महाराष्ट्रातील तरुण स्पर्धा परीक्षेत आघाडीवर आहेत. सनदी परीक्षेतही उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, परंतु मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील मुले मागे पडतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चौफेर वाचन व आकलन क्षमता या गोष्टीद्वारे मुलाखतीमध्ये यशस्वी होता येवू शकते हा मंत्र दिला आहे, कोल्हापूरच्या अनिरूद्ध कुलकर्णी या गुणवंत तरूणाने... नागरी सेवा परीक्षेत ४२१ व्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या यशाची कहाणी, त्याच्याच शब्दांत...