राणी मुखर्जीला तिच्या 'दिल बोले हडिप्पा' या चित्रपटाच्या यशाबद्दल मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट लोकांना आवडेल आणि तेही 'हडिप्पा' म्हणतील, असे ती म्हणते. लोकांचे मनोरंजन होऊ शकेल असे सर्व काही यात आहे, असा राणीचा दावा आहे.
राणी गेल्या काही दिवसांपासून अयशस्वी चित्रपटांची 'राणी' झाली आहे. म्हणूनच हडिप्पा तिचे हे अपयश धुऊन काढेल असे तिला वाटते. या चित्रपटासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. यात ती एक क्रिकेटपटू दाखवली आहे. त्यासाठी ती क्रिकेटही शिकली. गेली वर्षभर ती फक्त या एकमेव चित्रपटावर लक्ष केंद्रीत करून होती. राणीव्यतिरिक्त या चित्रपटात शेर्लिन चोप्रा, राखी सावंतही आहेत.