भारत व पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय संबंध सर्वोत्कृष्ट पातळीवर असून आम्हांस काश्मिरप्रश्नी भारतासोबत आणखी एक युद्ध नको असल्याचे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी स्पष्ट केले आहे.
संबंध दृढ करण्याचे प्रयत्न फलदायी ठरत असून पाच वर्षाअगोदरच्या तुलनेत देशाची संरक्षण भक्कम आहे. काश्मीर मुद्दयावरून युद्धाची शक्यता फेटाळून लावताना दोन्ही देशांनी पारंपरिक भूमिकेबाबत लवचिकता दाखवली आहे. आम्हांस युद्ध करण्याची आवश्यकता नाही, असे मुख्तार यांनी डॉन वृत्तपावाहीनीवरील मुलाखतीदरम्यान सांगितले.
|