संतुलित आहार फक्त आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. तणावपूर्ण जीवनात चुकीच्या आहारामुळे त्वचा कोरडी होते आणि बर्याचदा त्वचेच्या समस्या निर्माण व्हावयास लागतात. त्वचा कोरडी होणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि पूरळ इत्यादी.
त्वचेच्या समस्या अन्य कारणांमुळेही उद्भवू शकतात. हार्मोन्स परिवर्तन, जेनेटिक प्रॉम्बेम, आणि गर्भावस्थेचा काळ देखील त्वचेवर परिणाम घडवतो. पण 70% पेक्षा जास्त परिस्थितीत शुष्क त्वचेसाठी चुकीचा आहारच कारणीभूत ठरतो. वेगवेगळ्या त्वचेसाठी आहारही वेगळा हवा. पण त्वचेच्या आरोग्यासाठी खालील काही बाबी मात्र सर्वांसाठीच आवश्यक आहेत.
* जास्तीत-जास्त पाणी प्या. पाणी त्वचेसाठी चांगले औषध आहे. पाण्यामुळे आपण ताजेतवाने होतो त्याचबरोबर त्वचाही उजळते.
* आपल्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेसाठी जीवनसत्वाची आवश्यकता असते. काही जीवनसत्वाची नावे खालीलप्रमाणे. ही जीवनसत्वे त्वचा तजेलदार राखण्यास मदत करतात.
1. जीवनसत्व सी: हे रसदार फळांमध्ये असते, संत्रे, मोसंबी... 2. जीवनसत्व ए: याचे प्रमुख स्रोत आहेत पपई, संत्रे... 3. जीवनसत्व बी: हे फळांसोबतच पत्तेदार भाज्यांमध्ये आढळते. 4. जीवनसत्व इ: हे शेंगदाणे, आणि अन्य कडधान्यांमध्ये आढळते.
त्वचा तजेलदार करणे अवघड नाही. फक्त त्यासाठी आहाराकडे लक्ष द्यायला हवे. वरील घटकांचा समावेश आहारात केल्यास तेही तुम्ही साध्य कराल.
|