केंद्रातील कॉग्रेस सरकार बिहार सोबत सापत्न वागणूक करत असल्याचा आरोप माजी खासदार कीर्ती आझाद यांनी केला आहे. राज्य सरकारने वेळोवेळी केंद्राकडे विजेची आणि मदत निधीची मागणी केली आहे. परंतु केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आझाद म्हणाले.
देशात महागाई वाढत असताना सरकार महागाई रोखण्यात अपयशी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. महागाई अशीच वाढत राहिली तर येणार्या निवडणुकांमध्ये कॉग्रेस आणि सहकारी पक्षांना पराभवाचा सामना करावा लागेल असेही ते म्हणाले. याचाच फायदा भाजपला मिळेल आणि भाजप पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वाही त्यांनी व्यक्त केला
|