महागाई नियंत्रणात आणण्याच्या सरकारी प्रयत्नांना तडा देत आज महागाई दराने ७.६१ टक्क्यांपर्यंत मजल मारल्याने सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत महागाईदर ६.०१ टक्के होते. महागाईचा वाढता दर रोखण्यासाठी सरकारने गेल्या महिन्या भरापासून अनेक प्रयत्न केले होते. यात पोलाद कंपन्यांशी सरकारने चर्चा केल्यानंतर चार हजार रुपयांपर्यंत पोलादाचे भाव कमी करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला होता. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग दुसर्यांदा रोख राखीव रक्कम अर्थात सीआरआर दर वाढवल्याने महागाई कमी होईल अशी सरकारची आशा होती. परंतु ही आशा फोल ठरवत गेल्या ४२ महिन्यांचे सारे रेकॉर्ड तोडत महागाई दराने आज ७.६१ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.
|