ग्रामीण भागात दूरसंचार क्षेत्राला चालना देण्यासाठी भारत संचार निगम अर्थात बीएसएनएल तर्फे चालूवर्षात 27 लाख मोबाईल कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार बीएसएनएल यावर्षात 27 लाख 16 हजार 200 ग्रामीण कनेक्शन देणार आहे. आतापर्यंत पूर्वेकडील राज्यांना चार लाख 95 हजार 100 कनेक्शन, पश्चिम क्षेत्राला पाच लाख 12 हजार 400 आणि दक्षिण भागाला सहा लाख सात हजार 900 कनेक्शन देण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
|