महाराष्ट्र आणि मुंबईत उत्तर प्रदेश व बिहारींच्या वाढत्या लोंढ्यांच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल आणि भूमीपुत्रांना नोक-या देण्याची मागणी केल्याबद्दल तमाम हिंदी भाषिक माध्यमांचा रोष ओढवून घेतलेल्या मनसे नेते राज ठाकरे यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही बिहारी आणि उत्तर प्रदेशच्या लोकांना राज्यात नोक-या करू देणार नसल्याचे जाहीर केले आहे.