मुंबई हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताच्या बाजूने बोलताना युसूफ रजा गिलानी सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. भारताने हल्ल्यासंदर्भात दिलेले पुरावे सरकारने गंभीरपणे घेऊन तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वीही कसाब हा पाकिस्तानी नागरिक असून मी त्याच्या आई-वडीलांना भेटल्याचे त्यांनी मान्य केले होते.
पाकचे पंतप्रधान गिलानी यांनी कालच भारताने हल्ल्यासंदर्भात पक्के पुरावे दिले नसल्याचे म्हटले होते. त्या संदर्भात शरीफ यांनी गिलानी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. विरोधी पक्ष पीएमएल-एनचे प्रमुख असलेल्या नवाज शरीफ यांनी सरकारला ठासून सांगितले आहे, की पुराव्यांना गंभीरपणे घेऊन वस्तूनिष्ठ चौकशी केली जावी. अन्यथा भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकने पुराव्यांची चौकशी केली नाही, असे बोलण्याची संधी मिळू शकते. |