'पेरावे तसे उगवते' ही म्हण कृषीक्षेत्रात जितकी खरी तितकीच ती शिक्षणक्षेत्रातही खरी आहे. पेरण्याची क्रिया ज्यांच्याकडून होते त्यापैकी काही सजीव व्यक्ती असतात. शिक्षक, पालक, मित्र, नातेवाईक अशा या सजवी व्यक्ती मुलांच्या मनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे काही पेरीत असतात. चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, प्रदर्शने, वस्तूसंग्रहालये अशा माध्यमातून मुलांच्या मनात काहीबाही पेरल जाते. यापैकी व्यक्ती महत्त्वाच्या की यंत्रणा या प्रश्नाचे उत्तर देण्याचा माझा इरादा नाही. मात्र एवढे निश्चित की, सजीव व्यक्तीकडून होणार्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कारांचा मुलांना घडविण्यात फार मोठा वाटा असतो. हा वाटा मान्य केल्यामुळेच पालकांचा व शिक्षकांचा.... |