दहशतवादाने पाकमध्ये परिसीमा गाठली असून, कुर्रम भागातील कबायली भागातून दहशतवाद्यांनी चक्क 30 सैनिकांचेच अपहरण केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ही घटना घडली. तारी मंगलाकडे जाणाऱ्या सैनिकांच्या एका तुकडीवरच दहशतवाद्यांनी हल्ला चढवत त्यांचे अपहरण केले.
अपहरण करण्यात आलेले लोकं हे सैनिक नसून, ते मंगल गटाचे कार्यकर्ते असल्याने त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे मत स्थानिक कबायली नेत्यांनी व्यक्त केले आहे.
या भागात गेल्या काही दिवसांपासून कबायली गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे, यात अनेकांचा बळी गेला असून, पाक सैन्यही या गटांच्या हल्ल्यांना कंटाळले आहे.
|