केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगत 30 जून पर्यंत देशातील शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी काल पुन्हा केली.
सिंगमपुनारीतील ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सच्या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आले असताना त्यांनी ही घोषणा केली.
सरकारने कर्ज माफीची घोषणा केल्यानंतर काहीजण जाणून बुजून त्याचा अपप्रचार करत असल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका केली.
विरोधकांना असे वाटत आहे, की सरकारच्या या घोषणे नंतर जनतेच्या मनात सरकार विषयी आपुलकी निर्माण होईल, त्यामुळे ते या योजनेचे अपप्रचार करत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला.
|