जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत वावड्यांना पूर्णविराम देत स्वतंत्र व निष्पक्ष मतदान घेण्याचे वचन दिले. काही राजकीय पक्ष निवडणुकीत उत्तम प्रदर्शन करू शकणार नाही या भितीतून मतदानात गैरप्रकाराबाबत अफवा पसरवण्यात येत आहे.
फक्त देशातच नव्हे तर संप़र्ण जगभरातच्या तुलनेत स्वतंत्र व निष्पक्ष निडणुका घेण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली. मतदानात गैरप्रकारात आढळल्यास शासकीय अधिकार्यांना बडतर्फ करण्याचा इशारा देताना राजकीय पक्षांना त्यांचे धोरण व कतुर्त्वाच्या जोरावर लढण्याचे आवाहन केले. राज्यात कॉंग्रेस व पीडीपी पक्षाच्या संयुक्त सरकारने शांतता व विकासाचे वातावरण निर्माण केल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.
|