समुद्री चाच्यांचे जहाज बुडवल्यानंतर आता त्यांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी अदनच्या खाडीत भारतीय नौदलाच्या आणखी चार युद्धनौका पाठवण्याचा विचार भारतीय नौदल करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात समुद्री लुटारुंनी हैदोस घातला असून, आतापर्यंत 10 पेक्षा अधिक जहाजांचे अपहरण करुन त्यांच्याऐवजी खंडणी उकळली आहे.यानंतर भारतीय नौदलाने या भागात एक युद्धनौका तैनात केली आहे.
नुकतेच चाच्यांनी पुन्हा एकदा एका तेलवाहक जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला असता, भारतीय नौदलाने हा प्रयत्न हाणून पाडत लूटारुंचे जहाज बुडवले होते. |