टाटा, बीएसएनएल, एअरटेल पाठोपाठ आता आयडियानेही आपल्या ग्राहकांसाठी वन सेकंद योजना लॉंच केली आहे.
या योजनेनुसार कंपनीच्या ग्राहकांना आता लोकल आणि एसटीडी कॉलसाठी केवळ एका सेकंदाला एक पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या या घोषणेनंतर देशातील मोबाईल कंपन्यांचे दर कमी करण्याचे युद्ध सेकंदा- सेकंदांवर आले आहे.
सर्व प्रथम टाटा डोकोमोने अशा स्वरूपाच्या प्लॅनची घोषणा केली होती. यानंतर देशातील मोबाईल कंपन्यांमध्ये यासाठी जणू स्पर्धाच सुरू झाली आहे.