अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर ऐश्वर्याला त्याचा सहवास मिळविण्यासाठी सध्या त्याच्या मागे पळावे लागत आहे. अभिषेक आपल्या वाट्याला येतच नाही, अशी तिची तक्रार आहे.
आता हेच पहाना, जेव्हा अभिषेक 'दिल्ली6' चित्रपट करत होता, तेव्हा त्याला भेटायला ऐश त्याच्या मागे जयपूरला पोहचली. नंतर दोस्तानासाठी ती अभिषेकचा पाठलाग करत मियामीला गेली. आता या दोघांचा हा खेळ संपला आहे.
मणिरत्नम यांनी दोघांनाही 'लज्जो' मध्ये घेतल्याने ऐश आणि अभिषेक दोघेही निदान या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान तरी एकत्र राहतील.
लज्जोत अमिर आणि करीनाला घेण्याचा मणिरत्नम यांचा विचार होता. पण या दोघांनीही याला नकार दिल्याने त्यांनी ऐश आणि अभिषेकला घेण्याचे निश्चित केले आहे.
|