लोकसभेत 24 एप्रिल रोजी झालेल्या गोंधळावरून लोकसभेतील 32 खासदारां विरोधात अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी विशेषाधीकार समितीकडे तक्रार केल्यानंतर, आता त्यांच्या विरोधात खासदारांनी एकत्र येऊन नाराजी व्यक्त केली आहे.
तक्रार करण्यात आलेल्या खासदारांमध्ये विरोधीपक्ष खासदारांचा समावेश अधिक प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे.
लोकशाही आघाडीच्या खासदारां विरोधात चॅटर्जी यांनी घेतलेली भूमिका चुकीची असून, या विषयीची पुढील रणनीती आखण्यांसाठी लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एक बैठकही घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते विजय मल्होत्रा यांनी दिली आहे.
|