अंदमानात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्य स्फुरू लागले. जवळ कागद नव्हते. त्यांनी उष:कालच्या आभाळाला विचारले, 'माझा कागद होतोस काय?' आभाळ उत्तरले -
मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी। माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी। माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार? माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।
आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'। मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।
पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले। उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।
की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही। शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।। (ती पहाट लालम् लाल - अनपेक्षित झाली काळी)
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली। 'मी कागद झाले आहे - चल लिही' असे ती वदली।
|