वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी आर्थिक वर्ष कसोटीचे असल्याची कबुली देताना विकासदर सात ते आठ टक्क्यांदरम्यान राहणार असल्याचे स्पष्ट केले.
रालोआ सरकारच्या कार्यकाळातील सरासरी पाच ते सहा टक्क्यांच्या तुलनेत अर्थव्यवस्थेचा विकासदर सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्यासाठी सपुआ सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अकराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ही चांगली सुरूवात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने 2006 ते 2007 दरम्यान 9.1 टक्क्यांची विकासदर नोंदवला आहे.
|