सत्यमच्या घोटाळ्यानंतर भारतीय आयटी कंपन्यांचे नाव खराब झाले असून, भारतीय आयटी कंपन्यांनी जबाबदारीचे भान ठेवत काम करावे असा सल्ला इंफोसिसचे अध्यक्ष एन आर नारायण मूर्ती यांनी भारतीय आयटी उद्योजकांना दिला आहे.
सत्यममध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार आणि भारतीय उद्योजक सज्ज असून, सत्यमच्या भविष्याला तडा जाईल असे कोणतेही काम आपली कंपनी करणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
सत्यमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला आपण आपल्या कंपनीत घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सत्यम विकत घेण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे नारायणमूर्ती यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. |