देशात कोठडीत मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकार व केंद्र शासित प्रदेशास अशा घटनांबाबत चोवीस तासाच्या आत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगास माहिती देण्याचे निर्देश दिले आहे.
दोन हजार सात आठ या वर्षात पोलिस कोठडीत मृत्यू होण्याच्या संख्येत मालिग वर्षाच्या 118 मृत्यूच्या तुलनेत 188 मृत्यूपर्यंत वाढ झाली आहे. दोन हजार चार-पाच पासून आकडेवारी बघितल्यास पोलिस कोठडीत मृत्यूच्या संख्येत लक्षात येण्याजोगी वाढ झाली आहे.
पोलिस कोठडीत अत्याचार किंवा हिंसा होत असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकार्याविरूद्ध विभागीय व शिस्तपालन चौकशी सुरू करण्याची सूचना मानवाधिकार आयोगाने केली असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
|