इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाजवळ आलेल्या वादळात अडकल्याने 250 जणांना घेऊन जाणारे जहाज बुडले असून, यातील सर्व प्रवाशी आणि चालक दलाला जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने या भागात मदतदल पाठवले असले तरी या भागातील कठिण मार्ग आणि वादळामुळे येणाऱ्या अडचणींमुळे अद्यापही या जहाजातील प्रवाशांची माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही. टेराटाई नावाचे हे जहाज इंडोनेशियाच्या समरिंदाकडे जात होते. यात 250 प्रवासी तर 17 चालकदलाचे सदस्य होते. यातील काही जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले असून त्यांची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. |