या कंपन्यांची मुख्यालये याच महानगरात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील एकूण कारखानदारी नोकरदारांपैकी दहा टक्के लोक येथे रहातात. देशातील ४० टक्के आयकर आणि साठ टक्के कस्टम ड्यूटी येथून जमा होते. वीस टक्के केंद्रीय अबकारी कर येथूनच केंद्राच्या तिजोरीत भरला जातो. शिवाय देशाचा ४० टक्के परकीय व्यापार येथूनच चालतो. कॉर्पोरेट करापैकी चाळीस अब्ज रूपयांचा कर मुंबई देते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईचे प्रती माणशी उत्पन्न ४८ हजार ९५४ आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या ते तिप्पट आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, टाटा ग्रुप, गोदरेज, रिलायन्स यांच्यासारखी भारतातील बडी व्यावासायिक आस्थापनांचे मुंबईत मुख्यालय आहे. फोर्च्युन ग्लोबल ५०० कंपन्यांमधील चार कंपन्या मुंबईत आहेत. अनेक परकीय बॅंका आणि वित्तीय संस्थांनी मुंबईत शाखा उघडल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या संस्थाही येथे आहेत. ज्यात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, ऑईल अँड नॅचरल गॅस लि. (ओएनजीसी), बॉम्बे हाय याचा समावेश होतो. देशातील चौदा टक्के तेलाची गरज बॉम्बे हायमधून भागवली जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनोरंजनाचे केंद्र येथेच असल्याने त्याला बॉलीवूड असेही म्हटले जाते. बॉलीवूड ही जगातील सर्वांत मोठी मनोरंजनाची इंडस्ट्री आहे. जगात सर्वाधिक चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार होतात. त्याचबरोबर मराठी चित्रपटांचेही मुंबई हेच प्रमुख केंद्र आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 29 Apr 2010 18:49:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सुवर्णमहोत्सवी वर्षातील पंचरत्ने]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/सुवर्णमहोत्सवी-वर्षातील-पंचरत्ने-110042900039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/सुवर्णमहोत्सवी-वर्षातील-पंचरत्ने-110042900039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[दादासाहेब फाळके हे मराठी गृहस्थ होते आणि म्हणूनच त्यांचे; पर्यायाने मराठी चित्रपटांचे स्मरण महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात करण्यात शहाणपण आहे. 'श्वास'ने इतिहास घडविला, त्यालाही आता सात वर्षे होऊन गेली. नंतर मराठी प्रेक्षकांनी कधीही पाहिले ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1004/29/images/img1100429039_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दादासाहेब फाळके हे मराठी गृहस्थ होते आणि म्हणूनच त्यांचे; पर्यायाने मराठी चित्रपटांचे स्मरण महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात करण्यात शहाणपण आहे. 'श्वास'ने इतिहास घडविला, त्यालाही आता सात वर्षे होऊन गेली. नंतर मराठी प्रेक्षकांनी कधीही पाहिले नसतील असे मराठी चित्रपट येऊन गेले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुवर्णमहोत्सवी वर्षात काही महत्त्वाचे चित्रपट आले, काही येऊ घातले आहेत. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा चित्रपट या वर्षात आला, हा सोनेरी योगायोग आहे. नशिबाने परेश मोकाशीने याच वर्षात चित्रपट पूर्ण करून प्रदर्शित केला. त्याचे सर्वच पातळ्यांवर कौतुक होत आहे. हा विषय मांडायला अवघड होता.नेहमीप्रमाणे टीकाकारांसाठी सोडलेल्या अवकाशात काही मुद्दे आहेतच. शिवाय, फाळक्यांच्या एका नातेवाईकानेही चित्रपटावर नुकतीच एका संदर्भात टीका केली आहे. या टीका मान्य करुनही परेशने खूपच चांगली कामगिरी बजावली आहे, हे नोंदवले जातेच. मराठी माणूस, महाराष्ट्र काय आहेत हे समजण्यासाठी या चित्रपटाचे डबिंग होऊन तो इतर राज्यात पोचणे गरजेचे आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1004/29/images/img1100429039_1_2.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">IFM</p>IFM</p></p><!--endImage--> '<font  style='font-size:11pt; color:#000000'>विहीर' ही उमेश कुलकर्णीने चित्रपटसृष्टीलाच दिलेली भेट आहे. असे चित्रपट भारतात बनत नाहीत. पूर्वी दिल्ली दूरदर्शनवर रात्री असे चित्रपट दाखवले जायचे आणि प्रेक्षक 'कंटाळवाणा' म्हणून बंद करायचे. पौगंडावस्थेतील मुलाचे चित्रण हा तर मराठी चित्रपटसृष्टीत नाकं मुरडण्यासाठी आयता सापडलेला विषय आहे. विशेषतः जे लोक सतत चित्रनगरी, कोल्हापूरचा बंगला इथेच चित्रीकरण करतात त्यांच्यासाठी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>जोगवा' हे आणखी एक धाडस. जोगत्या आणि जोगतिणीचं जगणं तसं आधी चित्रपट व कादंब-यांतून थोडं झालेलं आहे. हा चित्रपट पूर्ण याच विषयावरचा आहे. उपेंद्र लिमयेने केलेली तायप्पाची भूमिका हा चित्रपटाचा महत्वाचा भाग आहे. भोवताली इंटरनेट, शहरीकरण यांचा प्रभाव पडत असतातना शहरी प्रेक्षकांसाठी असे चित्रपट घेऊन येणं, यालाच धाडस म्हणतात. पुरुषाने रंगवलेला हिजडा, ही आंबटशौकिनी रसिकता घेऊन चित्रपट पाहायला कोणाला जायचे असेल तर ती व्यक्ती वेडी आहे. .</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>गंध' तीन गोष्टींचा चित्रपट आहे. सहसा असे चित्रपट हमखास फसतात. अनेक कथांचा शेवट कोणत्यातरी एका ठिकाणी करण्याच्या नादात तिरपागडं काहीतरी होऊन बसतं. सचिन कुंडलकर प्रयत्नपूर्वक फसलेला नाही. 'बाजूला बसलेली बाई', 'औषधे घेणारा माणूस', 'लग्नाच्या वयाची मुलगी' या तीन गोष्टींचा गंध शेवटी एकच आहे आणि तो कसा, हे चित्रपटात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>गाभ्रीचा पाऊस' हा शेतकरी जीवनावरचा चित्रपट अजिबात न रडवता आणि वेळप्रसंगी हसवून विनोदाचा आधार घेऊन परिणामकारकरित्या मांडलेला आहे. शेतकरी आणि आत्महत्या हा तसा चोथा विषय. तरीही, हा चित्रपट वेगळाच ठरतो. सतीश मनवरने केलेला विषयाचा अभ्यास निराळा आहे. नेहमीप्रमाणे निर्मात्यांच्या नकारातून याही चित्रपटाला जावे लागले आणि शेवटी जे होते तेच झाले. एक निर्माते कथेवर व दिग्दर्शकावर विश्वास ठेवणारे मिळाले आणि आज हा चित्रपट सर्वत्र गाजला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुवर्णमहोत्सवी वर्षात बनलेल्या अनेक चित्रपटांपैकी या ख-या कलाकृती. पन्नासाव्या वाढदिवसाला शोभतील अशा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 29 Apr 2010 15:04:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[इतिहासातली मुंबई]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/इतिहासातली-मुंबई-110042900027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/इतिहासातली-मुंबई-110042900027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई हे नाव मुंबा किंवा महा अंबा या देवीच्या नावावरून पडले आहे. मुंबा किंवा महा अंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई असे नाव या नगरीला प्राप्त झाले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/29/images/img1100429027_1_1.jpg' alt='mumbai' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हे नाव मुंबा किंवा महा अंबा या देवीच्या नावावरून पडले आहे. मुंबा किंवा महा अंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई असे नाव या नगरीला प्राप्त झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आताची मुंबई ही सात बेटांवर वसली आहे. अगदी पाषाण युगापासून येथे वस्ती असल्याचे पुरावे आहेत. मुंबईवर मौर्य राजांनीही राज्य केले. अशोकाच्या प्रचंड साम्राज्याचा मुंबई एक भाग होती. नंतरच्या काळात सातवाहनांनीही मुंबईवर ताबा मिळविला. १३४३ पर्यंत शिलाहार राजांनी मुंबई आपल्या ताब्यात राखली. पण त्यानंतर गुजरातच्या शहाकडे मुंबईची सत्ता गेली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोर्तुगीजांचे मुंबईत आगमन १५३४ साली झाले. त्यांनी गुजरातच्या बहादूर शहाकडे या बेटाची मागणी केली होती. बहादूरशहाने बिनदिक्कत ही बेटे त्यांच्या ताब्यात दिली. पुढे पोर्तुगीजांनी इंग्लडचा राजा चार्ल्स दुसरा याला हुंड्यात चक्क हे बेट आंदण म्हणून दिले. या राजाने पोर्तुगीज राजाच्या मुलीशी लग्न केलं म्हणून त्याला त्यांनी ही भेट दिली. पुढे ब्रिटिश इस्ट इडिया कंपनीने हे बेट राजाकडून १६६८ मध्ये दहा पौंडाच्या वार्षिक भाड्याने आपल्या ताब्यात घेतले. पुढे ब्रिटिशांनीच मुंबईचा खर्‍या अर्थाने विकास केला. पोर्तुगीजांनीच मुंबईचे बॉम्बे केले. अर्थात ते त्याला </font><font style='font-size:11pt;'>Bombaim </font><font style='font-size:11pt;'>असे म्हणत. पुढे इंग्रजांनी त्याचे </font><font style='font-size:11pt;'>Bombay </font><font style='font-size:11pt;'>केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटिशांना तत्कालीन उपखंडात आपले बंदर विकसित करायचे होते, त्यांना मुंबई त्यासाठी अगदी योग्य वाटली. म्हणून त्यांनी सूरतहून आपले मुख्यालय मुंबईला हलविले. मुंबईमध्ये बाहेरचे लोक येण्यास सुरवात झाली ती यावेळेपासून. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटिशांच्या या निर्णयामुळे मुंबईची लोकसंख्या अगदी फटाफट वाढली. १६६१ मध्ये दहा हजाराची लोकसंख्या १६७५ मध्ये साठ हजारांवर जाऊन पोहोचली. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे हे मुख्यालय पुढे संपूर्ण देशाचा कारभार ब्रिटनच्या राणीच्या हातात गेल्यानंतरही बॉम्बे प्रेसिडेन्सीची राजधानी म्हणून कायम राहिले. ब्रिटिशांच्या ताब्यात हे शहर गेल्यानंतर त्यांनी त्याची सुव्यवस्थित रचना केली. अतिशय कलात्मक अशा इमारती उभारल्या.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१८५३ मध्ये स्थानिक रहिवाशांच्या दृष्टिकोनातून एक आक्रित घडलं. मुंबई ते ठाणे या दरम्यान त्यावेळी पहिली रेल्वे धावली. अमेरिकेचे नागरि युद्ध सुरू असताना मुंबई जगातील कापड व्यवहाराचे एक प्रमुख केंद्र बनली होती. १९०६ मध्ये मुंबईची लोकसंख्या दहा लाखावर गेली होती. तत्कालीन कोलकत्यानंतर सर्वांत जास्त लोकसंख्येचे हे शहर होते. पुढे ब्रिटिशांविरोधात भारतीय जनतेचा लढा सुरू झाला, त्यावेळी या सगळ्या चळवळीचे केंद्र मुंबईच होते. महात्मा गांधींनी भारत छोडो ही चळवळ मुंबईच्या गवालिया टॅंक आताचे आझाद मैदान येथून केली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याची मुंबई ही राजधानी बनली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९५५ मध्ये मुंबई राज्याची पुनर्रचना होऊन महाराष्ट्र व गुजरात असे त्याचे भाग करण्यात आले. त्यावेळी मुंबई शहर हे स्वायत्त शहर करावे अशीही एक मागणी होती. पण संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईची मागणी लावून धरली. त्यासाठी मोठी चळवळ सुरू केली त्यासाठी १०५ जणांनी आपले प्राण दिले. त्यांनी दिलेल्या प्राणामुळेच १ मे १९६० मध्ये अखेर मुंबई महाराष्ट्रात आली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 29 Apr 2010 13:31:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/विकासाच्या-वाटेवर-महाराष्ट्र-110042900025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/विकासाच्या-वाटेवर-महाराष्ट्र-110042900025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या स्थापनेपासून आतापर्यंतच्या 47 वर्षात महाराष्ट्राने अन्य राज्याच्या तुलनेत आघाडी मारली आहे, हे निश्चिचतच. महाराष्ट्राच्या विकासाचा चढता आलेख हा असा आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/29/images/img1100429025_1_1.jpg' alt='maharashatara day' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MHNEWS</p></td></tr></table><!--endImage--> 1 <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या स्थापनेपासून आतापर्यंतच्या 47 वर्षात महाराष्ट्राने अन्य राज्याच्या तुलनेत आघाडी मारली आहे, हे निश्चिचतच. महाराष्ट्राच्या विकासाचा चढता आलेख हा असा आहे. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>उद्यो</font><font style=' color:#000000;'>ग</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकासाला गती खर्‍या अर्थाने 1970 नंतरच्या काळात मिळाली. 1971 नंतरच्या दहा वर्षात कारखान्यांच्या संख्येत 62 टक्के वाढ झाली. महाराष्‍ट्राचे औद्योगिक धोरण हे देशाच्या औद्योगिक धोरणाशी नेहमीची सुसंगत राहिले आहे. औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी नवीन औद्योगिक गुंतवणूक व पायाभूत सुविधांकरिता नवे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाधिष्ठीत सेवा उद्योगांमध्ये गुंतवणूक होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रास सर्वाधिक पसंतीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी शासनाने 2003 साली सेवा धोरण जाहीर केले. यासाठी सिडको व एम. आय. सी. सी यांनी माहिती तंत्रज्ञान पार्क विकसित केले. गेल्या वर्षभरात 49 माहिती तंत्रज्ञान संकुलांची उभारणी करण्यात आली. ई-गर्व्हनन्स धोरणामुळे नागरिकांना उच्चतम सुविधा, सेवाक्षमतेमध्ये वाढ, महसुलात वाढ तसेच प्रशासनात पारदर्शकता आणणे ही उद्दिष्टये आहेत. यासाठी सेतू नावाने नागरी सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानुसार 27 जिल्ह्यांच्या व 312 तालुक्याच्या ठिकाणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारचे 94 दाखले दिले जातात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील विदेशी गुंतवणुकीमध्ये 21 टक्के हिस्सा प्राप्त करून महाराष्ट्र अग्रस्थानावर आला आहे. राज्यातील अविकसित व इतर विकासाभिमुख भागात उद्योगाचा प्रसार होण्यासाठी शासनाने सामुहिक प्रोत्साहन योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत जकात/प्रवेशकर परतावा, वीज शुल्कात माफी, विद्युत पुरवठ्यात सुलभता अशी विविध प्रोत्साहने उद्योगांना देण्यात आली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियमाच्या मसुद्यास मान्यता देण्यात देऊन 108 विशेष आर्थिक क्षेत्रांना मान्यता शासनाने विशेष आर्थिक क्षेत्रांना (एस.ई.झेड.) मंजुरी दिली. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, वस्त्रद्योग, औषधनिर्मिती, बहुउत्पादने, अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, विद्युत निर्मिती आणि मुक्त व्यापार साठवण व साखर उद्योग आदींचा समावेश आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/1004/29/images/img1100429025_1_2.jpg' alt='farming'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>कृषी </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कृषी क्षेत्रामध्ये रोजगाराची मोठी क्षमता आहे. राज्याच्या कृषि आणि संलग्न कार्ये क्षेत्रांची स्थूल राज्य उत्पन्नातील घट थांबविण्यासाठी कृषि धोरण आखण्यात आले. कृषि प्रक्रिया व व्यापारक्षम शेती या कक्षाची स्थापना करण्यात आली. याद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी, शेतमालाला खात्रीशीर व उच्च किंमत देणे, कच्चा माल उपलब्ध होण्यासाठी मदत ‍आणि जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या संभाव्य संधीचा शोध ही उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली आहे. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्त्याचा प्रश्न प्रभावीपणे हाताळण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा करुन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली. यासाठी आत्महत्त्याग्रस्त 6 जिल्ह्यांसाठी 5200 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी जैविक व्याप्ती व विकास समितीची स्थापना करण्यात आली. शेतकर्‍यांसाठी शासनाने अंडी उबवणी केंद्र, कुक्कुट विकास गट व विकास केंद्रे स्थापन केली. दुग्धव्यवसायात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारच्या ऑपरेशन फ्लडची राज्यात यशस्वी अंमलबजावणी केली. शेतकर्‍यांना कृषिपणन विषयक माहिती उपलब्ध होण्यासाठी बाजाराच्या ठिकाणी मार्कनेट प्रकल्प सुरु केला. याबरोबरच कृषि उत्पन्नाबाबतच्या माहितीसाठी वेबसाईटही सुरु करण्यात आली.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1004/29/images/img1100429025_1_3.jpg' alt='sugar factory'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>सहका</font><font style=' color:#000000;'>र</b></font><br/>20<font  style='font-size:11pt; color:#000000'>व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये महाराष्ट्रात सहकार चळवळीला प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील आर्थिक व सामाजिक चित्र सहकारी साखर कारखानदारीने पूर्णत: बदलून गेले. 50 वर्षात महाराष्ट्रातील साखर उद्योगाने ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकला. देशातील 36 टक्के सारखरेचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. शेतकर्‍यांची व्यापारांकडून होणारी पिळवणूक टाळणे, शेती उत्पादनाच्या विक्रीची व्यवस्था करुन चांगला मोबदला मिळवून देणे. त्यातबरोबर ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल वाजवी किंमतीमध्ये मिळावा अशी उद्दिष्ट्ये नजरेपुढे ठेऊन सहकारी पणन संस्‍था स्थापन करण्यात आल्या.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>पायाभूत सुविध</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/1004/29/images/img1100429025_1_6.jpg' alt='mseb'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MHNEWS</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाचा व राज्याचा सामाजिक-आर्थिक विकास विजेवर अवलंबून असल्याने विजेची कमतरता लक्षात घेता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे 4 कंपन्यांमध्ये विभाजन करुन विजेची उपलब्धता वाढविण्यास प्रयत्न सुरु केले. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घेतलेला धोरणात्मक निर्णय नजरेसमोर ठेऊन शासनाने खाजगी क्षेत्रास ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी सक्रीय पुढाकार घेतला आहे. विजेची दर आकारणी व ऊर्जा क्षेत्रातील आर्थिक व्यवस्थापन सुधारणांसाठी वीज नियामक आयोग अधिनियमानुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची स्थापना केली. अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे व स्वतंत्र मंत्री असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सातत्यपूर्ण आर्थिक विकासासाठी परिवहन सेवा ही आवश्यक आहे. यासाठी गाव तेथे रस्ता हे धोरण आखण्यात आले. सर्वाधिक पसंतीच्या वाहतूक यंत्रणेमध्ये रेल्वे यंत्रणा आहे. यासाठी कोकण रेल्वेद्वारे भारताशी जोडणी केली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डची स्थापना करुन खाजगी क्षेत्राच्या सहभागातून लहान बंदरे विकसित केली आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>सामाजिक क्षेत्र</font><font style='font-size:11pt;'>े  </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/29/images/img1100429025_1_5.jpg' alt='maharashtra day' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MHNEWS</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात 1972 पासून रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. मागेल त्याला काम या तत्त्वानुसार लाभदायक व उत्पादक रोजगार पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण भागात ‍अतिरिक्त रोजगार पुरविणे व त्यासोबत गरीब जनतेला धान्याची हमी देऊन त्या जनतेचा पोषकस्तर सुधारण्यासाठी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरु करण्यात आली. केंद्र सरकारचा सर्व शिक्षा अभियान हा महाराष्ट्रात सर्व शिक्षण मोहीम या स्वरुपात राबविला जाते. या अभियानात 6 मे 14 वयोगटातील मुलामुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी देऊन त्यांच्यामधील मानवी क्षमतेचा विकार साधण्यात येत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे जास्तीतजास्त खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा प्रबोधनीची स्थापना करण्यात आली आहे. क्रीडा विद्यापीठ व क्रीडा प्रबोधिनी जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यात कुटुंबकल्याण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. अर्भकमृत्यू व बाळंतपणासाठी मृत्यू यांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण अभियानाअंतर्गत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येतो. एड्‍सचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य एड्‍स निर्मुलन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील नागरी भागातील निवासाची गरज भागविण्यासाठी म्हाडाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पुणे-पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आजपर्यंत 2 लाख 7 हजार 460 सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. राज्यातील नागरी भागात विकार कामे करण्यासाठी सिडकोने नवी मुंबईत मिलेनियम टॉवर, स्पॅगेटी, घरोंदा, सी-वुड असे घरबांधणी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.</font><font style=' color:#FF0080;'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य येथे कार्यरत आहेत.) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 29 Apr 2010 13:22:22 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/संयुक्त-महाराष्ट्र-चळवळ-110042700044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/संयुक्त-महाराष्ट्र-चळवळ-110042700044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे. अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉस्मोपॉलिटिन आहे, ती कुण्या एका भाषिकांची नाही, असे उच्चरवाने इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी ही मुंबई ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1004/27/images/img1100427044_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">MH Govt</p>MH GOVT</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे. अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉस्मोपॉलिटिन आहे, ती कुण्या एका भाषिकांची नाही, असे उच्चरवाने इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी ही मुंबई मिळविण्यासाठी १०५ मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे, ही बाब विसरता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास अंगावर रोमांच आणणारा आहे, तो वाचला की मुंबईसाठी मराठी माणसाने काय मोजले आहे, ते कळते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ठिकठिकाणी भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. त्यासाठी आंदोलने होऊ लागली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल या दोघांचा मात्र याला विरोध होता. भाषेनुसार राज्ये निर्माण केली तर देशाचे तुकडे होण्याची भीती या दोघांना वाटत होती. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक होऊन लढा देणाऱ्या सर्व भाषिक राज्यांना आपल्या भाषकांचे राज्य असणे गरजेचे वाटत होते. म्हणून भाषावार प्रांतरचना व्हावी म्हणून आंदोलने सुरू झाली. प्रामुख्याने ही आंदोलने दक्षिणेत होऊ लागली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तेलगू राज्य व्हावे यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबून नंतर प्राणत्याग करणारे श्रीरामलू पोट्टी हे अखेरीस राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना समितीने आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू अशी राज्ये स्थापन करण्याची शिफारस केंद्राला केली. त्यावेळी या समितीने मराठी व गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य न करता या दोहोंचे मिळून एक राज्य करावे व त्याची राजधानी मुंबई असावी अशी शिफारस केली. या शिफारशीवरच ही समिती थांबली नाही, तर निजामाच्या ताब्यात असलेला मराठी भाषिकांचा मराठवाडावा व तत्कालीन मध्य भारतात असलेला विदर्भ यांचे मिळून मराठी भाषकांचे विदर्भ राज्य करण्याची शिफारस करून तमाम मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याला विरोध करण्यसाठी सर्व पक्षीय मराठी नेते एकत्र आले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समितीची स्थापन सहा फेब्रुवारी १९५६ रोजी केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून एकेकाळचे ब्राह्मणेतरांचे नेते केशवराव जेधे यांची निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीत त्यावेळी सर्व पक्षांचे नेते होते. आचार्य अत्रे यांची मुलखमैदान तोफ तर होतीच, पण सुधारकाग्रणी प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, कॉम्रेड डांगे हे नेतेही त्यात होते. या सर्वांनी महाराष्ट्राला जागे केले. स्वतंत्र भाषक राज्य असण्याची जाणीव निर्माण केली. या समितीचा प्रभाव एवढा पडला की त्यानंतर झालेल्या मुंबई राज्याच्या निवडणुकीत समितीला १०१ जागा मिळाल्या. पण गुजरात, मराठवाडा व विदर्भातील लोकप्रतिनिधींच्या साथीने यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतरही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ थाबंली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या गर्जनेसह तमाम मराठी मंडळी पेटून उठली. त्यावेळी केंद्रात अर्थमंत्री असलेल्या सी. डी. देशमुखांनीही या मागणीला पाठिंबा देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या लढ्याला नैतिक बळ प्राप्त झाले. पुढे मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाईं यांनी हे आंदोलन चिरडण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या निर्दयीपणामुळेच फ्लोरा फाऊंटनजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १०५ जण हुतात्मा झाले. मराठी राज्यासाठी १०५ जणांचे रक्त सांडले. या घटनेनंतर मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे गांभीर्य वाढले. मग देसाईंना हटवून मुख्यमंत्रिपदाची धुरा यशवंतराव चव्हाणांकडे देण्यात आली. त्यानंतर मग अखेरीस १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजराती भाषिकांचे गुजरात हे वेगळे राज्य करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्र राज्य होत असताना मराठी भाषिकांची मोठी वस्ती असलेले बेळगाव मात्र कर्नाटकातच राहिले. शिवाय डांग, निपाणी असे छोटे छोटे भागही अनुक्रमे गुजरात व कर्नाटकात गेले. त्याची जखम आजही ठसठसती आहेच. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 27 Apr 2010 18:11:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सुवर्ण महोत्सवी 'सेलिब्रेशन'मध्ये गुजरात पुढे!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/सुवर्ण-महोत्सवी-सेलिब्रेशन-मध्ये-गुजरात-पुढे-110042700043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/सुवर्ण-महोत्सवी-सेलिब्रेशन-मध्ये-गुजरात-पुढे-110042700043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/27/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1456556260-0387.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या विभाजनाचा आणि पर्यायाने स्वतंत्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव येत्या एक मे रोजी धुमधडाक्यात साजरा होत आहे. पण  त्याचा उत्साह शेजारच्या गुजरातमध्ये जास्त असल्याचे दिसते आहे. केवळ गुजरातमधीलच नव्हे, तर जगभरात पसरलेल्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1004/27/images/img1100427043_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या विभाजनाचा आणि पर्यायाने स्वतंत्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव येत्या एक मे रोजी धुमधडाक्यात साजरा होत आहे. पण  त्याचा उत्साह शेजारच्या गुजरातमध्ये जास्त असल्याचे दिसते आहे. केवळ गुजरातमधीलच नव्हे, तर जगभरात पसरलेल्या तमाम गुजराती मंडळींनी हा दिवस  दणक्यात साजरा करण्याचे ठरवलेले दिसते. या सुवर्ण महोत्सवाचे 'ऑनलाईन सेलिब्रेशन'ही करण्यात येत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र अगदीच 'दीन' असल्याचे  चित्र दिसत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रसिद्धीत आघाडीवर असणार्‍या नरेंद्र मोदींच्या गुजरात सरकारने यंदाचा 'गुजरात दिन' आपल्या सरकारच्या 'विधायक' प्रसिद्धीसाठी पुरेपूर वापरण्याचे ठरवले आहे.  मध्यंतरी इंदूरमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी गुजरात सरकारच्या कामाची माहिती देणारी सीडी, पुस्तके मोफत वाटली होती. शिवाय  'स्वर्णिम गुजरात' लिहिलेल्या हजारो पिशव्या भाजपच्या कार्यकर्त्यांत, पत्रकारांत वाटण्यात आल्या होत्या. मोदींचा संदेश अशा तर्‍हेने तेव्हाच देशभर पोहोचला  होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याही पुढे जाऊन गुजरातचे प्रमुख मंत्री प्रत्येक राज्यांत जाऊन तेथील गुजराती समुदायाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरातमध्ये येण्याचे आवाहन करत होते.  महाराष्ट्र, मध्य प्रदेश या दोन राज्यात गुजराती समाज मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज सधनही आहे. त्यामुळे वजनदार मंत्र्यांनी तेथे जाऊन गुजराती मंडळींना  सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एक मे रोजी गुजरातमध्ये जोरदार कार्यक्रम तर होणार आहेत, पण आपल्या या उपक्रमाची दखल आंतरजालावरही घ्यावी यासाठी मोदींच्या सरकारने  </font><font style='font-size:11pt;'>www.swarnimgujarat.org </font><font style='font-size:11pt;'>नावाची वेबसाईटच सुरू केली आहे. इंग्रजी आणि गुजराती या दोन भाषांत असलेल्या या वेबसाईटवर गुजरात स्थापनेचा  इतिहास दिला आहे. शिवाय 'गुजरातपेडीया' हा विकिपेडीयाच्या धर्तीवर मुक्त माहिती स्त्रोत तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात गुजरात केंद्रीत विविध  विषयांवर, गावांवर लेख लिहून घेतले जात आहेत. वाचकांनी स्वतंत्रपणे या वेबसाईटला मजकूर पाठविण्याची सोयही आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुवर्ण महोत्सवानिमित्त होणार्‍या उपक्रमांची माहिती, त्या शिवाय गुजरातच्या अभिमानाचे प्रतीक म्हणून झालेल्या कार्यक्रमांचे फोटो, व्हिडीओ हे देखिल या  साईटवर उपलब्ध आहेत. गुजरातचा अभिमान जागृत रहावा यासाठी अतिशय सुंदर असे वॉलपेपर तयार करण्यात आले आहेत. ते डाऊनलोड करण्याची सोयही  उपलब्ध आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रतिज्ञाबद्ध 'गुजरात' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महत्त्वाची बाब म्हणजे सुवर्ण महोत्सवानिमित्त गुजराती मंडळींनी काही उपक्रम हाती घ्यावा यासाठी आवाहन करण्यात आले असून तो उपक्रम नोंदविण्यासाठी  प्रतिज्ञा असा वेगळा विभाग आहे. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी अनेकविध प्रतिज्ञा नोंदवल्या आहेत. कुणी झोपडपट्टीत जाऊन काम करेन,  कुणी माझ्या मुलांत वाचनाची आवड रूजवेन, कुणी इको फ्रेंडली उत्पादने वापरने, कुणी पाणी व वीज जपून वापरेन असे शेकडो उपक्रम केले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेतील गुजराती समाजानेही गुजरात दिन साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला असून खास  त्यासाठी </font><font style='font-size:11pt;'>gujaratday.dcsamaj.com </font><font style='font-size:11pt;'>ही वेबसाईट सुरू  केली आहे. वॉशिंग्टन, बाल्टिमोर येथील गुजरात समाज संस्था आणि सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक संस्था या एकत्र आल्या आहेत. या संस्थेतर्फे विविध कार्यक्रम  होणार आहेत. या वेबसाईटवरही गुजरातबद्दल बरीच माहिती आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र मात्र 'दीन' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सगळं पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र दिनाच्या प्रसिद्धीसाठी कुठलाच पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत नाही. बृहन्महाराष्ट्रातील मराठी समाजाला आवाहन  सोडाच, पण आपल्याच राज्यात केल्या जाणार्‍या कार्यक्रमांची दणक्यात प्रसिद्धीही करणे जमलेले नाही. नवी वेबसाईट तर नाहीच, पण सरकारची प्रसिद्धी करण्यात रमलेल्या </font><font style='font-size:11pt;'>mahanews.gov.in </font><font style='font-size:11pt;'>या सरकारी वेबसाईटवरही महाराष्ट्र दिनाचे नामोनिशाण नाही. मंत्र्यांचे चेहरे आणि त्यांनी काढलेले आदेश नि फतवे या व्यतिरिक्त त्यावर काहीही माहिती नाही. किमान एक मे निमित्त विशेष लेखमालिका, आठवणींना उजाळा वा पन्नाशीतला, आधीचा, नंतरचा महाराष्ट्र अशी कोणतीही माहिती दिसत नाही. सरकारी घोषणांचा जागर करण्यापलीकडे या साईटवर माहिती नाही. दोन राज्यातील प्रशासनातील फरक केवळ या बाबीतूनही स्पष्ट व्हावा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 27 Apr 2010 16:49:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[MaharashtraDin]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
