सत्यमचे संस्थापक रामलिंग राजू यांनी कंपनीचे उत्पन्नच खोटे दाखवले असून, त्यांनी दाखवलेल्या उत्पन्नानुसार आयकर विभागाने कंपनीकडून कर घेऊ नये अशी मागणी कंपनी प्रकरणातील मंत्री सलमान खुर्शीद यांनी केली आहे.
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेक सिंग अहलूवालिया यांनी पुन्हा एकदा महागाई संदर्भात भाकीत केले आहे. यापूर्वी प्रमाणेच त्यांनी दोन महिन्यात महागाई कमी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या व अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या वक्तव्यातील विरोधाभास पुन्हा एकदा दिसून आला आहे.