दहशतवाद्यांनी खंडणीची मागणी करणारे धमकी देणारे पत्र मणीपूर फिल्म मंचाला पाठवल्याने मणीपुरातील सर्व सिनेमाघरांना आजपासून टाळे लावण्याचा निर्णय मंचाने घेतला आहे.
हा संप अनिश्चित काळासाठी असल्याचे मणीपूर फिल्म मंचाने स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी आमच्याकडे खंडणीची मागणी करत असून त्यांच्याशी वाटाघाटीचे प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी होत नाही
तोपर्यंत सिनेमाघरे सुरू करण्यात येणार नसल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष डब्लू ललित यांनी दिली.
|