देशात गव्हाच्या विक्रमी उत्पादनाने आनंदी असलेल्या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गहू आयात करण्याचा सार्या शक्यता फेटाळून लावत आता वायदे बाजारातही आता कृषी उत्पादनांवर बंदी घालण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उद्योग परिसंघाच्या अर्थात सीआयआयच्या शिखर संमेलनाचे उद्घाटन काल पवार यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा पवार यांनी गव्हाच्या उत्पादना बद्दल शेतकर्यांचे अभिनंदन केले.
आतापर्यंत सरकारने 185 टन गहू खरेदी केला असून, काही राज्यांकडून केंद्राला आणखी गहू मिळणार आहे, यानंतर केंद्राकडे 200 टन गहू असेल अशी माहितीही त्यांनी दिली. अशा परिस्थितीत गहू आयात करण्याची गरजच काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
|