मुंबई, शाहरुख आणि बिहारी या तीन मुद्द्यांवरून सध्या शिवसेना आणि कॉग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्यात 'रण ' पेटले आहे. राहुल यांनी सेनेला प्रत्योत्तर दिल्यानंतर सेनेने त्यांच्यावर फेरी झाडण्यास सुरुवात केली असून, राहुल यांनी महाराष्ट्राच्या आणि सेनेच्या वाट्याला जाऊ नये असा इशारा उद्धव यांनी राहुल गांधींना दिला आहे.
मुंबई कुणाची या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच त्यांची राजकीय शाखा असलेल्या भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि 'मराठी ह्रदयसम्राट' राज ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात मराठी म्हणजे कोण याची व्याख्याच जाहिर केली. राज यांची ही व्याख्या म्हणजे त्यांच्या वैचारीक गोंधळाचे नवे टोक आहे.