<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[कुजबूज]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/pollgossips-2009</link>
    <description><![CDATA[All infomation regarding maharashtra assembly election 2009. It includes maharashtra map, constituencies, candidate list, leaders, information regarding political parties like mns, shivsena, congress, bjp, RPI etc. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०००९ ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Tue, 21 Jul 2026 01:30:31 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>कुजबूज</title>
      <url>https://marathi.webdunia.com/pollgossips-2009</url>
      <link>https://marathi.webdunia.com/pollgossips-2009</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/pollgossips-2009-1010703.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[सात रूपये घेताना देतील का मतदार साथ?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/pollgossips-2009/सात-रूपये-घेताना-देतील-का-मतदार-साथ-109093000015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/pollgossips-2009/सात-रूपये-घेताना-देतील-का-मतदार-साथ-109093000015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[उमरगा- उमरगा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार ज्ञानराज चौगुले यांनी मतदारांकडून सात रूपये गोळा करण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. या प्रयोगात मतदार सात रूपये देतील मात्र त्यांना साथ देतील का? अशी चर्चा आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p align=center><font  style='font-size:11pt; color:#000000'>उमरगा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार ज्ञानराज चौगुले यांनी मतदारांकडून सात रूपये गोळा करण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. या प्रयोगात मतदार सात रूपये देतील मात्र त्यांना साथ देतील का? अशी चर्चा आहे. </font></p><p align=center><font  style='font-size:11pt; color:#000000'></font></p><p align=center><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री. चौगुले हे उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करतात. पुनर्रचनेनंतर उमरग्याची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली आणि आ. प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या खास मर्जीतले असलेले चौगुले यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. काँग्रेसकडून एक सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. बी. पी. गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठवाडा उपविभागाचे आरोग्य उपसंचालक या पदावरून निवृत्त झालेले डॉ. बी. पी. गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाला सात कोटी रूपयांचा पक्षनिधी देऊन उमेदवारी मिळविल्याची चर्चा आहे. मात्र, गायकवाड यांनी त्याचा इन्कार केला आहे. </font></p><p align=center><font  style='font-size:11pt; color:#000000'></font></p><p align=center><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण तोच धागा पकडून चौगुले यांनी मतदारांकडून सात रूपये गोळा करायला सुरवात केली आहे. सात रूपयांच्या माध्यमातून ते सात कोटी रूपये लोकांवर बिंबविण्याचा प्रयत्न करत आहेत. एका सभेत ज्ञानराज चौगुले यांना मतदारांनी साथ देण्यासाठी प्रत्येकी सात रूपये देण्याचे आवाहन आ. रवींद्र गायकवाड यांनी केले आणि अक्षरशः पंधरा मिनिटात उपस्थित मतदारांमधून ४१ हजार ५०० रूपये जमा झाले. उमरग्याजवळील कन्हेर या छोट्या खेडेगावातून मतदारांनी चौगुले यांना चार हजार रूपये जमा करून दिले. आता तर शिवसेनेच्या उमेदवारांनी चक्क पावती बुक छापून सात रूपये गोळा करण्यास सुरूवात केल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रयोगात सहाय्यक असणारे शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांचा अभिनव प्रयोग यशस्वी होणार की सेवा निवृत्तीनंतर जनसेवेची इनिंग सुरू करणारे डॉ. बी. पी. गायकवाड यशस्वी होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 30 Sep 2009 11:05:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:31:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Pollgossips]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पुस्तक प्रसारातून निवडणूक प्रचार!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/pollgossips-2009/पुस्तक-प्रसारातून-निवडणूक-प्रचार-109092800036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/pollgossips-2009/पुस्तक-प्रसारातून-निवडणूक-प्रचार-109092800036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पुणे - येत्या विधानसभा निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुण्याच्या एका अपक्ष उमेदवाराने अभिनव मार्गाचा अवलंब केला आहे. वाचन संस्कृती वाढीला लावण्याच्या उदात्त हेतुचा हवाला देत या उमेदवाराने मतदारांना घरोघर वाटलेल्या पत्रातून ४० पुस्तकांची यादी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>येत्या विधानसभा निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुण्याच्या एका अपक्ष उमेदवाराने अभिनव मार्गाचा अवलंब केला आहे. वाचन संस्कृती वाढीला लावण्याच्या उदात्त हेतुचा हवाला देत या उमेदवाराने मतदारांना घरोघर वाटलेल्या पत्रातून ४० पुस्तकांची यादी पाठविली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यादीतील आपल्या आवडीच्या पुस्ताकावर खूण करून तसे उमेदवाराच्या कार्यालयास सूचित केल्यास त्या पुस्तकाची नवी कोरी प्रत संबंधित मतदाराला घरपोच देण्यात येईल असे आश्वासनही या पत्रात देण्यात आले आहे. या आश्वासनाची खातरजमा करून घेण्यासाठी एका मतदाराने झाडाझडती या विश्वास पाटीललिखित पुस्तकाची पसंती कळविली असता त्याला त्या पुस्तकाची प्रतही पाठविण्यात आल्याचे कळते. मात्र त्या पुस्तकात आपल्या नावाचा बुकमार्क टाकण्यासही उमेदवार महाशय विसरलेले नाहीत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मताची वाढती किंमत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सलग चौथ्यांदा निवडणूक लढविण्यार्‍या एका उमेदवाराने दिलेल्या उद्बोधक माहितीनुसार पहिल्यांदा निवडणूक लढविताना एकाही मताची खरेदी करावी लागली नाही तर दुसर्‍या निवडणूकीत मला १००० मते पैसे देऊन विकत घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले. तिसरी निवडणूक लढविताना जवळपास सर्व मतांसाठी या महाशयांनी किंमत मोजली. आता चौथ्या वेळी निवडणूक लढविताना ही किंमत किती वाढणार या विवंचनेत हे उमेदवार आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 28 Sep 2009 18:20:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:31:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Pollgossips]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजजींचा 'रोखठोकनाम्याची' ब्ल्यू प्रिंट !]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/pollgossips-2009/राजजींचा-रोखठोकनाम्याची-ब्ल्यू-प्रिंट-109090100045_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/pollgossips-2009/राजजींचा-रोखठोकनाम्याची-ब्ल्यू-प्रिंट-109090100045_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0909/01/images/img1090901045_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली. या झाडाझडतीने धरती आंदोळली. कित्येक 'बांगड्या' फुटल्या. कित्येक घरंगळत पुन्हा आपल्या मायदेशी गेल्या. राजमान्य राजेश्री राजजींच्या या तेजतर्रार आंदोलनाने बहु मराठी मने आनंदली. 'मराठा तितुका मेळवावा'चा नाद घुमला आणि या महाराष्ट्रदेशी 'आनंदवनभुवनी'ची अनुभूती येऊ लागली. तर या सगळ्याचा मोठा लाभ राजजींना झाला. त्यांची लोकप्रियता बहु वाढली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यातच महाराष्ट्रदेशी निवडणूक जाहीर झाली. राजजींशी आमचे अतिशय घरोब्याचे संबंध असल्याने या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठिशी असणार आहोत. त्यामुळे त्यांच्या अतिगुप्त बैठकांतही आमचा सहभाग असतो. अशाच एका बैठकीत आम्ही सहभागी झालो असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'रोखठोकनामा' आमच्या हाती लागला. (रोखठोक हे शीर्षक श्रीमान ठाकरेजींच्या स्वभावाशी निगडीत असून त्याचा 'ठोकण्याशी' काहीही संबंध नाही हे सूज्ञास सांगणे न लगे.) सांगायचा मुद्दा असा की हा रोखठोकनामा राजजींच्या व्यक्तिमत्वाला साजेसाच आहे. निवडणुकीनंतर राजजी काय करणार आहेत, याची चुणूक त्यातून कळते. राजजी हे सगळे जे काही करत आहेत, ते 'महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा' या न्यायानेच असल्याने हा रोखठोकनामा मला मायबाप जनतेसमोर आणणे जरूरीचे वाटले. सबब, हा रोखठोकनामा खाली दिला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* महाराष्ट्रात यापुढे फक्त मराठीच बोलली, लिहिली जाईल. (ही मराठी कोणती यावर सध्या चर्चा (खरं तर वाद) सुरू आहे. पुण्याची, विदर्भाची, कोकणातली, खानदेशातली की पश्चिम महाराष्ट्रातली असा तो वाद आहे. काहींनी ज्ञानेश्वरकालीने मराठीचे रूप सर्वांत शुद्ध मानावे असे म्हटले आहे. पण मराठा महासंघ व इतर संघटनांनी त्याला तीव्र विरोध करून तुकारामाच्या काळातील मराठी शुद्ध मानावी असे म्हटले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* महाराष्ट्रात प्रवेश नाक्यांवर 'मराठी बोलणार्‍यासच प्रवेश' असा बोर्ड लावला जाईल. या तसेच सर्व नाक्यांवर एक भाषाविषयक तज्ज्ञ ठेवण्यात येईल. त्याची पात्रता साधारणपणे मराठी प्राध्यापकाएवढी असेल. (पात्रता हा शब्द शैक्षणिक पात्रतेशी निगडीत असून त्याचा बौद्धिक कौशल्याशी संबंध नाही.) प्रत्येक गाडीतून उतरणार्‍या प्रवाशाला मराठी येते की नाही याची तो तपासणी करेल. तसेच मराठी शिकविण्याची व्यवस्थाही येथे असेल. किमान कामचलाऊ मराठी शिकविण्याचे 'क्लासेस' उघडणार्‍यांना येथे फुकट सरकारी भूखंड दिला जाईल. विमानतळावरही मराठी शिकविण्यासाठी खास अधिकारी असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* शाळेतही अर्थात मराठीतूनच शिकवले जाईल. हिदी भाषिक विद्यार्थ्यांना 'एक्स्ट्रा मराठी' असा विषय असेल. त्यात त्यांना हिंदी भाषकांना ळ, ड, ट, ज्ञ ही अक्षरे तसेच च, ज यांचे उच्चार घोटवून घेण्यात येतील. त्यांच्याकडून मराठीचा सराव करण्यासाठी 'घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा' हे गाणे कविता म्हणून पाठ्यक्रमात सामील करण्यात येईल. हे गाणे म्हणून दाखविणार्‍या हिंदी भाषकाला 'मराठी प्रवीण' ही पदवीही देण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* याशिवाय ज्यांचे शिक्षण पूर्वी हिंदीत झाले आहे त्यांना मराठी शिकविण्यासाठी 'फाडफाड मराठी' 'तातडीचे मराठी', कामचलाऊ मराठी' 'शुद्ध मराठी' असे कोर्स सुरू करण्यात येतील. हे कोर्स चालविणार्‍या क्लासचालकांना सवलती देण्यात येतील. तसेच यासाठी लागणारी पुस्तके सरकारी खर्चाने उपलब्ध करून देण्यात येतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* उत्तर भारतीयांना मराठी 'धडा' शिकविणार्‍या मराठी युवकांना विशेष गुण दिले जातील. याचा उपयोग त्यांना सरकारी नोकरीतील प्राधान्य, सरकारी घरात प्राधान्य वगैरेसाठी होऊ शकेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* बैंक, बैग, इस्कूल, आईसीआईसीआई असे उच्चार करणार्‍या हिंदी भाषकांना कठोर दंड ठोठावण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील कार्यालयातही मराठीतूनच कामकाज चालेल. 'हिंदी पखवाडा' बंद करून 'मराठी वर्ष' असा उपक्रम राबविला जाईल. टपालापासून आयकरापर्यंतची सर्व कार्यालये हिंदीतूनच काम करतील. रेल्वेचे कामकाजही महाराष्ट्रात तरी मराठीतूनच चालेल. त्यामुळे रेल्वेची उद्घोषणा फक्त मराठीत केली जाईल. महाराष्ट्रातील इतर भागात या उद्गोषणा मराठी आणि तेथील स्थानिक प्रादेशिक भाषेतही असतील. उदा. खानदेशात- खानदेशी. रेल्वेतील सर्व हिंदी शब्द मराठीत केले जातील. उपरी उपस्कर डिपो' वगैरे शब्दांचे मराठीत भाषांतर केले जाईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* दुकानांच्या सर्व पाट्या मराठीतच असतील. इंग्रजीत असलेल्या पाट्याही मराठीत करण्यात येतील. उदा. बिग बझारचे 'मोठा बाजार', कॅफे कॉफी डेचे कॉफीचे दिवसाचे हॉटेल असे नामकरण करण्यात येतील. एवढच नव्हे तर ज्या कंपन्या महाराष्ट्रातून चालविल्या जातात, त्यांची नावेही मराठीत होतील. उदा. रिलायन्सचे 'विश्वास', कॅमलचे 'उंट' अशीही नावे मराठीत असतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* छट पूजेला परवानगी दिली जाईल. पण ही पूजा पूर्णपणे मराठीत होईल. त्यासाठी मराठी भिक्षुक असतील. त्यानंतर होणारी गाणीबजावणीही अस्सल मराठी होईल. त्यात लावणी, लोकसंगीत, मराठी भावसंगीत असे चढत्या भाजणीचे कार्यक्रम ठेवावे लागतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* मनोरंजनाची साधने फक्त मराठीतच उपलब्ध होतील. उदा. मराठी चित्रपट सर्व चित्रपटगृहात लावले जातील. त्यातही अलका कुबल छाप चित्रपट तर मल्टिप्लेक्समध्ये दाखविण्यात येईल. मराठी अभिनेत्यांना ग्लॅमर येण्यासाठी त्यांची मानधनाची रक्कम ही कोट्यावधीत देण्यात येईल. समजा निर्मात्याने (कसेबसे) २५ हजार दिल्यास उर्वरित रक्कम महाराष्ट्र सरकार देईल. मराठीचा गौरव टिकविण्यासाठी सरकारचे हे 'पुरोगामी' पाऊल असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* बॉलीवूडचे चित्रपटही मराठीतच तयार होतील. फक्त त्याला हिंदी सबटायटल्स देण्याची मुभा दिली जाईल. पण त्यांना या चित्रपटात कंपल्सरी एक मराठी आयटम सॉंग टाकावे लागेल. (मराठीत हिंदी आयटम सॉंग चालते मग हे उलटे का नाही?) महाराष्ट्रात रहाणार्‍या हिंदी भाषकांना 'कंपल्सरी' मराठी चित्रपट पहावे लागतील. त्यांचे मराठी सुधरेपर्यंत तरी आठवड्याला एक असा हा 'रतीब' असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* मराठीत काम करणार्‍या बॉलीवूडच्या अभिनेत्यांना त्यांच्या चित्रपटांच्या संख्येनुसार पुरस्कार देण्यात येईल. उदा. पाच चित्रपट केल्यास महाराष्ट्र गौरव, दहा केल्यास महाराष्ट्राचा अभिमान असे पुरस्कार देण्यात येतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* मराठी रागसंगीतातील हिंदी, अवधी, ब्रज भाषेतली बंदिशी बदलून त्यांची जागा मराठी पदांनी भरून काढली जाईल. त्यासाठी पूर्वी जसे राजकवी असायचे तशी कवींची भरती करण्यात येईल. हे कवी या बंदिशींना पर्यायी मराठी बंदिशी देतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* बिहार व युपीमधून येणार्‍या रेल्वेगाड्यांमध्ये महाराष्ट्रातील शेवटचे स्टेशन येईपर्यंत मराठी संस्कृतीची सीडी दाखवली, ऐकवली जाईल. त्यात अभंग, गवळण, लावणीपासून भावसंगीत ऐकविण्यात येईल. त्यानंतर मराठी सण-उत्सवांची ध्वनिचित्रफित दाखविण्यात येईल. महाराष्ट्रात येताना शेवटचे स्टेशन असेल तिथे यावर एक प्रश्नमंजूषा ठेवली जाईल. त्यात प्रथम क्रमांक मिळविणार्‍यांना 'पाईक महाराष्ट्राचा' हा पुरस्कार देण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तर राजमान्य राजजींच्या 'रोखठोकनाम्यात' मराठीचा गौरव वृद्धिंगत करण्यासाठी अनेक 'कलमे' आहेत. पण विस्तारभयास्तव त्यातील मोजकी कलमेच येथे दिली आहेत. माननीय राजजींच्या नेतृत्वाखालील सरकार या महाराष्ट्र देशी आल्यानंतर नक्कीच मराठीचा गौरव वाढेल हे उपर्यु्क्त तर्जुम्यावरून कळोन येते नाही का? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'>वरील 'रोखठोकनामा' ही थोरल्या महाराजांचे निकटस्थ रा. रा. मोरोपंत पिंगळे यांच्या आज्ञापत्रे या बहु गाजलेल्या ग्रंथाची त्रिशतकोत्तर आधुनिक आवृत्ती असल्याचे आमचिया कानावर आले आहे.)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 01 Sep 2009 15:29:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:31:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Pollgossips]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
