देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, आजही अनेक नागरिक विकासाची प्रतिक्षा करत आहेत. विकास हा सर्वांचा अधिकार आहे, आता सर्वांना त्यांचा अधिकार मिळणे गरजेचे असल्याने आता विकासाची वेळ आली असल्याचे सांगत रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प आज संसदेत मांडला.
एनडी सरकारमध्ये असताना ममतांनी यापूर्वी दोन अर्थसंकल्प मांडले असून, आज त्यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडला.
ममतांनी यात अनेक तरतूदी जाहीर केल्या आहेत. गुरु रविंद्र नाथ टागोर यांच्या काही काव्यात्मक ओळीही ममतांनी सांगितल्या.
जागतिक दर्जांच्या 50 स्टेशनात महाराष्ट्राला प्राधान्य सीएसटी मुंबई पुणे, नागपुर, हावडा लखनो, नी दिल्ली, कानपुर, जयपुर, तिरुअनंतपुरम, बेंगलुरु, अहमदाबाद, अग्रा चंदीगड, कोलकाता, पोरबंदर, पुरी, कोची या स्टेशनचा समावेश |