दहशतवाद हा एक संसर्ग जन्य रोग असून मुंबई सारखे हल्ले थांबविण्यासाठी सार्क देशांनी एकमेकांना हवे असलेल्या दहशवाद्यांचे प्रत्यार्पण करावे, अशा कानपिचक्या पाकिस्तान सरकारला तेथीलच एका प्रमुख मानवाधिकार संघटनेने दिल्या आहेत. एका शांतता रॅलीत अमृतसर येथे आलेल्या पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा अस्मा जहांगीर आणि दक्षिण आशियातील फ्री मीडिया असोसिएशनचे महासचिव इम्तियाज आलम यांनी या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेची गरज असल्याचे ठासून सांगितले आहे. |