केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने अखेर सगळे अंदाज आणि डावपेचांना खोटे ठरवत तब्बल १९ मते जादा मिळवून विश्वासदर्शक ठराव जिंकला. सरकारच्या बाजूने २७५ मते पडली तर डावे, भाजप आणि इतर पक्ष एकत्र येऊनही त्यांना केवळ २५६ मते मिळवता आली. दोन खासदार तटस्थ राहिले. या मतदानासाठी एकेका खासदारासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात असतानाही तब्बल ९ खासदार अनुपस्थित राहिले. डावे, भाजप आणि मायावती या सगळ्यांना धोबीपछाड देत अखेर डॉ. मनमोहनसिंग हेच 'किंग' ठरले.
............ |