आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » भारत-पाक संबंधात हस्‍तक्षेप नाहीः चीन
Feedback Print Bookmark and Share
 
भारत-पाकिस्तान संबंधांमध्‍ये चीन मध्यस्थी करणार नसून दोन्‍ही देशांमध्‍ये प्रत्यक्ष चर्चा व्‍हावी असा आपला पवित्रा असल्‍याचे चीनने स्‍पष्‍ट केले आहे. यापूर्वी चीनने यात हस्‍तक्षेपाची तयारी दर्शविली होती. मात्र हा प्रस्‍ताव भारताने स्‍पष्‍ट शब्‍दात फेटाळून लावला होता.

भारत सरकारच्‍या सूत्रांनी या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार चीनने भारत सरकारला स्‍पष्‍ट केले आहे, की भारत-पाक संबंधांमध्‍ये तिस-या देशाचा हस्‍तक्षेप नको या भारताच्‍या भूमिकेचा आम्ही सन्‍मान करतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्‍यक्ष बराक ओबामा आणि चीनचे राष्ट्राध्‍यक्ष हू जिंताओ यांच्‍या बीजिंग येथील भेटीनंतर चीन-अमेरिका संयुक्त वक्तव्‍यात भारत-पाक संबंधांचा उल्‍लेख करण्‍यात आल्‍याबद्दल भारताने स्‍पष्‍ट नाराजी व्‍यक्त करून यात तिस-या किंवा चौथ्‍या कोणत्‍याही देशाची मध्‍यस्‍थता स्‍वीकारली जाणार नाही असे स्‍पष्‍ट केले होते.
संबंधित माहिती शोधा