<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[फ्लॅशबॅक-26/11]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/flashback-26-11</link>
    <description><![CDATA[Mumbai terror attack- A flashback, articles, analysis, photos, rememberence. मुंबई हल्ल्याविषयक लेख, विश्लेषण,]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Tue, 16 Jun 2026 11:37:44 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>फ्लॅशबॅक-26/11</title>
      <url>https://marathi.webdunia.com/flashback-26-11</url>
      <link>https://marathi.webdunia.com/flashback-26-11</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/flashback-26-11-1010114.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[असा केला कसाबने हल्ला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/असा-केला-कसाबने-हल्ला-110050300021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/असा-केला-कसाबने-हल्ला-110050300021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कुबेर नावाच्या बोटीतून आपल्या सहकार्‍यांसमवेत गेट वे ऑफ इंडियाला आल्यानंतर कसाबने मोर्चा  वळवला तो छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे. त्याच्याबरोबर होता इस्लाईल खान हा अन्य एक  दहशतवादी. सीएसटीमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर कसाब टाईम्स ऑफ इंडियाजवळच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कुबेर नावाच्या बोटीतून आपल्या सहकार्‍यांसमवेत गेट वे ऑफ इंडियाला आल्यानंतर कसाबने मोर्चा वळवला तो छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे. त्याच्याबरोबर होता </font><font style='font-size:11pt;'>इस्माईल </font><font style='font-size:11pt;'>खान हा अन्य एक  दहशतवादी. सीएसटीमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर कसाब टाईम्स ऑफ इंडियाजवळच्या एका  गल्लीतून बाहेर पडला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कामा हॉस्पिटलच्या दिशेने जाणार्‍या पोलिसांच्या टोयोटो क्व</font><font style='font-size:11pt;'>ालिस  </font><font style='font-size:11pt;'>या गाडीवर त्याने हल्ला  चढवला. यातच महाराष्ट्र एटिएसचे प्रमुख हेमंत करकरे, पोलिस उपायुक्त अशोक कामटे, एनकाऊंटर  स्पेशालिस्ट विजय साळसकर यांचा मृत्यू झाला. त्यांना मारल्यानंतर दोघे गाडी घेऊन मेट्रो  सिनेमाच्या दिशेने गेले. जाताना गाडीत दोन जिवंत कॉन्स्टेबलही होते. पण ते मेलेले असावेत असे  त्यांना वाटले. पण त्यातल्या एका हवालदाराच्या मोबाईलची रिंग वाजल्यानंतर त्याने मागे  गोळीबार केला. त्यात तो हवालदार ठार झाला. विधान भवनाच्या दिशेने जात असतानाही त्यांनी  गोळीबार केला. पण पुढे त्यांची गाडी पंक्चर झाली. मग त्यांनी एक स्कोडा गाडी पळवली. आणि  गिरगाव चौपाटीच्या दिशेने गेले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तत्पूर्वी डि.बी.मार्ग पोलिस स्टेशनच्या कंट्रोल रूममध्ये दोन सशस्त्र लोक सीएसटीवर गोळीबार  करून पळाले आहेत, असा संदेश आला होता. यानंतर डिबी मार्ग ठाण्याचे पंधरा पोलिस चौपाटीवर  बॅरीकेड टाकून तपास अभियान राबवत होते. त्यांच्याकडे दोन रायफल, दोन रिव्हॉल्वर आणि  लाठ्या तेवढ्या होत्या. कसाबची स्कोडा गाडी बॅरीकेडपर्यंत पोहोचली. पण ती अडल्याने  वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस व त्यांच्यात चकमक सुरू झाली. यात अबू इस्लमाईल  ठार झाला. कसाबने आपणही मेल्याचे ढोंग केले. त्याचवेळी पोलिस उपनिरिक्षक तुकाराम ओंबळे  यांनी धाव घेऊन कसाबला पकडले. परंतु, कसाबने गोळ्या झाडत त्यांना ठार केले. परंतु, ओंबळेंनी  त्याला सोडले नाही. घट्ट पकडून ठेवले होते. त्याचा फायदा उचलत बाकीच्या पोलिसांनी त्याला  पकडले. परंतु, या घडामोडीत ओंबळे मात्र शहिद झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा रितीने कित्येकांना ठार मारणारा क्रूरकर्मा कसाब पकडला गेला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:39:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 14:11:21 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[असा बनला कसाब दहशतवादी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/असा-बनला-कसाब-दहशतवादी-110050300020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/असा-बनला-कसाब-दहशतवादी-110050300020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मोहम्मद अजमल आमीर कसाब हा मूळचा पाकिस्तानातील फरिदकोट गावचा. त्याचे वडिल दही  पुरी विक्रेते आहेत, तर त्याचा मोठा भाऊ अफझल हा लाहोरमध्ये मजूरी करतो. त्याची मोठी  बहिण रूकय्या हुसेनचे गावातच लग्न करून दिले आहे. लहान बहिण सुरय्या आणि भाऊ मनीर  ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मोहम्मद अजमल आमीर कसाब हा मूळचा पाकिस्तानातील फरिदकोट गावचा. त्याचे वडिल दही  पुरी विक्रेते आहेत, तर त्याचा मोठा भाऊ अफझल हा लाहोरमध्ये मजूरी करतो. त्याची मोठी  बहिण रूकय्या हुसेनचे गावातच लग्न करून दिले आहे. लहान बहिण सुरय्या आणि भाऊ मनीर  फरीदकोटमध्येच आई-वडिलांसोबत रहातात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फरिदकोट गाव तसे अगदीच गरीब आहे. बहुतांश लोक गरीबच आहेत. शिक्षण नाही म्हणून नोकरी  नाही आणि म्हणूनच पैसा नाही, अशी येथील स्थिती आहे. म्हणूनच येथील अनेक लोक  दहशतवादाकडे वळाले आहेत. दहशतवादी संघटना या त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणार्‍या  ठरल्या आहेत. अगदी फरिदकोटच्या बाहेरच एका भींतीवर 'जिहाद करा, जिहाद करा' असे आवाहन  मर्कझ दावत उल इर्शाद या लष्कर ए तोयबाच्या पालक संघटनेने केल्याचे लिहिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कसाबही घरच्या गरिबीमुळे लाहोरला जाऊन भावासोबत राहू लागला. पण नंतर मजुरी काही  मानवली नाही. फरीदकोटला परत आला. पण रिकामा बसून राहिल्याने घरी वडिलांशी वाजले आणि  २००५ मध्ये घर सोडून निघून गेला. घर सोडायचे कारण होते, वडिलांनी इदनिमित्त नवे कपडे  घेऊन दिले नाही हे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर मग पैसे कमवायचे भलते सलते मार्गही त्याच्या लक्षात येऊ लागले. हळूहळू छोट्या  छोट्या गुन्ह्यात तो दिसू लागला. त्याचा मित्र मुझफ्फर लाल खान हा त्याचा भागीदार. छोट्या  चोर्‍यांकडून मग तो मोठ्या दरोड्यांकडे वळाले. पण त्यासाठी शस्त्रेही हवी होती. मग २१ डिसेंबर  २००७ ला बकरी ईदच्या दिवशी ही जोडी रावळपिंडीत शस्त्रे खरेदीसाठी गेली. तिथे त्यांची भेट  लष्कर ए तोयबाची राजकीय शाखा असलेल्या जमात उद दवाच्या काही सदस्यांशी झाली.  त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग हे दोघेही सरळसरळ लष्कर ए तोयबात सामील झाले. त्यासाठी  मर्कझ तालिबा इथे त्यांचे प्रशिक्षणही झाले. काहींच्या मते कसाबच्या वडिलांनीच त्याला  दहशतवादाकडे वळवले. घरी बसून काही काम करत नाही त्यापेक्षा तिकडे जाऊन पैसे कमव या  धोशापोटी त्याला लष्कर ए तोयबाच्या हाती देऊन टाकले. परंतु, एका मुलाखतीत त्याच्या  वडिलांनी मी माझ्या मुलाला कधीही विकले नाही, असे सांगत त्यांनी याचा स्पष्ट शब्दांत इन्कार  केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्याच्या सहा महिने आधी कसाब आपल्या गावी आला होता. जिहादला जातो आहे,  म्हणून त्याने म्हणे आईकडून आशीर्वादही घेतला होता. त्याच दिवशी गावातल्या काही मुलांना  कुस्तीच्या करामतीही दाखवल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काहींच्या मते लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर लखवीने कसाबच्या मोबदल्यात त्याच्या  कुटुंबियांना दीड लाख रूपये दिले. काहींच्या मते ही रक्कम लाखाच्याही आत होती. खरे खोटे तेच  जाणोत. पण कसाब दहशतवादी बनला खरा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर तो गेला तो थेट लष्कर ए तोयबाने ठेवलेल्या प्रशिक्षण शिबिरात. त्याच्याबरोबर २४ जण  होते. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे हा ट्रेनिंग कॅम्प होता. तिथे जवळच  असलेल्या मंगला डॅमवर त्यांना समुद्री हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ट्रेनिंगचेही विविध प्रकार  होते, मानसिक, मुलभूत, अद्ययावत आणि कमांडो. मानसिक ट्रेनिंगमध्ये इस्लामिक शिकवण  त्याच्या डोक्यात भरण्यात आली. मुस्लिमांवरील कथित अत्याचारांशी त्याचा परिचय घडविण्यात  आला. एडवान्स्ड ट्रेनिंग त्याला  पाकिस्तानी लष्कराच्या एका निवृत्त अधिकार्‍याच्या उपस्थितीत  देण्यात आले. यात शस्त्रे कशी चालवावीत आणि स्फोटके कशी हाताळीत हे शिकविण्यात आले.  कमांडो ट्रेनिंग हा यातला महत्त्वाचा भाग होता. त्यात मरीन कमांडोच्या ट्रेनिंगचा सहभाग होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या ट्रेनिंगमध्ये २५ जण सहभागी होते. त्यातल्याच दहा जणांना मुंबई हल्ल्यासाठी निवडण्यात  आले. त्यांना पोहण्यापासून- तरण्यापर्यंत, उच्च क्षमतेची शस्त्रे, स्फोटके हाताळण्यापासून ते त्यांचा  वापर करण्यापर्यंत ट्रेनिंग देण्यात आले. त्याचा दर्जाही उच्च होता. पाकिस्तानच्या आयएसआय या  गुप्तचर संघटनेचे आणि लष्कराचे अधिकारीही या प्रशिक्षणात सहभागी होते, असा अमेरिकी संरक्षण  विभागातील एका माजी अधिकार्‍याचा दावा आहे. या सर्व हल्लेखोरांना मुंबईतील ताज महल हॉटेल,  ओबेरॉय, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊस येथील नकाशे, फोटो देण्यात आले होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:29:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 14:11:21 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी मुंबई बोलतेय...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मी-मुंबई-बोलतेय-109112500044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मी-मुंबई-बोलतेय-109112500044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[धाड...धाड गोळ्यांचे आवाज... बॉम्बस्‍फोट आणि काळजाचा थरकाप उड‍वणार्‍या किंकाळ्या... सगळं कसं आजही माझ्या डोळ्यांसमोर टक्क दिसतंय. तो दिवस, ती रात्र... सगळं जणू अंगावर येतंय... चहुकडे जीवाच्‍या आकांतानं सैरावैरा धावत सुटलेले जीव... रक्ताच्‍या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/25/images/img1091125044_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage-->  ''<font  style='font-size:11pt; color:#000000'>मी मुंबई. कधी कुणी मला बॉम्बे म्हणायचं तर कुणी बंबई. त्याही आधी तर कधी मुंबा, कधी मुंबापुरी, कधी </font><font style='font-size:11pt;'>Bombaim </font><font style='font-size:11pt;'>तर कधी बंबई आणि </font><font style='font-size:11pt;'>Bombay. </font><font style='font-size:11pt;'>गेल्‍या तीन-चारशे वर्षांत मी अनेक बदल पचवले आणि रूचवले सुध्‍दा. म्हणूनच मला कुणी काय संबोधावं ही तक्रार घेऊन मी आलेलीच नाहीये. ही नावे बदलतानाच मी इतकी बदलून गेले की माझी मीच मला ओळखू येत नाहीये. पण हो मी कितीही बदलले असले तरी माझ्या वृत्ती मात्र तशाच आहेत, माझ्या लेकरांमध्येही त्या वृत्तीच सामावल्या आहेत. त्यालाच तुमच्या इंग्रजी की काय भाषेत म्हणतात ना 'मुंबई स्पिरीट', तेच ते हे....  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षे सरलीत. कॅलेंडरची पाने एकामागोमाग उलटत गेलीय, पण इतक्या वर्षांच्या माझ्या आयुष्यांत गेल्या वर्षीचा २६ नोव्हेंबरचा दिवस मात्र विसरू म्हणता विसरता येत नाही. जणू भूतकाळ ठप्प होऊन स्तब्ध झालाय. धाड...धाड गोळ्यांचे आवाज... बॉम्बस्‍फोट आणि काळजाचा थरकाप उड‍वणार्‍या किंकाळ्या... सगळं कसं आजही माझ्या डोळ्यांसमोर टक्क दिसतंय. तो दिवस, ती रात्र... सगळं जणू अंगावर येतंय... चहुकडे जीवाच्‍या आकांतानं सैरावैरा धावत सुटलेले जीव... रक्ताच्‍या थारोळ्यात पडलेली माझी लेकरं....ग्रेनेड, बॉम्ब नि गोळीबाराचे आवाज... जळालेल्‍या मानवी मांसाचा दर्प...मृत्यूचे तांडव चाललं होतं नुसतं.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या अंगाखांद्यांवर अभिमानानं लेवून मिरवावं अशा माझ्या वैभवशाली इतिहासाच्‍या पाऊखुणांवरच त्या 'नापाक' मंडळींनी घाला घातला. छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज आणि ओबेरॉय इतकचं काय ज्यू धर्मियांचं नरीमन हाऊस... या इमारतींत घुसून या दुष्टांनी धाडधाड गोळीबार करत  निष्‍पाप, निरपराध आणि निरागस जीवांना निर्दयपणे ठार केलं. नृशंस हत्याकांडाचीही परिसीमा म्हणावी असंच हे चाललं होतं. जोडीला ग्रेनेडने हल्‍ले सुरूच होते. माझ्या लाडक्या ताजला तर विद्रुप करण्याचा जणू चंगच बांधला होता. माणसांना तर मारलंच, पण नंतर या वास्तुला आग लाव, हातबॉम्ब फोड असले उद्योगही त्या दुष्टांनी केले. 60 तास मृत्युचं हे तांडव सुरू होतं....</font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आणि मी हतबल होऊन सगळं काही पाहत राहण्‍याशिवाय काहीही करू शकले नाही....</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पण माझ्या नि माझ्या लेकरांच्‍या संरक्षणासाठी अगदीच तुटपुंज्या शस्‍त्रांसह धावून आलेले माझे ती वीरही आठवताहेत. निधड्या छातीनं दहशतवादाचा तो राक्षसी डाव उधळून लावण्‍यासाठी निघालेल्या त्या हेमत करकरे, विजय साळस्‍कर आणि अशोक कामटे नि त्यांना साथ देणारी त्यांच्या दलातली मंडळीही आठवतात. नि त्या नापाक धरतीचे इरादे जगापुढे उघड करणारा पुरावा आपल्या पोलादी हातांनी पकडून ठेवताना रक्त सांडलेले तुकाराम ओंबळेही आठवतात. माझ्या ताजची प्रतिष्ठा राखून तिथे लपलेल्या त्या भेकड दहशतवाद्यांवर तुटून पडलेला संदीप उन्नीकृष्णन नि कॅप्टन गजेंद्रसिंगही आठवतोय. नि या सगळ्यांच्या पराक्रमामुळेच मी वाचले. भर दरबारात द्रौपदीची अब्रू काढण्याचा प्रसंगच जणू होता. पण या वीरांनी आपले प्राण लावून माझी अब्रू वाचवली.  </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0911/25/images/img1091125044_1_2.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>हे साठ तास मी कुढत होते, आतल्या आत. या साठ तासात माझी 173 लेकरं गेली. कित्येक जायबंदी झाली. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले. कित्येक अनाथ झाले. नि कित्येक अपंग. कितिकांची कितीक दुःख. असं वाटत होतं जणू त्यांच्या या दुःखाला मीच तर जबाबदार नाही? या जगात माझं महत्त्वंच इतकं वाढलं की माझी ही प्रतिष्ठा धुळीला मिळवायसाठी हा कट रचला गेला. नि त्यात या निरपराधांना आपला जीव गमवावा लागला. हे थांबलं तरी माझ्या डोळ्यातली आसवे थांबत नव्हती. दहशतवाद्यांना मारले, पण मी कशी उभी राहू? पार खचूनच गेले होते मी. पुन्हा उभे रहाण्याची हिंमतच नव्हती माझ्यात. अगदीच असहाय झाले होते. पण मला धीर दिला, माझ्याच लेकरांनी. माझ्या मुंबईकरांनी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासाठी हा घाव मोठा होता, पण नवीन नव्हता. १९९३ मध्येही कुण्या दाऊदने बॉम्बस्फोट केले. त्याआधी दंगलही झाली. त्यानंतरही पुन्हा पुन्हा बॉम्बस्फोट होतच राहिले. दोन वर्षांपूर्वी २६ जुलैलाच महापूरही आला. संकटे मला नवीन नाहीत नि त्यांच्या मालिकाही. पण त्या प्रत्येकातून मी उभी राहिले. चालत राहिले. धावत राहिले. पण गेल्या वर्षीचा हल्ला माझ्या अगदी वर्मी लागला होता. पण तरीही दुसर्‍या दिवशी मी डोळे किलकिले केले नि त्याच छत्रपती   टर्मिनसकडे पाहिलं, लोकल आली होती, लोक येत होते. लोकल येतच गेल्या नि लोकंही येत गेले. माझ्या दुःखी चेहर्‍यावर किंचित हसू पसरलं. पाण्याच्या काठावर माणसांचा समुद्र पुन्हा एकदा माझ्यात हेलकावू लागला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>माझं चैतन्य परत आलं. हसू पुन्हा फुललं. समाधान ओसंडून वाहू लागलं. दहशतवाद्यांना वाटलं एका हल्ल्यात मी संपून जाईन. धुळीत मिळून जाईल. जणू माझं वैराण वाळवंट होईल. पण तसं काहीच झालं नाही. तो हल्ला उरात ठेवूनही माणसं येतच राहिली. काम करतच राहिली. माणसांचा समुद्र पुन्हा एकदा काठोकाठ भरला. माझं 'स्पिरिट' लोकांमध्ये शिगोशिग भरलंय. एका हल्ल्याने ते विरून जाणार नाही, याची खात्री पटली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुणीतरी उगाच नाही म्हटलंय, 'मुंबई नगरी बडी बाका। तिन्ही लोकी वाजे तिचा डंका' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेवटी मी मुंबई आहे. मुंबई. कधीच न थांबणारी. अखंड वाहत रहाणारी.....</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई नगरी बडी बॉंका </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 28 Nov 2009 18:02:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>विकास शिरपूरकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद्यांचे मृतदेह वर्षानंतरही शवागृहातच]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/दहशतवाद्यांचे-मृतदेह-वर्षानंतरही-शवागृहातच-109112600063_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/दहशतवाद्यांचे-मृतदेह-वर्षानंतरही-शवागृहातच-109112600063_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
मुंबईवर हल्ला करणारे क्रूरकर्मा कसाबचे नऊ सहकारी पोलिस कारवाईत मारले गेले असले तरी अद्यापही त्यांचे मृतदेह सरकारच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकार त्यांना पुढे घेण्यास न आल्याने हे मृतदेह मुंबईच्या शवागृहात गेल्या वर्षभरापासून बेवारस म्हणून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर हल्ला करणारे क्रूरकर्मा कसाबचे नऊ सहकारी पोलिस कारवाईत मारले गेले असले तरी अद्यापही त्यांचे मृतदेह सरकारच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकार त्यांना पुढे घेण्यास न आल्याने हे मृतदेह मुंबईच्या शवागृहात गेल्या वर्षभरापासून बेवारस म्हणून पडले असून त्यांच्यावर सरकारचा कोट्यवधीचा खर्च होतो आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जे जे हॉस्पिटलच्या शवागृहात हे मृतदेह असून पाकिस्तानातून त्यांचे नातेवाईक येण्याच्या प्रतिक्षेत येथील कर्मचारी आहेत. या दहशतवाद्यांचे नाव व पत्ता भारताने पाकिस्तानला कधीच कळविला आहे. पण पाकिस्तान या सगळ्यांना आपले नागरिक म्हणून मान्य करत नसल्याने त्यांचे मृतदेह ताब्यात घ्यायलाही तिकडून कोणी आलेले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या मृतदेहांवर रासायनिक लेप लावला आहे. तरीही ते सडून गेले असून त्यांना दफन करणेही जिकीरीचे ठरू शकेल. मुंबईतील मुस्लिम समुदायाच्या कबरस्तान व्यवस्थापनाने या अतिरेक्यांचे मृतदेह आपल्या कबरस्तानात दफन करण्यास सख्त विरोध दर्शविला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता या मृतदेहांना फार काळ शवागृहात सुद्धा ठेवता येणार नाही. त्यामुळे येथील कर्मचारी सरकारकडे डोळे लावून बसले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विशेष म्हणजे या मृत दहशतवाद्यांचे जतन करण्यात सरकारचे एका वर्षात कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. जगात कुठेही अद्याप मृत दहशतवाद्यांना इतका काळ शवागृहात ठेवण्याचे दुसरे उदाहरण नाही. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 26 Nov 2009 19:22:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबई पोलिसांचे शक्तीप्रदर्शन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबई-पोलिसांचे-शक्तीप्रदर्शन-109112600019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबई-पोलिसांचे-शक्तीप्रदर्शन-109112600019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी आज येथे संचलन केले आणि हल्ल्यात मृत व शहिद झालेल्यांप्रती श्रद्दांजली अर्पित केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0911/26/images/img1091126019_1_1.jpg' alt='' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी आज येथे संचलन केले आणि हल्ल्यात मृत व शहिद झालेल्यांप्रती श्रध्दांजली अर्पित केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई पोलीस दलाच्या विविध सशत्र दलांनी संचलन करुन मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली. यामध्ये एनएसजीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले फोर्स-१ पथक, अतिशिघ्र पोलीस पथक, बुलेट प्रुफ वाहने, कोम्बॅक्ट वाहने, मरीनक्रॉफ्ट, बॉम्ब शोधक व नाशक पथक, ३६० अंशातून फायरिंग करणारी बुलेट प्रुफ वाहने सहभागी झाले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फोर्स-१ कमांडो पथकांनी यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. एअर इंडियाच्या इमारतीवरुन खाली उतरणे, एका इमारतीतून दुसर्‍या इमारतीत दोरखंडाच्या सहाय्याने जाऊन शत्रुचा कसा मुकाबला करतात याची राज्य पोलीस दलाने प्रात्यक्षिक सादर केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर हॉटेल ट्रायडंट कर्मचार्‍यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या शहीद स्मृतिस्तंभास मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दाजंली वाहिली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 26 Nov 2009 19:09:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवादाशी लढण्यास शासन सज्ज- मुख्यमंत्री]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/दहशतवादाशी-लढण्यास-शासन-सज्ज-मुख्यमंत्री-109112600059_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/दहशतवादाशी-लढण्यास-शासन-सज्ज-मुख्यमंत्री-109112600059_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
दहशतवादाशी लढण्यास राज्य शासन सज्ज असून त्यासाठी आवश्यक यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी इंडियन मर्चंटस् चेंबर्सतर्फे आयोजित श्रध्दांजलीपर कार्यक्रमात केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादाशी लढण्यास राज्य शासन सज्ज असून त्यासाठी आवश्यक यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी इंडियन मर्चंटस् चेंबर्सतर्फे आयोजित श्रध्दांजलीपर कार्यक्रमात केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चर्चगेट येथील सदर संस्थेच्या कार्यालयात हा कार्य़क्रम झाला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिफलकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी अनावरण करण्यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवरील हल्ल्याचा दिवस अतिशय दुर्दैवी होता, असे उद्गार काढून श्री. चव्हाण म्हणाले, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पोलीस अधिकारी, जवान आणि नागरिकांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. गेल्या वर्षभराच्या कालावधीत मुंबई आणि राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद आज जागतिक समस्या झाली आहे. दहशतवादाशी लढताना राज्य आणि अवघ्या देशातील जनतेने दाखविलेली एकजूट अतिशय महत्त्वाची आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन, इंडियन मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष गूल कृपलानी, उपाध्यक्ष दिलीप दांडेकर, मर्चंटस् चेंबर्सचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 26 Nov 2009 18:53:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सात वर्षाच्या मुलाची पुणे-मुंबई स्केटिंग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/सात-वर्षाच्या-मुलाची-पुणे-मुंबई-स्केटिंग-109112600058_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/सात-वर्षाच्या-मुलाची-पुणे-मुंबई-स्केटिंग-109112600058_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई
मुंबईवर गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत आणि हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ओंकार ढोरे नावाचा सात वर्षाचा मुलगा पुण्याहून येते स्केटिंग करत आला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत आणि हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ओंकार ढोरे नावाचा सात वर्षाचा मुलगा पुण्याहून येते स्केटिंग करत आला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओंकार काल सकाळी पुण्याहून मुंबईला यायला निघाला. आज दुपारी तो मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचला. त्याच्यासोबत डॉक्टरांची दोन पथकेही होती. या प्रवासाची तो गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत होतो. सीएसटीसह दहशतवाद्यांची लक्ष्य ठरलेल्या कामा हॉस्पिटल, ताज, ट्रायडं हॉटेल आणि नरिमन हाऊस येथेही तो जाणार आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 26 Nov 2009 18:49:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अवघ्या देशाने केला शहिदांना सलाम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/अवघ्या-देशाने-केला-शहिदांना-सलाम-109112600027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/अवघ्या-देशाने-केला-शहिदांना-सलाम-109112600027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
मुंबईत गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभर शहिदांना सलाम करण्यात आला. संसदेपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत सर्वांनी शहिदांची आठवण जागवली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/26/images/img1091126027_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभर शहिदांना सलाम करण्यात आला. संसदेपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत सर्वांनी शहिदांची आठवण जागवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभेत गुरूवारी मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या निरपराधांसाठी दोन मिनिटाचे मौन पाळण्यात आले. संसदेत रक्तदान शिबिरही झाले. त्यात अनेक राजकीय नेत्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरही रक्तदानासाठी मोठी रांग लागली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कानपूरमध्ये सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या दुसर्‍या क्रिकेट कसोटीतही भारतीय संघाने दोन मिनिटांचे मौन पाळून शहिदांना आदरांजली अर्पित केली. यावेळी ग्रीन पार्क स्टेडियमवर शहिदांच्या स्मृती जागविणारे बॅनर्सही दिसत होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेश क्रिकेट संघाने गुरूवारी पन्नास अनाथ मुलांना हा सामना मोफत पाहण्याची संधी दिली. तत्पूर्वी या मुलांनी सकाळी नऊ वाजता हातात मेणबत्ती घेऊन संचलन केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाळू शिल्पांसाठी प्रसिद्ध असलेल्या ओरिसाच्या सुदर्शन पटनायकने भुवनेश्वमध्ये वाळूच्या माध्यमाने शिल्प तयार करून मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पित केली. मुंबईच्या ताज हॉटेलची सात फूट उंच प्रतिकृती त्याने तयार केली असून दहशतवादाला रोखा असा संदेश त्यावर दिला आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 26 Nov 2009 12:47:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गुरूवारी जागणार 26/11 च्या आठवणी!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/गुरूवारी-जागणार-26-11-च्या-आठवणी-109112500043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/गुरूवारी-जागणार-26-11-च्या-आठवणी-109112500043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
२६ नोव्हेंबर २००८. कॅलेंडरची पाने पटापट उलटत गेली नि आता २६ नोव्हेंबर २००९ उजाडतोय. मुंबईत गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती होतेय. या नृशंस हल्ल्याच्या आठवणी आता या निमित्ताने पुन्हा एकदा जाग्या होणार आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/25/images/img1091125043_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>२६ नोव्हेंबर २००८. कॅलेंडरची पाने पटापट उलटत गेली नि आता २६ नोव्हेंबर २००९ उजाडतोय. मुंबईत गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती होतेय. या नृशंस हल्ल्याच्या आठवणी आता या निमित्ताने पुन्हा एकदा जाग्या होणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्ल्याच्या निमित्ताने मुंबई पोलिस अधिकार्‍यांत सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी सर्वसामान्य मात्र या हल्ल्याच्या आठवणींनी हेलावून गेला आहे. मुंबईच्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम या दिवशी होत आहेत. शिवाय पोलिस दलातर्फेही काही कार्यक्रम होणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई पोलिसांचे संचलन होणार आहे. यात नवी शस्त्रे आणि नवी वाहने लोकांसमोर आणण्यात येतील. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम दक्षिण मुंबईतील पोलिस जिमखान्यात शहिद स्मारकाचे अनावरण करतील. त्याचवेळी गेट वे ऑफ इंडिया येथे प्रार्थना सभा होईल. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 25 Nov 2009 18:50:22 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी मुंबई बोलतेय...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मी-मुंबई-बोलतेय-109112500038_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मी-मुंबई-बोलतेय-109112500038_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[धाड...धाड गोळ्यांचे आवाज... बॉम्बस्‍फोट आणि काळजाचा थरकाप उड‍वणार्‍या किंकाळ्या... सगळं कसं आजही माझ्या डोळ्यांसमोर टक्क दिसतंय. तो दिवस, ती रात्र... सगळं जणू अंगावर येतंय... चहुकडे जीवाच्‍या आकांतानं सैरावैरा धावत सुटलेले जीव... रक्ताच्‍या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[''<font  style='font-size:11pt; color:#000000'>मी मुंबई. कधी कुणी मला बॉम्बे म्हणायचं तर कुणी बंबई. त्याही आधी तर कधी मुंबा, कधी मुंबापुरी, कधी </font><font style='font-size:11pt;'>Bombaim </font><font style='font-size:11pt;'>तर कधी बंबई आणि </font><font style='font-size:11pt;'>Bombay. </font><font style='font-size:11pt;'>गेल्‍या तीन-चारशे वर्षांत मी अनेक बदल पचवले आणि रूचवले सुध्‍दा. म्हणूनच मला कुणी काय संबोधावं ही तक्रार घेऊन मी आलेलीच नाहीये. ही नावे बदलतानाच मी इतकी बदलून गेले की माझी मीच मला ओळखू येत नाहीये. पण हो मी कितीही बदलले असले तरी माझ्या वृत्ती मात्र तशाच आहेत, माझ्या लेकरांमध्येही त्या वृत्तीच सामावल्या आहेत. त्यालाच तुमच्या इंग्रजी की काय भाषेत म्हणतात ना 'मुंबई स्पिरीट', तेच ते....  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षे सरलीत. कॅलेंडरची पाने एकामागोमाग उलटत गेलीय, पण इतक्या वर्षांच्या माझ्या आयुष्यांत गेल्या वर्षीचा २६ नोव्हेंबरचा दिवस मात्र विसरू म्हणता विसरता येत नाही. जणू भूतकाळ ठप्प होऊन स्तब्ध झालाय. धाड...धाड गोळ्यांचे आवाज... बॉम्बस्‍फोट आणि काळजाचा थरकाप उड‍वणार्‍या किंकाळ्या... सगळं कसं आजही माझ्या डोळ्यांसमोर टक्क दिसतंय. तो दिवस, ती रात्र... सगळं जणू अंगावर येतंय... चहुकडे जीवाच्‍या आकांतानं सैरावैरा धावत सुटलेले जीव... रक्ताच्‍या थारोळ्यात पडलेली माझी लेकरं....ग्रेनेड, बॉम्ब नि गोळीबाराचे आवाज... जळालेल्‍या मानवी मांसाचा दर्प...मृत्यूचे तांडव चाललं होतं नुसतं.  </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या अंगाखांद्यांवर अभिमानानं लेवून मिरवावं अशा माझ्या वैभवशाली इतिहासाच्‍या पाऊखुणांवरच त्या 'नापाक' मंडळींनी घाला घातला. छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज आणि ओबेरॉय इतकचं काय ज्यू धर्मियांचं नरीमन हाऊस... या इमारतींत घुसून या दुष्टांनी धाडधाड गोळीबार करत निष्‍पाप, निरपराध आणि निरागस जीवांना निर्दयपणे ठार केलं. नृशंस हत्याकांडाचीही परिसीमा म्हणावी असंच हे चाललं होतं. जोडीला ग्रेनेडने हल्‍ले सुरूच होते. माझ्या लाडक्या ताजला तर विद्रुप करण्याचा जणू चंगच बांधला होता. माणसांना तर मारलंच, पण नंतर या वास्तुला आग लाव, हातबॉम्ब फोड असले उद्योगही त्या दुष्टांनी केले. 60 तास मृत्युचं हे तांडव सुरू होतं....</font><br/>  <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आणि मी हतबल होऊन सगळं काही पाहत राहण्‍याशिवाय काहीही करू शकले नाही....</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font></p><p align=right>  <font  style='font-size:11pt; color:#FF0000'>पुढील पानावर पहा... </font><font style=' color:#000000;'></font></p> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/>   <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण माझ्या नि माझ्या लेकरांच्‍या संरक्षणासाठी अगदीच तुटपुंज्या शस्‍त्रांसह धावून आलेले माझे ती वीरही आठवताहेत. निधड्या छातीनं दहशतवादाचा तो राक्षसी डाव उधळून लावण्‍यासाठी निघालेल्या त्या हेमत करकरे, विजय साळस्‍कर आणि अशोक कामटे नि त्यांना साथ देणारी त्यांच्या दलातली मंडळीही आठवतात. नि त्या नापाक धरतीचे इरादे जगापुढे उघड करणारा पुरावा आपल्या पोलादी हातांनी पकडून ठेवताना रक्त सांडलेले तुकाराम ओंबळेही आठवतात. माझ्या ताजची प्रतिष्ठा राखून तिथे लपलेल्या त्या भेकड दहशतवाद्यांवर तुटून पडलेला संदीप उन्नीकृष्णन नि कॅप्टन गजेंद्रसिंगही आठवतोय. नि या सगळ्यांच्या पराक्रमामुळेच मी वाचले. भर दरबारात द्रौपदीची अब्रू काढण्याचा प्रसंगच जणू होता. पण या वीरांनी आपले प्राण लावून माझी अब्रू वाचवली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे साठ तास मी कुढत होते, आतल्या आत. या साठ तासात माझी 173 लेकरं गेली. कित्येक जायबंदी झाली. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले. कित्येक अनाथ झाले. नि कित्येक अपंग. कितिकांची कितीक दुःख. असं वाटत होतं जणू त्यांच्या या दुःखाला मीच तर जबाबदार नाही? या जगात माझं महत्त्वंच इतकं वाढलं की माझी ही प्रतिष्ठा धुळीला मिळवायसाठी हा कट रचला गेला. नि त्यात या निरपराधांना आपला जीव गमवावा लागला. हे थांबलं तरी माझ्या डोळ्यातली आसवे थांबत नव्हती. दहशतवाद्यांना मारले, पण मी कशी उभी राहू? पार खचूनच गेले होते मी. पुन्हा उभे रहाण्याची हिंमतच नव्हती माझ्यात. अगदीच असहाय झाले होते. पण मला धीर दिला, माझ्याच लेकरांनी. माझ्या मुंबईकरांनी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासाठी हा घाव मोठा होता, पण नवीन नव्हता. १९९३ मध्येही कुण्या दाऊदने बॉम्बस्फोट केले. त्याआधी दंगलही झाली. त्यानंतरही पुन्हा पुन्हा बॉम्बस्फोट होतच राहिले. दोन वर्षांपूर्वी २६ जुलैलाच महापूरही आला. संकटे मला नवीन नाहीत नि त्यांच्या मालिकाही. पण त्या प्रत्येकातून मी उभी राहिले. चालत राहिले. धावत राहिले. पण गेल्या वर्षीचा हल्ला माझ्या अगदी वर्मी लागला होता. पण तरीही दुसर्‍या दिवशी मी डोळे किलकिले केले नि त्याच छत्रपती   टर्मिनसकडे पाहिलं, लोकल आली होती, लोक येत होते. लोकल येतच गेल्या नि लोकंही येत गेले. माझ्या दुःखी चेहर्‍यावर किंचित हसू पसरलं. पाण्याच्या काठावर माणसांचा समुद्र पुन्हा एकदा माझ्यात हेलकावू लागला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझं चैतन्य परत आलं. हसू पुन्हा फुललं. समाधान ओसंडून वाहू लागलं. दहशतवाद्यांना वाटलं एका हल्ल्यात मी संपून जाईन. धुळीत मिळून जाईल. जणू माझं वैराण वाळवंट होईल. पण तसं काहीच झालं नाही. तो हल्ला उरात ठेवूनही माणसं येतच राहिली. काम करतच राहिली. माणसांचा समुद्र पुन्हा एकदा काठोकाठ भरला. माझं 'स्पिरिट' लोकांमध्ये शिगोशिग भरलंय. एका हल्ल्याने ते विरून जाणार नाही, याची खात्री पटली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुणीतरी उगाच नाही म्हटलंय, 'मुंबई नगरी बडी बाका। तिन्ही लोकी वाजे तिचा डंका' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेवटी मी मुंबई आहे. मुंबई. कधीच न थांबणारी. अखंड वाहत रहाणारी.....</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई नगरी बडी बॉंका</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 25 Nov 2009 18:22:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>विकास शिरपूरकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईच्‍या रक्षणासाठी 'फोर्स वन' सज्ज]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबईच्‍या-रक्षणासाठी-फोर्स-वन-सज्ज-109112500037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबईच्‍या-रक्षणासाठी-फोर्स-वन-सज्ज-109112500037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाच्‍या आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर भविष्‍यात अशा प्रकारच्‍या हल्‍ल्‍यांना प्रत्युत्तर देण्‍यासाठी एनएसजी प्रमाणे मुंबईसाठी 'फोर्स वन' या नवीन विशेष कमांडो पथकाची पहिली बॅच ट्रेनिंग घेऊन तयार  झाली असून या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/25/images/img1091125037_1_1.jpg' alt='force one'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>देशाच्‍या आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर भविष्‍यात अशा प्रकारच्‍या हल्‍ल्‍यांना प्रत्युत्तर देण्‍यासाठी एनएसजी प्रमाणे मुंबईसाठी 'फोर्स वन' या नवीन विशेष कमांडो पथकाची पहिली बॅच ट्रेनिंग घेऊन तयार  झाली असून या पहिल्‍या तुकडीने गोरेगाव येथे आपला मोर्चा सांभाळला आहे. या तुकडीत सध्‍या 216 जवान असून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्‍या उपस्थितीत 24 नोव्‍हेंबर रोजी या तुकडीचे पहिल्‍या संचलन करण्‍यात आले.</b></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/25/images/img1091125037_2_1.jpg' alt='force one'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>मुंबईत 26/11 च्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी राज्य पातळीवर दहशतवाद्यांच्‍या मुकाबल्‍यासाठी  एनएसजीच्‍या धर्तीवर अशा प्रकारचे कमांडो पथक तयार करण्‍याचा निर्णय घेतला होता. फोर्स वनच्‍या जवानांना सुमारे  126 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक शस्‍त्रास्‍त्रे तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी  आणखी शंभर कोटी रुपये खर्च करून त्‍याची व्‍याप्‍ती वाढविण्‍याचा सरकारचा विचार आहे. अत्याधुनिक शस्‍त्रांनी सज्ज  असलेली महाराष्ट्र पोलीस दलाची फोर्सवन कुठेही आवश्‍यकता भासल्‍यास जाण्‍यास सज्ज असणार आहे.</b></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/25/images/img1091125037_3_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>या पथकाचे लोकार्पण मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते नुकतेच करण्‍यात आले यावेळी उपमुख्‍यमंत्री छगन  भूजबळ आणि गृह मंत्री आर.आर.पाटील हे देखिल उपस्थित होते. हल्‍ल्‍यानंतर एका वर्षाच्‍या आत अशा प्रकारचे दल  तयार केल्‍याबद्दल मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी अधिका-यांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. </b></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/25/images/img1091125037_4_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>राज्‍याच्‍या संरक्षण विषयक गरजा पूर्ण करण्‍यासाठी आणि पोलीस व संरक्षण दलाच्‍या अत्याधुनिकरणासाठी गृह विभागाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्‍ध करून देण्‍याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. तर 26/11 च्‍या हल्‍ल्‍यातील  मृतांच्‍या कुटुंबीयांसाठी विशेष योजना उभारण्‍याचे वचनही यावेळी मुख्‍यमंत्र्यांनी दिले.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>‘फोर्स वन’ दहशतवादी आव्‍हानांचा सामना करण्‍यास सदैव सज्ज असल्‍याचे यावेळी एटीएस प्रमुख के. पी.रघुवंशी यांनी सांगितले.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 25 Nov 2009 18:06:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईत पुन्हा 26/11 होऊ शकेल काय?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबईत-पुन्हा-26-11-होऊ-शकेल-काय-109112500032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबईत-पुन्हा-26-11-होऊ-शकेल-काय-109112500032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत पुन्हा 26/11 होऊ शकेल काय? याचे उत्तर ठामपणे नाही असे देता येणार नाही. याचा अर्थ गेल्या वर्षभरात मुंबईच्या सुरक्षिततेकरीता काही झाले  नाही, असा याचा अर्थ घ्यायचा काय? तर तसे नाही. वर्षभरात पोलिस दल मजबूत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न झाले, पण ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/25/images/img1091125032_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत पुन्हा 26/11 होऊ शकेल काय? याचे उत्तर ठामपणे नाही असे देता येणार नाही. याचा अर्थ गेल्या वर्षभरात मुंबईच्या सुरक्षिततेकरीता काही झाले  नाही, असा याचा अर्थ घ्यायचा काय? तर तसे नाही. वर्षभरात पोलिस दल मजबूत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न झाले, पण तरीही मुंबई सुरक्षित आहे  असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवृत्त मेजर जनरल दत्ता यांनीही एका मुलाखतीत मुंबईत 26/11 कधीही घडू शकतं असं सांगितलं होतं. याचा अर्थ सुरक्षा व्यवस्थेवर त्यांचाही विश्वास  नाही हेही स्पष्ट होतं. इतकंच कशाला राज्याचे पोलिस महासंचालक अनामी रॉय यांनाही मुंबईतील दक्षता वाढविणे आणि दहशतवादविरोधी उपाय मजबूत करणे गरजेचे वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्यानंतरही पोलिस दलात काही सकारात्मक बदल नक्कीच झाले. त्यात लक्षणीय म्हणजे, नॅशनल सिक्युरिटी गार्डचे विकेंद्रीकरण होऊन देशातील चार शहरांत त्याची स्थापना करण्यात आली. त्यातले अडीचशे जणांचे पथक मुंबईत ठेवण्यात आले. पण याशिवाय महाराष्ट्र आणि मुंबई ोपलिसांनी स्वतःचे रॅपिड एक्शन फोर्सचे दलही तैनात केले आहे. मुंबई पोलिसांची कंट्रोल रूमही अद्ययावत करण्यात आली आहे. शहरभर अनेक ठिकाणी सिक्युरिटी कॅमेरे बसविण्यात आले असून या कंट्रोल रूममध्ये बसून शहरावर नजर ठेवता येणार आहे. एनएसजी कमांडोसारखे एक पथक सरकारनेही विकसित केले असून त्याला फोर्स वन असे नाव दिले आहे. त्याला कमांडो स्तरावरचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोलिस दलाला मिळालेल्या मजबूतीसाठी करण्यात आलेले प्रयत्न पहाता, गेल्या वर्षभरात मुंबईतच काय देशातही बॉम्बस्फोट झालेले नाहीत, याचा अर्थ देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट झाली आहे, असाच त्याचा अर्थ होतो, असे काहींचे म्हणणे आहे. पण ते तितके खरे नाही. भारताला अस्थिर करण्यात पाकिस्तानी लष्कर, त्यांची गुप्तचर संस्था आयएसआय यांचा मोठा हात आहे. पण गेल्या वर्षभरात पाकमध्येच अतिरेक्यांनी थैमान घातले असून सुरक्षा व्यवस्था पार खिळखिळी करून टाकली आहे. अशा धामधुमीच्या काळात या दोन्ही संस्थांना आणि अतिरेक्यांनाही भारताकडे लक्ष देण्यास वेळ नाही. म्हणूनच त्यांनी आपले लक्ष भारताकडे वळविलेले नाही, असे कारण या क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली असली हा पोलिसांचा दावा असला तरी वस्तुस्थिती तशी नाही, असे या क्षेत्रातीत तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खुद्द पोलिस महासंचालक अनामी रॉय यांनीही मान्य केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यापेक्षा सुरक्षा व्यवस्था सुधारली आहे हे नक्की, पण तंत्रज्ञान, संपर्क साधने आणि मनुष्यबळ यात अतिरेक्यांपेक्षा मुंबई पोलिस कोसो दूर आहेत, हेही रॉय यांनी मान्य केले आहे. पोलिसांच्या फोर्स वन पथकाला अत्याधुनिक शस्त्रे मिळाली असली तरी बाकीचे पोलिस आजही रायफलधारीच आहेत. त्यांच्याकडची संपर्क साधने तुलनेने जुनीच आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई पोलिस विभागाला अनुभवी पोलिस अधिकार्‍यांची गरज आहे. सध्या एक कोटी चाळीस लाखाच्या लोकसंख्येला अवघे ४८ हजार अधिकारी आहेत.  केंद्र सरकारने देशभरातील पोलिस खात्यात दीड लाख पोलिस शिपायांची भरती करणार असल्याचे सांगितले आहे. पण अत्याधुनिक प्रतिकार साधने  हातात असलेले पोलिस असणे ही आत्ताही गरजच आहे. गेल्या वर्षी आपण जितके आत्मविश्वासू होतो, त्याहून अधिक आत्मविश्वास आत्ता आपल्याला हवा. पण आपण अजूनही तो कमावलेला नाही, असे उद्गार रॉय यांनीच काही दिवसांपूर्वी झालेल्या सुरक्षा परिषदेत काढले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरी हद्दीच्या संरक्षणासाठीही काही बाबी महत्त्वाच्या आहेत. सागरी हद्दीत गस्त घालण्यासाठी पोलिस दलाने आठ अत्याधुनिक नौका परदेशातून आणल्या आहेत. पण ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभलेल्या महाराष्ट्रासाठी त्या पुरेशा आहेत काय? शिवाय गुजरातमध्ये उतरूनही अतिरेकी महाराष्ट्रात येतात की त्यामुळे सागरी हद्द हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न उरत नाही. गुजरात सरकारनेही याकडे लक्ष द्यायला हवे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सगळे पहाता, खरोखरच मुंबई सुरक्षित आहे काय? असा प्रश्न पडतो. या विषयी तुम्हाला काय वाटते? </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 25 Nov 2009 17:03:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबई हल्ला : तुम्हाला काय वाटते?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबई-हल्ला-तुम्हाला-काय-वाटते-109112500026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबई-हल्ला-तुम्हाला-काय-वाटते-109112500026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[२६ नोव्हेंबर २००८. मुंबईच काय देशवासियांसाठीही कधीही न विसरली जाणारी तारीख. कधीही न थांबणार्‍या मुंबई नगरीला याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले. तब्बल तीन दिवस त्यांनी मुंबईला वेठीस धरले. त्यांनी घडविलेल्या नृशंस ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/25/images/img1091125026_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>२६ </font><font style='font-size:11pt;'>नोव्हेंबर </font><font style='font-size:11pt;'>२००८. मुंबईच काय देशवासियांसाठीही कधीही न विसरली जाणारी तारीख. कधीही न थांबणार्‍या मुंबई नगरीला याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले. तब्बल तीन दिवस त्यांनी मुंबईला वेठीस धरले. त्यांनी घडविलेल्या नृशंस हिंसाचारात अनेक निरपराधांना जीव गमवावे लागले. ताज, ट्रायडंट, लिओपोल्ड हॉटेल, नरिमन हाऊस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि समोरचा रस्ता रक्तलांच्छित झाला. भारतभूच्या जॉंबाज जवानांनी या अतिरेक्यांचा यशस्वी मुकाबला करत या मुंबईला त्यांच्या तावडीतून मुक्त केले. पण या संघर्षात अनेक जवानांनाही प्राण गमवावे लागले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काळ हाच कुठल्याही गोष्टीवर उपाय असतो. आता या हल्ल्याला एक वर्ष झाले आहे. जखमा भरल्या असल्या तरी त्याचे व्रण मात्र कायम आहेत. या हल्ल्यात शहिद झालेल्यांविषयीच्या आपल्या भावनाही कायम आहेत. त्याचवेळी देशाच्या अस्मितेवर झालेल्या या भ्याड हल्ल्याविषयीचा संतापही आहे. देशाविषयी, या हल्ल्याविषयी आणि त्यात मृत आणि शहिद झालेल्यांविषयी तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या भावना इथे मोकळ्या करा. व्यक्त व्हा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 25 Nov 2009 15:34:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गुप्तचर संस्थांमध्ये समन्वय हवा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/गुप्तचर-संस्थांमध्ये-समन्वय-हवा-109112400029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/गुप्तचर-संस्थांमध्ये-समन्वय-हवा-109112400029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[26 ते 28 नोव्हेंबर असे सुमारे 72 तास मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही अंगावर काटा आणतात. पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी तीन दिवस संपूर्ण देशाला वेठीस धरले. हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197जण ठार झाले 800 पेक्षा अधिक लोक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/24/images/img1091124029_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> 26 <font  style='font-size:11pt; color:#000000'>ते 28 नोव्हेंबर असे सुमारे 72 तास मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही अंगावर काटा आणतात. पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी तीन दिवस संपूर्ण देशाला वेठीस धरले. हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197जण ठार झाले 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. शेवटी एनएसजीच्या कमांडोकडून नऊ दहशतवादी ठार झाले आणि मुंबई पोलिसांनी क्रूरकर्मा आमि</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>अजमल कसाबला जिवंत पकडले. मुंबईवर झालेला हा हल्ला म्हणजे आपल्या सुरक्षा यंत्रणेचे की गुप्तचर संस्थांचे अपयश?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार ही माहिती चार महिन्यांपूर्वी केंद्रीय गुप्तचर संस्थेने दिली होती. या हल्ल्यास 'लिओपोर्ट' हे सांकेतिक नाव दहशतवाद्यांनी दिले होते, असे मुंबई पोलिसांना केंद्रीय गुप्तचर संस्थेने कळविले होते. परंतु एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होत असलेले मुंबई पोलिस दलातील सुरक्षा यंत्रणा गाफील राहिली. त्यांनी 'लिओपोर्ट'ची गंभीर दखल घेतली नाही. त्यांच्याकडून नेमके माहितीचे विश्लेषण झाले नाही. पर्यायाने 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर महाभयंकर दहशतवादी हल्ला झाला. तसेच ही माहिती मुंबई पोलिसांप्रमाणे तटरक्षक दल आणि नौदलालाही दिली होती. त्यानंतरही हा हल्ला टाळता आला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात किमान अर्धा डझनभर गुप्तचर संस्था आहेत. गुप्तवार्ता विभाग (आयबी), 'रॉ', संरक्षण गुप्तचर विभाग, हवाई आणि नौदलाचे गुप्तचर विभाग, राज्य  गुप्तचर संस्था (सीआयडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा मंडळ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या संस्थाही आहेत. या सर्व संस्था स्वतंत्रपणे कार्य करतात. आपल्याकडील माहितीची ते परस्परांमध्ये देवाणघेवाण करीत नाहीत. त्यांच्यात समन्वय नाही. यामुळेच मुंबईसारखा महाभयंकर हल्ला घडला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. सुरक्षा हा मुद्दा राज्याचा असला तरी दहशतवादी हल्ल्याचा तपास अधिक परिणामकतेने होण्यासाठी केंद्रीय संस्थेची गरज भासली. यामुळेच 'नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी'ची (एनआयए) म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना 16 डिसेंबर  2008 रोजी करण्यात आली. राधा विनोद राजू हे या संस्थेचे पहिले महासंचालक आहेत. ज्या राज्यांमध्ये दहशतवादी हल्ले घडले आहेत, त्यांची परवानगी न घेता ती तपास सुरू करु शकते. तसेच काही विशेष अधिकारी या संस्थेकडे दिले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद आणि अन्य देशविघातक गुन्हेगारी यांच्या तपासासाठीची एनआयए हे सरकारने उचललेले पाऊल योग्य आहे. परंतु, गुन्हा घडल्यानंतरच या यंत्रणेचे काम सुरू होते. म्हणजेच दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्याच्या तपासासाठी ही यंत्रणा पुढे सरसावेल. हा हल्ला घडू नये यासाठी या यंत्रणेचा काही उपयोग नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक कामाची जबाबदारीही राज्य पोलिसांबरोबरच 'एनआयए'कडे सोपवायला हरकत नाही. याबाबत ढोबळ भूमिका न घेता नेमकेपणाने विविध घटकांवरील जबाबदारी निश्‍चित केली जावी. एनआयएमध्ये प्राप्तिकर, उत्पादनशुल्क, पोलिस, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, बॅंक, नौदल, हवाई दल, लष्कर या सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञ असणे आवश्‍यक आहे. यामुळे ही संस्था सर्व बाजूंनी व्यापक तपास करु शकेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवरील झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना वर्ष पूर्ण होत असतानाच या हल्ल्याच्या कटातले आंतरराष्ट्रीय गुन्हेगार अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात  सापडले. अमेरिकेच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एफबीआय) या गुप्तचर यंत्रणेने लष्कर-ए-तोयबा संघटनेचा साथीदार असलेल्या डेव्हिड हेडली या अमेरिकन नागरिकाला अटक केली. तसेच त्याचा दुसरा साथीदार हुसेन राणा या कॅनडाच्या नागरिकासही जेरबंद केले. अनेक वेळा भारत वार्‍या करुनही  भारतीय गुप्तचर यंत्रणेस या दोघांचा तपास लागू शकला नव्हता. एफबीआयने त्यांना पकडल्यावर भारतीय गुप्तहेर खात्याची झोप उडाली आहे. आता त्यांचे अनेक कारणामे माध्यमांमधून बाहेर येत आहे. परंतु हेडली आणि राणा यांच्या कारवायांची माहिती नसणे हे ही मुंबई हल्ल्याप्रमाणे आणखी एक अपयश आहे. मुंबईसारखा हल्ला झाल्यानंतरही आपल्या गुप्तचर संस्था पुरेशा सतर्क झाल्या नाही, असे म्हणावे लागले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात गुप्तचर संस्थेचे चांगले जाळे विणले गेले आहेत. परंतु या यंत्रणेत नेमक्या संवादाचा आणि सुसूत्रतेचा अभाव असल्याचे मुंबई हल्ल्यानंतर स्पष्टपणे समोर येते, नाहीतर हा हल्ला आपली सुरक्षा दले सहज परतवू शकल्या असत्या. थोडक्यात गुप्तचर यंत्रणा असून केवळ भागत नाही तर, त्यांच्याकडून मिळाली माहितीचे विश्लेषण करुन ती अंमलबजावणी योग्य प्रकारे केली गेली पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणेमध्ये समन्वय आणि संवाद असणे गरजेचे आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 24 Nov 2009 18:43:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबई हल्ल्याचा 'प्रसार' आणि माध्यमं]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबई-हल्ल्याचा-प्रसार-आणि-माध्यमं-109112400050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबई-हल्ल्याचा-प्रसार-आणि-माध्यमं-109112400050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- मुंबई हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्याची विदारकता जगभराने अनुभवली आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून देशावर होणारा लाइव्ह हल्ला सारे पाहत होते. हा हल्ला मुंबईत झाला असला तरी टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार्‍या फुटेजमुळे जणू हा हल्ला ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/24/images/img1091124050_1_1.jpg' alt='mumbai'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्याची विदारकता जगभराने अनुभवली आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून देशावर होणारा लाइव्ह हल्ला सारे पाहत होते. हा हल्ला मुंबईत झाला असला तरी टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार्‍या फुटेजमुळे जणू हा हल्ला आपल्या आसपासच होत असल्याचा भास प्रत्येकालाच होत होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका वर्षानंतरही परिस्थिती कायम आहे. या हल्ल्याच्या निमित्ताने सरकारी यंत्रणेतील फटी माध्यमांनी दाखविल्या. पण त्याचवेळी माध्यमांनी या हल्ल्यात निभावलेली भूमिकाही चर्चेत आली आहे. माध्यमांना देशात अवास्तव महत्त्व आणि अधिकार मिळाल्याचे आरोपही या दरम्यान झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर हल्ला झाला तो दिवस आजही माझ्या आठवणीत आहे. रात्रीची वेळ असेल पिसी शट डाऊन  करून जाण्याच्या तयारीत मी होतो, इतक्यात माध्यमांनी ब्रेकींग दाखवण्यास सुरुवात केली. मुंबईमध्ये 'गँगवॉर', 'ताजजवळ शुट आऊट'.<!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0911/24/images/img1091124050_1_2.jpg' alt='mumbai'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरुवातीला हा हल्ला गँगवॉर असेल असे साऱ्यांनाच वाटले होते. काही चॅनल्सनी तर दाऊद आणि  राजन टोळीच्या काही गुंडांचा परस्पर उल्लेखही करण्यास सुरुवात केली होती. परंतु काही क्षणातच हा  दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंदूरमधून आमच्या टीमने मुंबई हल्ल्यांचे सेकंदा-सेकंदाचे कव्हरेज दिले. टीम हल्ल्यांच्या बातम्यांनी  हवालदिल झाली होती, पण मिडिया हा कोणत्या वेळी किती प्रभावी ठरू शकतो हे आम्हाला या वेळी  स्पष्ट जाणवत होते. माध्यमांमध्ये जणू चढाओढच लागली होती. एक चॅनल मृतांचा आकडा 60 दाखवत होते, दुसरे शंभर तर तिसरे आणखी काही. </font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/24/images/img1091124050_2_1.jpg' alt='mumbai'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>हल्ल्याची माहिती मिळेपर्यंत चॅनल्स पाहणार्‍यांना माध्यमांच्या तत्परतेचा अभिमान वाटला असेल, परंतु कालांतराने माध्यमांनी दाखवण्यास सुरुवात केलेल्या फुटेजने सारेच अवाक झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात झालेल्या हल्ल्यांचे 'लाइव्ह' फुटेज, आमचा प्रतिनिधी घटनास्थळी जाऊन आपल्यासाठी कव्हरेज  करत आहे, आम्ही सर्वप्रथम आपल्याला ही माहिती दिली. पोलिस बळ किती आहे, आता एनएसजी  येणार, लष्कराने ताज आणि नरिमन हाऊसला वेढा दिला या बातम्या चॅनल्सवर फिरू लागल्या. माध्यमांच्या या ब्रेकींगच्या नादात आत लपलेल्या दहशतवाद्यांना किती फायदा झाला हे स्पष्ट आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे ही बाब कुणाच्या तरी लक्षात आली नि सरकारनेच लाईव्ह प्रक्षेपणावर प्रतिबंध घातला. तरीही काही  चॅनेलवाले ब्रेकिंग न्यूज मिळविण्याच्या नादात पुढे पुढे करतच होते. ब्रेकींगचे भूत त्यांच्या मानगुटावर  इतके वरचढ झाले होते, की आपण काय करतोय, दहशतवाद्यांना साथ देतोय याची साधी जाणीवही त्यांना झाली नाही. माध्यमांच्या भीतीने पोलिसांनीही त्यांना विरोध केला नाही. उगाच लफडं  नको म्हणून अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी माध्यमांना ताज आणि नरिमनचे चित्रीकरण  करण्यापासून मज्जाव केला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एनएसजी प्रमुख दत्ता आणि भारतीय लष्कराने ताज परिसराचा ताबा घेतल्यानंतर आधी मिडियाला या  भागातून दूर केले. माध्यमांना कव्हरेज न दाखवण्याची विनंती करण्यात आली. यानंतरच आतमधील  दहशतवाद्यांना जणू टिप्स मिळणे बंद झाले आणि त्यांचा खात्मा करण्यात एनएसजी कमांडोना यश  आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वास्तविक पाहता माध्यमांना या सार्‍या प्रकरणापासून दूर ठेवले असते तर करकरे आणि साळसकर यांसारखे जिगरबाज अधिकारी बचावले असते असेही या काळात बोलले गेले. करकरे आणि साळसकर आता कोठे जाणार, त्यांच्याकडे शस्त्रे कोणती, सोबत कोण आहे, याची इत्थंभूत माहिती चॅनल्सवाले दाखवत होते. याचाच फटका त्यांना बसला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बातमी आणि तिच्या परिणामापेक्षा आज एखादी बातमी आपण किती जलद गतीने उघड करू शकतो याचा छंदच माध्यमांना लागला आहे. त्यामुळे आपली सुरक्षा यंत्रणा धोक्यात सापडते आहे. मुंबई  हल्ल्यातून हेच स्पष्ट झाले. प्रसार माध्यमांनी या काळात केलेल्या कामगिरीचे कौतुक करावे का त्यांना याचा जाब विचारावा हे एक कोडेच आहे. या काळात माध्यमांची भूमिका एखाद्या कसलेल्या  व्यापार्‍यासारखी होती. <!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0911/24/images/img1091124050_2_2.jpg' alt='mumbai'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेतील 9/11 चा हल्ला झाल्यानंतरचे एकतरी फुटेज आपल्याला आठवते का? वर्ल्ड ट्रेड सेंटर पडल्यानंतर तेथील माध्यमांनी केवळ विमानांच्या टकरी वगळता इतर कोणतेही कव्हरेज न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना ब्रेकिग न्यूजपेक्षा देशावर झालेल्या हल्ल्यावेळी सामान्यांच्या भावना महत्त्वाच्या वाटल्या होत्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय माध्यमांनी मात्र या उलट काम मुंबई हल्ल्यादरम्यान केले. माध्यमांनी आपल्या तत्त्वांमध्ये बदल केले आहेत, का याचे व्यावसायिकरण झाल्याने त्यांची तत्त्वे लवचिक झालीत हा यक्षप्रश्न आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 24 Nov 2009 17:57:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>नितिन फलटणकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वर्षभरानंतर काय बदललं?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/वर्षभरानंतर-काय-बदललं-109112400051_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/वर्षभरानंतर-काय-बदललं-109112400051_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारताच्‍या इतिहासात 26 नोव्‍हेंबर 2008 ची रात्र काळरात्र म्हणून नोंदली गेली आहे. या रात्री घडलेल्‍या एक-एक घटनांची नुसती आठवण झाली तरीही मनात थरकाप, घृणा आणि संताप या परस्‍पर विरोधी भावना एकाच वेळी उफाळून येतात. पाकच्‍या भूमीत दहशतवादाचे बाळकडू ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/24/images/img1091124051_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>भारताच्‍या इतिहासात 26 नोव्‍हेंबर 2008 ची रात्र काळरात्र म्हणून नोंदली गेली आहे. या रात्री घडलेल्‍या एक-एक घटनांची नुसती आठवण झाली तरीही मनात थरकाप, घृणा आणि संताप या परस्‍पर विरोधी भावना एकाच वेळी उफाळून येतात. पाकच्‍या भूमीत दहशतवादाचे बाळकडू प्‍यायलेल्‍या 8-10 माथेफिरूंनी मुंबईच्‍या रस्‍त्‍यांवर घातलेला धिंगाणा, त्यानंतर तब्बल 60 तास चाललेला संघर्ष आणि या संघर्षात बळी पडलेले 173 निष्‍पाप जीव.... </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>त्‍या दिवशी... खरं तर त्याहीपेक्षा अनेक दिवसांपूर्वीच दहशतवादाचे काळे नाग फणा काढून फुत्‍कारत भारताच्‍या भूमीत शिरले आणि इथल्‍या संरक्षण यंत्रणेलाच वेठीशी धरत तीन दिवस मृत्युचे तांडव चालविले. स्‍वतःच्‍या राष्‍ट्रातील लोकांना पुरेसे संरक्षण देण्‍याची लायकी नसलेल्‍या पाकिस्तानने कधी आर्थिक, कधी भौगोलिक तर कधी शस्‍त्रास्‍त्रांनी दिलेल्‍या पाठबळाच्‍या बळावर पोसलेल्‍या या भस्‍मासुराने आपले काम चोख बजावले.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>तीन दिवसांच्‍या संघर्षानंतर आपल्‍या जवानांना आपल्‍याच भूमीत लढून विजय मिळवावा लागला. या लढ्यातून भारताने काय गमावले याचा हिशेब करणे तर शक्यच नाही. मात्र मिळवले काय म्हणायला एक गोष्‍ट होती. या हल्‍ल्‍यात पाकचा हात आहे, हे सिध्‍द करण्‍यासाठी अजमल आमीर कसाब तेवढा जिवंत हाती आला. </b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0911/24/images/img1091124051_1_2.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PTI</p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>कसाब हाती आल्‍यानंतर पाकचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पडेल आणि पाक दहशतवादी राष्‍ट्र असल्‍याच्‍या भारताच्‍या आरोपांना पाठबळ मिळेल असे वाटले होते. मात्र दुर्दैवाने आमचा राजकीय ढिसाळपणा आणि सहिष्‍णू धोरण यामुळे पाकवर हवा तेवढा दबाव निर्माण करणे अजुनही शक्य झाले नाही. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b><i>न्‍यायालयीन प्रक्रिया </font><font style=' color:#000000;'></i></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>हल्‍ल्‍याचा कट रचणार्‍या हाफिज सईद, झाकीऊर रहमान लखवीसह इतर आरोपींना भारताच्‍या ताब्यात द्या ही मागणी वारंवार करूनही पाकने ती साफ धुडकावली. इतकेच काय 'आयएसआय' प्रमुख शुजा पाशा यांना भारतात पाठवण्‍याची मागणीही नाकारली. मग निदान आरोपींवर पाकमध्‍ये तरी खटला चालवण्‍याची मागणी केली गेली. अनेकदा पुरावे देऊनही अजुनही पाक पुरेसे पुरावे नसल्‍याच्‍या बोंबा ठोकत असते. आता तर कसाबलाही पाकच्‍या ताब्यात द्या अशी उलटीच मागणी तिथल्‍या न्‍यायालयाकडून केली जाऊ लागली आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>कसाबने 26 नोव्‍हेंबरच्‍या रात्री सीएसटीसह कामा हॉस्पिटलमध्‍ये गोळीबार केल्‍याचे पक्के पुरावे असून आणि त्याने आपल्‍या गुन्‍ह्याची कबुली दिल्‍यानंतरही खटला सुरूच आहे. ही न्‍यायालयीन प्रक्रिया आणखी किती दिवस चालते माहीत नाही. त्‍यातून कसाबला फाशीची शिक्षा झालीच तर ती द्यायला चांगला मुहुर्त शोधायला किती वर्ष लागतील. हे देखिल सांगणे अवघड आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>जिथे सुमारे 350 आरोपींना अजुनही फाशीची प्रतिक्षा आहे, तिथे कसाबचा नंबर कधी लागणार? </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b><i>पाकमध्‍ये काय बदलले</font><font style=' color:#000000;'></b></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>भारतातच कसाबचा खटला मारूतीच्‍या शेपटीप्रमाणे लांबत चाललाय तिथे पाककडून न्‍यायाची अपेक्षा तरी कशी करणार? कधी न्यायालयाकडून तर कधी सरकारकडून खटल्‍याचे कामकाज लांबतच चालले आहे. हल्‍ल्‍यातील प्रमुख सुत्रधार हाफीज सईद आजही पाकमध्‍ये सैन्‍य आणि पोलिसांच्‍या संरक्षणात मोकाट फिरतो आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>आजही पाकमध्‍ये सैन्‍य आणि आयएसआयच्‍या मदतीने दहशतवादी शिबिरे सुरू आहेत. आजही पाकमध्‍ये भारतावर हल्‍ल्‍यांचे मनसुबे रचले जात आहेत. आणि आमचे कमकुवत परराष्‍ट्र धोरण अमेरिकेकडे काही तरी करण्‍यासाठी आशाभूत नजरेने पाहत आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b><i>वजीरिस्‍तान आणि बलुचिस्‍तान</font><font style=' color:#000000;'></b></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>दहशतवादाला पोसण्‍याच्‍या पाक सरकारच्‍या धोरणांमुळे आता त्यांच्‍याच मूळावर उठलेल्‍या दहशतवाद्यांविरोधात पाकने कारवाई सुरू केली असली तरीही यात दहशतवादाचा नायनाट ही प्रमाणिक भावना कमी तर अमेरिकेकडून आर्थक मदत मिळवणे हा शुध्‍द नफेखोर उद्देशच अधिक आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>भारताविरुध्‍द दहशतवादी कारवायांना पाठबळ देणे हे पाकचे परराष्‍ट्र धोरण तर अमेरिकेसह आंतरराष्‍ट्रीय समुदायाकडून दहशतवादाविरोधात लढण्‍यासाठी मिळणारी आर्थिक मदत भारताविरुध्‍द वापरणे हे त्‍यांचे आर्थिक धोरण असल्‍यासारखा त्याचा अवलंब केला जातो. स्‍वतः पाकचे माजी लष्‍करशहा परवेझ मुशर्रफ यांनी ही बाब मान्‍य केली आहे.  </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>पण पाक ते ऐकायलाच तयार नाही. हे कमी की काय म्हणून उलट पाकनेच भारतावर बलुचिस्तानात दहशतवादी कारवायांना पाठबळ देत असल्‍याचा आरोप लावला आहे. पाकच्‍या या आरोपामागे भारताचे लक्ष्य मुंबई हल्‍ल्‍यापासून विचलीत करणे हा प्रमुख उद्देश आहे. हे वेगळे सांगण्‍याची गरज नसावी.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b><i>अमेरिकेचे बोटचेपे धोरण</font><font style=' color:#000000;'></b></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>अमेरिकेला आपला मुख्‍य शत्रू तालिबांनशी लढण्‍यासाठी पाकची मदत हवी आहे. अफगाणिस्‍तानात दीर्घकाळ राहून आशिया खंडात आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर मग पाकची मर्जी सांभाळणे अमेरिकेला भागच आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेकडून पाकवर भारत पुरस्‍कृत दहशतवाद थांबवण्‍याची अपेक्षा ती कशी करणार. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>आम्ही मारल्‍यासारखे करू, तुम्ही रडल्‍यासारखे करा' ही तर अमेरिकेची रितच. त्‍यामुळे वर्षभरापासून 'पाकने मुंबई हल्‍ल्‍यातील आरोपींवर कारवाईत सक्रियता दाखवावी' या पलीकडे कधी अमेरिकेची भाषा गेलीच नाही. मूळात दहशतवाद संपावा असं अमेरिकेलाही वाटत नाही. दहशतवाद संपला तर मग जगाला आपल्‍या इशा-यावर खेळवायला अमेरिकेकडे मुद्दा तरी राहिल का? </b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>तर अमेरिकेच्‍या इशा-यांवर नाचूनही सार्वभौम लोकशाहीचा आव आणणारे भारताचे पोचट परराष्‍ट्र धोरण 'मुंबई हल्‍ल्‍यातील दोषींवर कारवाईबाबत पाकडून दिरंगाई' या साचेबध्‍द आरोपांमध्‍येच अडकून पडले आहे.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>वर्षभरात एक बदल मात्र झालायं. कधीकाळी मुंबईची शान म्हणून अभिमानाने मिरवणारा ताज आणि जागतिक वारसा असलेल्‍या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्‍या इमारतींचे पूर्वीचे सौंदर्य कोमजलंय. आतून त्या भेदरल्‍याहेत. खोलवर रूजलेल्‍या जखमा अंगावर बाळगत त्‍या येणा-या जाणा-या प्रत्येकाकडे साशंकतेने पाहताहेत.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 24 Nov 2009 17:55:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबई हल्ला आणि टेक्नॉलॉजी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबई-हल्ला-आणि-टेक्नॉलॉजी-109112400040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबई-हल्ला-आणि-टेक्नॉलॉजी-109112400040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई हल्ल्यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे तंत्रज्ञानाचा झालेला वापर. अर्थात दोघांकडून अतिरेकी आणि लोकांकडूनही. या दहशतवाद्यांना इतका मोठा हल्ला करण्यात तंत्रज्ञानाची फार मोठी मदत झाली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/24/images/img1091124040_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे तंत्रज्ञानाचा झालेला वापर. अर्थात दोघांकडून अतिरेकी आणि लोकांकडूनही. या दहशतवाद्यांना इतका मोठा हल्ला करण्यात तंत्रज्ञानाची फार मोठी मदत झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अतिरेक्यांनी गुगल अर्थ या गुगलच्या सेवेचा उपयोग करून त्यांना हल्ला करण्याची ठिकाणे नकाशाच्या माध्यमातून समाजावून घेतली. बारीक सारीक  माहिती त्यांना या आयत्या नकाशाच्या आधारे मिळाली. ज्या हॉटेल्सवर हल्ला करायचे त्यांचे नकाशे तर त्यांनी मिळवलेच, पण त्याच्या आतली  रचनाही त्यांना याच माध्यमातून कळाली. ब्लॅकबेरी, जीपीएस नेव्हिगेटर्स, हल्ल्याच्या ठिकाणांची सुस्पष्ट चित्रे असलेल्या सीडी, स्विचेबल सिमकार्ड्स  असलेले मल्टिपल सेलफोन (यांना ट्रॅक करणे अवघड असते), सॅटेलाईट फोन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञनाने हे दहशतवादी सज्ज होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या अतिरेक्यांना ही टेक्नॉलॉजी कशी वापरायची याचे शिक्षणही देण्यात आले होते. या हल्ल्याच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून कॉल केल्याचेही उघड  झाल्यानंतर पोलिसही हैराण झाले. शिवाय सॅटेलाईट फोनचाही त्यांना वापर केला. सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून ते पाकिस्तानात बसलेल्या म्होरक्यांशी  संपर्क साधत होते. तिकडे तीच मंडळी टिव्हीवर चाललेल्या लाईव्ह कव्हरेजच्या आधारे या दहशतवाद्यांना सुचना देत होती. सॅटेलाईट फोन आणि  मल्टिपल सीम फोन या दोहोच्या माध्यमातून होणारे बोलणे ट्रॅक करणे अवघड जाते. अतिरेक्यांनी जे ई -मेल्स पाठवले तेही वेगवेगल्या सर्व्हरच्या  माध्यमातून. त्यामुळे ते शोधणे अत्यंत जिकिरीचे होते.  या दहशतवाद्यांना अरबी समुद्रात प्रसंगी होडी चालवता येत नसेल, पण जीपीरएस तंत्रज्ञानाच्या  सहाय्याने इच्छित दिशेला कसे जायचे याचे ज्ञान होते, म्हणूनच कराची ते मुंबई हे अंतर ते विनायास पार करू शकले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तंत्रज्ञानाचा उपयोग लोकांनाही भरपूर झाला. या काळात मोबाईल फोनच्या माध्यमातून बरीच माहिती बाहेर पडली. हल्ल्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष  असलेल्यांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून हा हल्ला जगभर पोहोचविला. ताज किंवा इतर हॉटेलमध्ये अडकलेले फोनच्या माध्यमातून जगाशी संवाद  साधत होते. हल्ल्याच्या परिसरात असलेल्यांनी फ्लिकरसारख्या साईट्सवर तातडीने ताजे फोटो अपलोड करून हा हल्ला जगात पोहोचवला. त्याचवेळी  ट्विटवरवरही जोरदार ब्लॉगिंग सुरू होते. मिनिटामिनिटाची खबर पोहोचवली जात होती. टिव्हीवर या घटनांचे लाईव्ह कव्हरेज होतेच, पण न्यूज  वेबसाईट्सही या घटनेचा इत्यंभूत रिपोर्ताज लोकांना कळविण्यात तत्पर भूमिका पार पाडत होत्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकीकडे तंत्रज्ञानाचा इतका मुक्त हस्ते वापर होत असताना लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी असलेल्या सरकारी यंत्रणा तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे पडल्याचे  दिसून आले. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर रात्रीच्या अंधारात दिसू शकेल असे विशिष्ट प्रकारचे गॉगल्सही या यंत्रणेकडे  नव्हते. अत्याधुनिक शस्त्रांचा अभाव तर होताच. पण हॉटेल्सच्या आतल्या खोल्यांचे नकाशेही त्यांच्याकडे नव्हते. कुठून कसे जायचे हेही त्यांना माहित  नव्हते. त्याचवेळी अतिरेकी मात्र या सार्‍या गोष्टींनी सुसज्ज होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 24 Nov 2009 15:44:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईच्या धैर्याला बॉलीवूडचा सलाम!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबईच्या-धैर्याला-बॉलीवूडचा-सलाम-109112300062_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/मुंबईच्या-धैर्याला-बॉलीवूडचा-सलाम-109112300062_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याने नेहमीच ताजे-टवटवीत असणारे बॉलीवूडही हादरले. म्हणूनच या घटनेनंतर आपले ग्लॅमर बाजूला फेकत ही मंडळी मदतीसाठी पुढे सरसावली होती. आता या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना बॉलीवूड पुन्हा एकदा कर्तव्याला जागले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/23/images/img1091123062_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याने नेहमीच ताजे-टवटवीत असणारे बॉलीवूडही हादरले. म्हणूनच या घटनेनंतर आपले ग्लॅमर बाजूला फेकत ही मंडळी मदतीसाठी पुढे सरसावली होती. आता या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना बॉलीवूड पुन्हा एकदा कर्तव्याला जागले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>26<font  style='font-size:11pt; color:#000000'>/11 च्या काळात आणि त्यानंतरही मुंबईकरांनी दाखविलेल्या धैर्याला सलाम करण्यासाठी एक गीत तयार करण्यात आले आहे. यात अनेक गायकांसोबत महानायक अमिताभ बच्चननेही आवाज दिला आहे. यातून या हल्ल्यात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बिग बीला या गाण्याविषयी सांगितले त्यावेळी ते लगेचच तयार झाले. 'बिग बी'चे मुंबईवर अपार प्रेम आहेच. त्यामुळेच संकट आल्यानंतर मुंबई कोसळत नाही, चालत रहाते. हेच मुंबईचे स्पिरीट आहे, असे ते मानतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साऊंड ऑफ पीस नावाचा हा अल्बम या निमित्ताने तयार होतो आहे. त्याचे संगीत आदेश श्रीवास्तव यांनी दिले आहे. यात जागतिक दहशतवादावर टिप्पणी करण्यात आली आहे. अमिताभशिवाय सोनू निगम, हरिहरन, कैलाश खेर, सुरेश वाडकर, जगजीत सिंह, सुनीधी चौहान, शंकर महादेवन, रशिद खान, अलका याज्ञिक यांच्यासह अनेकांनी त्यासाठी आवाज दिला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या गीताचा व्हिडीयोही तयार करण्यात येत असून त्यात मुंबई हल्ल्यासोबतच अमेरिकेतील 9/11 चा हल्ला आणि लंडन स्फोटाची क्लिपिंग्ज दाखवली जाणार आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 23 Nov 2009 18:50:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[26/11 वर आधारीत चित्रपटांचे काय झाले?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/26-11-वर-आधारीत-चित्रपटांचे-काय-झाले-109112300061_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/26-11-वर-आधारीत-चित्रपटांचे-काय-झाले-109112300061_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बॉलीवूड निर्माता- दिग्दर्शक नेहमीच चांगल्या कथेच्या शोधात असतात.त्यातल्या त्यात सत्य घटनांवर आधारीत चित्रपट बनविणे त्यांना नेहमीच खुणावते. मुंबईवरील झालेला हल्ला ही अशीच एक घटना. त्यानंतरही अनेक निर्माता, दिग्दर्शकांनी त्यावर चित्रपट बनविण्याचे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/23/images/img1091123061_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">IFM</p>IFM</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>बॉलीवूड निर्माता- दिग्दर्शक नेहमीच चांगल्या कथेच्या शोधात असतात.त्यातल्या त्यात सत्य घटनांवर आधारीत चित्रपट बनविणे त्यांना नेहमीच खुणावते. मुंबईवरील झालेला हल्ला ही अशीच एक घटना. त्यानंतरही अनेक निर्माता, दिग्दर्शकांनी त्यावर चित्रपट बनविण्याचे जाहिर केले. अनेकांनी चित्रपटाची नावे रजिस्टर्ड केली. असे वाटले की पुढच्या दोन-तीन महिन्यांत हे चित्रपट आपल्याला पहायला मिळतील. पण तसे झाले नाही. जेमतेम एखाद-दुसर्‍या चित्रपटांचे शुटींग सुरू असल्याची बातमी तेवढी हाती येते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याचे कारण असे की चित्रपटांची घोषणा करणारे निर्माता-दिग्दर्शक दुय्यम-तिय्यम दर्जाचे होते. त्यांना फक्त संधीचा फायदा उठवून चर्चेत यायचे होते. अनेकांनी हा विषय आपल्याला झेपणार नाही म्हणून सोडून दिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेल पहायला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत रामगोपाल वर्माही आला होता. रामूला यावर चित्रपट बनवायचा होता, म्हणूनच तो त्यांच्यासोबत आला अशी टीकाही त्यावेळी झाली. रामू आणि विलासराव दोघेही मीडीयाच्या टीकेचे लक्ष्य ठरले. विलासरावांना आपल्या 'बॉलीवूड कनेक्शनमुळे' दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. रामूने या घटनेतून चित्रपटाचा मसाला शोधण्याचा प्रयत्न केला, त्याला त्यातून लोकांचे दुःख दिसले नाही, अशी टीकाही झाली. पण अजूनपर्यंत रामूचा या विषयावर चित्रपट आलेला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सफायर ओरिजन यांनी 'उन हजारों के नाम' नावाची टेलिफिल्म तयार करून हा विषय मांडला आहे. त्यात विनोद खन्ना, सीमा विश्वास आणि सादिया सिद्दकी यांनी काम केले आहे. स्टार प्लसवर २६ नोव्हेंबरला रात्री ही फिल्म दाखवली जाईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकी हल्ल्यांवर आधारीत अनेक चित्रपट बनविले जात आहेत. त्याची हाताळणीही तितक्याच गंभीरपणे केली जात आहे. मुंबई हल्ल्याच्या बाबतीत तसे घडले नाही. या विषयाची हाताळणी गंभीर दिग्दर्शकानेच करण्याची गरज आहे. तोच या विषयाला न्याय देऊ शकेल. अन्यथा त्याला काहीही अर्थ उरणार नाही. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 23 Nov 2009 18:39:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारत-पाक संबंध- मागल्या पानावरून पुढे....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/भारत-पाक-संबंध-मागल्या-पानावरून-पुढे-109112300044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/भारत-पाक-संबंध-मागल्या-पानावरून-पुढे-109112300044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर झालेल्या हल्ल्यात अमिर अजमल कसाब या अतिरेक्याला पकडले, त्यावेळी तुकाराम ओंबळेंना माहितही नसेल की आपण केवढा मोठा पुरावा  गोळा करतोय. दुर्देवाने ते पहायला ओंबळे राहिले नाहीत. पण भारताला पाकिस्तानविरोधात प्रथमच]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/23/images/img1091123044_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्या हल्ल्यात अमिर अजमल कसाब या अतिरेक्याला पकडले, त्यावेळी तुकाराम ओंबळेंना माहितही नसेल की आपण केवढा मोठा पुरावा  गोळा करतोय. दुर्देवाने ते पहायला ओंबळे राहिले नाहीत. पण भारताला पाकिस्तानविरोधात प्रथमच या निमित्ताने सज्जड पुरावा मिळाला. कसाब पाकिस्तानी असल्या-नसल्याच्या कोलांट्या उड्या पाकिस्तानने कितीही मारल्या तरी तिथल्या पत्रकारांनी कसाबचे कूळ आणि मूळ शोधून काढून  भारताच्या पुराव्यांना मदतच केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्ल्यात पाकिस्तानी हात आहे हे कळाल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली. ती स्वाभाविकही होती. सरकारवरही दबाव वाढला. पाकिस्तानला  आता धडा शिकवायलाच हवा असे पुन्हा एकदा बोलले जाऊ लागले. पण धडा शिकवायचा म्हणजे नेमके काय करायचे ते मात्र कळले नाही. भारताने या  काळात कोणतेही आततायी कृत्य केले नाही, पण पाकिस्तानशी बोलण्याची भाषा तेवढी कडक केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकिस्तान त्यांच्या देशातून संचलित होत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करत नसेल तर 'आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत,' हेही  सांगून झाले. पाकव्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांवर हल्ले करण्याची धमकीही तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणव  मुखर्जी यांनी दिली. तिकडे पाकिस्तानही आम्ही कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास तयार असल्याचे सांगत होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उभय देशांत चाललेल्या या घडामोडींमुळे चिंतीत झालेल्या अमेरिकेने या दोन्ही देशांत पेटलेला संघर्ष थंड करण्यासाठी पाऊल उचलले. त्यासाठी  उच्चपदस्थ नेत्यांनी उभय देशांच्या वार्‍या आरंभल्या नि फोनाफोनी सुरू झाली. दोघेही देश अण्वस्त्रसज्ज असल्याने या संघर्षाचे अंतिम रूपांतर युद्धात  झाल्यास नुसत्या दक्षिण आशियावरच नव्हे तर जगावर काय अनावस्था प्रसंग ओढवेल याची कल्पना इतर राष्ट्रांनाही आली होती. म्हणूनच अमेरिकेने  पाकिस्तानला त्यांच्या देशात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलण्यास बजावले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेने असा दबाव अद्यापही कायम ठेवला आहे. केरी-लुगार विधेयकांतर्गत पाकिस्तानला दहशतवादासाठी लढण्यास मोठी मदत देण्यात आली आहे.  मात्र, त्यासाठी त्या देशातून संचलित केल्या जाणार्‍या दहशतवाद्यांचा सफाया करण्याची पूर्वअट घालण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्यानंतर भारताने तातडीने पाकिस्तानसोबत सुरू असलेली बोलणी, व्यापार, राजनैतिक पातळीवरील चर्चा सारे काही थांबविले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्यानंतर पाकने आयएसआयच्या प्रमुखांना भारतात पाठवावे असे भारताने सुचविले. अध्यक्ष झरदारी त्याला तयारही झाले होते. पण लष्कप्रमुख  अश्फाक कियानींनी हस्तक्षेप करून 'आज आयएसआयप्रमुख उद्या मलाही पाठवाल, असे सांगत,' त्यास नकार दिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत-पाकमध्ये तणाव असला तरी तो युद्धात परिवर्तित होऊ नये याची काळजी अमेरिका घेत होती. म्हणूनच भारत कितीही ताठर भूमिका घेत असला  तरी पाकला कानपिचक्या देत अमेरिकेने जे साध्य करायचे ते केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/23/images/img1091123044_2_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या घटनेनंतर गेल्या जुलैत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांची भेट रशियात शांघाय कॉर्पोरेशन समिटमध्ये झाली.  त्यावेळी संपूर्ण माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मनमोहनसिंगांनी झरदारींना जाहिर कानपिचक्या देत, तुमच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ देऊ नका  असे ठणकावून सांगितले. या पहिल्या बैठकीत भारताच्या पंतप्रधानांच्या आक्रमक भूमिकेने देशभरात कौतुकाची पावती मिळाली. त्यानंतर १६ जुलैला  इजिप्तमध्ये शर्म अल शेख येथे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यासोबत त्यांची भेट झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी आपापल्या  सहकार्‍यांना खोलीबाहेर काढत चर्चा केली. दोन तास चर्चा झाली. पण त्याचे फलित मात्र निराळेच निघाले. संयुक्त जाहिरनाम्यात परराष्ट्र सचिव  स्तरावरील चर्चा पुन्हा सुरू करावी, दहशतवादाशी चर्चेचा संबध न जोडता ती सुरूच राहू द्यावी आणि बलुचिस्तानातील स्वातंत्र्य चळवळीला भारतातर्फे  फूस लावली जाते त्याचा शोध घ्यावा. या तीन मुद्यांभोवती केंद्रित जाहिरनामा प्रसिद्ध झाला नि भारतात वादळ उठले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादी घटना होतच असतील तर पाकशी चर्चा चालू ठेवण्यात अर्थ काय? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्याचवेळी बलुचिस्तानातील  अतिरेक्यांना भारतातर्फे मदत केली जाते, या प्रकाराची चौकशी म्हणजेच तिथे भारतीय हस्तक्षेप मान्य करणे असा होत असल्याचा तर्क लढवून विरोधी  पक्षाने मनमोहनसिंग सरकारला खिंडीत पकडले. त्यावर पंतप्रधानांनी निवेदन केले. पण त्यानंतरही पाकिस्तान आता वारंवार भारतासंदर्भात  बलुचिस्तानचा उल्लेख करते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरवातीला मुंबई हल्ल्यात आपला सहभाग नाहीच असेच पाकिस्तान म्हणत होते. पण त्यानंतर ते मान्य केले. त्यासाठी काही लोकांना पकडण्यातही  आले. त्यासाठी पाकव्याप्त काश्मिरमध्ये छापे टाकण्यात आले. जमात उद दवाचा प्रमुख झाकिर उर रहमान लखवीसह अनेकांना पकडण्यात आले. पण  त्यांना भारताच्या ताब्यात न देता पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर खटला चालवू असे सांगण्यात आले. या सगळ्यांचा कर्ताकरविता व लष्कर ए तोयबाचा  प्रमुख हफीझ सईद मात्र मोकळा फिरतो आहे. त्याच्यावर कारवाईचे नाटकच तेवढे करण्यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताने या खटल्यासंदर्भात पाकिस्तानी अतिरेक्यांचा मुंबई हल्ल्यात हात असल्याचे पुरावे देणारी कागदपत्रे पाठवली. त्यात शस्त्रे, दुधाची पाकिटे, कॅंडी  बारचे कपटे, सॅटेलाईट फोन्स या सगळ्या वस्तू पाकिस्तानी बनावटीच्या होत्या. कराचीहून भारतापर्यंत आणण्यात आलेल्या नावेचा तपशीलही पुरवला.  इतका तपशील पुरवूनही पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करायला का कू करत होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता अमेरिकेच्या एफबीआयने या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावत डेव्हिड हेडली उर्फ दाऊद गिलानीसह (कॅनडाचा नागरिक पण पाकवंशीय)  तहव्वूर राणा या पाकिस्तानी नागरिकाला अमेरिकेत अटक केली आहे. यांची मुळे शोधण्यासाठी भारताने पाकला बजावले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>पुढे काय? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्यासंदर्भात विचार करताना पाकिस्तानमध्येही वर्षभरात काय झाले ते तपासावे लागेल? भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍यांना आपल्याच  देशांत आसरा देणारा पाकिस्तान या काळात स्वतःच खोदलेल्या खड्ड्यात पडला आहे. दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाची आपल्या कारवायांनी चाळणी केली  आहे. पेशावर हे शहर बॉम्बस्फोटांच्या मुखावर वसले आहे. लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर हल्ला करून नंतर शेजारच्या मनावर येथील पोलिस  प्रशिक्षण केंद्रावरही दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. स्वात खोरेही पाकिस्तानी तालिबान्यांनी ताब्यात घेतले होते. वझिरीस्तान, वायव्य सरहद्द प्रांतातही  त्यांच्या हालचाली सुरू आहेत. एका मुंबई हल्ल्यात गेलेल्या बळींपेक्षा जास्त माणसे पाकिस्तानात गेल्या वर्षभरातील दहशतवादी हल्ल्यात मरण पावली  आहेत. मुंबई हल्ल्याने भारत हादरला नि सावरलाही. पण पाकिस्तान मात्र हादरण्याने खिळखिळा झाला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांना पोसणार्‍या पाकच्या डोक्यावरच या भस्मासुराने हात ठेवला आहे. आता मुंबई हल्ल्यासंदर्भात तपासाला पाकने मदत करावी यासाठी  अमेरिकेने दबाव वाढविला आहे. भारतही तेच करतो आहे. पाक याला किती मदत करेल ते सांगता येणे आत्ताही शक्य नाही. पण दुसर्‍याचे वाटोळे  करण्याच्या नादात स्वतःचेही वाटोळे होते, हा धडा या निमित्ताने पाकला शिकायला मिळाला हेही काही कमी नाही. मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर  कारवाई करण्याबाबत पाक किती प्रामाणिक आहे हे पुढे कळेलच. पण त्यांनी ती प्रामाणिकता दाखवली नाही, तर मग मात्र या देशाला कोणीही वाचवू  शकेल असे वाटत नाही.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 23 Nov 2009 15:51:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बदलली मुस्लिमांकडे पाहण्याची दृष्टी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/बदलली-मुस्लिमांकडे-पाहण्याची-दृष्टी-109112000054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/flashback-26-11/बदलली-मुस्लिमांकडे-पाहण्याची-दृष्टी-109112000054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याने जे काही चांगलं घडलं त्यात  मुस्लिमांविषयीचा बदललेला दृष्टीकोन महत्त्वाचा ठरावा. मुस्लिमांकडे या आधी ज्या  संशयास्पद रितीने पाहिलं जायचं ती संशयग्रस्तता कमी झाली. इतर धर्मियांप्रमाणे मुस्लिम  हेही ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/20/images/img1091120054_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याने जे काही चांगलं घडलं त्यात  मुस्लिमांविषयीचा बदललेला दृष्टीकोन महत्त्वाचा ठरावा. मुस्लिमांकडे या आधी ज्या  संशयास्पद रितीने पाहिलं जायचं ती संशयग्रस्तता कमी झाली. इतर धर्मियांप्रमाणे मुस्लिम  हेही कुठल्याही दहशतवादाचे तितकेच बळी आहेत, हे या हल्ल्याने दाखवून दिलं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यानंतर प्रथमच या हल्ल्यांसाठी मुस्लिमांना दोषी ठरविण्यात आलं नाही. या  हल्ल्यातील दहशतवादी मुस्लिम असले आणि ते पाकिस्तानातून आले असल्याचे जरी पुढे  आले तरी समस्त मुस्लिम समाजाचे ते प्रतिनिधी नव्हते, हे फार ठळकपणे मांडले गेले. यात  माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात विविधतेत एकता असली तरीही धार्मिक संघर्षही नित्याचा राहिला आहे हेही  नाकारता येणार नाही. हिंदू आणि मुस्लिम अशा या संघर्षाच्या दोन मुख्य बाजू आहेत.  याशिवाय हिंदू- ख्रिश्चन आणि हिंदू शीख असाही पैलू आहेत. हिंदू-मुस्लिम संघर्ष मात्र  परंपरागत असावा असा जपला जातो आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाची फाळणी याच धार्मिक संघर्षाच्या आधारावर झाली. त्यावेळीही लाखो लोक या संघर्षात  मृत्यूमुखी पडले. स्वातंत्र्यानंतरच्या दंगलीची उजळणी करायची झाली तरीही नऊ मोठ्या  दंगलींमध्ये किमान दहा हजार जण मृत्यूमुखी पडले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या सर्व दंगलींमध्ये मुस्लिमांकडे पहाण्याची संशयास्पद नजर तयार होत गेली. भारतातून  वेगळ्या झालेल्या पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचा एक कंगोराही त्याला असल्याने इथल्या मुस्लिमांची सहानुभूती सीमेपलीकडे असल्याचे उगाचच भासविले गेले किंवा तसे चित्र  उभे केले गेले. </font><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेत ११ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याने तर जणू जगभरातील मुस्लिमांकडे संदिग्ध  नजरेने पाहिले जाऊ लागले. भारतातील मुस्लिमांमध्ये तर यामुळे अधिकच भीतीची भावना  पसरली. भारतात मुस्लिमांना इतर धर्मियांइतकेच आधार असल्याने आणि त्यांच्याकडे दुय्यम  नागरिक म्हणून पाहिले जात नसले तरीही इतरांची त्यांच्या दिशेने टोचणारी नजर होतीच. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यातल्या त्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून तर मुस्लिमांकडे अधिक संशयाने पाहिले जाऊ  लागले. साखळी बॉम्बस्फोटांनी तर हा संशय अधिक गडद केला. मुंबई, दिल्ली, बेंगलुरू,  जयपूर, चेन्नई, कोलकता, हैदराबाद एकामगोमाग एक शहरे या स्फोटांनी हादरली. पण हे  स्फोट होऊनही मुंबईत १९९३ मध्ये स्फोटानंतर झालेल्या दंगलीसारखा प्रकार मात्र घडला  नाही, हेही इथे नोंदवावे लागेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे स्फोट घडवून आणणार्‍यांचा हेतूही दोन समाजातील सौहार्द तुटावे आणि दंगली घडाव्यात  हाच असावा. पण तसे काही घडले नाही. अनेक धार्मिक, राजकीय मुस्लिम संघटनांनी या  स्फोटाचा निषेध केला. पण मुस्लिमांविषयीचा संशय काही निवळला नाही. हैदराबाद  स्फोटानंतर तर अनेक मुस्लिम तरूणांना पकडण्यात आले. पण त्यातल्या अनेकांना केवळ ते  मुस्लिम असल्याने बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोलिसांच्या मते दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक स्थानिक मुस्लिमही आहेत. त्याला  स्लीपर सेल म्हटले जाते. त्यासाठी काम करणारी बरीच मंडळी आहेत. पण त्यांना  पकडण्याच्या नादात अनेक निरपराध मुस्लिमांवरही अन्याय होत होता. त्यातच दिल्लीमध्ये  बाटला हाऊसमध्ये कथित मुस्लिम दहशतवाद्यांच्या चकमकीने वातावरण आणखी गढूळ झाले.  मुस्लिमांनी ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला. अनेक हिंदूंच्या मते हा  दहशतवाद्यांना शुद्ध करून घेण्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याच वातावरणात २६-११ ची घटना घडली. २६ नोव्हेंबरला दहा दहशतवाद्यांनी देशाच्या आर्थिक  राजधानीला तब्बल तीन दिवस वेठीला धरले. १६४ नागरिक मृत्युमुखी पडले, तर ३०८  जखमी झाले. या घटनेने मुस्लिमांकडे दहशतवादी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण  दहशतवाद्यांनी घातलेल्या रक्तरंजीत थैमानामध्ये मुस्लिम- हिंदू अशी काही वर्गवारी केली  नव्हती. जो दिसेल त्याला ठार मारण्याचे सत्र आरंभले होते. त्यामुळेच यात मरण  पावलेल्यांमध्ये अनेक मुस्लिमही होते.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशभरात या हल्ल्याविषयी संतापाची तीव्र लाट उसळली. पण या संतापाने मुस्लिमांना लक्ष्य  केले नाही. कुठे दंगलही पेटली नाही. कारण हा हल्ला करणारे पाकिस्तानातून आले होते, हे  अजमल अमिर कसाबच्या अटकेने स्पष्ट झाले. शिवाय मुस्लिमांनाही या घटनेचा मोठा धक्का  बसल्याचेही दिसले. अनेक मुस्लिम संघटनांनी निषेध केला. मुस्लिमांनी बाहेर पडून  एकजूटपणे निषेधाच्या सुरात आपलाही सूर मिसळला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्ल्यानंतर माध्यमांनी मोठी भूमिका बजावली. या हल्ल्यात मुस्लिमही बळी पडले.  त्यांच्या बातम्याही माध्यमांनी दाखविल्या. या हल्ल्यातील मृतांची आकडेवारी पहाता, प्रत्येक  नऊ मृतांमागे एक मुस्लिम असल्याचे दिसते. याचा अर्थ मुस्लिमही या हल्ल्याचे तितकेच  बळी ठरले आहेत. मुस्लिम आणि दहशतवाद्यांमध्येही फरक असतो हे या घटनेने अधोरेखित  झाले. मुस्लिम म्हणजेच दहशतवादी असा राजकीय नेत्यांनी फुगवलेला फुगा या घटनेने  फोडून टाकला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धर्मनिरपेक्ष भारताच्या जडणघडणीत मुस्लिमांचे योगदानही मोठे आहेत. केवळ काही वाट  चुकलेल्या लोकांमुळे समस्त समुदायाकडे त्याच नजरेने पाहू नये हे या २६-११ च्या या  हल्ल्याने दाखवून दिले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 20 Nov 2009 17:21:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Flashback2611]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
