आशियाई आणि युरोपीय बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा फटका आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी 340.62 अंशांनी कोसळला. राष्ट्रीय बाजार अर्थात निफ्टीतही 96.10 अंशांची घसरणं दिसून आली.
यानंतर भारतीय बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, गुंतवणूकदारांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढीस लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बीएसई 13461.60 तर निफ्टी 4040.55 अंशांवर बंद झाला. वर्षाच्या सुरुवातीला बाजारात चांगली वाढ झाली होती. परंतु आता मध्यात मात्र बाजारात सातत्याने पडझड सुरू असल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
|