लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी बत्तीस खासदारांना गैरवर्तनासाठी शीस्तपालन समितीसमोर उभे केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) संसदेत मौन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधी पक्षनेते लालकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झालेलल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लोकसभेतील भाजपचे उपनेते व्हि के मल्होत्रा यांनी विरोधी पक्षातील खासदार लोकसभेत संपूर्ण दिवसभर मौन पाळणार असल्याचे सांगून मंगळवारी सकाळच्या बैठकीत निषेधाची दिशा निश्चित करणार असल्याचे स्पष्ट केले.
|