देशात ऑलिंपिक ज्योतचा शांततेचा मार्गाने विरोध करणार्या तिबेटी नागरिकांवर केंद्र सरकार अन्याय करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे.
हे आंदोलनकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सरकारने त्यांच्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिल्याचेही भाजपचे म्हणणे आहे.
भाजपची राजधानी दिल्लीत नुकतीच एक बैठक झाली यात भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यात सरकारने तिबेटी नागरिक आणि तिबेट प्रकरणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे मतही भाजप नेत्यांनी व्यक्त केले आहे.
|