बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1972 साली तयार करण्यात आलेली घटना यापुढेही लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बांगलादेशचे कायदा मंत्री शफीक अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी आणि देशातील अपराध्यांना शासन करण्यासाठी काही कडक उपाय योजले जाणार आहेत.
देश धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. |