मान्सूनने पाठ दाखवल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता आभाळाकडे गाऱ्हाणे मांडत आपले लक्ष आभाळातील बदलांवर केंद्रित केले असतानाचा आता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही आभाळाकडेच आपले डोळे लागल्याचे स्पष्ट केले आहे.
मान्सूनकडून आपल्याला आशा असून, आगामी काळात चांगला पाऊस झाला तर देशाचा विकास दर सात टक्क्यांना पार करेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतानाच प्रणवदांनी ही अपेक्षा व्यक्त केल्याने अर्थसंकल्पात ते अनेक कठोर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. |