महागाईच्या मुद्यावर कोंडीत सापडलेले केंद्र सरकार आता महागाई आटोक्यात राखण्यासाठी वित्तीय उपाययोजना करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी याचे संकेत दिले.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने महागाईला आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांत सीआरआर दरात अर्धा टक्क्याने वाढ केली होती. आता २९ एप्रिलला बॅंक पतधोरण समीक्षा जाहीर करेल, त्यावरून स्थिती आणखी स्पष्ट होईल. वित्तीय व पतविषयक उपाययोजनांचे दृष्य निकाल दिसायला अजून वेळ लागेल, असे चिदंबरम म्हणाले.
|